* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KAHE KABIR DIWANA (1-5)
  • Availability : Available
  • Translators : BHARATI PANDE
  • ISBN : 9788177663495
  • Edition : 4
  • Publishing Year : JANUARY 2004
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 168
  • Language : Translated From HINDI to MARATHI
  • Category : RELIGIOUS & SPIRITUALS
  • Available in Combos :OSHO COMBO SET - 33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SUSPICION IS BELIEVING THAT `I KNOW THE TRUTH.` MY EXPERIENCE IS VERY SMALL, TRUTH IS WAY TOO BIG. MY BACKYARD IS TOO SMALL, IT IS NOT THE WHOLE SKY. THE WINDOW OF MY HOUSE IS ALSO VERY SMALL, BUT THE FRAME IN WHICH IT IS BUILT DOES NOT FRAME THE SKY IN IT. I CAN SEE OUT OF THE WINDOW, YET I MUST UNDERSTAND THAT WINDOW IS NOT THE SKY, THIS UNDERSTANDING IS FAITH. VERY FEW ARE AS CRAZY AS KABIR. HE IS TERRIBLY CRAZY AND HIS CRAZINESS HAS SUCH POWERS THAT IF YOU ARE LUCKY TO GET EVEN ONE DROP OF HIS CRAZINESS THEN YOU SHOULD CONSIDER YOURSELF TO BE THE MOST LUCKY PERSON OF ALL. IF HIS CRAZINESS TOUCHES YOU EVEN A BIT, THEN YOU WILL REMAIN HEALTHY, CALM AND QUIET THROUGHOUT YOUR LIFE. IF YOU ADOPT A BIT OF HIS CRAZINESS THEN YOU WILL START DANCING AND SINGING LIKE HIM. IT WILL GIVE YOU ULTIMATE PLEASURE. OSHO HAS PRESENTED HIS THOUGHTS EXTENSIVELY ON ALL THE WORLD FAMOUS AND VALUABLE LITTERATEUR. HE NOT ONLY EXCORIATES THEM BUT HE CREATES A PERFECT HARMONY. HE HAS GIVEN FRAGRANCE TO GOLD. OSHO RESEMBLES KABIR THE MOST. THIS HUGE LABYRINTH HAS BEEN BUILT BY KABIR AND OSHO TOGETHER.
सत्य काय आहे हे मला माहीत आहे असं मानणं म्हणजे संदेह आणि माझा अनुभव खूप लहान आहे, सत्य याहून खूप मोठं असू शकतं. माझं अंगण छोटसं आहे. हे अंगण म्हणजे संपूर्ण आकाश नव्हे. माझी खिडकीछोटी आहे. परंतुखिडकीची चौकट म्हणजे आकाशाला घातलेली चौकट नव्हे. मी खिडकीतून बाहेर पाहू शकतो हे खरं असलं तरीही खिडकी म्हणजे आकाश नव्हेच हे जाणून घेणं म्हणजे श्रद्धा`. कबीरासारखे वेडे फार क्वचित भेटतात, हाताच्याबोटांवर मोजता येतात आणि त्यांचं वेडही असं आहे की त्यांच्या सुरईतल्या मद्याचा एक थेंब जरी तुमच्या वाट्याला आला तरी स्वत:चं अहोभाग्य समजा. त्यांच्या वेडेपणाचा तुम्हांला किंचितसा स्पर्श जरी झाला तरी तुम्ही निरोगी, शांत होऊन जाल. त्यांच्या वेडेपणानं तुम्हाला थोडं जरी वेडं केलं, तुम्हीही कबीरासारखे नाचू गाऊ लागलात तर त्याहून कोणतंच मोठं भाग्य नसेल तुमचं. ते तर परम सौभाग्य आहे. ओशोंनी ... जगातील साहित्यामध्ये जी काही मूल्यवान रत्ने आहेत ती शोधून त्यांवर आपले विचार विस्तृतपणे मांडले आहेत. परंतु टीकेबरोबरच समन्वयाचे जे अद्भूत सामंजस्य साधले गेले आहे ते सोन्याला सुगंध येण्यासारखेच आहे... असाच काहीसा समन्वय कबीरांमध्येही दिसून येतो... ओशोंचे साम्य सर्वाधिक कबीराबरोबरच आहे... कबीर आणि ओशो या दोन वेड्यांनी एकत्र येऊन हा शब्दांचा महाव्यूह उभारला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"BANDAKHOR# BHAKTIT BHIJALA KABIR# EK EK PAUL# MAZE MAZYAPASHI KAHI NAHI #HA SHODH VEGALA# HASAT KHELAT DHYANADHARANA# MEERA EK VASANT AAHE # MEERA SHYAMRANGI RANGALI # MEERECHI MADHUSHALA # MEERECHYA PREMTIRTHAVAR # MHANE KABIR DIWANA # MI DHARMIKTA SHIKAVTO DHARM NAHI # MRUTUCHE AMARATVA # MRUTYAYUSHI # MRUTYU AMRUTACHE DWAR # MUGDHA KAHANI PREMACHI # NANAK NIRANKARI KAVI # NANAK PARMATMYACHA NAD OMKAR # NANAK SANSAARI SANYASTA # NANAK SUR SANGEET EK DHUN # SAD GHALTO KABIR # SAKSHATKARACHI DENGI # SHIVSUTRA-PART 1 # SHIVSUTRA-PART II-2 # SWATHACHA SHODH #VIDROHI ##मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 18-07-2004

    कबीर दर्शन... ओशो जरी साहित्यामध्ये एक तत्त्वज्ञ, चिंतक, गुरू आणि ज्ञानी अशा रूपांत प्रसिद्ध असले तरी त्यांचे शब्द आणि विषयांची मांडणी पाहिली तर असे वाटते की ते महान कवी, कथाकार आहेत. त्यांची कथा आणि कविता स्वतंत्र रूपांत प्रसिद्धी पावली नाही; पण तीतत्त्वज्ञानाच्या चिंतन-मनन या शैलीत प्रकट झाली आहे. ओशोंचे साहित्य अप्रतिम आहे. तत्त्वज्ञान व काव्य यांचे अपूर्व मीलन त्यांच्या प्रवचनांमध्ये आढळते. त्यांच्या निरूपण शैलीमध्ये एवढी स्फूर्ती आहे की, आरंभापासून अंतापर्यंत एकच चैतन्यमय प्रवास होतो. साहित्यजगात कबीरही अद्वितीय आहेत. त्यांच्या सहा कवितांवरची सहा प्रवचने या पुस्तकांत समाविष्ट आहेत. प्रेम आणि भक्तीचे नवे रूप कबीरांच्या शब्दांतून व्यक्त होते. कबीर जन्मभर काशीमध्ये राहिले. पंडितांच्या विद्वानांच्या जगात त्यांनी शब्दांचा चालणारा व्यापार पाहिला पण खरे प्रेम आणि करुणा जोपर्यंत आपल्याजवळ नाही तोपर्यंत ईश्वरापर्यंत पोचणे अशक्य आहे, हीच गोष्ट ते वेगवेगळ्या तऱ्हेने भक्तांना पटवून देत आहेत. दान ही एक विलक्षण क्रिया आहे. जेव्हा माणसांच्या आयुष्यात दृष्टी येते तेव्हा त्याला परमात्म्याखेरीज काहीच दिसत नाही. ओशोंनी कबीरावर त्याच्या काव्याविषयी मांडलेले आपले विचार खरोखरच वाचनीय आहेत. यात टीकाही आहे अन् समन्वयही. खरोखरच हे सोन्याला सुगंध येण्यासारखे आहे. भारती पांडे यांचा अनुवादही अतिशय सरस उतरला आहे. कुठेही वाचन करताना खटकल्यासारखे वाटत नाही. पुस्तकाचे रूप, छपाई अतिशय सुबक व देखणी आहे. कबीर व ओशो दोन्ही ठिकाणी श्रद्धा असणाऱ्यांना हे पुस्तक आवडेलच; परंतु श्रद्धेने वाचन करणाऱ्या कुठल्याही व्यक्तींचे मन आकर्षून घेईल असे हे पुस्तक आहे. -रजनी मुकुंद वैद्य ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 18-07-2004

    कबीर दर्शन... ओशो जरी साहित्यामध्ये एक तत्वज्ञ, चिंतक, गुरू आणि ज्ञानी अशा रूपांत प्रसिद्ध असले तरी त्यांचे शब्द आणि विषयांची मांडणी पाहिली तर असे वाटते की ते महान कवी, कथाकार आहेत. त्यांची कथा आणि कविता स्वतंत्र रूपांत प्रसिद्धी पावली नाही पण ती ततत्वज्ञानाच्या चिंतन-मनन या शैलीत प्रकट झाली आहे. ओशोंचे साहित्य अप्रतिम आहे. तत्त्वज्ञान व काव्य यांचे अपूर्व मीलन त्यांच्या प्रवचनांमध्ये आढळते. त्यांच्या निरूपण शैलीमध्ये एवढी स्फूर्ती आहे की, आरंभापासून अंतापर्यंत एकच चैतन्यमय प्रवास होतो. साहित्यजगतात कबीरही अद्वितीय आहेत. त्यांच्या सहा कवितांवरची सहा प्रवचने या पुस्तकांत समाविष्ट आहेत. प्रेम आणि भक्तीचे नवे रूप कबीरांच्या शब्दांतून व्यक्त होते. कबीर जन्मभर काशीमध्ये राहिले. पंडितांच्या विद्वानांच्या जगात त्यांनी शब्दांचा चालणारा व्यापार पाहिला; पण खरे प्रेम आणि करुणा जोपर्यंत आपल्याजवळ नाही तोपर्यंत ईश्वरापर्यंत पोचणे अशक्य आहे, हीच गोष्ट ते वेगवेगळ्या तऱ्हेने भक्तांना पटवून देत आहेत. दर्शन ही एक विलक्षण क्रिया आहे. जेव्हा माणसांच्या आयुष्यात दृष्टी येते तेव्हा त्याला परमात्म्याखेरीज काहीच दिसत नाही. ओशोंनी कबीरावर त्याच्या काव्याविषयी मांडलेले आपले विचार खरोखरच वाचनीय आहेत. यात टीकाही आहे अन् समन्वयही. खरोखरच हे सोन्याला सुगंध येण्यासारखे आहे. भारती पांडे यांचा अनुवादही अतिशय सरस उतरला आहे. कुठेही वाचन करताना खटकल्यासारखे वाटत नाही. पुस्तकाचे रूप, छपाई अतिशय सुबक व देखणी आहे. कबीर व ओशो दोन्ही ठिकाणी श्रद्धा असणाऱ्यांना हे पुस्तक आवडेलच; परंतु श्रद्धेने वाचन करणाऱ्या कुठल्याही व्यक्तींचे मन आकर्षून घेईल असे हे पुस्तक आहे. -रजनी मुकुंद वैद्य ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 29-02-2004

    पूर्व आणि पश्चिमेकडील असा कोणताही धर्म, मतवाद, तत्त्वज्ञान नाही ज्याकडे ओशो यांचे लक्ष गेलेले नाही किंवा त्यावर त्यांनी भाष्य केलेले नाही. कृष्ण, बुद्ध, महावीर, शंकर, जिझस, या सगळ्यांवर ते चर्चा करतातच पण काण्ट हेगेल, योगी अरविंद यांच्यापर्यंत सर्वांी ते चर्चा करतात. ‘म्हणे कबीर दिवाणा’ हा त्यांचा कबीराच्या तत्त्वज्ञानाचे चिंतन करणारा ग्रंथ असून त्याचा भारती पांडे यांनी अनुवाद केला आहे. आरसी प्रसाद सिंग यांनी पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. ते म्हणतात, साहित्य जगतात. ओशो जसे अद्वितीय आहेत तसेच कबीरही अद्वितीय आहेत हे सांगण्याची आवश्यकता नाही. दोघांची जोडी विलक्षण आहे. दोघेही एकाच काळात जन्मले असते आणि समोरासमोर बसून एकमेकांशी बोलत असते तर त्यांनी काय करून दाखवले असते कल्पनाच करवत नाही. ओशांनी कबीरावर दिलेल्या प्रवचनांच्या या पुस्तकातही कबीरांच्या विचारात, तत्त्वज्ञानात ओशोंचेही तत्त्वज्ञान आणि विचार पूर्णपणे मिसळून गेलेले आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 06-06-2004

    संत कबीरांचे वचन म्हणजे भात्यातून सुटलेला बाणच. याचे विश्लेषण करून लोकांना सोप्या भाषेत पटवून देण्याचे काम आचार्य रजनीश उर्फ ओशो यांनी या पुस्तकात केले आहे. ओशोंचे साहित्य अप्रतिम आहे. तत्त्वज्ञान आणि काव्य याचे अपूर्व मीलन ओशोंच्या प्रवचनात आढळले. सत कबिरांची वचने त्यांनी याच ओघवत्या भाषेत लोकांपुढे आणली आहेत. त्यांची ही पाच प्रवचने जी कबिरांच्या वचनावर बद्ध केली आहेत ती या पुस्तकात गुंफली आहेत. यातून जीवनाचा अर्थ उलगडून सांगण्यात आला आहे. प्रत्येक प्रवचनात त्यांनी आधुनिक जगातील उदाहरणे सांगून संत कबिरांची वचने आजही किती उपयोगी आहेत, ते सांगितले आहे, ओशोंनी या प्रत्येक प्रकरणात लोकांना पटतील अशी सोप्या भाषेतील उदाहरणे सांगून वाचकांना गुंगवून ठेवले आहे. ओशो व कबीर या दोन्ही अद्वितीय तत्ववेधत्यांचा हा संगम या पुस्तकातून झाला आहे. याच वाचकांना दररोजच्या जीवनात खूपच उपयोग होईल. त्यामुळे हे पुस्तक वाचनीय ठरले आहे. याचा अनुवाद भारती पांडे यांनी रसाळ भाषेत केला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष ओशोच आपल्यापुढे येऊन प्रवचन देत असल्याचा भास हे पुस्तक वाचताना होतो. ओशोंचे असो वा कबिरांचे, शब्दांचे हे बाण मनाला छेदतील, मनाला भावतील, जिवाची तडफड होईल. माणसाला जीवनाचे वास्तव समजू शकेल. जीवनाचा अर्थ सांगणारे हे पुस्तक वाचनीय ठरले आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more