* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE NEW DAWN
  • Availability : Available
  • Translators : PRADNYA OAK
  • ISBN : 9788177662023
  • Edition : 3
  • Publishing Year : 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 240
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : RELIGIOUS & SPIRITUALS
  • Available in Combos :OSHO COMBO SET - 33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
LOVE AND SYMPATHY THESE ARE THE TWO FEELINGS THAT HAVE BEEN CONTINUOUSLY CONSIDERED BY SPIRITUALITY. OSHO BEAUTIFULLY PRESENTS HIS VIEW ON THESE TWO FEELINGS IN THE BOOK. JOURNALISM IS IN NO WAY RELATED TO SPIRITUALITY, YET THIS BOOK CONSISTS OF THREE CHAPTERS ON JOURNALISM. IN 1987, OSHO HAD PENNED DOWN HIS THOUGHTS ON JOURNALISM, IT IS ASTONISHING TO SEE THEM COMING TRUE TODAY. EVERY JOURNALIST SHOULD READ THESE CHAPTERS AT LEAST ONCE. OSHO TELLS US THAT MEDIA SHOULD NOT WORK AS DESTRUCTIVE WEAPONS, OTHERWISE THE HUMANITY WILL BE BURNT TO ASHES. OSHO NOT ONLY TELLS US THE WAY TO BUILD OUR FEALTY INWARDLY AS WELL AS OUTWARDLY, BUT HE ALSO RELATES THE IMPORTANT THINGS FOR RAISING HUMANITY. IN HIS BOOK `NAVI PAHAT` HE HAD TOLD ABOUT THE `MODERN MAN`, NOW IN THIS BOOK HE TELLS ABOUT THE `NEW WORLD`
अध्यात्मामधे सातत्यानं विचारात घेतल्या जाणाया गोष्टी म्हणजे, प्रेम आणि करुणा! या पुस्तकातल्या प्रकरणांमध्ये या दोन्हीवर ओशोंनी नितांत सुंदर विचार मांडलेले आहेत. ‘पत्रकारिता’ हा खरं पाहता अध्यात्मातला भाग नव्हे. परंतु पत्रकारितेवर तीन प्रकरणं यामध्ये अशी आहेत, की सत्याऐंशी सालात ओशोंनी त्यावर मांडलेली मतं, आत्ता या काळात तंतोतंत खरी ठरलेली आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक पत्रकारानं आवर्जून वाचावीत, अशी ही प्रकरणं आहेत. प्रसारमाध्यमं ही संहारक शस्त्रांप्रमाणे असता कामा नयेत. कारण यामध्ये ‘मनुष्यत्व’ संपवलं जातं. म्हणूनच मनुष्यत्वाच्या दृष्टीनं काय आवश्यक आहे हे सांगताना ओशोंनी माणसाच्या अंतरंगात आणि बाह्यजगात कोणत्या पद्धतीच्या निष्ठा बाळगल्या पाहिजेत, याचा ऊहापोह केलेला आहे. ‘नवी पहाट’ या पुस्तकात नवीन माणूस कसा हवा, हे त्यांनी सांगितलं. आत्ता या पुस्तकात नवीन जगाची रचना कशी असावी, याबद्दल ते बोललेले आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"BANDAKHOR# BHAKTIT BHIJALA KABIR# EK EK PAUL# MAZE MAZYAPASHI KAHI NAHI #HA SHODH VEGALA# HASAT KHELAT DHYANADHARANA# MEERA EK VASANT AAHE # MEERA SHYAMRANGI RANGALI # MEERECHI MADHUSHALA # MEERECHYA PREMTIRTHAVAR # MHANE KABIR DIWANA # MI DHARMIKTA SHIKAVTO DHARM NAHI # MRUTUCHE AMARATVA # MRUTYAYUSHI # MRUTYU AMRUTACHE DWAR # MUGDHA KAHANI PREMACHI # NANAK NIRANKARI KAVI # NANAK PARMATMYACHA NAD OMKAR # NANAK SANSAARI SANYASTA # NANAK SUR SANGEET EK DHUN # SAD GHALTO KABIR # SAKSHATKARACHI DENGI # SHIVSUTRA-PART 1 # SHIVSUTRA-PART II-2 # SWATHACHA SHODH #VIDROHI ##मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 24-02-2002

    साक्षात्काराचे समर्पक विवेचन... ‘ओशो’ म्हणजेच रजनीश यांच्या ‘द न्यू डॉन’ या पुस्तकाचा प्रज्ञा ओक यांनी केलेल्या अनुवादाचा दुसरा भाग ‘साक्षात्कारची देणगी’ या नावानं प्रसिद्ध झाला आहे. या पुस्तकात एकूण अकरा सत्रं असून त्यात मानवी देताना त्यांनी म्हटलंआहे. बुद्धाला साक्षात्कार झाला तेव्हा तो संपूर्ण सात दिवस एकही शब्द ल बोलता शांत राहिला. याच संदर्भात इंग्लिश कवी कोलरीज आणि सूफी पंथीय योगी जलालुद्दीन रुपी यांची दिलेली उदाहरणे समर्पक आहेत. पाचव्या सत्रात त्यांनी ज्ञानी, आत्मसाक्षात्करी आणि जीवनाचा आनंद यातील संबंध विषद केला आहे. जीवनातलं चैतन्य आणि जागृती मिळून म्हणजे आत्मज्ञानी आत्मप्रकाशित होणं असं त्यांना वाटतं. या संदर्भात ते पुढे लिहितात, ‘बीजामध्ये जे जे काही लवलेलं असतं ते ते फुलाद्वारे फुटून बाहेर येतं. सुगंधाद्वारे बाहेर पडतं आणि हा सुगंध म्हणजेच आत्मबोध. हे फुल म्हणजेच आत्मसाक्षात्कार. यासंबंधी विस्तृत विवेचन करताना अकराव्या सत्रात त्यांनी म्हटलं आहे, ध्यानधारणेमुळे आत्मसाक्षात्कार घडतो. पुढच्या सत्रात आपल्या जीवनात होणाऱ्या बदलांना प्रेमानं कसं स्वीकारायचं तसंच अनिश्चित आणि अज्ञान अशा जगण्यावर कसं प्रेम करायचं हे मार्मिकपणे पटवून दिलं आहे. तिसऱ्या सत्रात सकारात्मक विचार करणाऱ्या माणसानं आग्रही असलंच पाहिजे. त्यानं जगासमोर यायलाच पाहिजे. अन्यथा नकारात्मक विचारांच्या माणसांच्या हातात जगाचा कारभार राहिल्यामुळे ही नकारात्मक माणसं इतरांचा आत्मशोधाचा कार्यावर निर्बंध आणू शकतील याचं विश्लेषण करताना त्यांनी बुद्ध, जिझस, टर्जिनिव्ह हा रशियन कादंबरीकार यांची उद्बोधक उदाहरणं दिली आहेत. ओशो ज्ञानी माणसाला अक्कलवान किंवा शहाणा माणूस समजत नाहीत. ज्ञान हे बाहेरून मिळतं पण अक्कल किंवा शहाणपणा अगदी आतल्या गाभ्यातून येतो. ज्ञान दुसरीकडून उसनं घेतलं जातं; परंतु अक्कल दुसरीकडून घेता येत नाही हा आपला दृष्टिकोन त्यांनी अतिशय समर्पक रीतीनं पटवून दिला आहे. मानवी मनाचं त्यांनी अतिशय सखोल विवेचन केले आहे. मन हे त्यांना बाह्यजगाशी आपला संबंध जोडण्यासाठी एक माध्यम, पूल किंवा खिडकी वाटते. आपण मनाशी जेव्हा तादात्म्य पावतो तेव्हाच त्याला खरी शक्ती मिळते. मनुष्य आणि त्याच मन यावर भाष्य करताना ते लिहितात, ‘मनाशी निगडीत राहू नका. रस्त्याच्या कडेला केवळ निरीक्षक म्हणून उभे रहा आणि मनाला रस्त्यावर जाऊ द्या! ते कसं जात आहे त्याचे फक्त साक्षीदार व्हा. काही वेळातच रस्ता रिकामा दिसेल. मन एखाद्या बांडगुळासारखं जगत असतं. (सत्र सात) साक्षात्काराला भाषाच नाही. कारण ती मनाच्या पलीकडची गोष्ट आहे आणि ही मनाच्या आवाक्यातली गोष्ट आहे याबाबत सहाव्या सत्रात भाष्य करताना बुद्धाचं उदाहरण पाहायला मिळतात. प्रसारमाध्यमं ही संहारक अस्त्राप्रमाणे असू नयेत कारण ती मनुष्यत्व संपवणारी आहेत. मनुष्यत्व टिकवण्याची आवश्यकता प्रतिपादन करताना माणसांनी आपल्या अंतरंगात आणि बाह्यजगात कोणत्या पद्धतीच्या निष्ठा बाळगल्या पाहिजेत याचा ऊहापोह केला आहे. आजच्या पत्रकारांनी ही प्रकरणं आवर्जून वाचली पाहिजेत. ‘पत्रकाराचं मन जर स्वच्छ असेल तर ते मानव जातीसाठी प्रचंड कार्य करू शकतात’ या ओशोंच्या विचारांचा मागोवा त्यांनी घेणं ही आजची अत्यावश्यक गरज आहे. प्रज्ञा ओक यांनी केलेला हा अनुवाद मराठीमध्ये सुरेख उतरला आहे. ओशोंच्या विचारातून त्यांची प्रगल्भ बुद्धिमत्ता, प्रगाळ चिंतनशील आणि सखोल तात्त्विकपणा यांची प्रचीती येते. त्यांची मतं व्यापक स्वरूपाची आहेत. विविध धर्म व त्यांचे धर्मग्रथं यांचा त्यांनी केलेला सूक्ष्म अभ्यासही इथं जाणवतो. मात्र त्यांनी व्यक्त केलेले विचार सर्वांनाच सारख्या प्रमाणात पटतीलच असंही म्हणता येत नाही. उदा. महात्मा गांधी आणि त्यांच्या चरख्याबाबत व्यक्त केलेल्या विचारांशी मी स्वत: सहमत होऊ शकत नाही. फ्राइड हा मानसशास्त्रज्ञ स्वत: मृत्यूला आणि भुतांना घाबरत होता ही माहिती प्रथमच माझ्या वाचनात आली. वाचकांना अज्ञात असलेल्या ओशो माहितींचा खजिनाच या पुस्तकात आहे. ओशोंनी अध्यात्माला विज्ञानाची जी जोड दिली आहे त्यामुळे आजच्या युवा पिढीनं हे पुस्तक अवश्य वाचावं असंच आहे. -बाळ राणे ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 04-11-2001

    अध्यात्मामध्ये सातत्यानं विचारात घेतल्या जाणाऱ्या गोष्टी म्हणजे प्रेम आणि करुणा! या पुस्तकातल्या प्रकरणांमध्ये या दोन्हींवर ओशोंनी नितांत सुंदर विचार मांडलेले आहेत. ‘पत्रकारिता’ हा खरं पाहता अध्यात्मातला भाग नव्हे; परंतु पत्रकारितेवर तीन प्रकरणं ामध्ये अशी आहेत की सत्याऐंशी सालात ओशोंनी त्यावर मांडलेली मत, आता या काळात तंतोतंत खरी ठरलेली आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक पत्रकारानं आवर्जून वाचावीत, अशी ही प्रकरणं आहेत. प्रसारमाध्यमं ही संहारक शस्त्रांप्रमाणे असता कामा नयेत. कारण यामध्ये ‘मनुष्यत्व’ संपवलं जातं. म्हणूनच मनुष्यत्वाच्या दृष्टीनं काय आवश्यक आहे हे सांगताना ओशोंनी माणसाच्या अंतरंगात आणि बाह्यजगात कोणत्या पद्धतीच्या निष्ठा बाळगल्या पाहिजेत, याचा ऊहापोह केलेला आहे. ‘नवी पहाट’ या पुस्तकात नवीन माणूस कसा हवा, हे त्यांनी सांगितलं. आता या पुस्तकात नवीन जगाची रचना कशी असावी, याबद्दल ते बोललेले आहेत. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 20-01-2002

    स्त्री आणि पुरुष यांच्यात प्रेम उत्पन्न होते तो क्षण म्हणजे खरा चमत्कार... मी नवा माणूस तयार करण्याच्या प्रयत्नात आहे : ओशो रजनीश ओशो रजनीश हे आधुनिक काळातील एक अत्यंत बुद्धिमान व्यक्तिमत्त्व होते. संन्यस्त वृत्तीची त्यांची संकल्पना वेगळी होती; आणिजगातील नामवंत अशा सर्व तत्त्वज्ञानप्रणालींचा गाभा आत्मसात करण्यातील त्यांची गती थक्क करणारी होती, त्या त्या तत्त्वज्ञानाचे पृथगात्म विशेष नेमके पकडून अत्यंत मधुर काव्यात्म शैलीत विशद करीत. अवघड व जटिल कल्पनाही मिया नसरुद्दिन वगैरेंचे समर्पक दृष्टांत देत सुलभपणे स्पष्ट करीत. कृष्ण, शिव, शांडिल्य, नारद, महावीर, येशू ख्रिस्त अशा जागतिक तत्त्वज्ञांच्या बरोबरीने आदिशंकराचार्य, गोरक्षनाथ, कबीर, नानक, रेदास, दरियादास, मीरा वगैरे भारतीय अध्यात्म क्षेत्रातील महानुभाव त्यांनी शेकडो प्रवचने दिली. ध्यान, योग, तंत्र, मंत्र, ताओ, झेन, हसीद, सूफी वगैरे साधन पंरपरांतील गूढ रहस्यांवर यांचवर त्यांनी प्रकाश टाकला. राजकारण, तत्त्वज्ञान मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, समाजशास्त्र, विज्ञान, लोकसंख्या विस्फोट, पर्यावरण, परमाणू युद्ध, सेक्स वगैरे विषयांच्या अनुरोधानेही अत्यंत तरल, अभिनव विचार त्यांनी प्रकट केले. साडेसहाशेवर पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. त्यांचे तीस भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. माझा संदेश म्हणजे रूपांतराची एक किमया : माझा देश हा एखादा सिद्धांत वा चिंतन या स्वरुपात नाही; तर माझा संदेश म्हणजे रुपांतराची एक किमया, एक विज्ञान आहे’ असे ते म्हणत. ‘झोर्बा द बुद्ध’ अशा आदर्श माणसाची कल्पना ते पुढे मांडतात. झोर्बाप्रमाणे भौतिक जीवनात संपूर्ण आनंद उपभोगण्याची क्षमता व इच्छा असणारा, तसेच गौतम बुद्धाप्रमाणे मूक होऊन ध्यानातही उतरून या व्यापक अफाट विश्वाच्या गाभ्याचा वेध घेणारा, त्याच्याशी एकरूपता अनुभवणारा असा माणूस त्यांना अभिप्रेत आहे. भौतिक व अध्यात्मिक या दोन्ही दृष्टींनी समृद्ध अशा व्यक्तिमत्त्वाचा आग्रह ते धरतात. ती क्षमता प्रत्येक माणसात आहे असे ते मानतात. कुठल्याही धर्मविचारांपेक्षा या कर्मकांडापेक्षा ध्यानाच्या मार्गाने ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकतो असा विचार ते आग्रहाने मांडतात. ‘द न्यू डॉन’ या इंग्रजी पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचा अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊसने’ साक्षात्काराची देणगी’ या नावाने प्रसिद्ध केला आहे. ‘नवी पहाट’ या नावाने पहिल्या भागाचा अनुवाद करणाऱ्या प्रज्ञा ओक यांनीच या दुसऱ्या भागाचाही अनुवाद केला आहे. या पुस्तकात ११ सत्रांतील प्रश्नोत्तरांचा समावेश आहे. हे प्रश्न निरनिराळ्या व्यक्तींनी विचारले. कधी वैयक्तिक, कधी आध्यात्मिक. पुरुषद्वेशाचा कचरा मनातून बाहेर कसा काढता येईल? १) स्त्री ही नेहमी पुरुषाच्या बँक शिलकीवर लक्ष ठेवून प्रेम करते; पण पुरुष तसं करीत नाही असं ओशोंचं जे मत आहे, ते मला पटत नाही. माझी आई तर पुरुषांचा द्वेषच करते. माझ्या मनातही पुरुषांबद्दल रागसंतापच आहे. हा पुरुषद्वेषाचा कचरा मनातून बाहेर कसा काढता येईल?– एका तरुणीचा प्रश्न. २) आपल्या आश्रमात राहताना आपल्या प्रेमाच्या आणि करुणेच्या वर्षावात न्हाऊन निघाल्याने परमानंदाचा अनुभव येतो. पण आपण या आनंदाला लायक नाही, अशीही बोचणी मनाला कुतडत राहते. त्यामुळे निराशा वाटून येते. याबाबतच मला आपली मदत हवी आहे. ती द्याल?– दुसरी एक तरुणी. ३) तुम्ही म्हणता, आपण सगळेच जण आता अंतर्बाह्य ज्ञानी झालोय. पण तसं काही मला जाणवत नाही. तुमचं म्हणणं आम्ही विसरलोय. ही विसरण्याची वेळ बरोबर आहे का? ४) तुमचं लेखन वाचून व तुमच्या सहवासात असताना आपल्यात बदल होतो आहे असे जाणवते. माझ्यावरील आवरणे गळून पडत आहेत. पण हे जाणवणे म्हणजे कल्पनेचा खेळ नव्हे ना? मला जाणवणारी ही प्रगाढ शांतता म्हणजे भ्रम तर नव्हे ना? ज्ञान आणि अक्कल यात फरक काय? ५) ज्ञान आणि शहाणपणा किंवा अक्कल यात नेमका फरक आहे? (ज्ञान हे बाहेरून मिळतं. अककल किंवा शहाणपणा हा आतल्या गाभ्यातून येतो. ज्ञान दुसरीकडून घेता येतं. अक्कल कुणाकडून घेता येत नाही. कुणाला देता येत नाही.) ज्ञान मिळवलेला माणूस हा अक्कलवान असतोच असे नाही. शहाणा माणूस ज्ञानी असतो. ज्ञानाची धूळ त्याच्या डोळ्यांवर साचलेली नसते. तो आपल्या अस्तित्वासह पूर्णपणे सतत जागा असतो. तो पूर्ण जाणिवेनं आपली कृती करतो. ती कृती शहाणपणाची असते. ६) गेली नऊ वर्षे मी तुमची प्रवचने ऐकतो आहे. पण तरीही तुमच्या माझ्यात असणारं अंतर कमी झालंय असं वाटत नाही. मी काय करू? सगळं विसर्जित करू? भेटू? पुढची पायी कशी गाठू? ७) ज्ञानी होणं, आत्मसाक्षात्कारी होणं आणि जीवनाचा आनंद घेणं यामये काही संबंध आहे का? कोणता? आत्मज्ञानी होणं म्हणजेच जीवनाचा आनंद हे खरं का? साक्षात्काराची भाषा कोणती? ८) माझ्या मनात मृत्यूचा विचार वरचेवर येतो. माझा मृत्यू. तुमचा मृत्यू. तुमच्या विरहाची कल्पनाही मला सहन होत नाही. माझ्या आयुष्याचं जर काही उद्दिष्ट असेल तर ते तुम्हीच आहात. मी आत्मज्ञानी होऊन तुम्हाला माझं समर्पण करणं ही सुंदर भेट ठरेल. तेव्हा ध्यानधारणेची योग्य पद्धत कोणती? ९) साक्षात्काराची भाषा कोणती? (साक्षात्काराची भाषाच नाही. साक्षात्कार ही मनाच्या, बुद्धीच्या पलीकडची गोष्ट आहे, आणि भाषा ही मनाच्या आवाक्यातली गोष्ट आहे. साक्षात्कार हा प्रगाढ शांतीतला एक अनुभव आहे. साक्षात्काराचा आवाका इतका मोठा असतो की त्यातला आनंद, कृतार्थता, खरेपणा, प्रेम, करुणा हे सारं वेगवेगळ्या मार्गांनी प्रगट होतंच. मनुष्य प्राण्याच्या अत्युच्च जागरुकतेतला तो एक अनुभव असतो.) १०) माझ्या अंतर्मनात तुम्ही प्रवेश केलाय असे मला जाणवते. त्याची कल्पना येते हा मला माझा शोध लागल्याचा अनुभव देतो. या दोन्ही गोष्टी एकच आहेत का? मी म्हणजे एक व्यर्थ गेलेली व्यक्ती वा गोष्ट आहे असं तुम्हाला वाटतं का? ११) माझ्या मनावर जुने सनातनी, संस्कार आहेत. त्या मागे मी जाऊ की त्यांचा त्याग करू? त्यासाठी केवळ जागरुकता पुरे की आणखी काही करायला हवे? १२) ध्यानधारणा करताना कधी कधी मला विशालतेचा अनुभव येतो. आपण आपल्यातल्या शांतीमय अवकाशात विहार करीत आहोत असे जाणवते. पण त्या विशालतेने कधी कधी मनावर दडपण आल्यासारखेही वाटते. ती विलक्षण प्रगाढ शांतताही अस्वस्थ करते. कुठल्यातरी कुंपणाशी आपण उभे आहोत, असे वाटत राहते. हे कुंपण खरोखरच असेल तर ते कसले कुंपण म्हणायचे. १३) तुमच्या संबंधी उलटसुलट बातम्या वृत्तपत्रांत येतात. तुम्हाला बाजारमूल्य आहे असं पत्रकार मानतात. तुम्ही आत्म्याला तृप्त करता. पण आम्ही पत्रकार मन व शरीर तृप्त करणाऱ्या वस्तूंना किंमत देतो, हे बरोबर म्हणायचे का? १४) मंदिरात प्रवेश केल्यावर मानसिक शांतता लाभते. आजकालच्या उद्योगधंद्याच्या ठिकाणांना सद्यकालीन मंदिरच मानून असं वातावरण तिथं निर्माण करता येईल का? १५) व्यापाराचं उद्दिष्ट माल विकणं. हा माल अनेकदा लोकांना नको असलेल्या वस्तूंचाही असतो. व्यापाऱ्याच्या वैयक्तिक जीवनातही अनेक विसंगती दिसतात. हे कितपत योग्य आहे? १६) पत्रकारितेच्या प्रशिक्षणांत आत्मोन्नतीच्या, अध्यात्माच्या गोष्टींना स्थान नसते. १७) उत्तम पत्रकारितेचं लक्षण कोणतं? सकारात्मक बातम्या? माध्यमांची जबाबदारी काय असावी? १८) विवाह या गोष्टीपेक्षा आत्म्याचं मीलन ही कल्पना अधिक श्रेयस्कर मानावी का? १९) निद्रा म्हणजे नेमके काय? विश्रांती घेत असतानाही आपण शरीराबाहेर असतो का? २०) मनुष्य निर्मित अनुवंशिकतेचा वाटा फार अल्प असतो असे मला वाटते. आईवडिलांच्या विशिष्ट जनुकांपासून भगवान निर्माण होईल का? २१) भगवान बुद्ध सांगतात, की करुणा व ध्यानधारणा या दोन्ही गोष्टी बरोबर चालायला हव्या. तुमच्याकडे पाहताना मनात करुणा जागी होते आणि अश्रू दाटून येतात. करुणेकडे जायचा मार्ग सांगता येईल का? २२) तुमच्या सहवासात असताना चैतन्याशी एकरूप झाल्याचा अनुभव येतो. शरीरात अज्ञान शक्तीचे तांडव सुरू असते. विश्वाची जाणीव होते. विश्व म्हणजे आपणच असे वाटते. हा भ्रम तर नव्हे? असे वेगवेगळे प्रश्न त्यांना विचारण्यात आले. अशा प्रश्नांची उत्तरे देण्याच्या निमित्ताने ओशोंनी आपल्या प्रवचनामध्ये अनेक मार्मिक, अभिनव भाष्य केलेले आहे. येथे त्या भाष्याची झलक पेश करणेही शक्य नाही. कारण त्यालाही खूप जागा द्यावी लागेल. मूळात पुस्तक वाचणे हायच त्यासाठी उत्तम मार्ग. मी नवा माणूस तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र पहिल्या प्रश्नाचे उत्तर अनेक वाचकांना हवेसे वाटणार म्हणून ते तेवढे येथे देतो. ओशो प्रश्नकत्र्या तरुणीच्या मनातला पुरुषद्वेषाचा कचरा दूर करण्याच्या संदर्भात सांगतात: ‘‘मी नवा माणूस तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. हा नवा माणूस आपल्या भूतकाळातल्या पूर्वग्रहांपासून मुक्त असू शकेल. पुरुषांकडे पाहण्याचीही नवी दृष्टी हवी. स्त्रीवाचून पुरुष जसा अपूर्ण आहे तशीच स्त्रीसुद्धा पुरुषावाचून अपूर्णच आहे. (आत्मज्ञान झाल्यावर मात्र या दोहोचं अस्तित्व आपल्याला पूर्णत्व देऊ शकेल.) आपला जन्मच मुळी स्त्रीपुरुष मीलनातून होतो; त्यामुळे स्त्रीबरोबर किंवा पुरुषाबरोबर समरस होऊनच, मिळूनच, पूर्णत्व मिळवायला हवे. स्त्री म्हणजे गूढ नव्हे; पुरुष म्हणजेही गूढ नव्हे. चमत्कार नव्हे. ज्या क्षणी या दोघांत प्रेम उत्पन्न होते तो क्षण म्हणजे रखरखीत वाळवंट. कोरडे ठणठणीत. दोघे असणे म्हणजे हजारो फुले फुलणारा वसंत. पुरुषावर प्रेम कसं करायचं हे शिकायलाच हवं. प्रेमाच्या स्पर्शानं स्त्री बहरायला लागते. अन्यथा मिटलेल्या कळीसारखे राहते. फक्त प्रेमातच ती आपल्या पाकळ्या उलगडते. आईच्या पुरुषद्वेष्ट्या व वृत्तीच्या प्रभावातून बाहेर पड. आंधळेपणा टाकून दे. ध्यानधारणा व प्रेम या गोष्टी परस्परपूरक आहेत. प्रमानेच स्त्री किंवा पुरुष यांना पूर्णत्व येते. पुरुषद्वेषाची व स्त्रीद्वेषाची भावना जीवनाला विकृत बनवते– अशा आशयाचे भाष्य ओशो करतात. मानसशास्त्राचे ते गाढे अभ्यासक, जाणकार होते. जीवन एकांगी, अर्धवट असू नये, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निर्मळ असावा, कुठल्याही पूर्वग्रहांनी आणि नीतिमूल्यांच्या जुनाट कल्पनांनी तो दुषित झालेला नसावा असा त्यांचा आग्रह होता. ओशोंची विविध विषयांवरची ही भाष्ये वाचणे म्हणजे ढगाळलेल्या वातावरणातून स्वच्छ कोवळ्या सूर्यप्रकाशात प्रवेश करणे. मनावरची अभ्रे दूर करणे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more