* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: COME ON GET SET GO...
  • Availability : Available
  • Translators : ANJANI NARAVANE
  • ISBN : 9788177665703
  • Edition : 7
  • Publishing Year : AUGUST 2005
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 184
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :ANJANI NARAWANE COMBO SET-22 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ARE YOU INTERESTED TO KNOW ABOUT ` * YOUR RIGHTS WHILE BEING QUESTIONED BY POLICE. * AT THE TIME OF ARREST. * YOUR RIGHTS IN PRISON. * YOUR RIGHTS WITH GOVERNMENT/COURT. * YOUR FUNDAMENTAL HUMAN RIGHTS. -HUMAN RIGHTS- IS ONE OF ITS KIND OF BOOK WHICH ENTAILS ABOUT YOUR BASIC AND FUNDAMENTAL RIGHTS. READ THIS BOOK AND BE AWARE OF YOUR RIGHTS AND HENCEFORTH, FUNCTION AS A MORE RESPONSIBLE AND ACTIVE CITIZEN.
यशस्वी होण्यासाठी, प्रथम काय करू नये, ते शिका. मग काय करावं, ते शिका. हे पुस्तक तुम्हांला तुम्ही खरे कसे आहात, ते उलगडून दाखवतं. खरा यशस्वी माणूस आणि यशस्वी असल्याचं ढोंग करणारा माणूस, ह्यांच्यातला सूक्ष्म फरक हे पुस्तक तुम्हांला सांगतं. हे पुस्तक तुम्हांला स्वत:चा शोध घ्यायला मदत करतं. हे पुस्तक तुम्हांला `सर्र्वांत उत्तम` बनवत नाही, पण ते तुम्हांला `कोणापेक्षाही कमी नाही` असं बनवतं. लोक टीका करतात, तक्रार करतात आणि स्वत:ची कीव करतात. लोक कृत्रिमपणे वागतात, मत्सर करतात, उद्धटपणानं वागतात. लोक बढाया मारतात, त्यांची प्रगती खुंटते आणि सर्र्वांत कमाल म्हणजे, हे सर्व ते कबूल करत नाहीत. हे पुस्तक प्रत्येकाला स्वत:मधील उणिवा स्वीकारून, स्वत:मधे बदल घडवून आणायला प्रेरणा देतं.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #AAPAN AAPLE TANTANAV - EKA CHINTAN #आपण : आपले ताणतणाव : एक चिंतन #SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT #ANJANI NARAVANE #अंजनी नरवणे #SWATI SHAILESH LODHA #चला उठा कामाला लागा! : स्वाती-शैलेश लोढा #COME ON GET SET GO... #CHALA UTHA KAMALA LAGA #हितगूज तणावयुगातील तरुण पिढीशी #HITAGUJ - TANAVYUGATIL TARUN PIDHISHI
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 28-08-2005

    स्वत:मध्ये बदल घडवू इच्छिणाऱ्यांसाठी... कोणत्याही व्यक्तीने पहिल्यांदा स्वत:ला ओळखणे आवश्यक आहे. त्यानंतरच स्वत:च्या अंगभूत गुणांची जाणीव होते. यशस्वी होण्यासाठी जीवनाच्या वाटचालीत पदोपदी संघर्ष करावा लागतो. त्या वेळी निरनिराळ्या तऱ्हेच्या व्यक्ती भटतात. त्यांचे स्वभाव, दुर्गुण यांचा अभ्यास करूनच त्यांच्याशी संवाद साधावा लागतो. व्यक्तीने यशस्वी होण्यासाठी काय करायला पाहिजे, काय शिकायला पाहिजे, लोकांशी वांद कसा साधावा याविषयी पती-पत्नी लेखकांनी दैनंदिन जीवनातील उदाहरणे देऊन अनेक विषय समजावून दिले आहेत. मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद उत्तम झाला आहे. स्वत:मध्ये बदल घडवून आणू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने वाचावे असेच हे पुस्तक आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 21-08-2005

    यशाच्या दिशेने... आज दैनंदिन स्पर्धा, तणाव मिनिटागणिक वाढत आहेत. या तणावांना, स्पर्धेला तोंड देणे सगळ्यांनाच शक्य होते, असे नाही. प्रत्येकजण त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. त्यात काही यशस्वी होतात. काहींना ते जमत नाही. त्यामधून मग नैराश्याचा भवरा निर्माण होतो. या अडचणी मग दैनंदिन वाटचालीत माणसाला अधिकच अडचणीत टाकतात. त्यातून निर्माण होते नकारात्मक मानसिकता. या सर्व अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी गेल्या काही वर्षांत अनेक पुस्तके प्रकाशित होत असून त्यांचा उपयोगही होत आहे. नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे वाटचाल करण्यासाठी माणसाला मार्ग दाखविण्यासाठी ही पुस्तके उपयुक्त ठरत आहेत. याच पठडीतील ‘चला! उठा! कामाला लागा’ या पुस्तकाचा विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल. स्वाती व शैलेश लोढा यांनी इंग्रजीतून लिहिलेल्या या पुस्तकांचा अनुवाद अंजनी नरवणे यांनी केला आहे. दैनंदिन जीवनात बऱ्याचदा आपल्याला काय करावे’ यापेक्षा काय करू नये’ याचा अंदाज येत नाही. कोठे कसे वागावे, बोलण्याच्या पद्धती, आवाजाचा सूर, याचे यथायोग्य ज्ञान नसल्यामुळे माणसे बऱ्याचदा त्यांचा मुद्दा बरोबर असूनही हकनाक अडचणीत येतात. त्यांच्याकडे कोणी लक्षही देत नाही. आत्मविश्वासाचा अभाव, हे त्यामागचे आणखी एक कारण! आपल्याला मिळालेले यश, आपली प्रगती आदी गोष्टी ज्यांत बहुसंख्यांना फारसा रस नसतानाही त्याबद्दलची टिमकी मारणे, बढाया मारणे या गोष्टींमुळे आपण कसे इतरांमध्ये अप्रिय ठरू शकतो. आदी मुद्द्यांचा ऊहापोह ‘चला! उठा!...’ या पुस्तकात नेमकेपणाने करण्यात आला असून आपल्यातील लहान-मोठ्या गुणदोषांचा आरसाच जणू आल्यासमोर येतो. त्यामधून वाचकाला मिळते नवी दृष्टी! तुम्ही स्वत:मधील दोष, आळस झटकून टाका आणि कामाला लागा, असा संदेश देणारे हे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्यात नक्कीच सकारात्मक बदल घडवेल, असा लेखकांनी केलेला दावा निश्चितच अवास्तव वाटत नाही! ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 11-09-2005

    हे पुस्तक तुम्ही वाचलंत तर तुम्ही स्वत:ला समजू शकाल. या पुस्तकावर तुम्ही विचार केलात, तर तुम्ही स्वत:ला आवडू लागाल. तुम्ही तुमच्या मनात हे पुस्तक ठसवलंत, तर तुम्ही स्वत:वर प्रेम करू लागाल. यशस्वी होण्यासाठी तुमचा मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक या पुस्काच्या रूपाने हजर आहे. मूळ इंग्रजी लेखक स्वाती शैलेश लोढा या स्वत:च एक आदर्श आहेत. वयाच्या सतराव्या वर्षीच यांचा पहिला लेख प्रकाशित झाला होता. त्याचा आत्मविश्वास आणि दृढनिश्चय अचंबित करणारा होता. सध्या त्या श्वाश या प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका आणि जोधपूर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अ‍ॅण्ड मॅनेजमेंटच्या कार्यक्रम संचालिका आहेत. शैलेश लोंढा यांचे ‘अ‍ॅन इव्हिनिंग वीथ शैलेश लोढा’ हा व्यंगपूर्ण विनोदी कार्यक्रम जगभरात यशस्वी झाला आहे. हास्य आणि शिक्षण यांचा अनोखा संगम या कार्यक्रमात असतो. तुमच्यापर्यंत अतिशय साध्या आणि ओघवत्या मराठीमध्ये हे पुस्तक आणले आहे. अंजनी नरवणे या गुणी लेखिकेने आणि अर्थातच पब्लिशक आहेत पुण्याचे मेहता पब्लिशिंग हाऊस. संधी ही देवासारखी असते. ती सर्वत्र असते आणि सर्वशक्तिमान असते, यशस्वी होण्यासाठी आपली मनोवृत्ती बदलणे आणि बुद्धीचा पूर्ण उपयोग करणे, असे मित्रत्वाचे सल्ले देणाऱ्या या पुस्तकात यशस्वी होण्यासाठी प्रथम काय करू नये ते शिका. मग काय करावं ते शिका असा थोडा हटके सल्ला दिलेला आहे. यशस्वी व्यक्ती आणि यशस्वीतेचे ढोंग करणारी व्यक्ती यांच्यातील फरक हे पुस्तक उलगडून दाखवते. हे पुस्तक तुम्हाला सर्वांत उत्तम बनवित नाही पण कोणापेक्षाही कमी नाही, असे बनविते. हे पुस्तक प्रत्येकाला स्वत:मधील उणिवा स्वीकारून, स्वत:मध्ये बदल घडवून आणायला प्रेरणा देते. आम्ही एका माणसाला बदलू शकतो, तेव्हा एक जग आम्ही बदललेलं असते. असा स्वाती आणि शैलेश लोढा यांचा विश्वास आहे. ‘काहीच न शिकणारे अयशस्वी, कृत्रिमपणे वागणारे अयशस्वी, दिखाऊ यशस्वी, खरे यशस्वी अशा प्रकारचे वर्गीकरण करून समाजातील विविध पातळीवर कार्यरत असणाऱ्या व्यक्ती आणि खास करून तरुण वर्गांच्या स्वभावाची माहिती यात दिलेली आहे. नकारात्मक स्वभाववैशिष्ट्ये कशी दूर करायची आणि सकारात्मकता अंगी कशी बाळगायची ते उदाहरणांनी समजावून दिलेले आहे. हे पुस्तक आपले व्यक्तिमत्त्व कसे आहे, ते प्रगल्भ करण्यासाठी कोणते उपाय आणि बदल करणे गरजेचे आहे हे अचूक सांगते. सातत्याने प्रयत्न करणारेच पुढे जातात व यशस्वी होतात पण या मिळालेल्या यशातही सातत्य टिकविणे आवश्यक आहे. संधी गुपचुप चालू येत असते. तुमच्या कानांना त्याच्या पावलांचा आवाज ओळखायला शिकवा. आपल्यातील आत्मविश्वास अपयश आले म्हणून कमी होवू देऊ नका. टीका करणे, तक्रार करत राहणे, आत्म-विश्वासाचा अभाव, प्रश्नाचा डोंगर, निष्कारण नकारात्मक वटवट, स्वत:ची सतत किव करणे, अशा सवयी जर तुम्हाला असतील तर वेळीच सावध होण्याचा सल्ला हे पुस्तक देते, कारण या सवयी म्हणजेच तुम्ही. अयशस्वी असयाची लक्षणं आहेत. सर्वार्थाने वेगळे व प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवायला शिकविणारे हे पुस्तक मित्रांनो तुमच्यासाठी नक्कीच एक खजाना आहे. स्वत:शी नव्याने संवाद साधायला लावणार हे पुस्तक सांगते की, ध्येय ही आयुष्याबरोबर मैलाच्या दगडासारखी जात असतात. आपण एकापर्यंत पोचलो की आपली नजर पुढच्या ध्येयाकडे लागते. तुम्ही हे पुस्तक नक्की वाचालच... चला! वाचायला लागा. लेखकाप्रमाणे माझी खात्री आहे की, हे पुस्तक वाचून संपवाल तेव्हा तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त चांगले असाल, हे बदल टिकवून ठेवा... ...Read more

  • Rating StarLOKMAT 17-9-2006

    स्वाती शैलेश लोढा यांच्या ‘कम ऑन - गेट सेट गो’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा अंजनी नरवणे यांनी केलेला हा मराठी अनुवाद आहे. लोढा पतिपत्नी बुद्धिमान, धाडसी आणि उत्साही असून, त्यांनी राजस्थानात ‘स्वाश’ नावाची संस्था स्थापन केली आहे. ही संस्था लोकांमध्ये प्रगी घडवून आणण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देते. त्या कार्यशाळेत गेलेल्या लोकांची मनोवृत्ती व वर्तन यांत लक्षणीय बदल घडून येतात. स्वाती जोधपूर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची कार्यकारी संचालिका आहे. तर स्टेजवर सादर होणारे शैलेशचे व्यंगपूर्ण विनोदी कार्यक्रम देश-परदेशात गाजलेले आहेत. प्रशिक्षणाच्या त्यांच्या अनुभवाचे फलित म्हणजे हे पुस्तक. जीवनात यशस्वी होण्यासाठी काय करावे, हे सांगणारी पुस्तके आहेत; पण हे पुस्तक यशस्वी होण्यासाठी काय करू नये, हे सांगण्यावर भर देते. ते वाचकांना स्वत:मध्ये आमूलाग्र बदल कसा घडवून आणता येईल, यासंदर्भात मार्गदर्शन करते, आत्मशोध घ्यायला प्रवृत्त करते. जीवनाच्या वाटचालीच्या दृष्टीने मौलिक मार्गदर्शन घडवते. जीवनाकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन देते. म्हणूनच ते महत्त्वपूर्ण ठरते. या वेगळ्या विषयावरील विवेचनाची विभागणी सात प्रकरणांमध्ये केली आहे. कोष्टके, रेखाचित्रे, महत्त्वपूर्ण वाक्यांचे स्वतंत्र चौकटीत केलेले उल्लेख यामुळे पुस्तक लक्षवेधी झाले असून, चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या मुखपृष्ठाने त्याचे सौंदर्य वाढले आहे. ‘हे प्रकरण न वाचता पुस्तक वाचू नका’ असे बजाविणाऱ्या प्रस्तावनते दुसऱ्या व्यक्तीचे दोष शोधत न बसता, स्वत:मधील उणिवांचा विचार करावा, असे सुचविले आहे. लेखकाने या पहिल्याच प्रकरणात चार प्रकारच्या लोकांची वैशिष्ट्ये सांगितली आहेत - १) काहीच न शिकणारे अयशस्वी, २) कृत्रिमपणे वागणारे अयशस्वी, ३) दिखाऊ यशस्वी व ४) खरे यशस्वी. दुसऱ्या प्रदीर्घ प्रकरणात ‘अयशस्वी होण्याच्या लायकीचे लोक’ सतत तक्रारी व टीका कसे करीत राहतात, स्वत:ची कीव कशी करतात, त्यांच्या मनात कोणतेही काम करताना ‘लोक काय म्हणतील?’ ही भीती कशी असते, स्वत:च्या अडचणींचे वर्णन करून ते लोकांची सहानुभूती कशी मिळवितात, त्यांच्यामध्ये विश्वासाचा अभाव कसा असतो, ते सतत भूतकाळाबद्दल बोलत कसे राहतात, याचे वर्णन आहे. असे लोक मनातून मत्सरी असतात. ते आळशी असतात, त्यांच्यामध्ये स्वयंनिर्णयाची कुवत नसते. त्यामुळे त्यांची प्रगती होऊ शकत नाही. लेखकाच्या मते, असे अयशस्वी लोक मनाने लाकडी पुतळ्यासारखे असतात. तिसऱ्या प्रकरणात ‘दिखाऊ यशस्वी लोकां’ची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. हे लोक अहंमन्य असतात. ते स्वत:चे यश फुगवून सांगतात आणि इतरांचे यश तुच्छ मानतात. ते आत्मसंतुष्ट असतात आणि त्यांना बढाया मारण्याची सवय असते. त्यामुळे त्यांची प्रगती खुंटते; पण त्यांचे हे दोष सामान्य लोकांच्या लक्षात न आल्याने लोक त्यांना यशस्वी समजत असतात. ‘शिकण्यासाठी दिशानिर्देश’ या चौथ्या प्रकरणात अपयशातून काय शिकता येईल, याबाबतीतील मार्गदर्शन आहे. आपल्यावर दुसऱ्याने टीका केली, तर ते आपल्याला आवडत नाही; पण आपण मात्र सतत दुसऱ्यावर टीका करीत असतो, हे वास्तव आहे. टीका केलीच तर ती सरळपणे व नेमकेपणाने केलेली असावी. तिच्यात कडवटपणा असू नये. कोणाबद्दल तक्रार करायची असेल तर तीही समर्पक शब्दात, अतिशयोक्ती न करता करावी. संशयी वृत्ती सोडून दुसऱ्यावर विश्वास ठेवायला शिकावे. कोणत्याही कामासंदर्भात चालढकल न करता कार्यरत राहावे, अडचणींवर मात करायला शिकावे. बढाया न मारता स्वत:बद्दल वास्तवपूर्ण मत बाळगावे, आत्मसन्मान ठेवावा, आपली जिज्ञासा व सर्जनशीलता वाढवावी. अशा लहानसहान सूचना लेखकाने केल्या आहेत. अशाप्रकारे पहिल्या चार प्रकरणांमध्ये अयशस्वी माणसांचे वर्णन आहे. पाचव्या प्रकरणात मात्र ‘सोप्या भाषेत यश’ म्हणजे काय असते आणि काय नसते, याचे वर्णन आहे. प्रत्येकालाच यशस्वी होण्याची इच्छा असते. सामान्यत: ज्याच्याकडे संपत्ती व कीर्ती आहे, तो यशस्वी असे मानले जाते; पण लेखकाच्या मते, चुकीच्या मार्गाने संपत्ती मिळविणाऱ्याला यशस्वी म्हणणे योग्य नाही. प्रसिद्धीच्या संदर्भातही केवळ गुणवत्ता पुरेशी ठरत नाही. संधी मिळणे, स्वत:ची जाहिरात करता येणे हेही महत्त्वाचे असते. संधी मिळावी म्हणून प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज असते. ‘बदल : सतत चालू राहणारा लढा’ या सहाव्या प्रकरणात यशस्वी होण्यासाठी १) आपली मनोवृत्ती बदलणे - सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आणि २) आपल्या बुद्धीचा पूर्ण उपयोग करणे - आत्मविश्वास व कल्पकता यांचा वापर करणे या दोन गोष्टींची आवश्यकता स्पष्ट केली आहे. ‘यशाच्या दारात’ या शेवटच्या सातव्या प्रकरणात आयुष्याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करता यावा, यश मिळवता यावे म्हणून चिकाटीने प्रयत्न करायला हवेत, मिळालेल्या संधीचा फायदा घेता यायला हवा, उत्साही-आनंदी वृत्ती हवी, थोडी सामाजिक बांधिलकी व आत्मविश्वास हवा, सर्जनशीलता हवी, अशा अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. लेखकाच्या अपेक्षेप्रमाणे खरोखरच हे पुस्तक स्वत:मध्ये बदल घडवून आणायला प्रेरणा देणारे आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने हा अनुवाद प्रसिद्ध केला, त्याबद्दल अभिनंदन! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो