* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A VERY IMPORTANT PERSON IN THE EPIC MAHABHARAT, IS BHEESHMA. PRINCE DEV-VRAT IS CALLED BHEESHMA, WHEN HE TAKES THE EXTREMELY HARSH VOW, THAT HE WILL NEVER MARRY AND WILL NEVER ASCEND THE HASTINAPUR THRONE. BADLY WOUNDED IN THE WAR, HE PREFERS TO LY ON THE BED OF ARROWS, WAITING FOR THE SUN TO CROSS OVER TO THE NORTHERN HEMISPHERE TO ACCEPT DEATH. KRISHNA TELLS HIM ONE NIGHT TO REMEMBER ALL THE WOMEN TO WHOM HE DID GREAT INJUSTICE. INSPITE OF REFUSING TO DO SO, HE STARTS THINKING, AND REALIZES THAT STARTING WITH HIS MOTHER THE GANGA RIVER, HE HAS BEEN UNJUST TO SATYAVATI, AMBA, AMBALIKA, AMBIKA, GANDHARI, AND DRAUPADI THIS FASCINATING NOVEL IS THE STORY OF ALL THESE LADIES AND HOW HIS STICKING TO HIS ROW AND REMAINING LOYAL TO THE THRONE OF HASTINAPUR HAS OFTEN BEEN THEREASON FOR MANY PROBLEMS AND THAT IS WHAT, ON KRISHNAS INSISTENCE OF REMEMBERING THE PAST HE REALIZES IN THE END!
शरपंजरी पडलेले भीष्म आपला जीवनपट पाहत आहेत. कुरुकुलासमोर आता राजगादीला वारस कोण, असा प्रश्न उभा राहिला त्या वेळी त्यांनी प्रतिज्ञा मोडण्यास दिलेला नकार... द्रौपदीला राज्यसभेत फरपटत आणलं तो प्रसंग... कौरव-पांडव युद्ध इ. प्रसंगांना त्यांची प्रतिज्ञाबद्धता कारणीभूत होती, असा आरोप त्यांच्या जवळच्याच व्यक्तींकडून त्यांच्यावर केला गेला...हे सगळं त्यांना आठवतंय... भीष्मांवरच्या या आरोपाची आणि शरशय्येवर त्यांनी केलेल्या आत्मचिंतनाची नाट्यमय गाथा आहे ‘प्रतिश्रुती : स्मरणयात्रा भीष्मांची.’
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#प्रतिश्रुतीस्मरणयात्राभीष्मांची #ध्रुवभट्ट #अंजनीनरवणे #अतरापी #तिमिरपंथी #तत्तवमसी #अकुपार #सागरतीरी #कथागुर्जरी #टर्निंगपॉइंट्स#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक#PRATISHRUTISMARANYATRABHISHMANCHI #DHRUVABHATT #ANJANINARWANE #ATRAPI #TIMIRPANTHI #TATVAMASI#AKUPAR#SAGARTIRI#KATHAGURJARI#TURNINGPOINTS#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarKIRAN BORKAR

    बाणांच्या शय्येवर झोपलेले पितामह भीष्म उत्तरायण सुरू होण्याची वाट पाहतायत. उत्तरायण सुरू झाले की त्यांना प्राण त्यागायचे आहेत. मृत्यूशय्येवर असताना त्यांच्या डोळ्यासमोर स्वतःचा जीवनपट तरळतो आहे आणि त्यांचे आत्मपरीक्षण ही चालू आहे. भीष्माच्या प्रतिज्ञमुळे अनेकांना त्रास झाला आहे तर काहीजण दुखावले गेले आहेत . इच्छामृत्यूचे वरदान मिळाल्यामुळे आज त्यांना आत्मपरीक्षण करण्याची संधी प्राप्त झाली आहे .प्रतिज्ञाबद्धते विषयी स्वतः भीष्माना काय वाटते.. त्यांची बाजूही ऐकून घेऊ ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 22-12-2019

    भीष्म पितामहांची स्मरणगाथा... ‘महाभारता’ची गौरवगाथा अनादिकालापासून सर्वांच्या मनात घर करून आहे. त्यातील अनेक पात्रांचे गारूड आजही मानवी मनावर कायम आहे. त्याच्या पाठीमागे या पात्रांवर किंवा एकूण महाभारतावर जन्माला आलेले अजरामर साहित्य होय. महाभारतातल बहुचर्चित व तितकेच आकर्षणीय केंद्रबिंदू असलेले एक व्यक्तिमत्त्व म्हणजे भीष्म पितामह. भीष्म म्हणजे साक्षात ज्यांना स्वत:च्या मृत्यूला इच्छित वेळी बोलावण्याची संधी मिळालेले व्यक्तिमत्त्व. कौरव व पांडव या दोन्ही पक्षांमध्ये विश्वसनीय व मान्यताप्राप्त हे नाव. अशा अतुलनीय भीष्म पितामहांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा थरारक प्रवास लेखकाने नवीन केंद्रबिंदू घेत या पुस्तकात मांडला आहे. त्यांच्या भीष्म पितामहांची प्रतिज्ञाबद्धता कुरुकुलाचा नाश तसेच वेदनेचे कारण ठरले. ...Read more

  • Rating StarTARUN BHARAT, AKSHARYARTA, 8 DEC 2019

    भीष्मांच्या जीवनाचं चिंतनीय पुनरवलोकन ‘महाभारत’ या महाकाव्याने विविध भाषांतील साहित्यिकांना प्रभावित केलेलं दिसतं. मानवी मनाची, जीवनाची जी अभेद्य व्यूहरचना महाभारतात केली गेली आहे, ती या साहित्यिकांना साद घालते, विचारप्रवृत्त करते. गुजरातीमधील नामंत साहित्यिक ध्रुव भट्ट यांनाही महाभारताने, विशेषत: त्यातील भीष्मांच्या व्यक्तिरेखेने आकर्षून घेतलं आणि त्यातून निर्मिती झाली ‘प्रतिश्रुती : स्मरणयात्रा भीष्मांची’ या कादंबरीची. या कादंबरीचा मराठीत अनुवाद केला आहे अंजनी नरवणे यांनी. भीष्म ही महाभारतातील एक वंदनीय व्यक्तिरेखा. शरपंजरी पडलेल्या भीष्मांच्या डोळ्यांसमोरून गतजीवनाचा पट सरकतो आहे आणि ते आत्मपरीक्षण करत आहेत, अशी या कादंबरीची कल्पना आहे. वर्तमानकाळ-भूतकाळ-वर्तमानकाळ अशा साखळीतून ही कथा पुढे सरकत राहते. भीष्म हे स्वर्गातील अष्टवसूंपैकी एक होते. गायीचे हरण केल्यामुळे या अष्टवसूंना एका ऋषींनी शाप दिला होता, की पृथ्वीवर मनुष्यजन्माला येऊन तुम्हाला मनुष्ययोनीतील भोग भोगावे लागतील. या शापामुळे घाबरलेले वसू गंगा नदीला शरण गेले. त्यांच्यासाठी गंगेने मनुष्यरूप धारण केलं आणि ती शंतनू राजाची राणी झाली. शंतनू आणि गंगेला सात पुत्र झाले. या सातही बालकांना जन्मानंतर लगेच गंगानदीने पाण्यात बुडवलं. शंतनू राजा वचनबद्ध असल्यामुळे सातही वेळेला तिच्या या कृतीमागचं कारण त्याने विचारलं नाही; पण आठव्या वेळेला मात्र त्याने गंगेला अडवलं; मात्र राजाने तिच्याकडे विचारणा केल्यामुळे ती गुप्त झाली. जन्माला आलेल्या पुत्राला ती बरोबर घेऊन गेली. त्याचं नाव देवव्रत. देवव्रताने परशुरामांकडून शस्त्रास्त्र विद्या संपादन केली. त्यानंतर शंतनूराजाशी त्याची भेट झाली. गंगेने शंतून त्याचा पिता असल्याचं सांगितलं. शंतनू देवव्रताला आपल्याबरोबर हस्तिनापूरला घेऊन गेला. त्यानंतरची कथा सर्वज्ञातच आहे. शंतनूचा सत्यवतीशी विवाह, सत्यवतीला होणारी मुलंच भविष्यात राजगादीवर बसतील, अशी सत्यवतीच्या वडिलांची अट असल्यामुळे देवव्रताने आजन्म अविवाहित राहण्याची आणि राज सिंहासनावर कधीही न बसण्याची घेतलेली प्रतिज्ञा, त्या प्रतिज्ञेमुळेच देवव्रताचा ‘भीष्म’ झाला. त्यानंतर सत्यवतीची मुलं अल्पायुषी ठरल्याने हस्तिनापूरच्या गादीला वारस कोण, असा प्रश्न निर्माण झाल्यानंतरही भीष्म आपल्या प्रतिज्ञेवर अढळ राहिले. त्यामुळे सत्यवतीच्या सुनांना पुत्रप्राप्ती करून देण्याचा एकच मार्ग शिल्लक होता, तो म्हणजे सत्यवती-पराशरमुनी यांच्या संबंधांतून जन्मलेल्या व्यासांना पाचारण करणे. सत्यवतीच्या विनंतीनुसार व्यासांनी सत्यवतीच्या सुनांना पुत्रप्राप्ती करून दिली. पंडू, धृतराष्ट्र आणि विदुर या व्यासपुत्रांच्या जीवनातील घटना, कौरव-पांडव यांच्या जीवनातील घटना आणि कुरुक्षेत्रावरील कौरव-पांडव युद्ध या सगळ्या घटनांमध्ये भीष्मांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. त्यामुळेच द्रौपदीला राजसभेत फरपटत आणण्याचा प्रसंग ते टाळू शकले असते; पण केवळ प्रतिज्ञाबद्धतेमुळे त्यांना तसं करता आलं नाही. पांडवांचा वनवास, अज्ञातवास यालाही ते प्रतिबंध करू शकले नाहीत, कौरव-पांडव युद्धही त्यांना थांबवता आलं नाही. कारण एकच होतं, त्यांची प्रतिज्ञाबद्धता. भीष्मांच्या या प्रतिज्ञा घेण्यामागचं आणि जीवनभर त्याचं दृढतेने पालन करण्याचं कारण काय होतं, तर भीष्म हे स्वर्गातील अष्टवसूंपैकी आठवे वसू होते. परत स्वर्गात प्रवेश मिळवायचा असेल तर त्यागमय जीवनच जगायला हवं, सर्वसामान्य माणसापेक्षा वेगळं काहीतरी करायला हवं, असं त्यांना वाटत होतं; मात्र त्यांच्या या प्रतिज्ञेच्या दृढ पालनामुळे बरेच अनर्थ ओढवले, असा आरोप गंगा, सत्यवती, द्रौपदी, अंबा यांनी भीष्मांवर केला. तेव्हा भीष्मांच्या प्रतिज्ञाबद्धतेभोवती फिरणारी ही कादंबरी एका वेगळ्या पद्धतीने महाभारतातील नाट्य अधोरेखित करते. शरपंजरी पडलेल्या भीष्मांना कृष्ण आत्मचिंतन करायला भाग पाडतो, या प्रसंगाने सुरू झालेली ही कादंबरी वाचकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते आणि महाभारतावरील एक कलात्मक साहित्यकृती वाचल्याचा आनंद देते. -अंजली पटवर्धन ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA, (LOKRANG) 03-NOV-2019

    भीष्म आजच्या संदर्भात... ‘भीष्म’ ही महाभारतातील एक महत्त्वाची व्यक्तिरेखा. महाभारत हीच एक अजरामर साहित्यकृती असल्याने, त्यातील विविध व्यक्तिरेखांवर भरपूर साहित्यनिर्मिती झालेली आहे. पौराणिक कथा-कादंबऱ्यांमध्ये अशा व्यक्तिरेखांचे विविध पैलू विविध अंगंनी उलगडून दाखवले आहेत. पुराणकालीन घटना, प्रसंगांचे नव्याने अन्वयन केलेले, या इतिहासाला आजच्या परिप्रेक्ष्यात पाहिल्याचे अनेक साहित्यकृतींमधून दिसते. ध्रुव भट्ट या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखकाची ‘प्रतिश्रुती’ ही कादंबरी अशाच प्रकारची एक वेगळी पौराणिक साहित्यकृती आहे. अंजनी नरवणे यांनी या कादंबरीचा मराठीत अनुवाद केला आहे. भीष्मांच्या आयुष्यातील नाटय़मय प्रसंग व त्या प्रसंगांचा अन्वयार्थ सांगणारी ही कादंबरी असून, स्वत: भीष्मच वाचकांना आपली कथा सांगत आहेत, असे कादंबरीचे निवेदन आहे. पुराणातील एखादी व्यक्तिरेखा स्वत:च स्वत:ची कथा सांगते- ही निवेदनशैली वाचकाला मोहवणारी आहे. मृत्यूला इच्छित वेळी बोलावण्याचं वरदान भीष्मांना प्राप्त झालं आहे, त्यामुळे मृत्युशय्येवर उत्तरायणाची वाट पाहताना ते आत्मपरीक्षण करतात, तो नाटय़मय प्रसंग कादंबरीत परिणामकारकपणे रंगवला आहे. भीष्मांची प्रतिज्ञाबद्धता कुरुकुलाच्या नाशाला कारणीभूत ठरल्यामुळे ते शरशय्येवर असतानाही त्यांच्या प्रतिज्ञाबद्धतेला दोष दिला जातो. याबद्दल आणि एकंदरीतच आयुष्याबद्दल भीष्म आत्मपरीक्षण करतात, स्वत:लाच प्रश्न विचारतात. आपल्याच मनाशी चाललेल्या या संघर्षांचे, द्वंद्वाचे प्रभावी चित्रण या कादंबरीत केले आहे. जुनी मिथकं, धारणा, परंपरा यांचे आजच्या काळात नव्याने अर्थ लावून चिकित्सकपणे पौराणिक इतिहासाकडे पाहणाऱ्यांसाठी ही कादंबरी हा एक उत्तम साहित्यिक ऐवज आहे. ऐतिहासिक, पौराणिक घटनांना आपल्या नव्या साहित्यकृतीतून प्रश्न विचारण्याचा प्रयत्न मोजक्याच साहित्यिकांनी केलेला आहे. वि. स. खांडेकर यांच्या ‘ययाती’ या कादंबरीत भेटणारी पात्रं आपल्याला त्याच कथेवर गिरीश कार्नाडांसारख्या नाटककारानं लिहिलेल्या ‘ययाती’ नाटकामधून वेगळ्याच रुपात भेटतात. या दोन भिन्न साहित्यकृतींची कथा, आशय सारखेच आहेत, आशयाकडे समाजरचना, काळ, मूल्यं यांच्या परिप्रेक्ष्यातून पाहण्याचा दृष्टीकोन मात्र भिन्न आहे. खांडेकरांच्या ‘ययाती’तील व्यक्तिरेखांचे अनेक नवे पैलू कार्नाडांच्या ‘ययाती’ नाटकातून समोर येतात. दोन्हीचेही महत्त्व आहेच. त्यामुळेच पौराणिक घटनांचे समकालीन परिप्रेक्ष्यात अन्वयन वाचकांना नवी दृष्टी देते. ध्रुव भट्ट यांची ही कादंबरी अशी नवी दृष्टी देऊ पाहणारी आहे. पौराणिक व्यक्तिरेखांना समाजमान्य नैतिकतेच्या काचातून मोकळं करून, त्यांच्याकडे मानवी दृष्टीनं पाहायला लावणारी आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more