* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"A HEARTBREAKING NOVEL THAT TELLS THE PHILOSOPHY OF HEART AND THE PAIN OF HEART AND THE FAILURE OF HIS WIFE, SHANKARAMA`S WIFE SHANKARAMA, AND THEIR SON, WHO ARE UNABLE TO MEET THEM, IN ADVERSE CONDITIONS AND NATURE. ORIGINALLY KATDA GOVINDAYYA IS THE INSPIRATION FOR THIS PERSON`S SPEECH, BEHAVIOR, HONESTY AND ENDURING ATTITUDE. THE AUTHORS HAVE PLAYED THIS CHARACTER IN THEIR LIVES. "
प्रतिकूल परिस्थीती आणि निसर्गाशी दोन हात करत जगणारे गोपालय्या आणि त्यांना साथ देणारी पत्नी शंकरम्मा यांचे सहजीवन तसेच त्यांचा मुलगा त्या उभयतांना भेटायला येत नसल्याची हृदयातील वेदना व त्यांच्या कणखर जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारी मनोवेधक कादंबरी. मुळात कट्टद गोविंदय्या या व्यक्तीचं बोलणं, वागणं, सच्चेपणा आणि धीरोदात्त वृत्ती या कादंबरीच्या प्रेरणास्थानी आहे. लेखकाने त्यांच्या जीवनावर आधारित गोपालय्या हे पात्र साकारले आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #DONGARAEVDHA #BETTADJIV #डोंगराएवढा #NOVEL #TRANSLATEDFROMKANNADATOMARATHI #UMAKULKARNI #उमाकुलकर्णी #K.SHIVRAMKARANTH "
Customer Reviews
  • Rating StarRupali Sonawane

    शिवराम करंत यांचे पुस्तक आजच वाचून संपवले माणसाच्या कुवतीचा उपहास करणारे डोंगर,जमिनीला दुभंगून मार्ग काढू पाहणारे नवजात ओहोळ,पाच सहा फुटी माणसाला मुंगीसारखे तुच्छ लेखत उभी असलेली पर्वतशिखरे....सर्वच बाबतीत प्रतिकूल परिस्थिती.. अशा निसर्गाच्या छातडावर पाय रोवून उभे राहिलेले गोपालव्या आणि त्यांच्या पत्नी शंकरम्मा यांचे उन्नत जीवन,हृदयाची तीव्र वेदना,त्याचबरोबर त्यांच्या कणखर जीवनाचे तत्वज्ञान सांगणारी रसपूर्ण कादंबरी... ...Read more

  • Rating StarPratik Yetavadekar

    कन्नड साहित्यात ज्ञानपीठ पारितोषिक प्राप्त लेखक हे जवळपास डझनभर आहेत. त्यातील च एक अग्रगण्य नाव म्हणजे के. शिवराम कारंथ. ‘बेत्तद जीव’ या त्यांच्या प्रसिद्ध कादंबरी चा मराठी अनुवाद म्हणजेच ‘डोंगराएवढा’ गोपालय्या आणि त्यांची पत्नी शंकरम्मा या दाम्त्याची कहाणी.उत्तर कर्नाटकात एका आडबाजूच्या खेडेगावात राहणारे हे जोडपे.गावाच्या आजूबाजूला पर्वतराजी,जंगले यांनी वेढलेला परिसर.आजूबाजुला असणारी पडजमीन शेतीखाली आणणे आणि त्या माध्यमातून लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे.अशक्य हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नव्हता.हाती घेईल ते काम जिद्दीने पार पाडायचे हाच खाक्या.अशा एका दुर्दम्य इच्छा असणाऱ्या माणसाची ही कथा. तेथील नैसर्गिक साधनसंपत्ती मुळे वातावरण कायमच थंड त्यामुळे तिथे ती थंडी नवख्या माणसाला बाधत असे आणि थंडी ताप याचा त्रास होत असे तो सहन न झाल्याने अनेक शेतीवर ठेवलेले कामगार एखादा हंगाम राहत आणि पळून जात.अशामुळे गोपालय्या यांचे प्रसंगी नुकसान ही होत असे मात्र त्याला ही ते खंबीरपणे सामोरे जात.कादंबरीत असणारी गोपालय्या ही व्यक्तिरेखा कादंबरीचा सारा अवकाश व्यापून राहिली आहे हे आपल्याला जाणवत राहते.येणाऱ्या पाहुण्यांचे आदरातिथ्य त्यांच्या खास पद्धतीने ते करत असत त्यामुळेच आलेला पाहुणा दोनाचे चार दिवस राहत असे किंवा त्याचा पाय निघत नसे. हे सर्व चालू असताना किंवा करत असताना ही गोपालय्या आणि शंकरम्मा हे दाम्पत्य आपल्या बाळंतपणात अकाली गेलेल्या मुलीच्या दुःखाने आणि मुलगा असूनही तो शहरात राहती मात्र कुठं आहे किंवा काय करतो याची ही यांना माहिती नसते तसेच तो या दोघाना वर्षातून एकदाही भेटायला येत नसे याची खंत मनी बाळगून आपले दिवस पुढे ढकलत असतात मात्र याचा ते कुणालाही मागमूस लागू न देता ते राहत असतात आणि कायम नवं काहीतरी करून आपलं मन गुंतवत असतात अशा दुर्दम्य इच्छाशक्ती असलेल्या आणि खरंच तो कादंबरीच्या शीर्षकाप्रमाणे ‘डोंगराएवढा’ असलेल्या नायकाची कहाणी… ...Read more

  • Rating StarEknath Marathe

    जंगलाच्या वाटेने, एका गावातून दुसऱ्या गावात जाणारा लेखक वाट चुकतो. मागेही परतता येत नाही व पुढेही जाता येत नाही अशा बिकट परिस्थितीत त्याला काही वाटसरु भेटतात व जवळच्या आपल्या गावात घेऊन जातात. गावातील गोपालय्या या हव्यक ब्राह्मणाच्या घरी त्यांची रवानी होते. एका रात्रीपुरता आसरा घेऊन दुसऱ्या दिवशी आपल्या वाटेने जायचा लेखकाचा विचार असतो. त्याचे यजमानपद स्वीकारलेले गोपालय्या व त्यांची पत्नी शंकरी यांच्या व अकृत्रिम प्रेमाने व जिव्हाळ्याने लेखक तिकडे अडकून पडतो. लेखक तिकडच्या आपल्या मुक्कामाचे वर्णन करताना कादंबरीचा नायक गोपालय्या यांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक एक पदर उलगडत जातो. शरीराने पहाडासारखा मजबूत पण मनाने अतिशय कोमल अशा नायकाच्या व्यक्तिमत्त्वात आपणही पुरते गुंतून जातो. अतिशय दुर्गम पण तितकाच निसर्गाचा वरदहस्त लाभलेले गाव, त्यात राहणारा आपला नायक, त्याने स्वतःच्याच लग्नाची केलेली खटपट, कष्टाचे डोंगर उपसून निबीड अरण्यात फुलवलेले नंदनवन, त्यासाठी हत्ती, वाघ, गवा, रेडा या जंगली प्राण्यांशी केलेला संघर्ष, लाडक्या मुलीचा बाळंतपणात घरीच झालेला मृत्यू, शिकून-सवरून शहरात पळून गेलेल्या व दहा वर्षात घरी न फिरकलेल्या मुलाचे दुःख, अनाथ असलेल्या मुलाला मायेने जवळ करून त्याचा संसार उभारून देणाऱ्या व त्याच्या भविष्याची तरतूद म्हणून कसदार जमीन त्याच्या नावावर करून देणाऱ्या नायकाच्या स्वभावाचे असे अनेक पैलू कथेत सहज उलगडत जातात. मुलगा घर सोडून गेला हे दुःख मात्र त्यांचे काळीज आत कोठेतरी कुरतडत असतेच. शेवटी लेखकाला त्यांच्या मुलाचा जुना फोटो बघून त्याची ओळख पटते व त्याचा ठावठिकाणा समजतो. एकूण शेवट गोड होतो ! उमा कुलकर्णी यांनी या कादंबरीचा अतिशय ओघवता भावानुवाद केला आहे हे वेगळे सांगायला नकोच ! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
Ashwini Deshmukh, Pune.

This book holds a special place in my heart, especially because I come from Vidarbha, and the author`s writing resonates deeply with my roots. The stories are simple yet impactful, written in easy Marathi, making them accessible to all readers. What akes this book unique is how each story offers valuable life lessons—whether it`s about honesty, navigating real-life struggles, or the bonds we form with others. The humor woven throughout the stories adds a refreshing touch, making it enjoyable to read while also making you reflect on the deeper messages. The simplicity of the writing allows the book to flow seamlessly, leaving you eager to read the next story. It’s a perfect blend of life lessons, humor, and relatability. Overall, it`s a wonderful read that stays with you, reminding you of the little things that matter most in life. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ. मिना जोशी, नागपूर.

`छाटितो गप्पा` वाचताना असे वाटते की रोजच्या जीवनातील साधे साधे प्रसंग अतिशय नेटक्या शब्दात गुंफलेले आहेत. छाटितो गप्पांची सहज सुलभ मांडणी खूपच भावली.