* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WOMAN ON TOP
  • Availability : Available
  • Translators : SHOBHANA SHIKNIS
  • ISBN : 9788184981896
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 160
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Print Books:
WRITTEN BY WELL-KNOWN JOURNALIST AND AUTHOR SEEMA GOSWAMI, WOMAN ON TOP IS A READY-RECKONER FOR EVERY AMBITIOUS WORKING WOMAN. STARTING WITH THE BASICS OF FIRST IMPRESSIONS OF A CANDIDATE IN AN INTERVIEW, GOSWAMI HAS DEALT WITH ALMOST ALL THE VITAL AREAS OF A SUCCESSFUL CAREER. SHE HAS SUCCEDED IN SUSTAINING THE INTEREST OF A READER, WITH HER LIGHT HUMOUR, WITTY COMMENTS AND A REMARKABLE SENSE OF APPROPRIATE CLOTHING, FASHION AND MAKE-UP FOR EVERY OCCASION, TO LOOK PLEASANT . MORE IMPORTANTLY,GOSWAMI SKILLFULLY TAKES THE READER ALONGWITH HER, TOWARDS MORE VITAL TOPICS LIKE HOW TO DEAL WITH DIFFERENT TYPES OF BOSSES, STRIKING A BALANCE BETWEEN HOME AND CAREER, DO`S AND DONT`S OF DEALING WITH MEN AT WORK, SEXUAL HARRASSMENT, KEEPING FIT AND EATING HEALTHY, HOW TO GET AHEAD IN THE JOB, AND FINALLY ,BECOMING A BOSS ONE DAY ,BY BREAKING THAT PROVERBIAL GLASS CEILING. SEEMA GOSWAMI`S SIMPLE YET LIVELY AND DOWN-TO-EARTH WAY OF HANDLING SUCH A NEED-BASED, PERTINENT SUBJECT, HAS TRANSFORMED THE BOOK INTO AN ALL-TIME FAVOURITE GUIDE, ACTUALLY AS GOOD AS A BIBLE, A SUCCESS MANTRA, FOR EVERY WORKING WOMAN WOULD LIKE TO KEEP CLOSE TO HER HEART.
‘वुमन ऑन टॉप’ किताबाच्या मानकरी ठरण्यासाठी नोकरीच्या वाटचालीत शेवटी त्या आभासमय, अभेद्य अशा ग्लास सिलिंगला छेद देण्याची, ‘बॉस’ होऊन खास तुमच्यासाठी अभिरुचीपूर्ण, कलात्मकतेने सजवलेल्या ऑफिसच्या खिडकीतून बाहेरचं विहंगम दृश्य न्याहाळण्याची मनोकामना नोकरी करणा-या प्रत्येक स्त्रीच्या मनात सुप्तावस्थेत दडलेली असतेच. पण ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी निश्चित कोणत्या दिशेने प्रयत्न केले पाहिजेत, ह्याची मात्र त्यांना माहिती असतेच असं नाही. ‘टॉप’ला पोहोचताना विशेषत: स्त्रियांना अनेक अडथळ्यांच्या शर्यती पार कराव्या लागतात. नोकरीच्या ठिकाणी मुसंडी कशी मारायची, स्वत:चं व्यक्तिमत्त्व अंतर्बाह्य कसं खुलवायचं, लैंगिक छळाला कसं तोंड द्यायचं, बॉस कोणकोणत्या प्रकारचे असतात, घर-संसार आणि नोकरी यांच्यातला समतोल करिअरचं आव्हान पेलत असतानाच कसा संंभाळायचा... या सगळ्या विषयांचा संबंधित बारकाव्यांविषयी नर्म विनोदी शैलीत परामर्श घेणारं पुस्तक कसं असावं, याचा ‘वुमन ऑन टॉप’ हे सीमा गोस्वामी या नाणावलेल्या लोकप्रिय पत्रकाराने लिहिलेलं पुस्तक म्हणजे एक आदर्श नमुनाच ठरावा.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% # SEEMAGOSWAMI #SHOBHANASHIKNIS #WOMENONTOP #वुमन ऑन टॉप
Customer Reviews
  • Rating Starनीलिमा देशपांडे

    वुमन ऑन टॉप हे पुस्तक नोकरी करणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी अत्यावश्यक आहे. लेखिका सीमा गोस्वामी यांनी आपले अनुभव अतिशय मार्मिक आणि तरीही सोप्या भाषेत मांडले आहेत. या पुस्तकाचा अनुवाद करताना आपण पुस्तकाचा मूळ गाभा जपत त्यातील नर्मविनोद पकडला आहे. वर्किग वुमन साठी या पुस्तकातील माहितीचा नक्कीच उपयोग होईल. साध्या वाटणाऱ्या गोष्टी किती महत्त्वाच्या असतात याची जाणीव हे पुस्तक करून देते. सीमा गोस्वामी म्हणतात तसे हे पुस्तक खरेच `पथानिदर्शक` आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA SATARA 08-05-2011

    ‘सीमा गोस्वामी या भारतातील एका नामांकित पत्रकार. १९९५ पासून पत्रकारितेत त्यांनी फॅशन, राजकारण, जीवनशैली, निवडणूक, स्तंभलेखन वगैरे विषयांवर भाष्य करीत संडे, हिंदुस्तान टाइम्स वगैरे पत्रांद्वारे भारतभर आपला वाचकवर्ग निर्माण केला आहे. ‘वुमन ऑन टॉप’ हे ्यांचे नवे पुस्तक. नोकरी करणाऱ्या स्त्रियांनी प्रगतीचे विविध टप्पे आत्मविश्वासाच्या आणि आपल्या व्यक्तिमत्वाच्या तसेच कर्तृत्वाच्या बळावर कसे गाठावेत याचे स्वानुभवाच्या आधारे विवेचन करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. कॉलेजमध्ये वादविवाद स्पर्धेत भाग घेणाऱ्या इंग्रजीवर प्रभुत्व असणाऱ्या विशीतल्या तरुणीने एका साप्ताहिकात शिकाऊ वार्ताहराच्या जागेसाठी मुलाखत दिली आणि चलाखपणे उत्तरे देऊन सीमाने पत्रकारितेत पहिली नोकरी मिळवली! ‘तुम्ही जरा चढेल आणि शिष्ट वाटला. पण तुमचा निबंध चांगला होता म्हणून तुम्हाला संधी देण्यात आली.’ असे तिला निवड समितीच्या एका सदस्याने नंतर सांगितले. ते तिने कायम लक्षात ठेवले. उत्तम काम हे आपले ब्रीदवाक्य मानले. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या ऑफिसात एका तरुण स्त्रीने आपले स्वत:चे स्थान निर्माण करणे हे त्यावेळीही सोपे नव्हते. आपल्याला नोकरीत मुसंडी मारायची असेल, तर स्वत:च्याच हुशारीवर आणि चलाखीवर पुढं जायला हवं. आपला मार्ग शोधून काढायला हवा हे तय तरुणीला ऐन विशीत जे जाणवलं ते आज पन्नाशीतलही तितकंच महत्त्वाचं आहे असे तिला अनुभवावरून वाटते आणि त्यासाठी पुस्तक लिहावेसे वाटते. इतर भगिनींना टॉपवर जाण्यासाठी कानमंत्र द्यावेसे वाटते. नोकरी मिळाली तरी पुढे आपला पोशाख, आपला वॉर्डरोब, ऑफिस मीटिंगातील आपला सहभाग, त्यावेळी आपल्या वर्तनातून प्रकट होणारा आगाऊपणा आणि आत्मविश्वास यांच्यातील सीमारेषा, आपल्या सहकाऱ्यांबरोबरचे आपले संबंध (लंच डिनरची आमंत्रणे आणि लैंगिक छळवाद, ड्रिंक्स इत्यादीबाबत फास्ट अँड इझी यासारखा बसणारा शिक्का) ऑफिसमधला रोमान्स, सहकाऱ्यांचे गुणदोष, ऑफिसमधले वातावरण, व्यवस्थेचा भाग होण्यासाठी लागणारी कौशल्ये, टीमचे नेतृत्व करण्याचे कसब, निर्णायक प्रसंगी आवश्यक असणारे धैर्य, आपल्या विचारांबद्दलचा आग्रह, वर्चस्व गाजवण्याची हातोटी, ऑफिसमधले काम आणि कौटुंबिक कर्तव्ये यांचा मेळ घालण्यातले कौशल्य आणि वेळेचे नियोजन, ताणतणाव, नव्या ज्ञानाचे आकलन संपादन, नोकरीच्या ठिकाणी आपला प्रभाव वाढवणे अशा अनेक गोष्टींबाबत तारतम्य पाळावे लागते. नोकरी करताना ती व्यावसायिक वृत्तीने करणे, करिअर घडवणे या दृष्टीने सीमा गोस्वामी यांनी अनेक ठोकताळे या पुस्तकात सांगितले आहेत. तशा टिप्स यात दिल्या आहेत. नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी एक पथदर्शक पुस्तक म्हणून याची उपयुक्तता अभिप्रेत असली तरी सर्वच स्त्री-पुरुषांना हे पुस्तक प्रेरक ठरेल. फर्स्ट इम्प्रेशन. सुरुवात, छान दिसणे, बॉसला खूष ठेवणे, घरापासून दूर, बेडरूम की बोर्डरूम, लैंगिक छळ, निरोगी राहणे, वेगवान आयुष्य आणि आय अ‍ॅम द बॉस अशा दहा प्रकरणात हा सर्व पट मांडण्यात आला आहे. या पुस्तकाचे एक वैशिष्ट्य म्हणजे आवश्यक तेथे देण्यात आलेल्या सूत्ररूप सूचना. अशा माहितीपूर्ण सूत्रांमुळे या पुस्तकाची पारायण करायची इच्छा होईल. या पुस्तकातील एक विशेष म्हणजे लैंगिक छळाबाबत नमूद केलेली व्यूहरचना. ‘नोकरीच्या ठिकाणी स्त्रियांना होणारा सर्वात जास्त त्रास हा लैंगिक छळाचा असू शकतो. साधी चेष्टामस्करी, थोडाफार सौंदर्याचा उल्लेख, शृंगारिक वा चावट शेरा म्हणजे लैंगिक छळ नव्हे. थोड्याशा खुल्या बोलण्याला ‘सेक्शुअल हॅरासमेंट’ म्हणून संबोधू नका. नाहीतर ‘लांडगा आला रे आला’ म्हणून उगाचच हाकाटी करणाऱ्या गोष्टीतल्या मुलासारखी तुमची अवस्था होईल आणि जेव्हा खरोखरच काहीतरी गंभीर प्रसंग ओढवेल, तेव्हा तुमचा कोणीही गांभीर्याने विचार करणार नाही.’ असा इशारा लेखिका देते. तुमच्या मनाप्रमाणे घडलं आणि तुमच्या छळवादाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला, तर छानच! पण त्या सुनावणीत विजय मिळेलच असं गृहीत धरू नका. ऑफिसमध्ये तुम्हाला अनावश्यक ताण वाटत नसेल, तर तुम्ही तिथेच काम सुरू ठेवू शकता. पण जर तुम्हाला शरमल्यासारखं वाटत असेल किंवा तुम्हाला सूचकपणे असं सांगण्यात येत असेल की तुम्ही दुसरीकडे काम करून अधिक खूष राहू शकाल, तर मात्र दुसरी नोकरी शोधायला सुरुवात करा. तुम्ही झुंज जिंकली नसेल. पण स्वत:च्या मुद्यांवर ठाम राहून आणि उघडपणे बोलण्याचं धैर्य दाखवून युद्ध नक्कीच जिंकलं आहे आणि तुम्ही कुठेही नोकरी केलीत, तरी त्याबद्दलच्या समाधानाची एक उबदार भावना तुमच्या सगळ्या करिअरमध्ये तुमच्याबरोबर राहील. लैंगिक छळवादाची शिकार आपण होऊ नये, ही खात्री पटवण्यासाठी काय करावं लागेल? जो खराच छळवादी असतो, त्याला कोणत्याही प्रकाराने छळवादापासून परावृत्त करता येत नाही, हे बरोबर आहे. मग तुम्ही शालीन वेषभूषा करा, सुसंस्कृतपणे वागा किंवा कडक ‘डोन्ट-मेस-विथ-मी’ असं ध्वनित करा. नोकरीच्या ठिकाणी चुकीचे संदेश जाऊ देणं, ह्यात देखील काहीच फायदा नाही. जेव्हा धक्का देता देता ढकलून दिले जातं तेव्हा फार तर लोक असा विचार करतील की तुम्हाला नीट मार्गदर्शन करण्यात आलं नव्हतं किंवा तुम्ही अनभिज्ञ होतात. वाईटात वाईट ते हा विचार करतील की ही परिस्थिती तुम्हीच ओढवून घेतली आहे. तुमची प्रतिमा ही कामाच्या ठिकाणी फार महत्त्वाची आहे. तुम्ही एक ‘सेक्शुअल’ व्यक्ती आहात अशी तुमची प्रतिमा तयार होत असेल, तर जो संदेश मिळतो तो तशीच वागणूक तुम्हाला मिळावी हाच असतो. लोकांच्या लक्षात येण्यासाठी वेषभूषा करत असाल, तर मग लोकांनी तिची दखल घेतल्यावर भडकून काय उपयोग? सेक्ससाठी तुम्ही उपलब्ध आहात, अशा पद्धतीचं जर तुमचं वागणं असेल आणि तसं तुम्हाला जर वागवलं गेलं तर ‘लैंगिक छळ’ झाल्याची बोंब तुम्ही ठोकू शकत नाही. नोकरी करणाऱ्या स्त्रियांना आपल्या कार्यालयात कसे वागावे याचे बहुमोल मार्गदर्शन करणारे हे अप्रतिम पुस्तक आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more