* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SAMEEPA
  • Availability : Available
  • Translators : SUSHMA LELE
  • ISBN : 9788184988758
  • Edition : 1
  • Publishing Year : OCTOBER 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 200
  • Language : TRANSLATED FROM GUJARATI TO MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
EACH KINGDOM HAS A SUBCULTURE. IT IS THIS SUBCULTURE THAT PRODUCES LITERATURE. THE BOOK SAMIPAA REFLECTS THE DISTRESS OF AN INDIAN WOMAN FROM GUJARATI SUBCULTURE. IT SPEAKS ABOUT HER HONOUR AND PAIN. IT WILL SURELY HELP US TO UNDERSTAND LIFE FROM DIFFERENT PERSPECTIVE, LEAVING US PONDERING OVER THE TRUTHS.
प्रत्येक राज्याची एक उपसंस्कृती असते, त्या त्या उपसंस्कृतीतून वैशिष्ट्यपूर्ण साहित्यनिर्मिती होत असते ‘समीपा’ या कथासंग्रहामध्ये भारतीय स्त्रीची वेदना गुजराती उपसंस्कृतीतून येथे अभिव्यक्त झाली आहे. स्त्रीच्या समान आणि मूलभूत वेदनेचा मूलकंदच येथे धुमारला आहे. गुजराती प्रतिभेचा हा उन्मेष मराठी वाचकास व्यथित आणि हर्षित करील....
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SAMEEPA #SAMEEPA #समीपा #SHORTSTORIES #TRANSLATEDFROMGUJRATITOMARATHI #SUSHMALELE #UNKNOWN "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKSATTA 06-03-2016

    स्त्रीजाणिवेच्या प्रातिनिधिक गुजराती कथांचे संकलन ‘समीपा’ हे सुषमा लेले यांनी अनुवादित केलेले पुस्तक. या पुस्तकाला दिलेला डॉ. द. भि. कुलकर्णी यांचा अभिप्राय पुस्तकाच्या मलपृष्ठावर आढळतो. ‘समीपा’ या कथासंग्रहामध्ये भारतीय स्त्रीची वेदना गुजराती उपसंस्ृतीतून येथे अभिव्यक्त झाली आहे. स्त्रीच्या समान आणि मूलभूत वेदनेचा मूलकंदच येथे धुमारला आहे. गुजराती प्रतिभेचा हा उन्मेष मराठी वाचकास व्यथित आणि हर्षित करील.’’ पुस्तकाचे मुखपृष्ठ गुजराती कठपुतळ्यांच्या खेळाचे आहे; परंतु बाईची कठपुतळी होणे यातील वेदना पोचवण्याचे काम त्या करतात का, हा कळीचा प्रश्न आहे. लेखिकेने मनोगतामध्ये गुजराती भाषा आणि वडोदरा हे कधी परके वाटले नाही असे म्हटले आहे. दोन्ही भाषांवर समान प्रेम आणि आपुलकी असल्याने लेखिकेने हा प्रकल्प आत्मीयतेने राबविला आहे. मनोगतामध्ये त्यांनी गुजराती-मराठी साम्य-भेद सांगितले आहेत. अनुवाद करताना केलेली तारेवरची कसरत त्यांनी नेमक्या शब्दात मांडली आहे. त्यांनी गुजरातीतला गोडवा व माधुर्य अनुवादात टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. सांस्कृतिकदृष्ट्या शब्दांच्या आत दडलेला अर्थ मराठीत आणण्याचा आणि दोन्ही भाषांमधील लिंगभेदाचा फरक अधोरेखित करून मांडण्याचा प्रयत्नही दिसतो. त्यामुळे पुस्तक वाचनीय झाले आहे आणि मराठी स्त्री-साहित्यामध्ये चांगली भरही पडली आहे. मात्र प्रश्न आहे तो असा, की सर्व स्त्रियांमध्ये समान स्त्रीत्व असते असे मानून मनोगतात लेखिका असे म्हणते की,‘भाषेच्या याच लयीत, याच तालात स्त्रीकडे पाहिलं असता बसं दिसून येतं की स्त्री-मग ती शहरी-ग्रामीण, दलित-दलितेतर, गरीब-श्रीमंत किंवा कुठल्याही धर्मगटातील किंवा प्रांतातील असो; तिची मानसिकता, शरीररचना, शारीर अनुभव, समाजाचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे सगळे थोड्याफार फरकाने सारखेच असतात.’ स्त्रीवादी अभ्यासातून आम्हाला असे जाणवले आहे की, ‘सर्व स्त्रिया’,‘आम्ही स्त्रिया’ असे म्हणून सर्व स्त्रियांना एकसाची बनवून बाईपणाचे एकच एक सत्त्व असते असे जेव्हा मांडले जाते, तेव्हा भिन्न प्रदेशांमध्ये स्त्रियांच्या भिन्न मार्गानी सोसण्याच्या तपशिलांवरच बोळा फिरवला जातो. इतकेच नव्हे, तर ‘सर्व स्त्रिया’ असे म्हणणाऱ्यांसमोर उच्चवर्गीय स्त्रियांच प्राधान्याने असल्यास नवल नाही. आजही महाराष्ट्रातील स्त्रीमुक्ती चळवळीत उच्च जातिवर्गातील स्त्रियांचा पुढाकार दिसतो. जर ताराबाई शिंदे, पंडिता रमाबार्इंच्या पुढे जायचे तर दलित, कष्टकरी स्त्रियांचे अनुभव, नेतृत्व आणि त्यांचा कुटुंब, समाजजीवन याविषयीचा विचार व्यक्त व्हायला हवा असे वाटते. यातून भारतीय स्त्री-चळवळीची कुंठितता संपण्याची शक्यता आहे. भारतातील जातीय व वर्गीय विषमतेच्या अगदी गाभ्यापाशी स्त्रीप्रश्न आहे. त्याची तड लावायची तर जातीयवादी राजकारणाचे विश्लेषण करणे, स्त्रियांनी राजकारणात सहभाग घेणे आणि त्यातील पुरुषसत्ताकता उघडकीस आणणे याला पर्याय नाही. स्वायत्त स्त्री-संघटनांचे योगदान मान्य करूनही अनेक अभ्यासक आता भारतातील स्त्री-चळवळीने दलित व कष्टकऱ्यांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालून आपले स्त्री - पुरुष विषमतेविषयीचे विचार मांडावे, कृती करावी असे म्हणू लागले आहेत. असा महाराष्ट्राचा जो सामाजिक व सांस्कृतिक संघर्षाचा वारसा आहे तो वारसा गुजराती साहित्यामध्ये आढळतो का, हा शोध घेतला गेला पाहिजे आणि अनुवादासाठी तशा कथा निवडल्या गेल्या पाहिजेत. अनुवादित कथांचा एक सामाजिक इतिहास व त्या कथा लिहिणाऱ्या लेखकांचा त्यादृष्टिने परिचय देणे महत्त्वाचे आहे. असे झाले तर हे अनुवाद दुपारच्या फावल्यावेळात झोप येण्यापूर्वी वाचून विसरून जाण्याच्या स्वरूपाचे राहणार नाहीत आणि स्त्रीत्वाचे गुजरातसारख्या जवळच्या प्रांतातून आलेले आविष्कार फक्त सोहळ्याच्या रूपात कौतुकस्वरूपात मांडले जाणार नाहीत. लेखिका स्वत: मराठी व गुजराती साहित्याची अभ्यासक आहे. परंतु एकूणच साहित्याच्या अभ्यासात सामाजिक इतिहासाचा अभ्यास केला जात नाही. साहित्याचे वाचन कलावादी पद्धतीने केले जाते. परंतु त्याला चिकित्सक सामाजिक इतिहासाची जोड दिली जात नाही याबद्दल खंत वाटते. असे झाल्यामुळे साहित्याचा अभ्यास हा सभोवती घडणाऱ्या इतर घटनांशी जोडला जात नाही आणि मग साहित्य संमेलनेसुद्धा समारंभाच्या रूपात लाखो रुपये खर्च करून साजरी केली जातात. परंतु खऱ्या प्रश्नांना तोंड फुटत नाही. अनेक स्त्रिया अशा आहेत, की ज्या परित्यक्ता, विधवा असूनही कोणताही पाठिंबा नसताना झगडतात आणि संघर्षमय जगत आपले आयुष्य उभारतात. त्याला तोंड फोडण्याचे काम अशा स्त्री-जाणिवेच्या लेखनामधून झाले पाहिजे. आजच्या घडीला विवाहांत हुंड्याचे वाढते प्रमाण, लग्न मोडणे, लग्नांमध्ये थोडीही जातीय तफावत असली तर विरोध, इतकेच नाही तर हिंसाचाराचे वाढते प्रमाण असे सगळे आजूबाजूला घडत असताना या अनुवादाचे स्वरूप मात्र एखाद्या निर्लेप तरंगणाऱ्या बेटासारखे वाटते असे खेदाने नोंदवावे लागते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more