* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: LICENSE TO LIVE:A SEEKER’S JOURNEY TO GREATNESS
  • Availability : Available
  • Translators : SHYAMAL KULKARNI
  • ISBN : 9789387789548
  • Edition : 1
  • Publishing Year : MAY 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 220
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Print Books:
"LICENSE TO LIVE IS AN INSPIRATIONAL THRILLER. IT IS A SEEKERS JOURNEY TOWARDS FINDING GREATNESS WITHIN. THIS WONDERFULLY CRAFTED FABLE IS ABOUT FINDING THE DIRECTION YOU ARE DESTINED TO HEAD IN AND CREATING THE LIFE OF YOUR DREAMS. LICENSE TO LIVE TELLS THE TALE OF A SUCCESSFUL CORPORATE GURU WHO ENROLLS HERSELF IN A SEMINAR BY ONE OF THE FINEST SUCCESS COACHES IN THE WORLD. HIS RADICAL TRAINING METHODS TAKE HER ON A LIFE-CHANGING ODYSSEY. A SEVEN DAY SEMINAR SPREAD OVER THREE COUNTRIES, PUTS HER ONTO A JOURNEY WHERE SHE IS FORCED TO LOOK WITHIN AND BE HER OWN TEACHER AND GUIDE, SOMETHING SHE HAD DONE SO WELL FOR OTHERS BUT MISSED DOING FOR HERSELF. FULL OF WISDOM, WIT AND SPIRITUAL INSIGHTS, YOU COLLECT LESSONS THAT WILL CHANGE THE WAY YOU LEAD YOUR LIFE FOREVER. "
"‘लायसेन्स टु लिव्ह’ ही एक स्फूर्ती देणारी थरारकथा आहे. ज्याला स्वतःची प्रगती करायची आहे, अशा व्यक्तीचा स्वतःमधील मोठेपणाचा शोधप्रवास आहे हा. ज्या दिशेने तुमची प्रगती होण्याचे नियतीने ठरवले आहे ते शोधून आपल्या मनाप्रमाणे हवे ते प्राप्त कसे करता येते, याचे सुंदर वर्णन करणारी ही कथा आहे. एक यशस्वी उद्योजक जगताची शिक्षक योगायोगाने यशाचा मार्ग दाखवणाऱ्या एका जगप्रसिद्ध प्रशिक्षकाने आयोजलेल्या कार्यशाळेत दाखल होते. तेव्हा होणाऱ्या, तिचे आयुष्य संपूर्णपणे बदलून टाकणाऱ्या प्रवासाचे वर्णन या पुस्तकात आहे. सात दिवसांच्या या कार्यशाळेत तिचा प्रवास तीन देशांत होतो. त्या वेळी तिला आत्मशोध घ्यावा लागतो, आत्मपरीक्षण करावे लागते, स्वतःच स्वतःचा गुरू आणि मार्गदर्शक व्हावे लागते. इतरांना तसे वागायला ती उत्तम रीतीने शिकवत असे; पण स्वतःच्या बाबतीत तिने हा मंत्र वापरून पाहिला नव्हता. वाचक तिच्या या प्रवासात सामील होतो आणि अनेक धडे शिकतो. त्याच्या आयुष्यात बदल होण्यास, सतत आत्मपरीक्षण करण्यास तो त्यामुळे उद्युक्त होतो. आपल्या विद्यार्थ्याला जे ज्ञान सर्वांत जास्त आवश्यक आहे, ते त्याला शिकू देईल, शिकवेल तोच खरा शिक्षक. या दृष्टिकोनातून कुर्ट अतिशय उत्तम प्रशिक्षक होता. ‘जगण्याचा परवाना’ हे पुस्तक प्रत्यक्ष वास्तव जगात कसे वावरावे याची माहिती सांगते व त्याच्याआधी जगाच्या वास्तवाची ओळख करून देते. या वास्तव जगात चांगले आणि आणि वाईट यांची बेमालूम सरमिसळ झालेली दिसेल. तसेच समजूतदार, शहाण्या लोकांबरोबरच भ्रमिष्टपणाचे कातडे पांघरलेल्या लोकांचा भरणा सापडेल. तुम्हाला क्षणात योग्य मार्ग सापडेल, तर काही वेळाने तुम्ही भरकटत आहात असे वाटेल. या सर्वांमधून नियतीने तुमच्यासाठी आखलेला मार्ग शोधून काढून तुमची आयुष्याबद्दलची स्वप्ने योग्य प्रकारे प्रत्यक्षात उतरवायची कशी, हे या पुस्तकात सांगितले आहे. तुम्हाला न समजणाऱ्या लोकांबरोबर कसे निभावून न्यायचे, आपल्या नियंत्रणात नसलेल्या पेचप्रसंगांतून कसा मार्ग काढायचा आणि हे करता करता आपण त्यातून कसे प्रगल्भ व्हायचे, हे या पुस्तकावरून समजेल. तुमच्या रोजच्या जीवनातील निवड करताना, निर्णय करताना तुमची अध्यात्मिक वृत्ती त्यात कशी प्रकट होईल, याबद्दल हे पुस्तक आहे. काही वेळा आपल्याला आपले इतरांशी असलेले बंध दिसत नाहीत. आपल्या कृतीचा इतरांवर काय परिणाम होईल याचा आपण बऱ्याच वेळा विचारच केलेला नसतो; पण आपला इतरांशी काहीच संबंध नाही असे समजणे आणि आपल्याच विश्वात मग्न असणे, हे चुकीचे आहे. इतरांच्या दृष्टीने आपण कःपदार्थ आहोत असे समजणे चूक आहे. आपले अस्तित्व, आपल्या कृती इतरांच्या दृष्टीने निश्चित महत्त्वाच्या आहेत "

No Records Found
No Records Found
Keywords
#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%: #LICENSE TO LIVE# PARVANA JAGANYACHA# PRIYA KUMAR# PROF. SHAMAL KULKARNI #‘परवाना जगण्याचा’# प्रिया कुमार# अनुवाद प्रा. श्यामला कुलकर्णी, बोमो : ‘भविष्याचा रखवाला’# जेड– वर्तमानकाळाचा रक्षक # लुईही– भूतकाळाची रक्षक# डेबोरेन्स जंगल# लायसन्स टु लिव्ह#
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 23-12-2018

    प्रियाकुमार यांच्या ‘लायसेन्स टू लिव्ह’ या इंग्लिश पुस्तकाचा हा अनुवाद. उद्योग जगातली एक यशस्वी शिक्षिका यशाचा मार्ग दाखवणाऱ्या एका जगप्रसिद्ध प्रशिक्षकानं आयोजित केलेल्या कार्यशाळेत दाखल होते आणि त्यातून तिचं आयुष्य कसं बदलून जातं त्याची ही कथा. या ्रवासात नायिकेचा आत्मशोध आहे, आत्मपरिक्षण आहे आणि तटस्थपणे केलेलं विश्लेषणही आहे. जीवनाचे पैलू आपले आपल्यालाच कसे सापडत जातात, त्याची ही कहाणी वाचकांनाही एका प्रवासाला नेते. श्यामल कुलकर्णी यांनी अनुवाद केला आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 23-09-2018

    ‘परवाना जगण्याचा’ हे पुस्तक प्रत्यक्ष वास्तव जगात कसे वावरावे, याची माहिती सांगते व त्याच्या आधी जगाच्या वास्तवाची ओळख करून देते. या वास्तव जगात चांगले आणि वाईट याची बेमालूम सरमिसळ झालेली दिसेल तसेच समजूतदार, शहाण्या लोकांबरोबर भ्रमिष्टपणाचे कातडे पाघरलेल्या लोकांचा भरणा सापडेल. तुम्हाला क्षणात योग्य मार्ग सापडेल, तर काही वेळाने तुम्ही भरकटत आहात असे वाटेल. या सर्वांमधून नियतीने तुमच्यासाठी आखलेला मार्ग शोधून काढून तुमची आयुष्याबद्दलची स्वप्ने सापडेल, तर काही वेळाने तुम्ही भरकटत आहात असे वाटेल. या सर्वांमधून नियतीने तुमच्यासाठी आखलेला मार्ग शोधून काढून तुमची आयुष्याबद्दलची स्वप्ने योग्य प्रकारे प्रत्यक्षात उतरवायची कशी, हे या पुस्तकात सांगितले आहे. तुम्हाला न समजणाऱ्या लोकांबरोबर कसे निभावून न्यायचे, आपल्या नियंत्रणात नसलेल्या प्रेचप्रसंगातून कसा मार्ग काढायचा आणि हे करता करता आपण त्यातून कसे प्रगल्भ व्हायचे हे या पुस्तकातून समजेल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more