* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE NEW DAWN
  • Availability : Available
  • Translators : PRADNYA OAK
  • ISBN : 9788177662023
  • Edition : 4
  • Publishing Year : 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 240
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : RELIGIOUS & SPIRITUALS
  • Available in Combos :OSHO COMBO SET - 37 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
LOVE AND SYMPATHY THESE ARE THE TWO FEELINGS THAT HAVE BEEN CONTINUOUSLY CONSIDERED BY SPIRITUALITY. OSHO BEAUTIFULLY PRESENTS HIS VIEW ON THESE TWO FEELINGS IN THE BOOK. JOURNALISM IS IN NO WAY RELATED TO SPIRITUALITY, YET THIS BOOK CONSISTS OF THREE CHAPTERS ON JOURNALISM. IN 1987, OSHO HAD PENNED DOWN HIS THOUGHTS ON JOURNALISM, IT IS ASTONISHING TO SEE THEM COMING TRUE TODAY. EVERY JOURNALIST SHOULD READ THESE CHAPTERS AT LEAST ONCE. OSHO TELLS US THAT MEDIA SHOULD NOT WORK AS DESTRUCTIVE WEAPONS, OTHERWISE THE HUMANITY WILL BE BURNT TO ASHES. OSHO NOT ONLY TELLS US THE WAY TO BUILD OUR FEALTY INWARDLY AS WELL AS OUTWARDLY, BUT HE ALSO RELATES THE IMPORTANT THINGS FOR RAISING HUMANITY. IN HIS BOOK `NAVI PAHAT` HE HAD TOLD ABOUT THE `MODERN MAN`, NOW IN THIS BOOK HE TELLS ABOUT THE `NEW WORLD`
अध्यात्मामधे सातत्यानं विचारात घेतल्या जाणाया गोष्टी म्हणजे, प्रेम आणि करुणा! या पुस्तकातल्या प्रकरणांमध्ये या दोन्हीवर ओशोंनी नितांत सुंदर विचार मांडलेले आहेत. ‘पत्रकारिता’ हा खरं पाहता अध्यात्मातला भाग नव्हे. परंतु पत्रकारितेवर तीन प्रकरणं यामध्ये अशी आहेत, की सत्याऐंशी सालात ओशोंनी त्यावर मांडलेली मतं, आत्ता या काळात तंतोतंत खरी ठरलेली आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक पत्रकारानं आवर्जून वाचावीत, अशी ही प्रकरणं आहेत. प्रसारमाध्यमं ही संहारक शस्त्रांप्रमाणे असता कामा नयेत. कारण यामध्ये ‘मनुष्यत्व’ संपवलं जातं. म्हणूनच मनुष्यत्वाच्या दृष्टीनं काय आवश्यक आहे हे सांगताना ओशोंनी माणसाच्या अंतरंगात आणि बाह्यजगात कोणत्या पद्धतीच्या निष्ठा बाळगल्या पाहिजेत, याचा ऊहापोह केलेला आहे. ‘नवी पहाट’ या पुस्तकात नवीन माणूस कसा हवा, हे त्यांनी सांगितलं. आत्ता या पुस्तकात नवीन जगाची रचना कशी असावी, याबद्दल ते बोललेले आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"BANDAKHOR# BHAKTIT BHIJALA KABIR# EK EK PAUL# MAZE MAZYAPASHI KAHI NAHI #HA SHODH VEGALA# HASAT KHELAT DHYANADHARANA# MEERA EK VASANT AAHE # MEERA SHYAMRANGI RANGALI # MEERECHI MADHUSHALA # MEERECHYA PREMTIRTHAVAR # MHANE KABIR DIWANA # MI DHARMIKTA SHIKAVTO DHARM NAHI # MRUTUCHE AMARATVA # MRUTYAYUSHI # MRUTYU AMRUTACHE DWAR # MUGDHA KAHANI PREMACHI # NANAK NIRANKARI KAVI # NANAK PARMATMYACHA NAD OMKAR # NANAK SANSAARI SANYASTA # NANAK SUR SANGEET EK DHUN # SAD GHALTO KABIR # SAKSHATKARACHI DENGI # SHIVSUTRA-PART 1 # SHIVSUTRA-PART II-2 # SWATHACHA SHODH #VIDROHI ##मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 24-02-2002

    साक्षात्काराचे समर्पक विवेचन... ‘ओशो’ म्हणजेच रजनीश यांच्या ‘द न्यू डॉन’ या पुस्तकाचा प्रज्ञा ओक यांनी केलेल्या अनुवादाचा दुसरा भाग ‘साक्षात्कारची देणगी’ या नावानं प्रसिद्ध झाला आहे. या पुस्तकात एकूण अकरा सत्रं असून त्यात मानवी देताना त्यांनी म्हटलंआहे. बुद्धाला साक्षात्कार झाला तेव्हा तो संपूर्ण सात दिवस एकही शब्द ल बोलता शांत राहिला. याच संदर्भात इंग्लिश कवी कोलरीज आणि सूफी पंथीय योगी जलालुद्दीन रुपी यांची दिलेली उदाहरणे समर्पक आहेत. पाचव्या सत्रात त्यांनी ज्ञानी, आत्मसाक्षात्करी आणि जीवनाचा आनंद यातील संबंध विषद केला आहे. जीवनातलं चैतन्य आणि जागृती मिळून म्हणजे आत्मज्ञानी आत्मप्रकाशित होणं असं त्यांना वाटतं. या संदर्भात ते पुढे लिहितात, ‘बीजामध्ये जे जे काही लवलेलं असतं ते ते फुलाद्वारे फुटून बाहेर येतं. सुगंधाद्वारे बाहेर पडतं आणि हा सुगंध म्हणजेच आत्मबोध. हे फुल म्हणजेच आत्मसाक्षात्कार. यासंबंधी विस्तृत विवेचन करताना अकराव्या सत्रात त्यांनी म्हटलं आहे, ध्यानधारणेमुळे आत्मसाक्षात्कार घडतो. पुढच्या सत्रात आपल्या जीवनात होणाऱ्या बदलांना प्रेमानं कसं स्वीकारायचं तसंच अनिश्चित आणि अज्ञान अशा जगण्यावर कसं प्रेम करायचं हे मार्मिकपणे पटवून दिलं आहे. तिसऱ्या सत्रात सकारात्मक विचार करणाऱ्या माणसानं आग्रही असलंच पाहिजे. त्यानं जगासमोर यायलाच पाहिजे. अन्यथा नकारात्मक विचारांच्या माणसांच्या हातात जगाचा कारभार राहिल्यामुळे ही नकारात्मक माणसं इतरांचा आत्मशोधाचा कार्यावर निर्बंध आणू शकतील याचं विश्लेषण करताना त्यांनी बुद्ध, जिझस, टर्जिनिव्ह हा रशियन कादंबरीकार यांची उद्बोधक उदाहरणं दिली आहेत. ओशो ज्ञानी माणसाला अक्कलवान किंवा शहाणा माणूस समजत नाहीत. ज्ञान हे बाहेरून मिळतं पण अक्कल किंवा शहाणपणा अगदी आतल्या गाभ्यातून येतो. ज्ञान दुसरीकडून उसनं घेतलं जातं; परंतु अक्कल दुसरीकडून घेता येत नाही हा आपला दृष्टिकोन त्यांनी अतिशय समर्पक रीतीनं पटवून दिला आहे. मानवी मनाचं त्यांनी अतिशय सखोल विवेचन केले आहे. मन हे त्यांना बाह्यजगाशी आपला संबंध जोडण्यासाठी एक माध्यम, पूल किंवा खिडकी वाटते. आपण मनाशी जेव्हा तादात्म्य पावतो तेव्हाच त्याला खरी शक्ती मिळते. मनुष्य आणि त्याच मन यावर भाष्य करताना ते लिहितात, ‘मनाशी निगडीत राहू नका. रस्त्याच्या कडेला केवळ निरीक्षक म्हणून उभे रहा आणि मनाला रस्त्यावर जाऊ द्या! ते कसं जात आहे त्याचे फक्त साक्षीदार व्हा. काही वेळातच रस्ता रिकामा दिसेल. मन एखाद्या बांडगुळासारखं जगत असतं. (सत्र सात) साक्षात्काराला भाषाच नाही. कारण ती मनाच्या पलीकडची गोष्ट आहे आणि ही मनाच्या आवाक्यातली गोष्ट आहे याबाबत सहाव्या सत्रात भाष्य करताना बुद्धाचं उदाहरण पाहायला मिळतात. प्रसारमाध्यमं ही संहारक अस्त्राप्रमाणे असू नयेत कारण ती मनुष्यत्व संपवणारी आहेत. मनुष्यत्व टिकवण्याची आवश्यकता प्रतिपादन करताना माणसांनी आपल्या अंतरंगात आणि बाह्यजगात कोणत्या पद्धतीच्या निष्ठा बाळगल्या पाहिजेत याचा ऊहापोह केला आहे. आजच्या पत्रकारांनी ही प्रकरणं आवर्जून वाचली पाहिजेत. ‘पत्रकाराचं मन जर स्वच्छ असेल तर ते मानव जातीसाठी प्रचंड कार्य करू शकतात’ या ओशोंच्या विचारांचा मागोवा त्यांनी घेणं ही आजची अत्यावश्यक गरज आहे. प्रज्ञा ओक यांनी केलेला हा अनुवाद मराठीमध्ये सुरेख उतरला आहे. ओशोंच्या विचारातून त्यांची प्रगल्भ बुद्धिमत्ता, प्रगाळ चिंतनशील आणि सखोल तात्त्विकपणा यांची प्रचीती येते. त्यांची मतं व्यापक स्वरूपाची आहेत. विविध धर्म व त्यांचे धर्मग्रथं यांचा त्यांनी केलेला सूक्ष्म अभ्यासही इथं जाणवतो. मात्र त्यांनी व्यक्त केलेले विचार सर्वांनाच सारख्या प्रमाणात पटतीलच असंही म्हणता येत नाही. उदा. महात्मा गांधी आणि त्यांच्या चरख्याबाबत व्यक्त केलेल्या विचारांशी मी स्वत: सहमत होऊ शकत नाही. फ्राइड हा मानसशास्त्रज्ञ स्वत: मृत्यूला आणि भुतांना घाबरत होता ही माहिती प्रथमच माझ्या वाचनात आली. वाचकांना अज्ञात असलेल्या ओशो माहितींचा खजिनाच या पुस्तकात आहे. ओशोंनी अध्यात्माला विज्ञानाची जी जोड दिली आहे त्यामुळे आजच्या युवा पिढीनं हे पुस्तक अवश्य वाचावं असंच आहे. -बाळ राणे ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 04-11-2001

    अध्यात्मामध्ये सातत्यानं विचारात घेतल्या जाणाऱ्या गोष्टी म्हणजे प्रेम आणि करुणा! या पुस्तकातल्या प्रकरणांमध्ये या दोन्हींवर ओशोंनी नितांत सुंदर विचार मांडलेले आहेत. ‘पत्रकारिता’ हा खरं पाहता अध्यात्मातला भाग नव्हे; परंतु पत्रकारितेवर तीन प्रकरणं ामध्ये अशी आहेत की सत्याऐंशी सालात ओशोंनी त्यावर मांडलेली मत, आता या काळात तंतोतंत खरी ठरलेली आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक पत्रकारानं आवर्जून वाचावीत, अशी ही प्रकरणं आहेत. प्रसारमाध्यमं ही संहारक शस्त्रांप्रमाणे असता कामा नयेत. कारण यामध्ये ‘मनुष्यत्व’ संपवलं जातं. म्हणूनच मनुष्यत्वाच्या दृष्टीनं काय आवश्यक आहे हे सांगताना ओशोंनी माणसाच्या अंतरंगात आणि बाह्यजगात कोणत्या पद्धतीच्या निष्ठा बाळगल्या पाहिजेत, याचा ऊहापोह केलेला आहे. ‘नवी पहाट’ या पुस्तकात नवीन माणूस कसा हवा, हे त्यांनी सांगितलं. आता या पुस्तकात नवीन जगाची रचना कशी असावी, याबद्दल ते बोललेले आहेत. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 20-01-2002

    स्त्री आणि पुरुष यांच्यात प्रेम उत्पन्न होते तो क्षण म्हणजे खरा चमत्कार... मी नवा माणूस तयार करण्याच्या प्रयत्नात आहे : ओशो रजनीश ओशो रजनीश हे आधुनिक काळातील एक अत्यंत बुद्धिमान व्यक्तिमत्त्व होते. संन्यस्त वृत्तीची त्यांची संकल्पना वेगळी होती; आणिजगातील नामवंत अशा सर्व तत्त्वज्ञानप्रणालींचा गाभा आत्मसात करण्यातील त्यांची गती थक्क करणारी होती, त्या त्या तत्त्वज्ञानाचे पृथगात्म विशेष नेमके पकडून अत्यंत मधुर काव्यात्म शैलीत विशद करीत. अवघड व जटिल कल्पनाही मिया नसरुद्दिन वगैरेंचे समर्पक दृष्टांत देत सुलभपणे स्पष्ट करीत. कृष्ण, शिव, शांडिल्य, नारद, महावीर, येशू ख्रिस्त अशा जागतिक तत्त्वज्ञांच्या बरोबरीने आदिशंकराचार्य, गोरक्षनाथ, कबीर, नानक, रेदास, दरियादास, मीरा वगैरे भारतीय अध्यात्म क्षेत्रातील महानुभाव त्यांनी शेकडो प्रवचने दिली. ध्यान, योग, तंत्र, मंत्र, ताओ, झेन, हसीद, सूफी वगैरे साधन पंरपरांतील गूढ रहस्यांवर यांचवर त्यांनी प्रकाश टाकला. राजकारण, तत्त्वज्ञान मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, समाजशास्त्र, विज्ञान, लोकसंख्या विस्फोट, पर्यावरण, परमाणू युद्ध, सेक्स वगैरे विषयांच्या अनुरोधानेही अत्यंत तरल, अभिनव विचार त्यांनी प्रकट केले. साडेसहाशेवर पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. त्यांचे तीस भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. माझा संदेश म्हणजे रूपांतराची एक किमया : माझा देश हा एखादा सिद्धांत वा चिंतन या स्वरुपात नाही; तर माझा संदेश म्हणजे रुपांतराची एक किमया, एक विज्ञान आहे’ असे ते म्हणत. ‘झोर्बा द बुद्ध’ अशा आदर्श माणसाची कल्पना ते पुढे मांडतात. झोर्बाप्रमाणे भौतिक जीवनात संपूर्ण आनंद उपभोगण्याची क्षमता व इच्छा असणारा, तसेच गौतम बुद्धाप्रमाणे मूक होऊन ध्यानातही उतरून या व्यापक अफाट विश्वाच्या गाभ्याचा वेध घेणारा, त्याच्याशी एकरूपता अनुभवणारा असा माणूस त्यांना अभिप्रेत आहे. भौतिक व अध्यात्मिक या दोन्ही दृष्टींनी समृद्ध अशा व्यक्तिमत्त्वाचा आग्रह ते धरतात. ती क्षमता प्रत्येक माणसात आहे असे ते मानतात. कुठल्याही धर्मविचारांपेक्षा या कर्मकांडापेक्षा ध्यानाच्या मार्गाने ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकतो असा विचार ते आग्रहाने मांडतात. ‘द न्यू डॉन’ या इंग्रजी पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचा अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊसने’ साक्षात्काराची देणगी’ या नावाने प्रसिद्ध केला आहे. ‘नवी पहाट’ या नावाने पहिल्या भागाचा अनुवाद करणाऱ्या प्रज्ञा ओक यांनीच या दुसऱ्या भागाचाही अनुवाद केला आहे. या पुस्तकात ११ सत्रांतील प्रश्नोत्तरांचा समावेश आहे. हे प्रश्न निरनिराळ्या व्यक्तींनी विचारले. कधी वैयक्तिक, कधी आध्यात्मिक. पुरुषद्वेशाचा कचरा मनातून बाहेर कसा काढता येईल? १) स्त्री ही नेहमी पुरुषाच्या बँक शिलकीवर लक्ष ठेवून प्रेम करते; पण पुरुष तसं करीत नाही असं ओशोंचं जे मत आहे, ते मला पटत नाही. माझी आई तर पुरुषांचा द्वेषच करते. माझ्या मनातही पुरुषांबद्दल रागसंतापच आहे. हा पुरुषद्वेषाचा कचरा मनातून बाहेर कसा काढता येईल?– एका तरुणीचा प्रश्न. २) आपल्या आश्रमात राहताना आपल्या प्रेमाच्या आणि करुणेच्या वर्षावात न्हाऊन निघाल्याने परमानंदाचा अनुभव येतो. पण आपण या आनंदाला लायक नाही, अशीही बोचणी मनाला कुतडत राहते. त्यामुळे निराशा वाटून येते. याबाबतच मला आपली मदत हवी आहे. ती द्याल?– दुसरी एक तरुणी. ३) तुम्ही म्हणता, आपण सगळेच जण आता अंतर्बाह्य ज्ञानी झालोय. पण तसं काही मला जाणवत नाही. तुमचं म्हणणं आम्ही विसरलोय. ही विसरण्याची वेळ बरोबर आहे का? ४) तुमचं लेखन वाचून व तुमच्या सहवासात असताना आपल्यात बदल होतो आहे असे जाणवते. माझ्यावरील आवरणे गळून पडत आहेत. पण हे जाणवणे म्हणजे कल्पनेचा खेळ नव्हे ना? मला जाणवणारी ही प्रगाढ शांतता म्हणजे भ्रम तर नव्हे ना? ज्ञान आणि अक्कल यात फरक काय? ५) ज्ञान आणि शहाणपणा किंवा अक्कल यात नेमका फरक आहे? (ज्ञान हे बाहेरून मिळतं. अककल किंवा शहाणपणा हा आतल्या गाभ्यातून येतो. ज्ञान दुसरीकडून घेता येतं. अक्कल कुणाकडून घेता येत नाही. कुणाला देता येत नाही.) ज्ञान मिळवलेला माणूस हा अक्कलवान असतोच असे नाही. शहाणा माणूस ज्ञानी असतो. ज्ञानाची धूळ त्याच्या डोळ्यांवर साचलेली नसते. तो आपल्या अस्तित्वासह पूर्णपणे सतत जागा असतो. तो पूर्ण जाणिवेनं आपली कृती करतो. ती कृती शहाणपणाची असते. ६) गेली नऊ वर्षे मी तुमची प्रवचने ऐकतो आहे. पण तरीही तुमच्या माझ्यात असणारं अंतर कमी झालंय असं वाटत नाही. मी काय करू? सगळं विसर्जित करू? भेटू? पुढची पायी कशी गाठू? ७) ज्ञानी होणं, आत्मसाक्षात्कारी होणं आणि जीवनाचा आनंद घेणं यामये काही संबंध आहे का? कोणता? आत्मज्ञानी होणं म्हणजेच जीवनाचा आनंद हे खरं का? साक्षात्काराची भाषा कोणती? ८) माझ्या मनात मृत्यूचा विचार वरचेवर येतो. माझा मृत्यू. तुमचा मृत्यू. तुमच्या विरहाची कल्पनाही मला सहन होत नाही. माझ्या आयुष्याचं जर काही उद्दिष्ट असेल तर ते तुम्हीच आहात. मी आत्मज्ञानी होऊन तुम्हाला माझं समर्पण करणं ही सुंदर भेट ठरेल. तेव्हा ध्यानधारणेची योग्य पद्धत कोणती? ९) साक्षात्काराची भाषा कोणती? (साक्षात्काराची भाषाच नाही. साक्षात्कार ही मनाच्या, बुद्धीच्या पलीकडची गोष्ट आहे, आणि भाषा ही मनाच्या आवाक्यातली गोष्ट आहे. साक्षात्कार हा प्रगाढ शांतीतला एक अनुभव आहे. साक्षात्काराचा आवाका इतका मोठा असतो की त्यातला आनंद, कृतार्थता, खरेपणा, प्रेम, करुणा हे सारं वेगवेगळ्या मार्गांनी प्रगट होतंच. मनुष्य प्राण्याच्या अत्युच्च जागरुकतेतला तो एक अनुभव असतो.) १०) माझ्या अंतर्मनात तुम्ही प्रवेश केलाय असे मला जाणवते. त्याची कल्पना येते हा मला माझा शोध लागल्याचा अनुभव देतो. या दोन्ही गोष्टी एकच आहेत का? मी म्हणजे एक व्यर्थ गेलेली व्यक्ती वा गोष्ट आहे असं तुम्हाला वाटतं का? ११) माझ्या मनावर जुने सनातनी, संस्कार आहेत. त्या मागे मी जाऊ की त्यांचा त्याग करू? त्यासाठी केवळ जागरुकता पुरे की आणखी काही करायला हवे? १२) ध्यानधारणा करताना कधी कधी मला विशालतेचा अनुभव येतो. आपण आपल्यातल्या शांतीमय अवकाशात विहार करीत आहोत असे जाणवते. पण त्या विशालतेने कधी कधी मनावर दडपण आल्यासारखेही वाटते. ती विलक्षण प्रगाढ शांतताही अस्वस्थ करते. कुठल्यातरी कुंपणाशी आपण उभे आहोत, असे वाटत राहते. हे कुंपण खरोखरच असेल तर ते कसले कुंपण म्हणायचे. १३) तुमच्या संबंधी उलटसुलट बातम्या वृत्तपत्रांत येतात. तुम्हाला बाजारमूल्य आहे असं पत्रकार मानतात. तुम्ही आत्म्याला तृप्त करता. पण आम्ही पत्रकार मन व शरीर तृप्त करणाऱ्या वस्तूंना किंमत देतो, हे बरोबर म्हणायचे का? १४) मंदिरात प्रवेश केल्यावर मानसिक शांतता लाभते. आजकालच्या उद्योगधंद्याच्या ठिकाणांना सद्यकालीन मंदिरच मानून असं वातावरण तिथं निर्माण करता येईल का? १५) व्यापाराचं उद्दिष्ट माल विकणं. हा माल अनेकदा लोकांना नको असलेल्या वस्तूंचाही असतो. व्यापाऱ्याच्या वैयक्तिक जीवनातही अनेक विसंगती दिसतात. हे कितपत योग्य आहे? १६) पत्रकारितेच्या प्रशिक्षणांत आत्मोन्नतीच्या, अध्यात्माच्या गोष्टींना स्थान नसते. १७) उत्तम पत्रकारितेचं लक्षण कोणतं? सकारात्मक बातम्या? माध्यमांची जबाबदारी काय असावी? १८) विवाह या गोष्टीपेक्षा आत्म्याचं मीलन ही कल्पना अधिक श्रेयस्कर मानावी का? १९) निद्रा म्हणजे नेमके काय? विश्रांती घेत असतानाही आपण शरीराबाहेर असतो का? २०) मनुष्य निर्मित अनुवंशिकतेचा वाटा फार अल्प असतो असे मला वाटते. आईवडिलांच्या विशिष्ट जनुकांपासून भगवान निर्माण होईल का? २१) भगवान बुद्ध सांगतात, की करुणा व ध्यानधारणा या दोन्ही गोष्टी बरोबर चालायला हव्या. तुमच्याकडे पाहताना मनात करुणा जागी होते आणि अश्रू दाटून येतात. करुणेकडे जायचा मार्ग सांगता येईल का? २२) तुमच्या सहवासात असताना चैतन्याशी एकरूप झाल्याचा अनुभव येतो. शरीरात अज्ञान शक्तीचे तांडव सुरू असते. विश्वाची जाणीव होते. विश्व म्हणजे आपणच असे वाटते. हा भ्रम तर नव्हे? असे वेगवेगळे प्रश्न त्यांना विचारण्यात आले. अशा प्रश्नांची उत्तरे देण्याच्या निमित्ताने ओशोंनी आपल्या प्रवचनामध्ये अनेक मार्मिक, अभिनव भाष्य केलेले आहे. येथे त्या भाष्याची झलक पेश करणेही शक्य नाही. कारण त्यालाही खूप जागा द्यावी लागेल. मूळात पुस्तक वाचणे हायच त्यासाठी उत्तम मार्ग. मी नवा माणूस तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र पहिल्या प्रश्नाचे उत्तर अनेक वाचकांना हवेसे वाटणार म्हणून ते तेवढे येथे देतो. ओशो प्रश्नकत्र्या तरुणीच्या मनातला पुरुषद्वेषाचा कचरा दूर करण्याच्या संदर्भात सांगतात: ‘‘मी नवा माणूस तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. हा नवा माणूस आपल्या भूतकाळातल्या पूर्वग्रहांपासून मुक्त असू शकेल. पुरुषांकडे पाहण्याचीही नवी दृष्टी हवी. स्त्रीवाचून पुरुष जसा अपूर्ण आहे तशीच स्त्रीसुद्धा पुरुषावाचून अपूर्णच आहे. (आत्मज्ञान झाल्यावर मात्र या दोहोचं अस्तित्व आपल्याला पूर्णत्व देऊ शकेल.) आपला जन्मच मुळी स्त्रीपुरुष मीलनातून होतो; त्यामुळे स्त्रीबरोबर किंवा पुरुषाबरोबर समरस होऊनच, मिळूनच, पूर्णत्व मिळवायला हवे. स्त्री म्हणजे गूढ नव्हे; पुरुष म्हणजेही गूढ नव्हे. चमत्कार नव्हे. ज्या क्षणी या दोघांत प्रेम उत्पन्न होते तो क्षण म्हणजे रखरखीत वाळवंट. कोरडे ठणठणीत. दोघे असणे म्हणजे हजारो फुले फुलणारा वसंत. पुरुषावर प्रेम कसं करायचं हे शिकायलाच हवं. प्रेमाच्या स्पर्शानं स्त्री बहरायला लागते. अन्यथा मिटलेल्या कळीसारखे राहते. फक्त प्रेमातच ती आपल्या पाकळ्या उलगडते. आईच्या पुरुषद्वेष्ट्या व वृत्तीच्या प्रभावातून बाहेर पड. आंधळेपणा टाकून दे. ध्यानधारणा व प्रेम या गोष्टी परस्परपूरक आहेत. प्रमानेच स्त्री किंवा पुरुष यांना पूर्णत्व येते. पुरुषद्वेषाची व स्त्रीद्वेषाची भावना जीवनाला विकृत बनवते– अशा आशयाचे भाष्य ओशो करतात. मानसशास्त्राचे ते गाढे अभ्यासक, जाणकार होते. जीवन एकांगी, अर्धवट असू नये, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निर्मळ असावा, कुठल्याही पूर्वग्रहांनी आणि नीतिमूल्यांच्या जुनाट कल्पनांनी तो दुषित झालेला नसावा असा त्यांचा आग्रह होता. ओशोंची विविध विषयांवरची ही भाष्ये वाचणे म्हणजे ढगाळलेल्या वातावरणातून स्वच्छ कोवळ्या सूर्यप्रकाशात प्रवेश करणे. मनावरची अभ्रे दूर करणे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more