* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
GRUHABHANGA IS ONE OF THE SEVERAL HIGHLY ACCLAIMED WORKS WRITTEN BY S. L. BHYRAPPA. THIS KANNADA NOVEL BEARS PROOF OF THE AUTHOR’S RELENTLESS SEARCH FOR TRUTH AND AN EXPLORATION OF WOMEN’S PLACE IN MODERN SOCIETY. THE TEMPORAL BACKDROP OF THE STORY IS THE EARLY 20TH CENTURY. THE NOVEL OPENS IN A RURAL SETTING WHERE NANJAMMA, A WOMAN WHO ASSAYS THE VARIOUS ROLES OF DAUGHTER, WIFE, DAUGHTER-IN-LAW, AND MOTHER, IS TRAPPED IN A SUFFOCATING FAMILIAL SITUATION. SHE HAS TO PUT UP WITH HER LAZY, TOBACCO ADDICTED HUSBAND CHENNIGARAAYA, AN OVERBEARING MOTHER-IN LAW GANGAMMA AND AN UNEDUCATED, SUPERSTITIOUS NEIGHBORHOOD IN GENERAL. ADDED TO ALL THIS IS THE CURSE OF ACUTE POVERTY. DESPITE THE APPARENTLY HOPELESS ARRANGEMENT, NANJAMMA SHINES WITH INNER STRENGTH OF DETERMINATION AND IT IS THIS STRONG WILL THAT DRIVES HER TO FINALLY OVERCOME HER PROBLEMS.
गृहभंग ही स्वातंत्र्यपूर्व भारतात 1920 ते 1940 सालादरम्यान घडणारी कादंबरी. याचं कथासूत्र एका चारी बाजूंनी समस्यांनी ग्रासलेल्या महिलेच्या, नंजम्माच्या संघर्षाभोवती फिरतं. मूर्ख नवरा, खाष्ट सासू, अंधश्रद्धाळू शेजार आणि भीषण गरिबी अशी ओढाताण सहन करत नंजम्माचा जीवनसंघर्ष सुरू आहे. नंजम्माची सासू प्रत्येक दुर्दैवाला नंजम्माला जबाबदार धरते. नवरा घराची जबाबदारी नाकारतो. अशात आपल्या निर्भेळ स्वभावानं आणि धैर्यानं नंजम्मा परिस्थितीवर मात करू पाहते. आत्मनिर्भरपणे उभं राहत असतानाच आपल्या मुलांना चांगलं आयुष्य आणि चांगले संस्कार देण्यास धडपडते. मानवी मनाच्या अतर्क्य व्यापारांमुळे आणि नियतीच्या घावांमुळे घायाळ झालेल्या नंजम्माची हदयाला पीळ पाडणारी कथा.

No Records Found
No Records Found
Keywords
गृहभंग,डॉ. एस.एल. भैरप्पा, अनुवादित कादंबरी, उमा कुलकर्णी GRUHABHANGA, DR. S. L. BHYRAPPA, UMA KULKARNI
Customer Reviews
  • Rating Starवाचक

    "गृहभंग" ही कन्नड मधील सर्वात महत्त्वाच्या कादंबरीकारांपैकी एक श्री एस एल भैरप्पा यांची सुप्रसिद्ध कादंबरी आहे. हि कादंबरी जवळपास 14 भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. सौ उमा कुलकर्णी मॅडम यांनी त्यांच्या जादुई शब्दांनी अतिशय ऊत्कृष्ट प्रकारे तिचा मराठी भषेत अनुवाद केला आहे. हि स्वातंत्र्य पुर्व काळातील ग्रामीण कर्नाटकी भारतातील रामसंद्र गावातली एका ब्राम्हण कुटुंबात घडलेली गोष्ट आहे. या कथेत एक स्त्री ननजम्मा ही प्रमुख केंद्रीय पात्र आहे. लग्न करुन सासरी आल्यावर तिला भेटते ती सतत शिव्या देणारी आणि नंतर प्रत्येक दुर्दैवासाठी तिलाच जबाबदार धरणारी दुष्ट व खाष्ट सासू गांगम्मा,ननजम्माचा आळशी मूर्ख नवरा चेनिंगराय जो त्यांच्या वडिलांची शानुभोगा (ग्रामीण लेखापाल) म्हणून वारसाहक्काने सरकारी कामाला असुनही शुन्य कमाई करणारा असतो.तिचा दिर अप्पन्नय्या हा पण मोठ्या भावाच्या वळणावर गेलेला आहे.अशा घरात आल्यावर तिला अत्याचार, विश्वासघात, दारिद्र्य, दुष्काळ यांच्याशी संघर्ष करावा लागतो..खंबीर ननजम्मा एकट्याने काही वरिष्ठांच्या मदतीने गुप्तपणे शनभोग म्हणून गुपचूप काम करून व नंतर पानाच्या ताट्या बनवुन विकुन घर चालवते.पण नेहमीच तिच्या घरच्यांकडून तिला अपमान व तिरस्कार मिळतो.भरीस भर अंधश्रद्धाळू शेजारी आणि गरिबीविरुद्धचा व भीषण साथीच्या प्लेगच्या सतत पुनरावृत्तीपासून घरच्यांचा संरक्षण करण्याचा तिचा संघर्ष चालुच राहतो. आपल्या तीन मुलांची - पार्वती, रामय्या, विश्व यांचे जीवन, राहण्यायोग्य बनविण्यासाठी ननजम्मा तिच्या बुद्धीने आणि कष्टाने घाम सांडत अविचल उभी राहते आणि तिच्या कुटुंबाला अनेक अपरिहार्य घटनांच्या भोवऱ्यातून वाचवते. संपूर्ण पुस्तकात, अशी आशा वाटते की ननजम्माचे जीवन आनंदी वळण घेईल, परंतु सर्व प्रयत्न करूनही देव तिला `सुख` देऊ शकत नाही.... आणि मग एक अनिश्चित शेवटा कडे नेणारा आशेचा एक मोठा किरण!!. वरील सारांश वाचायला अगदी सोपा वाटतो. पण, या पुस्तकात वर्णन केलेली ज्वलंत कथा ही कादंबरी वाचताना कोणालाही रडवेल. हे पुस्तक जीवनातील कठोर,न पचणारे वास्तव दाखणारे आहे.शब्दांची निवड खूप धाडसी वाटते. कारण, इतर कोणत्याही कादंबरीकाराला कोणत्याही कादंबरीत असे शब्द लिहिण्याची हिंमत नसेल. ही कादंबरी भारतीय क्लासिक. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.