* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GOSHTA DOTCOM ANI ITAR BODHKATHA:BHAG-1
  • Availability : Available
  • ISBN : 9789353172213
  • Edition : 1
  • Publishing Year : APRIL 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 90
  • Language : MARATHI
  • Category : CHILDREN LITERATURE
Quantity
Buying Options:
  • Print Books:
NA
९७ बोधकथांचा हा संग्रह म्हणजे संस्कारांची शिदोरीच आहे. या छोट्या छोट्या बोधकथांच्या शेवटी कथेतून काय बोध घ्यावा आणि त्यासाठी कोणता संकल्प करावा हेदेखील मुलांना सांगितले आहे. लहान वयात मुलांच्या कोवळ्या मनावर जे संस्कार होतात, ते पुढे दीर्घ काळ टिकवून राहतात. मुलांच्या कोवळ्या मनावर ज्ञानदा नाईक यांच्या या बोधकथा नक्कीच प्रभाव पाडतील. या कथांमधून नम्रता, सहकार्य, विश्वास, संयम, आदर, प्रामाणिकपणा यांसारखी मूल्ये बालकांच्या मनावर रुजवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. मित्र-मैत्रिणी, नातेसंबंध त्यांचे महत्त्व पटवून देणाऱ्या बोधकथा त्यांनी लिहिल्या आहेत. या कथा सांगताना त्यांना परी, यक्ष, जादू अशा मुलांच्या कल्पनांमध्ये असणाऱ्या शब्दांचा छान वापर केला आहे. मुलांनी आपले स्वभावगुण ओळखावेत, डायरी लिहावी, आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करावा, क्षमाशील व्हावे, चांगल्या सवयी अंगी बाणवाव्यात, निसर्गावर- प्राणिमात्रांवर प्रेम करावे असे संदेश या बोधकथा देतात. मनोरंजन आणि संस्कार यांचा सुरेख मेळ या कथांमधून ज्ञानदा नाईक यांनी घातला आहे.
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघामार्फत दिला जाणारा साल 2019चा मुखपृष्ठासाठीचा (बालसाहित्य) उत्तेजनार्थ पुरस्कार

No Records Found
No Records Found
Keywords
#DNYANADANAIK #BOLKAUNTANIETERBODKATHA #BALSAHITYA #CHETKINISHIGATTIJAMLI #HUPUGUPUCHEGHAR #SHASHANKCHARAAG #NAAVADNARIMULGI #SURESHSHAHANAZALA #CHAVNARAPILLU #KHARAKHURAMITRAZIPRU #BABUCHAMITRABHALU #TAJELDARCANVAS #GURUSHISYAKATHA #BODHKATHA #CHATURYKATHA #ज्ञानदानाईक #बोलकाउंटआणिइतरबोधकथा # बालसाहित्य #चेटकिणीशीगट्टीजमली #हुप्पूगुप्पूचेघर #शशांकचाराग #नआवडणारी#मुलगी #सुरेशशहाणाझाला #चावणारंपिल्लू #खराखुरामित्रझिपरू #बाबूचामित्रभालू #तजेलदारकॅनव्हास #गुरुशिष्यकथा #बोधकथा #चातुर्यकथा
Customer Reviews
  • Rating StarLOKMAT 2-6-2019

    लहानांसाठी गोष्टीरुप बोधकथा निसर्गातल्या साध्या साध्या गोष्टींकडे लहान मुलांच्या कुतुहल बुद्धीने पाहिले तर त्या अधिक सुंदर दिसतात आणि त्यांच्याच भाषेत त्या मांडल्या तर बालवाचकांना मनापासून वाचायला आवडतात. याच नजरेतून मेहता पब्लिशिंग हाऊसने लहानांसाठ एक संचात्मक छोटेखानी पुस्तकांची मालिका प्रकाशित केली आहे. त्यातीलच एक चार पुस्तकांचा संच ज्ञानदा नाईक यांनी लिहिला आहे. यात सोनूचा धडा आणि इतर बोधकथा, प्रचंड भोपळ्यातला राक्षस आणि इतर बोधकथा, तळ्याकाठची मैत्री आणि इतर बोधकथा, यक्षाचे ढोलके आणि इतर बोधकथा यांचा या संचात समावेश आहे. निसर्गात आपल्या स्वाभाविक प्रेरणांनी जगणार्या प्राणी, पक्ष्यांचे निसर्गाशी नातं अधोरेखित करताना या पुस्यकांतून त्यांच्या जगण्याशी मानवाच्या कृतीची एक सांगड घालून निसर्गसंवर्धनाच्या बाबीवर बोलका प्रकाश टाकला आहे. ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 20-05-2019

    मनोरंजनातून संस्कार... मुलांचं मन समजावून त्यांच्यावर संस्कार रुजवण्याचा मार्ग खरंतर कठीणच, पण लहान-लहान गोष्टीतून त्यांना पटेल, उमजेल अशा पद्धतीने समजावून सांगितलं, काय योग्य-अयोग्य यातला फरक सांगितला, तर मुलं स्वत:ला बदलतात. हाच धागा पकडून ‘गोष्ट ॉटकॉम’ अंतर्गत प्रकाशित झालेल्या पुस्तकांमधून चांगल्या गोष्टी मुलांच्या वागण्या-बोलण्यात, जगण्यात रुजवण्याचा स्तुत्य प्रयत्न लेखिका ज्ञानदा नाईक यांनी केला आहे. कुठल्यातरी स्वप्नवत राजा-राणी-पऱ्यांच्या गोष्टींच्या जगात अनेक मुलं रमतात. या पुस्तकांतही अशा मुलांना कुतूहल, गंमत वाटणाऱ्या गोष्टी आहेत, पण तरीही या कथा केवळ स्वप्नरंजन ठरत नाहीत. या व्यक्तिरेखा मुलांना आयुष्याचा धडा देऊन जातात. त्यातील चेटकीण भीतीतून निर्माण झालेली आहे, भुरळ घालणारी बाग प्रामाणिकपणाचं महत्त्व अधोरेखित करते, बोटाएवढी परी दुसऱ्याला मदत करण्याचा मार्ग दाखवते. तर बागेतले यक्ष एका नव्या दुनियेची ओळख करून देतात. प्रचंड भोपळ्यातला राक्षस इतरांना मदत करण्याची शिकवण देतो. यक्षाच्या ढोलक्यातून म्हणजेच कचाट्यातून बाहेर पडणारी तानु संकटावर मात करण्याची उर्मी देते. या कथांमध्ये आई-बाबा आहेत, त्यांच्यावर रागवणारी मुले आहेत, प्रेमळ आजी आहे, बहीण-भावामधील वाद आहेत. पण हे प्रत्येकाच्या घराचे चित्र किंवा रोज घडणारे प्रसंग कथेतून वाचताना मजा येते. या कथा शेवटी साहजिकच वेगळा दृष्टिकोन देऊन जातात. लहान मुलांना शिकवताना मोठ्यांकडून होणाऱ्या चुकाही लेखिकेने खुबीने मांडल्या आहेत. यात कामाच्या धावपळीत व्यग्र असणारे पालक, त्यांची मुलांना वेळ देऊ शकत नसल्याची तगमगही दिसते. तसेच बाबांचे प्रेमही काही कथांमधून सुंदर पद्धतीने मांडण्यात आले आहे. मित्र-मैत्रिणींच्या जिव्हाळ्याच्या, मस्तीच्या, वादाच्या, भांडणाच्या कथाही मजा आणतात. या कथांत आणखी एक मजेशीर दुनिया दिसते ती म्हणजे प्राण्यांची. पक्ष्यांचे, निसर्गाचे, मुक्या जिवांचे जगणे मांडण्यात आले आहे. त्यांना विनाकारण त्रास न देण्याचा धडा मिळतो. तसेच त्यांची काळजी कशी घ्यावी, हेही पटवून सांगितलं आहे. यात पाळीव प्राण्यांसोबत उंट, हत्ती, कासव, सरडा असे प्राणीही भेटतात. काही कथांमध्ये प्राण्यांची फजितीही वाचायला मिळते. शिवाय दुसऱ्याला मदत करण्याचे, भीतीवर मात करण्याचे, आत्मविश्वासाचे मूल्यही या कथांमधून मांडण्यात आले आहे. अगदी लहान-लहान कथा बालमनात छान विहार करतात. त्यांना हसवतात, गुदगुल्या करतात, उत्सुकता ताणून धरतात आणि सरतेशेवटी विचार करायला लावतात. या कथासोबत समर्पक चित्रेही असल्याने गोष्ट छान पद्धतीने उलगडण्यास मदत होते. प्रत्येक कथेच्या शेवटी संकल्प काय करायचा तेही दिले आहे. एकूण तीन संच असून दोन संचात तीन आणि एका संचात चार पुस्तके आहेत. एका पुस्तकात साधारण आठ ते दहा कथा आहेत. यातील प्रत्येक कथा बोलकी आहे. मुलांच्या मानसिकतेशी मेळ साधणारी आहे. म्हणूनच या संचातून करमणुकीसोबत संस्काराचे गाठोडेही मिळते. – ऋतुजा सावंत ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more