* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE EXTRA ONE PER CENT
  • Availability : Available
  • Translators : SUJATA RAUT
  • ISBN : 9788184986266
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 220
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THERE ARE TIMES WHEN WE ALL NEED A BIT OF A PUSH TO HELP US REACH THE TOP. DISCOVER WHAT MAKES UP THE `EXTRA ONE PER CENT` THAT DISTINGUISHES EXCEPTIONAL PEOPLE FROM EVERYONE ELSE -- AND HOW YOU CAN MAKE THESE SUBTLE YET CRUCIAL DIFFERENCES WORK FOR YOU TOO. IN THIS BOOK, LEADING PSYCHOLOGIST AND COACH DR ROB YEUNG DRAWS UPON A WEALTH OF SCIENTIFIC RESEARCH AND SHARES REVELATIONS FROM HIS WORK WITH ENTREPRENEURS, BUSINESS LEADERS, WORLD-CLASS SPORTS PEOPLE AND CELEBRITIES. DISCOVER WHAT THESE SUCCESSFUL PEOPLE DO DIFFERENTLY AND FIND OUT HOW YOU TOO CAN REACH OUTSTANDING LEVELS OF SUCCESS BY TAPPING INTO THE PSYCHOLOGY OF HIGH ACHIEVERS BY DISCOVERING THE EIGHT CAPABILITIES THEY POSSESS THAT CAN MAKE ALL THE DIFFERENCE. IN THE EXTRA ONE PER CENT ROB YEUNG WILL SHOW YOU HOW YOU TOO CAN ACHIEVE YOUR FULL POTENTIAL AND DISCOVER HOW TO MAKE THESE STRATEGIES WORK FOR YOU. YOU WILL FIND OUT HOW TO MAKE REAL AND LASTING CHANGES IN YOUR LIFE AND TAKE YOURSELF TO THE NEXT LEVEL.
सर्वसामान्यांपेक्षा वरच्या पातळीवर पोहोचण्यासाठी आवश्यकता असते ती परिश्रमाची, मेहनतीची आणि सुयोग्य विचार करण्याची. या पुस्तकात व्यवसाय, मनोरंजन, क्रीडा या क्षेत्रांत यशस्वी झालेल्या व्यक्तींच्या मुलाखती आहेत. त्यांच्या प्रवासाचा अभ्यास करून त्यातून पुढे आलेली माहिती व शास्त्रीय संशोधन अत्यंत मार्मिक, सूक्ष्मपणे आपल्यासमोर ठेवले आहे, त्यांची व्याख्या केली आहे. जेणेकरून आपल्या करिअरच्या प्रवासात िंकवा दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला ते मार्गदर्शक ठरावेत. या पुस्तकामुळे तुम्हाला खालील गोष्टी कळतात – - सर्जनशील विचार करणे. - सूक्ष्म विचार करण्याची, टीकाकुशल मानसिकता निर्माण करणे. - इतरांना प्रभावित करून, त्यांचे मन वळवण्याचे मानसशास्त्र अवगत करणे. - नातेसंबंध दृढ करण्यासाठी, पैसा व यश संपादन करण्यासाठी काही प्रात्यक्षिक तंत्रे विकसित करणे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #PRAYATNEDHARUYASHPANTH #THEEXTRAONEPERCENT #प्रयत्नेधरूयशपंथ! #SELFHELPHEALTH&PERSONALDEVELOPMENT #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUJATARAUT #ROBYEUNG "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA 12-7-2015

    यशस्वी व्हा ! आयुष्यात प्रत्येकालाच यशस्वी व्हायचे असते पण मुळात यश म्हणजे काय? त्याची परिमाणे कोणती? आपल्याला नक्की काय हवे आहे? या प्रश्नांची उत्तरे मिळाली तर त्या दिशेने वाटचाल करता येईल. या यशाचा उगम आपल्या मनातूनच होतो. अखिल विश्वातील यशस्वी ाणसांच्या मनामध्ये उमटणाऱ्या या प्रेरणांमध्ये खूपच साम्य असते. म्हणूनच मानसशास्त्रज्ञ रॉब युग यांनी अनेक यशस्वी लोकांच्या मुलाखतींमधून अभ्यास करून सिद्ध केलेले हे The Extra One Percent प्रगतिपथावर वाटचाल करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठीच फलदायी ठरू शकते. सुजाता राऊत यांनी या पुस्तकाचा अनुवाद एखाद्या कुशल शल्यविशारदाच्या हातोटीने केला आहे. मूळ आशयास धक्का न लागू देता तज्ज्ञांचे विचार दुसऱ्या भाषेत सुलभ व सुटसुटीतपणे मांडण्याची अवघड जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली आहे. समूचित अशी प्रस्तावना व त्यानंतर प्रभुत्व, जोपासना, सत्यता, केंद्रीकरण, अनुसंधान, धाडस व नागरिकत्व व अत्यंत महत्त्वाचा म्हणजे दृष्टिकोन आणि निष्कर्ष अशा आठ प्रकरणांमध्ये विभागल्या गेलेल्या या पुस्तकाची परिणामकारकता जागोजागी यशस्वी लोकांचे वस्तुपाठ दिल्याने नक्कीच वर्धिष्णु झाली आहे. प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला उद्धृत केलेली वचने सकारात्मक ऊर्जा देणारी आहेत. आपल्या कामाचा सर्वोच्च परिणाम साधण्यासाठी व ते सातत्याने करण्यासाठी व्यायाम ही अत्यंत मौलिक गुंतवणूक आहे. कोणत्याही परिस्थितीत नैराश्य झटकून संतुलन साधणे हेच यशाचे गमक आहे. त्यासाठी मनाकडून मिळणाऱ्या नकारात्मक संदेशांना आव्हान व सकारात्मक संदेशांना ऊर्जा द्या. अनुसंधान म्हणजे नवीन लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्याबद्दल जाणून घेऊन अस्सल संबंधांचा शोध घेणे, तर धाडस म्हणजे परिणामांची खात्री नसताना कृती करण्याची इच्छा. सुजाण नागरिक नेहमी भविष्याचा, पर्यावरणाचा, समाजाचा विचार करून अनमोल अशा नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य प्रकारे विनियोग करतो. जबाबदारीने वागतो. आपल्यातील आनंदी, सफल व असामान्य लोक सम्यक दृष्टी निर्माण करतात. सतत अध्ययन, चौफेर विचार व नवे प्रवाह व कल्पना यांचे ज्ञान हे आपला दृष्टिकोन समतोल ठेवतात. जीवनाप्रमाणे दृष्टिकोनही परिवर्तनशील हवा. कणभर कृती ही मणभर सिद्धांतापेक्षा श्रेष्ठ असते. म्हणूनच हे पुस्तक मन:पूर्वक वाचून स्वत: त्या क्षमतांचा विकास व इतरांच्या क्षमतांचा अभ्यास करण्यासाठी मिळालेला समंजस सल्ला आचरणात आणला पाहिजे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more