* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THEMBHAR PANI ANANT AAKASH
  • Availability : Notify Me
     
  • ISBN : 9788184981087
  • Edition : 2
  • Publishing Year : JUNE 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 312
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS AN INSPIRING BIOGRAPHICAL BOOK BASED ON THE DEVOTION AND ACHIEVEMENTS OF PADMASHRI BHAWARLALAJI JAIN, PIONEER OF DRIP IRRIGATION, TISSUE CULTURE, PEPINS, AGRO FOOD PROCESSING INDUSTRIES LIKE ONION POWDER PLANT, PAPAYA PEPINS, MANGO, BANANA, POMEGRANATE PULP PLANTS AND WHO HAS LED REMARKABLE CONTRIBUTION TO GREEN REVOLUTION OF INDIA, AND FOR UPGRADATION OF ECONOMIC CONDITION OF INDIAN FARMERS THE GOAL ACHIEVED BY MR. JAIN IS HIGHLY INSPIRING TO YOUTH IN AGRICULTURAL AND INDUSTRIAL FIELDS. MR. JAIN IS BORN IN BACKWARD VILLAGE IN KHANDESH, MAHARASHTRA, IN LOWER MIDDLE CLASS FAMILY. HE HAS COMPLETED LAW AND ALSO HAD PASSED IAS. BUT HE DID NOT JOIN THE HIGH POST GOVT. SERVICE, WHICH IS DREAM FOR OTHERS. BUT MR. JAIN HAD STARTED WORKING IN AGRICULTURAL AND INDUSTRIAL FIELDS. HE IS FOUNDER CHAIRMAN OF JAIN GROUP OF INDUSTRIES. WHICH IS SECOND HIGHEST INDUSTRY IN DRIP IRRIGATION IN THE WORLD. E HAS DEVELOPED “JAIN HILLS” AT JALGAON, WHICH IS CONVERSION OF HUNDREDS OF ACRES OF BARREN HILLS INTO GREENERY AND A WORTH PLACE TO VISIT FOR AGRICULTURAL TOURISM. HE HAS CREATED MANY WATER RESERVOIRS, RAIN HARVESTING, PLANTED LAKHS OF TREES, HE HAS STARTED AGRI TRAINING AND RESEARCH INSTITUTES TO GIVE TIME TO TIME GUIDANCE TO FARMERS. HE HAS CREATED CHARITABLE TRUST FOR EDUCATION, MEDICAL AND HEALTH & FOR SOCIAL UP GRADATION FOR PUBLIC AT LARGE. THIS BOOK IS BASED ON HIM AND HIS SOCIO AGRICULTURAL REVOLUTION CONCEPTS AND INDUSTRIOUS NATURE EVEN AT HIS OLD AGE, WHICH IS A LIGHT HOUSE FOR COMING GENERATIONS OF RURAL INDIA.
‘भवरलाल, ही दगडाधोंड्यांची ओसाडी विकत घेऊन तू काय करणार आहेस? या दगडांच्या वांझ शरीरातून काही उगवेल तरी का?’ त्यांच्या मनाने त्यांना जाब विचारला. पण व्यवहारी मनाच्या आत एक सृजनशील अंतर्मन दडले होते. त्याने सांगितले, ‘तू हे करच. कारण केवळ तूच हे करू शकशील. तूच या निकामी पथ्थरातून एक संजीवक स्वप्नशिल्प निर्माण करू शकशील.’ ही संजीवक कहाणी आहे, ओसाडीतून नंदनवन निर्मिणा-या, पाण्याच्या थेंबाथेंबातून जीवन देऊन शेतक-यांना समृद्ध करणा-या, भूमी व भूमिपुत्रांवर प्रेम करणा-या पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन या महापुरुषाची! त्यांनी केलेल्या संघर्षाची. निर्माण केलेल्या वेगळ्या वाटेची. श्रम, बुद्धी, संस्कार आणि निसर्ग प्रेमाच्या महामंत्राची आणि त्यातून निर्माण झालेल्या उत्तुंग यशाची!

No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #सुरेखा शहा #थेंबभर पाणी अनंत आकाश : डॉ. भवरलालजी जैन यांचे चरित्र #THEMBHAR PANI ANANT AAKASH #SUREKHA SHAH #THEMBHAR PANI ANANT AAKASH
Customer Reviews
  • Rating Starश्री. वसंत लक्ष्मण पवार

    नुकतेच आपण लिहिलेला चरित्रग्रंथ ‘थेंबभर पाणी अनंत आकाश’ हा भाऊंच्या जीवनावरील चरित्रग्रंथ वाचून पूर्ण केला. आपल्या समृद्ध भाषेने, नितांत सुंदर श्रद्धेने सदर चरित्रग्रंथ ओतप्रोत भरलेला असून मला तो खूपच भावला. त्यातले अनेक प्रसंग मी पुन्हा पुन्हा वाचलेव त्यातील भावनांशी समरस झालो. आपली दीर्घ वाङमयीन सेवा वाचून मी खूपच प्रभावित झालो. आपल्या वाङमयाचे वाचन जरूर करायचे असा मनोमन आजतरी निश्चय केला आहे. अतिशय स्वच्छ, सुबोध, मनाची पकड घेणारी आपली भाषा मन मोहवून टाकते. समोर बसून गप्पागोष्टी जितक्या सहजतेने होतात, तितकीच सहजता आपल्या लिखानात असल्यामुळे पुस्तक हातातून खाली ठेववत नाही. ही आपली लिखानाची खासियत आहे, असे मला जाणवले. भाऊंचे चरित्र सांगताना आपण अगदी त्यांच्या अंतरंगाचाही वेध घेतलेला दिसतो. त्यामुळे भाऊंचे व्यक्तिमत्त्व हुबेहुब डोळ्यांसमोर साकार होते. त्याशिवायही त्यांच्या एकूण कुटुंबाचा जीवनप्रवास, त्यांची श्रद्धा, त्यांची श्रद्धास्थानं, त्यांचे कुटुंबातील संस्कार, प्रामाणिकपणा यांचेही वर्णन अंतर्मुख करणारे वाटले. त्यामुळे पुस्तक, चरित्रग्रंथ खूप खूप आवडला. भाऊंच्या मातोश्री स्व. गौराबाई यांचा जीवनप्रवास आदर्श मातेचा आहे. एका कुटुंबपद्धती, घरातील कर्ती स्त्री, स्वत:चे दु:ख उरात ठेवून कर्तव्यनिष्ठेने आपली कर्तव्य पार पाडणारी गृहस्वामिनी, सुरुवातीच्या काळात अपत्य विरहाचे दु:ख सोसणारी माता, आप्तेष्ठांवर, शेजाऱ्यापाजाऱ्यांवर मायेची पाखर करणारी माऊली अशी विविध रूपं मातोश्रींची मूर्ती साकारण्यासाठी, त्या माऊलीने किती अनंत खस्ता खाल्ल्या याचे विवेचन वाचून मन दु:खी, कष्टी होते. बऱ्याच वर्षांच्या विरहानंतर या मातेला पुत्रजन्माचा लाभ झाला. त्यांचे पोटी एका असामान्य वक्तित्वाने जन्म घेतला. त्यांच्यावर आईने कष्ट, जिद्द, प्रामाणिकपणा, वेळेचे महत्त्व, परोपकार, समाजाप्रती उत्तरदायीत्व हे संस्कार केले. अगदी अजाणतेपणी खिशात घातलेला ‘भवरा’ परंतु त्याबद्दल कोवळ्या बालकाला केव्हडी कठोर शिक्षा या माऊलीने केली? परंतु त्या शिक्षेच्या मागील उदात्त भाव नेमका बालकानेही समजून घेतला. असे हे कठोर व्रत मातोश्रीने घेतले होते. त्यांच्या मनात ‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा’ अशा आशयाचे विचार होते. परंतु त्यांनी हे देवावर न टाकता त्यासाठी निरक्षिर विवेकाने पावले उचलली. व आज जगासमोर ‘भवरलाल जैन’ हे नाव साकार झाले. त्यासाठी किती अथांग कष्ट, अपरंपार मेहनत, रात्रीचा दिवस केला असेल हे त्यांचे त्यांनाच माहीत. एवढे अलौकिक यश मिळविण्यासाठी त्यामागे नितांत परिश्रमाची आवश्यकता असते. १४-१४ / १६-१६ तास काम, काम आणि काम! तेव्हाच आणि तेव्हाच हे शक्य होते. भाऊंच्या पत्नी कांताबाई यांनीही आपल्या सासूबार्इंच्या पावलावर पाऊल टाकून आदर्श सून, आदर्श माता ही बिरुदं मिळवली. अतिशय अबोल राहून कर्म करीत राहणे हा त्यांचा स्थायी भाव. हा स्थायीभाव पाहून गीतेतील वचनाची आठवण होते. कर्मण्ये वाधिरस्ते, मां फलेशू कदाचन! कर्म करीत राहणे हा माझा धर्म आहे. त्याच्या फळाची अपेक्षा धरली नाही. परंतु असे कर्म करणाऱ्यांनाच प्रभू भरभरून देतात. इतके की त्यांच्या कल्पनेतही नसेल. हा निष्काम कर्मयोगाचा महिमा आहे. भाऊंचा घरातील प्रपंच जसा मोठा, त्यापेक्षाही हजारो पट मोठा प्रपंच भाऊंचा घराबाहेर होता. या मोठ्या प्रपंचासाठी भाऊंना खूप वेळ द्यावा लागला तरी त्या गृहस्वामिनीने चकार शब्द काढला नाही. हे त्यांचे मोठेपण त्यांच्या बद्दलचा आदर द्विगुणीत करते. त्यांच्या संसारवेलीवर चार काश्मिरी गुलाब फुलले. या गुलाबांचा दरवळ आज जगभर पसरला आहे. श्री. अशोक, श्री. अजित, श्री. अतुल व श्री. अनिल ही मुले आणि सौ. ज्योती, सौ. निशा, सौ. शोभना व सौ. डॉ. भावना या भाऊंच्या स्नूषा! या सर्व भाऊंच्या पोटी जन्मलेल्या हिऱ्यांचे कोंदण आहेत. भाऊ व कांताबार्इंनी यांच्यावर सुवर्णसंस्कार केल्यामुळेच एवढे मोठे साम्राज्य ही सर्व तरुण मंडळी प्रामाणिकपणे सांभाळताहेत. भाऊंच्या या पुत्रांच्या संसारवेलीवर उमललेली त्यांची गोंडस, निरागस नातवंड, त्यांच्यासोबतच भाऊ व कांताबार्इंचा फोटो म्हणजे अप्रतिम असा पुष्पगुच्छ! असे हे सर्वांगसुंदर चरित्र वाचून मला खूप खूप आनंद झाला. हे चरित्र वाचून भाऊंची एक सर्वांगसुंदर प्रतिमा माझ्या हृदयपटलावर उमटली आहे व अंतरंगातून त्याचेबद्दल माझ्या हातून एक छोटेसे ‘मानपत्र’ तयार झाले आहे. ...Read more

  • Rating Starआनंद गुप्ते, मुंबई

    अगदी आठवणीने मला पाठवलेली `थेंबभर पाणी अनंत आकाश` या तुमच्या पुस्तकाची प्रत आजच मिळाली. मन:पूर्वक आभार व धन्यवाद. पुस्तकातील सुरवाती-सुरवातीची काही प्रकरणं मी प्रूफांच्या स्वरूपात वाचली होती, तेव्हाच ही भट्टी फर्मास जमणार, अशी कल्पना आलीच होती. आता ांतपणे व्यवस्थित व संपूर्ण वाचेन. कादंबरीचा ढाचा, मांडणी, प्रसंग रंगविण्याची तुमची शैली फारच छान. म्हणजे आमच्या अवधूतच्या भाषेत सांगायचं झाल्यास एकदम `चाबूक!` त्यामुळेच वाचक सतत खिळलेलाच राहतो. पुस्तक खाली ठेवतच नाही. ही कादंबरी यशस्वी होणारच. सिद्धहस्त लेखिका तर तुम्ही आहातच. तुम्हाला तुमच्या पुढच्या लेखनासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा. ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 14-10-2010

    `जोहड‘कार सुरेखा शहा यांनी लिहिलेली `थेंबभर पाणी अनंत आकाश’ ही चरित्रात्मक कादंबरी नवयुवकांना उद्योगधंद्याकडे वळवून आपण जीवनात कसे यशस्वी होऊ शकतो, याची प्रेरणा यातून मिळते. उद्योजक भवरलालजी जैन यांच्या जीवनातील चढउतारांचा आढावा येथे घेण्यात आल आहे. जैनउद्योग समूह, जैन गुरुकुल, जैन इरिगेशन जी जगात आज दुसऱ्या क्रमांकावर आहे तिथंपर्यंत पोहचण्यासाठी त्यांच्यात असलेला आत्मविश्वास, चिकाटी, प्रामाणिकपणा, सामर्थ्य, ध्येयाची आस, कठोर परिश्रम, भव्य कल्पकता, स्वप्नवेडी वृत्ती, अपार जिद्द, अचूक निर्णयक्षमता आदी गुणांमुळे त्यांनी आपल्या व्यवसायाचं शिखर गाठलं आहे. `जहाँ न जाऐ बैलगाडी वहाँ पहुँचे मारवाडी’ या उक्तीप्रमाणे भवरलालजींचे पणजोबा राजस्थानमधील आगोळाईहून जळगावच्या वाघोर नदीच्या काठावर असलेल्या वाकोद या खेड्यात स्थानिक झाले. त्यांच्या जन्माची कहाणी लक्षात रहाण्यासारखी आहे. गौराबाई आणि हिरालाल या दांपत्याला होणारी अपत्ये जगत नव्हती. ९ वेळच्या प्रसव वेदनेनंतर झालेलं दहावं अपत्य जगावं म्हणून आजी जमनाबार्इंनी गावकुसाबाहेर राहणाऱ्या सोनाबार्इंच्या ओटीत झालेल्या मुलाला घातलं. मूल माझं आहे असं तिच्याकडून वदवून घेऊन मापटंभर मीठ देऊन, त्या बाळाला विकत घेतलं. तेच बालक म्हणजे भवरलाल जैन. त्यांच्या लहानपणीच्या काही घटना लेखिकेने नोंदविलेल्या आहेत. लहानपणी भोवरा चोरल्यामुळे आई गौराबार्इंनी फुंकणी तुटेपर्यंत भवरला चोपले होते. गावात चौथीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना पुढील शिक्षणासाठी जळगावात ठेवले. मॅट्रिकनंतर मुंबईला कॉमर्स ग्रॅज्युएट होऊन एल.एल.बी. पूर्ण केले. नंतर एम.पी.एस.सी. परीक्षा पास झाले, तरी वकिली अथवा सरकारी उच्चपदस्थ नोकरी न स्वीकारता जिल्हाधिकारी होण्याची संधी सोडून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मनाचा कल व्ययसायाकडे बदलवण्यामध्ये आई गौराबाई व भिकमचंद जैन यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. जे भारतीय भूमीपुत्रासाठी वरदान ठरले म्हणावे लागेल. भिकमचंद जैन यांना त्याचं जीवन बदलणारा सल्ला दिला. वकिली काय किंवा कलेक्टर काय दुसऱ्याची गुलामगिरीच, त्यापेक्षा मारवाड्याचा बच्चा आहात-व्यवसाय, धंदा करा. या सल्ल्यानुसार तीन पिढ्यांची असणारी सात हजार रुपयांची पुंजी धंद्यासाठी लावली. रॉकेलची एजन्सी घेतली. प्रत्येकाच्या जीवनात कलाटणी मिळते. प्रत्येकाच्या जीवनात कलाटणी मिळते, ती विवाहामुळे. त्यांनी नाशिकच्या सुंदर मुलीला नाकारुन विजापूरच्या कांताबार्इंशी हुंडा न घेता लग्न केलं. नंतर एकदा मुलांच्या तब्येतीमुळे स्वयंपाकाला उशीर झाला. म्हणून दीर रागावले. तेव्हा कुटुंब विभक्त होऊ शकले असते. तेव्हा भवरलाल आपल्या पत्नीला आदरार्थी संबोधन `तुम्ही मोठे व कर्त्या आहात, त्यांना तुम्ही मनातून क्षमा करा’ अशी समजूत घालून त्यांना शांतवलं. अशा बऱ्याच प्रसंगांचं वर्णन वाचायला मिळतं. त्यांनी नंतर खते, बी-बियाणे, पाईप्स, शेती उत्पादने, ट्रॅक्टर्स, स्पेअरपार्टस अशा एजन्सीज घेतल्या. जैन ब्रदर्स प्रख्यात झाले. औद्योगिक विकास साधत असताना, त्यांना आलेल्या बऱ्याच प्रसंगांची नोंद लेखिकेनी घेतली आहे. जगात प्रत्येक पाचवा माणूस खोटा असतो. असं सांगणाऱ्या जॅकहाईम स्पष्टवक्तेला त्यांनी निर्भयपणे उत्तर देऊन, पपई पासून बनवलेल्या पपेनची निर्यात गुणवत्तेने प्रामाणिकपणे केली. अमेरिकेच्या त्या दौऱ्यात थंडी पासून बचाव व्हावा, म्हणून अजाणतेने `मिंक’ चा कोट विकत घेतला. नि:ष्पाप मुक्या प्राण्याची निर्दय हत्या करुन कोट बनवल्याचं कळलं, तेव्हा त्यांनी अहिंसा परमो धर्म न्यायाने वापरायचं सोडून दिलं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या टाळण्यासाङ्गी शेतकऱ्यांनी वर्षातून दोन-तीन पिके घ्यायला हवीत म्हणून मरुभूमी असलेल्या इस्त्रायलमध्ये जाऊन ठिबक सिंचन पध्दतीचा अभ्यास करुन त्यांनी जलक्रांती घडवून आणली. प्रत्येकांनी श्रमप्रतिष्ठा जपली पाहिजे. याचं उदाहरण लेखिकेने चांगल्या पध्दतीने दिले आहे. सायकलसुध्दा नसताना गिऱ्हाईकाला देण्यासाठी भर उन्हात हातात रॉकेलचे कॅन घेऊन ते चालत जात असतं. जैन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, साहित्यिक, धार्मिक, प्रयोगशील, प्रतिभावंतांना त्यांनी मदत केली. आकाशाएवढे उत्तुंग यश मिळवून त्यांचे पाय मात्र शेतात भिजलेल्या मातीवरच राहिले. प्रा. कमलाताई ठकार यांच्या विनंतीने त्यांनी औसा येथील अंध, अपंग आधार केंद्रात वनौषधी उद्यानात ठिबक सिंचन संच घालून दिला. कविवर्य ना.धों. महानोर हे त्यांचे बालपणीचे मित्र. त्यांच्या घरोबाच्या संबंधाच्या आठवणी लेखिकेने विस्ताराने कथन केल्या आहेत. भवरलालजींनी ३ `नि’ चा मंत्र जपला- निर्व्यसनीपणा, नियमितपणा आणि त्यांनी जळगावातील हजार शालेय विद्यार्थ्यांची राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची भेट घडवून आणली. सुरुवातीच्या दिवसात एस्सो रॉकेल डेपोचे व्यवस्थापक नूर मोहम्मद शेख यांचे सहकार्य लाभले. त्यांची स्मृती जपण्यासाठी त्यांनी जळगावात त्यांच्या नावाने उर्दू ज्युनिअर कॉलेज काढले. आत्मकथेतील काही भाग जैन चोरडिया परिवारातील व्यक्तिरेखे भोवती फिरत राहतो, घुटमळत रहातो. काही गोष्टीची दुरुक्ती, पुनरावृत्ती झालेली आहे. चहापानाला सुध्दा विषपान समजणाऱ्या भवरलालजी जैन यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. कॉफर्ड ग्रीड, पद्मश्री पुरस्कार आदिंनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. लाख तर होतच रहातील, पण लाखांचा पोशिंदा होण्याची ताकद, हिंमत ठेवावी असा संदेश देण्यात लेखिका यशस्वी झालेल्या आहेत. -नागेश खमितकर ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more