* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE DIFFICULTY OF BEING GOOD
  • Availability : Available
  • Translators : SUDARSHAN ATHAWALE
  • ISBN : 9789353171148
  • Edition : 1
  • Publishing Year : SEPTEMBER 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 536
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : RELIGIOUS & SPIRITUALS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
WHY SHOULD WE BE GOOD? HOW SHOULD WE BE GOOD? AND HOW MIGHT WE MORE DEEPLY UNDERSTAND THE MORAL AND ETHICAL FAILINGS--SPLASHED ACROSS TODAY`S HEADLINES--THAT HAVE NOT ONLY DESTROYED INDIVIDUAL LIVES BUT CAUSED WIDESPREAD CALAMITY AS WELL, BRINGING COMMUNITIES, NATIONS, AND INDEED THE GLOBAL ECONOMY TO THE BRINK OF COLLAPSE? IN THE DIFFICULTY OF BEING GOOD, GURCHARAN DAS SEEKS ANSWERS TO THESE QUESTIONS IN AN UNLIKELY SOURCE: THE 2,000 YEAR-OLD SANSKRIT EPIC,MAHABHARATA. A SPRAWLING, WITTY, IRONIC, AND DELIGHTFUL POEM, THE MAHABHARATA IS OBSESSED WITH THE ELUSIVE NOTION OF DHARMA--IN ESSENCE, DOING THE RIGHT THING. WHEN A HERO DOES SOMETHING WRONG IN A GREEK EPIC, HE WASTES LITTLE TIME ON SELF-REFLECTION; WHEN A HERO FALTERS IN THE MAHABHARATA, THE ACTION STOPS AND EVERYONE WEIGHS IN WITH A DIFFERENT AND OFTEN CONTRADICTORY TAKE ON DHARMA. EACH MAJOR CHARACTER IN THE EPIC EMBODIES A SIGNIFICANT MORAL FAILING OR VIRTUE, AND THEIR STRUGGLES MIRROR WITH UNCANNY PRECISION OUR OWN FAMILIAR EMOTIONS OF ANXIETY, COURAGE, DESPAIR, REMORSE, ENVY, COMPASSION, VENGEFULNESS, AND DUTY. DAS EXPLORES THEMAHABHARATA FROM MANY PERSPECTIVES AND COMPARES THE SUCCESSES AND FAILURES OF THE POEM`S CHARACTERS TO THOSE OF CONTEMPORARY INDIVIDUALS, MANY OF THEM HIGHLY VISIBLE PLAYERS IN THE WORLD OF ECONOMICS, BUSINESS, AND POLITICS. IN EVERY CASE, HE FINDS STRIKING PARALLELS THAT CARRY LESSONS FOR EVERYONE FACED WITH ETHICAL AND MORAL DILEMMAS IN TODAY`S COMPLEX WORLD. WRITTEN WITH THE FLAIR AND SEEMINGLY EFFORTLESS ERUDITION THAT HAVE MADE GURCHARAN DAS A BESTSELLING AUTHOR AROUND THE WORLD--AND ENLIVENED BY DAS`S FORTHRIGHT DISCUSSION OF HIS OWN PERSONAL SEARCH FOR A MORE MEANINGFUL LIFE--THE DIFFICULTY OF BEING GOOD SHINES THE LIGHT OF AN ANCIENT POEM ON THE MOST CHALLENGING MORAL AMBIGUITIES OF MODERN LIFE.
महाभारताच्या प्रदीर्घ अभ्यासानंतर गुरुचरण दास यांनी आपल्या लेखनाद्वारे हा महान ग्रंथ आजच्या दैनंदिन जीवनातील पेचप्रसंगांवरही कसा प्रकाश टाकू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी केलेले धर्माचे विविधांगी सखोल विश्लेषण वाचकांना वेगळीच मर्मदृष्टी देते. या पुस्तकातही महाभारताप्रमाणे नैतिक, राजकीय आणि सार्वजनिक - सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब उमटले आहे.
SAHITYA AKADEMI ANUWAD PURASKAR 2025 TO SUDARSHAN ATHAWALE
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#GURCHARANDAS #SUDARSHAN ATHAVALE #RELIGIOUS #THEDIFFICULTYOFBEINGGOOD #द डीफीकल्टी ऑफ बिईंग गुड #मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI "
Customer Reviews
  • Rating StarANIL KAVNEKAR

    हा अनुवाद वाचला. आवडला. महाभारत समजून घेण्यासाठी हे पुस्तक फारच महत्वपूर्ण आहे. व्यावहारिक दाखले देऊन साध्यासोप्या भाषेत महाभारत समजून देण्याचा लेखकाचा प्रयत्न स्तुत्य आहे. प्रकाशनाबद्दल धन्यवाद.

  • Rating StarLOKPRABHA 15-02-2019

    महाभारत आणि आधुनिक जीवनाची सांगड... महाभारत हे एक अजरामर महाकाव्य असून मानवी स्वभावातील सर्व भावभावना आणि प्रवृत्तींचे दर्शन यातून घडते. महाभारत हा पौराणिक ग्रंथ असला तरीही त्याकडे तत्त्वज्ञान, नीतीशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र शा विविध कसोट्यांवरही पाहता येते. या कसोट्या लावून महाभारत आणि त्यातील सर्व व्यक्तिरेखांकडे नव्या विचाराने आपण पाहू शकतो. हजारो वर्षांपूर्वी असलेल्या मानवी प्रवृत्ती आजच्या काळातही तंतोतंत कशा लागू पडतात याचीही पडताळणी सहज करता येऊ शकते. हार्वर्ड विद्यापीठाचे पदवीधर, संस्कृत आणि तत्त्वज्ञान विषयाचे अभ्यासक, ‘प्रॉक्टर अ‍ॅण्ड गॅम्बल’ या कंपनीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी गुरुचरण दास यांनी ‘द डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड’ या ग्रंथात महाभारत आणि आधुनिक जीवन यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. माणसांच्या दैनंदिन जीवनातील समस्या सोडविण्यासाठी महाभारताची मदत घेण्याचे काम या ग्रंथाने केले असून मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद सुदर्शन आठवले यांनी केला आहे. महाभारतात नैतिक, राजकीय आणि सार्वजनिक जीवनाचे प्रतिबिंब उमटले असून महाभारत हे कालातील आहे. सध्याच्या अनिश्चित, अमर्याद स्पर्धेच्या जगात नीती-अनितीचा समतोल साधून कसे जगायचे? याचे उत्तर या पुस्तकाच्या माध्यमातून दास यांनी वाचकांसमोर ठेवले आहे. महाभारत हे मानवी बुद्धी आणि कल्पनाशक्ती यांचे दर्शन घडवणारी सर्वश्रेष्ठ कलाकृती असून त्यातील नीतिमत्तेविषयीच्या कल्पना आणि आजचे तत्त्वज्ञान या दोन्हीचे विश्लेषण दास यांनी या ग्रंथात केले आहे. योग्य-अयोग्य, चूक-बरोबर या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न महाभारत या महाकाव्यात करण्यात आला असून माणसाच्या अपयशाची, अध:पतनाची कारणे शोधण्याचाही प्रयत्न झाला आहे. समाजात सुसंवाद आणि सुख नांदण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी धर्मानुसार आचरण करण्याची गरज असते. धर्म हा शब्द जरासा जटिल आहे. आपल्या विहित कर्तव्याची प्रामाणिक पूर्ती म्हणजे धर्म, नीतिनियमांचे कठोर पालन म्हणजे धर्म. धर्माचा मुख्य रोख असतो तो योग्य आणि न्याय्य वागण्यावर. भारतीय संस्कृतीचा पाया असणाऱ्या महाभारत या ग्रंथात आपल्या भोवतालच्या समाजाच्या नीतिमत्तेचा अर्थपूर्ण दंडक पुन्हा शोधता येईल का? असा विचार दास यांच्या मनात रुंजी घालत होता आणि त्यातून या ग्रंथाची निर्मिती झाली. ‘धर्म’ या संकल्पनेची नेमकी व्याख्या करणे अवघड आहे. कर्तव्य, चांगुलपणा, नैतिकता, न्याय, यमनियम हे सर्व यात येते. पण ते पुरेसे नाही. धर्म म्हणजे या विश्वातील नीती-अनितीचा, सृष्ट-दुष्ट प्रवृत्तींचा समतोल आहे. प्रत्येक व्यक्तीची बुद्धी आणि त्याचा विवेक यांवर त्याच्या मनातील सत् आणि असत् ही पारडी वर-खाली होत असतात आणि तेच धर्माचे परिणाम. धर्माच्या मूळ संकल्पनेविषयीची शंका, त्याच्या पूर्णार्थाविषयीची गुंतागुंत हा महाभारताच्या कथनाचा व्यापक हेतू आहे. महाभारत हे महाकाव्य म्हणजे या जगात चांगल्या प्रकारे जीवन व्यतीत करायचे असेल तर नेमके काय केले पाहिजे? याचे सविस्तर स्पष्टीकरण देण्याचा विस्तृत आणि सर्वसमावेशक प्रयत्न असल्याचे दास यांचे म्हणणे आहे. ग्रंथाची सुरुवात ‘दुर्योधनाची असूया’ आणि ‘द्रौपदीची निर्भयता’ या प्रकरणांनी होते. या प्रकरणात महाभारतातील कौरव आणि पांडवातील द्यूत खेळ, पांडवांचे द्रौपदीला पणाला लावणे, भर दरबारात होणारे द्रौपदी वस्त्रहरण, समोर अधर्म, अत्याचार होत असतानाही शांत राहणारे दरबारातील धृतराष्ट्र आणि अन्य महारथी याविषयी दास यांनी सविस्तर विवेचन केले आहेच, पण त्यांनी याची सांगड आधुनिक काळातील अंबानी बंधू, त्यांचे साम्राज्य, त्याच्या झालेल्या वाटण्या, त्यांच्यातील भाऊबंदकीशी घातली आहे. महाभारतातील प्रसंग, व्यक्तिरेखा यांचे वागणे आणि त्या वर्तनाचे आजच्या काळातील विश्लेषण दास यांनी केले आहे. युद्धिष्ठिराची कर्तव्यबुद्धी, अर्जुनाचा विषाद, भीष्मांचा नि:स्वार्थ, कर्णाची त्याच्या समाजातील स्थानाविषयीची चिंता, श्रीकृष्णाचे कपट, अश्वत्थाम्याचा सूड, युधिष्ठिराचा पश्चात्ताप, महाभारताचा धर्म अशा विविध प्रकरणांमधून हा ग्रंथ उलगडत जातो. डोळ्यांवर कातडे ओढणे, नैतिकतेकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणे ही माणसाची अटळ अशी प्रवृत्ती आहे? की त्यात बदल करणे शक्य आहे? यातील काही गोष्टी आजच्या शासनाच्या कार्यपद्धतीचा परिणाम असतात. त्या शासनाला आपण सर्व संबधित शासकीय आणि सामाजिक संस्थांच्या रचना, घटना यात उचित असा बदल करून अधिक काळजीवाहू, जनतेविषयी सहानुभूती बाळगणारे बनवू शकू का? महाभारतात धर्म या गहन संकल्पनेचे जे बहुविध कोनातून दर्शन घडविले आहे त्यातून मी या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आणि आपले आयुष्य आपण कशा पद्धतीने जगले पाहिजे? हे शोधण्याचा प्रयत्न केला तीच या ग्रंथाच्या लेखनामागील स्फूर्ती आहे, असे ग्रंथातील ‘निष्कर्ष’ या प्रकरणात लेखक दास यांनी म्हटले आहे. ग्रंथात संदर्भग्रंथांचा परिचय, टिपा आणि खिस्तपूर्व २५००-१५०० ते इसवी सन १६५०-१६७० या कालखंडातील घटनांचा कालक्रमही देण्यात आला आहे. दास यांनी या ग्रंथातून महाभारत या महाकाव्याचा एक वेगळा पैलू समोर आणला असून त्यांनी धर्माचे विश्लेषण वेगळ्या पद्धतीने केले आहे. महाभारत हा पौराणिक ग्रंथ आजच्या काळातील आपल्या दैनंदिन जीवनातील नैतिक पेचप्रसंगांवरही कसा प्रकाश टाकू शकतो ते दास यांनी या ग्रंथातून दाखवून दिले आहे. महाभारत काळातील आणि आजच्या काळातील नीतिमानतेच्या परिणामातील संदिग्धता, अनिश्चितता यांतील आश्चर्यकारक साम्यही दास यांनी या ग्रंथातून वाचकांसमोर ठेवले असून आजच्या अवघड, संघर्षमय, गुंतागुंतीच्या जीवनाशी सामना कसा करायचा हेही समजावून सांगितले आहे. –शेखर जोशी ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 28-10-2018

    महाभारताचा आधुनिक वेध... एकेकाळी ‘प्रॉक्टर अ‍ॅण्ड गॅम्बल’ या जगप्रसिद्ध कंपनीचे सीईओ असलेले गुरुचरण दास हे साहित्य प्रांतात ‘इंडिया अनबाउंड’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक म्हणून विख्यात आहेत. त्यांचे नुकतेच ‘द डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड’ हे पुस्तक प्रकाशि झाले असून, त्याचा सुदर्शन आठवले यांनी मराठीत अनुवाद केला आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने हा अनुवाद प्रसिद्ध केला आहे. भारतीयांचा महान ठेवा असलेल्या महाभारताने त्यांनाही वेड लावले. त्याची अनेक पारायणे त्यांनी केली. त्यातून या महाकाव्याचा एक आगळा पैलू या पुस्तकाद्वारे त्यांनी वाचकांसमोर उलगडला आहे. महाभारत आपल्या रोजच्या जीवनातील नैतिक पेचप्रसंगावरही कसा प्रकाश टाकू शकते, हे लेखकाने अत्यंत विद्वत्तापूर्ण दाखवून दिले आहे. कथानकांची सर्वांधिक गुंतवळ असलेल्या या महाकाव्याचा लेखकाने आधुनिक वेध घेतला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more