GIRIJA KEER

About Author

Birth Date : 05/02/1933
Death Date : 31/10/2019


102 BOOKS OF GIRIJA KEER ARE FAMOUS, INCLUDING 29 CHILDRENS BOOKS. AWARDS – TOTAL AWARDS 49, INCLUDING 4 STATE AWARDS.

गिरिजा कीर यांची १०२ पुस्तके प्रसिद्ध असून त्यात बालवाङ्मयाची २९ पुस्तके आहेत. पुरस्कार – एकूण पुरस्कार ४९, त्यातले ४ राज्य पुरस्कार. महत्त्वाचे पुरस्कार – महाराष्ट्र मंडळ, न्यू यॉर्क यांच्या माध्यमातून कथासम्राज्ञी पुरस्कार ह.ना. आपटे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार – साहित्य परिषद, पुणे. कमलाबाई टिळक पुरस्कार – पुणे मराठी ग्रंथालय. अभिरुची पुरस्कार – मराठी वाङ्मय परिषद बडोदे. श्री अक्षरधन स्त्री-साहित्यिका पुरस्कार, मुंबई. आत्मचरित्राला चार पुरस्कार – (गोवा, परभणी, कोरेगाव, को.म.सा.प. इत्यादी). ग्रंथोत्तेजक संस्था, पुणेतर्फे २०१२ साली जन्मठेप या पुस्तकास पुरस्कार. सन्मान – वणीच्या पहिल्या लेखिका संमेलनाच्या उद्घाटक. बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा (कोल्हापूर, सेलू, सावंतवाडी या ठिकाणी). अ.भा. मराठी साहित्य संमेलनात कथाकथन सत्राच्या अध्यक्षा (चंद्रपूर, अमरावती, आवास, महाबळेश्वर). कथाकथनाचे २०००च्यावर कार्यक्रम, अमेरिकेत कथाकथन सम्राज्ञी असे मानपत्र. ठाणे जिल्हा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा. श्री शारदा ग्रंथप्रसारक संस्था, फोंडा – गोवा आयोजित लेखिका संमेलनाच्या अध्यक्षा. कोकण मराठी साहित्य परिषद – मुंबई जिल्हा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा. इंदिराजी वीरांगना अ.भा. महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा – पुणे. १६ वर्षे आदिवासी मुलांसाठी शैक्षणिक प्रकल्पात सहभाग. १२ वर्षे जन्मठेपेच्या गुन्हेगारांसाठी तुरुंगात जाऊन कैद्यांशी सुसंवाद व समुपदेशन (येरवडा जेल – पुणे; आधारवाडी जेल – कल्याण; अग्वाद जेल – गोवा; कळंबा जेल – कोल्हापूर). बालगुन्हेगारांसाठी कथाकथन ( जन्मठेप , इथं दिवा लावायला हवा , राखेतली पाखरं ही तीन पुस्तकं सामाजिक कार्याच्या अनुभवावर प्रसिद्ध). समाजकार्यासाठी एकूण ६ पुरस्कार व सन्मान. सह्याद्री वाहिनीवर, झी व ई-टीव्ही अशा वाहिन्यांवर दीर्घ मुलाखती. दूरदर्शन व आकाशवाणी यांवर अनेक कार्यक्रम. मुंबईतल्या अनेक शाळांतून फिरून, मराठी वाचन-लेखन यावर चर्चा, कृतिसत्रे. मराठी कथा, मुलाखती यांचे हिंदी, गुजराती, कन्नड, तेलुगु या भाषांत भाषांतरे. उडिया भाषेत मनबोली या कथासंग्रहाचे मनकथा या नावाने भाषांतर. कथाजागर या कथासंग्रहाचे उर्दू भाषांतर प्रसिद्ध होणार आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
AKASHVEDH Rating Star
Add To Cart INR 150
JANMATHEP Rating Star
Add To Cart INR 220

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more