* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AAPLYA PURVAJANCHE TANTRADNYAN
  • Availability : Available
  • ISBN : 9788190734424
  • Edition : 6
  • Publishing Year : NOVEMBER 2008
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 244
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE
  • Available in Combos :NIRANJAN GHATE COMBO SET - 17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
BERMUDA TRIANGLE;THE POWER OF PYRAMIDS;ATOM BOMBS;AEROPLANES IN THE TIMES OF THE MAHABHARAT, WHETHER OUR GODS WERE THE PERSONS COMING HERE FROM THE OTHER PLANETS? ARE TYPICAL QUESTIONS DEFINITELY ASKED DURING SCIENCE LECTURES. THE LECTURER TRIES TO REPLY THESE DEFINITE QUESTIONS ACCORDING TO HIS ABILITY AND CAPACITY; HE SAYS ALL THIS IS HUMBUG. HOWEVER, WHATEVER HE HAS READ IS USELESS, HE DARE NOT ADMIT. AFTER 1965, BOOKS MENTIONING THAT MOST OF THE SCIENCE THAT WE SEE AND EXPERIENCE TODAY WAS INVENTED AND DISCOVERED LONG BEFORE BY OUR ANCESTORS. THE BOOK BY GEORGE ADANSKI CONTAINS ALL THE TOPICS MENTIONED ABOVE. PEOPLE WHO BELIEVE IN THESE BOOKS, ARE NOT READY TO BELIEVE IN THOSE WHO ARE ACTUALLY DOING DEEP RESEARCH IN THIS FIELD. THEY ARE STUDYING THE THINGS THAT ARE FOUND IN THE EXCAVATION VERY CAREFULLY. SO, REALLY SPEAKING, WE SHOULD BELIEVE IN THESE SCHOLARS (EGYPTOLOGISTS, ARCHEOLOGISTS, POLYETOLOGISTS ETC;), AS THEY HAVE EVIDENCES AND PROOFS. HOW AND WHY? ALL THIS IS INCLUDED IN THE TWO BOOKS UNDER REVIEW VIZ. `OUR ANCESTORS AND THEIR SCIENCE` AND `OUR ANCESTORS AND THEIR TECHNOLOGY` WRITTEN BY SHRI. NIRANJAN GHATE. SHRI. GHATE IS A WRITER NOT ONLY IN MARATHI BUT ALSO IN ENGLISH. A POST GRADUATE (M.SC. GEOLOGY) OF PUNE UNIVERSITY, HE HAS LOT OF PROFESSIONAL EXPERIENCE OF BEING AN EDITOR OF ABOUT 10 SCIENTIFIC WELL KNOWN MAGAZINES. HE HAS BEEN A MEMBER / ADVISOR TO MANY GOVT. EDUCATIONAL INSTITUTES AND AIR, PUNE CENTER. HE HAS BEEN AWARDED MANY AWARDS BY SCIENTIFIC AND GOVT. AGENCIES. OUT OF HIS 97 BOOKS, 28 BOOKS HAVE BEEN PUBLISHED BY MEHTA PUBLISHING HOUSE, PUNE. HIS TWO BOOKS MENTIONED ABOVE ARE GOOD EVIDENCE OF HIS SCHOLARLY KNOWLEDGE. IT SEEMS THAT HE HAS TAKEN STRENUOUS EFFORTS FOR EVERYTHING. SOME OF THE TOPICS COVERED IN THE BOOKS ARE : § PLASTIC SURGERY AND BRAIN SURGERY § METHODS OF ANASTHARIA ANESTHESIA § ARTIFICIAL TEETH & OTHER ORGANS § APPLIANCES FOR FAMILY PLANNING § PERSONAL HYGIENE § THE JOURNEY OF FLORA AND FAUNA § KINDS OF GREEK SPORTS § GREEK MATCH FIXING § ANCIENT RELATION BETWEEN INDIA AND AFRICA § WHO ARRIVED IN AMERICA FIRST? § OMAR KHAYYAM AN ANCIENT ASTRONOMER § ARBERUNI THE OTHER BOOK ABOUT ANCIENT TECHNOLOGY IS ALSO WORTH READING. THE CAREFUL READING OF THESE TWO BOOKS LEAVES US AMAZED! MAY HE CONTINUE WRITING EXCELLENT BOOKS.
माहितीतंत्रज्ञान हा शब्द परवलीचा बनलेलं आजचं युग आणि आधुनिक अभियांत्रिकी कमाल दर्शविणारी तंत्रज्ञानाची नानाविध रूपं ही द्योतक आहेत, पूर्वजांच्या अनुभवसिद्ध ज्ञानाची, प्रयोगशीलतेची आजघडीचा तंत्रज्ञानाचा हा अफाट डोलारा साकारलाच तो पूर्वजांच्या अगाध प्राचीन तंत्रज्ञानाच्या भक्कम पायावर काळाच्या ओघात, मानवजातीच्या जडणघडणीत लोप पावलेल्या, नामशेष झालेल्या या प्राचीन तंत्रज्ञानाची ही ओळख...
फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्सतर्फे उत्कृष्ट पुस्तक निर्मिती पुरस्कार २००९
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#NIRANJAN GHATE #JYACHKARAVBHALA #PARYAVARANPRADUSHAN #MARATHIBOOKS #VEDHPARYAVARNACHA #DNYANDEEP #FARFARVARSHAPURVI #ROBOTFIXING #DNYANDEEP#NIRANJAN GHATE# #ज्ञानदीप#निरंजन घाटे##SWAPNACHOURYA#ज्याचंकरावंभलं #निरंजन घाटे #कथासंग्रह #एकाप्रकरणाचीसुरुवात #ज्याचंकरावंभलं #आणखीएकविकेट #जीनचेमाप #आमचाज्ञानेश्वर #एकामहादेवाचीकृपा #शेवटचाहप्ता #उद्योजक #अनूचाराजा #अनंतानावाचीवल्ली #बाळ्या #डायव्हर्शननिबाळासाहेब #व्यवहारी #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #JYACHAKARAVABHALA #NIRANJANGHATE #EKAPRAKANACHISURUVAT #AANKHIEKWICKET #JEENCHEMAP #AAMCHADNYANESHWAR #EKAMAHADEVACHIKRIPA #SHEVATACHAHAPTA #UDYOJAK #ANUCHA RAJA #ANANTANAVACHIVALLI #BALYA #DIAVARTIONNIBALASAHEB #VYAVHARI #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarSaurabh Kulkarni

    Marathitalya sarvotkrusht pustakanpaiki ek.

  • Rating StarDAINIK SAKAL 11-1-2009

    इराकमध्ये उरुक येथे शिलालेखांमध्ये इसवीसनपूर्व ३००० पूर्वीची काही चित्रे सापडली होती. घसरगाडीपासून चाकांची गाडी कशी तयार झाली, तो प्रवास या चित्रांमधून समजतो. `होकायंत्राचा वापर` या प्रकरणात चीनमधील चमचा-थाळी या गमतीदार होकायंत्राचा सचित्र उल्लेख आहे या यंत्राला `सिनाम` असे नाव होते. इसवीसन पूर्व चौथ्या शतकात हे होकायंत्र चीनमध्ये वापरले जात असे. `दिशादर्शनास मदत करणारे यंत्र` असे त्याचे वणेन केले जाई. `विमाने, बलून आणि हवाई उड्डाण` या प्रकरणात भारद्वाज ऋषींचा संदर्भ आहे. वेदांतील यंत्रांचे उल्लेख एकत्र करून भारद्वाजांनी लिहिलेल्या `यन्त्र सर्वस्व` या ग्रंथात विमानांविषयीचे प्रकरण आहे. पूर्वसुरींनी विमानविषयक केलेल्या कामांची नोंद त्यात आहे. नारायणमुनी, शौनक, गर्ग, वाचस्पती, चाक्रायणी, व्योमयानयंत्र, यंत्रकल्प, यानविन्दु, खेट्यान, प्रदीपिका, व्योमयानार्क प्रकाश आदींच्या ग्रंथांचा त्यात समावेश असल्याची माहिती या पुस्तकातून मिळते. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 26-4-2009

    `विज्ञानाचा ऐतिहासिक ठेवा` मानवी जीवनाशी निगडित असलेल्या विज्ञानाच्या अनेक क्षेत्रांचा परामर्श या पुस्तकात घेण्यात आला आहे. यामध्ये वैद्यकीय उपचार, सौंदर्यसाधना, शिवणकाम/फॅशन, उद्यानशास्त्र, प्राणिसंग्रहालये, खेळ यांसारख्या अनेक क्षेत्रांचा समावेशआहे. विज्ञानाचा हा जो इतिहास उलगडत गेला तो आर्किऑलॉजी (पुरातत्व) आणि पॉलिएंटॉलॉजीच्या (पुराजीवशास्त्र) अभ्यासकांनी केलेल्या उत्खननातून पुढे आलेलया पुराव्यांतून! सर्व जगभरात झालेल्या उत्खननातून हेच लक्षात येतं की एखाद्या कृतीमागचे वैज्ञानिक तत्त्व माहीत नसतानादेखील मानवाच्या पूर्वजांनी केलेली प्रगती आपल्याला थक्क करणारी आहे. पुस्तकातील सुरुवातीची प्रकरणे वैद्यक आणि मानवी आरोग्याशी संबंधित आहेत. त्यामध्ये रुग्णांचे औषधोपचार, रुग्णालये, शस्त्रक्रिया, शस्त्रक्रियेची उपकरणे, प्राचीन औषधे, औषधांचे बाजार, कुटुंबनियोजन व कुटुंबनियोजनाची साधने यांसारख्या विषयांचा समावेश आहे. हजारो वर्षांपूर्वीदेखील वैद्यकशास्त्र किती प्रगत होते याची जाणीव आपल्याला ही प्रकरणे वाचत असताना होत जाते. प्लॅस्टिक सर्जरीतील ‘पेडिकल फ्लॅप’ या नावाने ओळखला जाणाऱ्या तंत्राच्या सूचना भारतीय वैद्यकशास्त्राचा जनक सुश्रुत याने आपल्या ग्रंथात त्यातील बारकाव्यांसह सांगितलेल्या आढळतात. प्राचीन भारतीय वैद्यकात ‘ऱ्हिनोप्लॅस्टी’ या आधुनिक तंत्राचा वापरही आढळतो. अगदी उत्तर अश्मयुगीन काळातही कवटी उघडून मेंदूवर यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया पार पाडल्यानंतर एक व्यक्ती जगल्याचा पुरावाही आहे. आजच्या शल्यशास्त्रज्ञांना हेवा वाटेल इतकी उत्कृष्ट वैद्यकीय हत्यारे त्या काळी वापरली जात. प्राचीन काळात अद्ययावत रुग्णालये तर होतीच, त्याचबरोबर कृत्रिम दात, कृत्रिम अवयव, कुटुंबनियोजन यांसारख्या विषयातील तज्ज्ञदेखील इ.स.पूर्व काळात कार्यरत होते. सौंदर्यसाधनेत, प्रसाधन करण्यात, विविध प्रकारचे केसांचे टोप वापरण्यात प्राचीन काळातील स्त्रिया–पुरुष वाकबगार होते. मेसापोटेमियात चार हजार वर्षांपूर्वी साबण वापरला जात होता असे पुरावे आहेत. त्याच सुमारास धातूच्या आरशांच्या जोडीलाच काचेचे आरसे करण्याची कला खूपच विकसित झाली होती. नखे वाढविणे, रंगविणे, चेहरा गोरा दिसण्यासाठी शिशाची संयुगे वापरणे स्त्रियांमध्ये प्रचलित होते. वैयक्तिक स्वच्छता आणि सौंदर्य याविषयी रोमन साम्राज्यातील सर्वसामान्य नागरिकसुद्धा खूप काळजी घेत. दागिने करणे व ते वापरणे याबाबतीत प्राचीन काळातील लोक चांगलेच पुढारलेले होते. मौल्यवान दागिन्यांची नक्कल करून नकली दागिने, नकली रत्ने सर्रास वापरली जात. एवढेच नाही तर त्या काळातील जवाहिर्यांना वेगवेगळ्या हलक्या धातूंवर सोन्याचा मुलामा कसा द्यावा, याचंही तंत्र ठाऊक होतं. याच काळात वस्त्र विणण्याची कलाही विकसित झाली होती. त्या त्या हवामानात योग्य असे वस्त्रांचे प्रकार मानवाने निर्माण केले. सुमारे बावीस हजार वर्षांपूर्वी माणूस नेढं असलेल्या सुया वापरत असे. तागापासून, कापसापासून कापड विणले जात असे. इ.स.पू. ३००० च्या आसपास रेशीम उत्पादनासाठी रेशीमकिडे पाळले जात असलयाचे पुरावे उपलब्ध आहेत. वस्त्रांच्या बरोबरच फॅशनचीही सुरुवात झाली. बिकिनीची फॅशन दोन हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात होती यावर आपला आज विश्वास बसणार नाही. वनस्पतीशास्त्राचादेखील तेव्हा पद्धतशीर अभ्यास झाला होता. प्राचीन काळात उद्यानशास्त्र अतिशय प्रगत असल्याचे दाखले मिळतात. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी रोमचं वैभव तिथल्या विविध प्रकारच्या बगीच्यांमध्ये मोजलं जात होतं. या बागा अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने निर्माण केल्या जात. ‘झाडे लावा, देश वाचवा’ ही घोषणाही प्राचीन काळातलीच! प्राणिसंग्रहालयेही प्राचीन काळापासून अस्तित्वात होती. प्राणी पाळले जात होते, तशीच प्राण्यांसाठी राखीव अरण्येही होती. विविध प्रकारचे खेळ, त्यांच्या स्पर्धा यांचा उगमही इ.स. पूर्व काळातीलच! चष्मे, छत्र्या, तंबाखू याही आपल्याला मिळालेल्या पुरातनकालीन देणग्याच आहेत. तर असा हा उत्खननशास्त्र आणि पुरातनशास्त्राच्या साहाय्याने सिद्ध झालेल्या अतिशय रंजक आणि ज्ञानात भर घालणारा असा विज्ञानाचा इतिहास! इतिहास हा फक्त राजे, युद्ध, सनावळ्यांचा नसतो तर प्रत्येक विषयाच्या मागे पूर्वजांचे जे संशोधन व कर्तृत्व असते त्याचाही असतो. हा विज्ञानाचा इतिहास आपल्यापुढे या पुस्तकाद्वारे सहज उलगडत जातो. एरवी बऱ्याच जणंना कंटाळवाणा वाटणारा ‘इतिहास’ हा विषय अगदी वेगळ्या स्वरूपात आपल्यासमोर येतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यातील प्रत्येक लेखाला दिलेली उत्तम चित्रांची आणि सुस्पष्ट रेखाटनांची जोड. उदा. सुश्रुताने वर्णन केलेलया नाकाच्या प्लॅस्टिक सर्जरीची रेखाचित्रे, आरशात बघून ओठ रंगविणाऱ्या इजिप्शियन युवतीचे रेखाचित्र. या चित्रांतील रेखांकनामुळे लेखकाला जे सांगावयाचे आहे त्या माहितीचे आकलन वाचकाला अगदी सहजपणे होते. विविध विषयांच्या विभागवार मांडणीमुळे वाचनाची लयही चांगली सांभाळली गेली आहे. उत्कृष्ट छपाई, चंद्रमोहन कुलकर्णींचे विषयाला अनुरूप असे आकर्षक मुखपृष्ठ ही पुस्तकाची आणखी एक जमेची बाजू. दर्जेदार प्रकाशनासाठी प्रसिद्ध असलेल्या मेहता प्रकाशनाने साप्ताहिक मार्मिकमधील निरंजन घाटे यांची ही वाचकप्रिय लेखमाला पुस्तकरूपाने प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद! मार्मिकमधील निरंजन घाटे यांची ही लेखमाला न वाचलेल्या वाचकांना या पुस्तकामुळे वेगळ्याच वाचनानंदाचा लाभ होईल! ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 29-8-2010

    माहिती तंत्रज्ञान हा आज परवलीचा शब्द आहे पण याची सुरुवात साडेचार हजार वर्षांपूर्वी झाली. मानवी संस्कृतीत एक काळ असा होता की एका गावाची माहिती दुसऱ्या गावाला जात तेव्हा ही माहिती जाई. पण सांगणारा त्यात मालमसाला भरत असे. उत्खननानंतर समोर आलेल्या चिजा थ्क करतात. त्या काळात मानवी संस्कृतीची ही केन्द्रे बहुतेक सर्वत्र सारखीच होती, मध्यभागी देवळे, त्याभोवती वस्ती, बाहेर तटबंदी, तटबंदीच्या बाहेरून संपत्ती यायची. कधी ती गाई, बैल, शेळ्या, मेंढ्या, तर कधी धान्याच्या स्वरूपात. हिशोबात गोंधळ नको म्हणून विशिष्ट वजनाची चांदीची वळी वापरत. १ चांदीचे वळे • २शेळ्या • १ बुधला मध, चांदीची दोन वळी • सवत्स गाय, असा हिशोब. या हिशोबातूनच त्या काळातील माहिती तंत्रज्ञान जन्माला आहे. मालाच्या भावबदलांची नोंद, उधारी हे सर्व चिखलाच्या चौकोनी अशा तुकड्यात खुणा करून ठेवत. त्यातून भौमितिक लिपी जन्मली.विशिष्ट खुणांना विशिष्ट अर्थ येताच भाषेचे प्रमाणीकरण झाले. त्यामुळे वेगवेगळ्या भूभागातून शहरात येणाऱ्याना आता ही शहरी भाषा शिक्षण त्यातली माहिती पोचवणे, हिशोब ठेवणे या गोष्टींची माहिती करून घेणे आवश्यक झाले. ही माहिती ओल्या विटांवर कोरली जाई. ती आज साडेचार हजार वर्षांनीही उपलब्ध आहे. या विटालेखात रोजचे हिशोब, विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके, धार्मिक आज्ञा, व्यवहारविषयक कायदे, गणित सोडविण्याच्या पद्धती असे मानवी व्यवहारांचे दर्शन घडते. दळणवळण, रस्ते, जलमार्ग, नकाशे, जहाजे, किल्ले व शस्त्रे, तटबंदी-रणगाडे, युद्धसाधने-धरण-कालवे-शेतीची अवजारे यांची माहिती वाचकाला खिळवते. पूर्वजांनी असंख्य भव्य आणि भक्कम बांधकामे हजारो वर्षे टिकली. या काळात ही बांधकामे कशी केली? हे आपण करून बघावे, असे काही मंडळींना वाटले आणि बीबीसीने त्यांना आर्थिक मदत केली. या प्रकल्पात मूळ आराखडे आणि चाचण्या करताना सर्व आधुनिक तंत्रे वापरण्यात आली. या प्रकल्पात आपले पूर्वज किती बुद्धिमान होते, हे लक्षात आले. आजचे युग, आधुनिक अभियांत्रिकी, कमाल दर्शविणारी तंत्रज्ञानाची रूपे ही पूर्वजांच्या अनुभवसिद्ध ज्ञानाची व प्रयोगशीलतेची द्योतके आहेत. पूर्वजांच्या भक्कम पायावर आजच्या तंत्रज्ञानाचा डोलारा उभा आहे. काळाच्या ओघात लोप पावलेल्या या प्राचीन तंत्रज्ञानाची ओळख आकर्षक शैलीत देऊन निरंजन घाटे यांनी फार मोठी कामगिरी बजावली आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more