* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: FOR WHOM THE BELL TOLLS
  • Availability : Available
  • Translators : D.B.MOKASHI
  • ISBN : 9789353172640
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 1941
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 472
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Sub Category : HISTORICAL, MODERN & CONTEMPORARY FICTION
  • Available in Combos :AMERICAN CLASSICS COMBO SET-17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE NOVEL GRAPHICALLY DESCRIBES THE BRUTALITY OF THE CIVIL WAR IN SPAIN DURING THIS TIME. IT IS TOLD PRIMARILY THROUGH THE THOUGHTS AND EXPERIENCES OF THE PROTAGONIST, ROBERT JORDAN. IT DRAWS ON HEMINGWAY`S OWN EXPERIENCES IN THE SPANISH CIVIL WAR AS A REPORTER FOR THE NORTH AMERICAN NEWSPAPER ALLIANCE.[11] JORDAN IS AN AMERICAN WHO HAD LIVED IN SPAIN DURING THE PRE-WAR PERIOD, AND FIGHTS AS AN IRREGULAR SOLDIER FOR THE REPUBLIC AGAINST FRANCISCO FRANCO`S FASCIST FORCES. AN EXPERIENCED DYNAMITER, HE IS ORDERED BY A RUSSIAN GENERAL TO TRAVEL BEHIND ENEMY LINES AND DESTROY A BRIDGE WITH THE AID OF A BAND OF LOCAL ANTI-FASCIST GUERRILLAS, IN ORDER TO PREVENT ENEMY TROOPS FROM RESPONDING TO AN UPCOMING OFFENSIVE. ON HIS MISSION, JORDAN MEETS THE REBEL ANSELMO WHO BRINGS HIM TO THE HIDDEN GUERRILLA CAMP AND INITIALLY ACTS AS AN INTERMEDIARY BETWEEN JORDAN AND THE OTHER GUERRILLA FIGHTERS. IN THE CAMP, JORDAN ENCOUNTERS MARÍA, A YOUNG SPANISH WOMAN WHOSE LIFE HAD BEEN SHATTERED BY HER PARENTS` EXECUTION AND HER RAPE AT THE HANDS OF THE FALANGISTS (PART OF THE FASCIST COALITION) AT THE OUTBREAK OF THE WAR. HIS STRONG SENSE OF DUTY CLASHES WITH BOTH THE UNWILLINGNESS OF THE GUERRILLA LEADER PABLO TO COMMIT TO AN OPERATION THAT WOULD ENDANGER HIMSELF AND HIS BAND, AND JORDAN`S OWN NEW-FOUND LUST FOR LIFE WHICH ARISES FROM HIS LOVE FOR MARÍA. PABLO`S WIFE, PILAR, WITH THE SUPPORT OF THE OTHER GUERILLAS, DISPLACES PABLO AS THE GROUP LEADER AND PLEDGES THE ALLEGIANCE OF THE GUERRILLAS TO JORDAN`S MISSION. WHEN ANOTHER BAND OF ANTI-FASCIST GUERRILLAS, LED BY EL SORDO, IS SURROUNDED AND KILLED DURING A RAID THEY CONDUCTED IN SUPPORT OF JORDAN`S MISSION, PABLO STEALS THE DYNAMITE DETONATORS AND EXPLODER, HOPING TO PREVENT THE DEMOLITION AND THEREBY AVOID FASCIST REPRISALS. ALTHOUGH HE DISPOSES OF THE DETONATORS AND EXPLODER BY THROWING THEM DOWN A GORGE INTO THE RIVER, PABLO REGRETS ABANDONING HIS COMRADES AND RETURNS TO ASSIST IN THE OPERATION.
‘घणघणतो घंटानाद’ हे दि. बा. मोकाशी यांचे पुस्तक मूळ लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या ‘फॉर हूम द बेल टोल्स’ या कादंबरीवर आधारित आहे. स्पेनमध्ये झालेल्या नागरी युद्धाच्या काळात लोकांना जो क्रौर्याचा सामना करावा लागला त्याचे वर्णन या कादंबरीत आहे. प्रत्यक्ष युद्धात सहभागी असलेल्यांचे विशेषतः रॉबर्ट जॉर्डनचे विचार आणि कार्यानुभवांतूनच ही कथा साकारली आहे. तसेच उत्तर अमेरिकेतील वृत्तपत्रांसाठी स्पॅनिश नागरी युद्धाचे वार्तांकन करताना हेमिंग्वे यांनी जे पाहिले आणि अनुभवले तेही यामध्ये आले आहे. जॉर्डनचा फॅसिस्टांविरुद्धचा संघर्ष कोणत्या वळणाने जातो, याचं यशासांग चित्रण असणारं पुस्तक म्हणजे घणघणतो घंटानाद होय. या पुस्तकावर आधारित ‘फॉर हूम द बेल टोल्स’ हा चित्रपटही 1943 मध्ये प्रदर्शित झालेला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#FORWHOMTHEBELLTOLLS #GHANGHANTOGHANTANAD #ERNESTHEMINGWAY #DBMOKASHI #SPAINCIVILWAR #ROBERTJORDAN #MARATHITRANSLATION #MARATHIBOOKS #AMERICANCLASSICS # #घणघणतोघंटानाद #दिबामोकाशी #अर्नेस्टहेमिंग्वे #स्पेनयुद्ध #राॅबर्टजाॅर्डन #फाॅरहूमदबेलटोल्स #मराठीअनुवाद #मराठीपुस्तके #अमेरिकनक्लासिक #
Customer Reviews
  • Rating StarDivya Marathi 23.11.19

    स्पेनमधील नागरी युद्धाच्या क्रौर्याचा यथासांग पट मांडणारी कादंबरी...दि. बा. मोकाशी हे मराठी वाङ्मयाच्या इतिहासातील एक महत्त्वाचं नाव. विशेषत: मराठी कथाविश्वात त्यांचं स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. मोकाशींनी दोन पुस्तकांचा अनुवादही केला होता. त्यातील अर्नस्ट हेमिंग्वे यांच्या `फॉर हूम द बेल टोल्स` कादंबरीचं भाषांतर `घणघणतो घंटानाद` या शीर्षकाने त्यांनी केलं आहे. स्पेनमध्ये झालेल्या नागरी युद्धाच्या काळात लोकांना जो क्रौर्याचा सामना करावा लागला त्याचं वर्णन या कादंबरीत आहे. प्रत्यक्ष युद्धात सहभागी असलेल्यांचे विशेषतः रॉबर्ट जॉर्डनचे विचार आणि कार्यानुभवांतूनच ही कथा साकारली आहे. तसेच उत्तर अमेरिकेतील वृत्तपत्रांसाठी स्पॅनिश नागरी युद्धाचं वार्तांकन करताना हेमिंग्वे यांनी जे पाहिलं आणि अनुभवलं तेही यामध्ये आलं आहे. मूळचा अमेरिकन असलेला जॉर्डन या युद्धापूर्वीपासून स्पेनमध्ये राहत असतो आणि लोकशाहीसाठी फॅसिस्टांविरुद्धच्या चळवळीत तो हंगामी सैनिक म्हणून वावरत असतो. तो अनुभवी सुरुंगउडव्या म्हणूनही प्रसिद्ध असतो. साहजिकच रशियाच्या जनरलने त्याला शत्रूसैन्याच्या रेषेमागे प्रवास करत फॅसिस्टांविरुद्ध लढणाऱ्या स्थानिक गॉरिलांच्या मदतीसाठी एक पूल उडवण्याचा आदेश दिलेला असतो. या मोहिमेदरम्यान जॉर्डनची बंडखोर नेता अॅन्सेल्मोशी भेट होते. अॅन्सेल्मो त्याला गॉरिलांच्या छुप्या अड्ड्यामध्ये घेऊन जातो व तो स्वत: जॉर्डन आणि गॉरिलांमध्ये सहायकाची भूमिका बजावतो. या कॅम्पमध्ये (अड्डा), आई-वडिलांना झालेल्या देहदंडामुळे आणि स्वत:वरील अत्याचारामुळे मानसिक धक्का बसलेल्या मुलीशी - मेरियाशी - जॉर्डनची प्रेमभेट होते. कॅम्पमधील गॉरिलांचा नेता पाब्लो स्वकर्तव्याशी प्रामाणिक असलेल्या आणि नियोजित कामगिरी पार पाडण्यास पुढे सरसावलेल्या जॉर्डनला मदत करण्याऐवजी जीवावरील संकटाच्या भीतीने त्यापासून परावृत्त करू पाहतो, तर पाब्लोची पत्नी - पिलर आणि इतर गॉरिलांची जॉर्डनला साथ मिळते. जेव्हा दुसऱ्या एका फॅसिस्टविरोधी गटाचा नेता एल् सार्दो चकमकीत शत्रूकडून मारला जातो, तेव्हा पाब्लो जॉर्डनच्या मोहिमेत येतो; पण पाब्लोच्या या मोहिमेत येण्याने या मोहिमेला एक वेगळंच वळण मिळतं. वास्तविक, युद्धाच्या पार्श्वभूमीवरची ही कादंबरी आहे; पण तरीही यातील संघषार्च संयतपणे चित्रण केलं गेलं आहे, हे नमूद करावंसं वाटतं. फॅसिस्ट असतील किंवा गॉरिला, ती माणसं आहेत. युद्धाचा एक भाग म्हणून ते शत्रूची हत्या करतात; पण या गोष्टीची त्यांच्या मनात कुठेतरी खंत आहे. बंडखोर नेता अॅन्सेल्मोच्या मनातील विचारांतून ही खंत अधोरेखित होते. त्याच्या मनात आलं- `फॅसिस्ट उबेत आहेत. ते आज आरामात आहेत; पण उद्या आम्ही त्यांना मारू. किती विचित्र वाटतोय हा विचार! तो मनात आणणंही बरं वाटत नाही. दिवसभर मी त्यांना पाहतो आहे. ती आमच्याप्रमाणे माणसंच आहेत... ते लोक फॅसिस्ट नाहीत. मी त्यांना फॅसिस्ट म्हणतो, पण ते फॅसिस्ट नाहीत. आमच्यासारखेच ते गरीब आहेत. आमच्याविरुद्ध ते लढायला उभे राहायला नको होते. त्यांना मारण्याचा विचार मनाला रुचत नाही.` __ या पार्श्वभूमीवर पाब्लोची व्यक्तिरेखाही उठून दिसते. पाब्लो भ्याड आहे, असं नाही; पण युद्धाच्या किंवा संघर्षाच्या निमित्ताने त्याच्या हातून इतक्या हत्या घडल्या आहेत, की त्याला ते सगळं आता नको वाटतंय; म्हणून तो जॉर्डनलाही फॅसिस्टांशी लढण्यापासून परावृत्त करू पाहतो. अॅन्सेल्मोच्या मनात पाब्लोविषयी विचार येतात त्यावरून हे स्पष्ट होतं. अॅन्सेल्मोच्या मनात येतं `पाब्लोनं चौकीचे लोक झोपले होते, त्या खोलीत खिडकीतून बॉम्ब फेकला. त्याचा स्फोट झाला, तेव्हा सगळी पृथ्वी डोळ्यांसमोर लालपिवळी होऊन फुटावी तसं वाटलं. तोपर्यंत आणखी दोन बॉम्ब आत गेले होते. त्यांच्या पिना काढून ते झटकन खिडकीतून फेकले गेले. या दुसऱ्या बॉम्बमुळे, जे झोपले असल्यानं आधी मेले नव्हते, ते जागे होऊन उठू लागताच मेले. एखाद्या तार्तारप्रमाणे देशभर पाब्लो धुमाकूळ घालीत होता. त्याच्या तेव्हाच्या ऐन बहरातील ही गोष्ट आहे. तेव्हा एकही फॅसिस्ट चौकी सुरक्षित नव्हती आणि तोच पाब्लो आता खलास झाला आहे. खच्ची केलेल्या बैलासारखा खलास झाला आहे.` ...Read more

  • Rating StarSHIVMARG - AUGUST 2019

    युद्धाच्या पार्श्वभूमीवरील कादंबरी... दि. बा. मोकाशी हे मराठी वाङ्मयाच्या इतिहासातील एक महत्त्वाचं नाव. विशेषत: मराठी कथाविश्वात त्यांचं स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. मोकाशींनी दोन पुस्तकांचा अनुवादही केला होता. त्यातील अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या ‘फॉरहूम द बेल टोल्स’ कादंबरीचं भाषांतर ‘घणघणतो घंटानाद’ या शीर्षकाने त्यांनी केलं आहे. स्पेनमध्ये झालेल्या नागरी युद्धाच्या काळात लोकांना जो क्रौर्याचा सामना करावा लागला त्याचं वर्णन या कादंबरीत आहे. प्रत्यक्ष युद्धात सहभागी असलेल्यांचे विशेषतः रॉबर्ट जॉर्डनचे विचार आणि कार्यानुभवांतूनच ही कथा साकारली आहे. तसेच उत्तर अमेरिकेतील वृत्तपत्रांसाठी स्पॅनिश नागरी युद्धाचं वार्तांकन करताना हेमिंग्वे यांनी जे पाहिलं आणि अनुभवलं तेही यामध्ये आलं आहे. मूळचा अमेरिकन असलेला जॉर्डन या युद्धापूर्वीपासून स्पेनमध्ये राहत असतो आणि लोकशाहीसाठी फॅसिस्टांविरुद्धच्या चळवळीत तो हंगामी सैनिक म्हणून वावरत असतो. तो अनुभवी सुरुंगउडव्या म्हणूनही प्रसिद्ध असतो. साहजिकच रशियाच्या जनरलने त्याला शत्रूसैन्याच्या रेषेमागे प्रवास करत फॅसिस्टांविरुद्ध लढणाऱ्या स्थानिक गॉरिलांच्या मदतीसाठी एक पूल उडवण्याचा आदेश दिलेला असतो. या मोहिमेदरम्यान जॉर्डनची बंडखोर नेता अॅन्सेल्मोशी भेट होते. अॅन्सेल्मो त्याला गॉरिलांच्या छुप्या अड्ड्यामध्ये घेऊन जातो व तो स्वतः जॉर्डन आणि गॉरिलांमध्ये सहायकाची भूमिका बजावतो. या कॅम्पमध्ये (अड्डा), आई-वडिलांना झालेल्या देहदंडामुळे आणि स्वतःवरील अत्याचारामुळे मानसिक धक्का बसलेल्या मुलीशी - मेरियाशी - जॉर्डनची प्रेमभेट होते. कॅम्पमधील गॉरिलांचा नेता पाब्लो स्वकर्तव्याशी प्रामाणिक असलेल्या आणि नियोजित कामगिरी पार पाडण्यास पुढे सरसावलेल्या जॉर्डनला मदत करण्याऐवजी जीवावरील संकटाच्या भीतीने त्यापासून परावृत्त करू पाहतो, तर पाब्लोची पत्नी - पिलर आणि इतर गॉरिलांची जॉर्डनला साथ मिळते. जेव्हा दुसऱ्या एका फॅसिस्टविरोधी गटाचा नेता एल् सार्दो चकमकीत शत्रूकडून मारला जातो, तेव्हा पाब्लो जॉर्डनच्या मोहिमेत येतो; पण पाब्लोच्या या मोहिमेत येण्याने या मोहिमेला एक वेगळंच वळण मिळतं. वास्तविक, युद्धाच्या पार्श्वभूमीवरची ही कादंबरी आहे; पण तरीही यातील संघर्षाचं संयतपणे चित्रण केलं गेलं आहे, हे नमूद करावंसं वाटतं. फॅसिस्ट असतील किंवा गॉरिला, ती माणसं आहेत. युद्धाचा एक भाग म्हणून ते शत्रूची हत्या करतात; पण या गोष्टीची त्यांच्या मनात कुठेतरी खंत आहे. बंडखोर नेता अॅन्सेल्मोच्या मनातील विचारांतून ही खंत अधोरेखित होते. त्याच्या मनात आलं– ‘फॅसिस्ट उबेत आहेत. ते आज आरामात आहेत; पण उद्या आम्ही त्यांना मारू. किती विचित्र वाटतोय हा विचार! तो मनात आणणंही बरं वाटत नाही. दिवसभर मी त्यांना पाहतो आहे. ती आमच्याप्रमाणे माणसंच आहेत... ते लोक फॅसिस्ट नाहीत. मी त्यांना फॅसिस्ट म्हणतो, पण ते फॅसिस्ट नाहीत. आमच्यासारखेच ते गरीब आहेत. आमच्याविरुद्ध ते लढायला उभे राहायला नको होते. त्यांना मारण्याचा विचार मनाला रुचत नाही.’ या पार्श्वभूमीवर पाब्लोची व्यक्तिरेखाव्याqक्तरेखाही उठून दिसते. पाब्लो भ्याड आहे, असं नाही; पण युद्धाच्या किंवा संघर्षाच्या निमित्ताने त्याच्या हातून इतक्या हत्या घडल्या आहेत, की त्याला ते सगळं आता नको वाटतंय; म्हणून तो जॉर्डनलाही फॅसिस्टांशी लढण्यापासून परावृत्त करू पाहतो. अॅन्सेल्मोच्या मनात पाब्लोविषयी विचार येतात त्यावरून हे स्पष्ट होतं. अॅन्सेल्मोच्या मनात येतं ‘पाब्लोनं चौकीचे लोक झोपले होते, त्या खोलीत खिडकीतून बॉम्ब फेकला. त्याचा स्फोट झाला, तेव्हा सगळी पृथ्वी डोळ्यांसमोर लालपिवळी होऊन फुटावी तसं वाटलं. तोपर्यंत आणखी दोन बॉम्ब आत गेले होते. त्यांच्या पिना काढून ते झट्कन खिडकीतून फेकले गेले. या दुसऱ्या बॉम्बमुळे, जे झोपले असल्यानं आधी मेले नव्हते, ते जागे होऊन उठू लागताच मेले. एखाद्या तार्तारप्रमाणे देशभर पाब्लो धुमाकूळ घालीत होता. त्याच्या तेव्हाच्या ऐन बहरातील ही गोष्ट आहे. तेव्हा एकही फॅसिस्ट चौकी सुरक्षित नव्हती आणि तोच पाब्लो आता खलास झाला आहे. खच्ची केलेल्या बैलासारखा खलास झाला आहे.’ एकूण, या कादंबरीतील व्यक्तिरेखा किंवा आशय व्यामिश्र नाही; पण माणसांतील क्रौर्य आणि त्याला हवी असलेली शांती, या दोन टोकांमधील जीवनाचा कुठेतरी मेळ घातला पाहिजे, असा संदेश ही कादंबरी देते, असं म्हणायला हरकत नसावी. तेव्हा त्या संदेशासाठी ही कादंबरी अवश्य वाचावी. -अंजली पटवर्धन ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHASAMRAT RANKHAINDAL
MAHASAMRAT RANKHAINDAL by VISHWAS PATIL Rating Star
गंधार

नमस्ते सर, काल रात्री मी रणखैनदळ मध्ये आपण लिहलेला पावनखिंडीतील थरार वाचून काढला. कालची रात्र मी कधीच विसरणार नाही. जणू काही मीच महाराजांसोबत प्रवास करणारा एक मावळा आहे. महाराज थकल्यावर त्यांच्या तळपायांना राईचं तेल चोळून देतो आहे, त्यांच्यासह नाचणीच भाकर खातो आहे असं मला वाटतं होतं. सर, एखाद्या लहान मुलाला आकाशातल्या तारका दाखवाव्यात त्याचप्रमाणे आपण इतिहासाच्या नभांगणातील असंख्य तारकांचं दर्शन घडवून आणता आणि छत्रपती शिवराय हा अर्थातच ताऱ्यांमधील तारा असा ध्रुवतारा आहे ज्याचं अनोखं असं दर्शन महासम्राट मधून घडतंय. सर, माझी केवळ मागच्या जन्मीची पुण्याई म्हणून मी आपल्याला भेटू शकलो. ...Read more

FOUR SEASONS
FOUR SEASONS by SHARMILA PHADKE Rating Star
लोकसत्ता १०.९.२०२३ (लोकरंग) वंदना बोकील-कुलकर्णी

माणसांवाचून रिकामी गावं, रस्ते, घरं न पाहवणारी, अंजनमाळावरच्या नागदेवीच्या कातळावर रणरण उन्हात सर्वागाने उन्हं पिऊन घेणारी, आपली उन्हात तापून दग्ध तांबूस झालेली देहाकृती व्हिन्सेंटने (व्हान गॉग) पाहावी आत्ता या क्षणी आणि तिच्या मोहात पडून त्यानेती आपल्या कॅनव्हासवर रेखाटावी असं आसुसून वाटणारी एक अतिसंवेदनशील तरुणी कामायनी ही शर्मिला फडके यांच्या ‘फोर सीझन्स’ या कादंबरीची नायिका. या नायिकेची चार प्रदेशात, चार ऋतूंमध्ये, चार पुरुषांच्या सहवासात घडणारी कहाणी म्हणून तिचं शीर्षक ‘फोर सीझन्स’. ‘फोर सीझन्स’ ही खऱ्या अर्थाने आत्ताची कादंबरी आहे. कदाचित पहिली ब्लॉग कादंबरी. कारण लेखिकेने कादंबरीच्या नायिकेच्या नावाने ‘टय़ुलिप्स अॅण्ड ट्वायलाइट’ या ब्लॉगवर पोस्ट्स लिहिल्या. ‘कादंबरीने बऱ्यापैकी आकार घेतल्यावर, व्यक्तिरेखा सुस्पष्ट झाल्यावर’ मग हा ब्लॉग तिने बंद केला. ‘ब्लॉग अर्काइव्हमध्ये जमा झालेल्या शेकडो पोस्ट्सवरून मॅपिंग करत’ कादंबरीचा आत्ताचा आकार तिने सिद्ध केला. हिची निर्मितीप्रक्रिया आत्ताच्या तंत्रसाहाय्याने, समाजमाध्यमांचा शहाणा उपयोग करून घेऊन झाली आहे. या अर्थाने ही आत्ताची कादंबरी. अलीकडे म्हणजे साधारण गेल्या दहा वर्षांत नव्याने लिहू लागलेल्या लेखकांत हिरिरीने आपली भूमिकावाहक पात्रे निर्माण करण्याची जी वृत्ती दिसते तिच्यात न अडकता आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहत आणि तरी कथनात्म साहित्याच्या मागण्या नीट कळून घेत लेखन करणाऱ्यांमध्ये शर्मिला फडके ही लेखिका लक्ष वेधून घेते. मोजके लेखन आहे तिचे पण खरेच लक्षात राहणारे. गेल्या पाच-सहा वर्षांत विविध दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झालेल्या तिच्या कथा पाहिल्या तरी हे पटेल. ‘ये शहर बडा पुराना है’ ही कथा वाचकांना ताबडतोब आठवेल. याशिवाय विविध ठिकाणी कलाइतिहास, कलासमीक्षा, प्रवास याही विषयांवर तिचे लेखन सातत्याने चालू आहे. तिचे मूळ शिक्षण वनस्पतीशास्त्र या विषयातलं. नंतर पत्रकारिता आणि कलाइतिहास यांचेही पदव्युत्तर शिक्षण तिने घेतले. ही तिन्ही क्षेत्रं भटकंतीला पूरक. शर्मिला फडके यांना प्रवासाचीही आवड आहे. फॅशनेबल पर्यटन नव्हे, प्रवास. खरीखुरी हवा, माती, झाडंझुडं, पाणी, नद्या अंगावर घेत केलेला प्रवास. आणि हे करताना त्यांच्या संवेदना तल्लखपणे आजूबाजू टिपून घेत असतात. त्यामुळे त्यांच्या लेखनाचे विषय अनोखे आणि साहजिकपणे त्यांच्या अभ्यासविषयाशी आतून नातं सांगणारे असले तरी आजूबाजूला असलेलं वातावरण, सामाजिक-सांस्कृतिक घडामोडी यांचं भान असलेल्या एका डोळस कलाप्रेमी स्त्रीचं अनुभवविश्व त्यातून आकाराला येतं. ‘फोर सिझन्स’ ही त्यांची कादंबरी लेखक म्हणून त्यांचे जे वृत्तिविशेष आहेत त्यांचा प्रत्यय देणारी आहे. स्त्रियांनी लिहायचे ते खास त्यांच्याच रूढ अनुभवविश्वाविषयी असा जणू पायंडा पडलेला असताना ही लेखिका मात्र अशा विश्वाचा पसारा मांडते की जे खरंच अनवट आहे. या कथनाची नायिका कामायनी मुंबई, सुंदरबन, युरोप आणि माळरान अशा भूप्रदेशांमध्ये काही काळ वावरते. नुसती वावरत नाही तर जिवेभावे तिथे गुंतते. चार भूप्रदेश, तिथे भेटलेले चार पुरुष- तेही भिन्न विचारसरणीचे, प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे, त्यांच्या विचारांचा खोलवर परिणाम होऊन कच्च्या वयापासून वैचारिक, भावनिक आणि मानसिक गोंधळात वाढत गेलेली ही तीव्र बुद्धिमत्ता आणि कमालीची संवेदनशील असणारी मुलगी. मुंबईमध्ये वडिलांच्या वयाचा त्यांचा मित्र आणि तिला अगदी जन्मापासून ओळखणारा तिचा पालक म्हणावा असा जोसेफ, अनिर्बन बॅनर्जीच्या प्रभावाखाली सुंदरबनात दाखल, पण तिथे मनासारखे काहीच घडत नाही. उलट प्रेमात आणि कामात अपयश घेऊन पळून येणं. मग काही काळ पुन्हा मुंबई. मग जोसेफ तिला युरोपात पाठवतो. तिथे भेटतो इटालियन एरिक. तिथेही तेच घडते. विझून गेलेली, हरलेली आणि आत्मविश्वास गमावून बसलेली ती पुन्हा मुंबईत जोसेफच्या वळचणीला येते. तो तिला एक काम देऊन अंजनमाळ या माळरानावर पाठवतो. तिथे भेटतो विहान. माणूस आहे तिथे मतं आणि मतभेद आहेत, गुंतणं-गाठी बसणं आहे, संघर्ष तर आहेतच. पण या माळरानावर तेवढी ती तिची आहे. ती माळरानाच्याच प्रेमात पडते. कादंबरीत पात्रे म्हणाल तर कामायनीचे आईबाबा, त्यांच्याच बंगल्याच्या दुसऱ्या भागात राहणारे बानिदा, इरादी बॅनर्जी आणि त्यांचा मुलगा अनिर्बन, जोसेफ, एरिक, माळरानावर संशोधन करणारा विहान आणि त्याचे काका आस्ताद, रघु, मधोक हे मित्र आणि ती जिथे काम करते तिथले श्रीरंजन, निर्मल, नाडकर्णी वगैरे सहकारी. गेस्ट हाऊसची राखण करणारे राणू व लाखी आणि दहाबारा वर्षांची त्यांची मुलगी मणी. मरून गेलेली मार्गारेट फिलीप ग्रॅहम ही वनस्पतींची अभ्यासक, तिच्याशी एकनिष्ठ असलेला येशा हा तिचा मदतनीस पोरगा- ज्याची आता शंभरी उलटून गेली आहे. बस्स. माणसांचा आणि त्यांच्या नात्यांचा मोठा पसारा नाही मांडत लेखिका. या सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात जिवंत आहे तो निसर्ग. तोही तुमच्या आमच्या नेहमीच्या सवयीचा, चकचकीत, कॅमेरा किंवा तत्सदृश शब्दांतून दिसणारा, जणू काय आपलं मनोरंजन करण्याच्या डय़ुटीवर नेमलेला नव्हे. इथे त्याची जिवंत स्पंदनं आपल्याला जाणवतात. आपण उन्हात तापतो, आपल्याला उन्हाचा खरपूस वास येऊ लागतो. आपण सुंदरबनातल्या काळय़ा पाण्यात आणि दलदलीत पाय टाकायला कचरतो.. हा असा साक्षात अनुभव लेखिका तुम्हाला देते. अतिशय वैशिष्टय़पूर्ण रचना आहे या कादंबरीची. कधी प्रथमपुरुषी निवेदन, कधी तृतीयपुरुषी. कधी दैनंदिनीतल्या नोंदी. कधी नायिकेने स्वत:शीच केलेले विचार, कधी तिला पडणारी स्वप्नं तर कधी मार्गारेटच्या दैनंदिनीतल्या नोंदी. मुख्य प्रकरणं चार. ऋतू पहिला, ऋतू दुसरा.. अशा शीर्षकांची. त्यात उपशीर्षके असलेले लहान लहान परिच्छेद. कदाचित आधी ब्लॉग लिहून मग त्यातून कादंबरीचे कथानक रचल्यामुळे असेल, पण ही रचना एकाच वेळी अनेक पातळय़ांवर फिरते. त्यामुळे अनेक दिशीय, अनेक स्तरीय वास्तवाचा अनुभव वाचतावाचता येत राहतो. कादंबरीच्या आशयाशी इतकं थेट संलग्न असलेलं विविध पातळय़ांवर फिरणारं निवेदनतंत्र वाचकांच्या सवयीचे नाही. पण एकदा का तुम्ही या नायिकेबरोबर तिच्या पावलांनी चालू लागलात की.. आणि तसे चालताच तुम्ही.. की मात्र या निवेदनाची जादू आणि गंमत समजते. नायिकेची गोष्ट कधी ती सांगते तर कधी निवेदिका सांगते. निवेदनतंत्र इतक्या ताकदीने वापरणं आणि ते ‘वापरलं आहे’ याची जाणीव होऊ न देणं, यात या कादंबरीचं बरंच यश सामावलं आहे. उत्तम भाषाशैली आणि प्रतिमांचा फार नेमका वापर यांचाही त्यात वाटा आहेच. नायिका जशी जगते आहे, निसर्गाच्या चक्रातून स्वत:चे आयुष्य समजून घेते आहे तसं हे लेखन आहे. आखीव नाही, असं वाटणारं. तिची नजर जाते तो तो निसर्गाचा आविष्कार ती सांगते. नायिकेच्या रंग, गंध आणि स्पर्शाच्या संवेदना विशेष तल्लख आहेत. त्यामुळे तिच्या वर्णनांत चित्रकाराच्या पॅलेटवरचे रंग आणि त्यांच्या अगणित छटा येत-जात राहतात. व्हान गॉग, मोने वगैरे चित्रकारांच्या चित्रांचे संदर्भ येतात. सुंदरबन आणि युरोपातल्या आठवणी त्यात आपले धागे मिसळत राहतात. ती मनातले गोंधळ उघड करते. ते गोंधळ का निर्माण झाले, याचा वाचकांच्या साक्षीने शोध घेते. पहिल्याच मोठय़ा प्रकरणात आता लेखिका हे सारे कसे सोडवणार, म्हणून उत्सुकता आणि काळजीही वाटते कारण सरधोपट निवेदनाचा रस्ता तिने सोडून दिला आहे. या कादंबरीत आहे तसं रखरख माळरान कुणी कधी शब्दांतून क्वचितच मांडलं असेल. उन्हाच्या सुया डोळय़ांत घुसत असताना ही एका आंतरिक हट्टानं तिथे राहते. जगते. त्या उन्हात तिच्या आतले बर्फाचे गोठलेले प्रदेश वितळून वहाते होतात. तिची ती तिला सापडत जाते. ज्या प्रश्नांपासून ती पळत होती, त्या प्रश्नांना भिडण्याचे बळ ते ऊन तिला देते. अवघ्या तीस वर्षांच्या तिच्या आयुष्यात झालेले गुंते, गाठी हळूहळू सुटत जातात, सुरुवातीची ‘टय़ुलिपचे फूल वाटणारी ती अखेरीस एखादे रानफूल वाटू लागते.’ त्या प्रवासाची ही कहाणी आहे. या नायिकेला मिथक, लोककथा, झाडं-पानं-फुलं-पक्षी या सगळय़ांत रस आहे. नागदेवीच्या कातळाची कहाणी, आदिवासी तिथे करत असलेले विधी समजून घेण्याचा तिचा प्रयत्न आहे. राणू, त्याचा शंभरी पार केलेला वृद्ध बाप येशा, यांच्याशी संवाद साधण्याची, त्यांच्याकडून जुनी घटितं जाणून घेण्याची आणि ते ठिपके जोडत सलग चित्र पूर्ण करण्याची तिला निकड वाटते. मणी तर तिची छोटी मैत्रीण होऊन जाते. या कादंबरीच्या गाभ्याकडे अनेक वाटांनी जावं लागतं.. नायिकेच्या आई-वडिलांचं नातं विस्कटलेलं असणं, तिचं आईशिवाय मोठ होणं, वडिलांनी कामात बुडवून घेणं, अडनिडय़ा वयातल्या एकटेपणात बॅनर्जीकडे रमणं, त्यांच्या तरुण मुलाच्या प्रेमात पडणं. बाबांना दुखवायचं म्हणून वडीलधारेपण निभावणाऱ्या जोसेफकडे ओढा वाढणं, तरी त्याला जे नको वाटतं तेच तिनं निवडणं, अनिर्बनकडे जाणं. मग तिथून पळून युरोपात. तिथे एरिकच्या प्रेमात पडणं, करियरची वाट लागून, पूर्ण खचून मुंबई- पुन्हा जोसेफ आणि मग माळरान. हा सगळा प्रवास एका स्तरावर आहे. दुसऱ्या पातळीवर, माणसाचा जागतिक स्तरावरचा वावर, त्याला भेटणारी विविध देशीविदेशी माणसं, परदेशातील वास्तव्याची संधी, त्यामुळे होणारी भावनिक-शारीरिक जवळीक, त्यातून निर्माण होणाऱ्या वैयक्तिक जीवनातल्या समस्या आहेत. तिसऱ्या पातळीवर पर्यावरण आणि विकास यासंबंधीचे असंख्य स्थूल-सूक्ष्म धागे आहेत. नायिका जाहिरात क्षेत्रात करियर असणारी. ते क्षेत्र आणि पर्यावरण कायम विरोधी गटात. दोन्ही बाजू जनसामान्यांची करत असलेली अशुद्ध दिशाभूल, विस्थापितांचे पुनर्वसनाचे प्रश्न, ‘विस्थापितांचा प्रश्न केवळ जमिनी गमावण्याचा नसतो, तो मुळं उखडलं जाण्याचा असतो’, याविषयी असणारी कमालीची असंवेदनशीलता, प्रश्नांचा समग्र विचार न करता एकेका सुटय़ा घटकांचा विचार करून योजलेले तात्कालिक उपाय, हत्ती आणि सहा आंधळय़ांच्या प्राचीन गोष्टीतून आपण काहीच शिकलो नसल्याची चरचरीत जाणीव.. हे सगळं ही कादंबरी स्वत:त गुंफून घेते. म्हणजेच कालसमांतर आशय ती आपल्या पदरात घालते. नायिका ज्या जाहिरात क्षेत्रात काम करतेय तिथे येणारे कडवट अनुभव, स्वत:च केलेले सगळे नियम धाब्यावर बसवणाऱ्या सरकारी व्यवस्था, हिरव्या रंगाच्या ‘वॉश’खाली भयानक प्रदूषण करणाऱ्या उत्पादनांना मिळणाऱ्या परवानग्या आणि त्याविषयी उदासीन असणारी विविध पदांवरची माणसं. निकराने त्याला विरोध करणारे पर्यावरणस्नेही कार्यकर्ते आणि संस्था, याविषयी विचार करायला लावते ही कादंबरी. ही सगळी वीण गच्च विणली आहे. म्हणूनच ती वाचायला मजा येते. म्हणजे हिच्यात काही कमतरता वा त्रुटी नाहीत का? नाहीत कशा.. पण दुर्लक्ष कराव्यात अशा नक्कीच. उदा. जोसेफ, रघु, मधोक, आस्ताद, विहान यांच्या आयुष्यात कोणीच स्त्रिया कशा नाहीत? इतक्या जवळिकीच्या आणि प्रदीर्घ काळाच्या नात्यात कधीतरी त्या व नायिका आमनेसामने येऊ शकल्या असत्या. अशा तिढय़ांना सफाईने बगल दिली आहे. त्यामुळे समग्र चित्रात फटी राहिल्या आहेत. सहसा लेखिका ज्या तऱ्हेचं लेखन करत नाहीत तसं वाचायला मिळालं की सुखद वाटतं. स्त्री असण्याच्या परीघरेषा ओलांडून ही नायिका व्यक्ती म्हणून वेगळे आयुष्य जगते. सहजधर्मानं, अभिनिवेशानं नव्हे म्हणून आणखी बरं वाटतं. लेखिका, संपादक, संवादक, समीक्षक आणि कथा अभ्यासक अशा अनेक भूमिकांमध्ये सतत कार्यरत. ‘संवादसेतू’ या लक्षवेधी दिवाळी अंकाचे संपादन. कथक नृत्यांगना रोहिणी भाटे यांच्यावरील ‘रोहिणी निरंजनी’ हा गाजलेला ग्रंथ, ‘मंगला गोडबोले यांच्या निवडक कथां’ यासह अनेक पुस्तकांच्या संपादिका. ...Read more