* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TEENAGERS
  • Availability : Available
  • Translators : DR.ASMI ACHYUTE
  • ISBN : 9789353171957
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 268
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Discount : WORLD BOOK DAY OFFER 23 APRIL(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Print Books:
PARENTS WHO ARE ALWAYS EAGER TO UNDERSTAND THE SCIENCE BEHIND EACH SINGLE ASPECT ARE GENERALLY RELUCTANT TO FATHOM THE TEENAGE. WHY DO THEY NOT UNDERSTAND THE CHANGES DURING THIS TRYING PERIOD OF RAVING HORMONES? TEENAGE IS NOT RELATED TO PHYSICAL CHANGES. IT HAS THE IMMENSE POTENTIAL OF CHANGING A PERSON ON VARIOUS DIMENSIONS INCLUDING SOCIAL, CULTURAL, EMOTIONAL, PHYSICAL AND BIOLOGICAL. GIVING IMPORTANCE TO THE PHYSICAL CHANGE AND IGNORING OTHER AREAS POURS OIL OVER THE ALREADY BURNING FIRE. NONE OF THE ASPECTS SHOULD BE AVOIDED. THE ROOTS OF ‘TEENAGE-CHANGES’ GO DEEP DOWN RIGHT TO THE CORE OF EVOLUTION. THEY ENGULF THE SOCIAL ASPECTS MORE STRONGLY. THE WORLD OF TEENAGERS IS FULL OF FANTASY. THIS BOOK ALLOWS THE PARENTS TO TAKE A JOY-RIDE IN THIS FANTASTIC WORLD. TEENAGE IS THE PUZZLE CREATED BY THE NATURE ITSELF. IT IS FUN SOLVING IT, THOUGH IT IS A LITTLE BIT DIFFICULT. WHILE REVEALING EACH STAGE, WE BECOME MORE EXPERIENCED AND PROSPEROUS.
प्रत्येक गोष्ट शास्त्रीयदृष्ट्या समजून घेणारे पालक वयात येणं का समजून घेऊ शकत नाहीत? कारण ‘वयात येणं’ या घटनेमागे फक्त शारीरिक बदल नाहीत, सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक, शारीरिक, जीवशास्त्रीय असे सगळेच संदर्भ टीनएजला आहेत. उत्क्रांतीपासून सामाजिकतेपर्यंत सगळीकडेच टीनएजर्सची पाळंमुळं घट्ट रुजलेली आहेत. एरवी पालकांसाठी ‘प्रवेश निषिद्ध’ असणाऱ्या किशोरवयीन मुलांच्या अद्भुतरम्य जगाची सफर या पुस्तकाने घडवून आणली आहे. एखादं न सुटणारं अवघड कोडं सोडवताना जसा आनंद मिळतो, तसाच आनंद निसर्गाने घातलेलं कोडं सोडविण्यात आहे. ‘टीनएजर्स’चं तर्कापलीकडचं गणित उकलताना जगण्याच्या प्रत्येक पायरीवर आपण अधिकाधिक समृद्ध होत जातो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#टीनएजर्स : अ नॅचरल हिस्ट्री# डेव्हिड ब्रेनब्रिज#डॉ. अस्मी अच्युते#संप्रेरकं, लैंगिक संबंध, शरीरसंबंध, प्रेम, अमली पदार्थ, शरीरातील बदल, परिपक्वता #TEENAGERS : A NATURAL HISTORY#DAVID BAINBRIDGE#DR ASMI ACHYUTE#HORMONES, SEXY SWITCH, DRUGS, LOVE
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 24-03-2019

    टीनएजकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन... केंब्रिज विद्यापिठातील प्राणिवैद्यकीय शरीररचनाकार डेव्हिड बेनब्रिज यांच्या ‘टीनएजर्स - अ नॅचरल हिस्ट्री’ या पुस्तकाचा डॉ. अस्मी अच्युते यांनी केलेला मराठी अनुवाद नुकताच प्रसिद्ध झाला आहे. वयात येणं म्हणजेच टीनएज य अवस्थेतून प्रत्येकाचा प्रवास होत असतो. या प्रवासात आपल्या मेंदूमध्ये प्रचंड प्रमाणावर बदल होत असतो. अनेक विस्मयकारक स्तरांवर होत असलेला हा शारीरिक आणि बौद्धिक बदल मनाला अचंबित करतो. हा काळ पालक आणि मुलं या दोघांसाठीही फार कठीण असतो. या अवस्थेतील मेंदू हा समस्त मानवजातीचा मध्यबिंदू आहे, अशा विश्वासातून लेखक उत्क्रांतीपर्यंतचा मागोवा घेतो. हा मागोवा घेताना लेखकाने मानवी उत्क्रांतीच्या बहुविध टप्प्यांवर घेतलेल्या आनंदानुभवामुळे पुस्तकाची वाचनीयता वाढली आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more