* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KHELANI VIDNYANACHI
  • Availability : Available
  • ISBN : 9788184980516
  • Edition : 5
  • Publishing Year : OCTOBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 112
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE
  • Available in Combos :D.S.ITOKAR COMBO SET-13 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MR. ITOKAR HAS DEVELOPED AND DESIGNED THIS BOOK ESPECIALLY TO TRAIN THE YOUNG MINDS IN THE FIELD OF SCIENCE AND TO MAKE THEM AWARE OF THE VARIOUS THEORIES OF SCIENCE IN A STRESS FREE ENVIRONMENT. IT IS REALLY GOING TO BE A WONDERFUL EXPERIMENT FOR THE KIDS TO DESIGN ALMOST 50 SCIENTIFIC TOYS ALL BY THEMSELVES AND TO ENJOY PLAYING WITH THEM. THIS WILL NOT ONLY ENTERTAIN THEM BUT ALSO INTRODUCE THEM TO THE VARIOUS ASPECTS OF SCIENCE. A FEW TO NAME ARE: JELLY FISH IN THE WATER, THE BOAT RUNNING ON THE WATER SURFACE, THE FLOATING FISH, SAFE SIPHON, THE GROWING BUBBLES, THE DOLL IN WATER, PARROT IN THE CAGE, PLANTS TURN TOWARDS SUNLIGHT, JUMPING SPRING, THE FUNNY JOKER, HELICOPTER, HOT AIR IS LIGHT, TORCH RUNNING ON KEROSENE, ELECTRICAL IMAGES, JUMPING BALLOON, THE HONEYBEE, THE ROUND FOUNTAIN OF WATER, THE PHASES OF MOON, AND SO ON.
अगदी हसत खेळत व ताण-तणाव बाजूला ठेवून मुलांना विज्ञानाचे शिक्षण देता देता विज्ञानातले सिद्धांतही माहित करून देण्याच्या उद्देशाने श्री. डी.एस.इटोकर यांनी या पुस्तकाची रचना केली आहे. विज्ञानविषयक सुमारे पन्नास खेळणी स्वतः तयार करून त्यांच्याबरोबर खेळणे व मित्रांना दाखविणे यात मुलांना आनंद तर मिळेलच, पण त्याचबरोबर त्यांच्या विज्ञानविषयक ज्ञानात भर पडून विज्ञानाची अभिरुचीही वृद्धिंगत होईल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #KHELANIVIDNYANACHI #KHELANIVIDNYANACHI #खेळणीविज्ञानाची #SCIENCE #MARATHI #D.S.ITOKAR #डी.एस.इटोकर "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKSATTA 4-4-10

    विद्यार्थ्यांना किंवा घरातील मुलाला विज्ञानाची गोडी लावायची असेल तर विज्ञानातील गंमत त्याला समजली पाहिजे. साहजिकच प्रयोगातून विज्ञान ज्यावेळी मुलांना अनुभवण्यास मिळेल त्यावेळी त्याची विज्ञानातील गोडी आपोआपच वाढेल. डी.एस. इटोकर यांनी `खेळणी विजञानाची’ या पुस्तकातून विद्यार्थ्याला विज्ञानाची ओळख हसत-खेळत करुन देण्याची गुरुकिल्ली दिली आहे. ताणतणाव बाजूला ठेवून विज्ञानाचे शिक्षण तसेच विज्ञानातले सिद्धांत माहित करुन देण्याच्या उद्देशाने इटोकर यांनी पुस्तकाची रचना केली आहे. विज्ञानविषयक सुमारे ५० वर खेळणी स्वत: तयार करुन त्याच्याबरोबर खेळणे हा मुलांना विशेष आनंद देणारा भाग असतो. पुस्तकातील प्रयोग आणि खेळणी मुलांना नक्कीच आवडणारी आहेत. पाणी, हवा, ध्वनी, प्रकाश, चुंबकत्व, विद्युत आणि इतर अशा विभागातून ही खेळणी विभागली आहेत. पाण्यासंदर्भातील विविध सिध्दांत, जलदाबाचे यंत्र, पाणतराजू त्याचबरोबर पाण्यात तरंगणारा मासा या खेळण्यातून पाण्याचे गुणधर्म मुलांना सहज माहित होतात. हेलिकॉप्टर, गंमतीदार विदूषक, ध्वनीचा प्रवास, दृष्टीसातत्य, पळणारी गाडी, जिन्याचे वायरिंग, फॅरेडेचा प्रयोग तसेच दूर पळणारे मणी यातून विज्ञानविषयक मूलभूत सिध्दांत मुलांना सहज समजतात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more