* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MAINE RAM RATAN DHAN PAYO
  • Availability : Available
  • Translators : SWATI CHANDORKAR
  • ISBN : 9788184981292
  • Edition : 2
  • Publishing Year : JULY 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 188
  • Language : Translated From HINDI to MARATHI
  • Category : RELIGIOUS & SPIRITUALS
  • Available in Combos :OSHO COMBO SET - 37 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MEERA IS HEARD, PREACHED AND SANG BY MANY; BUT A VERY FEW CAN REACH HER SOUL. IN THIS MODERN WORLD, OSHO SEEMS TO BE THE ONLY ONE WHO HAS REACHED HER SOUL, WHO HAS FELT HER TEARS, WHO HAS UNDERSTOOD THE INTENSITY OF EACH OF HER BREATH. OSHO HIMSELF HAS LEAD A LIFE FULL OF POETRY, HE HAS FOUND RHYTHM IN HIS LIVING, HE HAS COMPOSED LYRICS BASED ON THE EXPERIENCES. JUST LIKE MEERA, OSHO SEES LOVE EVERYWHERE. FOR HIM IT IS LOVE WHICH KEEPS THIS WORLD GOING ON, FOR HIM IT IS LOVE WHICH PROTECTS HIM, COMFORTS HIM, OFFERS HIM WARMTH. HIS WHOLE BEING IS ‘LOVE’. AND MEERA??? MEERA HERSELF IS SUPREME DEVOTION, SHE IS UNIQUE THOUGH MANY DEVOTEES HAVE ACHIEVED THE ULTIMATE SALVATION. WHAT MAKES HER SO UNIQUE? OSHO HAS TRIED TO PUT HER UNIQUENESS IN WORDS. HE STATES THAT THE CRYSTAL CLEAR DEVOTION PRACTICED BY MEERA IS WORTHY ENOUGH TO PROVE HER DIVINITY. WE ALL KNOW THAT MEERA IS KRISHA, SHE SEES HIM EVERYWHERE, BUT AS WE GO ON UNDERSTANDING HER WE FIND OURSELVES BLENDING WITH HER, WE START BECOMING MEERA IN A WAY. THE PATH TO DEVOTION IS NOT SIMPLE OR EASY. IT IS MARKED WITH UNSEEN HURDLES. IT OFTEN CHECKS ON THE INTENSE DESIRES OF THE DEVOTEE. DEVOTION IS INTRICATE AS THE CAUSE IS UNSEEN. IT NEEDS EXTREME FAITH TO SURRENDER TO SOMETHING WHICH WE BELIEVE TO BE THERE BUT CANNOT SEE WITH NAKED EYES. MEERA DID IT WITHOUT ANY SECOND THOUGHTS IN HER MIND. SHE SACRIFICED HERSELF FOR THE UNSEEN CAUSE OF HER LIFE. THIS IS WHAT MAKES HER UNIQUE FROM OTHERS. A TRUE POEM TAKES BIRTH FROM THE DEPTH OF THE MIND, IT DOES NOT LINGER OVER ATTEMPTING RHYTHM, IT MAY NOT BE WELLVERSED. EVEN AFTER CENTURIES AND ERAS PASS, SUCH TRUE POEM HOLDS THE POWER TO CAPTIVATE MINDS. MEERA HAD ACCEPTED THE FACT THAT SHE IS MERGED IN LOVE. HER FAITH, HER RELIANCE AND HER DEVOTION TAKES US WITH HER.
मीरा म्हणजे भक्ती. भक्तीने परमात्मा साध्य करणारे अनेक आहेत आणि तरीही मीरा वेगळी आहे. का? ओशो सांगतात की भक्तिसाराची इतकी पारदर्शकता मीरामध्ये आहे, की ही पारदर्शकताच तिचं वेगळेपण सिद्ध करते. मीरा कृष्णमय आहे हे कुणी नव्याने सांगायला नको. पण आपण तिची भक्ती बघून मीरामय होऊन जातो हे निश्चित. भक्तिमार्ग हा सर्वांत कठीण मार्ग. न दिसणाया परमात्म्यावर तन, मन, भान विसरून प्रेम करणं, स्वत:ला त्याच्यावर सोपवून देणं हे कठीणच आणि म्हणूनच मीराचं कृष्णासाठी केलेलं समर्पण अनमोल आहे. यमक जुळतंय की नाही याची विवंचना न करता जे हृदयातून उमटत गेलं असं ते काव्य, गीत, भजन आजही आपल्या हृदयाला भिडतात आणि मीरा म्हणते ‘मैं तो प्रेम दीवानी’. हा तिचा भाव, ही तिची भावदशा आपल्यालाही भारावून टाकते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"BANDAKHOR# BHAKTIT BHIJALA KABIR# EK EK PAUL# MAZE MAZYAPASHI KAHI NAHI #HA SHODH VEGALA# HASAT KHELAT DHYANADHARANA# MEERA EK VASANT AAHE # MEERA SHYAMRANGI RANGALI # MEERECHI MADHUSHALA # MEERECHYA PREMTIRTHAVAR # MHANE KABIR DIWANA # MI DHARMIKTA SHIKAVTO DHARM NAHI # MRUTUCHE AMARATVA # MRUTYAYUSHI # MRUTYU AMRUTACHE DWAR # MUGDHA KAHANI PREMACHI # NANAK NIRANKARI KAVI # NANAK PARMATMYACHA NAD OMKAR # NANAK SANSAARI SANYASTA # NANAK SUR SANGEET EK DHUN # SAD GHALTO KABIR # SAKSHATKARACHI DENGI # SHIVSUTRA-PART 1 # SHIVSUTRA-PART II-2 # SWATHACHA SHODH #VIDROHI ##मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% "
Customer Reviews
  • Rating StarSHRAMEEK EKJOOT 26-9-2010

    ओशो करतात मीरेची उकल सामान्य माणसाला निराकारावर लक्ष केंद्रित करणे अवघड जाते. पूर्ण लक्ष एकवटल्याखेरीज लक्ष्य नेमके समजल्याखेरीज त्याविषयी आवड किंवा नावड या मनाच्या भावना कशा जोखता येणार? मीरा तर य निराकारावरच प्रेम करते हे अगम्य समजून घेण्यासाठी मीेची प्रेमातील उत्कटता समजून घेणे महत्त्वाचे ठरते. ओशोंच्या प्रवचानातून आधी प्रेमाची ताकद उलगत जाते. नंतर स्वत:चा विसर पडल्यानंतरच जीव खऱ्या अर्थाने निराकारावर जडवता येतो याची जाणीव होते. मीरेचे स्वत:ला विसरणे ओशो भक्तांना समजावून सांगतात आणि मीरा आपोआप उलगडत जाते. शब्दांना अगम्य असणारी मीरा तिच्या प्रेमाभावनेची उकल होताच अधिक मोकळेपणाने सादकांसमोर उभी ठाकते. अधात्म मार्गावरील कोणताही विचार ओशोंकडून ऐकणे ही अनुनूभूत अशी पर्वणी ठरते. ओशोंच्या प्रवचनांची ध्वनिमुद्रिते उपलब्ध आहेत. मीरेच्या पदांवर ओशोंच्या केलेल्या विश्लेषणाच्याही कॅसेट, सीडी उपलब्ध आहेतच. मात्र मुळात अरुपावर प्रेम करणारी, हजारो वर्षांचे अंतर तोडणारी आणि कृष्णाला प्रियकर मानणारी मीरा सामान्य माणसाच्या जाणीवेच्या आवाक्यात सहजासहजी येत नाही. भगवंत-भक्त, भगवंत माऊली-मी तान्हा किंवा भगवंत माझा सखा अशा पातळीवरची भगवद् - भक्ती निदान मनाला पटते. म्हणूनच बाकी संत, त्यांचे तत्वज्ञान त्यांची भक्तीची पातळी माध्यमखेरीज समजून घेणे कदाचित शक्य होते. मात्र स्त्री भूमिकेतून कृष्णचरणी सर्वस्व समर्पित करणारी, लोकलज्जेचे भय न मानणारी मीरा गाभ्यातून समजून घ्यायला समर्थ माध्यमाची गरज भासते. ओशो आपल्या प्रवचनातून मीरेची फार सुंदर उकल करतात. नव्याने या प्रातांत शिरणाऱ्यासाठी मुळात ओशोंची शैली समजून घेणेही कठीण ठरते.याच मुद्यावर ओशोंच्या मीरेच्या पदावरील प्रवचनांची पुस्तक रुपातील उपलब्धी महत्त्वाची ठरते. स्वाती चांदोरकर यांनी या प्रवचानांचा मराठीत अनुवाद केला आहे. ध्वनिमुद्रितांमधील प्रवचानांचा शब्दनशब्द पुस्तकात वेचला आहे. मेहता प्रकाशनाने आणलेली ‘मीरेची प्रेमतीर्थावर’ आणि ‘मीरा एक वसंत आहे’ ही दोन्ही पुस्तके मीरा समजून घेताना भक्तांना फार मदत करतात. जाणिवेचा आवाका वाढवण्यासाठी ध्वनिमुद्रितांपेक्षा पुस्तक अधिक साह्यभूत ठरते. गरज पडली तर प्रत्येक विचारापाशी अधिक काळ थांबून आधी ओशोंच्या आणि नंतर मीरेच्या अंत:करणात डोकावणे पुस्तकामुळे अधिक सोपे ठरते. पाच पाच प्रवचनांच्या या पुस्तकरूपात मीरेची भक्ती, मीरेचे साधन- साध्य , मीरेचे संपूर्ण समर्पण ओशोंच्या शब्दात त्यांच्या वाक्यरचनेच्या विशिष्ट शैलीत स्वाती चांदोरकरांनी उघडे केले आहे. मीरेच्या भक्तीबद्दल बोलताना ओशो सांगतात, मीरेची भक्ती कशी होती हा प्रश्नच चुकीचा ठरतो. मीरा ‘मीरा’ नव्हतीच. साक्षात भक्तीच मीरेचे रूप घेऊन पृथ्वीतलावर अवतरली होती. मीरेचे बोटे धरून श्रोत्यांना श्रद्धेच्या पहिल्या पायरीवर नेऊन उभे करताना ओशोंनी श्रद्धेचे स्वरूप वर्णन केले आहे. मरणाच्या दारातही तर्काचा आधार न घेता अढळ राहते. तीच खरी श्रद्धा. जन्म घेतेवेळीच श्रद्धा माणसाच्या बरोबर असते. मनुष्य जन्मानंतर श्रद्धेत अडथळा निर्माण करणारे तर्क हळूहळू शिकत असतो. मनुष्य तर्क इतक्या प्रमाणात शिकतो की त्याची श्रद्धा झाकोळली जाते. पुन्हा श्रद्धा ही लौकीक अर्थाने प्रमाणित न होऊ शकणारी आहे. मग श्रद्धेचे स्वरूप कसे पारखून घ्यायचे? आपली श्रद्धा आहे हाच मुद्दा महत्त्वाचा. श्रद्धा खरी की खोटी असा सवाल मुमुक्षूच्या मनात उमटूच नये. जसे जगात पाणी कुठे ना कुठे म्हणूनच मनुष्याला आर्त तृष्णेची भावना जाणवते. जगात पाणी अस्तित्वात नसतेच तर पाण्यानेच केवळ शांत होऊ शकेल, अशी तृष्णेची भावना माणसाच्या मनात निसर्गत:च निर्माण झाली नसती हे जेवढे निर्विवाद सत्य आहे तेवढीच श्रद्धाही खरी असते. जगात परमात्म्याचे अस्तित्वच नसते तर ते असण्याची भावना मनात निर्माणच झाली नसती. परमात्मा जगात आहेच आहे आणि तो असल्याची ठाम ग्वाही आपले मन देते, हेच श्रद्धेचे निखळ रूप आहे. श्रद्धेच्या पायरीवरून वर गेलात तर अनुभूती निश्चित आहे, असे ओशो ठामपणे सांगतात. अशी अनुभूती मिळायला जाणिवा जाग्या असायला हव्यात असे मात्र नाही. जीवनात अंतिम अनुभूतीचा साक्षात्कार जाणिवेने करून घेतल्यावर माणसाला जाणवते की पूर्वी जीवनात अनेकदा अशा अनुभूतीचा साक्षात्कार करून घेतल्यावर माणसाला जाणवते की पूर्वी जीवनात अनेकदा अशा अनुभूतींचे संकेत विनासायास मिळाले होते. मात्र, तेव्हा ही अनुभूती आहे हे कळण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आपल्याकडे नसल्याने या अलौकीक अनुभवाचे अस्तित्व तेव्हा आपल्याला जाणवले नाही. बुद्धी तर्कात अडकल्याने खूपदा या अनुभवाची तुलना एखाद्या क्षुद्र गोष्टीशी करते आणि त्याच क्षणी अनुभवाचे अस्तित्व थांबते. सामान्य माणसाच्या बाबतीत अलौकीक अनुभवांच्या बाबतीत गल्लत होण्याची आणखी एक शक्यता असते. जेव्हा असा अनुभव येतो तेव्हा हा अनुभव आपल्याला खरेच आला की हा भास आहे. अशी शंका माणसाच्या मनात येते. साशंक मनाने सत्याला भिडता येत नाही. त्यामुळेच साशंक मन हाच अनुभवातील अडथळा ठरतो. अलौकीक अनुभव येतातच आणि ते सत्यच असतात हे सांगण्यासाठी ओशोंनी सामान्य जीवनातील एक सामान्य उदाहरण दिले आहे. प्रकृती बिघडते तेव्हा आपण डॉक्टरकडे त्याचे कारण जाणून घेण्यासाठी जातो. प्रकृती स्वस्थ असताना ती तशी का आहे याची पृच्छा आपण करत नाही. कारण स्वस्थ प्रकृती ही नैसर्गिक अवस्था आहे. तद्वत जीवाला मिळणारी आनंददायी अनुभूती हीच शाश्वत आहे आणि त्याचे कारण शोधण्याची गरज नाही. अशा प्रकारे प्रेमदिवान्या मीरेची भक्ती समजावून देताना ओशो सामान्यजनांच्या जाणिवा जाग्या करण्याचा प्रयत्न करतात, ओशोंची ही भावना समजून घेण्यासाठी ही पुस्तके आपल्याला मदत करतात. ‘मीरेच्या प्रेमतीर्थावर’ हे १७६पानांचे तर ‘मीरा एक वसंत आहे’ हे १८८ पानांचे पुस्तक प्रत्येकी १५० रूपयांना उपलब्ध आहे. ओशोंच्या तत्त्वज्ञानांचा आदर करणाऱ्यांसाठी हे पुस्तक जणू वरदानच ठरते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more