* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"A HEARTBREAKING NOVEL THAT TELLS THE PHILOSOPHY OF HEART AND THE PAIN OF HEART AND THE FAILURE OF HIS WIFE, SHANKARAMA`S WIFE SHANKARAMA, AND THEIR SON, WHO ARE UNABLE TO MEET THEM, IN ADVERSE CONDITIONS AND NATURE. ORIGINALLY KATDA GOVINDAYYA IS THE INSPIRATION FOR THIS PERSON`S SPEECH, BEHAVIOR, HONESTY AND ENDURING ATTITUDE. THE AUTHORS HAVE PLAYED THIS CHARACTER IN THEIR LIVES. "
प्रतिकूल परिस्थीती आणि निसर्गाशी दोन हात करत जगणारे गोपालय्या आणि त्यांना साथ देणारी पत्नी शंकरम्मा यांचे सहजीवन तसेच त्यांचा मुलगा त्या उभयतांना भेटायला येत नसल्याची हृदयातील वेदना व त्यांच्या कणखर जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारी मनोवेधक कादंबरी. मुळात कट्टद गोविंदय्या या व्यक्तीचं बोलणं, वागणं, सच्चेपणा आणि धीरोदात्त वृत्ती या कादंबरीच्या प्रेरणास्थानी आहे. लेखकाने त्यांच्या जीवनावर आधारित गोपालय्या हे पात्र साकारले आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #DONGARAEVDHA #BETTADJIV #डोंगराएवढा #NOVEL #TRANSLATEDFROMKANNADATOMARATHI #UMAKULKARNI #उमाकुलकर्णी #K.SHIVRAMKARANTH "
Customer Reviews
  • Rating StarRupali Sonawane

    शिवराम करंत यांचे पुस्तक आजच वाचून संपवले माणसाच्या कुवतीचा उपहास करणारे डोंगर,जमिनीला दुभंगून मार्ग काढू पाहणारे नवजात ओहोळ,पाच सहा फुटी माणसाला मुंगीसारखे तुच्छ लेखत उभी असलेली पर्वतशिखरे....सर्वच बाबतीत प्रतिकूल परिस्थिती.. अशा निसर्गाच्या छातडावर पाय रोवून उभे राहिलेले गोपालव्या आणि त्यांच्या पत्नी शंकरम्मा यांचे उन्नत जीवन,हृदयाची तीव्र वेदना,त्याचबरोबर त्यांच्या कणखर जीवनाचे तत्वज्ञान सांगणारी रसपूर्ण कादंबरी... ...Read more

  • Rating StarPratik Yetavadekar

    कन्नड साहित्यात ज्ञानपीठ पारितोषिक प्राप्त लेखक हे जवळपास डझनभर आहेत. त्यातील च एक अग्रगण्य नाव म्हणजे के. शिवराम कारंथ. ‘बेत्तद जीव’ या त्यांच्या प्रसिद्ध कादंबरी चा मराठी अनुवाद म्हणजेच ‘डोंगराएवढा’ गोपालय्या आणि त्यांची पत्नी शंकरम्मा या दाम्त्याची कहाणी.उत्तर कर्नाटकात एका आडबाजूच्या खेडेगावात राहणारे हे जोडपे.गावाच्या आजूबाजूला पर्वतराजी,जंगले यांनी वेढलेला परिसर.आजूबाजुला असणारी पडजमीन शेतीखाली आणणे आणि त्या माध्यमातून लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे.अशक्य हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नव्हता.हाती घेईल ते काम जिद्दीने पार पाडायचे हाच खाक्या.अशा एका दुर्दम्य इच्छा असणाऱ्या माणसाची ही कथा. तेथील नैसर्गिक साधनसंपत्ती मुळे वातावरण कायमच थंड त्यामुळे तिथे ती थंडी नवख्या माणसाला बाधत असे आणि थंडी ताप याचा त्रास होत असे तो सहन न झाल्याने अनेक शेतीवर ठेवलेले कामगार एखादा हंगाम राहत आणि पळून जात.अशामुळे गोपालय्या यांचे प्रसंगी नुकसान ही होत असे मात्र त्याला ही ते खंबीरपणे सामोरे जात.कादंबरीत असणारी गोपालय्या ही व्यक्तिरेखा कादंबरीचा सारा अवकाश व्यापून राहिली आहे हे आपल्याला जाणवत राहते.येणाऱ्या पाहुण्यांचे आदरातिथ्य त्यांच्या खास पद्धतीने ते करत असत त्यामुळेच आलेला पाहुणा दोनाचे चार दिवस राहत असे किंवा त्याचा पाय निघत नसे. हे सर्व चालू असताना किंवा करत असताना ही गोपालय्या आणि शंकरम्मा हे दाम्पत्य आपल्या बाळंतपणात अकाली गेलेल्या मुलीच्या दुःखाने आणि मुलगा असूनही तो शहरात राहती मात्र कुठं आहे किंवा काय करतो याची ही यांना माहिती नसते तसेच तो या दोघाना वर्षातून एकदाही भेटायला येत नसे याची खंत मनी बाळगून आपले दिवस पुढे ढकलत असतात मात्र याचा ते कुणालाही मागमूस लागू न देता ते राहत असतात आणि कायम नवं काहीतरी करून आपलं मन गुंतवत असतात अशा दुर्दम्य इच्छाशक्ती असलेल्या आणि खरंच तो कादंबरीच्या शीर्षकाप्रमाणे ‘डोंगराएवढा’ असलेल्या नायकाची कहाणी… ...Read more

  • Rating StarEknath Marathe

    जंगलाच्या वाटेने, एका गावातून दुसऱ्या गावात जाणारा लेखक वाट चुकतो. मागेही परतता येत नाही व पुढेही जाता येत नाही अशा बिकट परिस्थितीत त्याला काही वाटसरु भेटतात व जवळच्या आपल्या गावात घेऊन जातात. गावातील गोपालय्या या हव्यक ब्राह्मणाच्या घरी त्यांची रवानी होते. एका रात्रीपुरता आसरा घेऊन दुसऱ्या दिवशी आपल्या वाटेने जायचा लेखकाचा विचार असतो. त्याचे यजमानपद स्वीकारलेले गोपालय्या व त्यांची पत्नी शंकरी यांच्या व अकृत्रिम प्रेमाने व जिव्हाळ्याने लेखक तिकडे अडकून पडतो. लेखक तिकडच्या आपल्या मुक्कामाचे वर्णन करताना कादंबरीचा नायक गोपालय्या यांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक एक पदर उलगडत जातो. शरीराने पहाडासारखा मजबूत पण मनाने अतिशय कोमल अशा नायकाच्या व्यक्तिमत्त्वात आपणही पुरते गुंतून जातो. अतिशय दुर्गम पण तितकाच निसर्गाचा वरदहस्त लाभलेले गाव, त्यात राहणारा आपला नायक, त्याने स्वतःच्याच लग्नाची केलेली खटपट, कष्टाचे डोंगर उपसून निबीड अरण्यात फुलवलेले नंदनवन, त्यासाठी हत्ती, वाघ, गवा, रेडा या जंगली प्राण्यांशी केलेला संघर्ष, लाडक्या मुलीचा बाळंतपणात घरीच झालेला मृत्यू, शिकून-सवरून शहरात पळून गेलेल्या व दहा वर्षात घरी न फिरकलेल्या मुलाचे दुःख, अनाथ असलेल्या मुलाला मायेने जवळ करून त्याचा संसार उभारून देणाऱ्या व त्याच्या भविष्याची तरतूद म्हणून कसदार जमीन त्याच्या नावावर करून देणाऱ्या नायकाच्या स्वभावाचे असे अनेक पैलू कथेत सहज उलगडत जातात. मुलगा घर सोडून गेला हे दुःख मात्र त्यांचे काळीज आत कोठेतरी कुरतडत असतेच. शेवटी लेखकाला त्यांच्या मुलाचा जुना फोटो बघून त्याची ओळख पटते व त्याचा ठावठिकाणा समजतो. एकूण शेवट गोड होतो ! उमा कुलकर्णी यांनी या कादंबरीचा अतिशय ओघवता भावानुवाद केला आहे हे वेगळे सांगायला नकोच ! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
लोकमत २५.९.२०२३

शब्बीर रोमानी हे व्यवसायाने वकील. मातृभाषा अर्थात उर्दू आणि शिक्षण मराठी माध्यमातून झालेले. २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या उर्दू पुस्तकाला, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या साहित्य अकादमी केंद्राचे पुरस्कार लाभले आहेत. आता मिर्झागालिबवरचे नवे पुस्तक, `मी गालिब बोलतोय...!` लक्ष वेधून घेत आहे. गालिबच्या एका शेरची पहिली ओळ घेऊन सांगायचे झाल्यास, जिक्र गालिबचा आणि खूबसूरत बयान लेखकाचे असे या पुरस्काराबद्दल म्हणता येईल. मिर्जा असदुल्ला खां,`गालिब` या श्रेष्ठ शायरची शायरी, त्याचे पत्रलेखन, चरित्र यावर आजवर शेकडो पुस्तक प्रसिद्ध आहेत. लेखकाने प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार गालिबवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. मराठी, हिंदी-उर्दू लेखकांची ते तपशील पाहून आचंबा वाटतो. शिवाय शब्बीर रोमानी यांनी इथे आपल्या लेखनाचे प्रयोजन सांगताना म्हटले आहे, कि गालिबबद्दल अनेक उलट-सुलट प्रकारच्या कहाण्या, विनोद, (कसलेही शेर गालिबच्या नावाने सांगत राहणे) प्रचलित आहेत; त्यामुळे गालिबची कथा, त्याच्या पत्रांमधल्या मनोरंजक गप्पा-गोष्टी आणि त्याच्याशी निगडित आठवणी हे सगळं साध्या सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक. सर्वसामान्य माणसाच्या जगण्यातल्या सर्व भावछटा गालिबच्या काव्यातून दिसत असतात. पुस्तक वाचताना गालिबची प्रकृती, त्याची विनोद बुद्धी, संवेदनशील वृत्ती हे आपल्याला जाणवत राहते, आणि लेखकाची तळमळसुद्धा. या पुस्तकाचे वैशिष्टय म्हणजे, मोठी प्रकरण टाळून किस्से सांगावेत अशी रचना. शिवाय लेखकाची साधी-सरळ भाषा, यामुळे शायरीची आणि गालिबबद्दलची सर्वसाधारण माहिती आणि कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हे पुस्तक रंजक वाटेल. सहसा गालिबचे गाजलेले शेर, किस्से हे आपल्या वाचनात असतात. या पुस्तकात गालिबचे अनेक दुर्मिळ शेर, शिवाय फारसी रचनाही या पुस्तकात समाविष्ट असल्याने त्याला एक संदर्भ ग्रंथाचेही स्वरूप आलेले आहे. गालिबला आंबे फार आवडायचे, `मिर्झा गालिब` या गाजलेल्या चित्रपटातला तो प्रसंग आजही लक्षात आहे. आंबे खाताना एक मित्र गालिबला तुच्छतेने म्हणतो, `आम तो गधेभी नही खाते!` त्यावर गालिबने त्वरित उत्तर देतो. `सिर्फ गधेही नाही खाते!` शब्बीर रोमानी यांनी हा प्रसंग व विनोद म्हणून सांगितला नाही, तर त्याचे तपशिलाने वर्णन तर केलेच शिवाय आंब्यावरची गालिबची मोठी गजल त्यांनी दिलेली असल्याने त्या किश्श्याला एक गांभीर्य आलेले आहे. असाच एक किस्सा, ते कलकत्त्याला असताना साध्या चिकणी-सुपारीवर गालिबला कुणी छेडले होते, यावर तुमची शायरी होऊन जाऊ द्या! असे आवाहन केले. या सुपारीच्या दिसण्या-असण्यावरच्या अफलातून शायरीची भली मोठी झलकच गालिबने पेश केली! गालिबच्या एक महत्वाचा शेर आहे. जिक्र ऊस परी-वंश का और फार बयां अपना बन गया रिकीब आखिर, था जो राजदां अपना त्या परिच्या सौंदर्याचे वर्णन आणि तेही माझ्या भाषेतून, माझ्याकडून ऐकले आणि माझा जवळचा असा मित्र आता या प्रेमाच्या नात्यात माझा प्रतिस्पर्धी झाला (आता तो तिच्यावर प्रेम करायला लागला) कलकत्त्याला गालिब दीडेएक वर्ष राहिला होता. तिथल्या धनिकांनी मुशायरे, मुजरे आयोजित केलेले असायचे, गालिबचा तिथे सन्मानही व्हायचा. गालिबने या बद्दल फार जिव्हाळ्याने लिहिले आहे. या मुशायऱ्यामध्ये गालिबचे फारसीचे काव्यवाचन ऐकून फारसी भाषेचे तज्ञ त्याच्यावर नाराज झाल्याची आठवण आहे! गालिबच्या तोंडून फारसीचे कौतुक ऐकून लोकांनी आक्षेप घेतला! गालिब हा आपल्या दुःख, विवंचनेवर हसणारा अद्भुत असा कलावंत होता. हा शेर वाचल्यावर आपल्याला मुन्शी प्रेमचंद यांच्या `पूस कि रात` मधला हलकू आठवतो! मिर्झा गालिबच्या कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हा संग्रह आवडण्यासारखाच आहे. लेखनातल्या भाषिक काही त्रुटी वगळल्यास, गालिबचे किस्से, त्याची शायरी हे सगळे रोचक आहे. ...Read more

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
पुस्तकप्रेमी

मीना कश्यप शाह *मृत्युंजयी* भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लगणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊन जात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more