* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: LADIES COUPÉ
  • Availability : Available
  • Translators : APARNA VELANKAR
  • ISBN : 9788177666038
  • Edition : 3
  • Publishing Year : SEPTEMBER 2005
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 340
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A STORY OF AKHILNANDESHWARI ALIAS AKHILA, A WOMAN WITH HER INDEPENDENT THOUGHTS AND WAYS, A WOMAN WHO WANTS TO FIND THE REAL TRUTH BEHIND HER LIFE. AT THE AGE OF 45, SHE IS STILL UNMARRIED, WORKING AS A GOVERNMENT SERVANT. BUT, CONTINUOUSLY SHOULDERING RESPONSIBILITIES ONE AFTER THE OTHER, AS A DAUGHTER, AS A SISTER, AS AN AUNT.SHE HAS FORGOTTEN LIVE FOR HERSELF. SHE FORGOT THAT SHE ALSO HAD SOME NOTIONS ABOUT LIVING. SHE WAS BURIED DEEP INTO THE PROBLEMS OF HER FAMILY MEMBERS, RELATIVES. FOR DAYS AFTER DAYS, THE SAME THING WAS GOING ON. BUT, ONE DAY, SHE HEARD HER INNER VOICE AND STARTED ON THE JOURNEY TO FIND HERSELF, TOWARDS KANYAKUMARI, ALONE, TO BREATHE FREELY IN THE OPEN, AT LAST. SHE WANTED TO LIVE HER LIFE, OUT OF THE BOUNDARIES SET UP BY HER ORTHODOX TAMIL FAMILY, SHE WANTED TO LIVE FOR HERSELF IN HER OWN STYLE, WITHOUT RESTRICTIONS, WITHOUT ANY SCORCHING LOOKS. DURING THE RAILWAY JOURNEY, SHE COMES ACROSS A DIFFERENT WORLD. SHE MEETS ANOTHER FIVE WOMEN IN THE LADIES COUPE. VERY SOON, THEY ALL GET FAMILIAR WITH EACH OTHER, THEIR DIFFERENCES RESOLVED. THE TRAIN STARTS ITS JOURNEY WITH A SET MIND, MERGING THE SIX DIRECTIONS FROM WHICH THESE SIX LADIES CAME INTO ONE. THEY START SPEAKING, REVEALING THEIR WOUNDS, THEIR SECRETS, …. AND MUCH MORE. SIX TOTALLY DIFFERENT LIVES ARE SHARED INTO ALL OF THEM. JANAKI, MARGARET SHANTI, PRABHADEVI, SHEELA, MARICOLANTHU… AKHILA ASKS THESE NEWLY MET FELLOW TRAVELERS, CAN A WOMAN STAY WITHOUT THE SUPPORT OF A MAN? CAN SHE BE HAPPY AND CONTENDED?OR DOES EVERY WOMAN NEED A MAN AT THE END?
ही आहे कथा स्वत:चंच आयुष्य विंचरून पाहणा-या एका स्त्रीची, अखिलनंदेश्वरी ऊर्फ अखिला. वय वर्ष पंचेचाळीस. अविवाहित, सरकारी खात्यात कारकून. जगता जगता इतकी ओझी येत गेली खांद्यावर की, तिचं स्वत:साठी जगणं.. स्वत:च्या मर्जीनं जगणं राहूनच गेलं. मुलगी म्हणून, बहीण म्हणून, आत्या आणि मावशी म्हणून ती उष्ट्या संसारांच्या खरकट्यात फक्त पिचत राहिली. हे रहाटगाडगं खरं तर असंच चालू राहायचं; पण एके दिवशी कशी कोण जाणे, स्वत:चीच हाक ऐकून अखिला निघाली.. कन्याकुमारीच्या प्रवासाला– एकटीच. आयुष्यात पहिल्यांदाच मोकळा श्वास घ्यायला... तमिळ ब्राह्मण कुटुंबाने तिच्या अविवाहितपणाभोवती घातलेली कर्मठ रिंगणं तोडून स्वत:च्या मनासारखं जगायला.. स्वत:साठी जगायला.. आयुष्याची वेगळी चव चाखायला. रेल्वेच्या प्रवासात तिला भेटतं एक वेगळंच जग. लेडीज कूपेच्या धावत्या आडोशात भेटतात आणखी पाच जणी. बघता बघता परकेपणाची बंधनं गळून पडतात. सहा जणींच्या आयुष्याच्या सहा दिशा पकडून गाडी भरधाव सुटते. जखमा मोकळ्या होतात. गुपितांच्या गाठी सुटतात. सहा वेगळी आयुष्यं सहा जणींत वाटली जातात. जानकी.. मार्गारेट शांती.. प्रभादेवी.. शीला.. मारीकोलान्थू. लेडीज कूपेमधून प्रवास करताना तिला भेटलेल्या या पाचही जणींना अखिला विचारतेच, `पुरुषांच्या आधाराशिवाय बाई एकटी राहू शकते? सुखाने, आनंदाने जगू शकते? की बाईला पुरुष हवाच असतो शेवटी?
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #APARNAVELANKAR #ANITANAIR #LADIESCOUPE #BIOGRAPHYA&TRUESTORIES
Customer Reviews
  • Rating StarPrashant Laxman Shendge

    अनुवाद पण भाषेच्या श्रीमंती अफाट प्रेम हे एक रंगहीन मूलद्रव्य आहे. पटकन पेट घेणारं... स्वतः जळता जळता इतरांनाही जाळून भस्मसात करणारं .. जाळ होतो, मागे पुरावा शून्य. ना धूर. ना राख. प्रेमाच्या धुंदीत मश्गूल असणाऱ्यांना कळता कळत नाही. पत्ता लागत लागतं नाही. त्यात दडलेल्या विषाच्या कुपीचा. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 11-06-2006

    महिलांच्या कथा अन् व्यथा... मूळ इंग्रजी लेखिका अनिता नायर यांच्या ‘लेडीज कूपे’ या पुस्तकाचा स्वैर अनुवाद अपर्णा वेलणकर यांनी मराठीत केला असून तो मेहता प्रकाशनने प्रसिद्ध केला आहे. अखिल नंदेश्वरी ऊर्फ अखिला दुर्दैवाने अविवाहित राहिलेल्या ‘स्त्री’चीही कहाणी. कट्टर, सनातनी, कर्मठ, तामीळ ब्राह्मण अप्पा आणि अम्मा या दांपत्याच्या पोटी अखिलाचा जन्म झाला. नारायण, नरसिंह, आणि पद्मा ही तीन तिची धाकटी भावंड, स्त्रीनं स्त्रीसारखंच वागावं. पती हाच परमेश्वर अशा पुरातन विचारांच्या कुटुंबात ती वाढते. तिची आई पतिव्रताच. पतिसेवेपुढे मुलांकडे लक्ष देण्यास तिला वेळ नसायचा. वडील अप्पा आयकर खात्यात अधिकारी. ते एक नेक, स्वच्छ अधिकारी असल्यामुळे त्यांच्या सर्व सहकाऱ्यांमध्ये अप्रिय. त्यांच्या सचोटी, नेक स्वभावाच्या त्यांच्या गरजा जेमतेम असायच्या, पण छानशौक वगैरे नसायचे. अचानक एका अपघातात अखिलाच्या अप्पांचं निधन होतं. भावंडांत सर्वांत मोठी, सर्वांची अक्का, अखिलाच्या खांद्यावर साऱ्या कुटुंबाची जबाबदारी येऊन पडते. वडिलांच्या निधनानंतर आयकर खात्यात तिला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळते. आई आणि आपली चार भावंडांची सारी जबाबदारी ती नेटाने पार पाडते. भावंडांचे शिक्षण, लग्न आणि विधवा वृद्ध आईची सेवा या सर्व धामधुमीत ती अविवाहित राहते. घरातील सारेचजण तिला गृहीत धरून चालतात. ज्या अक्कानं आपलं पालनपोषण नीट केलं, आपले संसार उभे करून दिले त्याची ‘नारायण’ वगळता कोणालाही जाणीव नसते. यात तिचं तारुण्य कोमेजून जातं. आपल्या अक्काला मत, मन, भावना, वासना आहे. तिला स्वातंत्र्य हवं आहे. हे कोणी ध्यानातच घेत नाही. या घुसमटीत या कोंडीतून बाहेर पडून आपण मोकळा श्वास घ्यावा. साऱ्या बंधनातून मुक्त व्हावं असं अखिला ठरवते. आणि साऱ्यांचा विरोध-रोष पत्करून ती मुक्त जीवन जगण्यासाठी एकटीच घरातून कन्याकुमारीला जाण्यासाठी निघते. कार्यालयीन मैत्रीण निलोफरच्या ओळखीने तिला लेडीज कूपेत आरक्षण मिळतं. या लेडीज कूपेतील प्रत्येक स्त्री पात्र रेखाटताना त्या त्या स्त्री पात्राची कौटुंबिक, आर्थिकता, सामाजिक पार्श्वभूमी त्यांची जात-पात, धर्म, संस्कृती आणि संस्कार याचं वास्तववादी चित्रण लेखिकेने यात केलं आहे. ‘स्त्री’च्या विविध प्रकृती-प्रवृत्ती, त्यांच्या भावभावना, त्यांचं मन, त्यांच्या वाट्याला आलेले जीवन भोग. त्यामुळे त्यांच्या मनाची होणारी घुसमट, कुचंबणा, मानसिक त्रास एकूणच त्यांची, विशेषत: अविवाहिता अखिलाची कथा आणि व्यथा अपर्णा वेलणकर यांनी सहज सुंदरतेने ‘लेडीज कूपे’त अनुवादित केली आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 18-02-2007

    स्त्रीची स्वयंशोधाची धडपड... वडिलांच्या पश्चात कुटुंबाची जबादारी पेलताना स्वत:साठी तिचे जगणे राहूनच जाते. ती जबादारी पूर्ण झाल्यावही ती ‘स्वतंत्र’ होऊ शकत नाही... तरी स्वत:चा शोध घेण्याची तिची धडपड सुरूच असते. अशातच एक दिवस ती एकटीने प्रवासाला निघते रेल्वेच्या डब्यात सोबत आणखी पाच जणी. स्वत:च्या आयुष्याचा विचार करत, त्या पाच जणींशी बोलत, त्या सुख-दु:खातून मार्ग काढत ती एका निष्कर्षावर येते... तिच्या पुरत्या अखिलनंदेश्वरी- अखिलाची ही कहाणी अशी उलगडत जाते. ‘लेडीज कूपे’ या कादंबरीत. स्वत:ची ओळख करून घ्यायला, अधोरेखित करायला जानकी, मार्गारेट शांती, प्रभादेवी, शीला, मारीकोलान्थू तिला मदत करतात. पण खरी मदत होते तिच्या मैत्रिणीची-कारपागमची! अनिता नायर यांच्या या मूळ इंग्रजी कादंबरीचा मराठी अनुवाद केला आहे. अपर्णा वेलणकर यांनी. कादंबरीचे निवेदन अगदी ओघवते आहे. पण या प्रत्येकीची कथा खूपच पसरट, वाटत जाते. त्यात तोचतोचपणा वाटू लागतो. वर्णनंही तीच वाटत राहतात. या पसाNयात या स्त्रियांच्या मनाचा वेध परिणामकारकपणे घेतलाच जात नाही. त्यामुळे ‘...प्रत्येकाची कहाणी ऐकताना सारखं वाटत होतं, मोठ्या सुखातलं छोटं दु:ख केवढं टोचतंय या बायकांना!...’ असे जे मारीकोलान्थूला त्यांच्याबद्दल वाटते, तसेच वाटू लागते. पण वास्तवास तसे नाहीय. प्रत्येकीची एका कहाणी आहे, एक वेदना आहे. तिच्यापुरती प्रामाणिक, सच्ची! मात्र कादंबरीत ती तितकी टोकदारपणे येत नाही. त्यामुळे भिडत नाही. शब्दबंबाळपणात हरवून जाते. ‘पुरुषाच्या आधाराशिवाय बाई एकटी आनंदाने जगू शकते? राहू शकते?’ या प्रश्नाचा वेध या निरनिराळ्या पात्रांच्या माध्यमातून लेखिकेने घेतला आहे. कादंबरीचे एक वैशिष्ट्य म्हणजे या प्रश्नाचे एकच एक किंवा नेमके उत्तर शोधण्याचा लेखिकेचा अट्टहास नाही. या प्रश्नाचे उत्तर तिने आपल्या पात्रांवर सोपवले आहे. परिस्थितीनुसार, कुवतीनुसार ती ती पात्रं आपल्यापुरते उत्तर शोधतात. या प्रश्नाचे सगळ्यांना लागू होईल, असे अंतिम एक उत्तर असूच शकत नाही. पण विचाराला नक्कीच हा प्रश्न चालना देतो. गुणदोषांसह कादंबरीचे हे यश नक्कीच म्हणावे लागेल. -ऋता बावडेकर ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 16-07-2006

    सहा वेगळी दु:खे… ही सहा सहप्रवासी स्त्रियांची जीवनगाथा आहे. लेडीज कूपेतून प्रवास करणाऱ्या या अनोळखी स्त्रिया काही तासांतच मैत्रिणींसारख्या एकमेकींची विचारपूस करून आपापसातील अपिचयाची अभ्रे बाजूला सारून भावनांना वाट करून देतात, त्यातून उमलत जातात. त्य त्यांच्या भावबंधातल्या ऋजू रेशमी पाकळ्या! आपल्या निसर्गदत्त स्वभाववैशिष्ट्यांमुळे स्त्रिया एकमेकींजवळ लवकर ‘मोकळ्या’ होऊ शकतात, एकमेकींना दिलासा देऊ शकतात. या कन्याकुमारी एक्स्प्रेसच्या लेडील कूपेत जानकी प्रभाकर, प्रभादेवी, मार्गारिया शांती पैलराज, अखिलनंदेश्वरी (अखिला) शीला वासुदेवेन व मारी कोलान्थू अशा सहा जणी आहेत. यात सर्वांत वयस्क म्हणजे जानकी व सर्वांत लहान म्हणजे १४ वर्षांची शीला. यातील सर्वांत महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे ती अखिलाची. तिचा प्रवास सर्वांत लांबचा तसा तिचा जीवनप्रवासही लांबचा. म्हणून या कादंबरीची ती नायिका आहे, असे म्हणायला हरकत नाही. कथेची सुरुवात व अंत तिच्यावरच आहे. या प्रवासातील थोड्याशा सहवासामुळे अखिलाच्या मनातील आंदोलने व त्यानंतर तिच्या जीवनाला मिळालेले वेगळे वळण हाच कथेचा विषय आहे. अपघाती अकाली मृत्यू पावलेल्या वडिलांच्या जागी आयकर कार्यालयामध्ये लहान वयातच अखिला कामाला लागते. घरात मोठी असल्याने एका कुटुंबकर्त्याची सर्व कर्तव्ये पार पाडता पाडता कधी पंचेचाळीशीला येते ते कळत नाही. पाठची सर्व भावंडे मात्र मोठी होऊन लग्न करून मार्गी लागतात. अखिलाच्या लग्नाचा, तिच्या भविष्याचा विचार कोणाच्याही डोक्यात शिरत नाही. अगदी तिच्या आईच्यासुद्धा! ती जुन्या परंपरेतील जुन्या आचारविचारांची कर्मठ ब्राह्मण बाई असते. नवरा हेच तिचे जीवनसर्वस्व असते. तिच्या बाबतीतील अत्यंत विचित्र गोष्ट म्हणजे तिचे लग्न. तिच्या सख्ख्या काकांशीच वडिलांनी लावून दिलेले असते. अखिलाने एकदा याबद्दल विचारले असता तिला प्रचंड राग येतो. अखिलाला ती चांगलीच फ़ैलावर घेते; पण या घटनेने सर्वांनाच आश्चर्य वाटत असते. अशा कर्मठ वातावरणात वाढलेल्या अखिलाची आईच्या मृत्यूनंतर मात्र फारच घुसमट सुरू होते. आपल्या सख्ख्या भावंडांच्या मतलबीपणामुळे ती आतल्या आत कुढत राहते; पण निलोफर व कॅथरिन या मैत्रिणींमुळे तिच्यामध्ये मानसिक बदल सुरू होतात. निलोफर तर तिला जोरात बजावते, ‘तुझ्या त्या स्वार्थी बहिणीला पहिल्यांदा तू घरातून हाकलून दे. ती जळूप्रमाणे तुझे रक्तशोषण करते आहे.’’ अशा खंबीर व स्वतंत्र मैत्रिणींमुळे अखिलाही स्वत: खंबीर बनण्याचापक्का निश्चय करून आयुष्यात अगदी पहिल्यांदा एकटी कन्याकुमारीच्या प्रवासाला निघते. तिथे कूपेमध्ये ‘पुरुषाशिवाय स्त्री एकटी राहू शकते का?’’ या विषयावर बायकांची बरीच चर्चा होते. कन्याकुमारीला गेल्यावर या प्रश्नाचे अचूक उत्तर अखिलाला सापडते. तिच्या जीवाची तगमग थांबते, तिला तिच्या भावी जीवनाचा सुखाचा मार्ग सापडतो. इथेच कथा संपते; पण वाचकांपुढे प्रश्न उभा राहतो. ‘सुखासाठी या मार्गाचा अवलंब अखिला किती दिवस करू शकणार आहे?’ कूपेतील दुसरी सहप्रवासी म्हणजे जानकी प्रभाकर. कमी शिकलेल्या व स्वतंत्र विचाराची पात्रता नसलेल्या स्त्रियांची जी मनोवृत्ती असते तीच जानकीची असते. जुन्या विचारांचे जानकीचे उपदेश बाकीच्या जणी तिच्या वयाकडे पाहून ऐकून घेतात. कारण तिच्या बोलण्यात सरळपणा व कळकळ असते. तिच्यासमवेत ‘स्त्रियांनी स्वत:चे स्वतंत्र अस्तित्त्व दाखवूच नये, तरच त्या समाधानी राहू शकतात.’ पती हाच परमेश्वर मानणारी स्त्री दुसरे काय सांगणार? हिच्या मनात एकच सल असते ती म्हणजे लग्नानंतर तिचा मुलगा सिद्धार्थ सतत आईची तुलना सासूशी करून तिला कमी लेखक असतो हेच. बाकी आपल्या संसारात ती समाधानी असते. तिसरी प्रवासी म्हणजे प्रभादेवी. ही सुखवस्तू स्त्री नवऱ्याबरोबर सहज म्हणून अमेरिकेला जाते व तेथून मानसिकदृष्ट्या बदलून येते. तिथल्या स्त्रियांप्रमाणे ती स्वतंत्र आचार-विचारांची, अधिक धीट व अधिक फॅशनेबल बनते. मुळातच ती माहेरची श्रीमंत घरातली मुलगी. वडिलांच्या सौन्या-चांदीच्या चार पेढ्या. जावयासाठी त्यांनी हिऱ्याची पेढी सुरू केलेली. ‘फिजिकल फिटनेस’साठी पोहणे शिकायचे असा निश्चय करून ती स्वत:च्या बंगल्याच्या तलावात मोठा धोका पत्करून स्वत:च-कोणाच्या मदतीशिवाय पोहणे शिकते. ही रुबाबदार, सुंदर, धाडसी व आनंदी स्त्री नावाप्रमाणेच परमेश्वराने दान केलेल्या संपन्न जीवनाचा पुरेपूर उपभोग घेत असते. चौथी मार्गारिटा शांती. सतत मानसिक छळ करणाऱ्या नवऱ्याचा ती अत्यंत अजब पद्धतीने सूड घेते. वास्तविक ही एम. एस्सी. सुवर्णपदकविजेती बाई. प्राचार्य असलेल्या नवऱ्याच्या शाळेत शास्त्र शिक्षक म्हणून काम करीत असते. नवऱ्याला त्याच्या आवडीचे पदार्थ रोज इतके खायला करून देते, की शेवटी अतिवजन वाढल्याने त्याला चालणेही कठीण होऊन जाते. तो परावलंबी बनतो. नवऱ्याची विवशता जसजशी वाढत जाते, तसतशी मार्गारेट खट्टू होत जाते. नवऱ्याशी न भांडता, त्याच्याविरुद्ध एक शब्दही न बोलता सायन्स प्रयोगाच्या वेळी सुचलेल्या एका युक्तीने पार त्याचे अस्तित्वच ती मिटवून टाकते. त्याला पार अपंग बनवून टाकते. मार्गारेटाच्या अक्कल हुशारीने नवऱ्याचा काटा काढण्याचा मार्ग म्हणजे अंतर्यामी वेदनेने व्याकूळ झालेल्या एका शोषित स्त्रीचा अतर्क्य असा सूड आहे. पाचवी मारी कोलान्थू ही पांढरपेशात न मोडणारी घरकामवाली स्त्री आहे, ती त्या कूपेत प्रवेश करताक्षणीच इतर स्त्रियांच्या ज्या प्रतिक्रिया उमटतात, त्या फार बोलक्या आहेत. त्या तिच्याही लक्षात आल्याने कोणाशीही न बोलता ती मुकाट्याने वरच्या बर्थवर जाऊन पडते. या वेठबिगार गरीब बाईला अनौरस संततीला जन्म द्यावा लागतो. हिच्या नशिबी कायम दु:ख व कष्ट! ती म्हणजे मागास जमातीतील प्रातिनिधिक स्वरूपाची व्यक्तिरेखा वाटते. सहावी १४ वर्षांची शीला ही शाळकरी पोर असून, जीवनातील चढउतार तिने अनुभवलेले नसल्याने इतरांच्या चर्चेत भाग न घेता चुपचाप पुस्तक वाचत बसते. नुकतीच आजी गेल्याने तशी ती दु:खी असते. जीवनाचे विविध रंग दाखविणारा हा लेडीज कूपे. यातील साऱ्याच स्त्रिया दक्षिणेकडील. त्यामुळे संपूर्ण कादंबरीभर तेच वातावरण आहे. तिकडची सुंदर वर्णने यात आहेत. अपर्णा वेलणकर यांनी या कादंबरीचे केलेले मराठी भाषांतर अप्रतिम आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठही वेधक झाले असते, तर ते अधिक आवडले असते. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more