* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PRATISHRUTI SMARANYATRA BHISHMANCHI
  • Availability : Available
  • Translators : ANJANI NARAVANE
  • ISBN : 9789353173081
  • Edition : 1
  • Publishing Year : AUGUST 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 256
  • Language : Translated From GUJRATI to MARATHI
  • Category : NOVEL
  • Available in Combos :DHRUV BHATT COMBO SET - 7 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A VERY IMPORTANT PERSON IN THE EPIC MAHABHARAT, IS BHEESHMA. PRINCE DEV-VRAT IS CALLED BHEESHMA, WHEN HE TAKES THE EXTREMELY HARSH VOW, THAT HE WILL NEVER MARRY AND WILL NEVER ASCEND THE HASTINAPUR THRONE. BADLY WOUNDED IN THE WAR, HE PREFERS TO LY ON THE BED OF ARROWS, WAITING FOR THE SUN TO CROSS OVER TO THE NORTHERN HEMISPHERE TO ACCEPT DEATH. KRISHNA TELLS HIM ONE NIGHT TO REMEMBER ALL THE WOMEN TO WHOM HE DID GREAT INJUSTICE. INSPITE OF REFUSING TO DO SO, HE STARTS THINKING, AND REALIZES THAT STARTING WITH HIS MOTHER THE GANGA RIVER, HE HAS BEEN UNJUST TO SATYAVATI, AMBA, AMBALIKA, AMBIKA, GANDHARI, AND DRAUPADI THIS FASCINATING NOVEL IS THE STORY OF ALL THESE LADIES AND HOW HIS STICKING TO HIS ROW AND REMAINING LOYAL TO THE THRONE OF HASTINAPUR HAS OFTEN BEEN THEREASON FOR MANY PROBLEMS AND THAT IS WHAT, ON KRISHNAS INSISTENCE OF REMEMBERING THE PAST HE REALIZES IN THE END!
शरपंजरी पडलेले भीष्म आपला जीवनपट पाहत आहेत. कुरुकुलासमोर आता राजगादीला वारस कोण, असा प्रश्न उभा राहिला त्या वेळी त्यांनी प्रतिज्ञा मोडण्यास दिलेला नकार... द्रौपदीला राज्यसभेत फरपटत आणलं तो प्रसंग... कौरव-पांडव युद्ध इ. प्रसंगांना त्यांची प्रतिज्ञाबद्धता कारणीभूत होती, असा आरोप त्यांच्या जवळच्याच व्यक्तींकडून त्यांच्यावर केला गेला...हे सगळं त्यांना आठवतंय... भीष्मांवरच्या या आरोपाची आणि शरशय्येवर त्यांनी केलेल्या आत्मचिंतनाची नाट्यमय गाथा आहे ‘प्रतिश्रुती : स्मरणयात्रा भीष्मांची.’
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#प्रतिश्रुतीस्मरणयात्राभीष्मांची #ध्रुवभट्ट #अंजनीनरवणे #अतरापी #तिमिरपंथी #तत्तवमसी #अकुपार #सागरतीरी #कथागुर्जरी #टर्निंगपॉइंट्स#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक#PRATISHRUTISMARANYATRABHISHMANCHI #DHRUVABHATT #ANJANINARWANE #ATRAPI #TIMIRPANTHI #TATVAMASI#AKUPAR#SAGARTIRI#KATHAGURJARI#TURNINGPOINTS#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarKIRAN BORKAR

    बाणांच्या शय्येवर झोपलेले पितामह भीष्म उत्तरायण सुरू होण्याची वाट पाहतायत. उत्तरायण सुरू झाले की त्यांना प्राण त्यागायचे आहेत. मृत्यूशय्येवर असताना त्यांच्या डोळ्यासमोर स्वतःचा जीवनपट तरळतो आहे आणि त्यांचे आत्मपरीक्षण ही चालू आहे. भीष्माच्या प्रतिज्ञमुळे अनेकांना त्रास झाला आहे तर काहीजण दुखावले गेले आहेत . इच्छामृत्यूचे वरदान मिळाल्यामुळे आज त्यांना आत्मपरीक्षण करण्याची संधी प्राप्त झाली आहे .प्रतिज्ञाबद्धते विषयी स्वतः भीष्माना काय वाटते.. त्यांची बाजूही ऐकून घेऊ ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 22-12-2019

    भीष्म पितामहांची स्मरणगाथा... ‘महाभारता’ची गौरवगाथा अनादिकालापासून सर्वांच्या मनात घर करून आहे. त्यातील अनेक पात्रांचे गारूड आजही मानवी मनावर कायम आहे. त्याच्या पाठीमागे या पात्रांवर किंवा एकूण महाभारतावर जन्माला आलेले अजरामर साहित्य होय. महाभारतातल बहुचर्चित व तितकेच आकर्षणीय केंद्रबिंदू असलेले एक व्यक्तिमत्त्व म्हणजे भीष्म पितामह. भीष्म म्हणजे साक्षात ज्यांना स्वत:च्या मृत्यूला इच्छित वेळी बोलावण्याची संधी मिळालेले व्यक्तिमत्त्व. कौरव व पांडव या दोन्ही पक्षांमध्ये विश्वसनीय व मान्यताप्राप्त हे नाव. अशा अतुलनीय भीष्म पितामहांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा थरारक प्रवास लेखकाने नवीन केंद्रबिंदू घेत या पुस्तकात मांडला आहे. त्यांच्या भीष्म पितामहांची प्रतिज्ञाबद्धता कुरुकुलाचा नाश तसेच वेदनेचे कारण ठरले. ...Read more

  • Rating StarTARUN BHARAT, AKSHARYARTA, 8 DEC 2019

    भीष्मांच्या जीवनाचं चिंतनीय पुनरवलोकन ‘महाभारत’ या महाकाव्याने विविध भाषांतील साहित्यिकांना प्रभावित केलेलं दिसतं. मानवी मनाची, जीवनाची जी अभेद्य व्यूहरचना महाभारतात केली गेली आहे, ती या साहित्यिकांना साद घालते, विचारप्रवृत्त करते. गुजरातीमधील नामंत साहित्यिक ध्रुव भट्ट यांनाही महाभारताने, विशेषत: त्यातील भीष्मांच्या व्यक्तिरेखेने आकर्षून घेतलं आणि त्यातून निर्मिती झाली ‘प्रतिश्रुती : स्मरणयात्रा भीष्मांची’ या कादंबरीची. या कादंबरीचा मराठीत अनुवाद केला आहे अंजनी नरवणे यांनी. भीष्म ही महाभारतातील एक वंदनीय व्यक्तिरेखा. शरपंजरी पडलेल्या भीष्मांच्या डोळ्यांसमोरून गतजीवनाचा पट सरकतो आहे आणि ते आत्मपरीक्षण करत आहेत, अशी या कादंबरीची कल्पना आहे. वर्तमानकाळ-भूतकाळ-वर्तमानकाळ अशा साखळीतून ही कथा पुढे सरकत राहते. भीष्म हे स्वर्गातील अष्टवसूंपैकी एक होते. गायीचे हरण केल्यामुळे या अष्टवसूंना एका ऋषींनी शाप दिला होता, की पृथ्वीवर मनुष्यजन्माला येऊन तुम्हाला मनुष्ययोनीतील भोग भोगावे लागतील. या शापामुळे घाबरलेले वसू गंगा नदीला शरण गेले. त्यांच्यासाठी गंगेने मनुष्यरूप धारण केलं आणि ती शंतनू राजाची राणी झाली. शंतनू आणि गंगेला सात पुत्र झाले. या सातही बालकांना जन्मानंतर लगेच गंगानदीने पाण्यात बुडवलं. शंतनू राजा वचनबद्ध असल्यामुळे सातही वेळेला तिच्या या कृतीमागचं कारण त्याने विचारलं नाही; पण आठव्या वेळेला मात्र त्याने गंगेला अडवलं; मात्र राजाने तिच्याकडे विचारणा केल्यामुळे ती गुप्त झाली. जन्माला आलेल्या पुत्राला ती बरोबर घेऊन गेली. त्याचं नाव देवव्रत. देवव्रताने परशुरामांकडून शस्त्रास्त्र विद्या संपादन केली. त्यानंतर शंतनूराजाशी त्याची भेट झाली. गंगेने शंतून त्याचा पिता असल्याचं सांगितलं. शंतनू देवव्रताला आपल्याबरोबर हस्तिनापूरला घेऊन गेला. त्यानंतरची कथा सर्वज्ञातच आहे. शंतनूचा सत्यवतीशी विवाह, सत्यवतीला होणारी मुलंच भविष्यात राजगादीवर बसतील, अशी सत्यवतीच्या वडिलांची अट असल्यामुळे देवव्रताने आजन्म अविवाहित राहण्याची आणि राज सिंहासनावर कधीही न बसण्याची घेतलेली प्रतिज्ञा, त्या प्रतिज्ञेमुळेच देवव्रताचा ‘भीष्म’ झाला. त्यानंतर सत्यवतीची मुलं अल्पायुषी ठरल्याने हस्तिनापूरच्या गादीला वारस कोण, असा प्रश्न निर्माण झाल्यानंतरही भीष्म आपल्या प्रतिज्ञेवर अढळ राहिले. त्यामुळे सत्यवतीच्या सुनांना पुत्रप्राप्ती करून देण्याचा एकच मार्ग शिल्लक होता, तो म्हणजे सत्यवती-पराशरमुनी यांच्या संबंधांतून जन्मलेल्या व्यासांना पाचारण करणे. सत्यवतीच्या विनंतीनुसार व्यासांनी सत्यवतीच्या सुनांना पुत्रप्राप्ती करून दिली. पंडू, धृतराष्ट्र आणि विदुर या व्यासपुत्रांच्या जीवनातील घटना, कौरव-पांडव यांच्या जीवनातील घटना आणि कुरुक्षेत्रावरील कौरव-पांडव युद्ध या सगळ्या घटनांमध्ये भीष्मांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. त्यामुळेच द्रौपदीला राजसभेत फरपटत आणण्याचा प्रसंग ते टाळू शकले असते; पण केवळ प्रतिज्ञाबद्धतेमुळे त्यांना तसं करता आलं नाही. पांडवांचा वनवास, अज्ञातवास यालाही ते प्रतिबंध करू शकले नाहीत, कौरव-पांडव युद्धही त्यांना थांबवता आलं नाही. कारण एकच होतं, त्यांची प्रतिज्ञाबद्धता. भीष्मांच्या या प्रतिज्ञा घेण्यामागचं आणि जीवनभर त्याचं दृढतेने पालन करण्याचं कारण काय होतं, तर भीष्म हे स्वर्गातील अष्टवसूंपैकी आठवे वसू होते. परत स्वर्गात प्रवेश मिळवायचा असेल तर त्यागमय जीवनच जगायला हवं, सर्वसामान्य माणसापेक्षा वेगळं काहीतरी करायला हवं, असं त्यांना वाटत होतं; मात्र त्यांच्या या प्रतिज्ञेच्या दृढ पालनामुळे बरेच अनर्थ ओढवले, असा आरोप गंगा, सत्यवती, द्रौपदी, अंबा यांनी भीष्मांवर केला. तेव्हा भीष्मांच्या प्रतिज्ञाबद्धतेभोवती फिरणारी ही कादंबरी एका वेगळ्या पद्धतीने महाभारतातील नाट्य अधोरेखित करते. शरपंजरी पडलेल्या भीष्मांना कृष्ण आत्मचिंतन करायला भाग पाडतो, या प्रसंगाने सुरू झालेली ही कादंबरी वाचकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते आणि महाभारतावरील एक कलात्मक साहित्यकृती वाचल्याचा आनंद देते. -अंजली पटवर्धन ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA, (LOKRANG) 03-NOV-2019

    भीष्म आजच्या संदर्भात... ‘भीष्म’ ही महाभारतातील एक महत्त्वाची व्यक्तिरेखा. महाभारत हीच एक अजरामर साहित्यकृती असल्याने, त्यातील विविध व्यक्तिरेखांवर भरपूर साहित्यनिर्मिती झालेली आहे. पौराणिक कथा-कादंबऱ्यांमध्ये अशा व्यक्तिरेखांचे विविध पैलू विविध अंगंनी उलगडून दाखवले आहेत. पुराणकालीन घटना, प्रसंगांचे नव्याने अन्वयन केलेले, या इतिहासाला आजच्या परिप्रेक्ष्यात पाहिल्याचे अनेक साहित्यकृतींमधून दिसते. ध्रुव भट्ट या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखकाची ‘प्रतिश्रुती’ ही कादंबरी अशाच प्रकारची एक वेगळी पौराणिक साहित्यकृती आहे. अंजनी नरवणे यांनी या कादंबरीचा मराठीत अनुवाद केला आहे. भीष्मांच्या आयुष्यातील नाटय़मय प्रसंग व त्या प्रसंगांचा अन्वयार्थ सांगणारी ही कादंबरी असून, स्वत: भीष्मच वाचकांना आपली कथा सांगत आहेत, असे कादंबरीचे निवेदन आहे. पुराणातील एखादी व्यक्तिरेखा स्वत:च स्वत:ची कथा सांगते- ही निवेदनशैली वाचकाला मोहवणारी आहे. मृत्यूला इच्छित वेळी बोलावण्याचं वरदान भीष्मांना प्राप्त झालं आहे, त्यामुळे मृत्युशय्येवर उत्तरायणाची वाट पाहताना ते आत्मपरीक्षण करतात, तो नाटय़मय प्रसंग कादंबरीत परिणामकारकपणे रंगवला आहे. भीष्मांची प्रतिज्ञाबद्धता कुरुकुलाच्या नाशाला कारणीभूत ठरल्यामुळे ते शरशय्येवर असतानाही त्यांच्या प्रतिज्ञाबद्धतेला दोष दिला जातो. याबद्दल आणि एकंदरीतच आयुष्याबद्दल भीष्म आत्मपरीक्षण करतात, स्वत:लाच प्रश्न विचारतात. आपल्याच मनाशी चाललेल्या या संघर्षांचे, द्वंद्वाचे प्रभावी चित्रण या कादंबरीत केले आहे. जुनी मिथकं, धारणा, परंपरा यांचे आजच्या काळात नव्याने अर्थ लावून चिकित्सकपणे पौराणिक इतिहासाकडे पाहणाऱ्यांसाठी ही कादंबरी हा एक उत्तम साहित्यिक ऐवज आहे. ऐतिहासिक, पौराणिक घटनांना आपल्या नव्या साहित्यकृतीतून प्रश्न विचारण्याचा प्रयत्न मोजक्याच साहित्यिकांनी केलेला आहे. वि. स. खांडेकर यांच्या ‘ययाती’ या कादंबरीत भेटणारी पात्रं आपल्याला त्याच कथेवर गिरीश कार्नाडांसारख्या नाटककारानं लिहिलेल्या ‘ययाती’ नाटकामधून वेगळ्याच रुपात भेटतात. या दोन भिन्न साहित्यकृतींची कथा, आशय सारखेच आहेत, आशयाकडे समाजरचना, काळ, मूल्यं यांच्या परिप्रेक्ष्यातून पाहण्याचा दृष्टीकोन मात्र भिन्न आहे. खांडेकरांच्या ‘ययाती’तील व्यक्तिरेखांचे अनेक नवे पैलू कार्नाडांच्या ‘ययाती’ नाटकातून समोर येतात. दोन्हीचेही महत्त्व आहेच. त्यामुळेच पौराणिक घटनांचे समकालीन परिप्रेक्ष्यात अन्वयन वाचकांना नवी दृष्टी देते. ध्रुव भट्ट यांची ही कादंबरी अशी नवी दृष्टी देऊ पाहणारी आहे. पौराणिक व्यक्तिरेखांना समाजमान्य नैतिकतेच्या काचातून मोकळं करून, त्यांच्याकडे मानवी दृष्टीनं पाहायला लावणारी आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
दिपक पांडे पुणे

भीमराव देशमुख या फुटबॉल योद्ध्याचा क्रीडापट असलेले महारुद्र नावाचे पुस्तक माझ्या वाचनात आले. हा क्रीडापट सहा प्रकरणात विभागला आहे . या साहसी फुटबॉलच्या या यशोगाथेने मन प्रसन्न झाले. १९४७ सालच्या आधी कुठलीही प्रसारमाध्यमे नसताना अलेक्झांडर या फुटबॉलटूने भीमराव देशमुख यांचा प्रत्यक्ष खेळ बघून या हिऱ्याला पैलू पडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा उदयकाल सुरु झाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. जडणघडण उत्कर्ष या दोन प्रकरणातील त्यांनी क्रीडास्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाचा आलेख आपल्याला थक्क करून सोडतो. प्रारब्ध या प्रकरणात कौटुंबिक जीवनावर प्रकाश लेखकाने टाकला आहे. त्यात अनोळखी गृहस्थ सरदेशपांडे सरांना केलेली मदत असो, ऑफिसरला मैदानावर तुडवण्याचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी आगीत घेतलेली उडी हे प्रसंग आपल्याला गुंतवून ठेवतात. आजच्या पिढीतील खेळाडूंना भीमराव देशमुख यांची हि यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. अशी मला अशा आहे. ...Read more

RIVER GOD
RIVER GOD by WILBUR SMITH Rating Star
Ganesh jagtap

Must read book