* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GREEN WARS
  • Availability : Available
  • Translators : RAVINDRA BHAGAVATE
  • ISBN : 9789353174729
  • Edition : 1
  • Publishing Year : JULY 2020
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 172
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SOCIETY & SOCIAL SCIENCES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHAT IS MORE IMPORTANT, BUILDING A MODERN AIRPORT IN RURAL UTTAR PRADESH OR CONSERVING THE SHRINKING HABITAT OF THE SARUS CRANES? PRODUCING MORE PALM OIL OR PROTECTING THE ORANG-UTAN? DO WE ALLOW THE DESTRUCTION OF PRISTINE FORESTS WITH THEIR RICH FLORA AND FAUNA SO WE CAN GENERATE MUCH-NEEDED HYDEL POWER? A MODERNIZING ECONOMY BRINGS IN ITS WAKE ECOLOGICAL CHALLENGES AND MISPLACED PRIORITIES. DEVELOPMENT, ENVIRONMENT, CONSERVATION, GLOBAL WARMING - WHAT DO THEY MEAN IN REAL TERMS, ON THE GROUND, TO THE PEOPLE THERE? MUST DEVELOPMENT ALWAYS BE IN CONFLICT WITH ENVIRONMENT? COMBINING RIGOROUS RESEARCH WITH THE EXPERIENCED TRAVELLERS EYE FOR PIQUANT STORIES, CONSERVATIONIST AND ENVIRONMENT JOURNALIST BAHAR DUTT CHASES SOME OF THE BIGGEST STORIES OF OUR TIMES. FROM ARUNACHAL PRADESH TO THE ARCTIC, FROM GOA TO GANGOTRI, FROM ILLEGAL MINING TO CLIMATE CHANGE, GREEN WARS JOURNEYS TO SOME OF THE RICHEST WILDERNESS AREAS, AND EXPLORES THE TENSION BETWEEN A DEVELOPING ECONOMY AND SAVING THE PLANET. LUCID, HEART-WARMING AND INTENSELY PERSONAL, THIS IS A BOOK FOR GREEN WARRIORS, YES, BUT EQUALLY FOR THOSE OF US WHO CRAVE BLUE SKIES AND FRESH AIR.
एका पर्यावरण पत्रकार स्त्रीने केलेलं अनुभवकथन म्हणजे ‘ग्रीन वॉर्स.’ पर्यावरण रक्षणाच्या विविध मोहिमांदरम्यान आलेले हे अनुभव आहेत. त्या अनुभवांचं हे तपशीलवार चित्रण आहे. गारुड्यांचं पुनर्वसन, सारस पक्ष्यांना वाचविण्याची मोहीम, सुसरींच्या कमी होणाNया संख्येबाबत अभ्यास, मेघालयातील जंगलतोड थांबविण्यासाठी केलेले प्रयत्न, हुलॉक वानरांसाठी चालवलेलं मुक्तिवेंÂद्र, ‘सरस्वती वन्यजीव अभयारण्य’ वाचविण्यासाठी उघडलेली मोहीम, गोव्यात खाणमाफियांना दिलेली टक्कर, इंडोनेशियातील जंगल आणि ओरंग उटान माकडाचं अस्तित्व जपण्यासाठी केलेले यशस्वी प्रयत्न, हिमनद्या, ग्लोबल वॉर्मिंगसाठी अभ्यासदौरा इ. विविध प्रकारच्या पर्यावरण मोहिमा त्यांनी राबवल्या. तर पर्यावरणाच्या विविध अंगांचा बहार यांनी केलेला अभ्यास, पर्यावरणाच्या त्या त्या प्रश्नातील वंÂगोरे आणि आव्हानं, या समस्यांच्या संदर्भात त्यांना भेटलेली माणसं इत्यादी बाबींबद्दल बहार यांनी वाचकांशी साधलेला हा संवाद मुळातून वाचण्यासारखा आहे. पर्यावरणाच्या विविध बाजू, पर्यावरण आणि विकास या बाबतीत होणारा संघर्ष, पर्यावरणाकडे सत्ताधाNयांचं असलेलं दुर्लक्ष, पर्यावरणाच्या क्षेत्रात शिरलेलं राजकारण, पर्यावरणाच्या Nहासामुळे झालेलं आणि होऊ घातलेलं नुकसान या सगळ्या गोष्टी सामान्य माणसालाही हे पुस्तक वाचून कळतील आणि लोकांमध्ये पर्यावरणाच्या बाबतीत थोडी तरी जागरूकता येईल. तेव्हा पर्यावरणप्रेमींसह सर्वांनी हे पुस्तक अवश्य वाचावं.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #हरितयुद्धे #बहारदत्त #रवीभगवते #गारुडी #शिकारी #सारसपक्षी #हुलॉकवानर #हॉग हरीण #अवतार #खाणमाफिया #जंगल #हिमनद्या #ओरंगउटान #गंगा #पर्यावरण #चंबळ #सुसर #मगर #स्टोरी #वनस्पती #वाघ #प्रदूषण #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50% GREENWARS #BAHARDUTT #CHARMERS #HUNTERS #SARAS #HOOLOCK #HOGDEER #MININGMAFIA #GOA #ORANGUTAN #GANGA #ENVIRONMENT #EKC #POLLUTION #FOREST #DRVELOPMENT #TIGER #CO2
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 15-02-2021

    पर्यावरणाच्या संरक्षणासाठी लढा.. जीवशास्त्रज्ञ आणि पर्यावरण पत्रकार बहार दत्त यांच्या ‘ग्रीन वॉर्स’ पुस्तकाचा रवींद्र भगवते यांनी केलेला मराठी अनुवाद म्हणजे ‘हरित युद्धे’ हे पुस्तक होय. बहार दत्त यांनी विकासाच्या नावाखाली पर्यावरण आणि निसर्गाचा नाश रणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध युद्धच पुकारले होते. या क्षेत्रात धडाडीनं काम करताना बहार दत्त यांनी भारतात आणि परदेशात अनेक स्थळांना भेट देऊन विकास व पर्यावरण यांच्यातील संघर्ष जगासमोर आणला. बहार दत्त यांच्या या धाडसी प्रवासाची चित्तथरारक कहाणी या पुस्तकात वाचायला मिळते. ‘‘गारुडी आणि शिकारी’ या प्रकरणात दिल्लीजवळ असलेल्या गारुड्यांच्या वस्तीत १० वर्षं राहून बहार दत्त यांनी केलेलं अभ्यासपूर्ण संशोधन आणि गारुड्यांच्या पुनर्वसन कार्याची तपशीलवार नोंद आहे. गारुड्यांचं सर्पविषयक ज्ञान वापरून त्यांना सर्पशिक्षक बनवण्याचा प्रयत्न, शंभर गारुड्यांचा वाद्यवृंद बनवून त्याचे देश-विदेशात अनेक कार्यक्रम करणं. त्यांना इतर व्यवसायात प्रस्थापित करण्याचे प्रयत्न इत्यादीचं रोमहर्षक वर्णन वाचायला मिळतं. त्या पुढील प्रकरणात उत्तर प्रदेशातील एटावा जिल्ह्यात विमानतळ बांधण्यासाठी त्या जागेवर सारस पक्षी नाहीत, असं सांगण्यात आलं. तेव्हा बहार दत्त यांनी धोका पत्करून, यंत्रणेविरुद्ध लढा देऊन तो प्रकल्प मागे घ्यायला लावला. याचा रोमहर्षक वृत्तांत आहे. ‘खरी अवतार कहाणी’ या प्रकरणात ओदिसा राज्यातील वेदांत कंपनीच्या बॉक्साइट प्रकल्पाविरोधात तेथील डोंगरिया लढ्यात बहार दत्त यांनी केलेला संघर्ष वाचनीय आहे. अशाच प्रकारे इतर प्रकरणात ‘गोव्यातील बेकायदा खाणी आणि तेथील माफिया’, ‘उत्तराखंड येथील गंगेच्या आणि उपनद्यांच्या भागातील जल-प्रकल्प आणि निसर्गाचा विध्वंस’, ‘हरयाणामधील अभयारण्यातील नामशेष होणारे हॉग हरण’ आणि ‘अरुणाचलमधील दिबांग धरणामुळे ५००० हेक्टर्स जंगलातील जैवविविधतेचा नाश’ याविषयी लिहिलं आहे. ‘मेघालयातील जंगलतोड’, ‘चंबळ नदीतील सुसरींना वाळू माफियांच्या खोदकामापासून वाचवण्याचे प्रयत्न’, आसामच्या अभयारण्यातील हुलॉक वानर’ आणि ‘इंडोनेशियातील नष्ट होत चाललेले ओरांग उटान’ यांच्यावर केलेलं संशोधन आणि ज्ञानवर्धक माहिती पुस्तकात वाचायला मिळते. बहार दत्त यांच्या पुस्तकातील मूळ इंग्रजी निवेदनाची ओघवती शैली रवींद्र भगवते यांनी मराठी अनुवादात कायम राखल्यानं हे पुस्तक खूपच वाचनीय झालं आहे. - रमेश सावंत ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more