* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KAHE KABIR DIWANA (6-10)
  • Availability : Available
  • Translators : BHARATI PANDE
  • ISBN : 9788177666786
  • Edition : 3
  • Publishing Year : JULY 2006
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 160
  • Language : Translated From HINDI to MARATHI
  • Category : RELIGIOUS & SPIRITUALS
  • Available in Combos :OSHO COMBO SET - 33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
YOGA IS NOT SUICIDE. YOGA IS A VERY ABSTRUSE PROCESS, IT IS AN ART ITSELF. THE MOMENT YOU START TAKING A SINGLE STEP AT A TIME, YOU YOURSELF WILL FIND THAT IT IS ALL THERE IN YOUR HEART. YOU WERE ACTUALLY BORN WITH IT. ONLY THING IS YOU YET HAVE TO MAKE IT EVIDENT, TO BRING IT TO REALITY. YOU ARE AN UNMANIFESTED SOUL, YOU NEED TO WORK ON REVEALING IT. THE MUSICAL INSTRUMENTS ARE READY, BUT THE FINGERS WILL TAKE SOME TIME TO GET READY. THEN THE `BINA` WILL START PLAYING. AS THE FINGERS GET TRAINED THEY WILL PRODUCE MORE VERSATILE MUSIC WITH MORE DEPTH. THERE WILL COME SUCH A WONDROUS MOMENT WHEN YOU WON`T EVEN NEED THE `BINA` OR YOUR FINGERS TO BRING IN THE CELESTIAL MUSIC. ALL THE FOUR DIRECTIONS WILL PLAY IT FOR YOU. THE MUSIC IS ALWAYS THERE IN THE UNIVERSE, YOU JUST HAVE TO PREPARE YOURSELF FOR IT, YOU NEED TO WORK ON YOUR CAPACITY. THAT CHIME IS KNOWN AS `AUM`.
‘‘योग ही काही आत्महत्या नाही. योग ही एक अतिशय गहन अशी प्रक्रिया आहे, एक कला आहे. आणि तुम्ही तर एकएक पाऊल चालत राहिलात तर सारं काही तुमच्या आतच लपलेलं आहे. तुम्ही सगळं घेऊनच आला आहात. फक्त ते प्रगट करायचं बाकी आहे. तुम्ही अप्रगट परमात्मा आहात फक्त थोडं प्रगट व्हायचं आहे. वाद्य तयार आहे, बोटं थोडी तयार करायची आहेत— मग वीणेचे स्वर निनादू लागतील. जसजशी बोटं तयार होऊ लागतील तसतसं अधिकाधिक सखोल संगीत निर्माण होईल. आणि मग एक क्षण असा येईल जेव्हा वीणेचीही गरज उरणार नाही, बोटांचीही गरज उरणार नाही— तेव्हा चारी दिशांना अस्तित्वात असलेलं परम संगीत ऐकू येऊ लागतं— फक्त तुमच्याजवळ ऐकण्याची क्षमता हवी आहे... त्या नादालाच आपण ‘ओंकार’ म्हणतो.``
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MAZE MAJAPASHI KAAHI NAAHI #OSHO #BHARATI PANDE #माझे माझ्यापाशी काही नाही #ओशो #भारती पांडे
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA 20-08-2006

    खरे प्रेम म्हणजे काय?... ओशो कुठल्याही विषयाकडे अगदी वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात. संत कबीर यांच्या दोह्यांवर ओशोंनी अनेक प्रवचनांमध्ये मार्मिक भाष्य केले आहे. त्यापैकी प्रेमविषयक दोह्यांवरचे विवचेन या पुस्तकात एकत्रित स्वरूपाचा बघायला मिळते. ‘प्रीी लागी तुम नाम की पल बिसरे नाही । नजर करो अब मिहर की मोहि मिल गुसाई’ या दोह्याच्या अनुषंगाने प्रथम: संत कबीर प्रेमाची संकल्पना पुढे मांडतात. प्रेम ही जीवनाची सार्थकतेची निशाणी, जीवनाची परम साधना, जीवनाच्या ऊर्जेचे सर्वोच्च शिखर, प्रेम मिळाले तर सर्व काही मिळाले. प्रेमापासून वंचति राहणे म्हणजे अवघे जीवनच व्यर्थ, कुचकामी, तुच्छ... प्रेम प्रत्येकजण करतो. परंतु ते चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या व्यक्तीवरही केले जाऊ शकते. प्रेम ही जीवनाची नैसर्गिक अभिव्यक्ती असते. ओशोंच्या मते तीन तर्हेचं प्रेम असतं. १) शंभरापैकी ९९ लोक प्रेम करतात ते वस्तूंवर, संपत्तीवर, घरावर, हे सर्वांत खोटं प्रेम या प्रेमाचं वैशिष्ट्य म्हणजे या प्रेमासाठी तुम्हाला तुमचं समर्पण करावं लागत नाही. तुमची कार, तुमचं घर, या वस्तूच तुमच्यासाठी समर्पित करून घेता; पण त्या वस्तूंच्या समर्पणाला काही अर्थ नाही. प्रेम करणाऱ्याला दुसऱ्याकडून शरणागतीची अपेक्षा असते. त्यामुळे व्यक्तीवर प्रेम करणे हा एक संघर्ष ठरतो. पुरुष स्त्रीवर प्रेम करतो तेव्हा स्त्रीला झुकवू पाहतो. २) वस्तूच्या प्रेमापेक्षा वरच्या स्तरावरचे प्रेम हे व्यक्तीवरचे प्रेम असते. जो व्यक्तीवर प्रेम करतो त्याच्या जीवनात वस्तूबद्दल उपेक्षा असते. परमात्म्याबद्दल तटस्थता असते. व्यक्तीवर प्रेम करणाऱ्याला उच्च दर्जाच्या प्रेमाचा रस चाखता येतो. व्यक्तीवर प्रेम करणारा माणूस पण राहात नाही. त्याच्या जीवनात आनंद असतो, उत्साह असतो; पण व्यक्तीचे प्रेम हे कधी पूर्ण होऊ शकत नाही. व्यक्तीवर प्रेम करणाऱ्या माणसाच्या आयुष्यात गुरू येण्याची दाट शक्यता असते. प्रेमामध्ये मिळणारे सुख ज्याला कळते तोच परमात्म्याच्या दिशेने जातो. ३) तिसऱ्या प्रकारचे प्रेम म्हणजे परममात्म्यावरील प्रेम. ते प्रेम पूर्ण प्रेम असते; कारण तेथे तुम्ही झुकता. तुम्हाला झुका असे सांगताना तेथे कोणी नसतो तरी तुम्ही झुकता. परमात्मा असा कोणी नसतोच. परमात्मा ही एक परम अनुपस्थिती आहे. म्हणून तुम्ही त्याला शोधले तरी तो कुठेच सापडत नाही. तो शून्यवत आहे. आकाशासारखा आहे. हिंदू, मुस्लीम, खिश्चन हे सर्व मनाचे खेळ आहेत. गुरुद्वारा, मंदिर, मस्जिद या सर्वांची निर्मिती ही मनाची करामत आहे. धर्माकडे आपण मनाच्या दृष्टीतून बघतो म्हणून धर्मसुद्धा वाटला गेला आहे. मन ही तुकडे करण्याची प्रक्रिया आहे. व्यक्तीच्या प्रेमाचा पलीकडे माणूस जातो तेव्हा परमात्म्याचे प्रेम जागृत होते. प्रीती लागी तुम नाम की - अशी नावाची प्रीती निर्माण होते... ही प्रीती गुरूमुळे निर्माण होते. गुरूची प्राप्ती झाली आता परमात्म्याची प्राप्ती होणारच. अब कबीर गुरू पाइया, मिला प्राण पियारा... जग म्हणजे मन... मनापासून मुक्त होणे म्हणजे जगापासून मुक्त होणे. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन हे सर्व मनाचे खेळ आहेत. गुरुद्वारा, मंदिर, मस्जिद या सर्वांचे निर्मिती ही मनाची करामत आहे. धर्माकडे आपण मनाच्या दृष्टीकोन बघतो म्हणून धर्मसुद्धा वाटला गेला आहे. मन ही तुकडे करण्याची प्रक्रिया आहे. मन हा भ्रम आहे. आपण मनाला माया म्हणतो. मायेचा अर्थ भ्रम. खरं आणि खोटं यांच्यामधली स्थिती. म्हणूनच मनाला खोटं म्हणता येत नाही... नाही म्हणता येत नाही. मन क्षणभंगूर आहे. बुडबुड्यासारखं ते सारखं तयार होत असतं. सारखं नष्ट होत असतं. मन ही स्वप्नसदृश अवस्था आहे. झोपेमध्ये स्वप्न नष्ट होते. जागेपणी विचार नष्ट होतो. अशी अवस्था म्हणजे जगापासून मुक्ती. मुक्ती हिमालयात जाऊन बैरागी होऊन मिळत नाही. घर म्हणजे जग नाही. कुटुंब-प्रपंच म्हणजे जग नाही. मनात जोपर्यंत अहंकार आहे. वासना आहे, विकार आहे तोपर्यंत जग आहे. मनाची विकृत अवस्था हा तुमच्या जगाचा मूलाधार आहे. जग सोडून पळू नका. विकाराचा त्याग करा. मनाचा संबंध जगाशी आहे. आत्म्याचा संबंध परमात्म्याशी आहे. मन असेल तर चारी बाजूंनी जग असेल. आत्मा झालात तर मन शिल्लक राहणार नाही. मन निर्मळ झाले तर कुठलेही स्वप्न उतर नाही. भ्रम नाही. विकार नाही. जब निर्मल करिजाना तब निर्मल माहि समाना... जग पापपुण्य भ्रमजारि, तब भयो प्रकाश मुरारी.. जगानं तुमच्याशी कसं वागावं असं तुम्हाला वाटतं, तसंच तुम्ही जगाशी वागा. परमात्मा म्हणजे अस्तित्व. परमात्मा ही व्यक्ती नाही. परमात्म्याला नाव, गाव, पत्ता काही नाही. सर्वांच्या आत लपून असलेला मूळ गुण तो असण्याचा गुण हाच परमात्मा तुम्ही नष्ट झालं की मृत्यूच्या क्षणीही अमृताचा वर्षाव होत राहिल. भारती पांडे यांनी ओशोच्या या पुस्तकाचा सुरेख अनुवाद केला आहे. -सौ. वैजयंती कुलकर्णी ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 12-11-2006

    ओशोंच्या मुखातून कबीरवाणी!... ‘ओशो’ नाव घेतलं की भारतीय मनासमोर धर्माच्या विरोधात बंड करून उठलेली आणि स्वैराचाराला प्रोत्साहन देणारी व्यक्ती डोळ्यासमोर येते. अशी सर्रास धारणा असलेल्या व्यक्तींनी एकतर ओशोंचं साहित्य वाचलेलं नसतं किंवा त्याबद्दल ते वालेल्यांकडून काही ऐकलेलंही नसतं. एक गॉसिप म्हणून ओशो बऱ्याचवेळा चघळले जातात. पण वस्तुस्थिती तर अशी आहे की, फ्रेडरिक नित्शे फ्रॉइड, रामकृष्ण, राजकारण, समाजकारण अशा सर्व विषयांवर अधिकारवाणीने मार्गदर्शन ओशोंनी केलंय. त्यांच्यावर धर्माच्या विपरित शिकवण केल्याचा आरोप केला जातो. तर त्यांच्याच भाषेत सांगायचं तर ‘मी धार्मिकता शिकवतो, धर्म नाही’ त्यामुळे अनेक संतांचे दाखले, त्यांचे विचार ओशो आपली धार्मिकता विषद करण्यासाठी मांडतात. दोह्यांमुळे आपल्याला माहिती असलेल्या कबीरांवर त्यांनी दिलेली व्याख्याने ‘मृत्यू अमृताचे द्वार’, ‘माझे माझ्यापाशी काही नाही’ आणि ‘भक्तीत भिजला कबीर’ या पुस्तकात संग्रहित करण्यात आली आहेत. ओशोंचा मुख्य विषय नेहमीप्रमाणेच परमेश्वर आणि मानव असा आहे. त्या ईश्वराला शोधण्यासाठी बाहेर नाही तर आत बघायला पाहिजे, हा उपदेश सर्वमान्य असला तरी सर्वसामान्यांच्या काही तो गळी उतरत नाही. पण कबिराच्या दोह्यांमध्ये नीट डोकावून बघितलं तर लक्षात येतं, परमेश्वर कसा आहे; तर तो जिथे हवा तिथे तसा आहे. आणि हे असं का आहे, हे ओशो मग अत्यंत रंजक अशा भाषेत पानापानात समजावत राहतात. या आशेने की, कधीतरी आपल्या मनातला अंधकार दूर होईल आणि या प्रचंड विश्वातल्या आपल्या आणि ईश्वराच्या बाबतीतल्या सत्य स्वरुपाचं आपल्याला ज्ञान होईल. साधारणपणे कुठलाही धार्मिक विषय हा रुक्ष असतो. एकदम कपाळावर भरपूर आठ्या घालून विश्वाचं ओझं आपल्याच डोक्यावर असल्यासारखी भावमुद्रा बुवांना आणि भक्तांना म्हणजे आपल्याला वागवावीच लागते. पण ओशोंच्या धार्मिकतेत मात्र निखळ विनोदाला स्थान आहे, समाजाच्या सबलीकरणाला स्थान आहे, शांततेला स्थान आहे, नृत्याला स्थान आहे. संगीताला स्थान आहे, थोडक्यात म्हणजे जीवनाला स्थान आहे. आणि जीवन आहे तर मृत्यूही आहे. या वास्तवाची जाणीव ज्यादिवशी खऱ्या अर्थी आपल्याला होते, त्यावेळी जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोनही बदलतो. मृत्यू आहे म्हणून जीवनाला काही अर्थ आहे. हे पटतं. मग कबीराचं ‘सारे जग ज्या मृत्यूला घाबरते त्याच मृत्यूने माझे मन आनंदित होते’ हे वचन आपल्याला आतल्या प्रवासाला जायला उद्युक्त करतं. लोकांनी आतल्या प्रवासाला सुरुवात करावी या उद्देशाने, धार्मिक बनावं या हेतूने असे हे कबीर आपल्याला ओशो या तीन पुस्तकांतून समजावून देतात. त्यामुळे अक्षरश: प्रत्येक व्यक्तीने ही पुस्तकं वाचणं ‘मस्ट’च आहे. -योगेश मेहेंदळे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
लोकमत २५.९.२०२३

शब्बीर रोमानी हे व्यवसायाने वकील. मातृभाषा अर्थात उर्दू आणि शिक्षण मराठी माध्यमातून झालेले. २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या उर्दू पुस्तकाला, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या साहित्य अकादमी केंद्राचे पुरस्कार लाभले आहेत. आता मिर्झागालिबवरचे नवे पुस्तक, `मी गालिब बोलतोय...!` लक्ष वेधून घेत आहे. गालिबच्या एका शेरची पहिली ओळ घेऊन सांगायचे झाल्यास, जिक्र गालिबचा आणि खूबसूरत बयान लेखकाचे असे या पुरस्काराबद्दल म्हणता येईल. मिर्जा असदुल्ला खां,`गालिब` या श्रेष्ठ शायरची शायरी, त्याचे पत्रलेखन, चरित्र यावर आजवर शेकडो पुस्तक प्रसिद्ध आहेत. लेखकाने प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार गालिबवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. मराठी, हिंदी-उर्दू लेखकांची ते तपशील पाहून आचंबा वाटतो. शिवाय शब्बीर रोमानी यांनी इथे आपल्या लेखनाचे प्रयोजन सांगताना म्हटले आहे, कि गालिबबद्दल अनेक उलट-सुलट प्रकारच्या कहाण्या, विनोद, (कसलेही शेर गालिबच्या नावाने सांगत राहणे) प्रचलित आहेत; त्यामुळे गालिबची कथा, त्याच्या पत्रांमधल्या मनोरंजक गप्पा-गोष्टी आणि त्याच्याशी निगडित आठवणी हे सगळं साध्या सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक. सर्वसामान्य माणसाच्या जगण्यातल्या सर्व भावछटा गालिबच्या काव्यातून दिसत असतात. पुस्तक वाचताना गालिबची प्रकृती, त्याची विनोद बुद्धी, संवेदनशील वृत्ती हे आपल्याला जाणवत राहते, आणि लेखकाची तळमळसुद्धा. या पुस्तकाचे वैशिष्टय म्हणजे, मोठी प्रकरण टाळून किस्से सांगावेत अशी रचना. शिवाय लेखकाची साधी-सरळ भाषा, यामुळे शायरीची आणि गालिबबद्दलची सर्वसाधारण माहिती आणि कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हे पुस्तक रंजक वाटेल. सहसा गालिबचे गाजलेले शेर, किस्से हे आपल्या वाचनात असतात. या पुस्तकात गालिबचे अनेक दुर्मिळ शेर, शिवाय फारसी रचनाही या पुस्तकात समाविष्ट असल्याने त्याला एक संदर्भ ग्रंथाचेही स्वरूप आलेले आहे. गालिबला आंबे फार आवडायचे, `मिर्झा गालिब` या गाजलेल्या चित्रपटातला तो प्रसंग आजही लक्षात आहे. आंबे खाताना एक मित्र गालिबला तुच्छतेने म्हणतो, `आम तो गधेभी नही खाते!` त्यावर गालिबने त्वरित उत्तर देतो. `सिर्फ गधेही नाही खाते!` शब्बीर रोमानी यांनी हा प्रसंग व विनोद म्हणून सांगितला नाही, तर त्याचे तपशिलाने वर्णन तर केलेच शिवाय आंब्यावरची गालिबची मोठी गजल त्यांनी दिलेली असल्याने त्या किश्श्याला एक गांभीर्य आलेले आहे. असाच एक किस्सा, ते कलकत्त्याला असताना साध्या चिकणी-सुपारीवर गालिबला कुणी छेडले होते, यावर तुमची शायरी होऊन जाऊ द्या! असे आवाहन केले. या सुपारीच्या दिसण्या-असण्यावरच्या अफलातून शायरीची भली मोठी झलकच गालिबने पेश केली! गालिबच्या एक महत्वाचा शेर आहे. जिक्र ऊस परी-वंश का और फार बयां अपना बन गया रिकीब आखिर, था जो राजदां अपना त्या परिच्या सौंदर्याचे वर्णन आणि तेही माझ्या भाषेतून, माझ्याकडून ऐकले आणि माझा जवळचा असा मित्र आता या प्रेमाच्या नात्यात माझा प्रतिस्पर्धी झाला (आता तो तिच्यावर प्रेम करायला लागला) कलकत्त्याला गालिब दीडेएक वर्ष राहिला होता. तिथल्या धनिकांनी मुशायरे, मुजरे आयोजित केलेले असायचे, गालिबचा तिथे सन्मानही व्हायचा. गालिबने या बद्दल फार जिव्हाळ्याने लिहिले आहे. या मुशायऱ्यामध्ये गालिबचे फारसीचे काव्यवाचन ऐकून फारसी भाषेचे तज्ञ त्याच्यावर नाराज झाल्याची आठवण आहे! गालिबच्या तोंडून फारसीचे कौतुक ऐकून लोकांनी आक्षेप घेतला! गालिब हा आपल्या दुःख, विवंचनेवर हसणारा अद्भुत असा कलावंत होता. हा शेर वाचल्यावर आपल्याला मुन्शी प्रेमचंद यांच्या `पूस कि रात` मधला हलकू आठवतो! मिर्झा गालिबच्या कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हा संग्रह आवडण्यासारखाच आहे. लेखनातल्या भाषिक काही त्रुटी वगळल्यास, गालिबचे किस्से, त्याची शायरी हे सगळे रोचक आहे. ...Read more

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
पुस्तकप्रेमी

मीना कश्यप शाह *मृत्युंजयी* भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लगणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊन जात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more