* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: COME ON GET SET GO...
  • Availability : Available
  • Translators : ANJANI NARAVANE
  • ISBN : 9788177665703
  • Edition : 7
  • Publishing Year : AUGUST 2005
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 184
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :ANJANI NARAWANE COMBO SET-22 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ARE YOU INTERESTED TO KNOW ABOUT ` * YOUR RIGHTS WHILE BEING QUESTIONED BY POLICE. * AT THE TIME OF ARREST. * YOUR RIGHTS IN PRISON. * YOUR RIGHTS WITH GOVERNMENT/COURT. * YOUR FUNDAMENTAL HUMAN RIGHTS. -HUMAN RIGHTS- IS ONE OF ITS KIND OF BOOK WHICH ENTAILS ABOUT YOUR BASIC AND FUNDAMENTAL RIGHTS. READ THIS BOOK AND BE AWARE OF YOUR RIGHTS AND HENCEFORTH, FUNCTION AS A MORE RESPONSIBLE AND ACTIVE CITIZEN.
यशस्वी होण्यासाठी, प्रथम काय करू नये, ते शिका. मग काय करावं, ते शिका. हे पुस्तक तुम्हांला तुम्ही खरे कसे आहात, ते उलगडून दाखवतं. खरा यशस्वी माणूस आणि यशस्वी असल्याचं ढोंग करणारा माणूस, ह्यांच्यातला सूक्ष्म फरक हे पुस्तक तुम्हांला सांगतं. हे पुस्तक तुम्हांला स्वत:चा शोध घ्यायला मदत करतं. हे पुस्तक तुम्हांला `सर्वात उत्तम` बनवत नाही, पण ते तुम्हांला `कोणापेक्षाही कमी नाही` असं बनवतं. लोक टीका करतात, तक्रार करतात आणि स्वत:ची कीव करतात. लोक कृत्रिमपणे वागतात, मत्सर करतात, उद्धटपणानं वागतात. लोक बढाया मारतात, त्यांची प्रगती खुंटते आणि सर्वात कमाल म्हणजे, हे सर्व ते कबूल करत नाहीत. हे पुस्तक प्रत्येकाला स्वत:मधील उणिवा स्वीकारून, स्वत:मधे बदल घडवून आणायला प्रेरणा देतं.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #AAPAN AAPLE TANTANAV - EKA CHINTAN #आपण : आपले ताणतणाव : एक चिंतन #SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT #ANJANI NARAVANE #अंजनी नरवणे #SWATI SHAILESH LODHA #चला उठा कामाला लागा! : स्वाती-शैलेश लोढा #COME ON GET SET GO... #CHALA UTHA KAMALA LAGA #हितगूज तणावयुगातील तरुण पिढीशी #HITAGUJ - TANAVYUGATIL TARUN PIDHISHI
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 28-08-2005

    स्वत:मध्ये बदल घडवू इच्छिणाऱ्यांसाठी... कोणत्याही व्यक्तीने पहिल्यांदा स्वत:ला ओळखणे आवश्यक आहे. त्यानंतरच स्वत:च्या अंगभूत गुणांची जाणीव होते. यशस्वी होण्यासाठी जीवनाच्या वाटचालीत पदोपदी संघर्ष करावा लागतो. त्या वेळी निरनिराळ्या तऱ्हेच्या व्यक्ती भटतात. त्यांचे स्वभाव, दुर्गुण यांचा अभ्यास करूनच त्यांच्याशी संवाद साधावा लागतो. व्यक्तीने यशस्वी होण्यासाठी काय करायला पाहिजे, काय शिकायला पाहिजे, लोकांशी वांद कसा साधावा याविषयी पती-पत्नी लेखकांनी दैनंदिन जीवनातील उदाहरणे देऊन अनेक विषय समजावून दिले आहेत. मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद उत्तम झाला आहे. स्वत:मध्ये बदल घडवून आणू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने वाचावे असेच हे पुस्तक आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 21-08-2005

    यशाच्या दिशेने... आज दैनंदिन स्पर्धा, तणाव मिनिटागणिक वाढत आहेत. या तणावांना, स्पर्धेला तोंड देणे सगळ्यांनाच शक्य होते, असे नाही. प्रत्येकजण त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. त्यात काही यशस्वी होतात. काहींना ते जमत नाही. त्यामधून मग नैराश्याचा भवरा निर्माण होतो. या अडचणी मग दैनंदिन वाटचालीत माणसाला अधिकच अडचणीत टाकतात. त्यातून निर्माण होते नकारात्मक मानसिकता. या सर्व अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी गेल्या काही वर्षांत अनेक पुस्तके प्रकाशित होत असून त्यांचा उपयोगही होत आहे. नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे वाटचाल करण्यासाठी माणसाला मार्ग दाखविण्यासाठी ही पुस्तके उपयुक्त ठरत आहेत. याच पठडीतील ‘चला! उठा! कामाला लागा’ या पुस्तकाचा विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल. स्वाती व शैलेश लोढा यांनी इंग्रजीतून लिहिलेल्या या पुस्तकांचा अनुवाद अंजनी नरवणे यांनी केला आहे. दैनंदिन जीवनात बऱ्याचदा आपल्याला काय करावे’ यापेक्षा काय करू नये’ याचा अंदाज येत नाही. कोठे कसे वागावे, बोलण्याच्या पद्धती, आवाजाचा सूर, याचे यथायोग्य ज्ञान नसल्यामुळे माणसे बऱ्याचदा त्यांचा मुद्दा बरोबर असूनही हकनाक अडचणीत येतात. त्यांच्याकडे कोणी लक्षही देत नाही. आत्मविश्वासाचा अभाव, हे त्यामागचे आणखी एक कारण! आपल्याला मिळालेले यश, आपली प्रगती आदी गोष्टी ज्यांत बहुसंख्यांना फारसा रस नसतानाही त्याबद्दलची टिमकी मारणे, बढाया मारणे या गोष्टींमुळे आपण कसे इतरांमध्ये अप्रिय ठरू शकतो. आदी मुद्द्यांचा ऊहापोह ‘चला! उठा!...’ या पुस्तकात नेमकेपणाने करण्यात आला असून आपल्यातील लहान-मोठ्या गुणदोषांचा आरसाच जणू आल्यासमोर येतो. त्यामधून वाचकाला मिळते नवी दृष्टी! तुम्ही स्वत:मधील दोष, आळस झटकून टाका आणि कामाला लागा, असा संदेश देणारे हे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्यात नक्कीच सकारात्मक बदल घडवेल, असा लेखकांनी केलेला दावा निश्चितच अवास्तव वाटत नाही! ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 11-09-2005

    हे पुस्तक तुम्ही वाचलंत तर तुम्ही स्वत:ला समजू शकाल. या पुस्तकावर तुम्ही विचार केलात, तर तुम्ही स्वत:ला आवडू लागाल. तुम्ही तुमच्या मनात हे पुस्तक ठसवलंत, तर तुम्ही स्वत:वर प्रेम करू लागाल. यशस्वी होण्यासाठी तुमचा मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक या पुस्काच्या रूपाने हजर आहे. मूळ इंग्रजी लेखक स्वाती शैलेश लोढा या स्वत:च एक आदर्श आहेत. वयाच्या सतराव्या वर्षीच यांचा पहिला लेख प्रकाशित झाला होता. त्याचा आत्मविश्वास आणि दृढनिश्चय अचंबित करणारा होता. सध्या त्या श्वाश या प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका आणि जोधपूर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अ‍ॅण्ड मॅनेजमेंटच्या कार्यक्रम संचालिका आहेत. शैलेश लोंढा यांचे ‘अ‍ॅन इव्हिनिंग वीथ शैलेश लोढा’ हा व्यंगपूर्ण विनोदी कार्यक्रम जगभरात यशस्वी झाला आहे. हास्य आणि शिक्षण यांचा अनोखा संगम या कार्यक्रमात असतो. तुमच्यापर्यंत अतिशय साध्या आणि ओघवत्या मराठीमध्ये हे पुस्तक आणले आहे. अंजनी नरवणे या गुणी लेखिकेने आणि अर्थातच पब्लिशक आहेत पुण्याचे मेहता पब्लिशिंग हाऊस. संधी ही देवासारखी असते. ती सर्वत्र असते आणि सर्वशक्तिमान असते, यशस्वी होण्यासाठी आपली मनोवृत्ती बदलणे आणि बुद्धीचा पूर्ण उपयोग करणे, असे मित्रत्वाचे सल्ले देणाऱ्या या पुस्तकात यशस्वी होण्यासाठी प्रथम काय करू नये ते शिका. मग काय करावं ते शिका असा थोडा हटके सल्ला दिलेला आहे. यशस्वी व्यक्ती आणि यशस्वीतेचे ढोंग करणारी व्यक्ती यांच्यातील फरक हे पुस्तक उलगडून दाखवते. हे पुस्तक तुम्हाला सर्वांत उत्तम बनवित नाही पण कोणापेक्षाही कमी नाही, असे बनविते. हे पुस्तक प्रत्येकाला स्वत:मधील उणिवा स्वीकारून, स्वत:मध्ये बदल घडवून आणायला प्रेरणा देते. आम्ही एका माणसाला बदलू शकतो, तेव्हा एक जग आम्ही बदललेलं असते. असा स्वाती आणि शैलेश लोढा यांचा विश्वास आहे. ‘काहीच न शिकणारे अयशस्वी, कृत्रिमपणे वागणारे अयशस्वी, दिखाऊ यशस्वी, खरे यशस्वी अशा प्रकारचे वर्गीकरण करून समाजातील विविध पातळीवर कार्यरत असणाऱ्या व्यक्ती आणि खास करून तरुण वर्गांच्या स्वभावाची माहिती यात दिलेली आहे. नकारात्मक स्वभाववैशिष्ट्ये कशी दूर करायची आणि सकारात्मकता अंगी कशी बाळगायची ते उदाहरणांनी समजावून दिलेले आहे. हे पुस्तक आपले व्यक्तिमत्त्व कसे आहे, ते प्रगल्भ करण्यासाठी कोणते उपाय आणि बदल करणे गरजेचे आहे हे अचूक सांगते. सातत्याने प्रयत्न करणारेच पुढे जातात व यशस्वी होतात पण या मिळालेल्या यशातही सातत्य टिकविणे आवश्यक आहे. संधी गुपचुप चालू येत असते. तुमच्या कानांना त्याच्या पावलांचा आवाज ओळखायला शिकवा. आपल्यातील आत्मविश्वास अपयश आले म्हणून कमी होवू देऊ नका. टीका करणे, तक्रार करत राहणे, आत्म-विश्वासाचा अभाव, प्रश्नाचा डोंगर, निष्कारण नकारात्मक वटवट, स्वत:ची सतत किव करणे, अशा सवयी जर तुम्हाला असतील तर वेळीच सावध होण्याचा सल्ला हे पुस्तक देते, कारण या सवयी म्हणजेच तुम्ही. अयशस्वी असयाची लक्षणं आहेत. सर्वार्थाने वेगळे व प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवायला शिकविणारे हे पुस्तक मित्रांनो तुमच्यासाठी नक्कीच एक खजाना आहे. स्वत:शी नव्याने संवाद साधायला लावणार हे पुस्तक सांगते की, ध्येय ही आयुष्याबरोबर मैलाच्या दगडासारखी जात असतात. आपण एकापर्यंत पोचलो की आपली नजर पुढच्या ध्येयाकडे लागते. तुम्ही हे पुस्तक नक्की वाचालच... चला! वाचायला लागा. लेखकाप्रमाणे माझी खात्री आहे की, हे पुस्तक वाचून संपवाल तेव्हा तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त चांगले असाल, हे बदल टिकवून ठेवा... ...Read more

  • Rating StarLOKMAT 17-9-2006

    स्वाती शैलेश लोढा यांच्या ‘कम ऑन - गेट सेट गो’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा अंजनी नरवणे यांनी केलेला हा मराठी अनुवाद आहे. लोढा पतिपत्नी बुद्धिमान, धाडसी आणि उत्साही असून, त्यांनी राजस्थानात ‘स्वाश’ नावाची संस्था स्थापन केली आहे. ही संस्था लोकांमध्ये प्रगी घडवून आणण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देते. त्या कार्यशाळेत गेलेल्या लोकांची मनोवृत्ती व वर्तन यांत लक्षणीय बदल घडून येतात. स्वाती जोधपूर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची कार्यकारी संचालिका आहे. तर स्टेजवर सादर होणारे शैलेशचे व्यंगपूर्ण विनोदी कार्यक्रम देश-परदेशात गाजलेले आहेत. प्रशिक्षणाच्या त्यांच्या अनुभवाचे फलित म्हणजे हे पुस्तक. जीवनात यशस्वी होण्यासाठी काय करावे, हे सांगणारी पुस्तके आहेत; पण हे पुस्तक यशस्वी होण्यासाठी काय करू नये, हे सांगण्यावर भर देते. ते वाचकांना स्वत:मध्ये आमूलाग्र बदल कसा घडवून आणता येईल, यासंदर्भात मार्गदर्शन करते, आत्मशोध घ्यायला प्रवृत्त करते. जीवनाच्या वाटचालीच्या दृष्टीने मौलिक मार्गदर्शन घडवते. जीवनाकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन देते. म्हणूनच ते महत्त्वपूर्ण ठरते. या वेगळ्या विषयावरील विवेचनाची विभागणी सात प्रकरणांमध्ये केली आहे. कोष्टके, रेखाचित्रे, महत्त्वपूर्ण वाक्यांचे स्वतंत्र चौकटीत केलेले उल्लेख यामुळे पुस्तक लक्षवेधी झाले असून, चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या मुखपृष्ठाने त्याचे सौंदर्य वाढले आहे. ‘हे प्रकरण न वाचता पुस्तक वाचू नका’ असे बजाविणाऱ्या प्रस्तावनते दुसऱ्या व्यक्तीचे दोष शोधत न बसता, स्वत:मधील उणिवांचा विचार करावा, असे सुचविले आहे. लेखकाने या पहिल्याच प्रकरणात चार प्रकारच्या लोकांची वैशिष्ट्ये सांगितली आहेत - १) काहीच न शिकणारे अयशस्वी, २) कृत्रिमपणे वागणारे अयशस्वी, ३) दिखाऊ यशस्वी व ४) खरे यशस्वी. दुसऱ्या प्रदीर्घ प्रकरणात ‘अयशस्वी होण्याच्या लायकीचे लोक’ सतत तक्रारी व टीका कसे करीत राहतात, स्वत:ची कीव कशी करतात, त्यांच्या मनात कोणतेही काम करताना ‘लोक काय म्हणतील?’ ही भीती कशी असते, स्वत:च्या अडचणींचे वर्णन करून ते लोकांची सहानुभूती कशी मिळवितात, त्यांच्यामध्ये विश्वासाचा अभाव कसा असतो, ते सतत भूतकाळाबद्दल बोलत कसे राहतात, याचे वर्णन आहे. असे लोक मनातून मत्सरी असतात. ते आळशी असतात, त्यांच्यामध्ये स्वयंनिर्णयाची कुवत नसते. त्यामुळे त्यांची प्रगती होऊ शकत नाही. लेखकाच्या मते, असे अयशस्वी लोक मनाने लाकडी पुतळ्यासारखे असतात. तिसऱ्या प्रकरणात ‘दिखाऊ यशस्वी लोकां’ची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. हे लोक अहंमन्य असतात. ते स्वत:चे यश फुगवून सांगतात आणि इतरांचे यश तुच्छ मानतात. ते आत्मसंतुष्ट असतात आणि त्यांना बढाया मारण्याची सवय असते. त्यामुळे त्यांची प्रगती खुंटते; पण त्यांचे हे दोष सामान्य लोकांच्या लक्षात न आल्याने लोक त्यांना यशस्वी समजत असतात. ‘शिकण्यासाठी दिशानिर्देश’ या चौथ्या प्रकरणात अपयशातून काय शिकता येईल, याबाबतीतील मार्गदर्शन आहे. आपल्यावर दुसऱ्याने टीका केली, तर ते आपल्याला आवडत नाही; पण आपण मात्र सतत दुसऱ्यावर टीका करीत असतो, हे वास्तव आहे. टीका केलीच तर ती सरळपणे व नेमकेपणाने केलेली असावी. तिच्यात कडवटपणा असू नये. कोणाबद्दल तक्रार करायची असेल तर तीही समर्पक शब्दात, अतिशयोक्ती न करता करावी. संशयी वृत्ती सोडून दुसऱ्यावर विश्वास ठेवायला शिकावे. कोणत्याही कामासंदर्भात चालढकल न करता कार्यरत राहावे, अडचणींवर मात करायला शिकावे. बढाया न मारता स्वत:बद्दल वास्तवपूर्ण मत बाळगावे, आत्मसन्मान ठेवावा, आपली जिज्ञासा व सर्जनशीलता वाढवावी. अशा लहानसहान सूचना लेखकाने केल्या आहेत. अशाप्रकारे पहिल्या चार प्रकरणांमध्ये अयशस्वी माणसांचे वर्णन आहे. पाचव्या प्रकरणात मात्र ‘सोप्या भाषेत यश’ म्हणजे काय असते आणि काय नसते, याचे वर्णन आहे. प्रत्येकालाच यशस्वी होण्याची इच्छा असते. सामान्यत: ज्याच्याकडे संपत्ती व कीर्ती आहे, तो यशस्वी असे मानले जाते; पण लेखकाच्या मते, चुकीच्या मार्गाने संपत्ती मिळविणाऱ्याला यशस्वी म्हणणे योग्य नाही. प्रसिद्धीच्या संदर्भातही केवळ गुणवत्ता पुरेशी ठरत नाही. संधी मिळणे, स्वत:ची जाहिरात करता येणे हेही महत्त्वाचे असते. संधी मिळावी म्हणून प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज असते. ‘बदल : सतत चालू राहणारा लढा’ या सहाव्या प्रकरणात यशस्वी होण्यासाठी १) आपली मनोवृत्ती बदलणे - सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आणि २) आपल्या बुद्धीचा पूर्ण उपयोग करणे - आत्मविश्वास व कल्पकता यांचा वापर करणे या दोन गोष्टींची आवश्यकता स्पष्ट केली आहे. ‘यशाच्या दारात’ या शेवटच्या सातव्या प्रकरणात आयुष्याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करता यावा, यश मिळवता यावे म्हणून चिकाटीने प्रयत्न करायला हवेत, मिळालेल्या संधीचा फायदा घेता यायला हवा, उत्साही-आनंदी वृत्ती हवी, थोडी सामाजिक बांधिलकी व आत्मविश्वास हवा, सर्जनशीलता हवी, अशा अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. लेखकाच्या अपेक्षेप्रमाणे खरोखरच हे पुस्तक स्वत:मध्ये बदल घडवून आणायला प्रेरणा देणारे आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने हा अनुवाद प्रसिद्ध केला, त्याबद्दल अभिनंदन! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more