* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: NIRAMAY YASHASATHI DHYAN
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662856
  • Edition : 4
  • Publishing Year : AUGUST 2002
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 128
  • Language : MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :SHUBHADA GOGATE COMBO SET - 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
OUR RICH AND VARIED CULTURE HAS BESTOWED US WITH THE MEDITATION POWER AND YOG VIDYA. MEDITATION IS VERY MUCH ESSENTIAL FOR OUR SPIRITUAL AWAKENING AND UPLIFTING OF OUR SOUL. USUALLY, IT IS BELIEVED THAT MEDITATION IS THE WAY OF PENANCE WHILE REACHING THE ALMIGHTY AND HOW TRUE IT IS! NOW PEOPLE ARE NOTICING THAT MEDITATION IS BENEFICIAL IN ALL POSSIBLE WAYS, IT BENEFITS, MENTALLY, PHYSICALLY AND MATERIALISTICALLY TOO. THIS HAS BEEN PROVED SCIENTIFICALLY. THERE ARE VARIOUS WAYS OF MEDITATION. THIS BOOK ELABORATES SOME OF THE WAYS AND ALSO GUIDES US ABOUT HOW TO MEDITATE IN HOUSE. WHATEVER THE PURPOSE AND THE WAY OF THE MEDITATION IS, IT ALWAYS WILL BE BENEFICIAL AND WILL PURIFY YOUR MIND AND SOUL. IT WILL RAISE YOU PHYSICALLY, MENTALLY AND SPIRITUALLY TOO. WHAT YOU NEED ON THIS PATH IS JUST ONE THING, PERSEVERANCE. IF YOU HAVE IT, THEN YOU WILL SURELY SUCCEED.
ध्यान, योगविद्या हा आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीनं आपल्याला दिलेला समृद्ध वारसा आहे. ध्यानधारणा ही आध्यााQत्मक उन्नतीसाठी, परमेश्वराच्या चरणी चित्त लीन व्हावं यासाठी करायची साधना आहे, असं आपण सर्वसाधारणपणे समजतो. ते खरंही आहे. त्याचबरोबर ध्यानानं अनेक शारीरिक, मानसिक लाभ होतात, यशाQस्वतेच्या वाटचालीत ध्यानाची मदत होते असंही आता लक्षात आलं आहे. वैज्ञानिक कसोट्यांवर हे लाभ सिद्ध होऊ लागले आहेत. ध्यान करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यांपैकी काहींची माहिती आणि घरच्या घरी ध्यान कसं करावं हे या पुस्तकात सांगितलं आहे. ध्यान कोणत्याही हेतूनं आणि कोणत्याही पद्धतीनं केलं तरी आपोआपच चित्तशुद्धी होत जाते. शारीरिक, मानसिक लाभापलीकडची आध्यात्मिक उन्नतीही होत जाते. आवश्यक असते ती फक्त चिकाटी!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT #SHUBHADAGOGATE #शुभदागोगटे #निरामययशासाठीध्यान #NIRAMAY YASHASATHI DHYAN
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    मन:शांती, आरोग्य, यश, चित्तशुद्धी आणि आध्यात्मिक साधना- यासाठी हवी ध्यानधारणा... आजच्या धावपळीच्या जीवनात आपले स्वास्थ्य आणि मन:शांती टिकवून धरणे अवघड होत चालले आहे. दैनंदिन ताणतणावांमुळे वेगवेगळ्या व्याधींना तोंड द्यावे लागत आहे. त्यावर तोडगा म्हणू ध्यान, मेडिटेशन, विपश्यना, प्राणायाम, योगासने, नामजप वगैरेंचा अवलंब करण्याचा सल्ला दिला जातो. त्यासाठी शिबिरे घेण्यात येतात. वेगवेगळ्या ध्यानपद्धतींचा पुरस्कार केला जातो. आपण कोणत्या ध्यानपद्धतीचा अवलंब करावा असाही प्रश्न पडतो. मनाचा गोंधळ उडतो. हा गोंधळ कमी करण्यासाठी शुभदा गोगटे यांचे ‘निरामय यशासाठी ध्यान’ हे छोटे पुस्तक काही प्रमाणात तरी उपयुक्त ठरेल. स्वत: शुभदा गोगटे गेली काही वर्षे ध्यानधारणा करीत आहेत आणि त्यामुळे मानसिक व शारीरिक दृष्ट्या आपली तंदुरुस्ती टिकून राहिली आहे असे वाटते. ध्यानामुळे बरे वाटते. मन शांत राहते. आरोग्य व यश यासाठी मन शांत आणि तणावरहित असावं लागतं. आणि त्यासाठी ध्यानाचा उपयोग होतो असा त्यांचा अनुभव आहे. ध्यानधारणेत आपण फार मोठी मजल मारलेली आहे किंवा कुंडलिनी जागृती वगैरे अवस्था गाठलेली आहे असा त्यांचा दावा नाही. एक साधक म्हणूनच ध्यानाबद्दल सर्वसामान्य वाचकांना मार्गदर्शन करण्याच्या हेतूने त्यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. प्रथम ध्यान म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे. मेडिटेशन व ध्यान हे शब्द त्या समानार्थी वापरतात. ध्यान, चिंतन, मनन, या सर्वांचा त्यात अंतर्भाव होतो. ध्यानामुळे मन शांत होते, चित्त समतोल व स्थिर राहते, रक्तदाब वगैरे व्याधी काबूत राहतात, त्याशिवाय अन्य काही आध्यात्मिक व अतींद्रिय अनुभवही येऊ शकतात. पण त्याकडे अनुषंगिक फायदा म्हणून त्या पाहतात. ध्यानाने मिळणाऱ्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर जास्त आहे. त्यांचा भर ध्यानाने आपली एकाग्रता वाढते, स्मृती सुधारते, चिकाटी वाढते, चित्ताची समधातता साधते, मेंदूतील विद्युत तरंगांची गती संतुलित राहून मन शांत व सजग राहते. हिंदू धर्मात ध्यानधारणेला महत्त्व आहे. चित्तवृत्तिनिरोध साधणे म्हणजे योग; यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी ही योगाची आठ अंगे असल्याचे महर्षी पतंजली यांनी योगसूत्रात सांगितले आहे. गौतम बुद्ध यांना ध्यानातून ज्ञानप्राप्ती झाली व ‘बौद्धत्व’ लाभले. फालुन गाँग (धर्मचक्राचं पालन करण्यासाठी ध्यान), झेन बुद्धिझम, विपश्यना असे वेगवेगळे ध्यान प्रकार बौद्धधर्मात आढळतात. जैन धर्मातही सामायिक ध्यान पद्धतीला महत्त्व आहे. महर्षी महेश योगी यांनी ट्रॅन्सेंडेंटल मेडिटेशन (टीएम) भावातीत ध्यान या पध्दतीचा पुरस्कार केला. गुरूने शिष्याला बीजमंत्र देणे व मनोमन वा मोठ्याने त्याचा उच्चार करीत मंत्राच्या ध्वनीवर लक्ष केंद्रित करणे हे याद्वारे रिलॅक्सेक्शन साधते आणि उच्च रक्तदाब, हृदयविकार, मानसिक तणाव, जन्मव्याधी यांची तीव्रता कमी होते असे प्रयोगान्ती सिद्ध झाल्याचा त्यांचा दावा आहे. ओशो रजनीश हे ध्यान हाच धर्म मानतात. स्वर्षाप्रकाश ध्यान, विसावा ध्यान हे प्रकार त्यांनी प्रचलित केले, सिल्व्हर माइंड कंट्रोल पद्धत आणि कल्पनाचित्रण पद्धत या विशिष्ट हेतू मनात ठेवून त्यांच्या प्राप्तीसाठी वापरल्या जातात. डॉ. ऑर्निश हे हृदयरोग्यांसाठी कल्पनाचित्रण पद्धतीचा वापर करतात. ध्यानामुळे मानसिक ताणतणाव, उच्च रक्तदाब, निद्रानाश, तोतरेपणा, डोकेदुखी, व्यसनासक्ती यात घट होते. तर शांतपणा, आशावाद, उत्साह, सकारात्मक दृष्टिकोन, स्वयंशिस्त, आत्मसन्मानाची भावना यात वाढ होते. ध्यान कुठे करावे, किती वेळ करावे, कसे करावे, ध्यान करताना कोणते आसन घालून बसावे, श्वासोच्छ्वासावर लक्ष कसे केंद्रित करावे, ध्वनी, अंत:प्रतिमा, मूर्ती वा प्रतिमा यावर लक्ष केंद्रित केल्यास काय होते, शरीरांतर्गत षट्चक्रे कोणती, ध्यानाने त्यांच्यातील सुप्त शक्तीला जाग कशी येऊ शकते वगैरे शंकांचेही समाधान पुस्तकात करण्यात आले आहे. ध्यानधारणेच्या प्रसारासाठी आज अनेक संस्था जागतिक पातळीवर कार्यरत असून त्यांचा व्याप प्रचंड वाढलेला आहे. रुग्णालयांमध्येही इतर औषधांबरोबर ध्यानधारणेचाही उपचार आता मान्यता मिळवत आहे. हे पुस्तक ध्यानधारणेची सर्व अंगे वाचकांना स्पष्ट दाखवणारे असल्याने उपयुक्त ठरेल. ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 08-09-2002

    आजच्या धकाधकीच्या जीवनात शांतता लाभणे दुरापास्त झाले आहे. प्रत्येकजण अस्वस्थतेने पछाडलेले आहे. अशा कंटाळलेल्या परिस्थितीत दोन चार का होईना शांततेचे, आनंदाचे क्षण अनुभवावे असे प्रत्येकालाच वाटते. हे शांततेचे क्षण अनुभवण्याचा मार्ग म्हणजे ध्यानधारणा. धयानधारणा ही काळाची गरज बनली आहे. मानसिक व शारीरिक आरोग्य टिकवायचे असेल तर ध्यानधारणा महत्त्वाची आहे. ध्यान, योगविद्या हा आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीचं आपल्याला दिलेला समृद्ध वारसा आहे. ध्यानधारणा ही आध्यात्मिक उन्नतीसाठी, परमेश्वराच्या चरणी लीन व्हावं यासाठी करायची साधना आहे. ध्यान करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्या नीट समजावून घेणे महत्त्वाचे आहे. ‘निरामय यशासाठी ध्यान’ हे शुभदा गोगटे यांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. शहरी जीवनात माणसाला सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या समस्यांची मांडणी उदाहरण देऊन स्पष्ट केली आहे. सध्या समाजात दिसणारं एकूण ‘लढा किंवा पळा’ ही यंत्रणा शरीरात कशी कार्यरत होते याबद्दल लेखिकेले सांगितले आहे. हार्मोन्सच्या वाढत्या पातळीमुळे शरीरावर होणाऱ्या परिणामांची जंत्री लेखिकेने दिली आहे. दैनंदिन जीवनात ताणतणाव वाढले आहेत. मात्र ते कमी करणं आपल्या हातात आहे आणि त्यासाठी ध्यान ही गुरूकिल्ली आहे असे लेखिका म्हणते. नियमितपणे रोज व्यायाम करणं किंवा एखादा खेळ खेळणं याने निश्चितपणे शारीरिक आणि मानसिक फायदे मिळतात. मनावरचे ताण कमी व्हायला त्यामुळे मदत होते. म्हणूनच सर्वांनी रोज व्यायाम करावा किंवा एखादा खेळ खेळावा हे उत्तम असा सल्ला शुभदा गोगटे यांनी दिला आहे. ध्यानामुळे लक्ष केंद्रित करणे आणि ते एका ठिकाणी अधिक काळ स्थिर ठेवणं यात सुधारणा होते, सततची जुनाट दुखणी हाताळण्यासाठी ध्यानाची मदत होते असे आढळून आले आहे. विविध ध्यानपद्धतीचा उल्लेख करताना नियम आसनं यांचा उल्लेख केला आहे. धारणेबद्दलही लेखिकेने माहिती दिली आहे. त्यामध्ये समाधी, बौद्ध ध्यान, झेन ध्यान, फालुन गाँग, विपध्यना, जैन ध्यान यांची माहिती दिली आहे. आध्यात्मिक उन्नतीसाठी, परमेश्वराच्या चरणी चित्त लीन व्हावं यासाठी करायची साधना आहे. ध्यान करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्या नीट समजावून घेणे महत्त्वाचे आहे. काही आधुनिक ध्यानपद्धती आणि पुरस्कर्ते ओशो रजनीश, स्वर्णप्रकाश ध्यान, विसावा ध्यान यांचा उल्लेख लेखिकेने केला आहे. ध्यान करायचं म्हटलं की ते कसं करावं, केव्हा करावं, कशासाठी करावं असे अनेक प्रश्न तुमच्या मनात उपस्थित होतील; परंतु त्यांचीही उत्तरे देवून वाचकाचं समाधान केलं आहे. काळानुरूप बदलताना आपण स्तोत्र म्हणणं, पूजा करणं, जप करणं यासारख्या गोष्टी विसरलो. परंतु या गोष्टी मन:शांतीसाठी महत्त्वाच्या आहेत असे लेखिका सांगते. मन:शांती, आरोग्य, त्यातून यश, चित्तशुद्धी, अध्यात्माची ओढ या सगळ्या गोष्टी एका ध्यानामुळे टप्प्या टप्प्यानं साधू शकतात. दुखणं कमी व्हावं किंवा नोकरी-धंद्यात यश मिळावं इतक्या साध्या सांसारिक हेतूनं आपण ध्यान करत राहिलो तरी त्यातूनच त्या पलीकडचं बरंच काही मिळत जातं, जाणवत जातं आणि ध्यान आनंददायी होतं असं लेखिका सांगते. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 22-09-2002

    शहरातील स्पर्धेच्या वाढत्या धावपळीच्या आयुष्यात माणसाच्या शरीरमनावर सतत ताण पडत असतो. त्यामुळे ब्लडप्रेशर, हृदयविकार, डायबिटीस असे अनेक आजार उद्भवतात. हा ताण दूर करून मनाला आणि शरीरालाही शांतता प्राप्त करून देण्यासाठी योग, ध्यानधारणा अशा प्राचीन परंपांकडे आता आपण पुन्हा जात आहोत. ध्यान हे ऋषीमुनींनी करायचे आणि तेसुद्धा ईश्वरप्राप्तीसाठी ही समजूत काही वर्षापूर्वीपर्यंत होती. पण ‘मोडेशन’ या शब्दाने किमया केली आणि ध्यान ही पर्यांयी उपचार पद्धती म्हणून वापरली जाऊ लागली. शुभदा गोगटे यांचे निरामय यशासाठी ध्यान हे पुस्तक घरच्या घरी ध्यान करू इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल असेच आहे. ध्यानामुळे ताण कमी होतात, स्मरणशक्ती सुधारते, लक्ष केंद्रित करण्याची शक्ती वाढते, जुनाट दुखणी बरी व्हायला मदत होते असे अनेक फायदे होतात. शिवाय त्यात शारीरिक मेहनत नसल्याने ते कुणालाही करता येते. शुभदा गोगटे यांनी लिहिलेल्या पुस्तकात ध्यान हे फक्त हिंदू धर्मातच नाही तर अन्य धर्मातही असल्याचे म्हटले आहे. विविध ध्यान पद्धती आणि त्यांचे पुरस्कर्ते या प्रकरणात महर्षी महेश योगी, ओशो, होजे सिल्व्हा आदी गुरूंच्या ध्यानपद्धतीची माहिती आहे. ध्यान केव्हा, कसे आणि का करावे? तसेच ध्यान कोणी व केव्हा करू नये हेही यात दिल्याने ध्यान जमत नसतानाही नेटाने करणाऱ्यांना त्याचा पुनर्विचार करावा लागेल. ध्यानातील कल्पनाचित्रे आणि सकारात्मक भावना यांचा उपयोग शारीरिक दुखणी कमी करण्यासाठी होतो हे अभिनव तंत्र अलीकडे विकसित झाले आहे. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    ध्यान म्हटलं की पद्मासन घालून आणि डोळे मिटून बसलेल्या जटाधारी साधूची मूर्ती आपल्या मन:चक्षूंसमोर उभी राहते. ध्यान-धारणा या गोष्टी आध्यात्मिक विकासासाठी करायच्या असतात. आपली सांसारिक कर्तव्ये नीटपणे पार पाडल्यावर मग उतरत्या वयात या गोष्टींकडे लक्ष देत येतं, तोपर्यंत त्यासाठी वेळच नसतो आणि ध्यान करण्याची गरजही नसते अशी आपली समजूत असते. पण, ध्यान हे सर्वसामान्य व्यक्तीनाही लाभदायक असतं हे अनेक प्रयोगांनी दिसून आलेलं आहे. नियमित ध्यानामुळे मानसिक ताण, रक्तदाब, निद्रानाश अशी दुखणी कमी होतात. मन शांत होतं. आशावाद, आत्मविश्वास या गोष्टी वाढीस लागतात. स्वस्थ शरीर आणि शांत मन यांमुळे कार्यक्षमता वाढते, यश सहजसाध्य होतं. आपलं ध्येय कुठलंही असलं तरी ते प्राव्त करून घेण्यासाठी ध्यानाची मदत होते. ध्यानाचे अनेक प्रकार, अनेक पद्धती आणि अनेक गुरू आहेत. त्यांची थोडक्यात माहिती या पुस्तकात दिलेली आहे. आपल्या धकाधकीच्या आणि व्यस्त अशा दिनक्रमातून थोडासा वेळ काढून ध्यान कसं करावं हेही सांगितलेलं आहे. ध्यानासाठी योग्य अशी जागा, वेळ, आसन यांची सविस्तर चर्चा केलेली आहे. निरामय यशासाठी ध्यान शहरातील स्पर्धेच्या, वाढत्या धावपळीच्या आयुष्यात माणसाच्या शरीर-मनावर सतत ताण पडत असतो. त्यामुळे ब्लडप्रेशर, हृदयविकार, डाबिटीस असे अनेक आजार उद्भवतात. हा ताण दूर करून मनाला आणि शरीरालाही शांतता प्राप्त करून देण्यासाठी योग, ध्यानधारणा अशा प्राचीन परंपरांकडे आता आपण पुन्हा जात आहोत. ध्यान हे ऋषीमुनींनी करायचे आणि तेसुद्धा ईश्वरप्राप्तीसाठी. ही समजूत काही वर्षांपूर्वीपर्यंत होती. पण ‘मेडिटेशन’ या शब्दाने किमया केली आणि ध्यान हे ही पर्यायी उपचार पद्धती म्हणून वापरली जाऊ लागली. ध्यानाची शिबिरे आता फार मोठ्या प्रमाणावर व्यावसायिकही घेण्यात येऊ लागली. शुभदा गोगटे यांचे निरामय यशासाठी ध्यान हे पुस्तक घरच्या घरी ध्यान करू इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल असेच आहे. ध्यानामुळे ताण कमी होतात, स्मरणशक्ती सुधारते, लक्ष केंद्रित करण्याची शक्ती वाढते, जुनाट दुखणी बरी व्हायला मदत होते असे अनेक फायदे होतात. शिवाय त्यात शारीरिक मेहनत नसल्याने ते कुणालाही करता येते. शुभदा गोगटे यांनी लिहिलेल्या पुस्तकात ध्यान हे फक्त हिंदू धर्मातच नाही तर अन्य धर्मातही असल्याचे म्हटले आहे. विविध ध्यान पद्धती आणि त्यांचे पुरस्कर्ते या प्रकरणात महर्षी महेश योगी, ओशो, होजे सिल्व्हा आदी गुरूंच्या ध्यानपद्धतीची माहिती आहे. ध्यान केव्हा, कसे आणि का करावे? तसेच ध्यान कोणी व केव्हा करू नये हेही यात दिल्याने ध्यान जमत नसतानाही नेटाने करणाऱ्यांना त्याचा पुनर्विचार करावा लागेल. ध्यानातील कल्पनाचित्रे आणि सकारात्मक भावना यांचा उपयोग शारीरिक दुखणी कमी करण्यासाठी होतो हे अभिनव तंत्र अलीकडे विकसित झाले आहे. ताणतणावमुक्तीसाठी ध्यानधारणेचे महत्त्व ‘ध्यान-मेडिटेशन’ हा आजच्या काळातील सर्वांच्या आकर्षणाचा विषय झाला आहे. गावोगाव ठिकठिकाणी ध्यानधारणा शिबिरांचे आयोजन केले जाते. त्यामुळे या विषयाची ज्यांना जिज्ञासा किंवा उत्सुकता आहे, त्यांच्यासाठी सुबोध विवेचन करून या छोट्याशा पुस्तिकेत एकूण पाच प्रकरणात हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या प्रकरणात ‘ध्यान’ की ‘मेडिटेशन’ याची चर्चा केली आहे. ‘ध्यान आणि मेडिटेशन हे शब्द बरेचसे समानार्थी आहेत; पण खरे म्हणजे मेडिटेशन’ या शब्दाला प्रतिशब्द धारणा हा होईल. एखाद्या वस्तूच्या किंवा विषयाच्या ठिकाणी चित्त स्थिर करणे म्हणजे धारणा. अशी धारणा नित्यनियमाने करीत गेलो, तर त्यातून ध्यान साधते,’’ असे लेखिकेने म्हटले असले तरी पुढे म्हटले आहे की ‘मेडिटेशन’ या शब्दाला ‘ध्यान’ हा प्रतिशब्द हल्ली सर्रास वारला जातो. त्यामुळे या पुस्तकातही हे दोन शब्द समानार्थी वापरले आहेत. ध्यान हे आपल्या आनंदी जगण्याचे एक द्वार आहे. ध्यान हे केवळ आध्यात्मिक पातळीवर न राहता त्याच्याकडे एका वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही बघितले जावे, असे अनेकजण म्हणतात. ध्यान ही मनाची अवस्था आहे. मानसिक बळ वाढविण्यासाठी ध्यान जणू औषधाचेच काम करते. भगवान रजनीश, महर्षीमहेश योगी, रविशंकरमहाराज आणि आसारामजीमहाराज आणि साधू संतांनीही आपल्या उपदेशात ध्यानाचे स्थान श्रेष्ठ मानले आहे. स्वामी विवेकानंदापासून मोठ्या प्रमाणात सुरू झालेली ही परंपरा आजतागायत सुरू आहे. ध्यान करण्याच्या विविध पद्धतींचा उल्लेख करून त्यांपैकी काहींची माहिती आणि घरच्या घरी ध्यान कसं करावं ते या पुस्तकात सांगितले आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केल्याप्रमाणे योग्याची सुखावस्था ज्या साधनाने प्राप्त होते ते म्हणजे ध्यान होय. ज्ञानेश्वरीतील सहाव्या अध्यायात कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासंबंधीचे जे विवेचन ज्ञानेश्वरांनी केले आहे ते म्हणजे ध्यानाचे तत्त्वज्ञानच होय. गुळवणीमहाराजांच्या चरित्रात ते साधना करीत असताना कुंडलिनी जागृतीच्या विविध अवस्थेत भ्रामरी व जमीन सोडून वर उचलले जाणे, असे वेगवेगळे अनुभव त्यांना येत असतं. आणि निर्विकल्प समाधीही लागत असे, असे लिहिलेले आहे. आध्यात्मिक कामासाठीच नव्हे, तर ऐहिक जीवनात यशस्वी झालेल्या अनेक थोर पुरुषांच्या जीवनात ध्यानाला महत्त्व लाभले आहे. उद्योगपती, कारखानदार, राजकारणी, अशा थोरांची आत्मचरित्रे वाचली म्हणजे ध्यानाचे त्यांनी किती महत्त्व मानले आहे हे लक्षात येते. जीवनाच्या वाटचालीत यशासाठी ध्यानाची मदत होते. ध्यान हे केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठीच नव्हे, तर शारीरिक आणि मानसिक व्याधी दूर करण्यासाठीसुद्धा उपयुक्त आहे. वैज्ञानिक कसोट्यांवरसुद्धा हे सिद्ध होत आहे. त्यामुळेच तर मानसिक ताण-तणावातून मुक्त होण्यासाठी ध्यानाचा पुरस्कार केला जातो. महाराष्ट्र सरकारने पोलिस अधिकाऱ्यांसाठी ध्यान आवश्यक मानून मुंबईमध्ये तयासाठी खास सोय-सवलत उपलब्ध केली आहे. या पुस्तकात शरीरातील आज्ञाचक्र, आज्ञाहातचक्र, मूलाधारचक्र यांचे स्थान दर्शविणारा वेगवेगळ्या मूर्ती आणि चिन्हे (लक्ष केंद्रित करण्यासाठी) तसेच पद् मासन सिद्धासन, इ. आसने इ. ची चित्रे दिली आहेत. ध्यान केव्हा, कसं करावं, यांच्या तपशीलवार सूचना दिल्या आहेत. अशा तर्हेने सध्याच्या ताण-तणावापासून मुक्त राहण्यासाठी म्हणजेच निरामय यशासाठी ध्यानाचे सुबोध विवेचन करणारे हे पुस्तक उत्तम मार्गदर्शक आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more