* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TWELVE RED HERRINGS
  • Availability : Available
  • Translators : DEODATT KETKAR
  • ISBN : 9789353173005
  • Edition : 1
  • Publishing Year : AUGUST 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 228
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :JEFFREY ARCHER COMBO - 27 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AN IMPRISONED MAN IS CERTAIN THAT HIS SUPPOSED MURDER VICTIM IS VERY MUCH ALIVE . . . A FEMALE DRIVER IS PURSUED RELENTLESSLY BY A MENACING FIGURE IN ANOTHER VEHICLE . . . A YOUNG ARTIST GETS THE BIGGEST BREAK OF HER CAREER . . . A RESTLESS BEAUTY MANAGES THE PERFECT BIRTHDAY CELEBRATION . . . AN ESCAPED IRAQI ON SADDAM HUSSEIN`S DEATH LIST PAYS AN INVOLUNTARY VISIT TO HIS HOMELAND . . . HOW WILL THEY REACT? HOW WOULD YOU? TWELVE RED HERRINGS IS THE THIRD COLLECTION OF IRRESISTIBLE SHORT STORIES FROM MASTER STORYTELLER, JEFFREY ARCHER. CLEVERLY STYLED, WITH RICHLY DRAWN CHARACTERS AND INGENIOUSLY PLOTTED STORY LINES, EACH OF THE TWELVE TALES ENDS WITH A DELIGHTFULLY UNEXPECTED TURN OF EVENTS.
तुरुंगात खितपत पडलेल्या एका कैद्याची खात्री असते की, ज्याच्या खुनाचा त्याच्यावर आरोप आहे, तो माणूस जिवंत आहे... एक चंचल सुंदरी चतुराईनं नवरा आणि नवीन धनिक सावजाकडून वाढदिवसाची भेट मिळवते... वडिलांच्या सांगण्याप्रमाणे नौकानयनपटूने बोटक्लब हाउसला भेट म्हणून दिलेल्या ऐतिहासिक वस्तूचीच चोरी होते... कथा-कादंबरी लेखकाला स्तंभलेखन करणारा त्याचा मित्र भोजनादरम्यान जी कल्पना ऐकवतो त्यावर लेखकाने आधीच कादंबरी लिहिलेली असते... एक धोकादायक वाटणारा माणूस एका महिला-ड्रायव्हरचा हायवेवर पाठलाग करतो... एका तरुण कलावतीला आयुष्यातली सर्वांत मोठी संधी मिळते... चतुर मांडणी, अनोखी व्यक्तिमत्त्वं, कल्पक कथानक आणि अनपेक्षित शेवट असलेल्या बारा कथांचा संग्रह ‘ट्वेल्व्ह रेड हेरिंग्ज.’

No Records Found
No Records Found
Keywords
#ट्वेल्व्हरेडहेरिंग्ज #जेफ्रीआर्चर #डॉदेवदत्तकेतकर #शूटटूकिल #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक # अ‍ॅण्डदेअरबायहँग्जअटेल #दपेंशट #मेकिंगदकट#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक#JEFFREYARCHER #GOVERNMENTLAWYER #JUDGEMENT #TWELVEREDHERRINGS #DRDEVDATTAKETKAR #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50% #SHOOTTOKILL # ANDTHEREBYHANGSATALE #THEPATIENT #MAKINGTHECUT #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA 08-03-2020

    उत्कंठावर्धक कथा... जेफ्री आर्चर हे इंग्रजीतील एक बेस्ट सेलर लेखक. रहस्यमय कादंबऱ्यांबरोबरच त्यांनी कथाही लिहिल्या. त्यांचा ‘ट्वेल्व्ह रेड हेरिंग्ज’ हा कथासंग्रह अनुवादित स्वरूपात वाचकांच्या भेटीला आला आहे. मराठीत अनुवाद केला आहे डॉ. देवदत्त केतकर यंनी. ‘ट्वेल्व्ह रेड हेरिंग्ज’ हा एकूण बारा कथांचा संग्रह आहे. विविध कल्पनांमधून साकारलेल्या या कथा मनुष्य स्वभावाचे विविध नमुने दर्शवणाऱ्या आहेत. ‘करावे तसे...’ या कथेचा निवेदक एका खासगी मालवाहतूक करणाऱ्या कंपनीचा मालक असतो. रोझमेरी ही त्याची दुसरी पत्नी. रोझमेरी आणि निवेदकाचा मित्र जेरेमी यांची ओळख होते आणि त्यांचं अफेअर सुरू होतं. जेव्हा निवेदक हे प्रकरण उघडकीला आणतो, तेव्हा जेरेमी आणि निवेदक यांच्यात हाणामारी होते. त्यात जेरेमी खाली कोसळतो. निवेदक तिथून निघून जातो; पण दुसऱ्या दिवशी त्याला जेरेमीच्या खुनाच्या आरोपावरून अटक होते. रोझमेरीही त्याच्या विरोधात साक्ष देते आणि तो तुरुंगात जातो; मात्र जेरेमीचा मृतदेह पोलिसांनी पाहिलेला नसतो. त्यामुळे जेरेमी जिवंत आहे, असं निवेदकाला राहून राहून वाटत असतं. काही घटना अशा घडतात, की निवेदकाची तुरुंगातून सुटका होते आणि मग एक माजी पोलीस सुपरिंटेंडन्ट आणि एक माजी पोलीस इन्स्पेक्टर यांच्यावर तो जेरेमीला शोधण्याची कामगिरी सोपवतो. त्या दोघांसह निवेदकही त्या कामगिरीत सामील होतो. जेरेमीपर्यंत ते कसे पोचतात, त्याची ही उत्कंठावर्धक कथा आहे. ‘अर्ध्या किमतीत स्वस्त’ ही कथा आहे कॉन्सुला रोझनहाईम या चतुर स्त्रीची. व्हिक्टर रोझनहाईम हा तिचा तिसरा नवरा बडा बँकर असतो. या नवऱ्याकडून भरपूर पैसे उकळून ती पुढचं सावज हेरणार असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून झळकत असतात. तिच्या वाढदिवसानिमित्त कोणतं महागडं गिफ्ट नवऱ्याकडून उकळावं या विचारात ती काही दुकानं पालथी घालते. तिला आवडतो एक हिऱ्यांचा हार. ती तो हार तिच्या नवऱ्याकडून आणि प्रियकराकडून कसा मिळवते, याची ही कथा आहे. ‘डगी मॉर्टिमरचा बाहू’ मधील रॉबर्ट हेन्री केफर्ड (तिसरा) ऊर्फ बॉबला डर्गी मार्टिमरच्या उजव्या बाहूबद्दल समजतं. केंब्रिजच्या विजयी संघात सलग तीन वर्षं आघाडीचा नावाडी म्हणून त्याने स्थान मिळवलेलं असतं. हेलन ही बॉबची मैत्रीण असते. तिच्या वडिलांच्या पबमध्ये बारच्या मागच्या बाजूला डगी मॉर्टिमरच्या बाहूची ब्राँझमध्ये घडवलेली प्रतिकृती असते. युनिव्हर्सिटी बोट क्लबला एखादं स्मृतिचिन्ह दिल्याशिवाय त्याने घरी परतू नये, असं बॉबच्या वडिलांचं सांगणं असतं. डगी मॉर्टिमरच्या बाहूची ब्राँझची प्रतिकृती स्मृतिचिन्ह म्हणून केंब्रिजला द्यावी, असं बॉब ठरवतो आणि त्याप्रमाणे थोड्या प्रयत्नांनी ती प्रतिकृती मिळवतो. केंब्रिजला समारंभपूर्वक स्मृतिचिन्ह म्हणून देतो; पण त्या समारंभानंतर चार्ल्स फॉरेस्टर आणि बोटमन सिडनी फिस्क त्या बाहूला जलसमाधी देतात, हे बॉब चोरून बघतो; पण त्या दोघांना जाब न विचारता तो वृद्ध ऑक्सफर्ड ब्लू हॅरॉल्ड डियरिंग यांना गाठतो आणि त्या दोघांनी त्या बाहूला जलसमाधी का दिली असेल, याचं कारण त्याला डियरिंग यांच्या बोलण्यातून समजतं. ‘वाट चुकू नका’ ही कथा आहे हमीद झेबारी याची. हमीद हा इराकमध्ये सद्दाम हुसेनच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री असतो. एका वर्षी गव्हाचं पीक कमी आलं म्हणून त्याला बडतर्फ करण्यात येतं. इराकमधील एकूण परिस्थिती आणि सद्दामची हुकूमशाही माहीत असल्यामुळे हमीद आपल्या गर्भवती बायकोसह मोठ्या शिताफीने इराकमधून निसटतो. अमेरिकन दूतावासाच्या मदतीने तो अमेरिकेत पोचतो. जाताना त्याने काही गालिचे अमेरिकेत विकण्यासाठी घेतलेले असतात. अमेरिकेत गालिचे विकण्याचा व्यवसाय करत तो स्थिरावतो. तिकडे इराकमध्ये त्याला मृत्युदंडाची शिक्षा फर्मावण्यात आलेली असते. एकदा तो गालिचे घेण्यासाठी इस्तंबूलला गेलेला असतो. विमानाने अमेरिकेला परत येत असताना विमानात बिघाड होतो आणि विमान बगदादला उतरवण्यात येतं. इथे आपल्याला कुणी ओळखलं किंवा आपला पासपोर्ट तपासला गेला तर आपण सद्दामच्या तावडीत सापडणार, या भीतीने हमीद अक्षरश: गर्भगळीत होतो. तो त्याची ही भीती विमानाच्या कॅप्टनजवळ बोलून दाखवतो. सद्दामचा एक अधिकारी हमीदला ओळखतो; पण कॅप्टन आणि विमानातील कर्मचारी हमीदला कसे वाचवतात, त्याची ही कथा आहे. ‘बोगद्यातली दृष्टी’ या कथेचा निवेदक लेखक आहे. त्याच्या एका कादंबरीच्या पूर्वप्रसिद्धीसाठी तो न्यू यॉर्कला गेलेला असतो. त्या वेळी तो तिथे राहणाऱ्या त्याच्या लेखक मित्राकडे डंकनकडे जातो. डंकन त्याच्या डोक्यात असलेल्या नवीन कादंबरीचं कथानक निवेदकाला अगदी रंगून सांगत असतो आणि ते ऐकताना निवेदकाला मात्र काय करावं ते सुचत नसतं; कारण त्या कथानकावर निवेदकाने आधीच कादंबरी लिहिलेली असते. डंकनचं कादंबरीविषयीचं बोलणं आणि निवेदकाची अवस्था, याचं गंमतशीर चित्रण या कथेत केलं गेलं आहे. उपरोल्लेखित कथांप्रमाणेच या संग्रहातील अन्य कथाही जेफ्री आर्चरने आपल्या खास शैलीत रंगवल्या आहेत. डॉ. देवदत्त केतकर यांच्या कुशल अनुवादामुळे या कथांची रंगत आणखी वाढली आहे. या बारा कथांपैकी नऊ कथा सत्य घटनेवर आधारित आहेत. जेफ्री आर्चर यांनी त्या घटनांवर कल्पनेचा साज चढवला आहे. -अंजली पटवर्धन ...Read more

  • Rating StarAnil Udgirkar

    मी सद्य्या हे छानपैकि पुस्तक वाचतोय.जेफ्री आर्चर ह्यांच्या अनेक कादंब-या पेक्षा कथासंग्रह फार वाचनिय आहेत असे माझे मत आहे !

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more