* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GATULA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662153
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 156
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
GATHUL MEANS A BUNDLE OF CLOTHES AND PERHAPS A FEW HUMBLE BELONGINGS. THIS NOVEL RELATES THE STORY OF A BOY FROM A PAVEMENT –DWELLING FAMILY IN MUMBAI.
चर्मकार समाजात जन्मलेल्या आणि मुंबईतल्या फुटपाथवर वाढलेल्या श्री. रवींद्र बागडे यांची ही आत्मकथनात्मक कादंबरी. यातला ‘ना-या’ हे लेखकाचंच प्रतिरूप. कमालीचं दारिद्र्य, दारूच्या व्यसनापायी कुटुंबाची धूळधाण करणारा बाप आणि नव-याच्या छळाला तोंड देत सात पोरांच्या कुटुंबाच्या पोटाला घालण्यासाठी मरेमरेस्तोवर कष्ट करणारी आई; सोबतीला गलिच्छ फुटपाथवरचं जनावरांच्या मोलानं जगणं आणि भोवताली बहुरंगी, बहुढंगी मुंबई हे ना-याचं प्राक्तन. त्यामुळे त्याच्या कोवळ्या भावविश्वात अनेक ‘जहरी’ अनुभवांचं ‘गटुळं’ आहे. त्यामुळे या आत्मकथनात केवळ चर्मकार समाजाचं दर्शन घडत नाही, तर गाळात रुतलेल्या माणसाच्या जगण्याच्या धडपडीचं आणि आपल्यासारख्या रुतलेल्यांना हात देण्याच्या जिद्दीचं वास्तव चित्र उमटलेलं आहे. यातलं फुटपाथवरचं वातावरण, वेश्याव्यवसायाचं जग, रेस, जुगार यांचं विदारक चित्रण पांढरपेशा मनाला धक्का देणारं आहे ! आज असंख्य माणसं या परिस्थितीत जगतायत्. याला जबाबदार कोण? बालमजूर प्रतिबंधक कायदा नेमका कोणासाठी? यांच्या पोटाची सोय होत नाही, तोवर ही मुलं धंदापाणी सोडून शिकणार कशी? बोलभाषेत सहज उलगडत जात ही कादंबरी परिस्थितीचं विदारक दर्शन घडवते व वाचकांना अंतर्मुख करते.
* सह्यनागरी २००१ . * भि.ग.रोहमारे पुरस्कार २००१ . * आशिर्वाद २००२ . * को.म.स.प. २००३. * नाथ माधव २००३ . * साहित्यरत्न २००३ . * वारणेचा वाघ २००४ . * राज्य पुरस्कार २००२-०३ . * बापूसाहेब धाक्रे स्मुर्ती पुरस्कार २००४. * संत प्रसाद २००५ . * आंबेकर श्रमगौरव २०११ . * राष्ट्राशाहीर अमर शेख २०१२ .
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#RAVINDRA BAGADE #BOCHAKA #GATULA "#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #GATULA #GATULA #गटुळं #FICTION #MARATHI #RAVINDRABAGDE #रवींद्रबागडे "
Customer Reviews
  • Rating StarSadahana Patil

    Mala he pustak manapasun avadle 2 veles vachle ahe

  • Rating StarRavindra Bagade

    सर्वात आवडते आत्मचरित्र

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    विदारक अनुभवांचं ‘गटुळं’... मुंबईसारख्या महानगरात कित्येक मुलं आणि मुली गल्ल्यांमधून रेल्वे गाड्यांमध्ये, स्टेशनजवळच्या बकान जगांमध्ये नजरेला पडतात. काही आपल्याला झेपेल त्या पद्धतीनं लहान-मोठी कामं करत जगतात आणि आपल्या भावंडांना जगवतात. हजारो मध्यमव्गीय प्रवासी रोज त्यांना बघतात. त्यांची कीव करतात, तिरस्कार करतात. पण नंतर त्यांना विसरून कामालाही लागतात. काय भवितव्य असतं या मुलांचं, घर हरवलेली-दुरावलेली ही मुलं उद्या कोणत्या वाटेवर जाणार, अशा अनेक प्रश्नांना उत्तरं मिळत नाहीत. हेही एक भयाण वास्तव आहे, असं म्हणून सगळेच जण त्याकडे पुन्हा नजर न वळवता आपला रस्ता धरतात. कधी काळी काहीसं असंच भरकटलेलं आयुष्य जगलेल्या रवींद्र बागडे नामक लेखकाचं ‘गटुळं’ हे पुस्तक भरकटलेल्या अनुभवाचं चित्रण करतं. चर्मकार समाजात जन्मलेला लेखक मुंबईतल्या आपल्या जगण्यातून जे शिकत गेला, जे अनुभव घेत गेला त्याचं दर्शन या लेखनात घडतं. कादंबरीचा नायक नारायण-नाऱ्या हे लेखकाचंचं दुसरं रूप आहे. दारूड्या बाप, त्याची मारहाण सतत सहन करत, कष्ट उपसत मुलांना वाढवणारी आई आणि रस्त्यावरचा त्यांचा उघडा संसार... दारिद्र्य हा या घराचा स्थायीभावच होऊन गेलेला. पारंपरिक काम न करता नाऱ्याचा बाप भाजी विकायचा धंदा करणारा. पण दारूच्या व्यसनानं त्याला पुरतं गिळून टाकलेलं, अशा परिस्थितीत पाच पोरांना खाऊ घालणं हे त्यांच्या आईवरच येऊन पडलेलं. तरीही नाऱ्या शाळेत जायचा. पण पुस्तक नाही म्हणून त्याला शाळेत हाकलून लावलं. असे अनेक अनुभव घेत नाऱ्या मॅट्रिक झाला. रस्त्यावरच्या जगण्यातली कुचंबणा, तिथला गलिच्छपण यातून आपण वर यायचं आहे ही भावना मनात जपत धडपडणारा नाऱ्या ज्या चाकोरीतून गेला, ती मध्यमवर्गीय माणसाला मानसिक धक्का देणारी आहे. कोवळ्या वयातलं नाऱ्याचं भावविश्व आणि त्याच्या अवतीभवती भयंकर वास्तव याचं या कादंबरीतलं चित्रण जण्याचा कुरूप चेहरा समोर ठेवतं. नाऱ्याच्या डोक्यावरचं अनुभवाचं हे ‘गटुळं’ विदारक सामाजिक परिस्थिती, गरीब माणसाची परवड, चुकीच्या रस्त्याला लागलेली मुलं, व्यसनामुळे उद्धध्वस्त होणारे संसार, जनावराच्या पातळीवरचं जगणं अशा अनेक गोष्टींनी भरलेलं आहे. नाऱ्या भाजी विकून आईला मदत करतो, पण शाळेतली वर्गमैत्रीण भाजी घ्यायला आली की त्याला शरम वाटते. शाळेतली त्याची टिंगल होते. नाऱ्याचं संवेदनशील वयातलं मानस कादंबरीत उलगडून समोर येतं. १९५५ ते १९६८ या काळातल्या मुंबईचं चित्रणही वैशिष्ट्यपूर्ण आहे. नाऱ्यानं या वाटचालीत अनेकविध अनुभव घेतले. डोक्यावर भाजीची पाटी घेऊन वणवण फिरला. दारूड्या बापाशी भांडला-तंटला... त्याला झटापटीत मारहाणही केली. शाळेतल्या चंचल या मुलीशी त्याची मैत्री झाली, पण नाऱ्याची पार्श्वभूमी कळताच ही मैत्री झटकन तुटलीही. नाऱ्याचं जगणं, शिकणं भरकटणं, त्याला बरंच काही शिकवून गेलं. नाऱ्याच्या या अनुभवांमध्ये त्याचं वेश्यावस्तीतला शब्दांमध्ये गुंतणंही आहे. अंगावर काटा आणणारे बाललैंगिक शोषणाचे अनुभव आहेत. कॉलेजातलं अर्धवट शिक्षण, त्यानंतरच्या सरकारी नोकऱ्या यातून जाताना मदत करणारे, वाट दाखवणारेही भेटले. नाऱ्याच्या लग्नापर्यंतची ही कहाणी आहे. यापुढचा लेखकानं लिहिलेला भाग प्रसिद्ध व्हायचा आहे. आपल्या आयुष्यात नाऱ्याला प्रेरणा आहे आईची. आईच्या कष्टांचा, तिच्या डोळ्यातील पाण्याचा तो साक्षीदार आहे. बापाबद्दल चीड बाळगणारा लेखक बापानं आपल्याला माझ्यासारखं वागू नकोस म्हणून कसं सांगितलं होतं तेही लिहितो. नाऱ्याच्या जीवनातले हे खळबळजनक, वेदनापूर्ण दिवस समाजापुढे काही प्रश्न ठेवतात. त्याला जाबही विचारतात. बोली भाषेचा वापर, विस्कळित जगणं तशाच पद्धतीने मांडणारी शैली आणि नाऱ्याचं ‘मी’पण उलगडून सांगणारं प्रांजळ निवदेन यामुळे ‘गटुळं’ मनाला भिडतं. त्यातला सूर नुसताच तक्रारीचा नाही. तक्रारीपेक्षा वास्तवाचं दर्शन थेटपणे घडवण्याला लेखकानं महत्त्व दिलं आहे. आपल्याबरोबर इतरांच्याही वेदना कळत-नकळत चित्रित केल्या आहेत. लेखकाची ही सहवेदना या लेखनाला एक निराळी उंची प्राप्त करून देते. ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 11-05-2003

    विदारक परिस्थितीचं भेदक दर्शन… जाती, धर्म यांच्या भेदाभेदांनी पोखरलेल्या आणि आर्थिक उच्चनीचतेच्या उतरंडीने माणसाला श्रेष्ठकनिष्ठा देणाऱ्या भारतीय समाजात, दैववशात् लाभलेला जन्मच कुणाला कधी सुखाच्या शिखरावर बसवू शकतो, तर कुण्या दुर्भाग्याला विनाअपराध ु:ख-अपमानाच्या नरकात लोटू शकतो. त्या प्रतिकूलतेला मूकपणे शरण जाणाऱ्यांचा एक गट बहुसंख्येने आढळतो. दुसरा गट आढळतो तो ‘मला उद्ध्वस्त व्हायचंय’ असा आक्रस्ताळेपणा करीत आपल्या समाजाच्या नावाने बोटं मोडणाऱ्यांचा! तिसरा गट तुलनेने ‘अल्पसंख्याक’ असतो, पण तोच या समाजाला विधायक वळण लावत असतो. या गटातील सूज्ञ, दैवजात दु:खांबद्दल आकांडतांडव न करता, जिद्दीने जन्मजात प्रतिकूलतेशी झगडून तिच्यावर मात करतात आणि स्वत:चे एक स्थान तथाकथित उच्चवर्णियांत निर्माण करतात. चर्मकार समाजात जन्मलेले मुंबईतील एक समाजसेवक रवींद्र बागडेलिखित ‘गटुंळ’ ही आत्मकथनपर कादंबरी वाचताना वरील सारे विचार मनात येतात. त्यामुळेच मुंबईतल्या पदपथावर अमानुष जिणे जगत वाएलेल्या लेखकाचे स्वत:च्या जिण्याबद्दलचे हे चित्रण वाचल्यानंतही वाचक खचून जात नाही; उलट हे पुस्तक त्याला जगण्याची उमेद देऊन जाते. ‘गटुळं’ नायक नाऱ्या हे मुंबईतल्या फूटपाथवर वाढलेल्या लेखकाचेच प्रतिरूप! कमालीचे दारिद्र्य, दारूच्या व्यसनामुळे कुटुंबाची धूळदाण उडवणारा बेजबाबदार बाप, नवऱ्याचा मार खात सात पोरांच्या पोटाला घालण्यासाठी सतत कष्ट करणारी आई आणि सभोवतालच्या बहुरंगी, बहुढंगी मुंबापुरीच्या झगमगत्या पार्श्वभूमीवर वाट्याला आलेले घाणेरड्या फूटपाथवरचे ढोरागत हेच नशिबी आलेल्या नाऱ्याच्या भावविश्वात अनेक जहरी अनुभवांचे ‘गटुळं’ आहे. यातले फूटपाथवरच भाज्यांच्या हाऱ्यांत, फळांच्या खोक्यात दैनंदिन वापराच्या वस्तू, चिरगुटं ठेवत वर्षानुवर्षे जगणाऱ्या नायकाचे भयानक कौटुंबिक जीवन, वेश्याव्यवसायाचे जगावेगळे जग, रेस/जुगार यांचे भोवंडून टाकणारे विश्व या साऱ्यांचे लेखकाने प्रत्ययकारकतेने केलेले चित्रण संवेदनशील पांढरपेशा वाचकांच्या मनाला भोवळ आणते. मग तो ढोर चाळीत यल्लमाच्या आरतीच्या वेळी भग्या जोगत्याकडून कोवळ्या नाऱ्याला आलेला विकृत लैंगिक अनुभव असो की, शाळेला दांडी मारून सिनेमा बघायला गेला असता, शेजारी बसलेल्या पुरुषांनी त्याच्याशी केलेले लैंगिक चाळे असोत. लेखक ते सारे घृणास्पद अनुभव काहीही हातचे न राखता वर्णन करतो. पण ते सारे जीवनाचा अटळ भाग आहे, हे उमजल्यामुळे, ती वर्णने वाचक कडू औषणाप्रमाणे रिचवतो. लेखकाची स्मरणशक्ती तल्लख आहे. त्यामुळे अशा या कडवट प्रसंगांबरोबरच संबंधित व्यक्तींच्या व्यक्तिरेखाही तो हुबेहूब साकारतो. त्यामुळेच बायकोच्या मंगळसूत्रवाटीचे पैसे घराच्या भाड्याऐवजी दारूत उडवून टाकणारा, नाऱ्याच्या पहिल्या पगाराचे कौतुक करण्याऐवजी तो चोरून दारूवर उधळणारा, पतीचे/पित्याचे कोणतेही कर्तव्य न बजावताही पत्नीवर नवरेशाही गाजवणाऱ्या बापाचे चित्रण लेखक यथायोग्य करतो. लेखकापासून पोटुशी राहिलेल्या शबनम या वेश्येचे, कष्टाळू आई सायत्रा, त्याच्यावर प्रेम करणारी पण तो भाजीविक्रेता आहे हे कळल्यावर त्याच्याकडे पाठ फिरवणारी वर्गमैत्रीण चंचगल, घरची रोजची भांडणं सहन न होऊन विष खाणारा भाऊ नामदेव या साऱ्या व्यक्तिरेखा लेखकाने नेमकेपणाने उभ्या केल्या आहेत. सभ्यतेची बंधने झुगारून, रांगड्या, बोलीभाषेत सहज उलगडत जाणारी ‘गटुळं’ कादंबरी परिस्थितीचं विदारक दर्शन घडवते आणि वाचकाला अंतर्मुख करते. -नीला उपाध्ये ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो