* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TEENAGERS
  • Availability : Available
  • Translators : DR.ASMI ACHYUTE
  • ISBN : 9789353171957
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 268
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Print Books:
PARENTS WHO ARE ALWAYS EAGER TO UNDERSTAND THE SCIENCE BEHIND EACH SINGLE ASPECT ARE GENERALLY RELUCTANT TO FATHOM THE TEENAGE. WHY DO THEY NOT UNDERSTAND THE CHANGES DURING THIS TRYING PERIOD OF RAVING HORMONES? TEENAGE IS NOT RELATED TO PHYSICAL CHANGES. IT HAS THE IMMENSE POTENTIAL OF CHANGING A PERSON ON VARIOUS DIMENSIONS INCLUDING SOCIAL, CULTURAL, EMOTIONAL, PHYSICAL AND BIOLOGICAL. GIVING IMPORTANCE TO THE PHYSICAL CHANGE AND IGNORING OTHER AREAS POURS OIL OVER THE ALREADY BURNING FIRE. NONE OF THE ASPECTS SHOULD BE AVOIDED. THE ROOTS OF ‘TEENAGE-CHANGES’ GO DEEP DOWN RIGHT TO THE CORE OF EVOLUTION. THEY ENGULF THE SOCIAL ASPECTS MORE STRONGLY. THE WORLD OF TEENAGERS IS FULL OF FANTASY. THIS BOOK ALLOWS THE PARENTS TO TAKE A JOY-RIDE IN THIS FANTASTIC WORLD. TEENAGE IS THE PUZZLE CREATED BY THE NATURE ITSELF. IT IS FUN SOLVING IT, THOUGH IT IS A LITTLE BIT DIFFICULT. WHILE REVEALING EACH STAGE, WE BECOME MORE EXPERIENCED AND PROSPEROUS.
प्रत्येक गोष्ट शास्त्रीयदृष्ट्या समजून घेणारे पालक वयात येणं का समजून घेऊ शकत नाहीत? कारण ‘वयात येणं’ या घटनेमागे फक्त शारीरिक बदल नाहीत, सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक, शारीरिक, जीवशास्त्रीय असे सगळेच संदर्भ टीनएजला आहेत. उत्क्रांतीपासून सामाजिकतेपर्यंत सगळीकडेच टीनएजर्सची पाळंमुळं घट्ट रुजलेली आहेत. एरवी पालकांसाठी ‘प्रवेश निषिद्ध’ असणाऱ्या किशोरवयीन मुलांच्या अद्भुतरम्य जगाची सफर या पुस्तकाने घडवून आणली आहे. एखादं न सुटणारं अवघड कोडं सोडवताना जसा आनंद मिळतो, तसाच आनंद निसर्गाने घातलेलं कोडं सोडविण्यात आहे. ‘टीनएजर्स’चं तर्कापलीकडचं गणित उकलताना जगण्याच्या प्रत्येक पायरीवर आपण अधिकाधिक समृद्ध होत जातो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#टीनएजर्स : अ नॅचरल हिस्ट्री# डेव्हिड ब्रेनब्रिज#डॉ. अस्मी अच्युते#संप्रेरकं, लैंगिक संबंध, शरीरसंबंध, प्रेम, अमली पदार्थ, शरीरातील बदल, परिपक्वता #TEENAGERS : A NATURAL HISTORY#DAVID BAINBRIDGE#DR ASMI ACHYUTE#HORMONES, SEXY SWITCH, DRUGS, LOVE
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 24-03-2019

    टीनएजकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन... केंब्रिज विद्यापिठातील प्राणिवैद्यकीय शरीररचनाकार डेव्हिड बेनब्रिज यांच्या ‘टीनएजर्स - अ नॅचरल हिस्ट्री’ या पुस्तकाचा डॉ. अस्मी अच्युते यांनी केलेला मराठी अनुवाद नुकताच प्रसिद्ध झाला आहे. वयात येणं म्हणजेच टीनएज य अवस्थेतून प्रत्येकाचा प्रवास होत असतो. या प्रवासात आपल्या मेंदूमध्ये प्रचंड प्रमाणावर बदल होत असतो. अनेक विस्मयकारक स्तरांवर होत असलेला हा शारीरिक आणि बौद्धिक बदल मनाला अचंबित करतो. हा काळ पालक आणि मुलं या दोघांसाठीही फार कठीण असतो. या अवस्थेतील मेंदू हा समस्त मानवजातीचा मध्यबिंदू आहे, अशा विश्वासातून लेखक उत्क्रांतीपर्यंतचा मागोवा घेतो. हा मागोवा घेताना लेखकाने मानवी उत्क्रांतीच्या बहुविध टप्प्यांवर घेतलेल्या आनंदानुभवामुळे पुस्तकाची वाचनीयता वाढली आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS
FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS by PAULETTE BOURGEOIS Rating Star
रश्मी मुसळे-साळगांवकर

लहानग्यांच्या विश्वातल्या छोट्या छोट्या गमतीजमती या पुस्तकांच्या मालिकेतून अगदी मजेशीर पद्धतीने मुलांसमोर येतात..त्या गोष्टी ऐकताना, वाचताना मूलं यात अगदी रमून जातात... शिवाय आजवर ससा आणि कासव यांव्यतिरिक्त इतर कथाविश्वात काहीसा दुर्लक्षित राहिलेलया कासवाच्या जगातही अनेक गंमती घडू शकतात ही नवखी कल्पना मुलांना भारीच आवडते... ...Read more

MARATHI DAULATICHE NARI SHILP
MARATHI DAULATICHE NARI SHILP by GOPAL DESHMUKH Rating Star
लोकसत्ता २२ जानेवारी २०२३.

बाईचे विश्व हे चूल आणि मूल एवढय़ापुरतेच मर्यादित नसते याची उदाहरणे आपल्याला इतिहासातसुद्धा पाहायला मिळतात. इतिहासात डोकावून पाहिले तर स्त्रियांचे आयुष्य हजार बंधनांनी जखडलेले होते. लहान वयातच मुलींची लग्नं केली जात असत. सतीची चाल, विधवांना केशपनाची सक्ती, सती जाणाऱ्या स्त्रियांच्या मरणाइतकेच सती न जाणाऱ्या विधवांचे जगणे भयंकर होते. अशा समाजातच काही स्त्रिया अशासुद्धा होऊन गेल्या ज्यांनी आपल्या कार्याने, आपल्या धाडसाने, शौर्याने महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाची भर टाकली. समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशाच काही निवडक स्त्रियांचे चरित्र रेखाटन गोपाळ देशमुख यांनी ‘मराठी दौलतीचे नारी शिल्प’ या पुस्तकात केले आहे. जिजाऊमातेने बालशिवाजींची जडणघडण केली. अशा कर्तृत्ववान जिजाबाईंचे व्यक्तिचरित्र ‘राजमाता जिजाऊ’ या प्रकरणामध्ये सारांशरूपाने रेखाटण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. तसेच शिवरायांच्या जीवनात ज्या आठ राण्या आल्या त्यांच्या जीवनकार्याचे वर्णन ‘राणीवसा’ या प्रकरणात येते. ‘महाराणी येसूबाई’ या प्रकरणात त्यांची स्वराज्यनिष्ठा व दूरदृष्टी कशी दिसून येते याचे वर्णन केले आहे. संकटसमयी संभाजी राजांना दिलेल्या सल्ल्यामुळे त्यांच्या कार्यात मदत कशी झाली याचेही वर्णन आले आहे. ताराबाई, उमाबाई दाभाडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी युद्धभूमीवर शत्रूला तोंड कसे दिले. दर्याबाई निंबाळकर, पेशवा पत्नी गोपिकाबाई, रमाबाई, गंगाबाई यांनाही व्यक्तिगत सुखदु:खाबरोबरच मराठी दौलतीच्या वाटचालीत आपली भूमिका कशी पार पाडावी लागली याचीही माहिती पुस्तकात देण्यात आली आहे. दौलतीचा कारभार करताना अहिल्याबाईंना तीस वर्षे वैयक्तिक दु:खांना सामोरे जावे लागले. या साऱ्या दु:खांना बाजूला सारून उत्कृष्ट कार्य करून त्या ‘साध्वी पुण्यश्लोक अहिल्या’ कशा झाल्या याचा थोडक्यात आढावा घेतला आहे ‘अहिल्याबाई होळकर’ या प्रकरणात. तसेच पुतळाबाई आणि रमाबाई यांचे पतिनिष्ठेचे वर्णनही वाचायला मिळते. या सर्व व्यक्तिचरित्रांपैकी ‘राणी लक्ष्मीबाई’ यांचे चरित्र वाचताना त्यांची धाडसी वृत्ती, चिकाटी, येईल त्या प्रसंगाला न घाबरता शौर्याने सामोरे जाण्याची वृत्ती व शेवटी त्यांचा झालेला शोकात्मक शेवट आपल्या मनाला चटका लावून गेल्याशिवाय राहात नाही. वयाच्या चौदाव्या वर्षी गंगाधरराव यांच्याशी विवाह झाल्यानंतर आपल्या मुलाच्या आणि पतीच्या निधनानंतर शोक करत न बसता ही वीरांगना आपला दत्तक मुलगा दामोदर याला घेऊन ब्रिटिशांच्या कटू कारस्थानांना तोंड देण्यास सज्ज झाली होती. यातच तिला वीरमरण आले. हे वीरमरण येतानासुद्धा ती मोठय़ा शौर्याने अखेरच्या क्षणापर्यंत लढली आणि जेव्हा आपला देह आपल्याला साथ देत नाही हे लक्षात आले तेव्हा तिने आपल्या अनुयायांना आपला देह शत्रूच्या हातात पडता कामा नये, त्याला अग्नी द्या, असे सांगितले. अशा या वीरांगनेची गर्जना ‘मै मेरी झांसी नही दूंगी’ ही आजही अनेक स्त्रियांना आपल्या कामात प्रेरणा देणारी अशी आहे. राणी लक्ष्मीबाईच्या मरणाविषयी अनेक हकीकती उपलब्ध आहेत. त्यांचा उल्लेखही या पुस्तकात आला आहे. या पुस्तकातील स्त्रिया इतिहासकालीन असल्याने काही ठिकाणी ऐतिहासिक संदर्भाची पुनरावृत्ती झाल्यासारखे वाटते; पण ते येणेसुद्धा गरजेचे आहे. साध्या सोप्या भाषेत ही स्त्री चरित्रे आपल्याला वाचायला मिळतात. थोडक्यात असे म्हणता येईल की, इतिहासकाळातील थोर महिला विभूतींच्या जीवनकार्याचा अल्पांशाने सार वाचकांपुढे मांडण्याचा प्रयत्न लेखक गोपाळ देशमुख यांनी केला आहे, तो कौतुकास्पद आहे. ...Read more