* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE HAPPINESS PROJECT
  • Availability : Available
  • Translators : ASHWINI TAPIKAR-KANTHI
  • ISBN : 9789353171919
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 320
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
GRETCHEN RUBIN HAD AN EPIPHANY ONE RAINY AFTERNOON IN THE UNLIKELIEST OF PLACES: A CITY BUS. "THE DAYS ARE LONG, BUT THE YEARS ARE SHORT," SHE REALIZED. "TIME IS PASSING, AND I`M NOT FOCUSING ENOUGH ON THE THINGS THAT REALLY MATTER." IN THAT MOMENT, SHE DECIDED TO DEDICATE A YEAR TO HER HAPPINESS PROJECT. IN THIS LIVELY AND COMPELLING ACCOUNT, RUBIN CHRONICLES HER ADVENTURES DURING THE TWELVE MONTHS SHE SPENT TEST-DRIVING THE WISDOM OF THE AGES, CURRENT SCIENTIFIC RESEARCH, AND LESSONS FROM POPULAR CULTURE ABOUT HOW TO BE HAPPIER. AMONG OTHER THINGS, SHE FOUND THAT NOVELTY AND CHALLENGE ARE POWERFUL SOURCES OF HAPPINESS; THAT MONEY CAN HELP BUY HAPPINESS, WHEN SPENT WISELY; THAT OUTER ORDER CONTRIBUTES TO INNER CALM; AND THAT THE VERY SMALLEST OF CHANGES CAN MAKE THE BIGGEST DIFFERENCE.
पावसाळ्यातल्या एका दुपारी ग्रेचेन रुबिनला अचानक साक्षात्कार झाला, आणि तो देखील एका अनपेक्षित ठिकाणी – बसमध्ये. तिला जाणवले की, “दिवस मोठे असतात, पण वर्षे छोटी असतात”. “वेळ निघून जात आहे, आणि महत्वाच्या गोष्टींवर मी पुरेसे लक्ष देत नाही आहे.” त्याक्षणी तिने पुढचे एक वर्ष तिच्या ‘हॅपीनेस प्रोजेक्ट’ला वाहून घेतले. आनंदी कसे व्हावे या विषयी युगानयुगे अनुभवातून आलेले शहाणपण, हल्लीचे शास्त्रशुद्ध संशोधन आणि वेगवेगळ्या संस्कृतीमधून मिळवलेली माहिती, हे सगळे वापरून रुबिन तिच्या आनंदी होण्याच्या प्रयत्नांचा बारा महिन्याचा प्रवास तिच्या रोचक आणि खिळवून टाकणाऱ्या शैलीत वर्णन करते. या प्रवासात तिला बऱ्याच गोष्टी जाणवल्या – नाविन्य आणि आव्हाने यातून आनंद निर्माण होतो, योग्य प्रकारे वापरला तर पैसादेखील आनंद देऊ शकतो, तुमच्या आजूबाजूचे नेटकेपण तुम्हाला मनःशांती देऊ शकते आणि छोट्यातले छोटे बदल खूप मोठा फरक घडवून आणतात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#THE HAPPINESS PROJECT #ANANDTARANG #GRECHEN RUBIN #ASHWINI TAPIKAR-KANTHI
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 13-10-2019

    परिवर्तनाचे बारा महिने... माणसाला मिळालेल्या आयुष्याला प्रवाहीपणाचे वरदान लाभले आहे. परंतु, कधी कधी माणूस एखाद्या चक्रव्यूहात अडकत जातो. एव्हाना त्याच्या आयुष्यात आनंद, समाधान, सुख, शांतता हे शब्द त्याला निरर्थक वाटू लागतात. ग्रेचेन रुबिनला पण आयुष्ाच्या एका विशिष्ट टप्प्यावर अनपेक्षितपणे वेळेचे महत्त्व अधोरेखित होते आणि तेथून पुढे सुरू होतो, त्याच्या आनंदाचा नवा शोध. त्याच परिवर्तनाच्या नांदीला हाताशी ती एक वर्ष हॅपीनेस प्रोजेक्टला वाहून घेते. आनंदी कसे व्हावे, याविषयी उपजत आलेले शहाणपण, युगायुगाचे संशोधन आणि माहिती यांच्या आधारे तंत्रशुद्ध शिक्षण घेते. हा तिचा बारा महिन्यांचा प्रवास म्हणजे नेमके काय आहे, त्यात तिने कोणकोणते प्रयोग केले त्याची रोचक कहाणी म्हणजे आनंदतरंग हे पुस्तक. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 15-09-2019

    परिवर्तनाची बारा महिने... माणसाला मिळालेल्या आयुष्याला प्रवाहीपणे वरदान लाभले आहे. परंतु, कधी कधी माणूस एखाद्या चक्रव्यूहात अडकत जातो. एव्हाना त्याच्या आयुष्यात आनंद, समाधान, सुख, शांतता हे शब्द त्याला निरर्थक वाटू लागतात. ग्रेचेन रुबिनला पण आयुष्या्या एका विशिष्ट टप्प्यावरती अनपेक्षितपणे वेळेचे महत्त्व अधोरेखित होते आणि तिथून पुढे सुरू होतो त्याच्या आनंदाचा नवा शोध. त्याच परिवर्तनाच्या नांदीला हाताशी ती एक वर्ष हॅपीनेस प्रोजेक्टली वाहून घेते. आनंदी कसे व्हावे याविषयी उपजत आलेले शहाणपण, युगानुयुगाचे संशोधन आणि माहिती यांच्या आधारे तंत्रशुद्ध शिक्षण घेते. हा तिचा बारा महिन्यांचा प्रवास म्हणजे नेमकं काय आहे. त्यात तिने कोणते कोणते प्रयोग केले त्याची रोचक कहाणी म्हणजे आनंदतरंग हे पुस्तक. ...Read more

  • Rating StarDivya Marathi 25-6-19

    आनंदी आयुष्याची वाट दर्शवणारे `आनंदतरंग` ----- आपले आयुष्य आनंदी व्हावे असे प्रत्येकालाच वाटत असते. पण आनंद मिळवण्याचा हमखास असा काही फॉर्म्युला वगैरे आजवर अस्तित्वात आलेला नाही. याचे कारण म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती. अर्थात, प्रत्येकाचा आनंद वेगेगळ्या गोष्टीत दडलेला असतो. त्यामुळे फारच थोड्यांना खऱ्या अर्थाने आनंदी जीवनाची गुरुकिल्ली सापडलेली असते. ही गुरुकिल्ली कशी शोधायची आणि स्वत:चे जीवन अधिकाधिक आनंदी कसे करायचे त्याची वाट ग्रेचेन रुबिन या अमेरिकन लेखिकेचे `द हॅपिनेस प्रोजेक्ट` हे अनोखे पुस्तक दाखवते. इंग्रजीत तुफान लोकप्रिय झालेल्या आणि दहा लाखांहून अधिक प्रतींचा आकडा पार केलेल्या या पुस्तकाचा अश्विनी तापीकर-कंठी यांनी केलेला मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे `आनंदतरंग` या नावाने अलीकडेच प्रकाशित झाला आहे. इतर `सेल्फ हेल्प बुक्स`प्रमाणे केवळ आनंदाची तत्त्वे, मार्गदर्शनपर उपदेश असे स्वरूप या पुस्तकाचे नाही, तर आनंदी होण्यासाठी लेखिकेने हाती घेतलेल्या प्रत्यक्ष प्रकल्पाचा तो सविस्तर अहवाल आहे. लेखिकेने आपला `हॅपिनेस प्रोजेक्ट` राबवतानाचे केलेले स्वानुभव कथन प्रत्येक वाचकाला कुठल्या ना कुठल्या बिंदूवर `कनेक्ट` करते. त्यामुळे पुस्तकाची निर्मितीची प्रक्रिया समजावून घेणेही महत्त्वाचे ठरते. लौकिकार्थाने पाहिल्यास लेखिकेचे म्हणजेच ग्रेचेन रुबिन या अमेरिकन महिलेचे आयुष्य अगदी सुस्थिर आणि परिपूर्ण होते. पण आपल्याकडे काहीतरी कमी आहे, आपल्याला आणखी काहीतरी हवे आहे, आणखी मिळवायचे आहे अशी अनामिक हुरहूर तिच्या मनाला कायम लागून राहिलेली असे. स्वभावात आलेला चिडचिडेपणा, लहान-मोठ्या कारणांवरून होणारी कुरकुर यामुळे ती अस्वस्थ असायची. एकदा अशीच बसमधून प्रवास करत असताना काचेवरून ओघळणारा पाण्याचा थेंब पाहून तिला आपलेही आयुष्य असेच ओघळत चालल्याची जाणीव झाली आणि त्याच क्षणी अधिक आनंदी होण्यासाठी आपण काहीतरी करायला हवे हा विचार तिच्या मनात आला. त्यानुसार तिने आपला हॅपिनेस प्रोजेक्ट आखला आणि महत्प्रयासाने वर्षभर त्याची अंमलबजावणीही केली. हे सगळे टप्पे पुस्तकात शास्त्रोक्त पद्धतीने मांडतानाच तिने त्यात आपले स्वानुभव उत्तमरीत्या गुंफल्याने वाचकाला खऱ्या अर्थाने आनंदतरंगांची अनुभूती येते. अर्थात, लेखिकेच्या प्रकल्पातील काही बाबी अमेरिकन संस्कृती, जीवनपद्धतीशी निगडित असल्याचे जाणवते. मात्र, प्रत्येकाचा `हॅपिनेस प्रोजेक्ट` वेगळा असेल आणि तो ज्याचा त्याने ठरवायचा आहे हे लेखिकेने सुरुवातीला बजावून सांगितले आहे. त्यामुळे अभ्यासपूर्ण मांडणी आणि मनोरंजक धाटणीचे हे पुस्तक प्रत्येक वाचकाला आयुष्य आनंदी बनवण्यासाठी आपापला `हॅपिनेस प्रोजेक्ट` सुरू करायला उद्युक्त करणारे आहे. - अभिजित कुलकर्णी ...Read more

  • Rating Starअश्विनी कंठी

    एप्रिल महिन्यातल्या अश्याच एका सकाळी मला अचानक, मी माझे आयुष्य वाया घालवतेय असे वाटू लागले. मी बसमधून चालले होते. खिडक्यांच्या काचांवरून ओघळणाऱ्या पावसाच्या थेंबांना पाहून मला वाटले कि या थेंबांसारखाच माझ्याही हातातून वेळ निसटून जात आहे. ”मला हवय तरीकाय आयुष्यापासून?” मी स्वतःलाच प्रश्न विचारला. माझे उत्तर होते.... मला आनंदी व्हायचय. काय केले असता मी आनंदी होणार आहे किंवा आहे त्याहून अधिक आनंदी होणार आहे याचा मात्र मी कधी विचार केला नव्हता. मला याचा निकाल लावायलाच हवा, असे मी स्वतःला बजावले. जेव्हा कधी मला रिकामा वेळ मिळेल, तेव्हा मी एक हॅपीनेस प्रोजेक्ट हाती घ्यायचे ठरवले. पण मला रिकामा वेळच मिळत नव्हता. आयुष्य नेहमीसारखेच चाकोरीतून पुढे सरकत होते, आणि आयुष्यात महत्वाचे काय आहे याचा मला विसर पडत चालला होता. मला जर हॅपीनेस प्रोजेक्ट हाती घ्यायचा असेल तर मला त्या करता वेळ काढायलाच हवा होता. सर्वात प्रथम मला माझ्या आयुष्यात कोणकोणते बदल करायचे आहेत ते ठरवायला हवे होते. नंतर मग त्या त्या गोष्टीत आनंद कसा वाढवायचा याचे उपाय शोधायला हवे होते. ते उपाय नेमके आणि ठोस असायला हवे होते आणि त्यांची प्रगती मोजता यायला हवी होती. मला दर महिन्याला एका संकल्पावर लक्ष केंद्रित करायचे होते. माझ्या तक्त्यानुसार वर्षामधले बारा महिने या हिशोबाने १२ महत्वाचे प्रश्न मी सोडवायला घेणार होते. काय केले मग ग्रेचेन रुबिनने? स्वतःच्या आधीच्या आनंदी जीवनात अधिक आनंद तिने कसा मिळवला? हे जाणून घेण्यासाठी वाचा .....आनंदतरंग ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more