* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: I IS FOR INFLUENCE
  • Availability : Available
  • Translators : SUDARSHAN ATHAWALE
  • ISBN : 9788184989120
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 328
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
HOW TO USE YOUR BODY LANGUAGE TO IMPRESS PEOPLE AROUND YOU, TO CHANGE THEIR PERSPECTIVE ABOUT YOU ?? IF WE PROVIDE VARIOUS OPTIONS TO CUSTOMERS , WHY THE PERCENTAGE OF ACTUAL PURCHASING FALLS DOWN ?? HOE EVEN 10 RUPEES , INSTEAD OF 50 , COULD CHANGE THE PERSPECTIVE ABOUT ANYTHING IT BELONGS TO ?? SOME PEOPLE POSSES THE ABILITY TO IMPRESS PEOPLE EASILY. THE TACTS AND SKILLS THEY USE , ARE EASILY APPROACHABLE BY OTHERS AS WELL. THIS BOOK, WITH SCIENTIFIC AND THEORETICAL RESEARCH EXCLUDING THE IMAGINATIVE PART, DESCRIBES THE TRUTH IN EASY AND SIMPLE LANGUAGE. THIS POPULAR BOOK NOT ONLY TEACHES THE SECRET OF HOW TO BE THE BEST ; BUT ALSO NARRATES THE TECHNIQUES AND SKILLS FOR, GETTING OUR DESIRED PROMOTION IN CAREER , TO BAG BIG PROJECTS IN BUSINESS, TO GET ALL THE DESIRED THINGS BY WALKING ON A PURE AND LOYAL PATH, AND MANY MORE.
मित्रांना जिंकून घ्यायला, लोकांवर प्रभाव पाडून त्यांचे मनपरिवर्तन करायला देहबोलीचा वापर नेमका कसा करायचा? ग्राहकांना खरेदीचे खूप पर्याय दिले तर प्रत्यक्ष खरेदीची शक्यता कमी का होते? मन वळवण्यासाठी ५० रुपयांपेक्षा १० रुपये कसे परिणामकारक ठरू शकतात? काही लोक दुस-यांवर सहज प्रभाव पाडू शकतात; सहजी त्यांचे मन वळवू शकतात. खरेतर ते पाळत असलेले नियम, वापर करत असलेली तंत्रे; कोणालाही आत्मसात करता येणारी असतात. या पुस्तकात शास्त्रीय संशोधनाच्या ज्ञानसागराचे मंथन करून त्यातील कल्पोकल्पित कथा बाजूला काढून `ख-या सत्या`चे अमृत आपल्यासमोर सहजसोप्या शब्दांत ठेवले आहे. हे पुस्तक लोकांचा विश्वास संपादन करून त्यांना लीलया कसे जिंकायचे याचे रहस्य सांगून थांबत नाही, तर आपल्याला अपेक्षित असणारी नोकरीतील बढती, उद्योगधंद्यातील-व्यवसायातील मोठी व महत्त्वाची कामे कशी मिळवायची, आपल्याला हवे ते, नीतिमत्तेची कास न सोडता पदरात कसे पाडून घ्यायचे, याबद्दलची हमखास यशस्वी होणारी आणि अनुभवाने सिद्ध झालेली तंत्रे शिकवते

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SUTREPRABHAVPADNYACHI #IISFORINFLUENCE #सूत्रेप्रभावपाडण्याची #SELFHELPHEALTH&PERSONALDEVELOPMENT #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUDARSHANATHAWALE #ROBYEUNG "
Customer Reviews
  • Rating StarVYAPARI MITRA MARCH 2018

    ‘आय इज फॉर इन्फ्लुअन्स’ या डॉ. रॉब युंग या लेखकाने इंग्रजी भाषेत लिहिलेल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद सुदर्शन आठवले यांनी केला आहे. मानसशास्त्रज्ञ डॉ. राब युंग उच्च गुणवत्ताधारकांच्या मानसिकतेचा अभ्यास करणारी अधिकारी व्यक्ती म्हणून ते ओळखले जातात. या पस्तकाची मांडणी १२ प्रकरणांमध्ये केली आहे. प्रत्येक प्रकरणात दिलेल्या माहितीचे ‘तात्पर्य काय?’ या प्रश्नांचे उत्तर वाचकांना योग्य जागी मिळावे यासाठी खास चौकटींचा पुस्तकात समावेश केला आहे. लोकांवर आपला प्रभाव पाडणे आणि त्यांचे मन वळविणे यात जास्तीत जास्त सक्षम होण्यासाठीचे उपाय व तंत्रे समर्थपणे आत्मसात करून, त्याचा प्रत्यक्ष व्यवहारात वापर करून यशस्वी होण्याच्या उद्देशाने तुम्ही हे पुस्तक वाचणार असाल तर त्यासाठी तुम्ही ‘नेमके’ काय करायला हवे हे अगदी थोडक्यात, सुस्पष्टपणे अशा चौकटीतून सांगितले आहे. प्रभाव पाडण्याची आणि मन परिवर्तनाची आणखी काही रोजच्या व्यवहारात वापरण्याजोगी तंत्रे पाहिजे असल्यास स्वतंत्रपणे तशा साधनांची यादी शेवटी जोडली आहे. त्याला नाव दिले आहे ‘प्रभाव-साधनांचा संच’ त्यात प्रत्येक प्रकरणातील महत्त्वाचे मुद्दे तर दिले आहेतच. त्याखेरीज काही प्रयोग आणि सरावपद्धती दिल्या आहेत. त्या तुम्ही आत्मसात केल्यास व त्याचा परिणामकारक वापर करून आयुष्यात यशस्वी होणे तुम्हाला अगदी सहजशक्य होईल. हे पुस्तक लोकांचा विश्वास संपादन करून त्यांना लीलया कसे जिंकायचे याचे रहस्य सांगून थांबत नाही, तर आपल्याला अपेक्षित असणारी नोकरीतील बढती, उद्योग व्यवसायातील मोठी व महत्वाची कामे कशी मिळवायची, आपल्याला हवे ते, नीतिमत्तेची कास न सोडता पदरात कसे पाडून घ्यायचे याबद्दलची हमखास यशस्वी होणारी आणि अनुभवाने सिद्ध झालेली तंत्रे शिकवते. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 24-01-2016

    मनपरिवर्तनाची प्रभावी सूत्रे... पाश्चात्य लेखक डॉ. रॉब युंग हे मानसशास्त्रीय लिखाणाबद्दल प्रसिद्ध असून त्यांनी लिहिलेल्या सुमारे २५ पुस्तकांपैकी अनेक पुस्तके बेस्ट सेलर ठरलेली आहेत. त्यांच्या ‘आय इज फॉर इन्फ्युअन्स’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘सूत्रेप्रभाव पाडण्याची!’ या नावाने सुदर्शन आठवले यांनी केलेला आहे. एखाद्याला प्रभावित करून आपले काम कसे करून घ्यावे याचे मानसशास्त्राच्या आधारे केलेले विश्लेषण असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. प्रभाव पाडणे हे एक कौशल्य आहे. काही लोक नैसर्गिकरीत्या प्रभावशाली असतात. तर काही लोक मानसशास्त्रीय पातळीवरील तंत्रकौशल्य विकसित करून सर्वसामान्यंवर प्रभाव पाडतात. मनपरिवर्तन करणे म्हणजे बळजबरी नव्हे. तर समोरच्याला त्याच्याही नकळत आपल्या बाजूला वळवून घेणे. त्यासाठी समोरची व्यक्ती नकारच देऊ शकणार नाही अशी विनंती अथवा मागणी कशी करायची? कोणते शब्द वापरायचे? माणसाच्या मनात सचोटी बाणवण्यासाठी कोणते उपाय करायचे? नीतिमत्तेच्या चौकटीत काटेकोरपणे राहूनही प्रभावशाली कसे बनता येईल याचे मौलिक मार्गदर्शन प्रस्तुत पुस्तकात आहे. बहुसंख्यांचे शहाणपण, देहबोलीचे छुपे संकेत, शब्द आणि प्रतिमा यांचे असाधारण सामथ्र्य, छोट्या कृती मोठी परिणती, कल्पनाशक्तीला आवाहन, मैत्री आणि मेहेरबानी, बक्षिसे देण्याचे दुष्परिणाम, मन वळविण्याच्या परिस्थितीजन्य उपायांचे सामथ्र्य आणि त्वरेने मन वळविण्याची वेगवान तंत्रे अशा नऊ प्रकरणांतून प्रभाव पाडण्याच्या कौशल्यासंबंधी मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून विस्तारपूर्वक ऊहापोह केलेला आहे. पुस्तकातील प्रत्येक प्रकरणात आवश्यक त्या ठीकाणी चौकटीत माहिती देऊन प्रकरणात आलेले मुद्दे आणखी सोपे करून सांगितलेले आहेत. मनपरिवर्तन आणि व्यक्तिमत्व विकास यासाठी पुस्तकात दिलेल्या टिपा आणि युक्त्या या व्यावहारिक पातळीवर उपयुक्त आहेतच, पण घर, कार्यालय आणि परस्परांमधील संबंध या प्रत्येक ठिकाणी उपयोगी पडतील अशा आहेत. मानसशास्त्राच्या अभ्यासकांनी मुद्दाम अभ्यासावे असे हे पुस्तक आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more