* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A VERY IMPORTANT PERSON IN THE EPIC MAHABHARAT, IS BHEESHMA. PRINCE DEV-VRAT IS CALLED BHEESHMA, WHEN HE TAKES THE EXTREMELY HARSH VOW, THAT HE WILL NEVER MARRY AND WILL NEVER ASCEND THE HASTINAPUR THRONE. BADLY WOUNDED IN THE WAR, HE PREFERS TO LY ON THE BED OF ARROWS, WAITING FOR THE SUN TO CROSS OVER TO THE NORTHERN HEMISPHERE TO ACCEPT DEATH. KRISHNA TELLS HIM ONE NIGHT TO REMEMBER ALL THE WOMEN TO WHOM HE DID GREAT INJUSTICE. INSPITE OF REFUSING TO DO SO, HE STARTS THINKING, AND REALIZES THAT STARTING WITH HIS MOTHER THE GANGA RIVER, HE HAS BEEN UNJUST TO SATYAVATI, AMBA, AMBALIKA, AMBIKA, GANDHARI, AND DRAUPADI THIS FASCINATING NOVEL IS THE STORY OF ALL THESE LADIES AND HOW HIS STICKING TO HIS ROW AND REMAINING LOYAL TO THE THRONE OF HASTINAPUR HAS OFTEN BEEN THEREASON FOR MANY PROBLEMS AND THAT IS WHAT, ON KRISHNAS INSISTENCE OF REMEMBERING THE PAST HE REALIZES IN THE END!
शरपंजरी पडलेले भीष्म आपला जीवनपट पाहत आहेत. कुरुकुलासमोर आता राजगादीला वारस कोण, असा प्रश्न उभा राहिला त्या वेळी त्यांनी प्रतिज्ञा मोडण्यास दिलेला नकार... द्रौपदीला राज्यसभेत फरपटत आणलं तो प्रसंग... कौरव-पांडव युद्ध इ. प्रसंगांना त्यांची प्रतिज्ञाबद्धता कारणीभूत होती, असा आरोप त्यांच्या जवळच्याच व्यक्तींकडून त्यांच्यावर केला गेला...हे सगळं त्यांना आठवतंय... भीष्मांवरच्या या आरोपाची आणि शरशय्येवर त्यांनी केलेल्या आत्मचिंतनाची नाट्यमय गाथा आहे ‘प्रतिश्रुती : स्मरणयात्रा भीष्मांची.’
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#प्रतिश्रुतीस्मरणयात्राभीष्मांची #ध्रुवभट्ट #अंजनीनरवणे #अतरापी #तिमिरपंथी #तत्तवमसी #अकुपार #सागरतीरी #कथागुर्जरी #टर्निंगपॉइंट्स#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक#PRATISHRUTISMARANYATRABHISHMANCHI #DHRUVABHATT #ANJANINARWANE #ATRAPI #TIMIRPANTHI #TATVAMASI#AKUPAR#SAGARTIRI#KATHAGURJARI#TURNINGPOINTS#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarKIRAN BORKAR

    बाणांच्या शय्येवर झोपलेले पितामह भीष्म उत्तरायण सुरू होण्याची वाट पाहतायत. उत्तरायण सुरू झाले की त्यांना प्राण त्यागायचे आहेत. मृत्यूशय्येवर असताना त्यांच्या डोळ्यासमोर स्वतःचा जीवनपट तरळतो आहे आणि त्यांचे आत्मपरीक्षण ही चालू आहे. भीष्माच्या प्रतिज्ञमुळे अनेकांना त्रास झाला आहे तर काहीजण दुखावले गेले आहेत . इच्छामृत्यूचे वरदान मिळाल्यामुळे आज त्यांना आत्मपरीक्षण करण्याची संधी प्राप्त झाली आहे .प्रतिज्ञाबद्धते विषयी स्वतः भीष्माना काय वाटते.. त्यांची बाजूही ऐकून घेऊ ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 22-12-2019

    भीष्म पितामहांची स्मरणगाथा... ‘महाभारता’ची गौरवगाथा अनादिकालापासून सर्वांच्या मनात घर करून आहे. त्यातील अनेक पात्रांचे गारूड आजही मानवी मनावर कायम आहे. त्याच्या पाठीमागे या पात्रांवर किंवा एकूण महाभारतावर जन्माला आलेले अजरामर साहित्य होय. महाभारतातल बहुचर्चित व तितकेच आकर्षणीय केंद्रबिंदू असलेले एक व्यक्तिमत्त्व म्हणजे भीष्म पितामह. भीष्म म्हणजे साक्षात ज्यांना स्वत:च्या मृत्यूला इच्छित वेळी बोलावण्याची संधी मिळालेले व्यक्तिमत्त्व. कौरव व पांडव या दोन्ही पक्षांमध्ये विश्वसनीय व मान्यताप्राप्त हे नाव. अशा अतुलनीय भीष्म पितामहांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा थरारक प्रवास लेखकाने नवीन केंद्रबिंदू घेत या पुस्तकात मांडला आहे. त्यांच्या भीष्म पितामहांची प्रतिज्ञाबद्धता कुरुकुलाचा नाश तसेच वेदनेचे कारण ठरले. ...Read more

  • Rating StarTARUN BHARAT, AKSHARYARTA, 8 DEC 2019

    भीष्मांच्या जीवनाचं चिंतनीय पुनरवलोकन ‘महाभारत’ या महाकाव्याने विविध भाषांतील साहित्यिकांना प्रभावित केलेलं दिसतं. मानवी मनाची, जीवनाची जी अभेद्य व्यूहरचना महाभारतात केली गेली आहे, ती या साहित्यिकांना साद घालते, विचारप्रवृत्त करते. गुजरातीमधील नामंत साहित्यिक ध्रुव भट्ट यांनाही महाभारताने, विशेषत: त्यातील भीष्मांच्या व्यक्तिरेखेने आकर्षून घेतलं आणि त्यातून निर्मिती झाली ‘प्रतिश्रुती : स्मरणयात्रा भीष्मांची’ या कादंबरीची. या कादंबरीचा मराठीत अनुवाद केला आहे अंजनी नरवणे यांनी. भीष्म ही महाभारतातील एक वंदनीय व्यक्तिरेखा. शरपंजरी पडलेल्या भीष्मांच्या डोळ्यांसमोरून गतजीवनाचा पट सरकतो आहे आणि ते आत्मपरीक्षण करत आहेत, अशी या कादंबरीची कल्पना आहे. वर्तमानकाळ-भूतकाळ-वर्तमानकाळ अशा साखळीतून ही कथा पुढे सरकत राहते. भीष्म हे स्वर्गातील अष्टवसूंपैकी एक होते. गायीचे हरण केल्यामुळे या अष्टवसूंना एका ऋषींनी शाप दिला होता, की पृथ्वीवर मनुष्यजन्माला येऊन तुम्हाला मनुष्ययोनीतील भोग भोगावे लागतील. या शापामुळे घाबरलेले वसू गंगा नदीला शरण गेले. त्यांच्यासाठी गंगेने मनुष्यरूप धारण केलं आणि ती शंतनू राजाची राणी झाली. शंतनू आणि गंगेला सात पुत्र झाले. या सातही बालकांना जन्मानंतर लगेच गंगानदीने पाण्यात बुडवलं. शंतनू राजा वचनबद्ध असल्यामुळे सातही वेळेला तिच्या या कृतीमागचं कारण त्याने विचारलं नाही; पण आठव्या वेळेला मात्र त्याने गंगेला अडवलं; मात्र राजाने तिच्याकडे विचारणा केल्यामुळे ती गुप्त झाली. जन्माला आलेल्या पुत्राला ती बरोबर घेऊन गेली. त्याचं नाव देवव्रत. देवव्रताने परशुरामांकडून शस्त्रास्त्र विद्या संपादन केली. त्यानंतर शंतनूराजाशी त्याची भेट झाली. गंगेने शंतून त्याचा पिता असल्याचं सांगितलं. शंतनू देवव्रताला आपल्याबरोबर हस्तिनापूरला घेऊन गेला. त्यानंतरची कथा सर्वज्ञातच आहे. शंतनूचा सत्यवतीशी विवाह, सत्यवतीला होणारी मुलंच भविष्यात राजगादीवर बसतील, अशी सत्यवतीच्या वडिलांची अट असल्यामुळे देवव्रताने आजन्म अविवाहित राहण्याची आणि राज सिंहासनावर कधीही न बसण्याची घेतलेली प्रतिज्ञा, त्या प्रतिज्ञेमुळेच देवव्रताचा ‘भीष्म’ झाला. त्यानंतर सत्यवतीची मुलं अल्पायुषी ठरल्याने हस्तिनापूरच्या गादीला वारस कोण, असा प्रश्न निर्माण झाल्यानंतरही भीष्म आपल्या प्रतिज्ञेवर अढळ राहिले. त्यामुळे सत्यवतीच्या सुनांना पुत्रप्राप्ती करून देण्याचा एकच मार्ग शिल्लक होता, तो म्हणजे सत्यवती-पराशरमुनी यांच्या संबंधांतून जन्मलेल्या व्यासांना पाचारण करणे. सत्यवतीच्या विनंतीनुसार व्यासांनी सत्यवतीच्या सुनांना पुत्रप्राप्ती करून दिली. पंडू, धृतराष्ट्र आणि विदुर या व्यासपुत्रांच्या जीवनातील घटना, कौरव-पांडव यांच्या जीवनातील घटना आणि कुरुक्षेत्रावरील कौरव-पांडव युद्ध या सगळ्या घटनांमध्ये भीष्मांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. त्यामुळेच द्रौपदीला राजसभेत फरपटत आणण्याचा प्रसंग ते टाळू शकले असते; पण केवळ प्रतिज्ञाबद्धतेमुळे त्यांना तसं करता आलं नाही. पांडवांचा वनवास, अज्ञातवास यालाही ते प्रतिबंध करू शकले नाहीत, कौरव-पांडव युद्धही त्यांना थांबवता आलं नाही. कारण एकच होतं, त्यांची प्रतिज्ञाबद्धता. भीष्मांच्या या प्रतिज्ञा घेण्यामागचं आणि जीवनभर त्याचं दृढतेने पालन करण्याचं कारण काय होतं, तर भीष्म हे स्वर्गातील अष्टवसूंपैकी आठवे वसू होते. परत स्वर्गात प्रवेश मिळवायचा असेल तर त्यागमय जीवनच जगायला हवं, सर्वसामान्य माणसापेक्षा वेगळं काहीतरी करायला हवं, असं त्यांना वाटत होतं; मात्र त्यांच्या या प्रतिज्ञेच्या दृढ पालनामुळे बरेच अनर्थ ओढवले, असा आरोप गंगा, सत्यवती, द्रौपदी, अंबा यांनी भीष्मांवर केला. तेव्हा भीष्मांच्या प्रतिज्ञाबद्धतेभोवती फिरणारी ही कादंबरी एका वेगळ्या पद्धतीने महाभारतातील नाट्य अधोरेखित करते. शरपंजरी पडलेल्या भीष्मांना कृष्ण आत्मचिंतन करायला भाग पाडतो, या प्रसंगाने सुरू झालेली ही कादंबरी वाचकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते आणि महाभारतावरील एक कलात्मक साहित्यकृती वाचल्याचा आनंद देते. -अंजली पटवर्धन ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA, (LOKRANG) 03-NOV-2019

    भीष्म आजच्या संदर्भात... ‘भीष्म’ ही महाभारतातील एक महत्त्वाची व्यक्तिरेखा. महाभारत हीच एक अजरामर साहित्यकृती असल्याने, त्यातील विविध व्यक्तिरेखांवर भरपूर साहित्यनिर्मिती झालेली आहे. पौराणिक कथा-कादंबऱ्यांमध्ये अशा व्यक्तिरेखांचे विविध पैलू विविध अंगंनी उलगडून दाखवले आहेत. पुराणकालीन घटना, प्रसंगांचे नव्याने अन्वयन केलेले, या इतिहासाला आजच्या परिप्रेक्ष्यात पाहिल्याचे अनेक साहित्यकृतींमधून दिसते. ध्रुव भट्ट या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखकाची ‘प्रतिश्रुती’ ही कादंबरी अशाच प्रकारची एक वेगळी पौराणिक साहित्यकृती आहे. अंजनी नरवणे यांनी या कादंबरीचा मराठीत अनुवाद केला आहे. भीष्मांच्या आयुष्यातील नाटय़मय प्रसंग व त्या प्रसंगांचा अन्वयार्थ सांगणारी ही कादंबरी असून, स्वत: भीष्मच वाचकांना आपली कथा सांगत आहेत, असे कादंबरीचे निवेदन आहे. पुराणातील एखादी व्यक्तिरेखा स्वत:च स्वत:ची कथा सांगते- ही निवेदनशैली वाचकाला मोहवणारी आहे. मृत्यूला इच्छित वेळी बोलावण्याचं वरदान भीष्मांना प्राप्त झालं आहे, त्यामुळे मृत्युशय्येवर उत्तरायणाची वाट पाहताना ते आत्मपरीक्षण करतात, तो नाटय़मय प्रसंग कादंबरीत परिणामकारकपणे रंगवला आहे. भीष्मांची प्रतिज्ञाबद्धता कुरुकुलाच्या नाशाला कारणीभूत ठरल्यामुळे ते शरशय्येवर असतानाही त्यांच्या प्रतिज्ञाबद्धतेला दोष दिला जातो. याबद्दल आणि एकंदरीतच आयुष्याबद्दल भीष्म आत्मपरीक्षण करतात, स्वत:लाच प्रश्न विचारतात. आपल्याच मनाशी चाललेल्या या संघर्षांचे, द्वंद्वाचे प्रभावी चित्रण या कादंबरीत केले आहे. जुनी मिथकं, धारणा, परंपरा यांचे आजच्या काळात नव्याने अर्थ लावून चिकित्सकपणे पौराणिक इतिहासाकडे पाहणाऱ्यांसाठी ही कादंबरी हा एक उत्तम साहित्यिक ऐवज आहे. ऐतिहासिक, पौराणिक घटनांना आपल्या नव्या साहित्यकृतीतून प्रश्न विचारण्याचा प्रयत्न मोजक्याच साहित्यिकांनी केलेला आहे. वि. स. खांडेकर यांच्या ‘ययाती’ या कादंबरीत भेटणारी पात्रं आपल्याला त्याच कथेवर गिरीश कार्नाडांसारख्या नाटककारानं लिहिलेल्या ‘ययाती’ नाटकामधून वेगळ्याच रुपात भेटतात. या दोन भिन्न साहित्यकृतींची कथा, आशय सारखेच आहेत, आशयाकडे समाजरचना, काळ, मूल्यं यांच्या परिप्रेक्ष्यातून पाहण्याचा दृष्टीकोन मात्र भिन्न आहे. खांडेकरांच्या ‘ययाती’तील व्यक्तिरेखांचे अनेक नवे पैलू कार्नाडांच्या ‘ययाती’ नाटकातून समोर येतात. दोन्हीचेही महत्त्व आहेच. त्यामुळेच पौराणिक घटनांचे समकालीन परिप्रेक्ष्यात अन्वयन वाचकांना नवी दृष्टी देते. ध्रुव भट्ट यांची ही कादंबरी अशी नवी दृष्टी देऊ पाहणारी आहे. पौराणिक व्यक्तिरेखांना समाजमान्य नैतिकतेच्या काचातून मोकळं करून, त्यांच्याकडे मानवी दृष्टीनं पाहायला लावणारी आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more