* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BUDDHIBALACHA SHREEGANESHA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663853
  • Edition : 5
  • Publishing Year : OCTOBER 2004
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 196
  • Language : MARATHI
  • Category : REFERENCE AND GENERAL
  • Available in Combos :N.R.VADNAP COMBO SET - 5 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A VERY EASY EXPLANATION OF THE CHESS. WHEN I READ THIS BOOK, MANY OF MY AGE OLD CONCEPTIONS WERE ANSWERED AUTOMATICALLY. THIS BOOK PROVIDES THE INFORMATION IN AN INTERESTING WAY. IT EXPLAINS THE VARIOUS WAYS OF PLAYING THIS GAME. IT EXPLAINS THE ROLES OF ALL THE PAWNS SIMPLY AND INTERESTINGLY. THIS GAME WAS BEING PLAYED IN INDIA SINCE LONG. BUT, IT WAS SERIOUSLY NURTURED IN ARABSTAN, IRAN, ETC. IT IS A KNOWN FACT THAT THE MOGUL SARDARS PLAYED THIS GAME USING REAL HUMAN BEINGS IN PLACE OF THE PAWNS. THERE ARE BOOKS WRITTEN IN ENGLISH ON MOSTLY ALL SUBJECTS, FOR ALL LEVELS. EVEN HINDI LANGUAGE COVERS A LOT OF SUBJECTS; BUT ACCORDING TO ME IN MARATHI THIS BOOK IS THE FIRST OF ITS TYPE COVERING THIS TOPIC SO WELL. I HAVE NOT YET COME ACROSS ANY OTHER WONDERFUL, INTERESTING AND INFORMATIVE BOOK LIKE THIS IN MARATHI. I MUST THANK THE AUTHOR FOR SUCH AN INTERESTING PIECE OF WORK. YOU MAY BE AN EXPERT IN CHESS, OR MAY BE A NEWCOMER, YOU MAY BE OLD AND WISE ENOUGH OR MANY BE VERY YOUNG, THIS BOOK WILL SURELY BE THE MOST USEFUL GUIDE FOR YOU.
‘बुद्धिबळ खेळ’ म्हणजे दोन बुद्धिवंतांमधील लढा आहे. बुद्धिबळ खेळ एक श्रमिक कार्य होऊ शकते किंवा बुद्धिबळ खेळ श्रमपरिहारक मौजेची लूट होऊ शकते. तेव्हा बुद्धिबळाचा डाव म्हणजे माणसाच्या मेंदूला उत्तम व्यायाम घडवून त्याचा तल्लखपणा वाढविणारा सोज्ज्वळ करमणुकीचा उच्च प्रकार होय. हे सारे नवोदितांना सहज समजण्यासाठी ‘बुद्धिबळ शिका’ हे खास पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात बुद्धिबळ खेळण्याची तंत्रे व सूत्रे अनेक आकृत्यांनिशी समजावून सांगितली आहेत. खेळाचे नियमही दिले आहेत. प्रत्येक प्रकरणाशेवटी स्वाध्यायासाठी चाचणीप्रश्न टाकले आहेत आणि जिज्ञासू वाचकांना आपापली उत्तरे पडताळून पाहता यावीत, म्हणून अखेरीस त्या सर्व प्रश्नांची उत्तरेही दिली आहेत. कुठलाही खेळ म्हटला, की त्यात करमणूक ही आलीच; परंतु करमणुकीबरोबर बुद्धिचापल्य, मनाची एकाग्रता. सोशिकपणा व तर्कशास्त्राचा योग्य उपयोग या गोष्टीही बुद्धिबळाच्या खेळातून सहज साध्य होतात, हे लक्षात घेतले पाहिजे. हे सारे पाहून ज्यांना हा खेळ शिकण्याची तीव्र इच्छा होते, अशा नवोदितांसाठी किंवा नियमित खेळाडूंसाठी हे मार्गदर्शक पुस्तक तयार केले आहे. त्यांना ते आवडेल आणि उपयुक्त ठरेल, आणि मार्गदर्शक म्हणून नित्य हाताशी ठेवावेसे वाटेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #NRVADNAP #BUDDHIBALSHIKA #DAAV #SHAT #CHALI #GATI #PALLA #MAAT #HUKUM #PARVA #LOPEZ #AAMISH #FRENCHBACHAV #VAJEER #SAPALE #RAJA #AADHARGRANTH #TANTRA #KHEL
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA 29-05-2005

    बुद्धिबळ मार्मिक दिग्दर्शन... बुद्धिबळाचा खेळ हा बैठ्या खेळांचा राजा आहे. बळावर बुद्धी नेहमीच मात करीत आली आहे. विश्वनाथन आनंदने तर या खेळाला भारदस्तपणा आणि झळाळी आणून ठेवली आहे. त्याच्या पाठोपाठ अभिजित कुंटे, कोनेरू हंपी, पी. हरिकृष्णन इ. नावे सहज ठवता येतात. हिंदुस्थानात असेच आणखी ग्रँडमास्टर्स तयार होतील अशी आशा बाळगता येईल. शाळेपासूनच आता या शिकण्याला चालना व प्रोत्साहन मिळाले आहे. विश्वनाथन आनंद तर पाचव्या वर्षापासूनच बुद्धिबळ शिकायला लागला होता. सामान्य मनुष्यही या खेळातून आनंद लुटू पाहतो. या खेळातील अनुभवी आणि जाणकार ना. रा. वडनप यांची बुद्धिबळावर सहा-सात पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. या विषयावर इंग्रजी भाषेत बरीच पुस्तके आहेत, परंतु मराठी भाषेत अशी पुस्तके असण्याचे श्रेय ना. रा. वडनप यांना आहे. या पुस्तकांनी आपली उत्सुकता पूर्ण होते. बुद्धिबळाचा श्रीगणेशा व सुरुवातीच्या चालींना दिशा हे मेहता प्रकाशनाने प्रकाशित केलेले वडनप यांचे पुस्तक होतकरू खेळाडूंसाठी अत्यंत उपयुक्त आहे. बुद्धिबळात सुरुवातीच्या चाली, डाव जिंकण्यासाठी महत्त्वाच्या किती आहेत हे सांगायला नकोच. आपल्या आयुष्यात जशा बालपण, तारुण्य आणि वृद्धत्व या तीन अवस्था आहेत त्याचप्रमाणे आरंभ, मध्य व अंत अशा तीन अवस्था बुद्धिबळात येतात आणि प्रस्तुत पुस्तक सुरुवातीच्या खेळांवर प्रकाशझोत टाकते. या पुस्तकातील पहिल्या भागात बुद्धिबळ पट, दले, खेळाचे नियम व तंत्र इ. गोष्टी आकृत्यांसह संवादरूपाने समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, तर दुसऱ्या भागात संवादविरहित पण सटीप आकृत्यांसह मारामारीचे खास तंत्र, स्वाध्याय पाठ उत्तरांसह दिलेले आहेत. अर्थात, कोणत्याही खेळाप्रमाणे सराव हाच महत्त्वाचा भाग आहे. खेळाडू घरबसल्या या पुस्तकाचा उपयोग सरावासाठी करू शकतील यात शंका नाही. नवव्या शतकात चतुरंगचा हा खेळ इराण, अरब देशांतून युरोपमध्ये पोहोचला. स्पेन, इटली, फ्रान्स व पोर्तुगाल या चार देशांनी या खेळाचा प्रसार केला. त्यांनी काही नियम बदलत या खेळाला आंतरराष्ट्रीय स्वरूप दिले. शह नसतानाही राजा हलणे, राजाला दुर्गाश्रयाची मुभा असणे, प्याद्याची वाटमारी इ. नावीन्यपूर्ण नियमांमुळे हा खेळ आकर्षक बनत गेला. वेगवेगळ्या परिस्थितीत आपली प्रतिक्रिया काय असावी, अंतिम ध्येय नजरेसमोर ठेवून सावधपणे, शांतपणे वाटचाल कशी करावी याचे मार्मिक दिग्दर्शन केल्याने वडनप धन्यवादाला पात्र झाले आहेत. मेहता प्रकाशनाला धन्यवाद देणेही महत्त्वाचे. कारण खेळाकडेही त्यांनी लक्ष पुरविण्याचे धाडस केले आहे. प्रा. रमेश पानसरे यांच्या प्रस्तावनेत या पुस्तकाचे महत्त्व आले आहे. शैलेश मांडरे यांचे मुखपृष्ठ विषयाला धरून आहे. -अशोक नारायण जाधव ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more