* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: VALIV
  • Availability : Available
  • ISBN : 9788177669299
  • Edition : 19
  • Publishing Year : AUGUST 1980
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 156
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :SHANKAR PATIL COMBO SET - 21 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SHANKAR PATIL HAD ONCE MENTIONED,RAIN IS MY BEST FRIEND! WHEN MY MIND BURNS IN THE PYRE, I FEEL SUFFOCATED, LIFELESS, BUT WHEN IT STARTS RAINING, I FORGET MY RESTLESSNESS, BREATHLESSNESS.` THERE IS DEFINITELY SOME RELATIONSHIP BETWEEN HIM AND THE RAIN. HE HAS PICTURED THE RAIN IN VARIOUS FORMS THROUGH MANY OF HIS STORIES LIKE AABHAL, VALIV. SOMETIMES, THE RAIN JUST DRIZZLES, SOMETIMES IT COMES WITH THUNDER AND STORMS, SOMETIMES IT RAINS VERY HEAVILY, SOMETIMES IT BRINGS THE HAILSTONES WITH IT, SOMETIMES IT APPEARS LIKE AN OLD MAN WALKING, TAKING TIME BETWEEN EVERY TWO STEPS, SOMETIMES IT APPEARS AS A NAUGHTY CHILD. WHATEVER THE FORM MAY BE IT ALWAYS GIVES IMMENSE PLEASURE. THIS PLEASURE IS BEYOND ANY HAPPINESS. I REMEMBER ONE OF VINOBA BHAVE`S MEETING. IT HAD JUST STARTED DRIZZLING AND HE HAD SAID, "TODAY, I AM VERY HAPPY. THE TOUCH OF THESE RAINDROPS IS DIVINE, I FEEL THAT THE GOD HIMSELF HAS COME OVER HERE. IT IS LIKE THE THOUSANDS OF RAINDROPS ARE EMBRACING THE EARTH" -BHALCHANDRA PHADKE.
पावसाचं आणि शंकर पाटलांचं एक नातं आहे. ते एकदा म्हणाले होते, ‘पाऊस म्हणजे माझा जिवलग दोस्त! उन्हाची खाई उसळली की माझी तगमग सुरू होते. अगदी गुदमरल्यासारखं वाटतं; पण पाऊस एकदा का कोसळू लागला, की माझ्या चित्तवृत्ती उल्हसित होतात.’ त्यांचं म्हणणं खरं आहे. ‘आभाळ’, ‘वळीव’ अशा कितीतरी कथांतून पावसाची विविध रूपं त्यांनी चित्रित केली आहेत. झिमझिम पाऊस, ताशा बडवत राहिलेला पाऊस, काठी टेकत येणारा पाऊस, धुवाधार पाऊस, थट्टेखोर पाऊस, गारांचा सडा टाकून घेरणारा पाऊस... पण पाऊस अंगावर झेलण्यात एक अपूर्व आनंद आहे! मला विनोबांची पावसातली एक सभा आठवते. पाऊस झिमझिम पडू लागला तशी ते म्हणाले होते, ‘मला विलक्षण आनंद होतो आहे. जणू परमेश्वरच आपल्या सहस्त्रधारांनी या धरतीला कडाडून मिठी मारत आहे. पावसाचा स्पर्श म्हणजे परमेश्वराचा स्पर्श!’ –भालचंद्र फडके
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#VALIV#SHALA#SHAARI#BHOOL#NATAK#BHAAN#AAFAT#SOOD#TIPISHAN#KANAV#MAHER#KHEL#JUGLYAKAKA#PRATIKSHA#
Customer Reviews
  • Rating Starमुकेश जाधव

    मी काही वर्षांपूर्वी जेव्हा वळीव वाचून पूर्ण केल तेव्हा त्यांची इतर पुस्तकसुद्धा वाचायची असं ठरवून टाकलं आणि महिनाभरात सगळी वाचून झाली. शंकर पाटील असे लेखक आहेत ज्यांनी मराठी कथालेखनाला एका वेगळ्या उचीवर नेऊन ठेवले. आज पुन्हा एकदा वळीव वाचायला सरवात केली आहे. आणि पुन्हा एकदा इल्लम, धिंड, वावरी शेंग, बंधारा ही सगळी पुस्तक वाचायची आहेत. शंकर पाटलांनी लिहिलेली टारफुला कादंबरी वाचताना लक्षात येत की एखदी व्यक्तिरेखा रंगवताना किती बारिकाईने लक्ष दिल गेलं असेल. वाचकांच्या डोळ्यासमोर एखादं गाव, एखादं जनावर, नदी, ओढा, पारावरची निवांत बसलेली माणसं अगदी हुबेहुब रंगवलेली दिसतात. कथानकाचा आपणही एक भाग आहोत, आपल्या डोळ्यासमोर ती गोष्ट घडते आहे असा भास निर्माण होत राहतो. शकर पाटील एक भन्नाट लेखक होते. वाचकांना एक वेगळा अनुभव देणारा लेखक म्हणजे शंकर पाटील. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    साहित्यिक शंकर पाटील हे एक सिद्धहस्त लेखक होते. याची प्रचिती त्यांची पुस्तके वाचताना पुन्हा पुन्हा येते. हास्य, कारूण्य अशा भावनांचा आविष्कार ते अगदी सहजतेने करतात. वाचक त्याच्या नकळत हळूहळू कथेत गुंतत जातो नेतर त्यास एक ओढ लागते व तो त्या कथाविश्वाततल्लीन होऊन जातो. कथाबीज अगदी साधे वाटते पण त्यातील आशय वैश्विक असतो, मनुष्य स्वभावाची वैशिष्ट्ये त्यातून परिवर्तित होतात. शंकर पाटील यांच्या कथेची सुरुवातच एकदम मनाची पकड घेणारी असते. ‘आता काय होईल?’ ही भावना पात्राबरोबर वाचकाच्या मनात रुंजी घालत जाते. लेखक मग शब्दांची, मांडणीची आतषबाजी करतो. वाचक दिग्मूढहोतो. ‘कारूण्य’ असेल तर गहिवरतो. ‘विनोद’ असेल तर हसतो आणि गांभीर्य असेल तर विचाराधीन होतो. खरोखर शंकर पाटील यांनी मानवी जीवनातील विसंगती, आर्तता, मुर्खपणा वगैरे चांगलाच अनुभवला होता, त्याचा प्रत्यय कथा वाचताना येतो. वाचक अगदी हरखून जातो! शंकर पाटील यांची निरीक्षणशक्ती, कल्पनेची भरारी आणि लेखनशैलीमधील जबरदस्त ताकद वादातीत होती याची झलक या तीन पुस्तकांमधून आपोआप मिळते. अशा या सिद्धहस्त लेखकाची पुस्तके पुन:प्रकाशित करून मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी जुन्या, नव्या पिढीतील वाचकांना एक उत्तम पुस्तक भेट दिली आहे यात शंकाच नाही! ‘वळीव’ कथासंग्रहातील ‘सूड’ ही कथा ‘वर्णनात्मक शैली’ म्हणजे काय असते याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. बैलगाड्यांची शर्यत म्हणजे एक मानबिंदू ठरतो. त्यातील हार-जीत प्राणांपेक्षाही मोलाची कशी वाटते, गावकऱ्यांची उत्सुकता, शर्यतीचा वेग कसा टिपेला पोहचतो याचे प्रत्ययकारी वर्णन या कथेत आहे. वाचकासंही जणू त्या शर्यतीचा वेग येतो! ‘यशस्वी चित्रपट कथाकार’ हा नावलौकिक शंकर पाटलांच्या मागे का आहे? याचे उत्तर ‘सूड’ ही कथा देते. एक चलतचित्रपट शब्दाच्या माध्यमातुन दिसू लागतो. यातील काही भाग पाहू. ‘विस्त्याच्या खेंडागत तापलेली ती जनावरं आवरणं आता त्याच्या देवालाही शक्य नव्हतं. गाडी दुसऱ्यांदा भकली. वाट सोडून रानात शिरली. चार-चार बोटं चाकं जमिनीत घुसू लागली तरी गाडीचा वेग काही आवरत नव्हता. हरबाही दात खाऊन कासरे ओढत होता. त्या कासऱ्यांची त्याच्या हातांचे पळके निघत होते: पण त्याला कशाचीच शुद्ध नव्हती. वेसणीला ओढलागून बैलांची नाकं फाटली होती. फड्याच्या पिकलेल्या बोंडागत त्यांचे डोळे लालभडक झाले होते. त्यांच्या रेशमासारख्या मऊ अंगावर आडवेतिडवे वळ उठून कुंड झाले होते. जागजागी कातडी सोलून निघाली होती. असं विलक्षण झपाटणारे वर्णन इतर सर्व कथांमधून आढळून येते. एक ‘काव्य’च गद्यलेखनातून प्रगटतं. ‘वळीव’ कथासंग्रहातील सर्व कथांचा आशय वास्तव असून त्याला गांभीर्यतेची आणि करूणेची एक आर्त झालर आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो