* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TODDLER TAMING:THE GUIDE TO YOUR CHILD FROM ONE TO FOUR
  • Availability : Notify Me
     
  • Translators : MANJUSHA AMDEKAR
  • ISBN : 9788184984361
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 436
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Print Books:
AT LAST HERE IS PRACTICAL ADVICE--MIXED WITH HUMOR--FOR HOW TO COPE WITH THOSE DIFFICULTIES THAT TURN YOUR SWEET BABY INTO A HOLY TERROR, INCLUDING: TOILET TRAINING, TANTRUMS AND OTHER TRICKS, SLEEP PROBLEMS, FIDGETS, AND MORE. FEATURING SPECIAL ADVICE FOR WORKING MOTHERS AND SINGLE PARENTS, TODDLER TAMING STRIVES TO CALM YOUR FEARS, WITH ADVICE THAT REALLY WORKS!
अजाण मुलांना वळण लावणं, त्यांच्या खाण्यापिण्याच्या, झोपेच्या, स्वच्छतेच्या समस्या सोडवणं सर्वच पालकांना कठीण जातं; पण त्यातही नोकरी करणाNया मातापित्यांना तर ती तारेवरची कसरतच वाटते. हे लक्षात घेऊन या पुस्तकात बालकांना संभाळण्याची कला हसत-खेळत शिकवली आहे. आपल्या बालकाचं संगोपन उत्कृष्टरीत्या करण्यासाठी धडपडणाNया सर्व पालकांसाठी हे पुस्तक म्हणजे ‘जादुई चिराग’ ठरेल! विशेषत: अवखळ मुलांचा संभाळ करता-करता ताणतणावानं थवूÂन गेलेल्या पालकांना हे पुस्तक संजीवनी देईल. बालसंगोपनासारखा विषय डॉ. खिस्तोफर ग्रीन यांनी आपल्या नर्मविनोदी शैलीत अत्यंत खेळकरपणे मांडलेला आहे. यामध्ये आधुनिक जगातल्या नव्या पिढीच्या पालकांना उपयुक्त ठरणारे अनेक मैत्रीपूर्ण सल्ले सापडतील.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #HASATKHELATBALSANGOPAN #TODDLERTAMINGASURVIVALGUIDEFORPARENTS #हसत-खेळतबालसंगोपन #SELFHELPHEALTH&PERSONALDEVELOPMENT #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #CHRISTOPHERGREEN "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA 28-05-2017

    एक काळ असा होता, की लहान मुलांच्या तऱ्हेवाईक वागण्यामुळे अन्य पालकांइतकाच मी ही गोंधळून गेलेलो होतो. पंचवीस वर्षांपूर्वी बालरोगतज्ज्ञ म्हणून प्रशिक्षण घेताना मला लहान मुलांच्या वर्तनात काडीइतकाही रस नव्हता. आव्हानात्मक प्रसंग हाताळण्याच्या युक्त्याप्युक्त्या माझ्याकडे मुळीच नव्हत्या. इतर सर्वच प्रशिक्षणार्थीप्रमाणे माझीदेखील सहा महिन्यांकरीता मानसोपचार विभागात पाठवणी करण्यात आली. मानसोपचार विभागात या सहा महिन्यात मी बरंच काही शिकलो. इडिपस गंडापासून ते खच्चीकरण करणाऱ्या चिंता, दडपून ठेवण्यात आलेल्या भावना आणि वरकरणी दिसणाऱ्या गोष्टींचा अर्थ लावण्यापर्यंत बरंच काही. जागतिक कीर्तीचे बालमानसोपचारतज्ज्ञ असलेले ऑस्ट्रेलियाचे एक श्रेष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक माझे निरीक्षक म्हणून काम पाहत होते. तसा माझा बहुतेक वेळ इतर मानसोपचारतज्ज्ञांचं आणि मानसतज्ज्ञांचं निरीक्षण करण्यातच जात असे. पण तरीही मलासुद्धा काही केसेस हाताळण्याकरता देण्यात आल्या होत्या. दर आठवड्याला माझे प्राध्यापक या सर्व केसेसची माझ्याबरोबर चर्चा करत असत आणि मला त्यांची अनुभवी मतं देत असत, पण तरीही बालसंगोपनतज्ज्ञ म्हणून मी अजूनही अनभिज्ञच होतो. त्यानंतर अचानक एका खोडसाळ बालकामुळे आणि त्याच्या गोंधळून गेलेल्या त्रस्त पालकांमुळे माझं सगळं विश्वच बदलून गेलं. मग मी मला मिळालेली नवी माहिती घेऊन पुन्हा माझ्या निरीक्षकासमोर बसलो, त्यांनी सगळं काही तपशीलवार ऐकून घेतलं. त्याच्या वडिलांनी मला पुन्हा विचारलं, पण आम्ही त्याचा खोडकरपणा आवाक्यात आणायचा तरी कसा? मला अजूनही या प्रश्नाचं उत्तर माहीत नव्हतं. त्यामुळे मी पुन्हा माझ्या प्राध्यापकांकडे परत गेलो आणि त्यांना सगळी माहिती दिली अन् म्हटलं. आता मात्र ते पालक माझ्यावर चिडायला लागलेले आहेत. आपण मुलाचा खोडसाळ स्वभाव बदलण्यासाठी काय उपाययोजना करू शकतो? या प्रश्नावर त्यांचं उत्तर काय होतं माहीत आहे? तुला आणखी माहिती घ्यावी लागेल. त्यामुळे मी पुन्हा माझा मोर्चा त्या पालकांकडे वळवला, ते मला सांगत असलेल्या त्यांच्या मुलाच्या खोडकरपणाच्या कथांवर काहीतरी उपाय सापडेल. या आशेवर कित्येक आठवडे उलटले. कित्येक आठवडे निघून गेले आणि तरीही त्या नाठाळ मुलाच्या खोडकरपणात तसूभरही फरक न पडलेला पाहून त्या मुलाच्या आईची सहनशक्ती संपली आणि त्याचा पिताही वैतागला. मी माझं प्रशिक्षण संपवलं आणि विशेषतज्ज्ञांच्या पंगतीत जाऊन बसलो. त्यापुढील तीन वर्षांच्या काळात मला रोजच्या रोज दवाखान्यात आणि वॉर्डात खूपच रुग्णांना तपासावं लागायचं आणि त्यांच्यावर उपचार करावे लागायचे, पण ज्या विमान कर्मचाऱ्यानं आणि त्याच्या कुटुंबीयांनी माझं खरं कुतूहल जागवलं होतं, ते कुतूहल मला राहून राहून मुलांच्या वागणुकीकडे खेचून घेत राहिलं. अशीच काही वर्षं गेल्यानंतर पालक मला शोधत यायला लागले आणि माझ्या लक्षात आलं की मी माझ्या प्राध्यापकांना जे प्रश्न विचारत होतो, त्यांची उत्तर मला सापडलेली आहेत. मग पालकांच्या गटांकडून मला मुलांच्या झोपण्याच्या, खाण्यापिण्याच्या, स्वच्छतेच्या सवयींबद्दल आणि त्याच्या वागण्याच्या समस्यांवर बोलण्यासाठी आमंत्रणं यायला लागली. लवकरच रेडिओवरही माझी भाषणं सुरू झाली. एके दिवशी एका पित्यानं माझं बोलणं ऐकलं, तो आपल्या मुलामुळे रात्र रात्र जागून अक्षरश: हैराण झाला होता. त्या मुलाचे आभारच मानायला हवेत! पालकांना काय हवं आहे ते मला माहीत आहे असं त्याला वाटत होतं आणि माझं सुदैव म्हणजे तो आंतरराष्ट्रीय प्रकाशक निघाला. त्यानं माझ्या दारात चक्क तळच ठोकल्यावर मी त्याला एक पुस्तक लिहून द्यायचं कबूल केलं. अशा प्रकारे या पुस्तकाचा जन्म झाला. गेल्या दोन दशकात जगात बरीच उलथापालथ झालेली असली, तरी एका गोष्टीत मात्र काहीच बदल झालेला नाही आणि तो म्हणजे बालकांचा व्रात्यपणा. बदलत्या काळाचा मुलांच्या अविचारीपणावर आणि वाट्टेल तशा वागण्यावर काहीही बदल झालेला नाही. स्वत:कडे लक्ष वेधून घेण्याचा त्यांचा हटवादीपणा जराही दबला गेलेला नाही. ही मुलं पूर्वीइतकीच चैतन्यानं आणि त्यांच्यामध्ये असलेल्या सदाबहार जादूनं रसरसलेली आहेत. त्यामुळे थोडक्यात काय, तर २१ वर्षांपूर्वी पालकांना ज्या काळज्या आणि चिंता सतावत होत्या त्याच आजही त्रास देतच असतात. आधुनिक पालकही आपल्या नखरेल मुलाला जेवूखाऊ घालण्याच्या बाबतीत पूर्वीच्या पालकांइतकेच गोंधळून गेलेले आहेत आणि स्वच्छतेचे अंतहीन धडे देऊन देऊन जेरीला आलेले आहेत. आपल्या झोपेचं खोबरं करत धावपळ करून थकले भागलेले पालक दिवस उजाडायची वेळ होईपर्यंत चिडीला आलेले असतात. आपल्या चिरंजीवांच्या नाठाळ कारवायांनी हादरून गेलेले असतात आणि त्याच्या अगम्य सवयी पाहून हवालदिल झालेले असतात. त्यांच्या चिरंजीवांची बोटं एरवी गोंडस दिसणाऱ्या नाकांमध्ये अखंड खुपसलेली असतात आणि आतल्या चिकट द्रवाच्या तारांमधून ही मुलं आपल्या ‘कलेचं’ प्रदर्शन करत असतात. अशा परिस्थितीत बिचारे पालक जीवघेणा संघर्ष करत राहतात यात काहीच नवल नाही. ‘माझं काय चुकलं?’ असं विचारत राहतात. खरं म्हणजे काहीच चुकलेलं नसतं आणि इतकी तडतड करण्याचीही खरं तर काहीच गरज नसते. तुमचं मूल अगदी नाठाळात नाठाळ असलं, तरी त्यावरही उपाय आहेत. मुलांची बाल्यावस्था आनंददायी व्हायला हवी आणि तुम्हाला सांगतो, माझ्या मदतीनं ते नक्की शक्य आहे. तर मग चला, पाय घट्ट रोवून उभे राहा. बाह्या सरसावा आणि तुमच्या अपत्याच्या बालपणातली गंमत चाखायला तयार व्हा. -डॉ. खिस्तोफर ग्रीन ...Read more

  • Rating Starनंदा गोरे

    बेस्ट book

  • Rating StarLOKPRABHA 13 March

    मुलांना वळण लावणं, त्यांना चांगल्या सवयी लावणं, त्यांना घडवणं आणि आयुष्यात यशस्वी करणं ही अनेक पालकांसाठी तारेवरची कसरतच असते. पण आपल्यावरची पालकत्वाची जबाबदारी त्यांना मनापासून निभवायची असते. पण नोकरी व्यवसाय सांभाळून पालकत्व निभवायचं आणि तेदेखील हसखेळत, तर ते एक प्रकारचे आव्हानच असते. त्यामुळेच पालकत्वाचं शिवधनुष्य लीलया कसे पेलावे हे सांगणारे एक पुस्तक नव्या पिढीतील पालकांसाठी अत्यंत उपयु्क्त आहे. पालकत्वाचा बाऊ न करता आपल्या मुलांची निकोप वाढ करायची असेल तर हे विक्रमी खपाचे पुस्तक वाचावे लागेल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more