* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: A LIFE LESS ORDINARY
  • Availability : Available
  • Translators : MRUNALINI GADKARI
  • ISBN : 9788177669671
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2008
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 152
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHEN SHE WAS VERY YOUNG, BABY HALDER WAS ABANDONED BY HER MOTHER AND LEFT WITH A CRUEL, ABUSIVE FATHER. SHE WAS MARRIED OFF AT TWELVE TO A MAN TWICE HER AGE WHO BEAT HER. AT FOURTEEN, SHE WAS A MOTHER HERSELF. HER EARLY LIFE WAS MARKED BY OVERWHELMING CHALLENGES AND HEARTBREAK UNTIL, EXHAUSTED AND DESPERATE, SHE FLED WITH HER THREE CHILDREN TO DELHI, TO WORK AS A MAID IN SOME OF THE CITY`S WEALTHIEST HOMES. EXPECTED TO SERVE HER EMPLOYERS` EVERY DEMAND, SHE FACED A STAGGERING WORKLOAD THAT OFTEN LEFT HER NO TIME TO CARE FOR HER OWN CHILDREN. BUT SHE NEVER COMPLAINED, FOR SUCH IS THE LOT OF THE POOR IN MODERN-DAY INDIA. WRITTEN WITHOUT A TRACE OF SELF-PITY, A LIFE LESS ORDINARY IS A SHOCKING LOOK DEEP INSIDE A WORLD OF POVERTY AND SUBJUGATION THAT FEW OUTSIDERS KNOW ABOUT—AND AN INSPIRING TRUE STORY OF ONE REMARKABLE WOMAN`S STRENGTH, COURAGE, AND DETERMINATION TO SOAR ABOVE HER CIRCUMSTANCES.
जर तेरा वर्षं पूर्ण होण्यापूर्वीच, सातवीतूनच शाळेला रामराम ठोवूÂन, एका अडाणी, मंदबुद्धी आणि दुप्पट वयाच्या माणसाबरोबर तुझी गाठ बांधली गेली, अंगावर दूध पिणारं एक मूल असतानाच दुसNयाची चाहूल लागली आणि पाहता पाहता तीन मुलांची आई झालीस, पंचविशीतच शरीर आणि मन थकलं असतानाही मुलांसकट दूर एखाद्या अनोळख्या गावी जावं लागलं. पोटासाठी मोलकरणीचं काम करतानाच मुलांची दुखणी, अभ्यास, पैसा ह्यांची सतत काळजी वाहावी लागली आणि असं असतानासुद्धा, स्वत:च्या ह्या धकाधकीच्या आयुष्यात सर्व अडचणींना तोंड देत इथपर्यंत कसे आलो, हे सातवीपर्यंत शिकलेल्या मोडक्यातोडक्या पण अतिशय सरळ भाषेत सांगण्याची जिद्द तुझ्यात असेल, तर सखे, तुझं दुसरं नाव असेल बेबी हालदार. – जिच्या ‘आलो-आंधारि’ ह्या आत्मकथेनं साहित्य-जगतात खळबळ उडवून दिली.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ALO-ANDHARI #ALIFELESSORDINARY #आलोआंधारि #AUTOBIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #MRUNALINIGADKARI #मृणालिनीगडकरी #BABYHALDER "
Customer Reviews
  • Rating Starमहाराष्ट्र टाइम्स २५ फेब्रुवारी २०१८

    अवघ्या १३व्या वर्षी आई झालेली एक मुलगी नवऱ्याच्या छळाला कंटाळून घर सोडते काय...,मोलकरीण म्हणून काम करते काय ...,तिथं पुस्तकांचा सहवास लाभूने ‘बेस्ट सेलर ‘ आत्मचरित्र लिहते काय आणि लेखिका बनते काय , सगळंच अतकर्य ! पण हे प्रत्यक्षात घडले आहे ,आताच्य नामवंत लेखिका बेबी हालदार यांच्या बाबतीत. काश्मीरमध्ये जन्मलेल्या बेबी यांचे जीवन जितके संघर्षमय ,तितकेच प्रेरणादायी आहे वयाच्या चौथ्या वर्षी आई घर सोडून निघून गेली. वडील आणि सावत्र आई यांचा जाच सहन करत बेबी यांचे बालपण गेले . आर्थिक अडचणीमुळे बेबी यांना इयत्ता सहावीत शाळा सोडावी लागली. दुप्पट वयाचा माणसाशी त्यांचे लग्न लावून देण्यात आले .तेराव्या वर्षी त्यांच्या पदरात पहिले मूल होते आणि काही वर्षांतच आणखी दोन मुलांना जन्म दिला . नवराच्या जाचाला कंटाळून एके दिवशी २५ वर्षांची बेबी तीन मुलांसह घराबाहेर पडली . घराबाहेर पडल्यानंतर बेबी यांनी मोलकरीण म्हणून काम स्वीकारले . मुन्शी प्रेमचंद यांचे नातू प्रबोध कुमार यांचाकडे त्या काम करू लागल्या . त्यांनी बेबी यांची पुस्तकांविषयी असणारी आवड हेरली . एके दिवशी त्यांनी बेबी यांच्या हातात तस्लीमा नसरीन यांचे ‘आमार मायेबेला’ हे पुस्तक दिले आणि वही-पेन देत तिलाही लिहण्यास प्रवृत्त केले . इतक्या वर्षं सहन केलेल्या घुसमटीला त्यांनी पानांवर वाट करून दिली आणि त्यांच्या ‘आलो अंधारी’ आत्मचरित्राचा जन्म झाला . प्रबोध कुमार यांनी बेबी यांनी लिहलेल्या लिखाणात थोडया –फार सुधारणा सुचवल्या . त्यानंतर पुस्तक प्रकाशनासाठी धडपड सुरु केली . प्रकाशनानंतर अवघ्या काही महिन्यांतच हे पुस्तक बेस्ट सेलर ठरलं . १२ भारतीय आणि १३ जागतिक भाषांमध्ये ‘आलो अंधारि’ चा अनुवाद करण्यात आला . ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more