* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Print Books:
`MINDGYM` TRANSLATION IN MARATHI `MANACHI VYAYAMSHALA` BY SHYAM BHURKE. IN MUCH OF OUR LIVES, OUR MIND OPERATE ON AUTOPILOT. RATHER LIKE THE TOURIST WHO REPEATS THE SAME WORLDS LOUDER EACH TIME THE LOCAL DOES NOT UNDERSTAND, WE TEND TO CONTINNUE THINKING AND BEHAVING IN SIMILOR WAYS, EVEN IF THIS IS NOT GETING US WHAT WE WANT. HOWEVER ONCE WE CAN SPOT THESE HABBITS WE CAN CHANGE THEM. AS A RESULT, WE ARE WORK LIKELY TO - ACHIVE MORE IN LESS TIME. - GAIN ENERGY AND HAVE LESS NEGATIVE STRESS. - RESOLVE DIFFICULT CHALLENGES. - ENJOY LIFE. HARE ARE HUNDRED OF PRACTICAL TIPS AND TECHNIQUES BASED ON APPLIED PSYCHOLOGY ARE PACKED INTO THIS BOOK.
इथे सांगितलेल्या प्रयोगांचा सराव करा! आपण आपल्याला हवा तसाच विचार करीत राहतो; ठरविल्याप्रमाणेच वागत राहतो. आपल्याला जे हवं ते साध्य होत नसतानाही त्याच चाकोरीतील आपली वागणूक सोडायला आपण तयार होत नाही. मनाच्या ह्या सवयीवर एकदा का आपण लक्ष केंद्रित केलं की मग आपल्याला हवे ते बदल दिसू लागतील. मग चांगले परिणाम दिसतील - * थोड्या वेळात मोठी कामे होतील. * तणाव नाहीसे होतील. उत्साह वाटेल. * कठीण आव्हाने पेलाल. * आपल्या मताशी सभोवतालचे लोक सहमत होतील. * जीवन आनंदी होईल. आतापर्यंत १ लाखाहून अधिक लोकांनी या मनाच्या कार्यशाळेतील अर्थात माइंड जिममधील प्रयोग केलेत आणि मग इतरांना ते करण्याची शिफारस केलीय. मानसशास्त्रावर आधारित अशा शेकडो युक्त्या प्रथमच इथे आपणासाठी मांडल्यात. तसंच आपण `द माइंड जिम` ऑनलाइनचा लाभ आपल्या वैयक्तिक मोफत सदस्यत्व क्रमांकात घेऊ शकता - THE MIND GYM ONLINE
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #THEMINDGYM #SHYAMBHURKE #द माइंड जिम #
Customer Reviews
  • Rating Starमोहन बापट

    व्यायामशाळा मनाची हे पुस्तक अलीकडेच वाचायला मिळाले. पुस्तक कसे वाचावे- कशाकरीता वाचावे व का वाचावे यांचे सुंदर मार्गदर्शन या पुस्तकात आहे. इथं मानसशास्त्र आहे आणि सोप्या शब्दांत त्याचे विवरण केले गेले आहे. व्यवहारी जीवनात येणारी अनेक प्रकारची संकटे प्रश्न, ताणतणाव यांचे निराकरण कसे करावे व आनंदी जीवन कसे अनुभवावे याचे पाठ दिले आहेत. प्रश्न व त्यावरील उत्तरे या पुस्तकात सापडतात. व्यवहारवाद, चातुर्य, विज्ञानवाद, सकारात्मक दृष्टिकोन याची आजच्या धावपळीच्या जीवनात अतिशय गरज आहे. या पुस्तकातून ते साध्य होईल. चौकटीबाहेरचे विचार व निर्णय अंतीम यश संपादन करण्याची प्रेरणा देणारे हे पुस्तक आहे. पुस्तकाची मांडणी व भाषा दर्जेदार आहे. समारोपाचे शब्द वाचकमंडळींनी आत्मसात करावे व पुस्तकाचा आनंद घ्यावा. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    प्रकृती उत्तम ठेवण्यात मनाची भूमिका महत्त्वाची… ‘‘प्रकृती उत्तम ठेवण्यात मानवी मनाची भूमिका महत्त्वाची असते. मानवाला व्यक्तिगत आणि सामाजिक अशी दोन मने असतात. समर्पण, करुणा, त्याग, प्रेम या भावनेतून व्यक्तिगत मनाची, तर सहकारातून सामाजिक उन्नती होते. ा दोन्ही मनांची उन्नती साधता आली पाहिजे.’’ असे मत ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. ह. वि. सरदेसाई यांनी आज येथे व्यक्त केले. मेहता पब्लिकेशनतर्फे श्याम भुर्के अनुवादित ‘द मार्इंड जिम’या पुस्तकाचे प्रकाशन ‘सकाळ’चे संपादक (साहित्य, कला, संस्कृती) सुरेशचंद्र पाध्ये यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी डॉ. सरदेसाई बोलत होते. श्याम भुर्के आणि मेहता पब्लिकेशनचे सुनील मेहता या प्रसंगी उपस्थित होते. विविध प्रकारची दुखणी घेऊन रुग्ण डॉक्टरांकडे जातात. पण त्यातील ८५ टक्के आजारांचे मूळ मानसिक अस्वस्थतेत असते,’’ असे सांगून डॉ. सरदेसाई यांनी मनाचे स्वास्थ्य याबद्दल मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘अपेक्षा आणि वस्तुस्थिती यात दरी निर्माण झाल्यास मन अस्वस्थ होते. माणसाला विचार करायला लावणारे मन हे इंद्रिय आहे, तर विचार हा एक तरंग आहे. तरंग स्थल आणि कालबद्ध असतात. तरंग माणसाच्या प्रज्ञेवर अवलंबून असतात. प्रत्येक विचाराला आयुष्य आहे. जो विचार शतकानुशतके जिवंत राहतो, तो विचार शतकानुशतके जिवंत राहतो, तो विचार आणि व्यक्तीही मोठी होते.’’ पाध्ये म्हणाले, ‘‘मानवास अहंकारामुळे अपयश येते. तो सोडून आवश्यक तिथे तडजोड, बुद्धीचा वापर केला पाहिजे. वास्तवाचा नेमकेपणाने विचार करण्याची गरज आहे.’’ असे सांगून आपल्याकडे ज्ञान आहे, पण निर्णयापर्यंत जाण्याची क्षमता नाही. मनाच्या तालमीसाठी जेवढे कष्ट घ्याल, तेवढे बुद्धीसाठी ही आवश्यक आहेत.’’ असेही ते म्हणाले. भुर्के यांनी पुस्तकाचा परिचय करून दिला. ते म्हणाले, ‘‘व्यायाम हा शरीराशी संबंधिक आहे, असा सर्वसामान्यांचा समज आहे. पण या पुस्तकामध्ये मनाच्या व्यायामाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले आहे.’’ ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS
FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS by PAULETTE BOURGEOIS Rating Star
रश्मी मुसळे-साळगांवकर

लहानग्यांच्या विश्वातल्या छोट्या छोट्या गमतीजमती या पुस्तकांच्या मालिकेतून अगदी मजेशीर पद्धतीने मुलांसमोर येतात..त्या गोष्टी ऐकताना, वाचताना मूलं यात अगदी रमून जातात... शिवाय आजवर ससा आणि कासव यांव्यतिरिक्त इतर कथाविश्वात काहीसा दुर्लक्षित राहिलेलया कासवाच्या जगातही अनेक गंमती घडू शकतात ही नवखी कल्पना मुलांना भारीच आवडते... ...Read more

MARATHI DAULATICHE NARI SHILP
MARATHI DAULATICHE NARI SHILP by GOPAL DESHMUKH Rating Star
लोकसत्ता २२ जानेवारी २०२३.

बाईचे विश्व हे चूल आणि मूल एवढय़ापुरतेच मर्यादित नसते याची उदाहरणे आपल्याला इतिहासातसुद्धा पाहायला मिळतात. इतिहासात डोकावून पाहिले तर स्त्रियांचे आयुष्य हजार बंधनांनी जखडलेले होते. लहान वयातच मुलींची लग्नं केली जात असत. सतीची चाल, विधवांना केशपनाची सक्ती, सती जाणाऱ्या स्त्रियांच्या मरणाइतकेच सती न जाणाऱ्या विधवांचे जगणे भयंकर होते. अशा समाजातच काही स्त्रिया अशासुद्धा होऊन गेल्या ज्यांनी आपल्या कार्याने, आपल्या धाडसाने, शौर्याने महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाची भर टाकली. समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशाच काही निवडक स्त्रियांचे चरित्र रेखाटन गोपाळ देशमुख यांनी ‘मराठी दौलतीचे नारी शिल्प’ या पुस्तकात केले आहे. जिजाऊमातेने बालशिवाजींची जडणघडण केली. अशा कर्तृत्ववान जिजाबाईंचे व्यक्तिचरित्र ‘राजमाता जिजाऊ’ या प्रकरणामध्ये सारांशरूपाने रेखाटण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. तसेच शिवरायांच्या जीवनात ज्या आठ राण्या आल्या त्यांच्या जीवनकार्याचे वर्णन ‘राणीवसा’ या प्रकरणात येते. ‘महाराणी येसूबाई’ या प्रकरणात त्यांची स्वराज्यनिष्ठा व दूरदृष्टी कशी दिसून येते याचे वर्णन केले आहे. संकटसमयी संभाजी राजांना दिलेल्या सल्ल्यामुळे त्यांच्या कार्यात मदत कशी झाली याचेही वर्णन आले आहे. ताराबाई, उमाबाई दाभाडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी युद्धभूमीवर शत्रूला तोंड कसे दिले. दर्याबाई निंबाळकर, पेशवा पत्नी गोपिकाबाई, रमाबाई, गंगाबाई यांनाही व्यक्तिगत सुखदु:खाबरोबरच मराठी दौलतीच्या वाटचालीत आपली भूमिका कशी पार पाडावी लागली याचीही माहिती पुस्तकात देण्यात आली आहे. दौलतीचा कारभार करताना अहिल्याबाईंना तीस वर्षे वैयक्तिक दु:खांना सामोरे जावे लागले. या साऱ्या दु:खांना बाजूला सारून उत्कृष्ट कार्य करून त्या ‘साध्वी पुण्यश्लोक अहिल्या’ कशा झाल्या याचा थोडक्यात आढावा घेतला आहे ‘अहिल्याबाई होळकर’ या प्रकरणात. तसेच पुतळाबाई आणि रमाबाई यांचे पतिनिष्ठेचे वर्णनही वाचायला मिळते. या सर्व व्यक्तिचरित्रांपैकी ‘राणी लक्ष्मीबाई’ यांचे चरित्र वाचताना त्यांची धाडसी वृत्ती, चिकाटी, येईल त्या प्रसंगाला न घाबरता शौर्याने सामोरे जाण्याची वृत्ती व शेवटी त्यांचा झालेला शोकात्मक शेवट आपल्या मनाला चटका लावून गेल्याशिवाय राहात नाही. वयाच्या चौदाव्या वर्षी गंगाधरराव यांच्याशी विवाह झाल्यानंतर आपल्या मुलाच्या आणि पतीच्या निधनानंतर शोक करत न बसता ही वीरांगना आपला दत्तक मुलगा दामोदर याला घेऊन ब्रिटिशांच्या कटू कारस्थानांना तोंड देण्यास सज्ज झाली होती. यातच तिला वीरमरण आले. हे वीरमरण येतानासुद्धा ती मोठय़ा शौर्याने अखेरच्या क्षणापर्यंत लढली आणि जेव्हा आपला देह आपल्याला साथ देत नाही हे लक्षात आले तेव्हा तिने आपल्या अनुयायांना आपला देह शत्रूच्या हातात पडता कामा नये, त्याला अग्नी द्या, असे सांगितले. अशा या वीरांगनेची गर्जना ‘मै मेरी झांसी नही दूंगी’ ही आजही अनेक स्त्रियांना आपल्या कामात प्रेरणा देणारी अशी आहे. राणी लक्ष्मीबाईच्या मरणाविषयी अनेक हकीकती उपलब्ध आहेत. त्यांचा उल्लेखही या पुस्तकात आला आहे. या पुस्तकातील स्त्रिया इतिहासकालीन असल्याने काही ठिकाणी ऐतिहासिक संदर्भाची पुनरावृत्ती झाल्यासारखे वाटते; पण ते येणेसुद्धा गरजेचे आहे. साध्या सोप्या भाषेत ही स्त्री चरित्रे आपल्याला वाचायला मिळतात. थोडक्यात असे म्हणता येईल की, इतिहासकाळातील थोर महिला विभूतींच्या जीवनकार्याचा अल्पांशाने सार वाचकांपुढे मांडण्याचा प्रयत्न लेखक गोपाळ देशमुख यांनी केला आहे, तो कौतुकास्पद आहे. ...Read more