* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Print Books:
`MINDGYM` TRANSLATION IN MARATHI `MANACHI VYAYAMSHALA` BY SHYAM BHURKE. IN MUCH OF OUR LIVES, OUR MIND OPERATE ON AUTOPILOT. RATHER LIKE THE TOURIST WHO REPEATS THE SAME WORLDS LOUDER EACH TIME THE LOCAL DOES NOT UNDERSTAND, WE TEND TO CONTINNUE THINKING AND BEHAVING IN SIMILOR WAYS, EVEN IF THIS IS NOT GETING US WHAT WE WANT. HOWEVER ONCE WE CAN SPOT THESE HABBITS WE CAN CHANGE THEM. AS A RESULT, WE ARE WORK LIKELY TO - ACHIVE MORE IN LESS TIME. - GAIN ENERGY AND HAVE LESS NEGATIVE STRESS. - RESOLVE DIFFICULT CHALLENGES. - ENJOY LIFE. HARE ARE HUNDRED OF PRACTICAL TIPS AND TECHNIQUES BASED ON APPLIED PSYCHOLOGY ARE PACKED INTO THIS BOOK.
इथे सांगितलेल्या प्रयोगांचा सराव करा! आपण आपल्याला हवा तसाच विचार करीत राहतो; ठरविल्याप्रमाणेच वागत राहतो. आपल्याला जे हवं ते साध्य होत नसतानाही त्याच चाकोरीतील आपली वागणूक सोडायला आपण तयार होत नाही. मनाच्या ह्या सवयीवर एकदा का आपण लक्ष केंद्रित केलं की मग आपल्याला हवे ते बदल दिसू लागतील. मग चांगले परिणाम दिसतील - * थोड्या वेळात मोठी कामे होतील. * तणाव नाहीसे होतील. उत्साह वाटेल. * कठीण आव्हाने पेलाल. * आपल्या मताशी सभोवतालचे लोक सहमत होतील. * जीवन आनंदी होईल. आतापर्यंत १ लाखाहून अधिक लोकांनी या मनाच्या कार्यशाळेतील अर्थात माइंड जिममधील प्रयोग केलेत आणि मग इतरांना ते करण्याची शिफारस केलीय. मानसशास्त्रावर आधारित अशा शेकडो युक्त्या प्रथमच इथे आपणासाठी मांडल्यात. तसंच आपण `द माइंड जिम` ऑनलाइनचा लाभ आपल्या वैयक्तिक मोफत सदस्यत्व क्रमांकात घेऊ शकता - THE MIND GYM ONLINE
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #THEMINDGYM #SHYAMBHURKE #द माइंड जिम #
Customer Reviews
  • Rating Starमोहन बापट

    व्यायामशाळा मनाची हे पुस्तक अलीकडेच वाचायला मिळाले. पुस्तक कसे वाचावे- कशाकरीता वाचावे व का वाचावे यांचे सुंदर मार्गदर्शन या पुस्तकात आहे. इथं मानसशास्त्र आहे आणि सोप्या शब्दांत त्याचे विवरण केले गेले आहे. व्यवहारी जीवनात येणारी अनेक प्रकारची संकटे प्रश्न, ताणतणाव यांचे निराकरण कसे करावे व आनंदी जीवन कसे अनुभवावे याचे पाठ दिले आहेत. प्रश्न व त्यावरील उत्तरे या पुस्तकात सापडतात. व्यवहारवाद, चातुर्य, विज्ञानवाद, सकारात्मक दृष्टिकोन याची आजच्या धावपळीच्या जीवनात अतिशय गरज आहे. या पुस्तकातून ते साध्य होईल. चौकटीबाहेरचे विचार व निर्णय अंतीम यश संपादन करण्याची प्रेरणा देणारे हे पुस्तक आहे. पुस्तकाची मांडणी व भाषा दर्जेदार आहे. समारोपाचे शब्द वाचकमंडळींनी आत्मसात करावे व पुस्तकाचा आनंद घ्यावा. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    प्रकृती उत्तम ठेवण्यात मनाची भूमिका महत्त्वाची… ‘‘प्रकृती उत्तम ठेवण्यात मानवी मनाची भूमिका महत्त्वाची असते. मानवाला व्यक्तिगत आणि सामाजिक अशी दोन मने असतात. समर्पण, करुणा, त्याग, प्रेम या भावनेतून व्यक्तिगत मनाची, तर सहकारातून सामाजिक उन्नती होते. ा दोन्ही मनांची उन्नती साधता आली पाहिजे.’’ असे मत ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. ह. वि. सरदेसाई यांनी आज येथे व्यक्त केले. मेहता पब्लिकेशनतर्फे श्याम भुर्के अनुवादित ‘द मार्इंड जिम’या पुस्तकाचे प्रकाशन ‘सकाळ’चे संपादक (साहित्य, कला, संस्कृती) सुरेशचंद्र पाध्ये यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी डॉ. सरदेसाई बोलत होते. श्याम भुर्के आणि मेहता पब्लिकेशनचे सुनील मेहता या प्रसंगी उपस्थित होते. विविध प्रकारची दुखणी घेऊन रुग्ण डॉक्टरांकडे जातात. पण त्यातील ८५ टक्के आजारांचे मूळ मानसिक अस्वस्थतेत असते,’’ असे सांगून डॉ. सरदेसाई यांनी मनाचे स्वास्थ्य याबद्दल मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘अपेक्षा आणि वस्तुस्थिती यात दरी निर्माण झाल्यास मन अस्वस्थ होते. माणसाला विचार करायला लावणारे मन हे इंद्रिय आहे, तर विचार हा एक तरंग आहे. तरंग स्थल आणि कालबद्ध असतात. तरंग माणसाच्या प्रज्ञेवर अवलंबून असतात. प्रत्येक विचाराला आयुष्य आहे. जो विचार शतकानुशतके जिवंत राहतो, तो विचार शतकानुशतके जिवंत राहतो, तो विचार आणि व्यक्तीही मोठी होते.’’ पाध्ये म्हणाले, ‘‘मानवास अहंकारामुळे अपयश येते. तो सोडून आवश्यक तिथे तडजोड, बुद्धीचा वापर केला पाहिजे. वास्तवाचा नेमकेपणाने विचार करण्याची गरज आहे.’’ असे सांगून आपल्याकडे ज्ञान आहे, पण निर्णयापर्यंत जाण्याची क्षमता नाही. मनाच्या तालमीसाठी जेवढे कष्ट घ्याल, तेवढे बुद्धीसाठी ही आवश्यक आहेत.’’ असेही ते म्हणाले. भुर्के यांनी पुस्तकाचा परिचय करून दिला. ते म्हणाले, ‘‘व्यायाम हा शरीराशी संबंधिक आहे, असा सर्वसामान्यांचा समज आहे. पण या पुस्तकामध्ये मनाच्या व्यायामाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले आहे.’’ ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more