* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Notify Me
     
  • ISBN : 9788177662474
  • Edition : 8
  • Publishing Year : JANUARY 1996
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 200
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE
  • Available in Combos :SURESHCHANDRA NADKARNI COMBO SET- 4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DR. NADKARNI IS A MULTIDIMENSIONAL VERSATILE PERSONALITY. HE HAS A COMMAND OVER LITERATURE, MUSIC, ART, SCIENCE, SPORTS, AND POETRY. HE IS A PERFECT COMBINATION OF DILIGENCE AND DISCERNMENT.HIS WRITING REVEALS ALL HIS PECULIARITIES MAKING IT UNIQUE. HE SEARCHES THE HORIZONS IN THE FIELDS OF MUSIC TO SCIENCE ENTERTAINING AND CAPTURING THE MINDS OF THE READERS.THE PRESENT BOOK IS YET ANOTHER OF HIS ASTONISHINGLY WONDERFUL CREATION.
डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी हे एक बहुवेधी व्यक्तिमत्व आहे. साहित्य, संगीत, कला, विज्ञान, क्रीडा, शेर-शायरी अशा विविध क्षेत्रांमध्ये अधिकारवाणीनं संचार करणारं. व्यासंग आणि रसिकता यांचा सुरेच मेळ असलेलं. म्हणूनच कमालीचं वैविध्यपूर्ण आणि रसरशीत शैलीनं नटलेलं असं लेखन हे त्याचं वैशिष्ट्य ठरतं. संगीताच्या मैफलीपासून गूढगुंजनाचा शोध घेणा-या विज्ञानापर्यंत अनेक विषयांचा रसग्राहक, शोधक मागोवा ते घेतात; आणि वाचकाला आपल्याबरोबर रमणीय विश्वात रमवतात... "अज्ञाताचे विज्ञान" ही आहे त्यांने घडविलेली अशीच एक आगळीवेगळी सफर....
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ADNYATACHEVIDNYAN #ADNYATACHEVIDNYAN #अज्ञाताचेविज्ञान #SCIENCE #MARATHI #SURESHCHANDRANADKARNI #सुरेशचंद्र नाडकर्णी "
Customer Reviews
  • Rating StarDaulati Vairat

    दोनदा वाचले आहे. छान आहे.

  • Rating StarAnil Soman

    मध्यंतरी fb वर `पृथ्वीवर माणूस उपराच` हया पुस्तकावर पोस्ट आली होती. त्या संदर्भात डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी ह्यांचे माझ्या संग्रही असलेले `अज्ञाताचे विज्ञान` हे पुस्तक आठवले. डॉ.नाडकर्णी म्हणजे एक व्यासंगी व्यक्तिमत्व. साहित्य, संगीत, शेरो शायरी आशा विवध क्षेत्रात त्यांची मुशाफिरी आहे. आपल्या अवती भोवती निसर्गात अशा अनेक घटना घडत असतात की त्या मागची कारण मीमांसा आपल्याला समजू शकत नाही. हे असे कसे व का ह्याची उत्तरे सापडत नाहीत. अनेक घटना विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध करता येत नाहीत. त्यांचे स्पष्टीकरण देता येत नाही. आणि मग साहजिकच त्यांना गुढतेचे वलय प्राप्त होते. प्रस्तुत पुस्तकात ह्याच अज्ञात वाटणाऱ्या गोष्टींचा शोध घेण्यासाठी केले गेलेले प्रयत्न ह्यांचा मागोवा घेण्यात आला आहे. जाणीव म्हणजे काय, तेजोवलय कोष, दूर संवेदना ई. कांही लेखांची शीर्षके आहेत. लेखकाने अनेक संदर्भही दिले आहेत. पुस्तक छान माहितीपूर्ण आहे. लेखकाची शैलीही उत्कंठा वाढविणारी आहे. वेगळ्या विषयाची आवड असणाऱ्यांना हे पुस्तक नक्की आवडेल. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    या विश्वात कितीतरी अशा गूढ गोष्टी आहेत की जेथे मती गुंग होते... आपल्या जीवनात अनेक असे प्रसंग घडतात की आपली बुद्धी चक्रावून जाते, असे अनेक अनुभव लोक सांगतात की त्यांचे तर्कशक्तीच्या बळावर आकलन - स्पष्टीकरण करणे जड जाते. ज्या गोष्टींचे स्पष्टीकरण व कर्यकारणभाव सहजपणे उलगडत नाही, अशा गोष्टी संदिग्ध आणि गूढ ठरतात, त्यांची गूढरचना ही माणसाला पिढ्यान्पिढ्या भूल घालत राहिली आहे. आपल्या भविष्यात काय दडलेले आहे, आपल्या पूर्वजन्मी आपण कोण होतो, पक्ष्यांची भाषा आपल्याला कळू शकते का, मृत्यूनंतर माणसाचे काय होते, आत्मा हा दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करून काही कामे करून घेऊ शकतो का, भूत वगैरे प्रकार खरोखरच आहेत का, दूर अंतरावर असणाऱ्या दोन व्यक्तींच्या मनात एकाच वेळी एकच विचार होणे असा प्रकार संभवतो का, भावी अनर्थाची पूर्वसूचना मिळते का, काही विशिष्ट स्थळी गेल्यावर व विशिष्ट व्यक्तींच्या सहवासात गेल्यावर मनःशांतीचा अनुभव येतो हे खरे आहे का, चंद्र व ग्रह यांचा मानवी मनावर व जीवनावर प्रभाव पडतो का, ग्रहशांती-यज्ञयाग करून काही फायदा होतो का, केवळ स्पर्शाने रोग बरा करण्याची क्षमता कोणात असते का, पंचेंद्रियांनी होऊ शकत नाही असे काही ज्ञान आहे का, आणि तसे ते असल्यास त्याच्या आकलनासाठी अधिक ज्ञानेंद्रिये असणे संभाव्य आहे का, लहान वयातच संगीत, गणित वगैरे क्षेत्रांत विशेष प्रावीण्य दाखविणाऱ्या मुलामुलींच्या व पूर्वजन्माच्या स्मृती सांगणाऱ्या व्यक्तींच्या अनुभवाचा अन्वयार्थ कसा लावायचा इ. इ्... हे आणि असे अनेक प्रश्न हे जगभरच्या शास्त्रज्ञांनाही सारखे सतावत राहिलेले आहेत. गूढ व रहस्यपूर्ण असा त्यांच्यावर शिक्का मारून ते स्वस्थ बसलेले नाहीत. त्यांचा उलगडा करण्यासाठी ते प्रयोग करीत आहेत. अज्ञानाचा बोध व्हावा, त्याची उकल व्हावी म्हणून त्यांची खटपट चालू आहे. अशा या प्रयत्नांची माहिती देण्याचा प्रयत्न डॉ. सुरेशचंद्र कुलकर्णी यांनी ‘अज्ञानाचे विज्ञान’ या पुस्तकातील चोवीस लेखांद्वारे केला आहे. मानवी सृष्टीतल्या अज्ञात, गूढ अशा अनेक बाबींवर प्रकाश टाकणारे हे लेख आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक पाश्चात्त्य पुस्तकांचा उपयोग केला आहे. अडीच वर्षे खपून बारा-तेरा हजार पृष्ठांचे वाचन करून, टिपणे काढून, भरपूर श्रम घेऊन योग्य ते संदर्भ जमवून या लेखांची मांडणी केली आहे. पाश्चात्त्य देशात एखाद्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी काही व्यक्ती व संस्था सतत प्रयत्नशील असतात आणि आपल्या संशोधनाचे निष्कर्ष वेळोवेळी प्रसिद्ध करीत असतात. काही संशोधक हे निष्कर्ष काढताना नको तेवढी चलाखी दाखवून, दिशाभूलही करतात. परंतु एकूण या संशोधनामुळे अनेक बाबींवर वेगवेगळ्या अंगांनी प्रकाश पडत जातो हे खरेच आहे. डॉ. नाडकर्णी यांनी पुढील विषय या पुस्तकात घेतले आहेत. वैश्विक चक्र व त्याचे परिणाम, चंद्राचा मानवी जीवनावर व स्वभावावर होणारा परिणाम, ग्रह आणि व्यवसाय, ग्रहावरून भविष्य सांगण्याचा प्रयत्न, आत्मा, उपद्व्यापी कंपनलहरी, मानसिक सामर्थ्य, प्रत्येक व्यक्तीभोवती असणारे तेजोवलय कोष, विद्युत चुंबकीय क्षेत्र, अ‍ॅक्युपंक्चर व शियात्सू इ. उपचार पद्धती, मनलहरी, इच्छाशक्ती, धातूचे सोन्यात रूपांतर करणारा परीस, आदिम समाजातील औषधोपचार पद्धती, हस्तरेखाशास्त्र, संमोहनशास्त्र, बाह्यमन व अंतर्मन, मंत्रविद्या व चेटूक, स्वप्ने व अबोध मन, दूर संवेदना, अंतःप्रेरणेने मिळणारे संकेत, काळावर मात करण्याचे प्रचत्न, भूतयोनीचे गौडबंगाल, मृत्यूनंतरचे अस्तित्व, मानवाचे भवितव्य. ह्या लेखांतून अनेक शास्त्रज्ञ, अनेक प्रयोग, अनेक नव्या संकल्पना समोर येतात. आपल्या विचारांना त्यामुळे चालना मिळते. पस्तीस आणि चाळीस सेल्सियस तापमानाच्या दरम्यान पाणी अत्यंत अस्थिर वागते. माणसाच्या शरीराचे तापमान नेमके याच तापमानाच्या टप्प्यात असते. हा केवळ योगायोग मानायचा का? (७) पृथ्वीवर सापडणाऱ्या सुमारे ११० मूलद्रव्यांपैकी फक्त सोळा द्रव्येच सजीवांचे शरीर घडवितात. त्यांच्या क्रमवारीचे संयुग साखळ्या (कंपाउंड चेन्स) बनविल्या जातात. बुरशीपासून देवमाशापर्यंत सर्वांच्या बाबतीत हाच प्रकार होतो. (९) विशिष्ट क्रमवार मांडणीने होणारी सजीवांची निर्मिती हा एक चमत्कारच आहे. मांजराचे कान इतके तीक्ष्ण असतात की त्यांचे वर्णन हाय फिडेलिटी इक्विपमेंट असे करता येईल. (११) डॉ. सेमिअन किर्लेअन यांनी मानवी शरीराभोवती असणाऱ्या तेजोवलय कोषाचा फोटो घेणारे तंत्र विकसित केले. (८९) हाताच्या पृष्ठभागावरचे किरणांचे पुंज या यंत्राद्वारे दिसल्यावर डॉ. मिखाईल गायकिन यांना अ‍ॅक्युपंक्चरच्या उपचारबिंदूच्या नकाशाशी ते जुळतात असे आढळून आले. (९०) चरक व सुश्रुत यांनी मानवी शरीरावरील १०७ मर्मबिंदूंची नोंद केलेली आहे. (९१) टोबिस्कोप या यंत्रामुळे बायोप्लाझ्मा (सूक्ष्मदेह), तेजोवलय (ऑॅरा) आणि अ‍ॅक्युपंक्चर व शियात्सू या उपचार पद्धतीत एक नवीनच दुवा निर्माण झाला आहे. (९२) सूक्ष्मदेह व तेजोवलय दोहोंना जोडणारे मन शरीरात कुठे आहे? अंतर्मनात अनेक सुप्त भावना दाबून ठेवल्या जातात. कारणपरत्वे त्यांचा एकाएकी उद्रेक होतो, तेव्हा मनोगतिकीच्या घटना घडून येतात. त्यांना भानामती असे मानले जात असावे असे डॉ. नांदोर फॉडोर हे मनोविश्र्लेषणतज्ज्ञ मानतात. (९५) डॉ. जेनेडी सर्जेयेव्ह यांनी म्हटले आहे की अत्यंत गाढ झोपेत वा समाधी अवस्थेत मेंदूतून प्रतिसेकंद चार लयीत ह्रदयाचे ठोके स्पंदन पावत असतात. त्यांना थिटा लहरी म्हणतात. (९६) जपानमध्ये १९१०-१९१३ या अवधीत टोमाकिशी फुकुराई याने सीलबंद फोटोप्लेटवर आपल्या मनातील विचारांचे छायाचित्र उमटवून दाखविण्याचा प्रयोग केला. (९८) निरनिराळ्या भाषांतील शब्दोच्चारणाची पद्धत व त्यातून निर्माण होणारे ध्वनी लक्षात घेऊन जागतिक ध्वन्यानुसारी (फोनेटिक) वर्णमाला तयार करण्यात आली. (५६) विश्वातील सर्व अणू हे कंपनशील आहेत आणि एखाद्या गोलाकार घंटेप्रमाणे सतत नादनिर्मिती करीत असतात. परमाणू हे स्वरसमूह आहेत. सजीवांचे शरीर हे एक वाद्य आहे. त्यातून सतत संगीत बाहेर पडत असते. ‘सिंफोनी ऑफ लाइफ’ या ग्रंथात डॉ. डोनाल्ड अँड्र्यू यांनी ही कल्पना मांडली आहे. (५७) दूर अंतरावरून, स्पर्श न करता दिवा पेटवता येतो हा प्रयोग १९३०-३१ साली डॉ. हॅरी प्राइस यांनी मार्गारेट एलिन या महिलेबाबत करून दाखवला. (६७) नेलिया मिखाइलोव्हा या महिलेने स्लाइसच्या चळतीकडे रोखून पाहिले. त्यातील एक स्लाइस बाहेर पडून नेलियाच्या दिशेने सरकत गेली - ही रशियातील साहित्यिक लेव्ह कोलोनी आणि व्हादिन मरीन यांनी नोंदवलेली कहाणी. (७५) नेलियाचे विद्युत चुंबकीय क्षेत्र इतरापेक्षा अधिक शक्तिशाली होते. केवळ नजरेने अंड्याचा पांढरा व पिवळा भाग अलग केला. (७७) लहान मेंदूच्या खालील भागात कल्पिलेले आज्ञाचक्र (थॅलॅमाय) हे अत्यंत महत्त्वाचे ज्ञानकेंद्र असन कुंडलिनी जागृती करणारे साधक त्याला शिवाचे स्थान मानतात. (७७) प्रत्येक सजीवाच्या शरीराभोवती त्याचे स्वतःचे असे एक स्थितिज विद्युत क्षेत्र (स्टॅटिक इलेक्ट्रिकल फील्ड) असते. गूढ विद्यासाधक हे तेजोवलय कोष पाहू शकतात वा तसा दावा करतात. (८३) डॉ. ऑस्कर बॅग्नल आणि डॉ. वॉल्टर क्लिनर यांनी त्यावर प्रयोग केले. (८४) शरीरातील सर्वात महत्त्वाची चेतासंस्था दिवसाकाठी तीन ग्रॅम पोटॅशियम उपयोगात आणते. आक्र्टिक व अंटार्टिक प्रदेशात दोन वर्षांपेक्षा जास्त काळ राहिलेल्या शास्त्रज्ञांच्या बाबतीतही हेच प्रमाण आढळते. यावरून पृथ्वीचे दिनमानचक्र आणि मानवी शरीराच्या क्रिया यांचा संबंध लक्षात येतो. (१३) पहाटे चार वाजता मातेचे शरीर कमाल शिथिल अवस्थेत असते. त्याच वेळेस जन्मणाऱ्या बालकांचे प्रमाण जास्त आढळते. पहाटे शरीर क्रिया मंदावलेल्या असल्याने गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस ही वेळ निवडतात. सर्वाधिक मतिमंद मुले डिसेंबर-जानेवारी या कालावधीत जन्मलेली दिसतात. मे-जून मध्ये जन्मलेल्या मुलांचा बुद्ध्यांक सर्वात जास्त आढळतो. डॉ. हॅटिंग्टन व डॉ. हेन्री नॉब्लॉक यांचे संशोधन. (१४) शुक्ल पक्षात चंद्रकला वाढताना व पौर्णिमेला केलेल्या शस्त्रक्रियांच्या वेळी हजारपैकी ८७० रुग्णांना रक्तस्राव जास्त होतो. (१९) अमावास्येच्या आसपास केलेल्या शस्त्रक्रियांत अतिरिक्त रक्तस्राव कमी होतो म्हणून ते दिवस शस्त्रक्रियांसाठी वापरावे असे डॉ. एडसन अँड्र्यू यांचे मत आहे. (२०) चोरी, उचलेगिरी, आततायी बेदरकार ड्रायव्हिंग, अतिरिक्त नशापान, इ. गुन्हे पौर्णिमेच्या दिवशी अधिक घड़तात, असे अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ क्लायमेटॉलॉजीच्या अहवालात दिले आहे. (२०) जन्मलग्नी शनि-मंगळाशी निगडित असलेल्या व्यक्ती वैद्यकीय व्यवसायात जास्त आढळतात असा डॉ. मायकेल गॉकिलिन यांनी निष्कर्ष नोंदवला आहे. (२६) कर्करोग होण्यापूर्वी शरीराच्या अवयवांच्या विद्युतभारात लक्षणीय बदल घडून येतात असे डॉ. हॅरॉल्ड बर (येल युनिव्हर्सिटी) यांनी जाहीर केले. (३९) संपूर्ण शरीरात एकदिश विद्युत प्रवाह आहे. मात्र चेतासंस्थेतून निघणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरी वेगळ्या आहेत. सजीवाचे विद्युतचुंबकीय क्षेत्र हे एकात्मीभूत कार्यतंत्र आहे आणि सजीवाचा मृत्यू झाल्यानंतर देखील ते काही काळ मागे उरते असे डॉ. एडवर्ड रसेल यांना आढळून आले. (४१) ‘नियतीची संकल्पना’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. हे क्षेत्र म्हणजे तर आत्मा नव्हे ना? पिरॅमिडच्या विशिष्ट रचनेमुळे खाद्यपदार्थ काही काळ तसेच टिकून राहतात. पिरॅमिडच्या आत ठेवलेली विद्युत उपकरणे कोणताही बिघाड न होता बंद पडतात असे डॉ. अमर गोहेड यांना आढळून आले. (५१) गोल, चौकोनी व दंडगोलाकृती डब्यापेक्षा मधे फुगीर असणाऱ्या पिंपात दारू वा बीअर स्वादिष्ट बनते. (५१) बुरशीसारखे सूक्ष्म जीवजंतू व मानवासारखा विकसित गुंतागुंतीचा देह यांच्या अ‍ॅमिनो अ‍ॅसिडस एकाच पद्धतीने निर्माण होतात. निसर्गात आढळणाऱ्या विविध आकृतिबंधांच्या शास्त्राला ‘सायमॅटिक्स’ हे नाव आहे. (५४) कंपनलहरी व त्यांच्या प्रभावामुळे घडवली जाणारी आकृती यांतील कार्यकारणभाव लक्षात घेऊन डॉ. हान्स येनी चांनी टोनोस्कोप हे यंत्र बनवले. ध्वनिलहरींची त्रिमिती आकृती रेखाटणारे हे साधन आहे. (५५) ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more