* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ONE NIGHT @ THE CALL CENTRE
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788184980813
  • Edition : 7
  • Publishing Year : NOVEMBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 264
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :CHETAN BHAGAT COMBO SET- 3 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
...PITCH-PERFECT... KEENLY FOCUSED ON NUANCES AND DETAIL ... ONE NIGHT @ THE CALL CENTER HAS STRUCK A CHORD WITH INDIA`S YOUNG...` IN THE WINTER OF 2004, A WINTER MET A YOUNG GIRL ON AN OVERNIGHT TRAIN JOURNEY. TO PASS THE TIME, SHE OFFERED TO TELL HIM A STORY. HOWEVER, SHE HAD ONE CONDITION THAT HE MAKE IT INTO HIS SECOND BOOK. HE HESITATED, BUT ASKED WHAT THE STORY WAS ABOUT. THE GIRL SAID THE STORY WAS ABOUT SIX PEOPLE WORKING IN A CALL CENTER, SET IN ONE NIGHT. SHE SAID IT WAS THE NIGHT THEY HAD GOT A PHONE CALL. THAT PHONE CALL WAS FROM GOD.
लेखकाला रात्रीच्या प्रवासात एक तरुण, देखणी मुलगी सहप्रवासी म्हणून भेटते. वेळ घालविण्यासाठी , ती त्याला एक गोष्ट सांगू इच्छिते, मात्र ती त्याला अट घालते, की त्या गोष्टीवर त्यानं दुसरं पुस्तक लिहायचं. लेखक सुरुवातीला ते मान्य करायला धजत नाही; पण त्याला ती गोष्ट जाणून घ्यायचं औत्सुक्यही असतंच. त्यानंतर ती मुलगी लेखकाला कॉल सेन्टरमध्ये काम करणाऱ्या सहा लोकांच्या एका रात्रीची कथा सांगते. `फाईव्ह पॉइन्ट समवन ` नंतर चेतन भगत यांचं तितकंच चर्चेत आलेलं हे पुस्तक वाचकांना निश्चितच निराळ्या अनुभवविश्वाची सफर घडवेल. नर्मविनोदाचा सुखद शिडकावा देणारी ही कादंबरी सद्य:स्थितीवर भेदकपणे प्रकाश टाकत वाचकांना नक्कीच अंतर्मुख करेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #ONENIGHT@THECALLCENTRE #FIVEPOINTSOMEONE #THE 3 MISTAKES OF MY LIFE #फाईव्हपॉइंटसमवन #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUPRIYAVAKIL #सुप्रियावकील #CHETANBHAGAT #चेतनभगत
Customer Reviews
  • Rating StarRohini Londhe

    The Marathi translation of this book is awesome.I just love it.

  • Rating StarDAINIK SAGAR 18-04-2010

    ‘कॉल सेंटर’चं यथार्थ दर्शन घडविणारी कादंबरी… ‘द कॉल सेंटर’ ही चेतन भगत यांची अत्यंत गाजलेली कादंबरी. तिचा मनोज्ञ अनुवाद केलाय सुप्रिया वकील यांनी. मॉडर्न तरुणतरुणींच्या जीवनाचा अविभाज्य घटक ठरलेल्या कॉल सेंटरचं यथार्थ दर्शन जसं प्रस्तुत कादंबरीत तसं त्या तरुणपिढीच्या भावभवनांचा आलेख नजरेसमोर उभा राहतो. एका वेगळ्याच अनुभवविश्वाची रोमांचक सफर घडविण्यात लेखक कमालीचा यशस्वी ठरला आहे. हसत खेळत सत्याचं विदारक दर्शन घडविण्याची त्याची वेगळीच शैली प्रभावशाली वाटते. प्रत्येक तरुण-तरुणीनं वाचावं, असचं हे पुस्तक. प्रस्तुत कादंबरीतील सर्व घटना एकाच रात्रीत घडत असल्यानं तिचा वेग हा देखील चक्रावून टाकणारा आहे. ...Read more

  • Rating StarPUNYANAGARI 24-01-2010

    चेतन भगत यांच्या वास्तवदर्शी कादंबऱ्या… चेतन भगत हे नाव त्यांच्या उल्लेखनीय कादंबऱ्यांमुळे इंग्रजी साहित्यजगतात सुप्रसिद्ध झाले आहे. केवळ लेखक म्हणून पाहण्यापेक्षा भगत यांच्याकडे आज `युथ आयकॉन` म्हणून पाहिले जाते. भगत यांनी भारतातील लहानथोरांना वाचनची आवड लावली आहे. कादंबरीबरोबरच हिंदी, इंग्रजी वर्तमानपत्रातून ते स्तंभलेखन करतात. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर संसदेत चर्चा झाली आहे. आयआयटीमधून पदवी घेतलेले चेतन भगत यांनी इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट बँकिंग करिअर सोडून लेखनाला पूर्ण वेळ दिला आहे. २००९ पासून त्यांनी अक्षरधनाची महती वाचकांपुढे आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीत मांडली आहे. भारताची सद्यस्थिती बदलण्यासाठी काही तरी करणे आवश्यक आहे आणि ते भगत आपल्या लिखाणातून करतात. `वन नाईट अ‍ॅट द कॉल सेंटर` आणि `द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ` या दोन कादंबऱ्या त्यांच्या या हेतूचे सर्वार्थाने समर्थन आणि प्रतिपादन करतात. `द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ` यात उद्योग, व्यवसाय, क्रिकेट आणि धर्म याभोवती गुंफलेली कहाणी आपल्यापुढे उलगडत जाते. तीन मित्रांची ही कथा असून स्वत:च्या इच्छा आकांक्षा आणि स्वप्ने घेऊन ती समाजात स्वत:चे अस्तित्व अधोरेखित करू इच्छितात, परंतु वास्तवात येणाऱ्या संकटांना, अडचणींना तोंड देणे किती अवघड आहे आणि कल्पना तसेच वास्तवात किती फरक आहे हे त्यांना अनुभवातून समजून येते. स्वप्नपूर्तीसाठी ते जीवनाच्या धगीचा सामनाही करतात. तो कसा करतात हे भगत यांच्या `द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ` या पुस्तकातून उलगडते. विलक्षण सहजसोपी लिखाणाची शैली हे भगत यांचे वैशिष्ट्य आहे. ही शैली तशीच ठेवण्यात अनुवादिका सुप्रिया वकील यशस्वी झाल्या आहेत. दोन्ही पुस्तकांची भाषांतरे सुप्रिया वकील यांनी भगत यांच्या शैलीस धक्का न लागेल अशा पद्धतीने केली आहेत. त्यामुळे लेखकाचा हेतू थेट वाचकांपर्यंत पोहोचतो. `वन नाईट अ‍ॅट द कॉल सेंटर` यामध्येही आजच्या भारताची आणि त्यातील युवकांची मनोभूमिका लेखकाने स्पष्ट केली आहे. रेल्वेतील एका रात्रीच्या प्रवासात एका मुलीने सांगितलेली ही कहाणी वाचकांना खिळवून ठेवते आणि आयटी क्षेत्रातल्या वास्तवाचे भान देते. ...Read more

  • Rating StarSAMANA 25-04-2010

    तरुणाईची जीवनशैली… चेतन भगत हे नाव आज ‘युथ आयकॉन’ म्हणून घेतलं जातं. ‘सर्वोच्च खपाच्या इंग्रजी कादंबऱ्यांचे लेखक’ म्हणूनही त्यांच्याकडे हिंदुस्थानी अभिमानानं पाहतात. ‘फाईव्ह पॉर्इंट समवन’ आणि ‘द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ’ अशी त्यांची दोन्ही पुस्तकंगाजली, त्यांची विक्रमी विक्री झाली. या पुस्तकांपाठोपाठ आता त्यांचं तिसरं पुस्तक ‘वन नाईट द कॉल सेंटर’ हे पुस्तक आलं. गाजलं. विक्रमी खपाचं ठरलं. आधीच्या दोन कादंबऱ्यांचा अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला होता. ‘वन नाईट... ’चा अनुवादही सुप्रिया वकील यांनी केलाय. ‘वन नाईट... ’चा विषय, त्यातील अनुभवविश्व, त्यातील जीवन त्यातून निर्माण होणारे प्रश्न, समस्या, त्यातील तारुण्यातील होणारी घुसमट हे सारं आजच्या तरुण वाचकांना आकर्षित करणारं आहे. मुळात चेतन भगत त्यांनी मांडण्याची शैली, भाषाशैली ही साधी, सरळ, वाचकांशी थेट संवाद साधाणारी आहे. अनलंकृत भाषेमुळे त्यात नैसर्गिकता जाणवते. अगदी क्वचितच त्यात उपमा येतात. पण त्याही मजेशीर अन् नेमका आशय व्यक्त करणारी आहेत. उदा. ‘सुयोग्य मुलं ही धोक्यात आलेल्या प्रजातींसारखी दुर्मिळ झाली आहेत’ किंवा ‘मोनालिसाचं चित्र पूर्ण झाल्यावर दा विन्सीच्या चेहऱ्यावर जसा अभिमान फुलला असेल तसेच भाव बक्षीच्या चेहऱ्यावर फुलले होते.’ यातून बक्षीच्या हेतूंबद्दल असणारी साशंकता, त्यातून ध्वनित होणाऱ्या शक्यताही भगत यांनी स्पष्ट केल्या आहेत. ‘कॉल सेंटर’चे विश्व आजच्या तरुणाईला आकर्षित करतंय. पण या कॉल सेंटरचे, त्याच्या कार्यपद्धतीचे, त्याच्या वेळेचे दुष्परिणाम हिंदुस्थानी तरुणपिढीवर कसे विदारक होताहेत याचं अंतर्मुख करणारं चित्रण भगत यांनी अत्यंत परिणामकारकतेनं केलंय. ‘कॉल सेंटर....’चं क्षेत्र स्वीकारलं की प्रथम त्या एजंटसना आपली ‘ओळख’ विसरायला लागते आणि त्यांच्या क्लाएंट्ससाठी नवं नाव, ‘ओळख’ स्वीकारावी लागते. आपलंच व्यक्तिमत्व मारून, केवळ पैशासाठी नवं व्यक्तिमत्व तेही नोकरीच्या कालावधीसाठी घ्यायचं हे भयानक आहे. ही कहाणी सहा तरुण एजंट्सशी संबंधित असली तरीही ती प्रातिनिधिक आहे. राधिका, ईशा, व्रूम, प्रियंका, श्याम, मिलिटरी अंकल आणि त्यांचा बॉस बक्षी अशी आणि त्यांच्याशी संबंधित इतर पात्रं. पण या साऱ्याच पात्रांचे व्यक्तिमत्व भगत यांनी कमालीची सजीव चितारली आहेत. अत्यंत पारदर्शी, स्वाभाविक अन् तरुणाईच्या आयुष्याचं नेमकं चित्रण व्यक्त करणारी आहेत. ‘तुमच्या पाकिटात पैसे असतील तर जग तुम्हाला जरासा मान देतं आणि तुम्हाला श्वासोच्छवास करू देतं.’ हे त्यांचं वास्तव आहे. व्यावहारिक जगातील तरुणाईचं वास्तव! कॉल सेंटरमधील जीवन, तिथलं राजकारण, तरुणाईवर होणारा परिणाम, त्यांच्या प्रेमासारख्या नाजूक भावनांची होणारी शोकांतिका, त्यांच्या आकांक्षांचं पानिपत... यावर तोडगा काढण्यासाठी जो ‘देवा’शी मोबाईलवरचा संवाद या कादंबरीच्या अखेरीस आलाय, त्यात भगत जीवनाचंच तत्त्वज्ञान सांगतात, ‘प्रगती म्हणजे भविष्यासाठी काहीतरी टिकाऊ घडवणं’ आणि शेवटी देवाच्या तोंडून भगत जे सांगतात, ते भरकटलेल्या तरुणाईसाठी अत्यंत महत्त्वाचं! ‘माणसाला यशस्वी होण्यासाठी चार गोष्टी आवश्यक असतात. पहिली मध्यम प्रमाणात बुद्धिमान, दुसरी थोडीफार कल्पकता, तिसरी आत्मविश्वास... यश भरारी घेण्यात असतं, गुरगुटून पडून राहण्यात नाही.’ या कादंबरीची ही मोठीच शिकवण. इतर दोन कादंबऱ्यांप्रमाणेच सुप्रिया वकील यांनी या कादंबरीचा अनुवाद अप्रतिम केलाय. चंद्रमोहन कुलकर्णीचं मुखपृष्ठ कादंबरीच्या आशयाशी सुसंगत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more