* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE NEW DAWN
  • Availability : Available
  • Translators : PRADNYA OAK
  • ISBN : 9788177662023
  • Edition : 4
  • Publishing Year : 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 240
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : RELIGIOUS & SPIRITUALS
  • Available in Combos :OSHO COMBO SET - 37 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
LOVE AND SYMPATHY THESE ARE THE TWO FEELINGS THAT HAVE BEEN CONTINUOUSLY CONSIDERED BY SPIRITUALITY. OSHO BEAUTIFULLY PRESENTS HIS VIEW ON THESE TWO FEELINGS IN THE BOOK. JOURNALISM IS IN NO WAY RELATED TO SPIRITUALITY, YET THIS BOOK CONSISTS OF THREE CHAPTERS ON JOURNALISM. IN 1987, OSHO HAD PENNED DOWN HIS THOUGHTS ON JOURNALISM, IT IS ASTONISHING TO SEE THEM COMING TRUE TODAY. EVERY JOURNALIST SHOULD READ THESE CHAPTERS AT LEAST ONCE. OSHO TELLS US THAT MEDIA SHOULD NOT WORK AS DESTRUCTIVE WEAPONS, OTHERWISE THE HUMANITY WILL BE BURNT TO ASHES. OSHO NOT ONLY TELLS US THE WAY TO BUILD OUR FEALTY INWARDLY AS WELL AS OUTWARDLY, BUT HE ALSO RELATES THE IMPORTANT THINGS FOR RAISING HUMANITY. IN HIS BOOK `NAVI PAHAT` HE HAD TOLD ABOUT THE `MODERN MAN`, NOW IN THIS BOOK HE TELLS ABOUT THE `NEW WORLD`
अध्यात्मामधे सातत्यानं विचारात घेतल्या जाणाया गोष्टी म्हणजे, प्रेम आणि करुणा! या पुस्तकातल्या प्रकरणांमध्ये या दोन्हीवर ओशोंनी नितांत सुंदर विचार मांडलेले आहेत. ‘पत्रकारिता’ हा खरं पाहता अध्यात्मातला भाग नव्हे. परंतु पत्रकारितेवर तीन प्रकरणं यामध्ये अशी आहेत, की सत्याऐंशी सालात ओशोंनी त्यावर मांडलेली मतं, आत्ता या काळात तंतोतंत खरी ठरलेली आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक पत्रकारानं आवर्जून वाचावीत, अशी ही प्रकरणं आहेत. प्रसारमाध्यमं ही संहारक शस्त्रांप्रमाणे असता कामा नयेत. कारण यामध्ये ‘मनुष्यत्व’ संपवलं जातं. म्हणूनच मनुष्यत्वाच्या दृष्टीनं काय आवश्यक आहे हे सांगताना ओशोंनी माणसाच्या अंतरंगात आणि बाह्यजगात कोणत्या पद्धतीच्या निष्ठा बाळगल्या पाहिजेत, याचा ऊहापोह केलेला आहे. ‘नवी पहाट’ या पुस्तकात नवीन माणूस कसा हवा, हे त्यांनी सांगितलं. आत्ता या पुस्तकात नवीन जगाची रचना कशी असावी, याबद्दल ते बोललेले आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"BANDAKHOR# BHAKTIT BHIJALA KABIR# EK EK PAUL# MAZE MAZYAPASHI KAHI NAHI #HA SHODH VEGALA# HASAT KHELAT DHYANADHARANA# MEERA EK VASANT AAHE # MEERA SHYAMRANGI RANGALI # MEERECHI MADHUSHALA # MEERECHYA PREMTIRTHAVAR # MHANE KABIR DIWANA # MI DHARMIKTA SHIKAVTO DHARM NAHI # MRUTUCHE AMARATVA # MRUTYAYUSHI # MRUTYU AMRUTACHE DWAR # MUGDHA KAHANI PREMACHI # NANAK NIRANKARI KAVI # NANAK PARMATMYACHA NAD OMKAR # NANAK SANSAARI SANYASTA # NANAK SUR SANGEET EK DHUN # SAD GHALTO KABIR # SAKSHATKARACHI DENGI # SHIVSUTRA-PART 1 # SHIVSUTRA-PART II-2 # SWATHACHA SHODH #VIDROHI ##मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 24-02-2002

    साक्षात्काराचे समर्पक विवेचन... ‘ओशो’ म्हणजेच रजनीश यांच्या ‘द न्यू डॉन’ या पुस्तकाचा प्रज्ञा ओक यांनी केलेल्या अनुवादाचा दुसरा भाग ‘साक्षात्कारची देणगी’ या नावानं प्रसिद्ध झाला आहे. या पुस्तकात एकूण अकरा सत्रं असून त्यात मानवी देताना त्यांनी म्हटलंआहे. बुद्धाला साक्षात्कार झाला तेव्हा तो संपूर्ण सात दिवस एकही शब्द ल बोलता शांत राहिला. याच संदर्भात इंग्लिश कवी कोलरीज आणि सूफी पंथीय योगी जलालुद्दीन रुपी यांची दिलेली उदाहरणे समर्पक आहेत. पाचव्या सत्रात त्यांनी ज्ञानी, आत्मसाक्षात्करी आणि जीवनाचा आनंद यातील संबंध विषद केला आहे. जीवनातलं चैतन्य आणि जागृती मिळून म्हणजे आत्मज्ञानी आत्मप्रकाशित होणं असं त्यांना वाटतं. या संदर्भात ते पुढे लिहितात, ‘बीजामध्ये जे जे काही लवलेलं असतं ते ते फुलाद्वारे फुटून बाहेर येतं. सुगंधाद्वारे बाहेर पडतं आणि हा सुगंध म्हणजेच आत्मबोध. हे फुल म्हणजेच आत्मसाक्षात्कार. यासंबंधी विस्तृत विवेचन करताना अकराव्या सत्रात त्यांनी म्हटलं आहे, ध्यानधारणेमुळे आत्मसाक्षात्कार घडतो. पुढच्या सत्रात आपल्या जीवनात होणाऱ्या बदलांना प्रेमानं कसं स्वीकारायचं तसंच अनिश्चित आणि अज्ञान अशा जगण्यावर कसं प्रेम करायचं हे मार्मिकपणे पटवून दिलं आहे. तिसऱ्या सत्रात सकारात्मक विचार करणाऱ्या माणसानं आग्रही असलंच पाहिजे. त्यानं जगासमोर यायलाच पाहिजे. अन्यथा नकारात्मक विचारांच्या माणसांच्या हातात जगाचा कारभार राहिल्यामुळे ही नकारात्मक माणसं इतरांचा आत्मशोधाचा कार्यावर निर्बंध आणू शकतील याचं विश्लेषण करताना त्यांनी बुद्ध, जिझस, टर्जिनिव्ह हा रशियन कादंबरीकार यांची उद्बोधक उदाहरणं दिली आहेत. ओशो ज्ञानी माणसाला अक्कलवान किंवा शहाणा माणूस समजत नाहीत. ज्ञान हे बाहेरून मिळतं पण अक्कल किंवा शहाणपणा अगदी आतल्या गाभ्यातून येतो. ज्ञान दुसरीकडून उसनं घेतलं जातं; परंतु अक्कल दुसरीकडून घेता येत नाही हा आपला दृष्टिकोन त्यांनी अतिशय समर्पक रीतीनं पटवून दिला आहे. मानवी मनाचं त्यांनी अतिशय सखोल विवेचन केले आहे. मन हे त्यांना बाह्यजगाशी आपला संबंध जोडण्यासाठी एक माध्यम, पूल किंवा खिडकी वाटते. आपण मनाशी जेव्हा तादात्म्य पावतो तेव्हाच त्याला खरी शक्ती मिळते. मनुष्य आणि त्याच मन यावर भाष्य करताना ते लिहितात, ‘मनाशी निगडीत राहू नका. रस्त्याच्या कडेला केवळ निरीक्षक म्हणून उभे रहा आणि मनाला रस्त्यावर जाऊ द्या! ते कसं जात आहे त्याचे फक्त साक्षीदार व्हा. काही वेळातच रस्ता रिकामा दिसेल. मन एखाद्या बांडगुळासारखं जगत असतं. (सत्र सात) साक्षात्काराला भाषाच नाही. कारण ती मनाच्या पलीकडची गोष्ट आहे आणि ही मनाच्या आवाक्यातली गोष्ट आहे याबाबत सहाव्या सत्रात भाष्य करताना बुद्धाचं उदाहरण पाहायला मिळतात. प्रसारमाध्यमं ही संहारक अस्त्राप्रमाणे असू नयेत कारण ती मनुष्यत्व संपवणारी आहेत. मनुष्यत्व टिकवण्याची आवश्यकता प्रतिपादन करताना माणसांनी आपल्या अंतरंगात आणि बाह्यजगात कोणत्या पद्धतीच्या निष्ठा बाळगल्या पाहिजेत याचा ऊहापोह केला आहे. आजच्या पत्रकारांनी ही प्रकरणं आवर्जून वाचली पाहिजेत. ‘पत्रकाराचं मन जर स्वच्छ असेल तर ते मानव जातीसाठी प्रचंड कार्य करू शकतात’ या ओशोंच्या विचारांचा मागोवा त्यांनी घेणं ही आजची अत्यावश्यक गरज आहे. प्रज्ञा ओक यांनी केलेला हा अनुवाद मराठीमध्ये सुरेख उतरला आहे. ओशोंच्या विचारातून त्यांची प्रगल्भ बुद्धिमत्ता, प्रगाळ चिंतनशील आणि सखोल तात्त्विकपणा यांची प्रचीती येते. त्यांची मतं व्यापक स्वरूपाची आहेत. विविध धर्म व त्यांचे धर्मग्रथं यांचा त्यांनी केलेला सूक्ष्म अभ्यासही इथं जाणवतो. मात्र त्यांनी व्यक्त केलेले विचार सर्वांनाच सारख्या प्रमाणात पटतीलच असंही म्हणता येत नाही. उदा. महात्मा गांधी आणि त्यांच्या चरख्याबाबत व्यक्त केलेल्या विचारांशी मी स्वत: सहमत होऊ शकत नाही. फ्राइड हा मानसशास्त्रज्ञ स्वत: मृत्यूला आणि भुतांना घाबरत होता ही माहिती प्रथमच माझ्या वाचनात आली. वाचकांना अज्ञात असलेल्या ओशो माहितींचा खजिनाच या पुस्तकात आहे. ओशोंनी अध्यात्माला विज्ञानाची जी जोड दिली आहे त्यामुळे आजच्या युवा पिढीनं हे पुस्तक अवश्य वाचावं असंच आहे. -बाळ राणे ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 04-11-2001

    अध्यात्मामध्ये सातत्यानं विचारात घेतल्या जाणाऱ्या गोष्टी म्हणजे प्रेम आणि करुणा! या पुस्तकातल्या प्रकरणांमध्ये या दोन्हींवर ओशोंनी नितांत सुंदर विचार मांडलेले आहेत. ‘पत्रकारिता’ हा खरं पाहता अध्यात्मातला भाग नव्हे; परंतु पत्रकारितेवर तीन प्रकरणं ामध्ये अशी आहेत की सत्याऐंशी सालात ओशोंनी त्यावर मांडलेली मत, आता या काळात तंतोतंत खरी ठरलेली आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक पत्रकारानं आवर्जून वाचावीत, अशी ही प्रकरणं आहेत. प्रसारमाध्यमं ही संहारक शस्त्रांप्रमाणे असता कामा नयेत. कारण यामध्ये ‘मनुष्यत्व’ संपवलं जातं. म्हणूनच मनुष्यत्वाच्या दृष्टीनं काय आवश्यक आहे हे सांगताना ओशोंनी माणसाच्या अंतरंगात आणि बाह्यजगात कोणत्या पद्धतीच्या निष्ठा बाळगल्या पाहिजेत, याचा ऊहापोह केलेला आहे. ‘नवी पहाट’ या पुस्तकात नवीन माणूस कसा हवा, हे त्यांनी सांगितलं. आता या पुस्तकात नवीन जगाची रचना कशी असावी, याबद्दल ते बोललेले आहेत. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 20-01-2002

    स्त्री आणि पुरुष यांच्यात प्रेम उत्पन्न होते तो क्षण म्हणजे खरा चमत्कार... मी नवा माणूस तयार करण्याच्या प्रयत्नात आहे : ओशो रजनीश ओशो रजनीश हे आधुनिक काळातील एक अत्यंत बुद्धिमान व्यक्तिमत्त्व होते. संन्यस्त वृत्तीची त्यांची संकल्पना वेगळी होती; आणिजगातील नामवंत अशा सर्व तत्त्वज्ञानप्रणालींचा गाभा आत्मसात करण्यातील त्यांची गती थक्क करणारी होती, त्या त्या तत्त्वज्ञानाचे पृथगात्म विशेष नेमके पकडून अत्यंत मधुर काव्यात्म शैलीत विशद करीत. अवघड व जटिल कल्पनाही मिया नसरुद्दिन वगैरेंचे समर्पक दृष्टांत देत सुलभपणे स्पष्ट करीत. कृष्ण, शिव, शांडिल्य, नारद, महावीर, येशू ख्रिस्त अशा जागतिक तत्त्वज्ञांच्या बरोबरीने आदिशंकराचार्य, गोरक्षनाथ, कबीर, नानक, रेदास, दरियादास, मीरा वगैरे भारतीय अध्यात्म क्षेत्रातील महानुभाव त्यांनी शेकडो प्रवचने दिली. ध्यान, योग, तंत्र, मंत्र, ताओ, झेन, हसीद, सूफी वगैरे साधन पंरपरांतील गूढ रहस्यांवर यांचवर त्यांनी प्रकाश टाकला. राजकारण, तत्त्वज्ञान मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, समाजशास्त्र, विज्ञान, लोकसंख्या विस्फोट, पर्यावरण, परमाणू युद्ध, सेक्स वगैरे विषयांच्या अनुरोधानेही अत्यंत तरल, अभिनव विचार त्यांनी प्रकट केले. साडेसहाशेवर पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. त्यांचे तीस भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. माझा संदेश म्हणजे रूपांतराची एक किमया : माझा देश हा एखादा सिद्धांत वा चिंतन या स्वरुपात नाही; तर माझा संदेश म्हणजे रुपांतराची एक किमया, एक विज्ञान आहे’ असे ते म्हणत. ‘झोर्बा द बुद्ध’ अशा आदर्श माणसाची कल्पना ते पुढे मांडतात. झोर्बाप्रमाणे भौतिक जीवनात संपूर्ण आनंद उपभोगण्याची क्षमता व इच्छा असणारा, तसेच गौतम बुद्धाप्रमाणे मूक होऊन ध्यानातही उतरून या व्यापक अफाट विश्वाच्या गाभ्याचा वेध घेणारा, त्याच्याशी एकरूपता अनुभवणारा असा माणूस त्यांना अभिप्रेत आहे. भौतिक व अध्यात्मिक या दोन्ही दृष्टींनी समृद्ध अशा व्यक्तिमत्त्वाचा आग्रह ते धरतात. ती क्षमता प्रत्येक माणसात आहे असे ते मानतात. कुठल्याही धर्मविचारांपेक्षा या कर्मकांडापेक्षा ध्यानाच्या मार्गाने ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकतो असा विचार ते आग्रहाने मांडतात. ‘द न्यू डॉन’ या इंग्रजी पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचा अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊसने’ साक्षात्काराची देणगी’ या नावाने प्रसिद्ध केला आहे. ‘नवी पहाट’ या नावाने पहिल्या भागाचा अनुवाद करणाऱ्या प्रज्ञा ओक यांनीच या दुसऱ्या भागाचाही अनुवाद केला आहे. या पुस्तकात ११ सत्रांतील प्रश्नोत्तरांचा समावेश आहे. हे प्रश्न निरनिराळ्या व्यक्तींनी विचारले. कधी वैयक्तिक, कधी आध्यात्मिक. पुरुषद्वेशाचा कचरा मनातून बाहेर कसा काढता येईल? १) स्त्री ही नेहमी पुरुषाच्या बँक शिलकीवर लक्ष ठेवून प्रेम करते; पण पुरुष तसं करीत नाही असं ओशोंचं जे मत आहे, ते मला पटत नाही. माझी आई तर पुरुषांचा द्वेषच करते. माझ्या मनातही पुरुषांबद्दल रागसंतापच आहे. हा पुरुषद्वेषाचा कचरा मनातून बाहेर कसा काढता येईल?– एका तरुणीचा प्रश्न. २) आपल्या आश्रमात राहताना आपल्या प्रेमाच्या आणि करुणेच्या वर्षावात न्हाऊन निघाल्याने परमानंदाचा अनुभव येतो. पण आपण या आनंदाला लायक नाही, अशीही बोचणी मनाला कुतडत राहते. त्यामुळे निराशा वाटून येते. याबाबतच मला आपली मदत हवी आहे. ती द्याल?– दुसरी एक तरुणी. ३) तुम्ही म्हणता, आपण सगळेच जण आता अंतर्बाह्य ज्ञानी झालोय. पण तसं काही मला जाणवत नाही. तुमचं म्हणणं आम्ही विसरलोय. ही विसरण्याची वेळ बरोबर आहे का? ४) तुमचं लेखन वाचून व तुमच्या सहवासात असताना आपल्यात बदल होतो आहे असे जाणवते. माझ्यावरील आवरणे गळून पडत आहेत. पण हे जाणवणे म्हणजे कल्पनेचा खेळ नव्हे ना? मला जाणवणारी ही प्रगाढ शांतता म्हणजे भ्रम तर नव्हे ना? ज्ञान आणि अक्कल यात फरक काय? ५) ज्ञान आणि शहाणपणा किंवा अक्कल यात नेमका फरक आहे? (ज्ञान हे बाहेरून मिळतं. अककल किंवा शहाणपणा हा आतल्या गाभ्यातून येतो. ज्ञान दुसरीकडून घेता येतं. अक्कल कुणाकडून घेता येत नाही. कुणाला देता येत नाही.) ज्ञान मिळवलेला माणूस हा अक्कलवान असतोच असे नाही. शहाणा माणूस ज्ञानी असतो. ज्ञानाची धूळ त्याच्या डोळ्यांवर साचलेली नसते. तो आपल्या अस्तित्वासह पूर्णपणे सतत जागा असतो. तो पूर्ण जाणिवेनं आपली कृती करतो. ती कृती शहाणपणाची असते. ६) गेली नऊ वर्षे मी तुमची प्रवचने ऐकतो आहे. पण तरीही तुमच्या माझ्यात असणारं अंतर कमी झालंय असं वाटत नाही. मी काय करू? सगळं विसर्जित करू? भेटू? पुढची पायी कशी गाठू? ७) ज्ञानी होणं, आत्मसाक्षात्कारी होणं आणि जीवनाचा आनंद घेणं यामये काही संबंध आहे का? कोणता? आत्मज्ञानी होणं म्हणजेच जीवनाचा आनंद हे खरं का? साक्षात्काराची भाषा कोणती? ८) माझ्या मनात मृत्यूचा विचार वरचेवर येतो. माझा मृत्यू. तुमचा मृत्यू. तुमच्या विरहाची कल्पनाही मला सहन होत नाही. माझ्या आयुष्याचं जर काही उद्दिष्ट असेल तर ते तुम्हीच आहात. मी आत्मज्ञानी होऊन तुम्हाला माझं समर्पण करणं ही सुंदर भेट ठरेल. तेव्हा ध्यानधारणेची योग्य पद्धत कोणती? ९) साक्षात्काराची भाषा कोणती? (साक्षात्काराची भाषाच नाही. साक्षात्कार ही मनाच्या, बुद्धीच्या पलीकडची गोष्ट आहे, आणि भाषा ही मनाच्या आवाक्यातली गोष्ट आहे. साक्षात्कार हा प्रगाढ शांतीतला एक अनुभव आहे. साक्षात्काराचा आवाका इतका मोठा असतो की त्यातला आनंद, कृतार्थता, खरेपणा, प्रेम, करुणा हे सारं वेगवेगळ्या मार्गांनी प्रगट होतंच. मनुष्य प्राण्याच्या अत्युच्च जागरुकतेतला तो एक अनुभव असतो.) १०) माझ्या अंतर्मनात तुम्ही प्रवेश केलाय असे मला जाणवते. त्याची कल्पना येते हा मला माझा शोध लागल्याचा अनुभव देतो. या दोन्ही गोष्टी एकच आहेत का? मी म्हणजे एक व्यर्थ गेलेली व्यक्ती वा गोष्ट आहे असं तुम्हाला वाटतं का? ११) माझ्या मनावर जुने सनातनी, संस्कार आहेत. त्या मागे मी जाऊ की त्यांचा त्याग करू? त्यासाठी केवळ जागरुकता पुरे की आणखी काही करायला हवे? १२) ध्यानधारणा करताना कधी कधी मला विशालतेचा अनुभव येतो. आपण आपल्यातल्या शांतीमय अवकाशात विहार करीत आहोत असे जाणवते. पण त्या विशालतेने कधी कधी मनावर दडपण आल्यासारखेही वाटते. ती विलक्षण प्रगाढ शांतताही अस्वस्थ करते. कुठल्यातरी कुंपणाशी आपण उभे आहोत, असे वाटत राहते. हे कुंपण खरोखरच असेल तर ते कसले कुंपण म्हणायचे. १३) तुमच्या संबंधी उलटसुलट बातम्या वृत्तपत्रांत येतात. तुम्हाला बाजारमूल्य आहे असं पत्रकार मानतात. तुम्ही आत्म्याला तृप्त करता. पण आम्ही पत्रकार मन व शरीर तृप्त करणाऱ्या वस्तूंना किंमत देतो, हे बरोबर म्हणायचे का? १४) मंदिरात प्रवेश केल्यावर मानसिक शांतता लाभते. आजकालच्या उद्योगधंद्याच्या ठिकाणांना सद्यकालीन मंदिरच मानून असं वातावरण तिथं निर्माण करता येईल का? १५) व्यापाराचं उद्दिष्ट माल विकणं. हा माल अनेकदा लोकांना नको असलेल्या वस्तूंचाही असतो. व्यापाऱ्याच्या वैयक्तिक जीवनातही अनेक विसंगती दिसतात. हे कितपत योग्य आहे? १६) पत्रकारितेच्या प्रशिक्षणांत आत्मोन्नतीच्या, अध्यात्माच्या गोष्टींना स्थान नसते. १७) उत्तम पत्रकारितेचं लक्षण कोणतं? सकारात्मक बातम्या? माध्यमांची जबाबदारी काय असावी? १८) विवाह या गोष्टीपेक्षा आत्म्याचं मीलन ही कल्पना अधिक श्रेयस्कर मानावी का? १९) निद्रा म्हणजे नेमके काय? विश्रांती घेत असतानाही आपण शरीराबाहेर असतो का? २०) मनुष्य निर्मित अनुवंशिकतेचा वाटा फार अल्प असतो असे मला वाटते. आईवडिलांच्या विशिष्ट जनुकांपासून भगवान निर्माण होईल का? २१) भगवान बुद्ध सांगतात, की करुणा व ध्यानधारणा या दोन्ही गोष्टी बरोबर चालायला हव्या. तुमच्याकडे पाहताना मनात करुणा जागी होते आणि अश्रू दाटून येतात. करुणेकडे जायचा मार्ग सांगता येईल का? २२) तुमच्या सहवासात असताना चैतन्याशी एकरूप झाल्याचा अनुभव येतो. शरीरात अज्ञान शक्तीचे तांडव सुरू असते. विश्वाची जाणीव होते. विश्व म्हणजे आपणच असे वाटते. हा भ्रम तर नव्हे? असे वेगवेगळे प्रश्न त्यांना विचारण्यात आले. अशा प्रश्नांची उत्तरे देण्याच्या निमित्ताने ओशोंनी आपल्या प्रवचनामध्ये अनेक मार्मिक, अभिनव भाष्य केलेले आहे. येथे त्या भाष्याची झलक पेश करणेही शक्य नाही. कारण त्यालाही खूप जागा द्यावी लागेल. मूळात पुस्तक वाचणे हायच त्यासाठी उत्तम मार्ग. मी नवा माणूस तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र पहिल्या प्रश्नाचे उत्तर अनेक वाचकांना हवेसे वाटणार म्हणून ते तेवढे येथे देतो. ओशो प्रश्नकत्र्या तरुणीच्या मनातला पुरुषद्वेषाचा कचरा दूर करण्याच्या संदर्भात सांगतात: ‘‘मी नवा माणूस तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. हा नवा माणूस आपल्या भूतकाळातल्या पूर्वग्रहांपासून मुक्त असू शकेल. पुरुषांकडे पाहण्याचीही नवी दृष्टी हवी. स्त्रीवाचून पुरुष जसा अपूर्ण आहे तशीच स्त्रीसुद्धा पुरुषावाचून अपूर्णच आहे. (आत्मज्ञान झाल्यावर मात्र या दोहोचं अस्तित्व आपल्याला पूर्णत्व देऊ शकेल.) आपला जन्मच मुळी स्त्रीपुरुष मीलनातून होतो; त्यामुळे स्त्रीबरोबर किंवा पुरुषाबरोबर समरस होऊनच, मिळूनच, पूर्णत्व मिळवायला हवे. स्त्री म्हणजे गूढ नव्हे; पुरुष म्हणजेही गूढ नव्हे. चमत्कार नव्हे. ज्या क्षणी या दोघांत प्रेम उत्पन्न होते तो क्षण म्हणजे रखरखीत वाळवंट. कोरडे ठणठणीत. दोघे असणे म्हणजे हजारो फुले फुलणारा वसंत. पुरुषावर प्रेम कसं करायचं हे शिकायलाच हवं. प्रेमाच्या स्पर्शानं स्त्री बहरायला लागते. अन्यथा मिटलेल्या कळीसारखे राहते. फक्त प्रेमातच ती आपल्या पाकळ्या उलगडते. आईच्या पुरुषद्वेष्ट्या व वृत्तीच्या प्रभावातून बाहेर पड. आंधळेपणा टाकून दे. ध्यानधारणा व प्रेम या गोष्टी परस्परपूरक आहेत. प्रमानेच स्त्री किंवा पुरुष यांना पूर्णत्व येते. पुरुषद्वेषाची व स्त्रीद्वेषाची भावना जीवनाला विकृत बनवते– अशा आशयाचे भाष्य ओशो करतात. मानसशास्त्राचे ते गाढे अभ्यासक, जाणकार होते. जीवन एकांगी, अर्धवट असू नये, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निर्मळ असावा, कुठल्याही पूर्वग्रहांनी आणि नीतिमूल्यांच्या जुनाट कल्पनांनी तो दुषित झालेला नसावा असा त्यांचा आग्रह होता. ओशोंची विविध विषयांवरची ही भाष्ये वाचणे म्हणजे ढगाळलेल्या वातावरणातून स्वच्छ कोवळ्या सूर्यप्रकाशात प्रवेश करणे. मनावरची अभ्रे दूर करणे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more