* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SAMEEPA
  • Availability : Available
  • Translators : SUSHMA LELE
  • ISBN : 9788184988758
  • Edition : 1
  • Publishing Year : OCTOBER 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 200
  • Language : TRANSLATED FROM GUJARATI TO MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
EACH KINGDOM HAS A SUBCULTURE. IT IS THIS SUBCULTURE THAT PRODUCES LITERATURE. THE BOOK SAMIPAA REFLECTS THE DISTRESS OF AN INDIAN WOMAN FROM GUJARATI SUBCULTURE. IT SPEAKS ABOUT HER HONOUR AND PAIN. IT WILL SURELY HELP US TO UNDERSTAND LIFE FROM DIFFERENT PERSPECTIVE, LEAVING US PONDERING OVER THE TRUTHS.
प्रत्येक राज्याची एक उपसंस्कृती असते, त्या त्या उपसंस्कृतीतून वैशिष्ट्यपूर्ण साहित्यनिर्मिती होत असते ‘समीपा’ या कथासंग्रहामध्ये भारतीय स्त्रीची वेदना गुजराती उपसंस्कृतीतून येथे अभिव्यक्त झाली आहे. स्त्रीच्या समान आणि मूलभूत वेदनेचा मूलकंदच येथे धुमारला आहे. गुजराती प्रतिभेचा हा उन्मेष मराठी वाचकास व्यथित आणि हर्षित करील....
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SAMEEPA #SAMEEPA #समीपा #SHORTSTORIES #TRANSLATEDFROMGUJRATITOMARATHI #SUSHMALELE #UNKNOWN "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKSATTA 06-03-2016

    स्त्रीजाणिवेच्या प्रातिनिधिक गुजराती कथांचे संकलन ‘समीपा’ हे सुषमा लेले यांनी अनुवादित केलेले पुस्तक. या पुस्तकाला दिलेला डॉ. द. भि. कुलकर्णी यांचा अभिप्राय पुस्तकाच्या मलपृष्ठावर आढळतो. ‘समीपा’ या कथासंग्रहामध्ये भारतीय स्त्रीची वेदना गुजराती उपसंस्ृतीतून येथे अभिव्यक्त झाली आहे. स्त्रीच्या समान आणि मूलभूत वेदनेचा मूलकंदच येथे धुमारला आहे. गुजराती प्रतिभेचा हा उन्मेष मराठी वाचकास व्यथित आणि हर्षित करील.’’ पुस्तकाचे मुखपृष्ठ गुजराती कठपुतळ्यांच्या खेळाचे आहे; परंतु बाईची कठपुतळी होणे यातील वेदना पोचवण्याचे काम त्या करतात का, हा कळीचा प्रश्न आहे. लेखिकेने मनोगतामध्ये गुजराती भाषा आणि वडोदरा हे कधी परके वाटले नाही असे म्हटले आहे. दोन्ही भाषांवर समान प्रेम आणि आपुलकी असल्याने लेखिकेने हा प्रकल्प आत्मीयतेने राबविला आहे. मनोगतामध्ये त्यांनी गुजराती-मराठी साम्य-भेद सांगितले आहेत. अनुवाद करताना केलेली तारेवरची कसरत त्यांनी नेमक्या शब्दात मांडली आहे. त्यांनी गुजरातीतला गोडवा व माधुर्य अनुवादात टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. सांस्कृतिकदृष्ट्या शब्दांच्या आत दडलेला अर्थ मराठीत आणण्याचा आणि दोन्ही भाषांमधील लिंगभेदाचा फरक अधोरेखित करून मांडण्याचा प्रयत्नही दिसतो. त्यामुळे पुस्तक वाचनीय झाले आहे आणि मराठी स्त्री-साहित्यामध्ये चांगली भरही पडली आहे. मात्र प्रश्न आहे तो असा, की सर्व स्त्रियांमध्ये समान स्त्रीत्व असते असे मानून मनोगतात लेखिका असे म्हणते की,‘भाषेच्या याच लयीत, याच तालात स्त्रीकडे पाहिलं असता बसं दिसून येतं की स्त्री-मग ती शहरी-ग्रामीण, दलित-दलितेतर, गरीब-श्रीमंत किंवा कुठल्याही धर्मगटातील किंवा प्रांतातील असो; तिची मानसिकता, शरीररचना, शारीर अनुभव, समाजाचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे सगळे थोड्याफार फरकाने सारखेच असतात.’ स्त्रीवादी अभ्यासातून आम्हाला असे जाणवले आहे की, ‘सर्व स्त्रिया’,‘आम्ही स्त्रिया’ असे म्हणून सर्व स्त्रियांना एकसाची बनवून बाईपणाचे एकच एक सत्त्व असते असे जेव्हा मांडले जाते, तेव्हा भिन्न प्रदेशांमध्ये स्त्रियांच्या भिन्न मार्गानी सोसण्याच्या तपशिलांवरच बोळा फिरवला जातो. इतकेच नव्हे, तर ‘सर्व स्त्रिया’ असे म्हणणाऱ्यांसमोर उच्चवर्गीय स्त्रियांच प्राधान्याने असल्यास नवल नाही. आजही महाराष्ट्रातील स्त्रीमुक्ती चळवळीत उच्च जातिवर्गातील स्त्रियांचा पुढाकार दिसतो. जर ताराबाई शिंदे, पंडिता रमाबार्इंच्या पुढे जायचे तर दलित, कष्टकरी स्त्रियांचे अनुभव, नेतृत्व आणि त्यांचा कुटुंब, समाजजीवन याविषयीचा विचार व्यक्त व्हायला हवा असे वाटते. यातून भारतीय स्त्री-चळवळीची कुंठितता संपण्याची शक्यता आहे. भारतातील जातीय व वर्गीय विषमतेच्या अगदी गाभ्यापाशी स्त्रीप्रश्न आहे. त्याची तड लावायची तर जातीयवादी राजकारणाचे विश्लेषण करणे, स्त्रियांनी राजकारणात सहभाग घेणे आणि त्यातील पुरुषसत्ताकता उघडकीस आणणे याला पर्याय नाही. स्वायत्त स्त्री-संघटनांचे योगदान मान्य करूनही अनेक अभ्यासक आता भारतातील स्त्री-चळवळीने दलित व कष्टकऱ्यांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालून आपले स्त्री - पुरुष विषमतेविषयीचे विचार मांडावे, कृती करावी असे म्हणू लागले आहेत. असा महाराष्ट्राचा जो सामाजिक व सांस्कृतिक संघर्षाचा वारसा आहे तो वारसा गुजराती साहित्यामध्ये आढळतो का, हा शोध घेतला गेला पाहिजे आणि अनुवादासाठी तशा कथा निवडल्या गेल्या पाहिजेत. अनुवादित कथांचा एक सामाजिक इतिहास व त्या कथा लिहिणाऱ्या लेखकांचा त्यादृष्टिने परिचय देणे महत्त्वाचे आहे. असे झाले तर हे अनुवाद दुपारच्या फावल्यावेळात झोप येण्यापूर्वी वाचून विसरून जाण्याच्या स्वरूपाचे राहणार नाहीत आणि स्त्रीत्वाचे गुजरातसारख्या जवळच्या प्रांतातून आलेले आविष्कार फक्त सोहळ्याच्या रूपात कौतुकस्वरूपात मांडले जाणार नाहीत. लेखिका स्वत: मराठी व गुजराती साहित्याची अभ्यासक आहे. परंतु एकूणच साहित्याच्या अभ्यासात सामाजिक इतिहासाचा अभ्यास केला जात नाही. साहित्याचे वाचन कलावादी पद्धतीने केले जाते. परंतु त्याला चिकित्सक सामाजिक इतिहासाची जोड दिली जात नाही याबद्दल खंत वाटते. असे झाल्यामुळे साहित्याचा अभ्यास हा सभोवती घडणाऱ्या इतर घटनांशी जोडला जात नाही आणि मग साहित्य संमेलनेसुद्धा समारंभाच्या रूपात लाखो रुपये खर्च करून साजरी केली जातात. परंतु खऱ्या प्रश्नांना तोंड फुटत नाही. अनेक स्त्रिया अशा आहेत, की ज्या परित्यक्ता, विधवा असूनही कोणताही पाठिंबा नसताना झगडतात आणि संघर्षमय जगत आपले आयुष्य उभारतात. त्याला तोंड फोडण्याचे काम अशा स्त्री-जाणिवेच्या लेखनामधून झाले पाहिजे. आजच्या घडीला विवाहांत हुंड्याचे वाढते प्रमाण, लग्न मोडणे, लग्नांमध्ये थोडीही जातीय तफावत असली तर विरोध, इतकेच नाही तर हिंसाचाराचे वाढते प्रमाण असे सगळे आजूबाजूला घडत असताना या अनुवादाचे स्वरूप मात्र एखाद्या निर्लेप तरंगणाऱ्या बेटासारखे वाटते असे खेदाने नोंदवावे लागते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more