* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789353172091
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 220
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE
  • Available in Combos :ATUL KAHATE COMBO SET - 12 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AS MAN GLANCED OVER THE SPACE, HIS CURIOUS MIND INSPIRED HIM TO REACH AND TRAVEL THROUGH THE SPACE. THIS INEVITABLY GAVE RISE TO A NEW ERA, THAT OF SCIENCE AND TECHNOLOGY, A MIRACLE FOREVER. THE PATH FOR THE SAME WAS ALREADY CREATED BY GREAT GENIUS MINDS LIKE COPERNICUS, GALILEO, NEWTON, EINSTEIN AND A FEW OTHERS. THE MID OF THE 20TH CENTURY SAW THIS JOURNEY REACHING ITS HEIGHTS. POST SECOND WORLD WAR, THE COLD WAR BETWEEN THE TWO SUPER POWERS- AMERICA AND SOVIET UNION INTENSIFIED THEIR EFFORTS TO SHOW THEIR COMMAND OVER EVERY AREA INCLUDING SPACE. IT IS VERY DISTURBING TO KNOW THAT DURING HITLER’S NAZI REIGN, THE TECHNOLOGY NEEDED FOR SPACE INVASION WAS DEVELOPED. THE SAID STORY ‘ANTARAL SPARDHA’ – COMPETITION FOR THE SPACE HELPS US TO SOAR HIGH, UP ABOVE THE SKY, REVEALING THE WONDERFUL ‘ANOTHER WORLD’ RIGHT OUT THERE. FAUN BROWN AND KORELIYOVH WERE THE TWO EXTREMELY TALENTED AND PERSUASIVE TECHNICIAN WHO GOT THE GOLDEN OPPORTUNITY TO BE THE PIONEERS OF THIS JOURNEY TO SPACE. THIS STORY SALUTES THEM WHILE THE READERS ENJOY THE EXPEDITION.
अंतराळाकडे कुतूहलानं बघणाऱ्या माणसाला आपण अंतराळात प्रवास करावा असं वाटायला लागलं आणि एक नवं युग सुरू झालं. यासाठीचं विज्ञान आणि तंत्रज्ञान अर्थातच अद्भुत आहे. या सगळ्याची निर्मिती कोपर्निकस, गॅलिलिओ, न्यूटन, आईनस्टाईन यांच्यासारख्या महामानवांनी दाखवून दिलेल्या मार्गावर चालल्यामुळे साध्य झाली असली तरी तिचा कळस विसाव्या शतकाच्या मध्यावर झाला. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यात सुरू झालेल्या शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही महासत्तांमध्ये एकमेकांवर हरप्रकारे कुरघोडी करण्यासाठीची रस्सीखेच सुरू झाली. याचाच एक भाग अंतराळावर हुकमत गाजवण्याचा होता. कहर म्हणजे हिटलरच्या नाझी राजवटीत यासाठीच्या तंत्रज्ञानाची पाळंमुळं रचली गेली, हे ऐकून आपण सर्दच होऊ. अंतराळामध्ये प्रथम जाण्यासंबंधीच्या या स्पर्धेची अत्यंत रोमहर्षक, चित्तथरारक, भारावून सोडणारी आणि वेगळ्याच विश्वात नेणारी कहाणी म्हणजे `अंतराळ स्पर्धा`! फॉन ब्राऊन आणि कोरेलियॉव्ह हे दोघे विलक्षण हुशार आणि अफाट जिद्दीचे तंत्रज्ञ या शर्यतीमधले मुख्य प्रवासी ठरले. त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करणारी ही रंजक सफर खास मराठी वाचकांसाठी!
1.अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघामार्फत दिला जाणारा साल 2019चा विज्ञानविषयक साहित्यातील प्रथम पुरस्कार
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#अंतराळ स्पर्धा#अतुल कहाते# #ANTARAL SPARDHA#ATUL KAHATE#
Customer Reviews
  • Rating StarDainik Samana 4 Aug.2019

    दोन अंतराळशास्त्रज्ञांच्या जिद्दीचं आणि तंत्रज्ञानाचं व्यापक दर्शन आता अंतराळात जाण्यासाठीचं तंत्रज्ञान पुष्कळ अद्ययावत झालं आहे; पण सुरुवातीला अंतराळात उपग्रह आणि मानवाला पाठविण्यासाठी शास्त्रज्ञांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. शास्त्रज्ञांचया त्या अथक परिश्रमांचं सखोल चित्रण अतुल कहाते यांनी त्यांच्या ‘अंतराळ स्पर्धा’ या पुस्तकातून केलं आहे. रॉकेटनिर्मितीचं तंत्रज्ञान, त्याची उपयुक्तता, रॉकेटनिर्मितीच्या बाबतीत आणि त्याद्वारे मानवाला, उपग्रहाला अंतराळात पाठविण्याच्या बाबतीत सोव्हिएत रशिया आणि अमेरिकेमध्ये लागलेली चढाओढ, केवळ राजकीय चढाओढीसाठी काम न करता प्रचंड ध्येयासक्तीतून रॉकेटनिर्मितीमध्ये विविध प्रयोग करणारा रशियाचा कोरेलियॉव्ह आणि मूळ जर्मन असणारा, पण अमेरिकेसाठी काम करणारा फॉन ब्राऊन यांचं रॉकेटनिर्मितीच्या क्षेत्रातील अभूतपूर्व योगदान आणि त्यांना करावा लागलेला पराकोटीचा संघर्ष, अनंत अडचणींचा करावा लागलेला सामना या सगळ्याचं व्यापक दर्शन कहाते या पुस्तकातून घडवतात. दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर जॉन फाऊलरवर जर्मनीसाठी रॉकेटनिर्मिती करण्याची जबाबदारी हिटलरने सोपवलेली असते. रॉकेटद्वारे शत्रूच्या प्रदेशावर बॉम्ब टाकणे किंवा क्षेपणास्त्र डागणे याच उद्देशाने ही रॉकेटनिर्मिती करायची असते; पण केवळ युद्धासाठी रॉकेटनिर्मिती न करता रॉकेट अंतराळात पाठविण्याची फाऊलरची महत्त्वाकांक्षा असते; मात्र त्यासाठी राजकीय वातावरण अनुकूल नसतं. दरम्यान, ही रॉकेटनिर्मिती सुरू असतानाच हिटलरचा मृत्यू होतो आणि जर्मनीत प्रचंड अस्थैर्य निर्माण होतं. रॉकेटनिर्मितीचं तंत्रज्ञान शत्रूराष्ट्रांच्या हातात पडू न देण्यासाठी नाझी सैनिक आपल्याला आणि आपल्या सहकाऱ्यांना ठार मारतील, अशी भीती फाऊलरला वाटते. मोठ्या शिताफीने तो स्वत:ची आणि सहकाऱ्यांची एस. एस. संघटनेच्या तावडीतून सुटका करून घेतो आणि अमेरिकेला शरण जातो. सुरुवातीला अमेरिकेचा विश्वास संपादन करण्यात फाऊलरचा बराच वेळ जातो. शेवटी एकदाची त्याच्यावर रॉकेटनिर्मितीची जबाबदारी सोपविण्यात येते; मात्र अमेरिकेलाही फक्त युद्धासाठीच रॉकेटचा वापर करायचा असतो; पण फाऊलर मनोमन रॉकेट अंतराळात सोडण्याचं स्वप्न बाळगून असतो. इकडे रशियामध्ये सर्गई पावलोविच कोरेलियॉव्ह या रॉकेटशास्त्रज्ञाला, क्रूरकर्मा म्हणून प्रसिद्ध असलेला राष्ट्राध्यक्ष स्टॅलिन देशद्रोहाच्या तथाकथित आरोपावरून छळछावणीत डांबतो. कोरेलियॉव्हलाही अंतराळात रॉकेट पाठविण्याची जबरदस्त महत्त्वाकांक्षा असते; पण छळछावणीत त्याच्यावर इतके अनन्वित अत्याचार होत असतात, की त्याने जगण्याची आशा सोडलेली असते; पण अनपेक्षितपणे त्याची त्या छळछावणीतून सुटका होते आणि त्याच्यावर रॉकेटनिर्मितीची जबाबदारी सोपविण्यात येते. अर्थातच रशियाचा रॉकेटनिर्मितीचा उद्देशही फक्त युद्धापुरताच मर्यादित असतो आणि कोरेलियॉव्ह तरीही अंतराळात रॉकेट पाठविण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून असतो. कोरेलियॉव्ह आणि जॉन फाऊलर यांनी रॉकेटनिर्मितीनंतर ते अंतराळात पाठविण्यासाठी घेतलेल्या विविध चाचण्यांचं आणि त्या दोघांच्याही कर्तृत्वाचं, त्यांच्या भावनिक आंदोलनांचं समांतर चित्रण कहाते यांनी केलं आहे. यातील कोरेलियॉव्हचं प्रसिद्धिपराङ्मुख राहून आपल्या कामाला तन-मन-धनाने वाहून घेणं मनाला स्पर्श करणारं आणि प्रेरणा देणारंही आहे. त्याचबरोबर जॉन फाऊलरचं कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता, आपल्या महत्त्वाकांक्षेला चिकटून राहणंही स्फूर्ती देणारं आहे. मानवाला चंद्रावर पाठविण्याचं कोरेलियॉव्हचं स्वप्न त्याच्या मृत्यूमुळे अपूर्ण राहणं, त्याच्या जिवंतपणी त्याचं कर्तृत्व जगासमोर न आणलं जाणं आणि त्याच्या मृत्यूनंतर ते कर्तृत्व जगासमोर आल्यावर लाखो लाकोंनी त्याचं अंत्यदर्शन घेणं या बाबी मन हेलावून टाकतात. कोरेलियॉव्हचं पत्नीपासून विभक्त होणं, मुलीपासून दूर राहावं लागणं, नंतर अनेक वर्षांनी मुलीला भेटल्यानंतर मुलीने त्याच्याशी मनसोक्त गप्पा मारणं, नीनावर त्याचं प्रेम जडणं आणि तिच्याशी त्याने लग्न करणं या त्याच्या वैयक्तिक जीवनातील घटनांमधून एक माणूस म्हणूनही त्याचं व्यक्तिमत्त्व उलगडत जातं. कोरेलियॉव्ह आणि जॉन फाऊलर यांनी रॉकेटच्या घेतलेल्या विविध चाचण्या, अंतराळवीरांच्या अंतराळात पोचल्यानंतरच्या भावना, चाचण्या घेताना आणि अंतराळवीर अंतराळातून परत येईपर्यंतची अंतराळशास्त्रज्ञाची मन:स्थिती, अंतराळ मोहीम यशस्वी झाल्यानंतर अंतराळशास्त्रज्ञाला होणारा मनस्वी आनंद या सगळ्याचं वर्णन वाचणं हा एक रोमांचकारी अनुभव ठरतो. चाचण्यांदरम्यान काही अतराळवीरांचा, चाचणीसाठी अंतराळात पाठवलेल्या कुत्र्यांचा झालेला मृत्यू, या घटना वाचकाला विषण्ण करतात. तसेच अंतराळवीरांना अंतराळात पाठविताना करावी लागणारी तयारी, अंतराळवीरांना तोंड द्याव्या लागणाऱ्या मुख्य अडचणी, अंतराळवीरांना दिलेल्या सूचनांचं काटेकोर पालन करायला लागणं, अंतराळात संभाव्य समस्यांपेक्षा अन्य काही समस्या उद्भवल्या तर अंतराळवीराला दाखवावं लागणारं धाडस आणि प्रसंगावधान याबद्दल वाचताना या कामातील जोखीम आणि जीवन-मृत्यूच्या सीमेवर असताना सेकंदासेकंदाला असणारं महत्त्व लक्षात येतं. अस्थिर राजकीय परिाqस्थतीमुळे आणि सत्ताधाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे, अहंकारामुळे कोरेलियॉव्ह आणि जॉन फाऊलर यांच्यासारख्या प्रतिभावंतांची कशी गळचेपी होते, याचं विदारक दर्शन या पुस्तकातून घडतं. रॉकेटसंबंधित तंत्रज्ञानाचं अगदी सोप्या भाषेत विवेचन केल्यामुळे आणि त्याला जॉन फाऊलर आणि कोरेलियॉव्ह या दोघांच्या प्रेरणादायक यशोगाथेची साथ मिळाल्यामुळे हे पुस्तक अतिशय रोचक आणि वाचनीय झालं आहे. शिवाय तंत्रज्ञान हा वर्ण्य विषय असूनही मानवातील कौर्य, द्वेष, सूडभावना आणि त्याच्या हळुवार भावभावना याचं संमिश्र चित्र अतिशय सहजतेनं या पुस्तकातून उमटत जातं आणि माणसाचं मन आणि बुद्धी या दोहोंनाही आवाहन करतं. म्हणूनच ते मुळातून वाचावं असं आहे. -अंजली पटवर्धन ...Read more

  • Rating StarDAINIK DIVYA MARATHI 26-05-2019

    आता अंतराळात जाण्यासाठीचं तंत्रज्ञान पुष्कळ अद्ययावत झालं आहे; पण सुरुवातीला अंतराळात उपग्रह आणि मानवाला पाठविण्यासाठी शास्त्रज्ञांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. शास्त्रज्ञांच्या त्या अथक परिश्रमांचं सखोल चित्रण अतुल कहाते यांनी त्यांच्या ‘अंतरा स्पर्धा’ या पुस्तकातून केलं आहे. रॉकेटनिर्मितीचं तंत्रज्ञान, त्याची उपयुक्तता, रॉकेटनिर्मितीच्या बाबतीत आणि त्याद्वारे मानवाला, उपग्रहाला अंतराळात पाठविण्याच्या बाबतीत सोव्हिएत रशिया आणि अमेरिकेमध्ये लागलेली चढाओढ, केवळ राजकीय चढाओढीसाठी काम न करता प्रचंड ध्येयासक्तीतून रॉकेटनिर्मितीमध्ये विविध प्रयोग करणारा रशियाचा कोरेलियॉव्ह आणि मूळ जर्मन असणारा, पण अमेरिकेसाठी काम करणारा फॉन ब्राऊन यांचं रॉकेटनिर्मितीच्या क्षेत्रातील अभूतपूर्व योगदान आणि त्यांना करावा लागलेला पराकोटीचा संघर्ष, अनंत अडचणींचा करावा लागलेला सामना या सगळ्याचं व्यापक दर्शन कहाते या पुस्तकातून घडवतात. रॉकेटसंबंधित तंत्रज्ञानाचं अगदी सोप्या भाषेत विवेचन केल्यामुळे आणि त्याला जॉन फाऊलर आणि कोरेलियॉव्ह या दोघांच्या प्रेरणादायक यशोगाथेची साथ मिळाल्यामुळे हे पुस्तक अतिशय रोचक आणि वाचनीय झालं आहे. ...Read more

  • Rating Starशिरीष भोसले, सांगली

    नुकतेच आपले अंतराळ स्पर्धा पुस्तक झपाट्याने वाचून काढले,आपल्या आधीच्या पुस्तकां प्रमाणेच हेही पुस्तक अगदी सुंदर लिहिलं गेलेले आहे,आपण ज्या पध्दतीने मांडणी केलीत ती वाचताना थक्क व्हायला होते, अशीच नवीन पुस्तके आम्हास वाचायला मिळावोत, आणि नवीन विषय आपाकडून लिहला जावो हीच आपणास शुभेच्छा ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 14-04-2019

    अंतराळविश्वात नेणारी कहाणी... दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोन्ही महासत्तांमध्ये सुरू झालेल्या शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर परस्परांवर कुरघोडी करण्याची त्यांच्यात एक स्पर्धाच सुरू झाली. याचाच एक भाग अंतराळावर हुकुमत गाजवण्याच होता. या स्पर्धेची अत्यंत रोमहर्षक कहाणी अतुल कहाते यांच्या ‘अंतराळ स्पर्धा’ या नव्या पुस्तकातून उलगडत जाते. या शर्यतीमधले फॉन ब्राऊन आणि सर्गई पावलोव कोरेलियॉव्ह हे विलक्षण हुशार आणि जिद्दी तंत्रज्ञ मुख्य प्रवासी ठरले. त्यांच्या कर्तृत्वाची अतिशय रंजक सफर वाचकाला या पुस्तकात वाचायला मिळते. सगळ्या अडचणींवर आणि निराशाजनक परिस्थितींवर मात करत या दोघांनी आपल्यातील जिद्द अभंग ठेवली. आवश्यक तेवढ्याच वैज्ञानिक संकल्पनांच्या आधारे लेखकाने हा प्रवास चितारला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more