* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662474
  • Edition : 8
  • Publishing Year : JANUARY 1996
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 200
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE
  • Available in Combos :SURESHCHANDRA NADKARNI COMBO SET- 4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DR. NADKARNI IS A MULTIDIMENSIONAL VERSATILE PERSONALITY. HE HAS A COMMAND OVER LITERATURE, MUSIC, ART, SCIENCE, SPORTS, AND POETRY. HE IS A PERFECT COMBINATION OF DILIGENCE AND DISCERNMENT.HIS WRITING REVEALS ALL HIS PECULIARITIES MAKING IT UNIQUE. HE SEARCHES THE HORIZONS IN THE FIELDS OF MUSIC TO SCIENCE ENTERTAINING AND CAPTURING THE MINDS OF THE READERS.THE PRESENT BOOK IS YET ANOTHER OF HIS ASTONISHINGLY WONDERFUL CREATION.
डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी हे एक बहुवेधी व्यक्तिमत्व आहे. साहित्य, संगीत, कला, विज्ञान, क्रीडा, शेर-शायरी अशा विविध क्षेत्रांमध्ये अधिकारवाणीनं संचार करणारं. व्यासंग आणि रसिकता यांचा सुरेच मेळ असलेलं. म्हणूनच कमालीचं वैविध्यपूर्ण आणि रसरशीत शैलीनं नटलेलं असं लेखन हे त्याचं वैशिष्ट्य ठरतं. संगीताच्या मैफलीपासून गूढगुंजनाचा शोध घेणा-या विज्ञानापर्यंत अनेक विषयांचा रसग्राहक, शोधक मागोवा ते घेतात; आणि वाचकाला आपल्याबरोबर रमणीय विश्वात रमवतात... "अज्ञाताचे विज्ञान" ही आहे त्यांने घडविलेली अशीच एक आगळीवेगळी सफर....
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ADNYATACHEVIDNYAN #ADNYATACHEVIDNYAN #अज्ञाताचेविज्ञान #SCIENCE #MARATHI #SURESHCHANDRANADKARNI #सुरेशचंद्र नाडकर्णी "
Customer Reviews
  • Rating StarDaulati Vairat

    दोनदा वाचले आहे. छान आहे.

  • Rating StarAnil Soman

    मध्यंतरी fb वर `पृथ्वीवर माणूस उपराच` हया पुस्तकावर पोस्ट आली होती. त्या संदर्भात डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी ह्यांचे माझ्या संग्रही असलेले `अज्ञाताचे विज्ञान` हे पुस्तक आठवले. डॉ.नाडकर्णी म्हणजे एक व्यासंगी व्यक्तिमत्व. साहित्य, संगीत, शेरो शायरी आशा विवध क्षेत्रात त्यांची मुशाफिरी आहे. आपल्या अवती भोवती निसर्गात अशा अनेक घटना घडत असतात की त्या मागची कारण मीमांसा आपल्याला समजू शकत नाही. हे असे कसे व का ह्याची उत्तरे सापडत नाहीत. अनेक घटना विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध करता येत नाहीत. त्यांचे स्पष्टीकरण देता येत नाही. आणि मग साहजिकच त्यांना गुढतेचे वलय प्राप्त होते. प्रस्तुत पुस्तकात ह्याच अज्ञात वाटणाऱ्या गोष्टींचा शोध घेण्यासाठी केले गेलेले प्रयत्न ह्यांचा मागोवा घेण्यात आला आहे. जाणीव म्हणजे काय, तेजोवलय कोष, दूर संवेदना ई. कांही लेखांची शीर्षके आहेत. लेखकाने अनेक संदर्भही दिले आहेत. पुस्तक छान माहितीपूर्ण आहे. लेखकाची शैलीही उत्कंठा वाढविणारी आहे. वेगळ्या विषयाची आवड असणाऱ्यांना हे पुस्तक नक्की आवडेल. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    या विश्वात कितीतरी अशा गूढ गोष्टी आहेत की जेथे मती गुंग होते... आपल्या जीवनात अनेक असे प्रसंग घडतात की आपली बुद्धी चक्रावून जाते, असे अनेक अनुभव लोक सांगतात की त्यांचे तर्कशक्तीच्या बळावर आकलन - स्पष्टीकरण करणे जड जाते. ज्या गोष्टींचे स्पष्टीकरण व कर्यकारणभाव सहजपणे उलगडत नाही, अशा गोष्टी संदिग्ध आणि गूढ ठरतात, त्यांची गूढरचना ही माणसाला पिढ्यान्पिढ्या भूल घालत राहिली आहे. आपल्या भविष्यात काय दडलेले आहे, आपल्या पूर्वजन्मी आपण कोण होतो, पक्ष्यांची भाषा आपल्याला कळू शकते का, मृत्यूनंतर माणसाचे काय होते, आत्मा हा दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करून काही कामे करून घेऊ शकतो का, भूत वगैरे प्रकार खरोखरच आहेत का, दूर अंतरावर असणाऱ्या दोन व्यक्तींच्या मनात एकाच वेळी एकच विचार होणे असा प्रकार संभवतो का, भावी अनर्थाची पूर्वसूचना मिळते का, काही विशिष्ट स्थळी गेल्यावर व विशिष्ट व्यक्तींच्या सहवासात गेल्यावर मनःशांतीचा अनुभव येतो हे खरे आहे का, चंद्र व ग्रह यांचा मानवी मनावर व जीवनावर प्रभाव पडतो का, ग्रहशांती-यज्ञयाग करून काही फायदा होतो का, केवळ स्पर्शाने रोग बरा करण्याची क्षमता कोणात असते का, पंचेंद्रियांनी होऊ शकत नाही असे काही ज्ञान आहे का, आणि तसे ते असल्यास त्याच्या आकलनासाठी अधिक ज्ञानेंद्रिये असणे संभाव्य आहे का, लहान वयातच संगीत, गणित वगैरे क्षेत्रांत विशेष प्रावीण्य दाखविणाऱ्या मुलामुलींच्या व पूर्वजन्माच्या स्मृती सांगणाऱ्या व्यक्तींच्या अनुभवाचा अन्वयार्थ कसा लावायचा इ. इ्... हे आणि असे अनेक प्रश्न हे जगभरच्या शास्त्रज्ञांनाही सारखे सतावत राहिलेले आहेत. गूढ व रहस्यपूर्ण असा त्यांच्यावर शिक्का मारून ते स्वस्थ बसलेले नाहीत. त्यांचा उलगडा करण्यासाठी ते प्रयोग करीत आहेत. अज्ञानाचा बोध व्हावा, त्याची उकल व्हावी म्हणून त्यांची खटपट चालू आहे. अशा या प्रयत्नांची माहिती देण्याचा प्रयत्न डॉ. सुरेशचंद्र कुलकर्णी यांनी ‘अज्ञानाचे विज्ञान’ या पुस्तकातील चोवीस लेखांद्वारे केला आहे. मानवी सृष्टीतल्या अज्ञात, गूढ अशा अनेक बाबींवर प्रकाश टाकणारे हे लेख आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक पाश्चात्त्य पुस्तकांचा उपयोग केला आहे. अडीच वर्षे खपून बारा-तेरा हजार पृष्ठांचे वाचन करून, टिपणे काढून, भरपूर श्रम घेऊन योग्य ते संदर्भ जमवून या लेखांची मांडणी केली आहे. पाश्चात्त्य देशात एखाद्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी काही व्यक्ती व संस्था सतत प्रयत्नशील असतात आणि आपल्या संशोधनाचे निष्कर्ष वेळोवेळी प्रसिद्ध करीत असतात. काही संशोधक हे निष्कर्ष काढताना नको तेवढी चलाखी दाखवून, दिशाभूलही करतात. परंतु एकूण या संशोधनामुळे अनेक बाबींवर वेगवेगळ्या अंगांनी प्रकाश पडत जातो हे खरेच आहे. डॉ. नाडकर्णी यांनी पुढील विषय या पुस्तकात घेतले आहेत. वैश्विक चक्र व त्याचे परिणाम, चंद्राचा मानवी जीवनावर व स्वभावावर होणारा परिणाम, ग्रह आणि व्यवसाय, ग्रहावरून भविष्य सांगण्याचा प्रयत्न, आत्मा, उपद्व्यापी कंपनलहरी, मानसिक सामर्थ्य, प्रत्येक व्यक्तीभोवती असणारे तेजोवलय कोष, विद्युत चुंबकीय क्षेत्र, अ‍ॅक्युपंक्चर व शियात्सू इ. उपचार पद्धती, मनलहरी, इच्छाशक्ती, धातूचे सोन्यात रूपांतर करणारा परीस, आदिम समाजातील औषधोपचार पद्धती, हस्तरेखाशास्त्र, संमोहनशास्त्र, बाह्यमन व अंतर्मन, मंत्रविद्या व चेटूक, स्वप्ने व अबोध मन, दूर संवेदना, अंतःप्रेरणेने मिळणारे संकेत, काळावर मात करण्याचे प्रचत्न, भूतयोनीचे गौडबंगाल, मृत्यूनंतरचे अस्तित्व, मानवाचे भवितव्य. ह्या लेखांतून अनेक शास्त्रज्ञ, अनेक प्रयोग, अनेक नव्या संकल्पना समोर येतात. आपल्या विचारांना त्यामुळे चालना मिळते. पस्तीस आणि चाळीस सेल्सियस तापमानाच्या दरम्यान पाणी अत्यंत अस्थिर वागते. माणसाच्या शरीराचे तापमान नेमके याच तापमानाच्या टप्प्यात असते. हा केवळ योगायोग मानायचा का? (७) पृथ्वीवर सापडणाऱ्या सुमारे ११० मूलद्रव्यांपैकी फक्त सोळा द्रव्येच सजीवांचे शरीर घडवितात. त्यांच्या क्रमवारीचे संयुग साखळ्या (कंपाउंड चेन्स) बनविल्या जातात. बुरशीपासून देवमाशापर्यंत सर्वांच्या बाबतीत हाच प्रकार होतो. (९) विशिष्ट क्रमवार मांडणीने होणारी सजीवांची निर्मिती हा एक चमत्कारच आहे. मांजराचे कान इतके तीक्ष्ण असतात की त्यांचे वर्णन हाय फिडेलिटी इक्विपमेंट असे करता येईल. (११) डॉ. सेमिअन किर्लेअन यांनी मानवी शरीराभोवती असणाऱ्या तेजोवलय कोषाचा फोटो घेणारे तंत्र विकसित केले. (८९) हाताच्या पृष्ठभागावरचे किरणांचे पुंज या यंत्राद्वारे दिसल्यावर डॉ. मिखाईल गायकिन यांना अ‍ॅक्युपंक्चरच्या उपचारबिंदूच्या नकाशाशी ते जुळतात असे आढळून आले. (९०) चरक व सुश्रुत यांनी मानवी शरीरावरील १०७ मर्मबिंदूंची नोंद केलेली आहे. (९१) टोबिस्कोप या यंत्रामुळे बायोप्लाझ्मा (सूक्ष्मदेह), तेजोवलय (ऑॅरा) आणि अ‍ॅक्युपंक्चर व शियात्सू या उपचार पद्धतीत एक नवीनच दुवा निर्माण झाला आहे. (९२) सूक्ष्मदेह व तेजोवलय दोहोंना जोडणारे मन शरीरात कुठे आहे? अंतर्मनात अनेक सुप्त भावना दाबून ठेवल्या जातात. कारणपरत्वे त्यांचा एकाएकी उद्रेक होतो, तेव्हा मनोगतिकीच्या घटना घडून येतात. त्यांना भानामती असे मानले जात असावे असे डॉ. नांदोर फॉडोर हे मनोविश्र्लेषणतज्ज्ञ मानतात. (९५) डॉ. जेनेडी सर्जेयेव्ह यांनी म्हटले आहे की अत्यंत गाढ झोपेत वा समाधी अवस्थेत मेंदूतून प्रतिसेकंद चार लयीत ह्रदयाचे ठोके स्पंदन पावत असतात. त्यांना थिटा लहरी म्हणतात. (९६) जपानमध्ये १९१०-१९१३ या अवधीत टोमाकिशी फुकुराई याने सीलबंद फोटोप्लेटवर आपल्या मनातील विचारांचे छायाचित्र उमटवून दाखविण्याचा प्रयोग केला. (९८) निरनिराळ्या भाषांतील शब्दोच्चारणाची पद्धत व त्यातून निर्माण होणारे ध्वनी लक्षात घेऊन जागतिक ध्वन्यानुसारी (फोनेटिक) वर्णमाला तयार करण्यात आली. (५६) विश्वातील सर्व अणू हे कंपनशील आहेत आणि एखाद्या गोलाकार घंटेप्रमाणे सतत नादनिर्मिती करीत असतात. परमाणू हे स्वरसमूह आहेत. सजीवांचे शरीर हे एक वाद्य आहे. त्यातून सतत संगीत बाहेर पडत असते. ‘सिंफोनी ऑफ लाइफ’ या ग्रंथात डॉ. डोनाल्ड अँड्र्यू यांनी ही कल्पना मांडली आहे. (५७) दूर अंतरावरून, स्पर्श न करता दिवा पेटवता येतो हा प्रयोग १९३०-३१ साली डॉ. हॅरी प्राइस यांनी मार्गारेट एलिन या महिलेबाबत करून दाखवला. (६७) नेलिया मिखाइलोव्हा या महिलेने स्लाइसच्या चळतीकडे रोखून पाहिले. त्यातील एक स्लाइस बाहेर पडून नेलियाच्या दिशेने सरकत गेली - ही रशियातील साहित्यिक लेव्ह कोलोनी आणि व्हादिन मरीन यांनी नोंदवलेली कहाणी. (७५) नेलियाचे विद्युत चुंबकीय क्षेत्र इतरापेक्षा अधिक शक्तिशाली होते. केवळ नजरेने अंड्याचा पांढरा व पिवळा भाग अलग केला. (७७) लहान मेंदूच्या खालील भागात कल्पिलेले आज्ञाचक्र (थॅलॅमाय) हे अत्यंत महत्त्वाचे ज्ञानकेंद्र असन कुंडलिनी जागृती करणारे साधक त्याला शिवाचे स्थान मानतात. (७७) प्रत्येक सजीवाच्या शरीराभोवती त्याचे स्वतःचे असे एक स्थितिज विद्युत क्षेत्र (स्टॅटिक इलेक्ट्रिकल फील्ड) असते. गूढ विद्यासाधक हे तेजोवलय कोष पाहू शकतात वा तसा दावा करतात. (८३) डॉ. ऑस्कर बॅग्नल आणि डॉ. वॉल्टर क्लिनर यांनी त्यावर प्रयोग केले. (८४) शरीरातील सर्वात महत्त्वाची चेतासंस्था दिवसाकाठी तीन ग्रॅम पोटॅशियम उपयोगात आणते. आक्र्टिक व अंटार्टिक प्रदेशात दोन वर्षांपेक्षा जास्त काळ राहिलेल्या शास्त्रज्ञांच्या बाबतीतही हेच प्रमाण आढळते. यावरून पृथ्वीचे दिनमानचक्र आणि मानवी शरीराच्या क्रिया यांचा संबंध लक्षात येतो. (१३) पहाटे चार वाजता मातेचे शरीर कमाल शिथिल अवस्थेत असते. त्याच वेळेस जन्मणाऱ्या बालकांचे प्रमाण जास्त आढळते. पहाटे शरीर क्रिया मंदावलेल्या असल्याने गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस ही वेळ निवडतात. सर्वाधिक मतिमंद मुले डिसेंबर-जानेवारी या कालावधीत जन्मलेली दिसतात. मे-जून मध्ये जन्मलेल्या मुलांचा बुद्ध्यांक सर्वात जास्त आढळतो. डॉ. हॅटिंग्टन व डॉ. हेन्री नॉब्लॉक यांचे संशोधन. (१४) शुक्ल पक्षात चंद्रकला वाढताना व पौर्णिमेला केलेल्या शस्त्रक्रियांच्या वेळी हजारपैकी ८७० रुग्णांना रक्तस्राव जास्त होतो. (१९) अमावास्येच्या आसपास केलेल्या शस्त्रक्रियांत अतिरिक्त रक्तस्राव कमी होतो म्हणून ते दिवस शस्त्रक्रियांसाठी वापरावे असे डॉ. एडसन अँड्र्यू यांचे मत आहे. (२०) चोरी, उचलेगिरी, आततायी बेदरकार ड्रायव्हिंग, अतिरिक्त नशापान, इ. गुन्हे पौर्णिमेच्या दिवशी अधिक घड़तात, असे अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ क्लायमेटॉलॉजीच्या अहवालात दिले आहे. (२०) जन्मलग्नी शनि-मंगळाशी निगडित असलेल्या व्यक्ती वैद्यकीय व्यवसायात जास्त आढळतात असा डॉ. मायकेल गॉकिलिन यांनी निष्कर्ष नोंदवला आहे. (२६) कर्करोग होण्यापूर्वी शरीराच्या अवयवांच्या विद्युतभारात लक्षणीय बदल घडून येतात असे डॉ. हॅरॉल्ड बर (येल युनिव्हर्सिटी) यांनी जाहीर केले. (३९) संपूर्ण शरीरात एकदिश विद्युत प्रवाह आहे. मात्र चेतासंस्थेतून निघणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरी वेगळ्या आहेत. सजीवाचे विद्युतचुंबकीय क्षेत्र हे एकात्मीभूत कार्यतंत्र आहे आणि सजीवाचा मृत्यू झाल्यानंतर देखील ते काही काळ मागे उरते असे डॉ. एडवर्ड रसेल यांना आढळून आले. (४१) ‘नियतीची संकल्पना’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. हे क्षेत्र म्हणजे तर आत्मा नव्हे ना? पिरॅमिडच्या विशिष्ट रचनेमुळे खाद्यपदार्थ काही काळ तसेच टिकून राहतात. पिरॅमिडच्या आत ठेवलेली विद्युत उपकरणे कोणताही बिघाड न होता बंद पडतात असे डॉ. अमर गोहेड यांना आढळून आले. (५१) गोल, चौकोनी व दंडगोलाकृती डब्यापेक्षा मधे फुगीर असणाऱ्या पिंपात दारू वा बीअर स्वादिष्ट बनते. (५१) बुरशीसारखे सूक्ष्म जीवजंतू व मानवासारखा विकसित गुंतागुंतीचा देह यांच्या अ‍ॅमिनो अ‍ॅसिडस एकाच पद्धतीने निर्माण होतात. निसर्गात आढळणाऱ्या विविध आकृतिबंधांच्या शास्त्राला ‘सायमॅटिक्स’ हे नाव आहे. (५४) कंपनलहरी व त्यांच्या प्रभावामुळे घडवली जाणारी आकृती यांतील कार्यकारणभाव लक्षात घेऊन डॉ. हान्स येनी चांनी टोनोस्कोप हे यंत्र बनवले. ध्वनिलहरींची त्रिमिती आकृती रेखाटणारे हे साधन आहे. (५५) ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more