DR. SUVARNA NAIK NIMBALKAR

About Author

Birth Date : 21/04/1959


DR. SUVARNA NAIK NIMBALKAR COMPLETED HER POST-GRADUATION IN MARATHI AND SOCIAL SCIENCES. SHE ALSO COMPLETED M.PHIL AND PH. D IN MARATHI. HER BOOKS I.E. ‘SHODH JHADAJHADTICHA’, ‘RANJIT DESAI YANCHE KATHVISHVA’. ‘GAPPA MANTRYANCHYA PATNISHI’, ‘SAMAJKRANTIKARAK RAJARSHI SHAHU MAHARAJ’, ‘DNYANAI SAVITRIBAI PHULE’, ‘BHADRAKALI TARARANI’, ‘MAHARANI YESUBAI’, ‘RAJMATA JIJAUSAHEB’, ‘SHIVPATNI MAHARANI SAIBAI’, ‘KARVEER CHHATRAPATI INDUMATI RANISAHEB’ HAVE BEEN PUBLISHED SO FAR. SHE HAS RECEIVED ‘AKSHARGANDH AWARD’, SHRIPUR, SOLAPUR FOR ‘SHODH JHADAJHADTICHA’, ‘TUKOBA MANDESH AWARD’ FOR ‘DNYANAI SAVITRIBAI PHULE’, ‘AKASHARGAURAV LITERATURE AWARD’ FOR ‘MAHARANI YESUBAI’, ‘D. N. NATU AWARD’- MARATHI SAHITYA PARISHAD PUNE AND ‘MAHARANI TARARANI AWARD’ FOR ‘SHIVPATNI MAHARANI SAIBAI’. SHE ALSO RECEIVED ‘JIJAU RATN AWARD’ FROM MARATHI KRANTI MORCHA, BEED. SHE WORKED FOR TEN YEARS AS A JUDGE OF ‘SAHKAR MAHARSHI CHASHAK- PARAMPARIK LAVANI MAHOTSAV’.

डॉ. सुवर्णा नाईक निंबाळकर यांनी समाजशास्त्र आणि मराठी या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. तसेच मराठी विषयात एम. फिल. आणि पीएच.डी. ही पदवी प्राप्त केली आहे. शोध झाडाझडतीचा, रणजित देसाई यांचे कथाविश्व, गप्पा मंत्र्यांच्या पत्नीशी, समाजक्रांतिकारक राजर्षी शाहू महाराज, ज्ञानाई सावित्रीबाई फुले, भद्रकाली ताराराणी, महाराणी येसूबाई, राजमाता जिजाऊसाहेब, शिवपत्नी महाराणी सईबाई, करवीर छत्रपती इंदुमती राणीसाहेब इ. पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या शोध झाडाझडतीचा या पुस्तकाला श्रीपूर, जि. सोलापूरचा अक्षरगंध पुरस्कार, ज्ञानाई सावित्रीबाई फुलेसाठी तुकोबा माणदेश साहित्य पुरस्कार, महाराणी येसूबाईला सातार्‍याचा अक्षरगौरव साहित्य पुरस्कार, शिवपत्नी महाराणी सईबाईला महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचा दा. ना नातू पुरस्कार, महाराणी ताराराणी पुरस्कार इ. पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. मराठा क्रांती मोर्चा बीड यांच्या जिजाऊ रत्न पुरस्काराने देखील त्यांना सम्मानित करण्यात आले आहे. अकलूज येथील सहकार महर्षी चषक या राज्यस्तरीय पारंपरिक लावणी महोत्सवासाठी दहा वर्षे परीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 7 of 7 total
DNYANAI SAVITRIBAI PHULE Rating Star
Add To Cart INR 250
25 %
OFF
DR. SUVARNA NAIK NIMBALKAR BIRTHDAY ... Rating Star
Add To Cart INR 1500 INR 1125
20 %
OFF
DR. SUVARNA NAIK NIMBALKAR COMBO SET... Rating Star
Add To Cart INR 1500 INR 1200
KARVEER CHHATRAPATI INDUMATI RANISAHEB Rating Star
Add To Cart INR 310
MAHARANI BAYAJABAI SHINDE DAKHKHANCH... Rating Star
Add To Cart INR 280
MAHARANI YESUBAI Rating Star
Add To Cart INR 380
SHIVPATNI MAHARANI SAIBAI Rating Star
Add To Cart INR 280

Shop by

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more