* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE DIFFICULTY OF BEING GOOD
  • Availability : Available
  • Translators : SUDARSHAN ATHAWALE
  • ISBN : 9789353171148
  • Edition : 1
  • Publishing Year : SEPTEMBER 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 536
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : RELIGIOUS & SPIRITUALS
  • Available in Combos :GURUCHARAN DAS BIRTHDAY OFFER
Quantity
Buying Options:
  • Print Books:
WHY SHOULD WE BE GOOD? HOW SHOULD WE BE GOOD? AND HOW MIGHT WE MORE DEEPLY UNDERSTAND THE MORAL AND ETHICAL FAILINGS--SPLASHED ACROSS TODAY`S HEADLINES--THAT HAVE NOT ONLY DESTROYED INDIVIDUAL LIVES BUT CAUSED WIDESPREAD CALAMITY AS WELL, BRINGING COMMUNITIES, NATIONS, AND INDEED THE GLOBAL ECONOMY TO THE BRINK OF COLLAPSE? IN THE DIFFICULTY OF BEING GOOD, GURCHARAN DAS SEEKS ANSWERS TO THESE QUESTIONS IN AN UNLIKELY SOURCE: THE 2,000 YEAR-OLD SANSKRIT EPIC,MAHABHARATA. A SPRAWLING, WITTY, IRONIC, AND DELIGHTFUL POEM, THE MAHABHARATA IS OBSESSED WITH THE ELUSIVE NOTION OF DHARMA--IN ESSENCE, DOING THE RIGHT THING. WHEN A HERO DOES SOMETHING WRONG IN A GREEK EPIC, HE WASTES LITTLE TIME ON SELF-REFLECTION; WHEN A HERO FALTERS IN THE MAHABHARATA, THE ACTION STOPS AND EVERYONE WEIGHS IN WITH A DIFFERENT AND OFTEN CONTRADICTORY TAKE ON DHARMA. EACH MAJOR CHARACTER IN THE EPIC EMBODIES A SIGNIFICANT MORAL FAILING OR VIRTUE, AND THEIR STRUGGLES MIRROR WITH UNCANNY PRECISION OUR OWN FAMILIAR EMOTIONS OF ANXIETY, COURAGE, DESPAIR, REMORSE, ENVY, COMPASSION, VENGEFULNESS, AND DUTY. DAS EXPLORES THEMAHABHARATA FROM MANY PERSPECTIVES AND COMPARES THE SUCCESSES AND FAILURES OF THE POEM`S CHARACTERS TO THOSE OF CONTEMPORARY INDIVIDUALS, MANY OF THEM HIGHLY VISIBLE PLAYERS IN THE WORLD OF ECONOMICS, BUSINESS, AND POLITICS. IN EVERY CASE, HE FINDS STRIKING PARALLELS THAT CARRY LESSONS FOR EVERYONE FACED WITH ETHICAL AND MORAL DILEMMAS IN TODAY`S COMPLEX WORLD. WRITTEN WITH THE FLAIR AND SEEMINGLY EFFORTLESS ERUDITION THAT HAVE MADE GURCHARAN DAS A BESTSELLING AUTHOR AROUND THE WORLD--AND ENLIVENED BY DAS`S FORTHRIGHT DISCUSSION OF HIS OWN PERSONAL SEARCH FOR A MORE MEANINGFUL LIFE--THE DIFFICULTY OF BEING GOOD SHINES THE LIGHT OF AN ANCIENT POEM ON THE MOST CHALLENGING MORAL AMBIGUITIES OF MODERN LIFE.
महाभारताच्या प्रदीर्घ अभ्यासानंतर गुरुचरण दास यांनी आपल्या लेखनाद्वारे हा महान ग्रंथ आजच्या दैनंदिन जीवनातील पेचप्रसंगांवरही कसा प्रकाश टाकू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी केलेले धर्माचे विविधांगी सखोल विश्लेषण वाचकांना वेगळीच मर्मदृष्टी देते. या पुस्तकातही महाभारताप्रमाणे नैतिक, राजकीय आणि सार्वजनिक - सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब उमटले आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#GURCHARANDAS #SUDARSHAN ATHAVALE #RELIGIOUS #THEDIFFICULTYOFBEINGGOOD #द डीफीकल्टी ऑफ बिईंग गुड #मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI "
Customer Reviews
  • Rating StarANIL KAVNEKAR

    हा अनुवाद वाचला. आवडला. महाभारत समजून घेण्यासाठी हे पुस्तक फारच महत्वपूर्ण आहे. व्यावहारिक दाखले देऊन साध्यासोप्या भाषेत महाभारत समजून देण्याचा लेखकाचा प्रयत्न स्तुत्य आहे. प्रकाशनाबद्दल धन्यवाद.

  • Rating StarLOKPRABHA 15-02-2019

    महाभारत आणि आधुनिक जीवनाची सांगड... महाभारत हे एक अजरामर महाकाव्य असून मानवी स्वभावातील सर्व भावभावना आणि प्रवृत्तींचे दर्शन यातून घडते. महाभारत हा पौराणिक ग्रंथ असला तरीही त्याकडे तत्त्वज्ञान, नीतीशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र शा विविध कसोट्यांवरही पाहता येते. या कसोट्या लावून महाभारत आणि त्यातील सर्व व्यक्तिरेखांकडे नव्या विचाराने आपण पाहू शकतो. हजारो वर्षांपूर्वी असलेल्या मानवी प्रवृत्ती आजच्या काळातही तंतोतंत कशा लागू पडतात याचीही पडताळणी सहज करता येऊ शकते. हार्वर्ड विद्यापीठाचे पदवीधर, संस्कृत आणि तत्त्वज्ञान विषयाचे अभ्यासक, ‘प्रॉक्टर अ‍ॅण्ड गॅम्बल’ या कंपनीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी गुरुचरण दास यांनी ‘द डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड’ या ग्रंथात महाभारत आणि आधुनिक जीवन यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. माणसांच्या दैनंदिन जीवनातील समस्या सोडविण्यासाठी महाभारताची मदत घेण्याचे काम या ग्रंथाने केले असून मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद सुदर्शन आठवले यांनी केला आहे. महाभारतात नैतिक, राजकीय आणि सार्वजनिक जीवनाचे प्रतिबिंब उमटले असून महाभारत हे कालातील आहे. सध्याच्या अनिश्चित, अमर्याद स्पर्धेच्या जगात नीती-अनितीचा समतोल साधून कसे जगायचे? याचे उत्तर या पुस्तकाच्या माध्यमातून दास यांनी वाचकांसमोर ठेवले आहे. महाभारत हे मानवी बुद्धी आणि कल्पनाशक्ती यांचे दर्शन घडवणारी सर्वश्रेष्ठ कलाकृती असून त्यातील नीतिमत्तेविषयीच्या कल्पना आणि आजचे तत्त्वज्ञान या दोन्हीचे विश्लेषण दास यांनी या ग्रंथात केले आहे. योग्य-अयोग्य, चूक-बरोबर या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न महाभारत या महाकाव्यात करण्यात आला असून माणसाच्या अपयशाची, अध:पतनाची कारणे शोधण्याचाही प्रयत्न झाला आहे. समाजात सुसंवाद आणि सुख नांदण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी धर्मानुसार आचरण करण्याची गरज असते. धर्म हा शब्द जरासा जटिल आहे. आपल्या विहित कर्तव्याची प्रामाणिक पूर्ती म्हणजे धर्म, नीतिनियमांचे कठोर पालन म्हणजे धर्म. धर्माचा मुख्य रोख असतो तो योग्य आणि न्याय्य वागण्यावर. भारतीय संस्कृतीचा पाया असणाऱ्या महाभारत या ग्रंथात आपल्या भोवतालच्या समाजाच्या नीतिमत्तेचा अर्थपूर्ण दंडक पुन्हा शोधता येईल का? असा विचार दास यांच्या मनात रुंजी घालत होता आणि त्यातून या ग्रंथाची निर्मिती झाली. ‘धर्म’ या संकल्पनेची नेमकी व्याख्या करणे अवघड आहे. कर्तव्य, चांगुलपणा, नैतिकता, न्याय, यमनियम हे सर्व यात येते. पण ते पुरेसे नाही. धर्म म्हणजे या विश्वातील नीती-अनितीचा, सृष्ट-दुष्ट प्रवृत्तींचा समतोल आहे. प्रत्येक व्यक्तीची बुद्धी आणि त्याचा विवेक यांवर त्याच्या मनातील सत् आणि असत् ही पारडी वर-खाली होत असतात आणि तेच धर्माचे परिणाम. धर्माच्या मूळ संकल्पनेविषयीची शंका, त्याच्या पूर्णार्थाविषयीची गुंतागुंत हा महाभारताच्या कथनाचा व्यापक हेतू आहे. महाभारत हे महाकाव्य म्हणजे या जगात चांगल्या प्रकारे जीवन व्यतीत करायचे असेल तर नेमके काय केले पाहिजे? याचे सविस्तर स्पष्टीकरण देण्याचा विस्तृत आणि सर्वसमावेशक प्रयत्न असल्याचे दास यांचे म्हणणे आहे. ग्रंथाची सुरुवात ‘दुर्योधनाची असूया’ आणि ‘द्रौपदीची निर्भयता’ या प्रकरणांनी होते. या प्रकरणात महाभारतातील कौरव आणि पांडवातील द्यूत खेळ, पांडवांचे द्रौपदीला पणाला लावणे, भर दरबारात होणारे द्रौपदी वस्त्रहरण, समोर अधर्म, अत्याचार होत असतानाही शांत राहणारे दरबारातील धृतराष्ट्र आणि अन्य महारथी याविषयी दास यांनी सविस्तर विवेचन केले आहेच, पण त्यांनी याची सांगड आधुनिक काळातील अंबानी बंधू, त्यांचे साम्राज्य, त्याच्या झालेल्या वाटण्या, त्यांच्यातील भाऊबंदकीशी घातली आहे. महाभारतातील प्रसंग, व्यक्तिरेखा यांचे वागणे आणि त्या वर्तनाचे आजच्या काळातील विश्लेषण दास यांनी केले आहे. युद्धिष्ठिराची कर्तव्यबुद्धी, अर्जुनाचा विषाद, भीष्मांचा नि:स्वार्थ, कर्णाची त्याच्या समाजातील स्थानाविषयीची चिंता, श्रीकृष्णाचे कपट, अश्वत्थाम्याचा सूड, युधिष्ठिराचा पश्चात्ताप, महाभारताचा धर्म अशा विविध प्रकरणांमधून हा ग्रंथ उलगडत जातो. डोळ्यांवर कातडे ओढणे, नैतिकतेकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणे ही माणसाची अटळ अशी प्रवृत्ती आहे? की त्यात बदल करणे शक्य आहे? यातील काही गोष्टी आजच्या शासनाच्या कार्यपद्धतीचा परिणाम असतात. त्या शासनाला आपण सर्व संबधित शासकीय आणि सामाजिक संस्थांच्या रचना, घटना यात उचित असा बदल करून अधिक काळजीवाहू, जनतेविषयी सहानुभूती बाळगणारे बनवू शकू का? महाभारतात धर्म या गहन संकल्पनेचे जे बहुविध कोनातून दर्शन घडविले आहे त्यातून मी या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आणि आपले आयुष्य आपण कशा पद्धतीने जगले पाहिजे? हे शोधण्याचा प्रयत्न केला तीच या ग्रंथाच्या लेखनामागील स्फूर्ती आहे, असे ग्रंथातील ‘निष्कर्ष’ या प्रकरणात लेखक दास यांनी म्हटले आहे. ग्रंथात संदर्भग्रंथांचा परिचय, टिपा आणि खिस्तपूर्व २५००-१५०० ते इसवी सन १६५०-१६७० या कालखंडातील घटनांचा कालक्रमही देण्यात आला आहे. दास यांनी या ग्रंथातून महाभारत या महाकाव्याचा एक वेगळा पैलू समोर आणला असून त्यांनी धर्माचे विश्लेषण वेगळ्या पद्धतीने केले आहे. महाभारत हा पौराणिक ग्रंथ आजच्या काळातील आपल्या दैनंदिन जीवनातील नैतिक पेचप्रसंगांवरही कसा प्रकाश टाकू शकतो ते दास यांनी या ग्रंथातून दाखवून दिले आहे. महाभारत काळातील आणि आजच्या काळातील नीतिमानतेच्या परिणामातील संदिग्धता, अनिश्चितता यांतील आश्चर्यकारक साम्यही दास यांनी या ग्रंथातून वाचकांसमोर ठेवले असून आजच्या अवघड, संघर्षमय, गुंतागुंतीच्या जीवनाशी सामना कसा करायचा हेही समजावून सांगितले आहे. –शेखर जोशी ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 28-10-2018

    महाभारताचा आधुनिक वेध... एकेकाळी ‘प्रॉक्टर अ‍ॅण्ड गॅम्बल’ या जगप्रसिद्ध कंपनीचे सीईओ असलेले गुरुचरण दास हे साहित्य प्रांतात ‘इंडिया अनबाउंड’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक म्हणून विख्यात आहेत. त्यांचे नुकतेच ‘द डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड’ हे पुस्तक प्रकाशि झाले असून, त्याचा सुदर्शन आठवले यांनी मराठीत अनुवाद केला आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने हा अनुवाद प्रसिद्ध केला आहे. भारतीयांचा महान ठेवा असलेल्या महाभारताने त्यांनाही वेड लावले. त्याची अनेक पारायणे त्यांनी केली. त्यातून या महाकाव्याचा एक आगळा पैलू या पुस्तकाद्वारे त्यांनी वाचकांसमोर उलगडला आहे. महाभारत आपल्या रोजच्या जीवनातील नैतिक पेचप्रसंगावरही कसा प्रकाश टाकू शकते, हे लेखकाने अत्यंत विद्वत्तापूर्ण दाखवून दिले आहे. कथानकांची सर्वांधिक गुंतवळ असलेल्या या महाकाव्याचा लेखकाने आधुनिक वेध घेतला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHASAMRAT RANKHAINDAL
MAHASAMRAT RANKHAINDAL by VISHWAS PATIL Rating Star
गंधार

नमस्ते सर, काल रात्री मी रणखैनदळ मध्ये आपण लिहलेला पावनखिंडीतील थरार वाचून काढला. कालची रात्र मी कधीच विसरणार नाही. जणू काही मीच महाराजांसोबत प्रवास करणारा एक मावळा आहे. महाराज थकल्यावर त्यांच्या तळपायांना राईचं तेल चोळून देतो आहे, त्यांच्यासह नाचणीच भाकर खातो आहे असं मला वाटतं होतं. सर, एखाद्या लहान मुलाला आकाशातल्या तारका दाखवाव्यात त्याचप्रमाणे आपण इतिहासाच्या नभांगणातील असंख्य तारकांचं दर्शन घडवून आणता आणि छत्रपती शिवराय हा अर्थातच ताऱ्यांमधील तारा असा ध्रुवतारा आहे ज्याचं अनोखं असं दर्शन महासम्राट मधून घडतंय. सर, माझी केवळ मागच्या जन्मीची पुण्याई म्हणून मी आपल्याला भेटू शकलो. ...Read more

FOUR SEASONS
FOUR SEASONS by SHARMILA PHADKE Rating Star
लोकसत्ता १०.९.२०२३ (लोकरंग) वंदना बोकील-कुलकर्णी

माणसांवाचून रिकामी गावं, रस्ते, घरं न पाहवणारी, अंजनमाळावरच्या नागदेवीच्या कातळावर रणरण उन्हात सर्वागाने उन्हं पिऊन घेणारी, आपली उन्हात तापून दग्ध तांबूस झालेली देहाकृती व्हिन्सेंटने (व्हान गॉग) पाहावी आत्ता या क्षणी आणि तिच्या मोहात पडून त्यानेती आपल्या कॅनव्हासवर रेखाटावी असं आसुसून वाटणारी एक अतिसंवेदनशील तरुणी कामायनी ही शर्मिला फडके यांच्या ‘फोर सीझन्स’ या कादंबरीची नायिका. या नायिकेची चार प्रदेशात, चार ऋतूंमध्ये, चार पुरुषांच्या सहवासात घडणारी कहाणी म्हणून तिचं शीर्षक ‘फोर सीझन्स’. ‘फोर सीझन्स’ ही खऱ्या अर्थाने आत्ताची कादंबरी आहे. कदाचित पहिली ब्लॉग कादंबरी. कारण लेखिकेने कादंबरीच्या नायिकेच्या नावाने ‘टय़ुलिप्स अॅण्ड ट्वायलाइट’ या ब्लॉगवर पोस्ट्स लिहिल्या. ‘कादंबरीने बऱ्यापैकी आकार घेतल्यावर, व्यक्तिरेखा सुस्पष्ट झाल्यावर’ मग हा ब्लॉग तिने बंद केला. ‘ब्लॉग अर्काइव्हमध्ये जमा झालेल्या शेकडो पोस्ट्सवरून मॅपिंग करत’ कादंबरीचा आत्ताचा आकार तिने सिद्ध केला. हिची निर्मितीप्रक्रिया आत्ताच्या तंत्रसाहाय्याने, समाजमाध्यमांचा शहाणा उपयोग करून घेऊन झाली आहे. या अर्थाने ही आत्ताची कादंबरी. अलीकडे म्हणजे साधारण गेल्या दहा वर्षांत नव्याने लिहू लागलेल्या लेखकांत हिरिरीने आपली भूमिकावाहक पात्रे निर्माण करण्याची जी वृत्ती दिसते तिच्यात न अडकता आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहत आणि तरी कथनात्म साहित्याच्या मागण्या नीट कळून घेत लेखन करणाऱ्यांमध्ये शर्मिला फडके ही लेखिका लक्ष वेधून घेते. मोजके लेखन आहे तिचे पण खरेच लक्षात राहणारे. गेल्या पाच-सहा वर्षांत विविध दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झालेल्या तिच्या कथा पाहिल्या तरी हे पटेल. ‘ये शहर बडा पुराना है’ ही कथा वाचकांना ताबडतोब आठवेल. याशिवाय विविध ठिकाणी कलाइतिहास, कलासमीक्षा, प्रवास याही विषयांवर तिचे लेखन सातत्याने चालू आहे. तिचे मूळ शिक्षण वनस्पतीशास्त्र या विषयातलं. नंतर पत्रकारिता आणि कलाइतिहास यांचेही पदव्युत्तर शिक्षण तिने घेतले. ही तिन्ही क्षेत्रं भटकंतीला पूरक. शर्मिला फडके यांना प्रवासाचीही आवड आहे. फॅशनेबल पर्यटन नव्हे, प्रवास. खरीखुरी हवा, माती, झाडंझुडं, पाणी, नद्या अंगावर घेत केलेला प्रवास. आणि हे करताना त्यांच्या संवेदना तल्लखपणे आजूबाजू टिपून घेत असतात. त्यामुळे त्यांच्या लेखनाचे विषय अनोखे आणि साहजिकपणे त्यांच्या अभ्यासविषयाशी आतून नातं सांगणारे असले तरी आजूबाजूला असलेलं वातावरण, सामाजिक-सांस्कृतिक घडामोडी यांचं भान असलेल्या एका डोळस कलाप्रेमी स्त्रीचं अनुभवविश्व त्यातून आकाराला येतं. ‘फोर सिझन्स’ ही त्यांची कादंबरी लेखक म्हणून त्यांचे जे वृत्तिविशेष आहेत त्यांचा प्रत्यय देणारी आहे. स्त्रियांनी लिहायचे ते खास त्यांच्याच रूढ अनुभवविश्वाविषयी असा जणू पायंडा पडलेला असताना ही लेखिका मात्र अशा विश्वाचा पसारा मांडते की जे खरंच अनवट आहे. या कथनाची नायिका कामायनी मुंबई, सुंदरबन, युरोप आणि माळरान अशा भूप्रदेशांमध्ये काही काळ वावरते. नुसती वावरत नाही तर जिवेभावे तिथे गुंतते. चार भूप्रदेश, तिथे भेटलेले चार पुरुष- तेही भिन्न विचारसरणीचे, प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे, त्यांच्या विचारांचा खोलवर परिणाम होऊन कच्च्या वयापासून वैचारिक, भावनिक आणि मानसिक गोंधळात वाढत गेलेली ही तीव्र बुद्धिमत्ता आणि कमालीची संवेदनशील असणारी मुलगी. मुंबईमध्ये वडिलांच्या वयाचा त्यांचा मित्र आणि तिला अगदी जन्मापासून ओळखणारा तिचा पालक म्हणावा असा जोसेफ, अनिर्बन बॅनर्जीच्या प्रभावाखाली सुंदरबनात दाखल, पण तिथे मनासारखे काहीच घडत नाही. उलट प्रेमात आणि कामात अपयश घेऊन पळून येणं. मग काही काळ पुन्हा मुंबई. मग जोसेफ तिला युरोपात पाठवतो. तिथे भेटतो इटालियन एरिक. तिथेही तेच घडते. विझून गेलेली, हरलेली आणि आत्मविश्वास गमावून बसलेली ती पुन्हा मुंबईत जोसेफच्या वळचणीला येते. तो तिला एक काम देऊन अंजनमाळ या माळरानावर पाठवतो. तिथे भेटतो विहान. माणूस आहे तिथे मतं आणि मतभेद आहेत, गुंतणं-गाठी बसणं आहे, संघर्ष तर आहेतच. पण या माळरानावर तेवढी ती तिची आहे. ती माळरानाच्याच प्रेमात पडते. कादंबरीत पात्रे म्हणाल तर कामायनीचे आईबाबा, त्यांच्याच बंगल्याच्या दुसऱ्या भागात राहणारे बानिदा, इरादी बॅनर्जी आणि त्यांचा मुलगा अनिर्बन, जोसेफ, एरिक, माळरानावर संशोधन करणारा विहान आणि त्याचे काका आस्ताद, रघु, मधोक हे मित्र आणि ती जिथे काम करते तिथले श्रीरंजन, निर्मल, नाडकर्णी वगैरे सहकारी. गेस्ट हाऊसची राखण करणारे राणू व लाखी आणि दहाबारा वर्षांची त्यांची मुलगी मणी. मरून गेलेली मार्गारेट फिलीप ग्रॅहम ही वनस्पतींची अभ्यासक, तिच्याशी एकनिष्ठ असलेला येशा हा तिचा मदतनीस पोरगा- ज्याची आता शंभरी उलटून गेली आहे. बस्स. माणसांचा आणि त्यांच्या नात्यांचा मोठा पसारा नाही मांडत लेखिका. या सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात जिवंत आहे तो निसर्ग. तोही तुमच्या आमच्या नेहमीच्या सवयीचा, चकचकीत, कॅमेरा किंवा तत्सदृश शब्दांतून दिसणारा, जणू काय आपलं मनोरंजन करण्याच्या डय़ुटीवर नेमलेला नव्हे. इथे त्याची जिवंत स्पंदनं आपल्याला जाणवतात. आपण उन्हात तापतो, आपल्याला उन्हाचा खरपूस वास येऊ लागतो. आपण सुंदरबनातल्या काळय़ा पाण्यात आणि दलदलीत पाय टाकायला कचरतो.. हा असा साक्षात अनुभव लेखिका तुम्हाला देते. अतिशय वैशिष्टय़पूर्ण रचना आहे या कादंबरीची. कधी प्रथमपुरुषी निवेदन, कधी तृतीयपुरुषी. कधी दैनंदिनीतल्या नोंदी. कधी नायिकेने स्वत:शीच केलेले विचार, कधी तिला पडणारी स्वप्नं तर कधी मार्गारेटच्या दैनंदिनीतल्या नोंदी. मुख्य प्रकरणं चार. ऋतू पहिला, ऋतू दुसरा.. अशा शीर्षकांची. त्यात उपशीर्षके असलेले लहान लहान परिच्छेद. कदाचित आधी ब्लॉग लिहून मग त्यातून कादंबरीचे कथानक रचल्यामुळे असेल, पण ही रचना एकाच वेळी अनेक पातळय़ांवर फिरते. त्यामुळे अनेक दिशीय, अनेक स्तरीय वास्तवाचा अनुभव वाचतावाचता येत राहतो. कादंबरीच्या आशयाशी इतकं थेट संलग्न असलेलं विविध पातळय़ांवर फिरणारं निवेदनतंत्र वाचकांच्या सवयीचे नाही. पण एकदा का तुम्ही या नायिकेबरोबर तिच्या पावलांनी चालू लागलात की.. आणि तसे चालताच तुम्ही.. की मात्र या निवेदनाची जादू आणि गंमत समजते. नायिकेची गोष्ट कधी ती सांगते तर कधी निवेदिका सांगते. निवेदनतंत्र इतक्या ताकदीने वापरणं आणि ते ‘वापरलं आहे’ याची जाणीव होऊ न देणं, यात या कादंबरीचं बरंच यश सामावलं आहे. उत्तम भाषाशैली आणि प्रतिमांचा फार नेमका वापर यांचाही त्यात वाटा आहेच. नायिका जशी जगते आहे, निसर्गाच्या चक्रातून स्वत:चे आयुष्य समजून घेते आहे तसं हे लेखन आहे. आखीव नाही, असं वाटणारं. तिची नजर जाते तो तो निसर्गाचा आविष्कार ती सांगते. नायिकेच्या रंग, गंध आणि स्पर्शाच्या संवेदना विशेष तल्लख आहेत. त्यामुळे तिच्या वर्णनांत चित्रकाराच्या पॅलेटवरचे रंग आणि त्यांच्या अगणित छटा येत-जात राहतात. व्हान गॉग, मोने वगैरे चित्रकारांच्या चित्रांचे संदर्भ येतात. सुंदरबन आणि युरोपातल्या आठवणी त्यात आपले धागे मिसळत राहतात. ती मनातले गोंधळ उघड करते. ते गोंधळ का निर्माण झाले, याचा वाचकांच्या साक्षीने शोध घेते. पहिल्याच मोठय़ा प्रकरणात आता लेखिका हे सारे कसे सोडवणार, म्हणून उत्सुकता आणि काळजीही वाटते कारण सरधोपट निवेदनाचा रस्ता तिने सोडून दिला आहे. या कादंबरीत आहे तसं रखरख माळरान कुणी कधी शब्दांतून क्वचितच मांडलं असेल. उन्हाच्या सुया डोळय़ांत घुसत असताना ही एका आंतरिक हट्टानं तिथे राहते. जगते. त्या उन्हात तिच्या आतले बर्फाचे गोठलेले प्रदेश वितळून वहाते होतात. तिची ती तिला सापडत जाते. ज्या प्रश्नांपासून ती पळत होती, त्या प्रश्नांना भिडण्याचे बळ ते ऊन तिला देते. अवघ्या तीस वर्षांच्या तिच्या आयुष्यात झालेले गुंते, गाठी हळूहळू सुटत जातात, सुरुवातीची ‘टय़ुलिपचे फूल वाटणारी ती अखेरीस एखादे रानफूल वाटू लागते.’ त्या प्रवासाची ही कहाणी आहे. या नायिकेला मिथक, लोककथा, झाडं-पानं-फुलं-पक्षी या सगळय़ांत रस आहे. नागदेवीच्या कातळाची कहाणी, आदिवासी तिथे करत असलेले विधी समजून घेण्याचा तिचा प्रयत्न आहे. राणू, त्याचा शंभरी पार केलेला वृद्ध बाप येशा, यांच्याशी संवाद साधण्याची, त्यांच्याकडून जुनी घटितं जाणून घेण्याची आणि ते ठिपके जोडत सलग चित्र पूर्ण करण्याची तिला निकड वाटते. मणी तर तिची छोटी मैत्रीण होऊन जाते. या कादंबरीच्या गाभ्याकडे अनेक वाटांनी जावं लागतं.. नायिकेच्या आई-वडिलांचं नातं विस्कटलेलं असणं, तिचं आईशिवाय मोठ होणं, वडिलांनी कामात बुडवून घेणं, अडनिडय़ा वयातल्या एकटेपणात बॅनर्जीकडे रमणं, त्यांच्या तरुण मुलाच्या प्रेमात पडणं. बाबांना दुखवायचं म्हणून वडीलधारेपण निभावणाऱ्या जोसेफकडे ओढा वाढणं, तरी त्याला जे नको वाटतं तेच तिनं निवडणं, अनिर्बनकडे जाणं. मग तिथून पळून युरोपात. तिथे एरिकच्या प्रेमात पडणं, करियरची वाट लागून, पूर्ण खचून मुंबई- पुन्हा जोसेफ आणि मग माळरान. हा सगळा प्रवास एका स्तरावर आहे. दुसऱ्या पातळीवर, माणसाचा जागतिक स्तरावरचा वावर, त्याला भेटणारी विविध देशीविदेशी माणसं, परदेशातील वास्तव्याची संधी, त्यामुळे होणारी भावनिक-शारीरिक जवळीक, त्यातून निर्माण होणाऱ्या वैयक्तिक जीवनातल्या समस्या आहेत. तिसऱ्या पातळीवर पर्यावरण आणि विकास यासंबंधीचे असंख्य स्थूल-सूक्ष्म धागे आहेत. नायिका जाहिरात क्षेत्रात करियर असणारी. ते क्षेत्र आणि पर्यावरण कायम विरोधी गटात. दोन्ही बाजू जनसामान्यांची करत असलेली अशुद्ध दिशाभूल, विस्थापितांचे पुनर्वसनाचे प्रश्न, ‘विस्थापितांचा प्रश्न केवळ जमिनी गमावण्याचा नसतो, तो मुळं उखडलं जाण्याचा असतो’, याविषयी असणारी कमालीची असंवेदनशीलता, प्रश्नांचा समग्र विचार न करता एकेका सुटय़ा घटकांचा विचार करून योजलेले तात्कालिक उपाय, हत्ती आणि सहा आंधळय़ांच्या प्राचीन गोष्टीतून आपण काहीच शिकलो नसल्याची चरचरीत जाणीव.. हे सगळं ही कादंबरी स्वत:त गुंफून घेते. म्हणजेच कालसमांतर आशय ती आपल्या पदरात घालते. नायिका ज्या जाहिरात क्षेत्रात काम करतेय तिथे येणारे कडवट अनुभव, स्वत:च केलेले सगळे नियम धाब्यावर बसवणाऱ्या सरकारी व्यवस्था, हिरव्या रंगाच्या ‘वॉश’खाली भयानक प्रदूषण करणाऱ्या उत्पादनांना मिळणाऱ्या परवानग्या आणि त्याविषयी उदासीन असणारी विविध पदांवरची माणसं. निकराने त्याला विरोध करणारे पर्यावरणस्नेही कार्यकर्ते आणि संस्था, याविषयी विचार करायला लावते ही कादंबरी. ही सगळी वीण गच्च विणली आहे. म्हणूनच ती वाचायला मजा येते. म्हणजे हिच्यात काही कमतरता वा त्रुटी नाहीत का? नाहीत कशा.. पण दुर्लक्ष कराव्यात अशा नक्कीच. उदा. जोसेफ, रघु, मधोक, आस्ताद, विहान यांच्या आयुष्यात कोणीच स्त्रिया कशा नाहीत? इतक्या जवळिकीच्या आणि प्रदीर्घ काळाच्या नात्यात कधीतरी त्या व नायिका आमनेसामने येऊ शकल्या असत्या. अशा तिढय़ांना सफाईने बगल दिली आहे. त्यामुळे समग्र चित्रात फटी राहिल्या आहेत. सहसा लेखिका ज्या तऱ्हेचं लेखन करत नाहीत तसं वाचायला मिळालं की सुखद वाटतं. स्त्री असण्याच्या परीघरेषा ओलांडून ही नायिका व्यक्ती म्हणून वेगळे आयुष्य जगते. सहजधर्मानं, अभिनिवेशानं नव्हे म्हणून आणखी बरं वाटतं. लेखिका, संपादक, संवादक, समीक्षक आणि कथा अभ्यासक अशा अनेक भूमिकांमध्ये सतत कार्यरत. ‘संवादसेतू’ या लक्षवेधी दिवाळी अंकाचे संपादन. कथक नृत्यांगना रोहिणी भाटे यांच्यावरील ‘रोहिणी निरंजनी’ हा गाजलेला ग्रंथ, ‘मंगला गोडबोले यांच्या निवडक कथां’ यासह अनेक पुस्तकांच्या संपादिका. ...Read more