THE RURAL AREA AND THE REALITY IN THE STORY COLLECTION ‘GAIGULI’ MAKE THESE EVENTS SEEM SO VIVID THAT THEY SEEM TO HAVE JUST HAPPENED. FOR EXAMPLE: ‘KOKANYA’ ASUDE WHO BRINGS THE LOOT IN THE STORY ‘NATAM’ OR ‘SAKHA’ IN ‘EK HOTA SAKHA’ – BOTH OF THEM BECOME THEIR OWN MOTHERS BECAUSE THEY COULD NOT SOLVE THE MATH OF THEIR LIVES. HOW DOES ‘SAVI’ IN ‘TICHI GOSHT’ BECOME A CRIMINAL AFTER GETTING BORED WITH HER BORING LIFE? AND ON THE CONTRARY, HOW ‘TI’ IN ‘SHIKAR’, DESPITE BEING A SAVAGE, BOLDLY HUNTS THE HUNTER – THAT IS, THE ONE WHO TAKES ADVANTAGE OF HER – ALSO GIVES THE READER A LOT TO LIVE BY.
‘गायगुली’ या कथासंग्रहातील ग्रामीण भाग आणि त्यातील वास्तव यामुळे या घटना आताच घडल्या आहेत असं वाटण्याइतपत जिवंत आहेत. उदा: ‘नातं’ कथेतील दळप घेऊन येणारा ‘कोकण्या’ असुदे किंवा ‘एक होता सखा’मधला ‘सखा’- दोघांच्याही आयुष्याचं गणित त्यांना न सोडवता आल्यामुळे त्यांचंच मातेरं होतं. ‘तिची गोष्ट’मध्ये ‘सावी’ या जोगतीण तिच्या रटाळ आयुष्याला कंटाळून ती गुन्हेगार कशी होते? आणि याउलट ‘शिकार’मधली ‘ती’ सावज असूनही शिकाऱ्याची- म्हणजे तिचा गैरफायदा घेणाऱ्याची धिटाईनं शिकार कशी करते हा फरकही वाचकाला जगण्यासाठी खूप काही देऊन जातो.