GIRIJA KEER

About Author

Birth Date : 05/02/1933
Death Date : 31/10/2019


102 BOOKS OF GIRIJA KEER ARE FAMOUS, INCLUDING 29 CHILDRENS BOOKS. AWARDS – TOTAL AWARDS 49, INCLUDING 4 STATE AWARDS.

गिरिजा कीर यांची १०२ पुस्तके प्रसिद्ध असून त्यात वाङ्‌मयाची २९ पुस्तके आहेत. पुरस्कार – एकूण पुरस्कार ४९, त्यातले ४ राज्य पुरस्कार. महत्त्वाचे पुरस्कार – महाराष्ट्र मंडळ, न्यू यॉर्क यांच्या माध्यमातून कथासम्राज्ञी पुरस्कार ह.ना. आपटे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार – साहित्य परिषद, पुणे. कमलाबाई टिळक पुरस्कार – पुणे मराठी ग्रंथालय. अभिरुची पुरस्कार – मराठी वाङ्‌मय परिषद बडोदे. श्री अक्षरधन स्त्री-साहित्यिका पुरस्कार, मुंबई. आत्मचरित्राला चार पुरस्कार – (गोवा, परभणी, कोरेगाव, को.म.सा.प. इत्यादी). ग्रंथोत्तेजक संस्था, पुणेतर्फे २०१२ साली जन्मठेप या पुस्तकास पुरस्कार. सन्मान – वणीच्या पहिल्या लेखिका संमेलनाच्या उद्घाटक. बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा (कोल्हापूर, सेलू, सावंतवाडी या ठिकाणी). अ.भा. मराठी साहित्य संमेलनात कथाकथन सत्राच्या अध्यक्षा (चंद्रपूर, अमरावती, आवास, महाबळेश्वर). कथाकथनाचे २०००च्यावर कार्यक्रम, अमेरिकेत कथाकथन सम्राज्ञी असे मानपत्र. ठाणे जिल्हा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा. श्री शारदा ग्रंथप्रसारक संस्था, फोंडा – गोवा आयोजित लेखिका संमेलनाच्या अध्यक्षा. कोकण मराठी साहित्य परिषद – मुंबई जिल्हा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा. इंदिराजी वीरांगना अ.भा. महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा – पुणे. १६ वर्षे आदिवासी मुलांसाठी शैक्षणिक प्रकल्पात सहभाग. १२ वर्षे जन्मठेपेच्या गुन्हेगारांसाठी तुरुंगात जाऊन कैद्यांशी सुसंवाद व समुपदेशन (येरवडा जेल – पुणे; आधारवाडी जेल – कल्याण; अग्वाद जेल – गोवा; कळंबा जेल – कोल्हापूर). बालगुन्हेगारांसाठी कथाकथन ( जन्मठेप , इथं दिवा लावायला हवा , राखेतली पाखरं ही तीन पुस्तकं सामाजिक कार्याच्या अनुभवावर प्रसिद्ध). समाजकार्यासाठी एकूण ६ पुरस्कार व सन्मान. सह्याद्री वाहिनीवर, झी व ई-टीव्ही अशा वाहिन्यांवर दीर्घ मुलाखती. दूरदर्शन व आकाशवाणी यांवर अनेक कार्यक्रम. मुंबईतल्या अनेक शाळांतून फिरून, मराठी वाचन-लेखन यावर चर्चा, कृतिसत्रे. मराठी कथा, मुलाखती यांचे हिंदी, गुजराती, कन्नड, तेलुगु या भाषांत भाषांतरे. उडिया भाषेत मनबोली या कथासंग्रहाचे मनकथा या नावाने भाषांतर. कथाजागर या कथासंग्रहाचे उर्दू भाषांतर प्रसिद्ध होणार आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
AKASHVEDH Rating Star
Add To Cart INR 150
JANMATHEP Rating Star
Add To Cart INR 220

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.