GIRIJA KEER

About Author

Birth Date : 05/02/1933
Death Date : 31/10/2019


102 BOOKS OF GIRIJA KEER ARE FAMOUS, INCLUDING 29 CHILDRENS BOOKS. AWARDS – TOTAL AWARDS 49, INCLUDING 4 STATE AWARDS.

गिरिजा कीर यांची १०२ पुस्तके प्रसिद्ध असून त्यात वाङ्‌मयाची २९ पुस्तके आहेत. पुरस्कार – एकूण पुरस्कार ४९, त्यातले ४ राज्य पुरस्कार. महत्त्वाचे पुरस्कार – महाराष्ट्र मंडळ, न्यू यॉर्क यांच्या माध्यमातून कथासम्राज्ञी पुरस्कार ह.ना. आपटे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार – साहित्य परिषद, पुणे. कमलाबाई टिळक पुरस्कार – पुणे मराठी ग्रंथालय. अभिरुची पुरस्कार – मराठी वाङ्‌मय परिषद बडोदे. श्री अक्षरधन स्त्री-साहित्यिका पुरस्कार, मुंबई. आत्मचरित्राला चार पुरस्कार – (गोवा, परभणी, कोरेगाव, को.म.सा.प. इत्यादी). ग्रंथोत्तेजक संस्था, पुणेतर्फे २०१२ साली जन्मठेप या पुस्तकास पुरस्कार. सन्मान – वणीच्या पहिल्या लेखिका संमेलनाच्या उद्घाटक. बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा (कोल्हापूर, सेलू, सावंतवाडी या ठिकाणी). अ.भा. मराठी साहित्य संमेलनात कथाकथन सत्राच्या अध्यक्षा (चंद्रपूर, अमरावती, आवास, महाबळेश्वर). कथाकथनाचे २०००च्यावर कार्यक्रम, अमेरिकेत कथाकथन सम्राज्ञी असे मानपत्र. ठाणे जिल्हा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा. श्री शारदा ग्रंथप्रसारक संस्था, फोंडा – गोवा आयोजित लेखिका संमेलनाच्या अध्यक्षा. कोकण मराठी साहित्य परिषद – मुंबई जिल्हा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा. इंदिराजी वीरांगना अ.भा. महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा – पुणे. १६ वर्षे आदिवासी मुलांसाठी शैक्षणिक प्रकल्पात सहभाग. १२ वर्षे जन्मठेपेच्या गुन्हेगारांसाठी तुरुंगात जाऊन कैद्यांशी सुसंवाद व समुपदेशन (येरवडा जेल – पुणे; आधारवाडी जेल – कल्याण; अग्वाद जेल – गोवा; कळंबा जेल – कोल्हापूर). बालगुन्हेगारांसाठी कथाकथन ( जन्मठेप , इथं दिवा लावायला हवा , राखेतली पाखरं ही तीन पुस्तकं सामाजिक कार्याच्या अनुभवावर प्रसिद्ध). समाजकार्यासाठी एकूण ६ पुरस्कार व सन्मान. सह्याद्री वाहिनीवर, झी व ई-टीव्ही अशा वाहिन्यांवर दीर्घ मुलाखती. दूरदर्शन व आकाशवाणी यांवर अनेक कार्यक्रम. मुंबईतल्या अनेक शाळांतून फिरून, मराठी वाचन-लेखन यावर चर्चा, कृतिसत्रे. मराठी कथा, मुलाखती यांचे हिंदी, गुजराती, कन्नड, तेलुगु या भाषांत भाषांतरे. उडिया भाषेत मनबोली या कथासंग्रहाचे मनकथा या नावाने भाषांतर. कथाजागर या कथासंग्रहाचे उर्दू भाषांतर प्रसिद्ध होणार आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
AKASHVEDH Rating Star
Add To Cart INR 150
JANMATHEP Rating Star
Add To Cart INR 220

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more