- वाचक
डॉ. एस. एल.भैरप्पा यांची कन्नड कादंबरी, अनुवाद उमा कुलकर्णी यांनी केला आहे ... डॉ. अमृता आणि सोमशेखर या दोघांची ही गोष्ट आहे , सध्या संदीप रेड्डी वांगा या दाक्षिणात्य दिग्दर्शकाच्या चित्रपटांवर वाद सुरू आहे की तो Toxic Masculinity ला promote करतो, Toxic femininity काय असू शकते हे अमृताच्या कॅरेक्टर वरून समजून जाईल, तिच्या स्वभावाचे विविध पेलू आपणास पाहायला मिळतात त्याउलट सोमशेखर अगदी शांत संयमी , दोघांची फुलत जाणारी प्रेमकहाणी त्यात नैतिक आणि अनैतिकतेचे पेलू खूप चांगल्या प्रकारे मांडले आहेत. Anxiety, depression, suicidal ideation, sadism, mood swings हे सर्व अमृताच्या character मध्ये दिसून येते ... शेवट अगदी अनपेक्षित आहे नक्की वाचावी अशी कादंबरी... #वाचनवेडा #भैरप्पा
- Pinesh Jadhav
काठ - स्त्री आणि पुरुष यांच्यातील नातेसंबंधाची मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून उत्कट, मनोवेधक मांडणी !
म्हैसूरमध्ये, गावाच्या अगदी बाहेर अत्यंत विरळ वस्तीत असलेली जुनी बंगली. एकदा बांधल्यावर दुसऱ्यांदा कधीही रंगरंगोटीचा हात न फिरल्याची स्पष्ट लक्षणं दाखवणाऱ्या, पण कधीकाळचं जुनं वैभव अभिमामानाने मिरवणाऱ्या त्या घराची मालकीण आहे डॉ. अमृता..! अमृता कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहे.ती आणि तिची दोन मुले त्या घरात राहत आहेत !
अमृता सहा वर्षांची असतानाच तिच्या आईचा मृत्यू होतो. मोठा कॉफीचा मळा आणि जमीन-जुमला या इस्टेटीच्या लोभाने तिची काकू त्यांच्या घरात प्रवेश करते. "आता,अमृताला मी सोडून कोण आहे?" असा प्रश्न करत अमृताला सांभाळण्याची जबाबदारी काकू स्वतःवर घेते. पुढे,जाऊन अमृता वीस वर्षाची होताच, काकू तिचे लग्न रंगनाथबरोबर लावून देते. रंगनाथ काकूचा सख्खा भाऊ असतो ! इस्टेटीच्या पैशातूनच डोनेशन भरून रंगनाथला काकूने इंजिनियर केलेले असते !
त्याच गावात अलीकडेच, सोमशेखर नावाचा आर्किटेक्ट राहायला आलेला असतो. मुंबईमधलं वास्तव्य आणि तिथली कामं यांचा पराकोटीचा कंटाळा आल्यामुळे मुंबईमधल्या दहा वर्षाची फिकीर न करता तो म्हैसूरला आला होता. डोके वर करून आकाशात पाहिले असता, नजरेस पडणारे निळेशार आकाश, गावाच्या थोडे बाहेर गेल्यावर हिरव्यागार झाडांनी वेढलेली चामुंडी टेकडी....! - त्याला घेतलेल्या निर्णयाचा अभिमानच वाटत होता.
आपल्या जुन्या बंगल्याची थोडीशी दुरुस्ती करण्याच्या निमित्ताने डॉ.अमृता आणि सोमशेखरची भेट होते..
डॉ. एस. एल. भैरप्पा हे कन्नड, `साहित्य अकादमी पुरस्कार विजेते` कादंबरीकार आहेत.त्यांनी तत्वज्ञान विषयातून डॉक्टरेट मिळवली आहे. `आवरण` या त्यांच्या कादंबरीचे चार वर्षांत 34 आवृत्या प्रसिद्ध झाल्या आहेत. दिवाळीत पुस्तक खरेदीच्या वेळी यादीत त्यांचे एक तरी पुस्तक असणार- हे नक्की केले होते. मानसशास्त्र आवडीचा विषय आणि लेखक स्वतः तत्वज्ञानाचे प्राध्यापक या दोन गोष्टींमुळे हे पुस्तक अंतिम यादीत निश्चित केले होते.
या कादंबरीची नायिका अमृता मुळात खूप हुशार आहे, पण त्याचबरोबर अतिशय स्वाभिमानी, आपले स्वतःचे ठाम मत असणारी आहे. पण, लहानपणीच आईचे छत्र हरवलेले असताना, काकूंकडून झालेल्या अनपेक्षित फसवणुकीमुळे तिचे अंतरंग ढवळून निघाले आहे. ` आपण ज्याला अगदी जवळचं मानतो, ती व्यक्ती अशीही वागू शकते?` या प्रश्नाने तिच्या मनात कायमच वेदनेचे काहूर दाटून राहतात. दोन जीवांच्या विश्वासावर लग्न नावाची रेशीमगाठ बांधली जाते ! अमृताचा हा प्रवासही अविश्वासाच्या पायरीने सुरू होतो !
कादंबरीचा आवाका जास्त मोठा नाही. पात्रेही मोजकीच आहेत. दोन प्रमुख पात्र आणि थोडे अजून सहकलाकार घेऊन तयार केलेला एखादा चित्रपट आपल्याला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. अशावेळी संवादांना अर्थातच महत्व प्राप्त होते. त्याचप्रमाणे, अमृता आणि सोमशेखर यांच्यातील अगदी सहज आणि चपखल अशा संवादातून ही कादंबरी पुढे जाते.
या जगात सगळयात गूढ गोष्ट कोणती असेल ,तर ती माणसाचे `मन` आहे.प्रत्येकाच्या आयुष्यात लहानपणापासून छोट्या मोठ्या गोष्टी घडत राहतात. काही गोष्टी अगदी सुखद अनुभव देणाऱ्या असतात.काही गोष्टींची आठवन सुद्धा आपल्याला नको असते. पण, हे झालं सर्वसामान्य आयुष्य. केव्हा केव्हा आयुष्यात अशा घटना घडतात, की आपले हृदय, मन पिळवटून निघते.मन पोखरून निघते. नैराश्याची भावना तीव्र होत जाते.सगळीकडे विषाद भरून राहतो. नैराश्याच्या भावना योग्य वेळी, योग्य प्रकारे कमी झाली नाही तर मनोविकाराला प्रारंभ होतो.
अमृता आणि सोमशेखर यांच्यामधील नात्याचा प्रवास म्हणजे ही कादंबरी आहे. वर ,आलेल्या पार्श्वभूमीवर हा प्रवास सहजसोपा नसणार हे स्पष्टच आहे. पण लेखकाने हे शिवधनुष्य पेलले आहे.लेखक स्वतः तत्वज्ञानाचे प्राध्यापक असल्याने कादंबरीत वेगवेगळ्या प्रसंगी पात्र जे ` युक्तिवाद` करतात, तो अतिशय चपखल ठरतो.कादंबरी वाचताना `असाही कोणी विचार करू शकतो?` `माणसाचे मन असेही असू शकते?` असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. पात्रांमध्ये एक `मानसिक गुंता` आहे. त्यांच्या मनात जे द्वंद्व चालू आहे त्यामध्ये आपणही सहजरित्या गुरफटून जातो. त्यामधून बाहेर पडण्यासाठी आपल्याही मनाची घालमेल सुरू होते. हा मनाचा गुंता कसा सुटणार ? हे जाणून घेण्यासाठी, कदाचित स्वतःच्याही मनाच्या अंतरंगात बुडून जाण्यासाठी, तुम्हांला ही कादंबरी वाचायलाच हवी
- Pinesh Jadhav
काठ - स्त्री आणि पुरुष यांच्यातील नातेसंबंधाची मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून उत्कट, मनोवेधक मांडणी !
म्हैसूरमध्ये, गावाच्या अगदी बाहेर अत्यंत विरळ वस्तीत असलेली जुनी बंगली. एकदा बांधल्यावर दुसऱ्यांदा कधीही रंगरंगोटीचा हात न फिरल्याची स्पष्ट लक्षणं दाखवणाऱ्या, पण कधीकाळचं जुनं वैभव अभिमामानाने मिरवणाऱ्या त्या घराची मालकीण आहे डॉ. अमृता..! अमृता कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहे.ती आणि तिची दोन मुले त्या घरात राहत आहेत !
अमृता सहा वर्षांची असतानाच तिच्या आईचा मृत्यू होतो. मोठा कॉफीचा मळा आणि जमीन-जुमला या इस्टेटीच्या लोभाने तिची काकू त्यांच्या घरात प्रवेश करते. "आता,अमृताला मी सोडून कोण आहे?" असा प्रश्न करत अमृताला सांभाळण्याची जबाबदारी काकू स्वतःवर घेते. पुढे,जाऊन अमृता वीस वर्षाची होताच, काकू तिचे लग्न रंगनाथबरोबर लावून देते. रंगनाथ काकूचा सख्खा भाऊ असतो ! इस्टेटीच्या पैशातूनच डोनेशन भरून रंगनाथला काकूने इंजिनियर केलेले असते !
त्याच गावात अलीकडेच, सोमशेखर नावाचा आर्किटेक्ट राहायला आलेला असतो. मुंबईमधलं वास्तव्य आणि तिथली कामं यांचा पराकोटीचा कंटाळा आल्यामुळे मुंबईमधल्या दहा वर्षाची फिकीर न करता तो म्हैसूरला आला होता. डोके वर करून आकाशात पाहिले असता, नजरेस पडणारे निळेशार आकाश, गावाच्या थोडे बाहेर गेल्यावर हिरव्यागार झाडांनी वेढलेली चामुंडी टेकडी....! - त्याला घेतलेल्या निर्णयाचा अभिमानच वाटत होता.
आपल्या जुन्या बंगल्याची थोडीशी दुरुस्ती करण्याच्या निमित्ताने डॉ.अमृता आणि सोमशेखरची भेट होते..
डॉ. एस. एल. भैरप्पा हे कन्नड, `साहित्य अकादमी पुरस्कार विजेते` कादंबरीकार आहेत.त्यांनी तत्वज्ञान विषयातून डॉक्टरेट मिळवली आहे. `आवरण` या त्यांच्या कादंबरीचे चार वर्षांत 34 आवृत्या प्रसिद्ध झाल्या आहेत. दिवाळीत पुस्तक खरेदीच्या वेळी यादीत त्यांचे एक तरी पुस्तक असणार- हे नक्की केले होते. मानसशास्त्र आवडीचा विषय आणि लेखक स्वतः तत्वज्ञानाचे प्राध्यापक या दोन गोष्टींमुळे हे पुस्तक अंतिम यादीत निश्चित केले होते.
या कादंबरीची नायिका अमृता मुळात खूप हुशार आहे, पण त्याचबरोबर अतिशय स्वाभिमानी, आपले स्वतःचे ठाम मत असणारी आहे. पण, लहानपणीच आईचे छत्र हरवलेले असताना, काकूंकडून झालेल्या अनपेक्षित फसवणुकीमुळे तिचे अंतरंग ढवळून निघाले आहे. ` आपण ज्याला अगदी जवळचं मानतो, ती व्यक्ती अशीही वागू शकते?` या प्रश्नाने तिच्या मनात कायमच वेदनेचे काहूर दाटून राहतात. दोन जीवांच्या विश्वासावर लग्न नावाची रेशीमगाठ बांधली जाते ! अमृताचा हा प्रवासही अविश्वासाच्या पायरीने सुरू होतो !
कादंबरीचा आवाका जास्त मोठा नाही. पात्रेही मोजकीच आहेत. दोन प्रमुख पात्र आणि थोडे अजून सहकलाकार घेऊन तयार केलेला एखादा चित्रपट आपल्याला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. अशावेळी संवादांना अर्थातच महत्व प्राप्त होते. त्याचप्रमाणे, अमृता आणि सोमशेखर यांच्यातील अगदी सहज आणि चपखल अशा संवादातून ही कादंबरी पुढे जाते.
या जगात सगळयात गूढ गोष्ट कोणती असेल ,तर ती माणसाचे `मन` आहे.प्रत्येकाच्या आयुष्यात लहानपणापासून छोट्या मोठ्या गोष्टी घडत राहतात. काही गोष्टी अगदी सुखद अनुभव देणाऱ्या असतात.काही गोष्टींची आठवन सुद्धा आपल्याला नको असते. पण, हे झालं सर्वसामान्य आयुष्य. केव्हा केव्हा आयुष्यात अशा घटना घडतात, की आपले हृदय, मन पिळवटून निघते.मन पोखरून निघते. नैराश्याची भावना तीव्र होत जाते.सगळीकडे विषाद भरून राहतो. नैराश्याच्या भावना योग्य वेळी, योग्य प्रकारे कमी झाली नाही तर मनोविकाराला प्रारंभ होतो.
अमृता आणि सोमशेखर यांच्यामधील नात्याचा प्रवास म्हणजे ही कादंबरी आहे. वर ,आलेल्या पार्श्वभूमीवर हा प्रवास सहजसोपा नसणार हे स्पष्टच आहे. पण लेखकाने हे शिवधनुष्य पेलले आहे.लेखक स्वतः तत्वज्ञानाचे प्राध्यापक असल्याने कादंबरीत वेगवेगळ्या प्रसंगी पात्र जे ` युक्तिवाद` करतात, तो अतिशय चपखल ठरतो.कादंबरी वाचताना `असाही कोणी विचार करू शकतो?` `माणसाचे मन असेही असू शकते?` असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. पात्रांमध्ये एक `मानसिक गुंता` आहे. त्यांच्या मनात जे द्वंद्व चालू आहे त्यामध्ये आपणही सहजरित्या गुरफटून जातो. त्यामधून बाहेर पडण्यासाठी आपल्याही मनाची घालमेल सुरू होते. हा मनाचा गुंता कसा सुटणार ? हे जाणून घेण्यासाठी, कदाचित स्वतःच्याही मनाच्या अंतरंगात बुडून जाण्यासाठी, तुम्हांला ही कादंबरी वाचायलाच हवी.....!
- VIJAY SARAVATE
तशी कथा अगदी साधी आहे, पण आत्महत्येस प्रवृत्त होणाऱ्या व्यक्तीच्या मनोविचार आणि विकार खूप विस्तृत पणे मांडले आहेत. त्यामुळे थोडी पुनरुक्ती आढळते, बाकी उत्त्तम.
- Govind Kulkarni
नायिका लहान असतांना मातृसुखाला पारखी होते.तेथे तिची काकूंच तिला प्रेम लावून फसवते.एव्हढच कशाला तिच्या वडिलांना सुद्धा जाळ्यात ओढते.ते केवळ संपत्ती करताच.त्याचा पर्दाफाश नायिकाच करते.