* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TODDLER TAMING:THE GUIDE TO YOUR CHILD FROM ONE TO FOUR
  • Availability : Notify Me
     
  • Translators : MANJUSHA AMDEKAR
  • ISBN : 9788184984361
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 436
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Print Books:
AT LAST HERE IS PRACTICAL ADVICE--MIXED WITH HUMOR--FOR HOW TO COPE WITH THOSE DIFFICULTIES THAT TURN YOUR SWEET BABY INTO A HOLY TERROR, INCLUDING: TOILET TRAINING, TANTRUMS AND OTHER TRICKS, SLEEP PROBLEMS, FIDGETS, AND MORE. FEATURING SPECIAL ADVICE FOR WORKING MOTHERS AND SINGLE PARENTS, TODDLER TAMING STRIVES TO CALM YOUR FEARS, WITH ADVICE THAT REALLY WORKS!
अजाण मुलांना वळण लावणं, त्यांच्या खाण्यापिण्याच्या, झोपेच्या, स्वच्छतेच्या समस्या सोडवणं सर्वच पालकांना कठीण जातं; पण त्यातही नोकरी करणाNया मातापित्यांना तर ती तारेवरची कसरतच वाटते. हे लक्षात घेऊन या पुस्तकात बालकांना संभाळण्याची कला हसत-खेळत शिकवली आहे. आपल्या बालकाचं संगोपन उत्कृष्टरीत्या करण्यासाठी धडपडणाNया सर्व पालकांसाठी हे पुस्तक म्हणजे ‘जादुई चिराग’ ठरेल! विशेषत: अवखळ मुलांचा संभाळ करता-करता ताणतणावानं थवूÂन गेलेल्या पालकांना हे पुस्तक संजीवनी देईल. बालसंगोपनासारखा विषय डॉ. खिस्तोफर ग्रीन यांनी आपल्या नर्मविनोदी शैलीत अत्यंत खेळकरपणे मांडलेला आहे. यामध्ये आधुनिक जगातल्या नव्या पिढीच्या पालकांना उपयुक्त ठरणारे अनेक मैत्रीपूर्ण सल्ले सापडतील.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #HASATKHELATBALSANGOPAN #TODDLERTAMINGASURVIVALGUIDEFORPARENTS #हसत-खेळतबालसंगोपन #SELFHELPHEALTH&PERSONALDEVELOPMENT #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #CHRISTOPHERGREEN "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA 28-05-2017

    एक काळ असा होता, की लहान मुलांच्या तऱ्हेवाईक वागण्यामुळे अन्य पालकांइतकाच मी ही गोंधळून गेलेलो होतो. पंचवीस वर्षांपूर्वी बालरोगतज्ज्ञ म्हणून प्रशिक्षण घेताना मला लहान मुलांच्या वर्तनात काडीइतकाही रस नव्हता. आव्हानात्मक प्रसंग हाताळण्याच्या युक्त्याप्युक्त्या माझ्याकडे मुळीच नव्हत्या. इतर सर्वच प्रशिक्षणार्थीप्रमाणे माझीदेखील सहा महिन्यांकरीता मानसोपचार विभागात पाठवणी करण्यात आली. मानसोपचार विभागात या सहा महिन्यात मी बरंच काही शिकलो. इडिपस गंडापासून ते खच्चीकरण करणाऱ्या चिंता, दडपून ठेवण्यात आलेल्या भावना आणि वरकरणी दिसणाऱ्या गोष्टींचा अर्थ लावण्यापर्यंत बरंच काही. जागतिक कीर्तीचे बालमानसोपचारतज्ज्ञ असलेले ऑस्ट्रेलियाचे एक श्रेष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक माझे निरीक्षक म्हणून काम पाहत होते. तसा माझा बहुतेक वेळ इतर मानसोपचारतज्ज्ञांचं आणि मानसतज्ज्ञांचं निरीक्षण करण्यातच जात असे. पण तरीही मलासुद्धा काही केसेस हाताळण्याकरता देण्यात आल्या होत्या. दर आठवड्याला माझे प्राध्यापक या सर्व केसेसची माझ्याबरोबर चर्चा करत असत आणि मला त्यांची अनुभवी मतं देत असत, पण तरीही बालसंगोपनतज्ज्ञ म्हणून मी अजूनही अनभिज्ञच होतो. त्यानंतर अचानक एका खोडसाळ बालकामुळे आणि त्याच्या गोंधळून गेलेल्या त्रस्त पालकांमुळे माझं सगळं विश्वच बदलून गेलं. मग मी मला मिळालेली नवी माहिती घेऊन पुन्हा माझ्या निरीक्षकासमोर बसलो, त्यांनी सगळं काही तपशीलवार ऐकून घेतलं. त्याच्या वडिलांनी मला पुन्हा विचारलं, पण आम्ही त्याचा खोडकरपणा आवाक्यात आणायचा तरी कसा? मला अजूनही या प्रश्नाचं उत्तर माहीत नव्हतं. त्यामुळे मी पुन्हा माझ्या प्राध्यापकांकडे परत गेलो आणि त्यांना सगळी माहिती दिली अन् म्हटलं. आता मात्र ते पालक माझ्यावर चिडायला लागलेले आहेत. आपण मुलाचा खोडसाळ स्वभाव बदलण्यासाठी काय उपाययोजना करू शकतो? या प्रश्नावर त्यांचं उत्तर काय होतं माहीत आहे? तुला आणखी माहिती घ्यावी लागेल. त्यामुळे मी पुन्हा माझा मोर्चा त्या पालकांकडे वळवला, ते मला सांगत असलेल्या त्यांच्या मुलाच्या खोडकरपणाच्या कथांवर काहीतरी उपाय सापडेल. या आशेवर कित्येक आठवडे उलटले. कित्येक आठवडे निघून गेले आणि तरीही त्या नाठाळ मुलाच्या खोडकरपणात तसूभरही फरक न पडलेला पाहून त्या मुलाच्या आईची सहनशक्ती संपली आणि त्याचा पिताही वैतागला. मी माझं प्रशिक्षण संपवलं आणि विशेषतज्ज्ञांच्या पंगतीत जाऊन बसलो. त्यापुढील तीन वर्षांच्या काळात मला रोजच्या रोज दवाखान्यात आणि वॉर्डात खूपच रुग्णांना तपासावं लागायचं आणि त्यांच्यावर उपचार करावे लागायचे, पण ज्या विमान कर्मचाऱ्यानं आणि त्याच्या कुटुंबीयांनी माझं खरं कुतूहल जागवलं होतं, ते कुतूहल मला राहून राहून मुलांच्या वागणुकीकडे खेचून घेत राहिलं. अशीच काही वर्षं गेल्यानंतर पालक मला शोधत यायला लागले आणि माझ्या लक्षात आलं की मी माझ्या प्राध्यापकांना जे प्रश्न विचारत होतो, त्यांची उत्तर मला सापडलेली आहेत. मग पालकांच्या गटांकडून मला मुलांच्या झोपण्याच्या, खाण्यापिण्याच्या, स्वच्छतेच्या सवयींबद्दल आणि त्याच्या वागण्याच्या समस्यांवर बोलण्यासाठी आमंत्रणं यायला लागली. लवकरच रेडिओवरही माझी भाषणं सुरू झाली. एके दिवशी एका पित्यानं माझं बोलणं ऐकलं, तो आपल्या मुलामुळे रात्र रात्र जागून अक्षरश: हैराण झाला होता. त्या मुलाचे आभारच मानायला हवेत! पालकांना काय हवं आहे ते मला माहीत आहे असं त्याला वाटत होतं आणि माझं सुदैव म्हणजे तो आंतरराष्ट्रीय प्रकाशक निघाला. त्यानं माझ्या दारात चक्क तळच ठोकल्यावर मी त्याला एक पुस्तक लिहून द्यायचं कबूल केलं. अशा प्रकारे या पुस्तकाचा जन्म झाला. गेल्या दोन दशकात जगात बरीच उलथापालथ झालेली असली, तरी एका गोष्टीत मात्र काहीच बदल झालेला नाही आणि तो म्हणजे बालकांचा व्रात्यपणा. बदलत्या काळाचा मुलांच्या अविचारीपणावर आणि वाट्टेल तशा वागण्यावर काहीही बदल झालेला नाही. स्वत:कडे लक्ष वेधून घेण्याचा त्यांचा हटवादीपणा जराही दबला गेलेला नाही. ही मुलं पूर्वीइतकीच चैतन्यानं आणि त्यांच्यामध्ये असलेल्या सदाबहार जादूनं रसरसलेली आहेत. त्यामुळे थोडक्यात काय, तर २१ वर्षांपूर्वी पालकांना ज्या काळज्या आणि चिंता सतावत होत्या त्याच आजही त्रास देतच असतात. आधुनिक पालकही आपल्या नखरेल मुलाला जेवूखाऊ घालण्याच्या बाबतीत पूर्वीच्या पालकांइतकेच गोंधळून गेलेले आहेत आणि स्वच्छतेचे अंतहीन धडे देऊन देऊन जेरीला आलेले आहेत. आपल्या झोपेचं खोबरं करत धावपळ करून थकले भागलेले पालक दिवस उजाडायची वेळ होईपर्यंत चिडीला आलेले असतात. आपल्या चिरंजीवांच्या नाठाळ कारवायांनी हादरून गेलेले असतात आणि त्याच्या अगम्य सवयी पाहून हवालदिल झालेले असतात. त्यांच्या चिरंजीवांची बोटं एरवी गोंडस दिसणाऱ्या नाकांमध्ये अखंड खुपसलेली असतात आणि आतल्या चिकट द्रवाच्या तारांमधून ही मुलं आपल्या ‘कलेचं’ प्रदर्शन करत असतात. अशा परिस्थितीत बिचारे पालक जीवघेणा संघर्ष करत राहतात यात काहीच नवल नाही. ‘माझं काय चुकलं?’ असं विचारत राहतात. खरं म्हणजे काहीच चुकलेलं नसतं आणि इतकी तडतड करण्याचीही खरं तर काहीच गरज नसते. तुमचं मूल अगदी नाठाळात नाठाळ असलं, तरी त्यावरही उपाय आहेत. मुलांची बाल्यावस्था आनंददायी व्हायला हवी आणि तुम्हाला सांगतो, माझ्या मदतीनं ते नक्की शक्य आहे. तर मग चला, पाय घट्ट रोवून उभे राहा. बाह्या सरसावा आणि तुमच्या अपत्याच्या बालपणातली गंमत चाखायला तयार व्हा. -डॉ. खिस्तोफर ग्रीन ...Read more

  • Rating Starनंदा गोरे

    बेस्ट book

  • Rating StarLOKPRABHA 13 March

    मुलांना वळण लावणं, त्यांना चांगल्या सवयी लावणं, त्यांना घडवणं आणि आयुष्यात यशस्वी करणं ही अनेक पालकांसाठी तारेवरची कसरतच असते. पण आपल्यावरची पालकत्वाची जबाबदारी त्यांना मनापासून निभवायची असते. पण नोकरी व्यवसाय सांभाळून पालकत्व निभवायचं आणि तेदेखील हसखेळत, तर ते एक प्रकारचे आव्हानच असते. त्यामुळेच पालकत्वाचं शिवधनुष्य लीलया कसे पेलावे हे सांगणारे एक पुस्तक नव्या पिढीतील पालकांसाठी अत्यंत उपयु्क्त आहे. पालकत्वाचा बाऊ न करता आपल्या मुलांची निकोप वाढ करायची असेल तर हे विक्रमी खपाचे पुस्तक वाचावे लागेल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो