* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SAMEEPA
  • Availability : Available
  • Translators : SUSHMA LELE
  • ISBN : 9788184988758
  • Edition : 1
  • Publishing Year : OCTOBER 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 200
  • Language : Translated From GUJRATI to MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
EACH KINGDOM HAS A SUBCULTURE. IT IS THIS SUBCULTURE THAT PRODUCES LITERATURE. THE BOOK SAMIPAA REFLECTS THE DISTRESS OF AN INDIAN WOMAN FROM GUJARATI SUBCULTURE. IT SPEAKS ABOUT HER HONOUR AND PAIN. IT WILL SURELY HELP US TO UNDERSTAND LIFE FROM DIFFERENT PERSPECTIVE, LEAVING US PONDERING OVER THE TRUTHS.
प्रत्येक राज्याची एक उपसंस्कृती असते, त्या त्या उपसंस्कृतीतून वैशिष्ट्यपूर्ण साहित्यनिर्मिती होत असते ‘समीपा’ या कथासंग्रहामध्ये भारतीय स्त्रीची वेदना गुजराती उपसंस्कृतीतून येथे अभिव्यक्त झाली आहे. स्त्रीच्या समान आणि मूलभूत वेदनेचा मूलकंदच येथे धुमारला आहे. गुजराती प्रतिभेचा हा उन्मेष मराठी वाचकास व्यथित आणि हर्षित करील....
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SAMEEPA #SAMEEPA #समीपा #SHORTSTORIES #TRANSLATEDFROMGUJRATITOMARATHI #SUSHMALELE #UNKNOWN "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKSATTA 06-03-2016

    स्त्रीजाणिवेच्या प्रातिनिधिक गुजराती कथांचे संकलन ‘समीपा’ हे सुषमा लेले यांनी अनुवादित केलेले पुस्तक. या पुस्तकाला दिलेला डॉ. द. भि. कुलकर्णी यांचा अभिप्राय पुस्तकाच्या मलपृष्ठावर आढळतो. ‘समीपा’ या कथासंग्रहामध्ये भारतीय स्त्रीची वेदना गुजराती उपसंस्ृतीतून येथे अभिव्यक्त झाली आहे. स्त्रीच्या समान आणि मूलभूत वेदनेचा मूलकंदच येथे धुमारला आहे. गुजराती प्रतिभेचा हा उन्मेष मराठी वाचकास व्यथित आणि हर्षित करील.’’ पुस्तकाचे मुखपृष्ठ गुजराती कठपुतळ्यांच्या खेळाचे आहे; परंतु बाईची कठपुतळी होणे यातील वेदना पोचवण्याचे काम त्या करतात का, हा कळीचा प्रश्न आहे. लेखिकेने मनोगतामध्ये गुजराती भाषा आणि वडोदरा हे कधी परके वाटले नाही असे म्हटले आहे. दोन्ही भाषांवर समान प्रेम आणि आपुलकी असल्याने लेखिकेने हा प्रकल्प आत्मीयतेने राबविला आहे. मनोगतामध्ये त्यांनी गुजराती-मराठी साम्य-भेद सांगितले आहेत. अनुवाद करताना केलेली तारेवरची कसरत त्यांनी नेमक्या शब्दात मांडली आहे. त्यांनी गुजरातीतला गोडवा व माधुर्य अनुवादात टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. सांस्कृतिकदृष्ट्या शब्दांच्या आत दडलेला अर्थ मराठीत आणण्याचा आणि दोन्ही भाषांमधील लिंगभेदाचा फरक अधोरेखित करून मांडण्याचा प्रयत्नही दिसतो. त्यामुळे पुस्तक वाचनीय झाले आहे आणि मराठी स्त्री-साहित्यामध्ये चांगली भरही पडली आहे. मात्र प्रश्न आहे तो असा, की सर्व स्त्रियांमध्ये समान स्त्रीत्व असते असे मानून मनोगतात लेखिका असे म्हणते की,‘भाषेच्या याच लयीत, याच तालात स्त्रीकडे पाहिलं असता बसं दिसून येतं की स्त्री-मग ती शहरी-ग्रामीण, दलित-दलितेतर, गरीब-श्रीमंत किंवा कुठल्याही धर्मगटातील किंवा प्रांतातील असो; तिची मानसिकता, शरीररचना, शारीर अनुभव, समाजाचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे सगळे थोड्याफार फरकाने सारखेच असतात.’ स्त्रीवादी अभ्यासातून आम्हाला असे जाणवले आहे की, ‘सर्व स्त्रिया’,‘आम्ही स्त्रिया’ असे म्हणून सर्व स्त्रियांना एकसाची बनवून बाईपणाचे एकच एक सत्त्व असते असे जेव्हा मांडले जाते, तेव्हा भिन्न प्रदेशांमध्ये स्त्रियांच्या भिन्न मार्गानी सोसण्याच्या तपशिलांवरच बोळा फिरवला जातो. इतकेच नव्हे, तर ‘सर्व स्त्रिया’ असे म्हणणाऱ्यांसमोर उच्चवर्गीय स्त्रियांच प्राधान्याने असल्यास नवल नाही. आजही महाराष्ट्रातील स्त्रीमुक्ती चळवळीत उच्च जातिवर्गातील स्त्रियांचा पुढाकार दिसतो. जर ताराबाई शिंदे, पंडिता रमाबार्इंच्या पुढे जायचे तर दलित, कष्टकरी स्त्रियांचे अनुभव, नेतृत्व आणि त्यांचा कुटुंब, समाजजीवन याविषयीचा विचार व्यक्त व्हायला हवा असे वाटते. यातून भारतीय स्त्री-चळवळीची कुंठितता संपण्याची शक्यता आहे. भारतातील जातीय व वर्गीय विषमतेच्या अगदी गाभ्यापाशी स्त्रीप्रश्न आहे. त्याची तड लावायची तर जातीयवादी राजकारणाचे विश्लेषण करणे, स्त्रियांनी राजकारणात सहभाग घेणे आणि त्यातील पुरुषसत्ताकता उघडकीस आणणे याला पर्याय नाही. स्वायत्त स्त्री-संघटनांचे योगदान मान्य करूनही अनेक अभ्यासक आता भारतातील स्त्री-चळवळीने दलित व कष्टकऱ्यांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालून आपले स्त्री - पुरुष विषमतेविषयीचे विचार मांडावे, कृती करावी असे म्हणू लागले आहेत. असा महाराष्ट्राचा जो सामाजिक व सांस्कृतिक संघर्षाचा वारसा आहे तो वारसा गुजराती साहित्यामध्ये आढळतो का, हा शोध घेतला गेला पाहिजे आणि अनुवादासाठी तशा कथा निवडल्या गेल्या पाहिजेत. अनुवादित कथांचा एक सामाजिक इतिहास व त्या कथा लिहिणाऱ्या लेखकांचा त्यादृष्टिने परिचय देणे महत्त्वाचे आहे. असे झाले तर हे अनुवाद दुपारच्या फावल्यावेळात झोप येण्यापूर्वी वाचून विसरून जाण्याच्या स्वरूपाचे राहणार नाहीत आणि स्त्रीत्वाचे गुजरातसारख्या जवळच्या प्रांतातून आलेले आविष्कार फक्त सोहळ्याच्या रूपात कौतुकस्वरूपात मांडले जाणार नाहीत. लेखिका स्वत: मराठी व गुजराती साहित्याची अभ्यासक आहे. परंतु एकूणच साहित्याच्या अभ्यासात सामाजिक इतिहासाचा अभ्यास केला जात नाही. साहित्याचे वाचन कलावादी पद्धतीने केले जाते. परंतु त्याला चिकित्सक सामाजिक इतिहासाची जोड दिली जात नाही याबद्दल खंत वाटते. असे झाल्यामुळे साहित्याचा अभ्यास हा सभोवती घडणाऱ्या इतर घटनांशी जोडला जात नाही आणि मग साहित्य संमेलनेसुद्धा समारंभाच्या रूपात लाखो रुपये खर्च करून साजरी केली जातात. परंतु खऱ्या प्रश्नांना तोंड फुटत नाही. अनेक स्त्रिया अशा आहेत, की ज्या परित्यक्ता, विधवा असूनही कोणताही पाठिंबा नसताना झगडतात आणि संघर्षमय जगत आपले आयुष्य उभारतात. त्याला तोंड फोडण्याचे काम अशा स्त्री-जाणिवेच्या लेखनामधून झाले पाहिजे. आजच्या घडीला विवाहांत हुंड्याचे वाढते प्रमाण, लग्न मोडणे, लग्नांमध्ये थोडीही जातीय तफावत असली तर विरोध, इतकेच नाही तर हिंसाचाराचे वाढते प्रमाण असे सगळे आजूबाजूला घडत असताना या अनुवादाचे स्वरूप मात्र एखाद्या निर्लेप तरंगणाऱ्या बेटासारखे वाटते असे खेदाने नोंदवावे लागते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.