* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BACKSTAGE
  • Availability : Available
  • Translators : G.B. DESHMUKH
  • ISBN : 9789357206037
  • Edition : 1
  • Publishing Year : MARCH 2026
  • Weight : 394.00 gms
  • Pages : 440
  • Language : MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"TRACING THE SPECTACULAR TRAJECTORY OF AHLUWALIA’S LIFE FROM ITS HUMBLE BEGINNINGS IN SECUNDERABAD TO THE CORRIDORS OF POWER IN NEW DELHI, THIS BOOK IS A CLASSIC INSIDER’S ACCOUNT OF HOW THE INDIA STORY WAS SHAPED AND SCRIPTED. AHLUWALIA PLAYED A KEY ROLE IN THE TRANSFORMATION OF INDIA FROM A STATE-RUN TO A MARKET-BASED ECONOMY, AND REMAINED A CONSTANT FIXTURE AT THE TOP OF INDIA`S ECONOMIC POLICY ESTABLISHMENT FOR AN UNPRECEDENTED PERIOD OF THREE DECADES. THE BOOK TRAVERSES THE POLITICS, PERSONALITIES, EVENTS AND CRISES IN INDIA`S RECENT HISTORY. IT GOES BEHIND THE NUMBERS TO BRING ALIVE THE POLITICS OF REFORM, AND HOW POLICY CHANGE WAS PUSHED THROUGH—AT FIRST, SLOWLY, UNDER PRIME MINISTER RAJIV GANDHI, AND THEN MUCH MORE BOLDLY IN 1991 WHEN THE OPPORTUNITY PROVIDED BY A SEVERE BALANCE OF PAYMENTS CRISIS WAS SEIZED FOR WIDE-RANGING REFORM. AHLUWALIA, WHO SERVED AS COMMERCE SECRETARY AND FINANCE SECRETARY DURING THIS CRUCIAL PERIOD, MAKES A CONVINCING CASE FOR WHY, CONTRARY TO THE ACCUSATIONS AT THE TIME, THE REFORMS THAT FORMED PART OF THE CONDITIONALITY OF THE INTERNATIONAL MONETARY FUND (IMF) PROGRAMME IN 1991, WERE HOME-GROWN AND NOT THRUST UPON A RELUCTANT INDIA BY THE IMF. AHLUWALIA DISCUSSES THE SUCCESSES AND FAILURES OF THE UPA REGIME DURING WHICH PERIOD HE SERVED AS DEPUTY CHAIRMAN OF THE PLANNING COMMISSION, A CABINET-LEVEL POSITION. HE PRESENTS THE STORY BEHIND INDIA’S SPECTACULAR ECONOMIC GROWTH IN THE FIRST HALF OF THE UPA’S TENURE AS WELL AS ITS HISTORIC ACHIEVEMENTS IN POVERTY ALLEVIATION. HE ALSO CANDIDLY DISCUSSES THE POLICY PARALYSIS AND ALLEGATIONS OF CORRUPTION THAT CAME TO MARK THE LAST FEW YEARS OF UPA 2. NARRATED WITH WIT, HUMOUR AND REMARKABLE INTELLECT, BACKSTAGE IS A DEFINITIVE CONTRIBUTION TO INDIA`S ECONOMIC AND POLITICAL HISTORY BY ONE UNIQUELY POSITIONED TO WRITE IT."
"सिकंदराबादमधील साध्या सुरुवातीपासून नवी दिल्लीतील सत्ताकेंद्रांपर्यंत अहलुवालिया यांच्या आयुष्याचा विलक्षण प्रवास मांडणारे हे पुस्तक भारताच्या घडणाऱ्या कथेमागील आतल्या गोटातील नोंद आहे. राज्यनियंत्रित अर्थव्यवस्थेतून बाजारआधारित अर्थव्यवस्थेकडे भारताच्या परिवर्तनात अहलुवालिया यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि तब्बल तीन दशकांपर्यंत ते भारताच्या आर्थिक धोरणनिर्मितीच्या सर्वोच्च पातळीवर कायम प्रभावी राहिले. हे पुस्तक भारताच्या अलीकडच्या इतिहासातील राजकारण, व्यक्तिमत्त्वे, घटना आणि संकटांचा मागोवा घेते. आकड्यांच्या पलीकडे जाऊन ते सुधारणा प्रक्रियेतील राजकारण उलगडते आणि धोरणात्मक बदल कसे पुढे नेले गेले हे स्पष्ट करते—सुरुवातीला पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात हळूहळू, आणि नंतर १९९१ मध्ये गंभीर देयक तुटीच्या (बॅलन्स ऑफ पेमेंट्स) संकटाचा लाभ घेत व्यापक सुधारणांसाठी धाडसी पावले उचलली गेली. या निर्णायक काळात वाणिज्य सचिव आणि वित्त सचिव म्हणून काम पाहणाऱ्या अहलुवालिया यांनी त्या वेळी करण्यात आलेल्या आरोपांना छेद देत ठामपणे मांडले आहे की १९९१ मधील आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कार्यक्रमाच्या अटींमध्ये समाविष्ट असलेल्या सुधारणा या भारतावर लादलेल्या नव्हत्या, तर त्या देशांतर्गत विचारमंथनातून जन्मलेल्या होत्या. युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स (यूपीए) सरकारच्या काळात नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष (कॅबिनेट दर्जा) म्हणून कार्यरत असताना, त्यांनी त्या कालखंडातील यश-अपयशाचा सविस्तर आढावा घेतला आहे. यूपीएच्या पहिल्या कार्यकाळातील भारताच्या उल्लेखनीय आर्थिक वाढीची कहाणी तसेच दारिद्र्यनिर्मूलनातील ऐतिहासिक कामगिरी ते मांडतात. त्याचबरोबर यूपीए-२ च्या अखेरच्या काही वर्षांत दिसून आलेली धोरणात्मक अडचण (पॉलिसी पॅरॅलिसिस) आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबतही ते स्पष्ट व प्रांजळ चर्चा करतात. विनोदबुद्धी, हलका-फुलका शैली आणि विलक्षण बौद्धिक सामर्थ्य यांच्या संगमातून कथन केलेले ‘बॅकस्टेज’ हे पुस्तक भारताच्या आर्थिक आणि राजकीय इतिहासातील एक महत्त्वपूर्ण आणि अधिकृत योगदान मानले जाते—अशा व्यक्तीकडून, ज्यांना ही कथा सांगण्याची अनन्यसाधारण संधी आणि स्थान लाभले."
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीसाहित्य #मेहतापब्लिशिंगहाऊस #मराठीपुस्तके #अनुभवकथन #बॅकस्टेज # माँटेकसिंगअहलुवालिया #जी.बी.देशमुख # MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHITRANSLATEDBOOK #AUTOBIOGRAPHY #BACKSTAGE #MONTEKSINGHAHLUWALIA #G.B.DESHMUKH
Customer Reviews
  • Rating Starश्री. श्रीकांत सातपुते, मुंबई

    १ मार्च २०२६ रोजी अर्थतज्ज्ञ माँटेकसिंग अहलुवालिया ह्यांचं चरित्र `बॅकस्टेज` ह्या पुस्तकाचा जी.बी.देशमुख ह्यांनी केलेला मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे ह्यांचेतर्फे प्रकाशित करण्यात आला. ही बातमी कळल्यासरशी त्याच दिवशी शिवाजी पार्क इथल्य पुस्तक प्रदर्शनातून माझ्या कन्येच्या हातून मी हे पुस्तक मागवून घेतलं. सुमारे तिन आठवड्यांच्या अवधित ४५० पानांचं हे अनुवादित पुस्तक वाचून काढलं . अनुवाद एकदम भारी झाला आहे. यात जसं लेखकाचं मनोगत आहे तसंच अनुवाद करणा-याचं सुद्धा मनोगत असायला हवं अशी प्रकाशकांना सुचना करावीशी वाटते. लोकमान्य टिळकांच्या गीता रहस्यानंतर इतक्या मोठ्या आकाराचं पुस्तक मी पहिल्यांदाच वाचलं. हे एक आत्मकथन आहे याची जाणीव पुस्तक वाचताना होती. पुस्तकातील बरेच विषय कानावर असलेले होते व ते स्मृतीत ताजे असल्यामुळे वाचनात चांगलाच रस आला. कुठलिही कटुता व्यक्त न करता पुस्तक/ आत्मकथन कसे असावे याचा हा उत्तम नमुना आहे. पुस्तक छान आहे. माझ्या मित्रमंडळीत तथा नातेवाईकांना हे पुस्तक वाचण्याचा आग्रह जरुर करेन. लवकरच माझ्या शाळकरी मित्रांच्या गृपसाठी एक पोस्ट तयार करून त्यांना हे पुस्तक वाचण्याचे आवाहन करणार आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more