* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"UTTARAKAANDA" IS AN ATTEMPT TO LOOK AT RAMA’S STORY FROM SEETHA’S PERSPECTIVE AND EXPERIENCE. THIS IS THE SECOND TIME THAT MR. BHYRAPPA IS TACKLING AN EPIC. FORTY YEARS AGO, HE WROTE ‘PARVA’, A RETELLING OF THE MAHABHARATA. PARVA IS IN THE FORM OF PERSONAL REFLECTIONS OF SOME OF THE PRINCIPAL CHARACTERS OF THE EPIC.
‘उत्तरकांड’ ही रामायणावर आधारित कादंबरी साकारली आहे सीतेच्या प्रथमपुरुषी निवेदनातून.. त्यामुळे रामायणातील घटना/प्रसंग तिच्या दृष्टिकोनातून उलगडतात. रामाची पत्नी म्हणून तिच्या वाट्याला जे भोग आले, त्याचं मनोविश्लेषणात्मक चित्रण या कादंबरीत केलं गेलं आहे. त्यामुळे राम-सीता-लक्ष्मणाबरोबरच रामायणातील अन्य व्यक्तिरेखाही पारंपरिक चौकट भेदताना दिसतात. सीतेच्या प्रथमपुरुषी निवेदनामुळे या कादंबरीत नाट्य निर्माण झालं आहे. या कादंबरीमुळे रामायणाचा एक नवा अन्वयार्थ समोर येतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#उत्तरकांड #एस.एल. भैरप्पा # उमाकुलकर्णी#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#UTTARKAND #SLBHYRAPPA #UMAKULKARNI
Customer Reviews
  • Rating StarSandeep Jadhav

    पुस्तक परिचय... "उत्तरकांड" एस. एल. भैरप्पा यांचं प्रत्येक साहित्य वाचकाच्या मन आणि मेंदूचा ताबा घेणारं असतं, वाचत असताना वाचक एका वेगळ्याच विचारचक्रात हरवून जातो आणि याचाच प्रत्यय मला पुन्हा एकदा आला त्यांची रामायणावर आधारित कादंबरी "उत्तरकांड" वचत असताना! "साक्षी" आणि "आवरण" या कादंबऱ्या वाचल्यानंतर "उत्तरकांड" ही त्यांची तिसरी कादंबरी आज वाचून पूर्ण झाली. प्रत्येक कादंबरीचा विषय जरी वेगळा असला तरी भैरप्पांच्या साहित्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं साहित्य हे मानसिक पातळीवर वाचून संपत नाही असं वाटतं कारण पुस्तक वाचून झाल्यानंतर त्याचा विचार बराच वेळ आपल्या डोक्यात घोळतच राहतो. "उत्तरकांड" ही रामायणावर आधारित कादंबरी रामाने सीतेचा त्याग केल्यानंतर वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात राहत असताना सीतेच्या निवेदनातून उलगडत जाते. रामायणात घडलेल्या घटनांसोबत बरेच चांगले-वाईट प्रसंग सीतेच्या दृष्टिकोनातून उलगडत असताना सीतेचा वर्तमानकाळ आणि भूतकाळ यामधे वाचकाला गुंतवून ठेवत ही कादंबरी पुढे सरकत राहते. रामाची पत्नी म्हणून सीतेच्या वाट्याला जे भोग आले, त्याचं मनोविश्लेषणात्मक चित्रण भैरप्पांनी या कादंबरीत केलेलं आहे. राम, सीता आणि लक्ष्मणाबरोबरच रामायणातील इतरही पात्रांचे जे वर्णन भैरप्पा यांनी केलं आहे ते वाचत असताना आजपर्यंत ज्या पारंपारिक चौकटींमध्ये आपण या पात्रांना पाहत आलो आहोत त्या सर्व भेदून ही पात्रे आपल्यासमोर उभी राहतात. शिवाय रामायणात घडलेल्या सर्वच घटना कोणताही दैवी मुलामा न देता वर्णन केल्याने आणि प्रत्येक व्यक्तिरेखेला मानवी पातळीवर आणून मांडल्यामुळे सीतेच्या वाट्याला आलेलं आयुष्य म्हणजे आजच्या समाजात, आपल्या आसपास घडत असणारी एखादी कथाच असल्याचा भास वाचकाला होत राहतो आणि त्यामुळेच सीतेच्या निवेदनातून पुढे सरकत असताना कादंबरीत एकप्रकारचं नाट्य निर्माण झालं आहे जे रामायणाचा एक नवा अर्थ आपल्यासमोर घेऊन येते. `पतिव्रता`, `सोशिकतेचं एक मूर्तिमंत उदाहरण` फक्त याच नजरेतून आजपर्यंत सीतेकडे पाहिलं गेलं आणि पुढच्या पिढीतील स्त्रियांसाठी एक आदर्श म्हणून समाजापुढे त्याचं इतकं उदात्तीकरण केलं गेलं की सीतेवर एक स्त्री म्हणून झालेला अन्याय आपसूकच झाकला गेला, तिचा आवाज दबला गेला. एस. एल. भैरप्पांनी सीतेवर झालेल्या याच अन्यायाला वाचा फोडण्याचा, सीतेला न्याय देण्याचा प्रयत्न त्यांच्या या "उत्तरकांड" कादंबरीमधून केला आहे. सीतेला एका वेगळ्याच रुपात भैरप्पांनी या कादंबरीतून आपल्यासमोर आणलं आहे ज्यामुळे सीता जणूकाही आजच्या काळातली एखादी स्त्रीवादी व्यक्तिरेखाच वाटत राहते. "उत्तरकांड" या कादंबरीमधे भैरप्पांनी सीतेच्या माध्यमातून स्त्रीची एक तेजस्वी बाजू आपल्यासमोर आणली आहे. रावणाकडून सुटका केल्यानंतर रामाने सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावली परंतु सीता जशी रामापासून दूर होती तसाच रामही सीतेपासून दूर होता, मग जो न्याय सीतेला तोच रामाला का नाही? असा सवाल दबक्या आवाजात अनेकदा केला जातो पण सीता ही एक "स्त्री" असल्या कारणाने रामाने जे केलं ते कसं योग्य होतं असंच आजपर्यंत सांगितलं गेलं. भैरप्पांचं "उत्तरकांड" याला अपवाद आहे, भैरप्पांच्या "उत्तरकांड" मधील सीता नेमका असाच सवाल रामाला भर धर्मसभेत करते - ‘रामा माझ्या शीलाबद्दल तुला शंका आहे, पण तुझ्या स्वतःच्या शीलाचं काय?’ आणि राम निरुत्तर राहतो. भैरप्पांनी सीतेच्या माध्यमातून विचारलेला हा प्रश्न म्हणजे एका अर्थाने रामसारखंच दुटप्पीपणे वागणाऱ्या आजच्या समाजपुरुषाला दाखवलेला आरसा आहे. त्यामुळेच पौराणिक पार्श्वभूमी असली तरी आजच्या वास्तविक जगाला अगदी तंतोतंत लागू होणारी भैरप्पांची ही ३०४ पानी कादंबरी "उत्तरकांड" वाचकाला अंतर्मुख होऊन विचार करायला लावते. ...Read more

  • Rating StarUMA NIJASURE

    अप्रतिम पुस्तक

  • Rating StarPratik Yetawdekar

    प्रख्यात भारतीय कादंबरीकार डॉ.एस.एल.भैरप्पा यांनी लिहिलेली २०१५ साली कन्नड भाषेत प्रसिद्ध झालेली *`उत्तरकांड`* ही महर्षी वाल्मिकी यांच्या अभिजात असणाऱ्या महाकाव्य रामायणातील सीता या उत्तुंग पात्राभोवती गुंफलेली कलाकृती. राम हे अखिल भारत वर्षाचे हृदय्थ दैवत.राम आणि त्याचे धर्माचरण हे ही एक मिथक च पण प्रत्येक भारतीय लोकमनाचा ठाव व्यापून राहिलेलं गूढ पण लोभस असं सत्य.रामाचा वनवास,सीताहरण,लंकेवर स्वारी त्या नंतर प्राप्त केलेला विजय नन्तर अयोध्येत आल्यावर लोकभिचाराला सामोरं जाऊन रामाने केलेला सीतात्याग.त्यानंतर सीते च्या मनातील विचारांचे काहूर आणि त्यावर तिने केलेली मात, जनकाने भूमीतून सापडलेल्या एका कन्येचा केलेला सांभाळ पण त्या भूमी बद्दल सीतेची असणारी ओढ, त्या ओढीच्या माध्यमातून च कृषक म्हणून केलेली शेतीची कामे. महर्षी वाल्मीकींच्या आश्रमात व्यतीत केलेला काळ,केलेले लव कुशांचे संगोपन, कळते झालेले लवकुश यांनी पकडलेला अश्वमेध यज्ञाचा घोडा तो सोडून न देता वाल्मिकी नि केलेली मध्यस्थी त्यातून झालेली अयोध्येतील धर्मसभा आणि त्यात सीतेने बजावलेली स्त्री च्या हक्कासाठी ची भूमिका. एक सूंदर अशी पौराणिक पार्श्वभूमीवर आधारलेली पण वास्तवातही सही सही लागू होणारी अशी कलाकृती `उत्तरकांड` ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more

RUCHIRA BHAG -2
RUCHIRA BHAG -2 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more