* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MAINE RAM RATAN DHAN PAYO
  • Availability : Available
  • Translators : SWATI CHANDORKAR
  • ISBN : 9788184981292
  • Edition : 2
  • Publishing Year : JULY 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 188
  • Language : Translated From HINDI to MARATHI
  • Category : RELIGIOUS & SPIRITUALS
  • Available in Combos :OSHO COMBO SET - 33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MEERA IS HEARD, PREACHED AND SANG BY MANY; BUT A VERY FEW CAN REACH HER SOUL. IN THIS MODERN WORLD, OSHO SEEMS TO BE THE ONLY ONE WHO HAS REACHED HER SOUL, WHO HAS FELT HER TEARS, WHO HAS UNDERSTOOD THE INTENSITY OF EACH OF HER BREATH. OSHO HIMSELF HAS LEAD A LIFE FULL OF POETRY, HE HAS FOUND RHYTHM IN HIS LIVING, HE HAS COMPOSED LYRICS BASED ON THE EXPERIENCES. JUST LIKE MEERA, OSHO SEES LOVE EVERYWHERE. FOR HIM IT IS LOVE WHICH KEEPS THIS WORLD GOING ON, FOR HIM IT IS LOVE WHICH PROTECTS HIM, COMFORTS HIM, OFFERS HIM WARMTH. HIS WHOLE BEING IS ‘LOVE’. AND MEERA??? MEERA HERSELF IS SUPREME DEVOTION, SHE IS UNIQUE THOUGH MANY DEVOTEES HAVE ACHIEVED THE ULTIMATE SALVATION. WHAT MAKES HER SO UNIQUE? OSHO HAS TRIED TO PUT HER UNIQUENESS IN WORDS. HE STATES THAT THE CRYSTAL CLEAR DEVOTION PRACTICED BY MEERA IS WORTHY ENOUGH TO PROVE HER DIVINITY. WE ALL KNOW THAT MEERA IS KRISHA, SHE SEES HIM EVERYWHERE, BUT AS WE GO ON UNDERSTANDING HER WE FIND OURSELVES BLENDING WITH HER, WE START BECOMING MEERA IN A WAY. THE PATH TO DEVOTION IS NOT SIMPLE OR EASY. IT IS MARKED WITH UNSEEN HURDLES. IT OFTEN CHECKS ON THE INTENSE DESIRES OF THE DEVOTEE. DEVOTION IS INTRICATE AS THE CAUSE IS UNSEEN. IT NEEDS EXTREME FAITH TO SURRENDER TO SOMETHING WHICH WE BELIEVE TO BE THERE BUT CANNOT SEE WITH NAKED EYES. MEERA DID IT WITHOUT ANY SECOND THOUGHTS IN HER MIND. SHE SACRIFICED HERSELF FOR THE UNSEEN CAUSE OF HER LIFE. THIS IS WHAT MAKES HER UNIQUE FROM OTHERS. A TRUE POEM TAKES BIRTH FROM THE DEPTH OF THE MIND, IT DOES NOT LINGER OVER ATTEMPTING RHYTHM, IT MAY NOT BE WELLVERSED. EVEN AFTER CENTURIES AND ERAS PASS, SUCH TRUE POEM HOLDS THE POWER TO CAPTIVATE MINDS. MEERA HAD ACCEPTED THE FACT THAT SHE IS MERGED IN LOVE. HER FAITH, HER RELIANCE AND HER DEVOTION TAKES US WITH HER.
मीरा म्हणजे भक्ती. भक्तीने परमात्मा साध्य करणारे अनेक आहेत आणि तरीही मीरा वेगळी आहे. का? ओशो सांगतात की भक्तिसाराची इतकी पारदर्शकता मीरामध्ये आहे, की ही पारदर्शकताच तिचं वेगळेपण सिद्ध करते. मीरा कृष्णमय आहे हे कुणी नव्याने सांगायला नको. पण आपण तिची भक्ती बघून मीरामय होऊन जातो हे निश्चित. भक्तिमार्ग हा सर्वांत कठीण मार्ग. न दिसणाया परमात्म्यावर तन, मन, भान विसरून प्रेम करणं, स्वत:ला त्याच्यावर सोपवून देणं हे कठीणच आणि म्हणूनच मीराचं कृष्णासाठी केलेलं समर्पण अनमोल आहे. यमक जुळतंय की नाही याची विवंचना न करता जे हृदयातून उमटत गेलं असं ते काव्य, गीत, भजन आजही आपल्या हृदयाला भिडतात आणि मीरा म्हणते ‘मैं तो प्रेम दीवानी’. हा तिचा भाव, ही तिची भावदशा आपल्यालाही भारावून टाकते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"BANDAKHOR# BHAKTIT BHIJALA KABIR# EK EK PAUL# MAZE MAZYAPASHI KAHI NAHI #HA SHODH VEGALA# HASAT KHELAT DHYANADHARANA# MEERA EK VASANT AAHE # MEERA SHYAMRANGI RANGALI # MEERECHI MADHUSHALA # MEERECHYA PREMTIRTHAVAR # MHANE KABIR DIWANA # MI DHARMIKTA SHIKAVTO DHARM NAHI # MRUTUCHE AMARATVA # MRUTYAYUSHI # MRUTYU AMRUTACHE DWAR # MUGDHA KAHANI PREMACHI # NANAK NIRANKARI KAVI # NANAK PARMATMYACHA NAD OMKAR # NANAK SANSAARI SANYASTA # NANAK SUR SANGEET EK DHUN # SAD GHALTO KABIR # SAKSHATKARACHI DENGI # SHIVSUTRA-PART 1 # SHIVSUTRA-PART II-2 # SWATHACHA SHODH #VIDROHI ##मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% "
Customer Reviews
  • Rating StarSHRAMEEK EKJOOT 26-9-2010

    ओशो करतात मीरेची उकल सामान्य माणसाला निराकारावर लक्ष केंद्रित करणे अवघड जाते. पूर्ण लक्ष एकवटल्याखेरीज लक्ष्य नेमके समजल्याखेरीज त्याविषयी आवड किंवा नावड या मनाच्या भावना कशा जोखता येणार? मीरा तर य निराकारावरच प्रेम करते हे अगम्य समजून घेण्यासाठी मीेची प्रेमातील उत्कटता समजून घेणे महत्त्वाचे ठरते. ओशोंच्या प्रवचानातून आधी प्रेमाची ताकद उलगत जाते. नंतर स्वत:चा विसर पडल्यानंतरच जीव खऱ्या अर्थाने निराकारावर जडवता येतो याची जाणीव होते. मीरेचे स्वत:ला विसरणे ओशो भक्तांना समजावून सांगतात आणि मीरा आपोआप उलगडत जाते. शब्दांना अगम्य असणारी मीरा तिच्या प्रेमाभावनेची उकल होताच अधिक मोकळेपणाने सादकांसमोर उभी ठाकते. अधात्म मार्गावरील कोणताही विचार ओशोंकडून ऐकणे ही अनुनूभूत अशी पर्वणी ठरते. ओशोंच्या प्रवचनांची ध्वनिमुद्रिते उपलब्ध आहेत. मीरेच्या पदांवर ओशोंच्या केलेल्या विश्लेषणाच्याही कॅसेट, सीडी उपलब्ध आहेतच. मात्र मुळात अरुपावर प्रेम करणारी, हजारो वर्षांचे अंतर तोडणारी आणि कृष्णाला प्रियकर मानणारी मीरा सामान्य माणसाच्या जाणीवेच्या आवाक्यात सहजासहजी येत नाही. भगवंत-भक्त, भगवंत माऊली-मी तान्हा किंवा भगवंत माझा सखा अशा पातळीवरची भगवद् - भक्ती निदान मनाला पटते. म्हणूनच बाकी संत, त्यांचे तत्वज्ञान त्यांची भक्तीची पातळी माध्यमखेरीज समजून घेणे कदाचित शक्य होते. मात्र स्त्री भूमिकेतून कृष्णचरणी सर्वस्व समर्पित करणारी, लोकलज्जेचे भय न मानणारी मीरा गाभ्यातून समजून घ्यायला समर्थ माध्यमाची गरज भासते. ओशो आपल्या प्रवचनातून मीरेची फार सुंदर उकल करतात. नव्याने या प्रातांत शिरणाऱ्यासाठी मुळात ओशोंची शैली समजून घेणेही कठीण ठरते.याच मुद्यावर ओशोंच्या मीरेच्या पदावरील प्रवचनांची पुस्तक रुपातील उपलब्धी महत्त्वाची ठरते. स्वाती चांदोरकर यांनी या प्रवचानांचा मराठीत अनुवाद केला आहे. ध्वनिमुद्रितांमधील प्रवचानांचा शब्दनशब्द पुस्तकात वेचला आहे. मेहता प्रकाशनाने आणलेली ‘मीरेची प्रेमतीर्थावर’ आणि ‘मीरा एक वसंत आहे’ ही दोन्ही पुस्तके मीरा समजून घेताना भक्तांना फार मदत करतात. जाणिवेचा आवाका वाढवण्यासाठी ध्वनिमुद्रितांपेक्षा पुस्तक अधिक साह्यभूत ठरते. गरज पडली तर प्रत्येक विचारापाशी अधिक काळ थांबून आधी ओशोंच्या आणि नंतर मीरेच्या अंत:करणात डोकावणे पुस्तकामुळे अधिक सोपे ठरते. पाच पाच प्रवचनांच्या या पुस्तकरूपात मीरेची भक्ती, मीरेचे साधन- साध्य , मीरेचे संपूर्ण समर्पण ओशोंच्या शब्दात त्यांच्या वाक्यरचनेच्या विशिष्ट शैलीत स्वाती चांदोरकरांनी उघडे केले आहे. मीरेच्या भक्तीबद्दल बोलताना ओशो सांगतात, मीरेची भक्ती कशी होती हा प्रश्नच चुकीचा ठरतो. मीरा ‘मीरा’ नव्हतीच. साक्षात भक्तीच मीरेचे रूप घेऊन पृथ्वीतलावर अवतरली होती. मीरेचे बोटे धरून श्रोत्यांना श्रद्धेच्या पहिल्या पायरीवर नेऊन उभे करताना ओशोंनी श्रद्धेचे स्वरूप वर्णन केले आहे. मरणाच्या दारातही तर्काचा आधार न घेता अढळ राहते. तीच खरी श्रद्धा. जन्म घेतेवेळीच श्रद्धा माणसाच्या बरोबर असते. मनुष्य जन्मानंतर श्रद्धेत अडथळा निर्माण करणारे तर्क हळूहळू शिकत असतो. मनुष्य तर्क इतक्या प्रमाणात शिकतो की त्याची श्रद्धा झाकोळली जाते. पुन्हा श्रद्धा ही लौकीक अर्थाने प्रमाणित न होऊ शकणारी आहे. मग श्रद्धेचे स्वरूप कसे पारखून घ्यायचे? आपली श्रद्धा आहे हाच मुद्दा महत्त्वाचा. श्रद्धा खरी की खोटी असा सवाल मुमुक्षूच्या मनात उमटूच नये. जसे जगात पाणी कुठे ना कुठे म्हणूनच मनुष्याला आर्त तृष्णेची भावना जाणवते. जगात पाणी अस्तित्वात नसतेच तर पाण्यानेच केवळ शांत होऊ शकेल, अशी तृष्णेची भावना माणसाच्या मनात निसर्गत:च निर्माण झाली नसती हे जेवढे निर्विवाद सत्य आहे तेवढीच श्रद्धाही खरी असते. जगात परमात्म्याचे अस्तित्वच नसते तर ते असण्याची भावना मनात निर्माणच झाली नसती. परमात्मा जगात आहेच आहे आणि तो असल्याची ठाम ग्वाही आपले मन देते, हेच श्रद्धेचे निखळ रूप आहे. श्रद्धेच्या पायरीवरून वर गेलात तर अनुभूती निश्चित आहे, असे ओशो ठामपणे सांगतात. अशी अनुभूती मिळायला जाणिवा जाग्या असायला हव्यात असे मात्र नाही. जीवनात अंतिम अनुभूतीचा साक्षात्कार जाणिवेने करून घेतल्यावर माणसाला जाणवते की पूर्वी जीवनात अनेकदा अशा अनुभूतीचा साक्षात्कार करून घेतल्यावर माणसाला जाणवते की पूर्वी जीवनात अनेकदा अशा अनुभूतींचे संकेत विनासायास मिळाले होते. मात्र, तेव्हा ही अनुभूती आहे हे कळण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आपल्याकडे नसल्याने या अलौकीक अनुभवाचे अस्तित्व तेव्हा आपल्याला जाणवले नाही. बुद्धी तर्कात अडकल्याने खूपदा या अनुभवाची तुलना एखाद्या क्षुद्र गोष्टीशी करते आणि त्याच क्षणी अनुभवाचे अस्तित्व थांबते. सामान्य माणसाच्या बाबतीत अलौकीक अनुभवांच्या बाबतीत गल्लत होण्याची आणखी एक शक्यता असते. जेव्हा असा अनुभव येतो तेव्हा हा अनुभव आपल्याला खरेच आला की हा भास आहे. अशी शंका माणसाच्या मनात येते. साशंक मनाने सत्याला भिडता येत नाही. त्यामुळेच साशंक मन हाच अनुभवातील अडथळा ठरतो. अलौकीक अनुभव येतातच आणि ते सत्यच असतात हे सांगण्यासाठी ओशोंनी सामान्य जीवनातील एक सामान्य उदाहरण दिले आहे. प्रकृती बिघडते तेव्हा आपण डॉक्टरकडे त्याचे कारण जाणून घेण्यासाठी जातो. प्रकृती स्वस्थ असताना ती तशी का आहे याची पृच्छा आपण करत नाही. कारण स्वस्थ प्रकृती ही नैसर्गिक अवस्था आहे. तद्वत जीवाला मिळणारी आनंददायी अनुभूती हीच शाश्वत आहे आणि त्याचे कारण शोधण्याची गरज नाही. अशा प्रकारे प्रेमदिवान्या मीरेची भक्ती समजावून देताना ओशो सामान्यजनांच्या जाणिवा जाग्या करण्याचा प्रयत्न करतात, ओशोंची ही भावना समजून घेण्यासाठी ही पुस्तके आपल्याला मदत करतात. ‘मीरेच्या प्रेमतीर्थावर’ हे १७६पानांचे तर ‘मीरा एक वसंत आहे’ हे १८८ पानांचे पुस्तक प्रत्येकी १५० रूपयांना उपलब्ध आहे. ओशोंच्या तत्त्वज्ञानांचा आदर करणाऱ्यांसाठी हे पुस्तक जणू वरदानच ठरते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more