* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PHYSICS OF THE IMPOSSIBLE
  • Availability : Available
  • Translators : LEENA DAMALE
  • ISBN : 9789353172602
  • Edition : 1
  • Publishing Year : JUNE 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 316
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SCIENCE
  • Sub Category : PHYSICS, CHEMISTRY, BIOLOGY, ZOOLOGY
  • Available in Combos :LEENA DAMALE BIRTHDAY COMBO OFFER
Quantity
Buying Options:
  • Print Books:
A FASCINATING EXPLORATION OF THE SCIENCE OF THE IMPOSSIBLE—FROM DEATH RAYS AND FORCE FIELDS TO INVISIBILITY CLOAKS—REVEALING TO WHAT EXTENT SUCH TECHNOLOGIES MIGHT BE ACHIEVABLE DECADES OR MILLENNIA INTO THE FUTURE. ONE HUNDRED YEARS AGO, SCIENTISTS WOULD HAVE SAID THAT LASERS, TELEVISIONS, AND THE ATOMIC BOMB WERE BEYOND THE REALM OF PHYSICAL POSSIBILITY. IN PHYSICS OF THE IMPOSSIBLE, THE RENOWNED PHYSICIST MICHIO KAKU EXPLORES TO WHAT EXTENT THE TECHNOLOGIES AND DEVICES OF SCIENCE FICTION THAT ARE DEEMED EQUALLY IMPOSSIBLE TODAY MIGHT WELL BECOME COMMONPLACE IN THE FUTURE. FROM TELEPORTATION TO TELEKINESIS, KAKU USES THE WORLD OF SCIENCE FICTION TO EXPLORE THE FUNDAMENTALS—AND THE LIMITS—OF THE LAWS OF PHYSICS AS WE KNOW THEM TODAY. HE RANKS THE IMPOSSIBLE TECHNOLOGIES BY CATEGORIES—CLASS I, II, AND III, DEPENDING ON WHEN THEY MIGHT BE ACHIEVED, WITHIN THE NEXT CENTURY, MILLENNIA, OR PERHAPS NEVER. IN A COMPELLING AND THOUGHT-PROVOKING NARRATIVE, HE EXPLAINS: • HOW THE SCIENCE OF OPTICS AND ELECTROMAGNETISM MAY ONE DAY ENABLE US TO BEND LIGHT AROUND AN OBJECT, LIKE A STREAM FLOWING AROUND A BOULDER, MAKING THE OBJECT INVISIBLE TO OBSERVERS “DOWNSTREAM” • HOW RAMJET ROCKETS, LASER SAILS, ANTIMATTER ENGINES, AND NANOROCKETS MAY ONE DAY TAKE US TO THE NEARBY STARS • HOW TELEPATHY AND PSYCHOKINESIS, ONCE CONSIDERED PSEUDOSCIENCE, MAY ONE DAY BE POSSIBLE USING ADVANCES IN MRI, COMPUTERS, SUPERCONDUCTIVITY, AND NANOTECHNOLOGY • WHY A TIME MACHINE IS APPARENTLY CONSISTENT WITH THE KNOWN LAWS OF QUANTUM PHYSICS, ALTHOUGH IT WOULD TAKE AN UNBELIEVABLY ADVANCED CIVILIZATION TO ACTUALLY BUILD ONE KAKU USES HIS DISCUSSION OF EACH TECHNOLOGY AS A JUMPING-OFF POINT TO EXPLAIN THE SCIENCE BEHIND IT. AN EXTRAORDINARY SCIENTIFIC ADVENTURE, PHYSICS OF THE IMPOSSIBLE TAKES READERS ON AN UNFORGETTABLE, MESMERIZING JOURNEY INTO THE WORLD OF SCIENCE THAT BOTH ENLIGHTENS AND ENTERTAINS.
आज जे तंत्रज्ञान अशक्य वाटतं आहे, ते कदाचित येत्या काही दशकांत अथवा शतकांमध्ये अगदी नेहमीच्या वापरातलं होऊन जाईल, या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित पुस्तक आहे – अशक्य भौतिकी. हे पुस्तक तीन विभागांत विभागलेलं आहे. पहिला भाग आहे, क्लास-१ अशक्यता. ज्यात टेलिपोर्टेशन, अँटिमॅटर इंजिन्स, काही प्रकारची टेलिपथी, सायकोकायनेसिस आणि अदृश्यता यांचा समावेश आहे. हे तंत्रज्ञान असे आहे, जे आज अशक्य वाटत असले; तरी ते भौतिकशास्त्राच्या ज्ञात नियमांचे उल्लंघन करीत नाही. दुसरा भाग आहे क्लास-२ अशक्यता. ज्यात टाइम मशीन, हायपर स्पेस ट्रॅव्हलची शक्यता आणि कृमिविवरातून प्रवास यांचा समावेश आहे. हे तंत्रज्ञान असे आहे; जे या भौतिक जगाच्या आपल्या समजाच्या अगदी काठावर उभे आहे. तिसरा आणि शेवटचा भाग आहे, क्लास-३ अशक्यता. हे तंत्रज्ञान असे आहे, जे आजच्या भौतिकशास्त्राच्या ज्ञात नियमांचे उल्लंघन करणारे आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#अशक्यभौतिकी #मिचिओकाकू #लीनादामले #अदृश्यता #दूरप्रेषण #मनाच्याशक्तीचेप्रयोग #यंत्रमानव #परग्रह #परग्रहवासीआणिUFOS #समांतरविश्वे #कालप्रवास #शाश्वतगतीयंत्र #भविष्यकथन #प्रकाशाचीतलवार #ऊर्जाक्षेत्रे #आयनायूच्याखिडक्या #तोफग्रह #कथारुपीखगोलशास्त्र #अंतरिक्षाच्याअंतरंगात#PHYSICSOFTHEIMPOSSIBLE #INVISIBILITY #TELEPORTATION #TELEPATHI #PSYCHOKINESIS #ROBOTS #EXOPLANETS #EXTRATERESTRIAL-UFOS #ANTIMATTER #ANTIGRAVITY #ANTIUNIVERSE #NULTIVERSES #PARALLELUNIVERSE #TIMETRAVEL #PERPETUALMOTIONMACHINE #PERCOGRITION #LIGHTSABERS #FORCEFIELDS #PLASMAWINDOWS #ANTARIKSHACHYAANTRANAGAT #KATHARUPI KHAGOLSHASTRA
Customer Reviews
  • Rating StarPranav Patil

    भौतिकशास्त्रातील अशक्यतांचा मागोवा भौतिकशास्त्रातील मूलभूत संकल्पना, समीकरणे, सिद्धांत, गृहीतके यांच्या आधाराने अशक्यतेचा विषय लेखकाने आपल्यासमोर मांडला आहे छायाचित्र) कविता भालेराव भौतिकशास्त्रातील सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ मिचिओ काकू यांच्या ‘िजिक्स ऑफ दि इम्पॉसिबल’ या गाजलेल्या इंग्रजी पुस्तकाचा उत्तम अनुवाद खगोल अभ्यासक लीना दामले यांनी केला असून ‘अशक्य भौतिकी’ या शीर्षकाखाली हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात विज्ञानकथांमधील काल्पनिक उच्च तंत्रज्ञान आणि यंत्रे- जी आजच्या काळात अशक्य वाटत आहेत, ती कुठल्या मर्यादेपर्यंत भविष्यात नेहमीच्या रोजच्या वापरातल्या गोष्टी होऊ शकतात, याबाबतचे विवेचन केलेले आहे. सुरुवातीच्या उपोद्घातामध्ये लेखकाने विज्ञानकथा वाचून त्यासंबंधी भौतिकशास्त्राविषयी आपण कसा विचार करू लागलो, याबद्दल लिहिले आहे. प्रो. काकू यांच्या मते, अशक्यता ही सापेक्ष आहे. हे पटवून देण्यासाठी त्यांनी पृथ्वीतलावरून एकाएकी नाहीशा झालेल्या डायनॉसोरचे उदाहरण दिले आहे. एकेकाळी या घटनेचे कारण समजणे अशक्य होते. परंतु कालांतराने पृथ्वीवर पडलेल्या महाकाय उल्केमुळे डायनासोर व इतर बरीच जीवसृष्टी नष्ट झाली, हे वैज्ञानिक सत्य उलगडले. त्याचप्रमाणे आपली गाठ काही दशलक्ष वर्षे जास्त प्रगत असणाऱ्या एखाद्या संस्कृतीशी झाली, तर त्याचे रोजच्या वापरातले तंत्रज्ञान आपल्याला जादूसमान वाटेल का? या प्रश्नाभोवती या पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना गुंफलेली आहे. आज एखादी अशक्य वाटणारी गोष्ट भविष्यात काही शतकानंतर किंवा, काही लाखो वर्षांंनंतरही अशक्यच राहील का? भविष्यातील तंत्रज्ञानाची रूपरेषा काय असेल? कशी असेल? असंभवनीय आणि अशक्य यातील निश्चित फरक काय? अशा विविध प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी लेखकाने अशक्य गोष्टी तीन भागात विभागल्या आहेत. यातील पहिला भाग म्हणजेच क्लास – १ – अशक्यता. यामध्ये भौतिकीतील माहीत असलेल्या नियमांचे उल्लंघन होत नाही आणि हे तंत्रज्ञान या किंवा पुढल्या शतकात शक्य होईल. या भागात ऊर्जा क्षेत्रे, दूरप्रेषण, रोबो, परग्रहवासी, अवकाशयाने, अँटिमॅटर इ. दहा गोष्टींचा समावेश आहे. यातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने तयार होणाऱ्या प्रगत यंत्र मानवांची संख्या तर दिवसेंदिवस वाढतेच आहे. परग्रहवासीयांचा शोध घेण्याचा माणसाचा विलक्षण ध्यास लक्षात घेता लेखकाने विचारलेला ‘खरोखरच आपले भविष्य ताऱ्यांमध्ये दडले आहे का?’ हा प्रश्न भविष्यातील उत्सुकता वाढविण्यास, विचार करण्यास वाचकाला प्रवृत्त करतो. दुसऱ्या भागात आहे क्लास – २ – अशक्यता. यामधील तंत्रज्ञान कधीकाळी शक्य झालेच तर ते काही लाखो वर्षांच्या कालावधीतच शक्य होईल. त्यात टाइम मशीन, कालप्रवास, कृमी विवर, कृष्णविवर यांचा समावेश आहे. अवकाशशास्त्रज्ञ सर मार्टिन रीस यांनी एक ना ‘एक दिवस जीवसृष्टी या आकाशगंगेला व्यापून त्याही पलीकडे पसरेल असं निश्चितपणे वाटते.’ असे म्हंटले आहे. त्यांच्या या आशावादाचा प्रवासच जणू या भागात वाचायला मिळतो. यातील कालप्रवासाची रहस्ये, काळासंबंधीचे तर्क येणाऱ्या भविष्यकाळाविषयीची आपली उत्सुकता वाढविणारे आहेत. तिसरा भाग हा तिसऱ्या प्रतीची अशक्यता दाखवून देतो. यामधील तंत्रज्ञान, आजच्या भौतिकशास्त्राच्या ज्ञात नियमांचे उल्लंघन करणारे आहे. मात्र अशा अशक्यता फारच थोडय़ा आहेत. त्यात शाश्वत गतियंत्र, भविष्यकथन यांचा समावेश केलेला आहे. भौतिकशास्त्रातील मूलभूत संकल्पना, समीकरणे, सिद्धांत, गृहीतके यांच्या आधाराने अशक्यतेचा विषय लेखकाने आपल्यासमोर मांडला आहे. हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विलक्षण प्रवास लिहिण्याची लेखकाची शैली मोहित करणारी आहे. अशा आगळ्यावेगळ्या पुस्तकाचा अनुवाद करण्याचे काम लीना दामले यांनी चांगल्या प्रकारे केले आहे. मात्र अनुवादाबाबत दोन मुख्य मुद्दे आहेत. एक म्हणजे ज्या संकल्पनांना सोपे मराठी शब्द आहेत, ते त्या त्या ठिकाणी कटाक्षाने वारंवार वापरायला हवे होते. उदा. टेलिपोर्टेशनला असलेला दूरप्रेषण हा शब्द! असे कितीतरी शब्द पुस्तकभर सापडतील. दुसरे म्हणजे एकूणच विज्ञान पुस्तके सलग वाचणे अवघड असते. म्हणूनच आवश्यक तिथे चित्रांचा-फोटोंचा समावेश करायला हवा होता. त्यामुळे पुस्तकाच्या रंजकतेत भर पडली असती. या पुस्तकात मिचिओ काकू यांनी भौतिकीतील अशक्य वाटणाऱ्या गोष्टी भविष्यात नव्या प्रगत तंत्रज्ञानाच्या अस्तित्वाने घडू शकतात, हा आशावाद दाखवून दिला आहे. भौतिकशास्त्रातील नवनवी क्षितिजे कायम उलगडतच जाणार आहेत. म्हणूनच मराठी अनुवादाचे ‘अशक्य भौतिकी’ हे नाव दिशाभूल करणारे वाटते. ते सकारात्मकतेकडे झुकणारे असायला हवे होते. विश्व विज्ञानाच्या सरहद्दीपर्यंतचा आपल्या कल्पनाशक्तीच्या मर्यादेपलीकडचा हा प्रवास प्रत्येकाने वाचायला हवा, असाच आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 16-02-2020

    भौतिकशास्त्रातील अशक्यतांचा मागोवा… भौतिकशास्त्रातील सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ मिचिओ काकू यांच्या ‘फिजिक्स ऑफ दि इम्पॉसिबल’ या गाजलेल्या इंग्रजी पुस्तकाचा उत्तम अनुवाद खगोल अभ्यासक लीना दामले यांनी केला असून ‘अशक्य भौतिकी’ या शीर्षकाखाली हे पुस्तक प्रकाित झाले आहे. या पुस्तकात विज्ञानकथांमधील काल्पनिक उच्च तंत्रज्ञान आणि यंत्रे- जी आजच्या काळात अशक्य वाटत आहेत, ती कुठल्या मर्यादेपर्यंत भविष्यात नेहमीच्या रोजच्या वापरातल्या गोष्टी होऊ शकतात, याबाबतचे विवेचन केलेले आहे. सुरुवातीच्या उपोद्घातामध्ये लेखकाने विज्ञानकथा वाचून त्यासंबंधी भौतिकशास्त्राविषयी आपण कसा विचार करू लागलो, याबद्दल लिहिले आहे. प्रो. काकू यांच्या मते, अशक्यता ही सापेक्ष आहे. हे पटवून देण्यासाठी त्यांनी पृथ्वीतलावरून एकाएकी नाहीशा झालेल्या डायनॉसोरचे उदाहरण दिले आहे. एकेकाळी या घटनेचे कारण समजणे अशक्य होते. परंतु कालांतराने पृथ्वीवर पडलेल्या महाकाय उल्केमुळे डायनासोर व इतर बरीच जीवसृष्टी नष्ट झाली, हे वैज्ञानिक सत्य उलगडले. त्याचप्रमाणे आपली गाठ काही दशलक्ष वर्षे जास्त प्रगत असणाऱ्या एखाद्या संस्कृतीशी झाली, तर त्याचे रोजच्या वापरातले तंत्रज्ञान आपल्याला जादूसमान वाटेल का? या प्रश्नाभोवती या पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना गुंफलेली आहे. आज एखादी अशक्य वाटणारी गोष्ट भविष्यात काही शतकानंतर किंवा, काही लाखो वर्षांनंतरही अशक्यच राहील का? भविष्यातील तंत्रज्ञानाची रूपरेषा काय असेल? कशी असेल? असंभवनीय आणि अशक्य यातील निश्चित फरक काय? अशा विविध प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी लेखकाने अशक्य गोष्टी तीन भागात विभागल्या आहेत. यातील पहिला भाग म्हणजेच क्लास – १ – अशक्यता. यामध्ये भौतिकीतील माहीत असलेल्या नियमांचे उल्लंघन होत नाही आणि हे तंत्रज्ञान या किंवा पुढल्या शतकात शक्य होईल. या भागात ऊर्जा क्षेत्रे, दूरप्रेषण, रोबो, परग्रहवासी, अवकाशयाने, अँटिमॅटर इ. दहा गोष्टींचा समावेश आहे. यातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने तयार होणाऱ्या प्रगत यंत्र मानवांची संख्या तर दिवसेंदिवस वाढतेच आहे. परग्रहवासीयांचा शोध घेण्याचा माणसाचा विलक्षण ध्यास लक्षात घेता लेखकाने विचारलेला ‘खरोखरच आपले भविष्य ताऱ्यांमध्ये दडले आहे का?’ हा प्रश्न भविष्यातील उत्सुकता वाढविण्यास, विचार करण्यास वाचकाला प्रवृत्त करतो. दुसऱ्या भागात आहे क्लास – २ – अशक्यता. यामधील तंत्रज्ञान कधीकाळी शक्य झालेच तर ते काही लाखो वर्षांच्या कालावधीतच शक्य होईल. त्यात टाइम मशीन, कालप्रवास, कृमी विवर, कृष्णविवर यांचा समावेश आहे. अवकाशशास्त्रज्ञ सर मार्टिन रीस यांनी एक ना ‘एक दिवस जीवसृष्टी या आकाशगंगेला व्यापून त्याही पलीकडे पसरेल असं निश्चितपणे वाटते.’ असे म्हंटले आहे. त्यांच्या या आशावादाचा प्रवासच जणू या भागात वाचायला मिळतो. यातील कालप्रवासाची रहस्ये, काळासंबंधीचे तर्क येणाऱ्या भविष्यकाळाविषयीची आपली उत्सुकता वाढविणारे आहेत. तिसरा भाग हा तिसऱ्या प्रतीची अशक्यता दाखवून देतो. यामधील तंत्रज्ञान, आजच्या भौतिकशास्त्राच्या ज्ञात नियमांचे उल्लंघन करणारे आहे. मात्र अशा अशक्यता फारच थोडय़ा आहेत. त्यात शाश्वत गतियंत्र, भविष्यकथन यांचा समावेश केलेला आहे. भौतिकशास्त्रातील मूलभूत संकल्पना, समीकरणे, सिद्धांत, गृहीतके यांच्या आधाराने अशक्यतेचा विषय लेखकाने आपल्यासमोर मांडला आहे. हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विलक्षण प्रवास लिहिण्याची लेखकाची शैली मोहित करणारी आहे. अशा आगळ्यावेगळ्या पुस्तकाचा अनुवाद करण्याचे काम लीना दामले यांनी चांगल्या प्रकारे केले आहे. मात्र अनुवादाबाबत दोन मुख्य मुद्दे आहेत. एक म्हणजे ज्या संकल्पनांना सोपे मराठी शब्द आहेत, ते त्या त्या ठिकाणी कटाक्षाने वारंवार वापरायला हवे होते. उदा. टेलिपोर्टेशनला असलेला दूरप्रेषण हा शब्द! असे कितीतरी शब्द पुस्तकभर सापडतील. दुसरे म्हणजे एकूणच विज्ञान पुस्तके सलग वाचणे अवघड असते. म्हणूनच आवश्यक तिथे चित्रांचा-फोटोंचा समावेश करायला हवा होता. त्यामुळे पुस्तकाच्या रंजकतेत भर पडली असती. या पुस्तकात मिचिओ काकू यांनी भौतिकीतील अशक्य वाटणाऱ्या गोष्टी भविष्यात नव्या प्रगत तंत्रज्ञानाच्या अस्तित्वाने घडू शकतात, हा आशावाद दाखवून दिला आहे. भौतिकशास्त्रातील नवनवी क्षितिजे कायम उलगडतच जाणार आहेत. म्हणूनच मराठी अनुवादाचे ‘अशक्य भौतिकी’ हे नाव दिशाभूल करणारे वाटते. ते सकारात्मकतेकडे झुकणारे असायला हवे होते. विश्व विज्ञानाच्या सरहद्दीपर्यंतचा आपल्या कल्पनाशक्तीच्या मर्यादेपलीकडचा हा प्रवास प्रत्येकाने वाचायला हवा, असाच आहे. -कविता भालेराव ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more