* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789353172213
  • Edition : 1
  • Publishing Year : APRIL 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 90
  • Language : MARATHI
  • Category : CHILDREN LITERATURE
  • Available in Combos :DNYANDA NAIK BIRTHDAY OFFER
Quantity
Buying Options:
  • Print Books:
GOSHTA DOTCOM ANI ITAR BODHKATHA:BHAG-1
९७ बोधकथांचा हा संग्रह म्हणजे संस्कारांची शिदोरीच आहे. या छोट्या छोट्या बोधकथांच्या शेवटी कथेतून काय बोध घ्यावा आणि त्यासाठी कोणता संकल्प करावा हेदेखील मुलांना सांगितले आहे. लहान वयात मुलांच्या कोवळ्या मनावर जे संस्कार होतात, ते पुढे दीर्घ काळ टिकवून राहतात. मुलांच्या कोवळ्या मनावर ज्ञानदा नाईक यांच्या या बोधकथा नक्कीच प्रभाव पाडतील. या कथांमधून नम्रता, सहकार्य, विश्वास, संयम, आदर, प्रामाणिकपणा यांसारखी मूल्ये बालकांच्या मनावर रुजवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. मित्र-मैत्रिणी, नातेसंबंध त्यांचे महत्त्व पटवून देणाऱ्या बोधकथा त्यांनी लिहिल्या आहेत. या कथा सांगताना त्यांना परी, यक्ष, जादू अशा मुलांच्या कल्पनांमध्ये असणाऱ्या शब्दांचा छान वापर केला आहे. मुलांनी आपले स्वभावगुण ओळखावेत, डायरी लिहावी, आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करावा, क्षमाशील व्हावे, चांगल्या सवयी अंगी बाणवाव्यात, निसर्गावर- प्राणिमात्रांवर प्रेम करावे असे संदेश या बोधकथा देतात. मनोरंजन आणि संस्कार यांचा सुरेख मेळ या कथांमधून ज्ञानदा नाईक यांनी घातला आहे.
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघामार्फत दिला जाणारा साल 2019चा मुखपृष्ठासाठीचा (बालसाहित्य) उत्तेजनार्थ पुरस्कार

No Records Found
No Records Found
Keywords
#DNYANADANAIK #BOLKAUNTANIETERBODKATHA #BALSAHITYA #CHETKINISHIGATTIJAMLI #HUPUGUPUCHEGHAR #SHASHANKCHARAAG #NAAVADNARIMULGI #SURESHSHAHANAZALA #CHAVNARAPILLU #KHARAKHURAMITRAZIPRU #BABUCHAMITRABHALU #TAJELDARCANVAS #GURUSHISYAKATHA #BODHKATHA #CHATURYKATHA #ज्ञानदानाईक #बोलकाउंटआणिइतरबोधकथा # बालसाहित्य #चेटकिणीशीगट्टीजमली #हुप्पूगुप्पूचेघर #शशांकचाराग #नआवडणारी#मुलगी #सुरेशशहाणाझाला #चावणारंपिल्लू #खराखुरामित्रझिपरू #बाबूचामित्रभालू #तजेलदारकॅनव्हास #गुरुशिष्यकथा #बोधकथा #चातुर्यकथा
Customer Reviews
  • Rating StarLOKMAT 2-6-2019

    लहानांसाठी गोष्टीरुप बोधकथा निसर्गातल्या साध्या साध्या गोष्टींकडे लहान मुलांच्या कुतुहल बुद्धीने पाहिले तर त्या अधिक सुंदर दिसतात आणि त्यांच्याच भाषेत त्या मांडल्या तर बालवाचकांना मनापासून वाचायला आवडतात. याच नजरेतून मेहता पब्लिशिंग हाऊसने लहानांसाठ एक संचात्मक छोटेखानी पुस्तकांची मालिका प्रकाशित केली आहे. त्यातीलच एक चार पुस्तकांचा संच ज्ञानदा नाईक यांनी लिहिला आहे. यात सोनूचा धडा आणि इतर बोधकथा, प्रचंड भोपळ्यातला राक्षस आणि इतर बोधकथा, तळ्याकाठची मैत्री आणि इतर बोधकथा, यक्षाचे ढोलके आणि इतर बोधकथा यांचा या संचात समावेश आहे. निसर्गात आपल्या स्वाभाविक प्रेरणांनी जगणार्या प्राणी, पक्ष्यांचे निसर्गाशी नातं अधोरेखित करताना या पुस्यकांतून त्यांच्या जगण्याशी मानवाच्या कृतीची एक सांगड घालून निसर्गसंवर्धनाच्या बाबीवर बोलका प्रकाश टाकला आहे. ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 20-05-2019

    मनोरंजनातून संस्कार... मुलांचं मन समजावून त्यांच्यावर संस्कार रुजवण्याचा मार्ग खरंतर कठीणच, पण लहान-लहान गोष्टीतून त्यांना पटेल, उमजेल अशा पद्धतीने समजावून सांगितलं, काय योग्य-अयोग्य यातला फरक सांगितला, तर मुलं स्वत:ला बदलतात. हाच धागा पकडून ‘गोष्ट ॉटकॉम’ अंतर्गत प्रकाशित झालेल्या पुस्तकांमधून चांगल्या गोष्टी मुलांच्या वागण्या-बोलण्यात, जगण्यात रुजवण्याचा स्तुत्य प्रयत्न लेखिका ज्ञानदा नाईक यांनी केला आहे. कुठल्यातरी स्वप्नवत राजा-राणी-पऱ्यांच्या गोष्टींच्या जगात अनेक मुलं रमतात. या पुस्तकांतही अशा मुलांना कुतूहल, गंमत वाटणाऱ्या गोष्टी आहेत, पण तरीही या कथा केवळ स्वप्नरंजन ठरत नाहीत. या व्यक्तिरेखा मुलांना आयुष्याचा धडा देऊन जातात. त्यातील चेटकीण भीतीतून निर्माण झालेली आहे, भुरळ घालणारी बाग प्रामाणिकपणाचं महत्त्व अधोरेखित करते, बोटाएवढी परी दुसऱ्याला मदत करण्याचा मार्ग दाखवते. तर बागेतले यक्ष एका नव्या दुनियेची ओळख करून देतात. प्रचंड भोपळ्यातला राक्षस इतरांना मदत करण्याची शिकवण देतो. यक्षाच्या ढोलक्यातून म्हणजेच कचाट्यातून बाहेर पडणारी तानु संकटावर मात करण्याची उर्मी देते. या कथांमध्ये आई-बाबा आहेत, त्यांच्यावर रागवणारी मुले आहेत, प्रेमळ आजी आहे, बहीण-भावामधील वाद आहेत. पण हे प्रत्येकाच्या घराचे चित्र किंवा रोज घडणारे प्रसंग कथेतून वाचताना मजा येते. या कथा शेवटी साहजिकच वेगळा दृष्टिकोन देऊन जातात. लहान मुलांना शिकवताना मोठ्यांकडून होणाऱ्या चुकाही लेखिकेने खुबीने मांडल्या आहेत. यात कामाच्या धावपळीत व्यग्र असणारे पालक, त्यांची मुलांना वेळ देऊ शकत नसल्याची तगमगही दिसते. तसेच बाबांचे प्रेमही काही कथांमधून सुंदर पद्धतीने मांडण्यात आले आहे. मित्र-मैत्रिणींच्या जिव्हाळ्याच्या, मस्तीच्या, वादाच्या, भांडणाच्या कथाही मजा आणतात. या कथांत आणखी एक मजेशीर दुनिया दिसते ती म्हणजे प्राण्यांची. पक्ष्यांचे, निसर्गाचे, मुक्या जिवांचे जगणे मांडण्यात आले आहे. त्यांना विनाकारण त्रास न देण्याचा धडा मिळतो. तसेच त्यांची काळजी कशी घ्यावी, हेही पटवून सांगितलं आहे. यात पाळीव प्राण्यांसोबत उंट, हत्ती, कासव, सरडा असे प्राणीही भेटतात. काही कथांमध्ये प्राण्यांची फजितीही वाचायला मिळते. शिवाय दुसऱ्याला मदत करण्याचे, भीतीवर मात करण्याचे, आत्मविश्वासाचे मूल्यही या कथांमधून मांडण्यात आले आहे. अगदी लहान-लहान कथा बालमनात छान विहार करतात. त्यांना हसवतात, गुदगुल्या करतात, उत्सुकता ताणून धरतात आणि सरतेशेवटी विचार करायला लावतात. या कथासोबत समर्पक चित्रेही असल्याने गोष्ट छान पद्धतीने उलगडण्यास मदत होते. प्रत्येक कथेच्या शेवटी संकल्प काय करायचा तेही दिले आहे. एकूण तीन संच असून दोन संचात तीन आणि एका संचात चार पुस्तके आहेत. एका पुस्तकात साधारण आठ ते दहा कथा आहेत. यातील प्रत्येक कथा बोलकी आहे. मुलांच्या मानसिकतेशी मेळ साधणारी आहे. म्हणूनच या संचातून करमणुकीसोबत संस्काराचे गाठोडेही मिळते. – ऋतुजा सावंत ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more