* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: LADHA LOKPALCHA UDREK AAM ADMICHA
  • Availability : Available
  • ISBN : 9788184985450
  • Edition : 1
  • Publishing Year : 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 208
  • Language : MARATHI
  • Category : POLITICS & GOVERNMENT
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IT IS AS IF INDIA HAS BECOME A RICH COUNTRY OF POOR PEOPLE. IT WAS DURING THIS PERIOD THAT THE COUNTRY GOT A `LOKPAL` DUE TO THE FIERCE STRUGGLE OF AAM AADMI AND SOCIAL WORKERS. PEOPLE ARE NOW STRUGGLING AGAINST INJUSTICE, EVEN WITHOUT LEADERSHIP. THIS IS A PROMISING PICTURE FOR A LIVING, STRONG, VIBRANT DEMOCRACY. INFILTRATION IS CURRENTLY GOING ON IN ALL STRATA OF SOCIETY. WHY IS ALL THIS HAPPENING NOW? THIS IS AN ATTEMPT TO FIND THE ANSWER TO THIS QUESTION.
देशात आज ५५ कोटी मोबाईल फोन, तर चौदा कोटी इंटरनेट कनेक्शन्स आहेत. रस्त्यावर दर मिनिटाला वीस नव्या कोNया मोटरसायकल, तर तासाला दोनशे चकचकीत चारचाकी गाड्या दाखल होत आहेत. सुबत्तेची गंगा दुथडी भरून वाहत असताना दुसNया बाजूला जनता भ्रष्टाचार, अत्याचाराविरोधात रस्त्यावर उतरत आहे. ‘भारत हा जणू गरीब लोकांचा श्रीमंत देश बनला आहे.’ नेमक्या अशा काळातच आम आदमीच्या आणि समाजसेवकांच्या चिवट लढ्याने देशाला ‘लोकपाल’ मिळाला. अन्यायाविरोधात लोक आता कोणाचे नेतृत्व नसले, तरी संघर्ष करीत आहेत. जिवंत, सशक्त, सळसळत्या लोकशाहीसाठी हे आश्वासक चित्र आहे. समाजाच्या सर्व थरांत सध्या घुसळण सुरू आहे. हे सारे नेमके आताच का घडत आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा केलेला हा प्रयत्न....
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #LADHALOKPALCHAUDREKAAMADMICHA #LADHALOKPALCHAUDREKAAMADMICHA #लढालोकपालचाउद्रेकआमआदमीचा #POLITICS&GOVERNMENT #MARATHI #DHANANJAYBIJALE #धनंजयबिजले "
Customer Reviews
  • Rating StarDaily Sakal – 23-11-14

    देशात सध्या तरुणवर्गाची संख्या वाढतेय. २०२०मध्ये याच तरुणाईची संख्या ५५ कोटीच्या घरात जाईल. तरुण मंडळी अन्यायाच्या विरोधात पटकन सक्रिय होतात. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत लोकपाल कायद्यासाठी आंदोलन केलं आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंगयांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला लोकपाल कायदा करावा लागला. अण्णांच्या आंदोलनाचा जोरच इतका होता, की या कायद्याला संसदेत सर्वच पक्षांच्या सदस्यांनी पाठिंबा दिला. अण्णांच्या आंदोलनाचा परिणाम म्हणून हा कायदा झाला. इतकच नाही तर दिल्लीत आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली सरकारही स्थापन झालं. अण्णांचं आंदोलन आणि केजरीवाल यांच्या सरकारची स्थापना या घटनाक्रमाची सविस्तर नोंद हे पुस्तक घेतं. पत्रकार धनंजय बिजले यांनी या आंदोलनामागचे प्रवाह आणि त्यातील सहभागी मंडळींच्या कार्याची नेमकी माहिती दिली आहे. अण्णांच्या या आंदोलनापूर्वींच्या राज्यातील विविध प्रश्नांसंबधीच्या आंदोलनांचीही माहितीही या पुस्तकात त्यांनी दिली आहे. अकरा प्रकरणांमध्ये या आंदोलनाची माहिती देतानाच बिजले यांनी केजरीवाल यांचीही सविस्तर माहिती दिली आहे. सरकारी सेवेत प्रवेश केल्यावर त्यांना आलेले विचित्र अनुभव आणि मग त्यांनी जनआंदोलनात घेतलेला पुढाकार हे सगळं या पुस्तकामुळं नीटपणानं समजून घेता येतं. लोकपालच्या प्रश्नावरून देशात एक आंदोलन अत्यंत कमी वेळात कसं उभं राहिलं आणि त्याची व्याप्ती कशी पसरली, याचा सगळा प्रवास या पुस्तकातून समजून घेता येतो. आज केजरीवाल सत्तेच्या परिघातून बाहेर फेकले गेले आहेत; पण त्या मंतरलेल्या दिवसाच्या काळातील सा-या घटना या पुस्तकामुळं ताज्या होतात. केजरीवाल आणि अण्णांच्या आंदोलनाचा परिणाम आणि त्या काळात नेमकं काय घडल, हे समजून घ्यायचं असेल, तर हे पुस्तक उपयोगी ठरतं. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more