* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789353172213
  • Edition : 1
  • Publishing Year : APRIL 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 90
  • Language : MARATHI
  • Category : CHILDREN LITERATURE
Quantity
Buying Options:
  • Print Books:
GOSHTA DOTCOM ANI ITAR BODHKATHA:BHAG-1
९७ बोधकथांचा हा संग्रह म्हणजे संस्कारांची शिदोरीच आहे. या छोट्या छोट्या बोधकथांच्या शेवटी कथेतून काय बोध घ्यावा आणि त्यासाठी कोणता संकल्प करावा हेदेखील मुलांना सांगितले आहे. लहान वयात मुलांच्या कोवळ्या मनावर जे संस्कार होतात, ते पुढे दीर्घ काळ टिकवून राहतात. मुलांच्या कोवळ्या मनावर ज्ञानदा नाईक यांच्या या बोधकथा नक्कीच प्रभाव पाडतील. या कथांमधून नम्रता, सहकार्य, विश्वास, संयम, आदर, प्रामाणिकपणा यांसारखी मूल्ये बालकांच्या मनावर रुजवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. मित्र-मैत्रिणी, नातेसंबंध त्यांचे महत्त्व पटवून देणाऱ्या बोधकथा त्यांनी लिहिल्या आहेत. या कथा सांगताना त्यांना परी, यक्ष, जादू अशा मुलांच्या कल्पनांमध्ये असणाऱ्या शब्दांचा छान वापर केला आहे. मुलांनी आपले स्वभावगुण ओळखावेत, डायरी लिहावी, आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करावा, क्षमाशील व्हावे, चांगल्या सवयी अंगी बाणवाव्यात, निसर्गावर- प्राणिमात्रांवर प्रेम करावे असे संदेश या बोधकथा देतात. मनोरंजन आणि संस्कार यांचा सुरेख मेळ या कथांमधून ज्ञानदा नाईक यांनी घातला आहे.
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघामार्फत दिला जाणारा साल 2019चा मुखपृष्ठासाठीचा (बालसाहित्य) उत्तेजनार्थ पुरस्कार

No Records Found
No Records Found
Keywords
#DNYANADANAIK #BOLKAUNTANIETERBODKATHA #BALSAHITYA #CHETKINISHIGATTIJAMLI #HUPUGUPUCHEGHAR #SHASHANKCHARAAG #NAAVADNARIMULGI #SURESHSHAHANAZALA #CHAVNARAPILLU #KHARAKHURAMITRAZIPRU #BABUCHAMITRABHALU #TAJELDARCANVAS #GURUSHISYAKATHA #BODHKATHA #CHATURYKATHA #ज्ञानदानाईक #बोलकाउंटआणिइतरबोधकथा # बालसाहित्य #चेटकिणीशीगट्टीजमली #हुप्पूगुप्पूचेघर #शशांकचाराग #नआवडणारी#मुलगी #सुरेशशहाणाझाला #चावणारंपिल्लू #खराखुरामित्रझिपरू #बाबूचामित्रभालू #तजेलदारकॅनव्हास #गुरुशिष्यकथा #बोधकथा #चातुर्यकथा
Customer Reviews
  • Rating StarLOKMAT 2-6-2019

    लहानांसाठी गोष्टीरुप बोधकथा निसर्गातल्या साध्या साध्या गोष्टींकडे लहान मुलांच्या कुतुहल बुद्धीने पाहिले तर त्या अधिक सुंदर दिसतात आणि त्यांच्याच भाषेत त्या मांडल्या तर बालवाचकांना मनापासून वाचायला आवडतात. याच नजरेतून मेहता पब्लिशिंग हाऊसने लहानांसाठ एक संचात्मक छोटेखानी पुस्तकांची मालिका प्रकाशित केली आहे. त्यातीलच एक चार पुस्तकांचा संच ज्ञानदा नाईक यांनी लिहिला आहे. यात सोनूचा धडा आणि इतर बोधकथा, प्रचंड भोपळ्यातला राक्षस आणि इतर बोधकथा, तळ्याकाठची मैत्री आणि इतर बोधकथा, यक्षाचे ढोलके आणि इतर बोधकथा यांचा या संचात समावेश आहे. निसर्गात आपल्या स्वाभाविक प्रेरणांनी जगणार्या प्राणी, पक्ष्यांचे निसर्गाशी नातं अधोरेखित करताना या पुस्यकांतून त्यांच्या जगण्याशी मानवाच्या कृतीची एक सांगड घालून निसर्गसंवर्धनाच्या बाबीवर बोलका प्रकाश टाकला आहे. ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 20-05-2019

    मनोरंजनातून संस्कार... मुलांचं मन समजावून त्यांच्यावर संस्कार रुजवण्याचा मार्ग खरंतर कठीणच, पण लहान-लहान गोष्टीतून त्यांना पटेल, उमजेल अशा पद्धतीने समजावून सांगितलं, काय योग्य-अयोग्य यातला फरक सांगितला, तर मुलं स्वत:ला बदलतात. हाच धागा पकडून ‘गोष्ट ॉटकॉम’ अंतर्गत प्रकाशित झालेल्या पुस्तकांमधून चांगल्या गोष्टी मुलांच्या वागण्या-बोलण्यात, जगण्यात रुजवण्याचा स्तुत्य प्रयत्न लेखिका ज्ञानदा नाईक यांनी केला आहे. कुठल्यातरी स्वप्नवत राजा-राणी-पऱ्यांच्या गोष्टींच्या जगात अनेक मुलं रमतात. या पुस्तकांतही अशा मुलांना कुतूहल, गंमत वाटणाऱ्या गोष्टी आहेत, पण तरीही या कथा केवळ स्वप्नरंजन ठरत नाहीत. या व्यक्तिरेखा मुलांना आयुष्याचा धडा देऊन जातात. त्यातील चेटकीण भीतीतून निर्माण झालेली आहे, भुरळ घालणारी बाग प्रामाणिकपणाचं महत्त्व अधोरेखित करते, बोटाएवढी परी दुसऱ्याला मदत करण्याचा मार्ग दाखवते. तर बागेतले यक्ष एका नव्या दुनियेची ओळख करून देतात. प्रचंड भोपळ्यातला राक्षस इतरांना मदत करण्याची शिकवण देतो. यक्षाच्या ढोलक्यातून म्हणजेच कचाट्यातून बाहेर पडणारी तानु संकटावर मात करण्याची उर्मी देते. या कथांमध्ये आई-बाबा आहेत, त्यांच्यावर रागवणारी मुले आहेत, प्रेमळ आजी आहे, बहीण-भावामधील वाद आहेत. पण हे प्रत्येकाच्या घराचे चित्र किंवा रोज घडणारे प्रसंग कथेतून वाचताना मजा येते. या कथा शेवटी साहजिकच वेगळा दृष्टिकोन देऊन जातात. लहान मुलांना शिकवताना मोठ्यांकडून होणाऱ्या चुकाही लेखिकेने खुबीने मांडल्या आहेत. यात कामाच्या धावपळीत व्यग्र असणारे पालक, त्यांची मुलांना वेळ देऊ शकत नसल्याची तगमगही दिसते. तसेच बाबांचे प्रेमही काही कथांमधून सुंदर पद्धतीने मांडण्यात आले आहे. मित्र-मैत्रिणींच्या जिव्हाळ्याच्या, मस्तीच्या, वादाच्या, भांडणाच्या कथाही मजा आणतात. या कथांत आणखी एक मजेशीर दुनिया दिसते ती म्हणजे प्राण्यांची. पक्ष्यांचे, निसर्गाचे, मुक्या जिवांचे जगणे मांडण्यात आले आहे. त्यांना विनाकारण त्रास न देण्याचा धडा मिळतो. तसेच त्यांची काळजी कशी घ्यावी, हेही पटवून सांगितलं आहे. यात पाळीव प्राण्यांसोबत उंट, हत्ती, कासव, सरडा असे प्राणीही भेटतात. काही कथांमध्ये प्राण्यांची फजितीही वाचायला मिळते. शिवाय दुसऱ्याला मदत करण्याचे, भीतीवर मात करण्याचे, आत्मविश्वासाचे मूल्यही या कथांमधून मांडण्यात आले आहे. अगदी लहान-लहान कथा बालमनात छान विहार करतात. त्यांना हसवतात, गुदगुल्या करतात, उत्सुकता ताणून धरतात आणि सरतेशेवटी विचार करायला लावतात. या कथासोबत समर्पक चित्रेही असल्याने गोष्ट छान पद्धतीने उलगडण्यास मदत होते. प्रत्येक कथेच्या शेवटी संकल्प काय करायचा तेही दिले आहे. एकूण तीन संच असून दोन संचात तीन आणि एका संचात चार पुस्तके आहेत. एका पुस्तकात साधारण आठ ते दहा कथा आहेत. यातील प्रत्येक कथा बोलकी आहे. मुलांच्या मानसिकतेशी मेळ साधणारी आहे. म्हणूनच या संचातून करमणुकीसोबत संस्काराचे गाठोडेही मिळते. – ऋतुजा सावंत ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more