* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE DIFFICULTY OF BEING GOOD
  • Availability : Available
  • Translators : SUDARSHAN ATHAWALE
  • ISBN : 9789353171148
  • Edition : 1
  • Publishing Year : SEPTEMBER 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 536
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : RELIGIOUS & SPIRITUALS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
WHY SHOULD WE BE GOOD? HOW SHOULD WE BE GOOD? AND HOW MIGHT WE MORE DEEPLY UNDERSTAND THE MORAL AND ETHICAL FAILINGS--SPLASHED ACROSS TODAY`S HEADLINES--THAT HAVE NOT ONLY DESTROYED INDIVIDUAL LIVES BUT CAUSED WIDESPREAD CALAMITY AS WELL, BRINGING COMMUNITIES, NATIONS, AND INDEED THE GLOBAL ECONOMY TO THE BRINK OF COLLAPSE? IN THE DIFFICULTY OF BEING GOOD, GURCHARAN DAS SEEKS ANSWERS TO THESE QUESTIONS IN AN UNLIKELY SOURCE: THE 2,000 YEAR-OLD SANSKRIT EPIC,MAHABHARATA. A SPRAWLING, WITTY, IRONIC, AND DELIGHTFUL POEM, THE MAHABHARATA IS OBSESSED WITH THE ELUSIVE NOTION OF DHARMA--IN ESSENCE, DOING THE RIGHT THING. WHEN A HERO DOES SOMETHING WRONG IN A GREEK EPIC, HE WASTES LITTLE TIME ON SELF-REFLECTION; WHEN A HERO FALTERS IN THE MAHABHARATA, THE ACTION STOPS AND EVERYONE WEIGHS IN WITH A DIFFERENT AND OFTEN CONTRADICTORY TAKE ON DHARMA. EACH MAJOR CHARACTER IN THE EPIC EMBODIES A SIGNIFICANT MORAL FAILING OR VIRTUE, AND THEIR STRUGGLES MIRROR WITH UNCANNY PRECISION OUR OWN FAMILIAR EMOTIONS OF ANXIETY, COURAGE, DESPAIR, REMORSE, ENVY, COMPASSION, VENGEFULNESS, AND DUTY. DAS EXPLORES THEMAHABHARATA FROM MANY PERSPECTIVES AND COMPARES THE SUCCESSES AND FAILURES OF THE POEM`S CHARACTERS TO THOSE OF CONTEMPORARY INDIVIDUALS, MANY OF THEM HIGHLY VISIBLE PLAYERS IN THE WORLD OF ECONOMICS, BUSINESS, AND POLITICS. IN EVERY CASE, HE FINDS STRIKING PARALLELS THAT CARRY LESSONS FOR EVERYONE FACED WITH ETHICAL AND MORAL DILEMMAS IN TODAY`S COMPLEX WORLD. WRITTEN WITH THE FLAIR AND SEEMINGLY EFFORTLESS ERUDITION THAT HAVE MADE GURCHARAN DAS A BESTSELLING AUTHOR AROUND THE WORLD--AND ENLIVENED BY DAS`S FORTHRIGHT DISCUSSION OF HIS OWN PERSONAL SEARCH FOR A MORE MEANINGFUL LIFE--THE DIFFICULTY OF BEING GOOD SHINES THE LIGHT OF AN ANCIENT POEM ON THE MOST CHALLENGING MORAL AMBIGUITIES OF MODERN LIFE.
महाभारताच्या प्रदीर्घ अभ्यासानंतर गुरुचरण दास यांनी आपल्या लेखनाद्वारे हा महान ग्रंथ आजच्या दैनंदिन जीवनातील पेचप्रसंगांवरही कसा प्रकाश टाकू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी केलेले धर्माचे विविधांगी सखोल विश्लेषण वाचकांना वेगळीच मर्मदृष्टी देते. या पुस्तकातही महाभारताप्रमाणे नैतिक, राजकीय आणि सार्वजनिक - सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब उमटले आहे.
SAHITYA AKADEMI ANUWAD PURASKAR 2025 TO SUDARSHAN ATHAWALE
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#GURCHARANDAS #SUDARSHAN ATHAVALE #RELIGIOUS #THEDIFFICULTYOFBEINGGOOD #द डीफीकल्टी ऑफ बिईंग गुड #मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI "
Customer Reviews
  • Rating StarANIL KAVNEKAR

    हा अनुवाद वाचला. आवडला. महाभारत समजून घेण्यासाठी हे पुस्तक फारच महत्वपूर्ण आहे. व्यावहारिक दाखले देऊन साध्यासोप्या भाषेत महाभारत समजून देण्याचा लेखकाचा प्रयत्न स्तुत्य आहे. प्रकाशनाबद्दल धन्यवाद.

  • Rating StarLOKPRABHA 15-02-2019

    महाभारत आणि आधुनिक जीवनाची सांगड... महाभारत हे एक अजरामर महाकाव्य असून मानवी स्वभावातील सर्व भावभावना आणि प्रवृत्तींचे दर्शन यातून घडते. महाभारत हा पौराणिक ग्रंथ असला तरीही त्याकडे तत्त्वज्ञान, नीतीशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र शा विविध कसोट्यांवरही पाहता येते. या कसोट्या लावून महाभारत आणि त्यातील सर्व व्यक्तिरेखांकडे नव्या विचाराने आपण पाहू शकतो. हजारो वर्षांपूर्वी असलेल्या मानवी प्रवृत्ती आजच्या काळातही तंतोतंत कशा लागू पडतात याचीही पडताळणी सहज करता येऊ शकते. हार्वर्ड विद्यापीठाचे पदवीधर, संस्कृत आणि तत्त्वज्ञान विषयाचे अभ्यासक, ‘प्रॉक्टर अ‍ॅण्ड गॅम्बल’ या कंपनीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी गुरुचरण दास यांनी ‘द डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड’ या ग्रंथात महाभारत आणि आधुनिक जीवन यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. माणसांच्या दैनंदिन जीवनातील समस्या सोडविण्यासाठी महाभारताची मदत घेण्याचे काम या ग्रंथाने केले असून मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद सुदर्शन आठवले यांनी केला आहे. महाभारतात नैतिक, राजकीय आणि सार्वजनिक जीवनाचे प्रतिबिंब उमटले असून महाभारत हे कालातील आहे. सध्याच्या अनिश्चित, अमर्याद स्पर्धेच्या जगात नीती-अनितीचा समतोल साधून कसे जगायचे? याचे उत्तर या पुस्तकाच्या माध्यमातून दास यांनी वाचकांसमोर ठेवले आहे. महाभारत हे मानवी बुद्धी आणि कल्पनाशक्ती यांचे दर्शन घडवणारी सर्वश्रेष्ठ कलाकृती असून त्यातील नीतिमत्तेविषयीच्या कल्पना आणि आजचे तत्त्वज्ञान या दोन्हीचे विश्लेषण दास यांनी या ग्रंथात केले आहे. योग्य-अयोग्य, चूक-बरोबर या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न महाभारत या महाकाव्यात करण्यात आला असून माणसाच्या अपयशाची, अध:पतनाची कारणे शोधण्याचाही प्रयत्न झाला आहे. समाजात सुसंवाद आणि सुख नांदण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी धर्मानुसार आचरण करण्याची गरज असते. धर्म हा शब्द जरासा जटिल आहे. आपल्या विहित कर्तव्याची प्रामाणिक पूर्ती म्हणजे धर्म, नीतिनियमांचे कठोर पालन म्हणजे धर्म. धर्माचा मुख्य रोख असतो तो योग्य आणि न्याय्य वागण्यावर. भारतीय संस्कृतीचा पाया असणाऱ्या महाभारत या ग्रंथात आपल्या भोवतालच्या समाजाच्या नीतिमत्तेचा अर्थपूर्ण दंडक पुन्हा शोधता येईल का? असा विचार दास यांच्या मनात रुंजी घालत होता आणि त्यातून या ग्रंथाची निर्मिती झाली. ‘धर्म’ या संकल्पनेची नेमकी व्याख्या करणे अवघड आहे. कर्तव्य, चांगुलपणा, नैतिकता, न्याय, यमनियम हे सर्व यात येते. पण ते पुरेसे नाही. धर्म म्हणजे या विश्वातील नीती-अनितीचा, सृष्ट-दुष्ट प्रवृत्तींचा समतोल आहे. प्रत्येक व्यक्तीची बुद्धी आणि त्याचा विवेक यांवर त्याच्या मनातील सत् आणि असत् ही पारडी वर-खाली होत असतात आणि तेच धर्माचे परिणाम. धर्माच्या मूळ संकल्पनेविषयीची शंका, त्याच्या पूर्णार्थाविषयीची गुंतागुंत हा महाभारताच्या कथनाचा व्यापक हेतू आहे. महाभारत हे महाकाव्य म्हणजे या जगात चांगल्या प्रकारे जीवन व्यतीत करायचे असेल तर नेमके काय केले पाहिजे? याचे सविस्तर स्पष्टीकरण देण्याचा विस्तृत आणि सर्वसमावेशक प्रयत्न असल्याचे दास यांचे म्हणणे आहे. ग्रंथाची सुरुवात ‘दुर्योधनाची असूया’ आणि ‘द्रौपदीची निर्भयता’ या प्रकरणांनी होते. या प्रकरणात महाभारतातील कौरव आणि पांडवातील द्यूत खेळ, पांडवांचे द्रौपदीला पणाला लावणे, भर दरबारात होणारे द्रौपदी वस्त्रहरण, समोर अधर्म, अत्याचार होत असतानाही शांत राहणारे दरबारातील धृतराष्ट्र आणि अन्य महारथी याविषयी दास यांनी सविस्तर विवेचन केले आहेच, पण त्यांनी याची सांगड आधुनिक काळातील अंबानी बंधू, त्यांचे साम्राज्य, त्याच्या झालेल्या वाटण्या, त्यांच्यातील भाऊबंदकीशी घातली आहे. महाभारतातील प्रसंग, व्यक्तिरेखा यांचे वागणे आणि त्या वर्तनाचे आजच्या काळातील विश्लेषण दास यांनी केले आहे. युद्धिष्ठिराची कर्तव्यबुद्धी, अर्जुनाचा विषाद, भीष्मांचा नि:स्वार्थ, कर्णाची त्याच्या समाजातील स्थानाविषयीची चिंता, श्रीकृष्णाचे कपट, अश्वत्थाम्याचा सूड, युधिष्ठिराचा पश्चात्ताप, महाभारताचा धर्म अशा विविध प्रकरणांमधून हा ग्रंथ उलगडत जातो. डोळ्यांवर कातडे ओढणे, नैतिकतेकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणे ही माणसाची अटळ अशी प्रवृत्ती आहे? की त्यात बदल करणे शक्य आहे? यातील काही गोष्टी आजच्या शासनाच्या कार्यपद्धतीचा परिणाम असतात. त्या शासनाला आपण सर्व संबधित शासकीय आणि सामाजिक संस्थांच्या रचना, घटना यात उचित असा बदल करून अधिक काळजीवाहू, जनतेविषयी सहानुभूती बाळगणारे बनवू शकू का? महाभारतात धर्म या गहन संकल्पनेचे जे बहुविध कोनातून दर्शन घडविले आहे त्यातून मी या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आणि आपले आयुष्य आपण कशा पद्धतीने जगले पाहिजे? हे शोधण्याचा प्रयत्न केला तीच या ग्रंथाच्या लेखनामागील स्फूर्ती आहे, असे ग्रंथातील ‘निष्कर्ष’ या प्रकरणात लेखक दास यांनी म्हटले आहे. ग्रंथात संदर्भग्रंथांचा परिचय, टिपा आणि खिस्तपूर्व २५००-१५०० ते इसवी सन १६५०-१६७० या कालखंडातील घटनांचा कालक्रमही देण्यात आला आहे. दास यांनी या ग्रंथातून महाभारत या महाकाव्याचा एक वेगळा पैलू समोर आणला असून त्यांनी धर्माचे विश्लेषण वेगळ्या पद्धतीने केले आहे. महाभारत हा पौराणिक ग्रंथ आजच्या काळातील आपल्या दैनंदिन जीवनातील नैतिक पेचप्रसंगांवरही कसा प्रकाश टाकू शकतो ते दास यांनी या ग्रंथातून दाखवून दिले आहे. महाभारत काळातील आणि आजच्या काळातील नीतिमानतेच्या परिणामातील संदिग्धता, अनिश्चितता यांतील आश्चर्यकारक साम्यही दास यांनी या ग्रंथातून वाचकांसमोर ठेवले असून आजच्या अवघड, संघर्षमय, गुंतागुंतीच्या जीवनाशी सामना कसा करायचा हेही समजावून सांगितले आहे. –शेखर जोशी ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 28-10-2018

    महाभारताचा आधुनिक वेध... एकेकाळी ‘प्रॉक्टर अ‍ॅण्ड गॅम्बल’ या जगप्रसिद्ध कंपनीचे सीईओ असलेले गुरुचरण दास हे साहित्य प्रांतात ‘इंडिया अनबाउंड’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक म्हणून विख्यात आहेत. त्यांचे नुकतेच ‘द डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड’ हे पुस्तक प्रकाशि झाले असून, त्याचा सुदर्शन आठवले यांनी मराठीत अनुवाद केला आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने हा अनुवाद प्रसिद्ध केला आहे. भारतीयांचा महान ठेवा असलेल्या महाभारताने त्यांनाही वेड लावले. त्याची अनेक पारायणे त्यांनी केली. त्यातून या महाकाव्याचा एक आगळा पैलू या पुस्तकाद्वारे त्यांनी वाचकांसमोर उलगडला आहे. महाभारत आपल्या रोजच्या जीवनातील नैतिक पेचप्रसंगावरही कसा प्रकाश टाकू शकते, हे लेखकाने अत्यंत विद्वत्तापूर्ण दाखवून दिले आहे. कथानकांची सर्वांधिक गुंतवळ असलेल्या या महाकाव्याचा लेखकाने आधुनिक वेध घेतला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more