* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KAHE KABIR DIWANA (1-5)
  • Availability : Available
  • Translators : BHARATI PANDE
  • ISBN : 9788177663495
  • Edition : 4
  • Publishing Year : JANUARY 2004
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 168
  • Language : Translated From HINDI to MARATHI
  • Category : RELIGIOUS & SPIRITUALS
  • Available in Combos :OSHO COMBO SET - 37 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SUSPICION IS BELIEVING THAT `I KNOW THE TRUTH.` MY EXPERIENCE IS VERY SMALL, TRUTH IS WAY TOO BIG. MY BACKYARD IS TOO SMALL, IT IS NOT THE WHOLE SKY. THE WINDOW OF MY HOUSE IS ALSO VERY SMALL, BUT THE FRAME IN WHICH IT IS BUILT DOES NOT FRAME THE SKY IN IT. I CAN SEE OUT OF THE WINDOW, YET I MUST UNDERSTAND THAT WINDOW IS NOT THE SKY, THIS UNDERSTANDING IS FAITH. VERY FEW ARE AS CRAZY AS KABIR. HE IS TERRIBLY CRAZY AND HIS CRAZINESS HAS SUCH POWERS THAT IF YOU ARE LUCKY TO GET EVEN ONE DROP OF HIS CRAZINESS THEN YOU SHOULD CONSIDER YOURSELF TO BE THE MOST LUCKY PERSON OF ALL. IF HIS CRAZINESS TOUCHES YOU EVEN A BIT, THEN YOU WILL REMAIN HEALTHY, CALM AND QUIET THROUGHOUT YOUR LIFE. IF YOU ADOPT A BIT OF HIS CRAZINESS THEN YOU WILL START DANCING AND SINGING LIKE HIM. IT WILL GIVE YOU ULTIMATE PLEASURE. OSHO HAS PRESENTED HIS THOUGHTS EXTENSIVELY ON ALL THE WORLD FAMOUS AND VALUABLE LITTERATEUR. HE NOT ONLY EXCORIATES THEM BUT HE CREATES A PERFECT HARMONY. HE HAS GIVEN FRAGRANCE TO GOLD. OSHO RESEMBLES KABIR THE MOST. THIS HUGE LABYRINTH HAS BEEN BUILT BY KABIR AND OSHO TOGETHER.
सत्य काय आहे हे मला माहीत आहे असं मानणं म्हणजे संदेह आणि माझा अनुभव खूप लहान आहे, सत्य याहून खूप मोठं असू शकतं. माझं अंगण छोटसं आहे. हे अंगण म्हणजे संपूर्ण आकाश नव्हे. माझी खिडकीछोटी आहे. परंतुखिडकीची चौकट म्हणजे आकाशाला घातलेली चौकट नव्हे. मी खिडकीतून बाहेर पाहू शकतो हे खरं असलं तरीही खिडकी म्हणजे आकाश नव्हेच हे जाणून घेणं म्हणजे श्रद्धा`. कबीरासारखे वेडे फार क्वचित भेटतात, हाताच्याबोटांवर मोजता येतात आणि त्यांचं वेडही असं आहे की त्यांच्या सुरईतल्या मद्याचा एक थेंब जरी तुमच्या वाट्याला आला तरी स्वत:चं अहोभाग्य समजा. त्यांच्या वेडेपणाचा तुम्हांला किंचितसा स्पर्श जरी झाला तरी तुम्ही निरोगी, शांत होऊन जाल. त्यांच्या वेडेपणानं तुम्हाला थोडं जरी वेडं केलं, तुम्हीही कबीरासारखे नाचू गाऊ लागलात तर त्याहून कोणतंच मोठं भाग्य नसेल तुमचं. ते तर परम सौभाग्य आहे. ओशोंनी ... जगातील साहित्यामध्ये जी काही मूल्यवान रत्ने आहेत ती शोधून त्यांवर आपले विचार विस्तृतपणे मांडले आहेत. परंतु टीकेबरोबरच समन्वयाचे जे अद्भूत सामंजस्य साधले गेले आहे ते सोन्याला सुगंध येण्यासारखेच आहे... असाच काहीसा समन्वय कबीरांमध्येही दिसून येतो... ओशोंचे साम्य सर्वाधिक कबीराबरोबरच आहे... कबीर आणि ओशो या दोन वेड्यांनी एकत्र येऊन हा शब्दांचा महाव्यूह उभारला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"BANDAKHOR# BHAKTIT BHIJALA KABIR# EK EK PAUL# MAZE MAZYAPASHI KAHI NAHI #HA SHODH VEGALA# HASAT KHELAT DHYANADHARANA# MEERA EK VASANT AAHE # MEERA SHYAMRANGI RANGALI # MEERECHI MADHUSHALA # MEERECHYA PREMTIRTHAVAR # MHANE KABIR DIWANA # MI DHARMIKTA SHIKAVTO DHARM NAHI # MRUTUCHE AMARATVA # MRUTYAYUSHI # MRUTYU AMRUTACHE DWAR # MUGDHA KAHANI PREMACHI # NANAK NIRANKARI KAVI # NANAK PARMATMYACHA NAD OMKAR # NANAK SANSAARI SANYASTA # NANAK SUR SANGEET EK DHUN # SAD GHALTO KABIR # SAKSHATKARACHI DENGI # SHIVSUTRA-PART 1 # SHIVSUTRA-PART II-2 # SWATHACHA SHODH #VIDROHI ##मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 18-07-2004

    कबीर दर्शन... ओशो जरी साहित्यामध्ये एक तत्त्वज्ञ, चिंतक, गुरू आणि ज्ञानी अशा रूपांत प्रसिद्ध असले तरी त्यांचे शब्द आणि विषयांची मांडणी पाहिली तर असे वाटते की ते महान कवी, कथाकार आहेत. त्यांची कथा आणि कविता स्वतंत्र रूपांत प्रसिद्धी पावली नाही; पण तीतत्त्वज्ञानाच्या चिंतन-मनन या शैलीत प्रकट झाली आहे. ओशोंचे साहित्य अप्रतिम आहे. तत्त्वज्ञान व काव्य यांचे अपूर्व मीलन त्यांच्या प्रवचनांमध्ये आढळते. त्यांच्या निरूपण शैलीमध्ये एवढी स्फूर्ती आहे की, आरंभापासून अंतापर्यंत एकच चैतन्यमय प्रवास होतो. साहित्यजगात कबीरही अद्वितीय आहेत. त्यांच्या सहा कवितांवरची सहा प्रवचने या पुस्तकांत समाविष्ट आहेत. प्रेम आणि भक्तीचे नवे रूप कबीरांच्या शब्दांतून व्यक्त होते. कबीर जन्मभर काशीमध्ये राहिले. पंडितांच्या विद्वानांच्या जगात त्यांनी शब्दांचा चालणारा व्यापार पाहिला पण खरे प्रेम आणि करुणा जोपर्यंत आपल्याजवळ नाही तोपर्यंत ईश्वरापर्यंत पोचणे अशक्य आहे, हीच गोष्ट ते वेगवेगळ्या तऱ्हेने भक्तांना पटवून देत आहेत. दान ही एक विलक्षण क्रिया आहे. जेव्हा माणसांच्या आयुष्यात दृष्टी येते तेव्हा त्याला परमात्म्याखेरीज काहीच दिसत नाही. ओशोंनी कबीरावर त्याच्या काव्याविषयी मांडलेले आपले विचार खरोखरच वाचनीय आहेत. यात टीकाही आहे अन् समन्वयही. खरोखरच हे सोन्याला सुगंध येण्यासारखे आहे. भारती पांडे यांचा अनुवादही अतिशय सरस उतरला आहे. कुठेही वाचन करताना खटकल्यासारखे वाटत नाही. पुस्तकाचे रूप, छपाई अतिशय सुबक व देखणी आहे. कबीर व ओशो दोन्ही ठिकाणी श्रद्धा असणाऱ्यांना हे पुस्तक आवडेलच; परंतु श्रद्धेने वाचन करणाऱ्या कुठल्याही व्यक्तींचे मन आकर्षून घेईल असे हे पुस्तक आहे. -रजनी मुकुंद वैद्य ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 18-07-2004

    कबीर दर्शन... ओशो जरी साहित्यामध्ये एक तत्वज्ञ, चिंतक, गुरू आणि ज्ञानी अशा रूपांत प्रसिद्ध असले तरी त्यांचे शब्द आणि विषयांची मांडणी पाहिली तर असे वाटते की ते महान कवी, कथाकार आहेत. त्यांची कथा आणि कविता स्वतंत्र रूपांत प्रसिद्धी पावली नाही पण ती ततत्वज्ञानाच्या चिंतन-मनन या शैलीत प्रकट झाली आहे. ओशोंचे साहित्य अप्रतिम आहे. तत्त्वज्ञान व काव्य यांचे अपूर्व मीलन त्यांच्या प्रवचनांमध्ये आढळते. त्यांच्या निरूपण शैलीमध्ये एवढी स्फूर्ती आहे की, आरंभापासून अंतापर्यंत एकच चैतन्यमय प्रवास होतो. साहित्यजगतात कबीरही अद्वितीय आहेत. त्यांच्या सहा कवितांवरची सहा प्रवचने या पुस्तकांत समाविष्ट आहेत. प्रेम आणि भक्तीचे नवे रूप कबीरांच्या शब्दांतून व्यक्त होते. कबीर जन्मभर काशीमध्ये राहिले. पंडितांच्या विद्वानांच्या जगात त्यांनी शब्दांचा चालणारा व्यापार पाहिला; पण खरे प्रेम आणि करुणा जोपर्यंत आपल्याजवळ नाही तोपर्यंत ईश्वरापर्यंत पोचणे अशक्य आहे, हीच गोष्ट ते वेगवेगळ्या तऱ्हेने भक्तांना पटवून देत आहेत. दर्शन ही एक विलक्षण क्रिया आहे. जेव्हा माणसांच्या आयुष्यात दृष्टी येते तेव्हा त्याला परमात्म्याखेरीज काहीच दिसत नाही. ओशोंनी कबीरावर त्याच्या काव्याविषयी मांडलेले आपले विचार खरोखरच वाचनीय आहेत. यात टीकाही आहे अन् समन्वयही. खरोखरच हे सोन्याला सुगंध येण्यासारखे आहे. भारती पांडे यांचा अनुवादही अतिशय सरस उतरला आहे. कुठेही वाचन करताना खटकल्यासारखे वाटत नाही. पुस्तकाचे रूप, छपाई अतिशय सुबक व देखणी आहे. कबीर व ओशो दोन्ही ठिकाणी श्रद्धा असणाऱ्यांना हे पुस्तक आवडेलच; परंतु श्रद्धेने वाचन करणाऱ्या कुठल्याही व्यक्तींचे मन आकर्षून घेईल असे हे पुस्तक आहे. -रजनी मुकुंद वैद्य ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 29-02-2004

    पूर्व आणि पश्चिमेकडील असा कोणताही धर्म, मतवाद, तत्त्वज्ञान नाही ज्याकडे ओशो यांचे लक्ष गेलेले नाही किंवा त्यावर त्यांनी भाष्य केलेले नाही. कृष्ण, बुद्ध, महावीर, शंकर, जिझस, या सगळ्यांवर ते चर्चा करतातच पण काण्ट हेगेल, योगी अरविंद यांच्यापर्यंत सर्वांी ते चर्चा करतात. ‘म्हणे कबीर दिवाणा’ हा त्यांचा कबीराच्या तत्त्वज्ञानाचे चिंतन करणारा ग्रंथ असून त्याचा भारती पांडे यांनी अनुवाद केला आहे. आरसी प्रसाद सिंग यांनी पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. ते म्हणतात, साहित्य जगतात. ओशो जसे अद्वितीय आहेत तसेच कबीरही अद्वितीय आहेत हे सांगण्याची आवश्यकता नाही. दोघांची जोडी विलक्षण आहे. दोघेही एकाच काळात जन्मले असते आणि समोरासमोर बसून एकमेकांशी बोलत असते तर त्यांनी काय करून दाखवले असते कल्पनाच करवत नाही. ओशांनी कबीरावर दिलेल्या प्रवचनांच्या या पुस्तकातही कबीरांच्या विचारात, तत्त्वज्ञानात ओशोंचेही तत्त्वज्ञान आणि विचार पूर्णपणे मिसळून गेलेले आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 06-06-2004

    संत कबीरांचे वचन म्हणजे भात्यातून सुटलेला बाणच. याचे विश्लेषण करून लोकांना सोप्या भाषेत पटवून देण्याचे काम आचार्य रजनीश उर्फ ओशो यांनी या पुस्तकात केले आहे. ओशोंचे साहित्य अप्रतिम आहे. तत्त्वज्ञान आणि काव्य याचे अपूर्व मीलन ओशोंच्या प्रवचनात आढळले. सत कबिरांची वचने त्यांनी याच ओघवत्या भाषेत लोकांपुढे आणली आहेत. त्यांची ही पाच प्रवचने जी कबिरांच्या वचनावर बद्ध केली आहेत ती या पुस्तकात गुंफली आहेत. यातून जीवनाचा अर्थ उलगडून सांगण्यात आला आहे. प्रत्येक प्रवचनात त्यांनी आधुनिक जगातील उदाहरणे सांगून संत कबिरांची वचने आजही किती उपयोगी आहेत, ते सांगितले आहे, ओशोंनी या प्रत्येक प्रकरणात लोकांना पटतील अशी सोप्या भाषेतील उदाहरणे सांगून वाचकांना गुंगवून ठेवले आहे. ओशो व कबीर या दोन्ही अद्वितीय तत्ववेधत्यांचा हा संगम या पुस्तकातून झाला आहे. याच वाचकांना दररोजच्या जीवनात खूपच उपयोग होईल. त्यामुळे हे पुस्तक वाचनीय ठरले आहे. याचा अनुवाद भारती पांडे यांनी रसाळ भाषेत केला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष ओशोच आपल्यापुढे येऊन प्रवचन देत असल्याचा भास हे पुस्तक वाचताना होतो. ओशोंचे असो वा कबिरांचे, शब्दांचे हे बाण मनाला छेदतील, मनाला भावतील, जिवाची तडफड होईल. माणसाला जीवनाचे वास्तव समजू शकेल. जीवनाचा अर्थ सांगणारे हे पुस्तक वाचनीय ठरले आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more