* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GREEN WARS
  • Availability : Available
  • ISBN : 9789353174729
  • Edition : 1
  • Publishing Year : JULY 2020
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 172
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SOCIETY & SOCIAL SCIENCES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHAT IS MORE IMPORTANT, BUILDING A MODERN AIRPORT IN RURAL UTTAR PRADESH OR CONSERVING THE SHRINKING HABITAT OF THE SARUS CRANES? PRODUCING MORE PALM OIL OR PROTECTING THE ORANG-UTAN? DO WE ALLOW THE DESTRUCTION OF PRISTINE FORESTS WITH THEIR RICH FLORA AND FAUNA SO WE CAN GENERATE MUCH-NEEDED HYDEL POWER? A MODERNIZING ECONOMY BRINGS IN ITS WAKE ECOLOGICAL CHALLENGES AND MISPLACED PRIORITIES. DEVELOPMENT, ENVIRONMENT, CONSERVATION, GLOBAL WARMING - WHAT DO THEY MEAN IN REAL TERMS, ON THE GROUND, TO THE PEOPLE THERE? MUST DEVELOPMENT ALWAYS BE IN CONFLICT WITH ENVIRONMENT? COMBINING RIGOROUS RESEARCH WITH THE EXPERIENCED TRAVELLERS EYE FOR PIQUANT STORIES, CONSERVATIONIST AND ENVIRONMENT JOURNALIST BAHAR DUTT CHASES SOME OF THE BIGGEST STORIES OF OUR TIMES. FROM ARUNACHAL PRADESH TO THE ARCTIC, FROM GOA TO GANGOTRI, FROM ILLEGAL MINING TO CLIMATE CHANGE, GREEN WARS JOURNEYS TO SOME OF THE RICHEST WILDERNESS AREAS, AND EXPLORES THE TENSION BETWEEN A DEVELOPING ECONOMY AND SAVING THE PLANET. LUCID, HEART-WARMING AND INTENSELY PERSONAL, THIS IS A BOOK FOR GREEN WARRIORS, YES, BUT EQUALLY FOR THOSE OF US WHO CRAVE BLUE SKIES AND FRESH AIR.
एका पर्यावरण पत्रकार स्त्रीने केलेलं अनुभवकथन म्हणजे ‘ग्रीन वॉर्स.’ पर्यावरण रक्षणाच्या विविध मोहिमांदरम्यान आलेले हे अनुभव आहेत. त्या अनुभवांचं हे तपशीलवार चित्रण आहे. गारुड्यांचं पुनर्वसन, सारस पक्ष्यांना वाचविण्याची मोहीम, सुसरींच्या कमी होणाNया संख्येबाबत अभ्यास, मेघालयातील जंगलतोड थांबविण्यासाठी केलेले प्रयत्न, हुलॉक वानरांसाठी चालवलेलं मुक्तिवेंÂद्र, ‘सरस्वती वन्यजीव अभयारण्य’ वाचविण्यासाठी उघडलेली मोहीम, गोव्यात खाणमाफियांना दिलेली टक्कर, इंडोनेशियातील जंगल आणि ओरंग उटान माकडाचं अस्तित्व जपण्यासाठी केलेले यशस्वी प्रयत्न, हिमनद्या, ग्लोबल वॉर्मिंगसाठी अभ्यासदौरा इ. विविध प्रकारच्या पर्यावरण मोहिमा त्यांनी राबवल्या. तर पर्यावरणाच्या विविध अंगांचा बहार यांनी केलेला अभ्यास, पर्यावरणाच्या त्या त्या प्रश्नातील वंÂगोरे आणि आव्हानं, या समस्यांच्या संदर्भात त्यांना भेटलेली माणसं इत्यादी बाबींबद्दल बहार यांनी वाचकांशी साधलेला हा संवाद मुळातून वाचण्यासारखा आहे. पर्यावरणाच्या विविध बाजू, पर्यावरण आणि विकास या बाबतीत होणारा संघर्ष, पर्यावरणाकडे सत्ताधाNयांचं असलेलं दुर्लक्ष, पर्यावरणाच्या क्षेत्रात शिरलेलं राजकारण, पर्यावरणाच्या Nहासामुळे झालेलं आणि होऊ घातलेलं नुकसान या सगळ्या गोष्टी सामान्य माणसालाही हे पुस्तक वाचून कळतील आणि लोकांमध्ये पर्यावरणाच्या बाबतीत थोडी तरी जागरूकता येईल. तेव्हा पर्यावरणप्रेमींसह सर्वांनी हे पुस्तक अवश्य वाचावं.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #हरितयुद्धे #बहारदत्त #रवीभगवते #गारुडी #शिकारी #सारसपक्षी #हुलॉकवानर #हॉग हरीण #अवतार #खाणमाफिया #जंगल #हिमनद्या #ओरंगउटान #गंगा #पर्यावरण #चंबळ #सुसर #मगर #स्टोरी #वनस्पती #वाघ #प्रदूषण #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50% GREENWARS #BAHARDUTT #CHARMERS #HUNTERS #SARAS #HOOLOCK #HOGDEER #MININGMAFIA #GOA #ORANGUTAN #GANGA #ENVIRONMENT #EKC #POLLUTION #FOREST #DRVELOPMENT #TIGER #CO2
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 15-02-2021

    पर्यावरणाच्या संरक्षणासाठी लढा.. जीवशास्त्रज्ञ आणि पर्यावरण पत्रकार बहार दत्त यांच्या ‘ग्रीन वॉर्स’ पुस्तकाचा रवींद्र भगवते यांनी केलेला मराठी अनुवाद म्हणजे ‘हरित युद्धे’ हे पुस्तक होय. बहार दत्त यांनी विकासाच्या नावाखाली पर्यावरण आणि निसर्गाचा नाश रणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध युद्धच पुकारले होते. या क्षेत्रात धडाडीनं काम करताना बहार दत्त यांनी भारतात आणि परदेशात अनेक स्थळांना भेट देऊन विकास व पर्यावरण यांच्यातील संघर्ष जगासमोर आणला. बहार दत्त यांच्या या धाडसी प्रवासाची चित्तथरारक कहाणी या पुस्तकात वाचायला मिळते. ‘‘गारुडी आणि शिकारी’ या प्रकरणात दिल्लीजवळ असलेल्या गारुड्यांच्या वस्तीत १० वर्षं राहून बहार दत्त यांनी केलेलं अभ्यासपूर्ण संशोधन आणि गारुड्यांच्या पुनर्वसन कार्याची तपशीलवार नोंद आहे. गारुड्यांचं सर्पविषयक ज्ञान वापरून त्यांना सर्पशिक्षक बनवण्याचा प्रयत्न, शंभर गारुड्यांचा वाद्यवृंद बनवून त्याचे देश-विदेशात अनेक कार्यक्रम करणं. त्यांना इतर व्यवसायात प्रस्थापित करण्याचे प्रयत्न इत्यादीचं रोमहर्षक वर्णन वाचायला मिळतं. त्या पुढील प्रकरणात उत्तर प्रदेशातील एटावा जिल्ह्यात विमानतळ बांधण्यासाठी त्या जागेवर सारस पक्षी नाहीत, असं सांगण्यात आलं. तेव्हा बहार दत्त यांनी धोका पत्करून, यंत्रणेविरुद्ध लढा देऊन तो प्रकल्प मागे घ्यायला लावला. याचा रोमहर्षक वृत्तांत आहे. ‘खरी अवतार कहाणी’ या प्रकरणात ओदिसा राज्यातील वेदांत कंपनीच्या बॉक्साइट प्रकल्पाविरोधात तेथील डोंगरिया लढ्यात बहार दत्त यांनी केलेला संघर्ष वाचनीय आहे. अशाच प्रकारे इतर प्रकरणात ‘गोव्यातील बेकायदा खाणी आणि तेथील माफिया’, ‘उत्तराखंड येथील गंगेच्या आणि उपनद्यांच्या भागातील जल-प्रकल्प आणि निसर्गाचा विध्वंस’, ‘हरयाणामधील अभयारण्यातील नामशेष होणारे हॉग हरण’ आणि ‘अरुणाचलमधील दिबांग धरणामुळे ५००० हेक्टर्स जंगलातील जैवविविधतेचा नाश’ याविषयी लिहिलं आहे. ‘मेघालयातील जंगलतोड’, ‘चंबळ नदीतील सुसरींना वाळू माफियांच्या खोदकामापासून वाचवण्याचे प्रयत्न’, आसामच्या अभयारण्यातील हुलॉक वानर’ आणि ‘इंडोनेशियातील नष्ट होत चाललेले ओरांग उटान’ यांच्यावर केलेलं संशोधन आणि ज्ञानवर्धक माहिती पुस्तकात वाचायला मिळते. बहार दत्त यांच्या पुस्तकातील मूळ इंग्रजी निवेदनाची ओघवती शैली रवींद्र भगवते यांनी मराठी अनुवादात कायम राखल्यानं हे पुस्तक खूपच वाचनीय झालं आहे. - रमेश सावंत ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more