* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
    15/01/2022
  • ISBN : 9789391151928
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2022
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 160
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AAISI AKSHARE IS A COLLECTION OF 20 STORIES. MOSTLY CENTERING AROUND WOMEN. A WOMAN IN DIFFERENT SHADES AND COLORS. IN SOME STORIES IS MEEK AND FEEBLE. IN OTHERS SHE IS STRANG-WILLED. A FEW STORIES ALSO SHED A LIGHT ON HER SIGN UNCONVENTIONAL ANGLES. ‘PRATIBIMBA’ STORY THAT PIN-POINTS TO THE STATUS OF WOMAN IN A MALE-ORIENTED SOCIETY. GAURI GRACIOUSLY ASSUMES MAHUA`S DAUGHTER`S MOTHERHOOD. WHY THIS GOOD TURN. THE STORY GARBAGE QUESTIONS THE VALUES OF THE MODERN GIRL. WHAT TRANSPIRES TWEES SHREE & SHWETA AFTER ENGAGEMENT ? IN ‘MUKHAWATA’ JAYANTI EXHIBITS ATTENTION. SEEKING BEHAVIOUR. WHAT IS HER MOTIVE? LIFE IS B`FUL IS A STORY OF THAT STRONG, SUPPORTIVE MOTHER WHO STANDS BY HER AILING, DYING SON`S DECISION. WE MEET SAYARA IN ``MOTHER`S DAY` AND WITNESS HER TRAGIC END MILES AWAY FROM HER HOME! IN EKA WADALACHI WAT ARUNA, THE PROTAGONIST IS BRAVING DEPRESSING SITUATION AT HER WORK A PLACE. DOES SHE WIN? `PAITHANI` ELUCIDATES HUMAN EGOISM AT ITS WORST. ALL IN ALL, THIS JOURNEY INTO THE EVE`S WORLD LEAVES ITS IMPRINTS ON THE MINDS OF THE READER.
मुलीच्या अस्तित्वासाठी सासूला ठार मारणारी महुआ आणि महुआच्या मुलीचं पालकत्व स्वीकारणारी गौरी भेटते ’प्रतिबिंब’मध्ये...तरुण मुलाच्या मृत्यूनंतर एकाकी जीवन जगणार्या अनिताच्या जीवनाला फुटलेल्या पालवीचं दर्शन घडतं ’फ्रायडे इव्हिनिंग’मध्ये...अल्झायमर या रोगाने ठाासलेल्या मीराताई आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वेदना उलगडतात ’यात्रा’मधून...तर ’गार्बेज’ कथा प्रकाश टाकते आजच्या तरुणाईच्या संस्कारांवर...’ओळखपरेड’मध्ये मृत्युशय्येवर असलेल्या आईला परदेशातून बघायला आलेली आणि त्याही परिस्थितीत नातेवाइकांचे टोमणे सहन करावे लागणारी गीता भेटते...यांसारख्या अन्य कथांतून नियती...मानवी मन...नातेसंबंध...सामाजिक परिस्थिती यांची गुंफण करणार्या आणि स्त्रीमनाचा वेध घेणार्या वाचनीय कथांचा संठाह ’ऐसी अक्षरे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #मराठीसाहित्य #कथासंग्रह #ऐसीअक्षरे #मैत्रेयीजोशी #प्रतिबिंब #फ्रायडेइव्हिनिंग #यात्रा #गार्बेज #स्त्रीमुक्ती #ओळखपरेड #मुखवटा #सावररे #एकावादळाचीवाट #पूर्तता #पैठणी #पॅकेज #डिनायल #गोष्टएकाकरानाची #गर्नसीवाचकमंडळ #स्लमगर्लड्रीमिंग #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50% #MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHISAHITYA #KATHASANGRAHA #AAISIAKSHARE #MAITREYEEJOSHI #PRATIBIMBA #FRIDAYEVENING #YATRA #GARBAGE #STRIMUKTI #OLAKHPARED #MUKHAWATA #SAVARRE #EKAVADALACHIWAT #POORTATA #PAITHANI #PACKAGE #DENIAL #GOSHTAEKAKARANACHI #GUERNSEYVACHAKMANDAL #SLUMGIRLDREAMING
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more