* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GARBHASANSKAR
  • Availability : Available
  • ISBN : 9788177668988
  • Edition : 18
  • Publishing Year : DECEMBER 2007
  • Weight : 100.00 gms
  • Pages : 148
  • Language : MARATHI
  • Category : PREGNANCY AND CHILD CARE
  • Available in Combos :MOTHERS DAY COMBO OFFER
    MOTHERS DAY COMBO SET-2
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
`GARBHASANSKAR` IS ACTUALLY CODE OF CONDUCT FOR A PREGNANT WOMAN AS DESCRIBED IN `AYURVEDA`. THIS BOOK PRESENTS THE AUTHOR`S GUIDELINES ABOUT EVERY MINUTE ASPECT IN A PREGNANT WOMAN`S LIFE. DR. BORKAR HAS STUDIED THIS SUBJECT IN DETAILS BEFORE PUTTING IT INTO WORDS. SHE GUIDES ABOUT THE DIET, THE LIFE-STYLE, THE THOUGHT PROCESS OF A PREGNANT LADY. THIS BOOK ALSO TELLS US ABOUT THE SPECIFIC MEDICINES THAT A PREGNANT LADY SHOULD TAKE DURING EACH MONTH OF HER PREGNANCY FOR AN OVERALL BETTER GROWTH OF THE CHILD. TODAY`S WORLD IS OF NUCLEAR FAMILIES. THIS BOOK WILL SURELY HELP AS A PREGNANCY GUIDE TO THE WOULD BE MOMS AND DADS AND ALSO WHO HAVE ALREADY PLANNED THEIR FAMILIES.
‘गर्भसंस्कार’ म्हणजे आयुर्वेदशास्त्राच्या आधारे वर्णन केलेली गर्भवती स्त्रीसाठीची आचारसंहिता (CODE OF CONDUCT) आहे. गर्भवती स्त्रीचा आहार-आचार-विचार यासंबंधीचे मार्गदर्शन, तसेच गर्भाच्या प्रत्येक महिन्याच्या वाढीनुसार व उत्कृष्ट अवयवनिर्मितीसाठी गर्भशास्त्रात सांगितलेली औषधे इत्यादींचा या पुस्तकात समावेश आहे. डॉ. गौरी बोरकर यांचे गर्भसंस्कारविषयक संशोधन पुस्तकरूपाने येत आहे. आजच्या ‘हम दो हमारे दो’ विंÂवा ‘हमारा एक’च्या जमान्यात हे पुस्तक PREGNANCY GUIDE उल्ग् म्हणून नक्कीच उपयुक्त ठरेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #GARBHASANSKAR #GARBHASANSKAR #गर्भसंस्कार #HEALTHCARE&PSYCHOLOGY #MARATHI #GAURIBORKAR #गौरीबोरकर "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKSATTA 12-01-2008

    आई-बाप घडविणारे पुस्तक... ‘गर्भसंस्कार’ हे पुस्तकाचं नाव आणि लेखिका डॉ. गौरी बोरकर एवढं पाहिलं की गरोदर स्त्रियांना मार्गदर्शन करणारं हे पुस्तक आहे, हे कळतंच. विवाहित मध्यमवर्गीय मराठी तरुणींच्या डोळ्यांसमोरून लगेचच या विषयावरील अनेक सदरं, मासिक सापताहिकांतले लेख, क्वचित एक-दोन पुस्तकंही तरळून जातात अनुकूल पूर्वग्रह आणि वाचनाचा पूर्वांनुभव मनात ठेवून पुस्तक उघडल्यावर मात्र चांगल्या अर्थाने अपेक्षाभंग होतो. कारण गर्भावर संस्कार कसे करावेत, हे सांगण्यापुरतंच या पुस्तकाचं प्रयोजन नाही, तर सुजाण आई-बाप आणि आरोग्यपूर्ण कुटुंब घडवणारं हे पुस्तक आहे, हे त्याच्या पाना-पानांतून उलगडत जातं. बऱ्याच वाचकांना या डॉक्टर लेखिका यापूर्वी वर्तमानपत्री लिखाणातून भेटलेल्या आहेत. त्यामुळे त्या केवळ आजार, आहार आणि औषधाविषयीच सांगत नाहीत, जीवशैलीही घडवतात, हे आपल्याला माहीत आहेच. एका वाक्यात सांगायचं तर ‘गर्भसंस्कार : उद्याच्या बुद्धिमान व आरोग्यसंपन्न संततीसाठी’ हे पुस्तक बाळ आणि आई-बाप घडवणारं पुस्तक आहे. अपत्योत्सुक जोडप्याची आचारसंहिता कशी असावी, हे आयुर्वेदाशास्त्राच्या आधारे या पुस्तकात सांगितलेलं आहे. स्थळं पाहून किंवा प्रेमात पडून लग्न होतं तेव्हा प्रथम ते नवविवाहित पती-पत्नी परस्परांच्या चालीरीती, स्वभाव, नोकरी-व्यवसायातील प्राध्यान्यक्रम समजून घेण्यात व्यग्र होतात. दरम्यान, नव्या पाहुण्याची चाहूल लागते आणि आणखी काही समजून घेण्याचंही बाकी राहिलंय, असं त्यांना अस्पष्टपणे जाणवतं. ते नेमकं स्पष्ट करतं- ‘गर्भसंस्कार’, आपण सुशिक्षित असलो, विविध प्रकारचं वाचत, ऐकत, पाहत असलो, तरी आणखीही कितीतरी गोष्टी समजून घेणं बाकी आहेत, हे समजावून सांगतं हे पुस्तक! नवा जीवन जन्माला येण्याआधी पती व पत्नी दोघानीही शरीर व मन योग्य स्थितीत राखलं पाहिजे. याबाबत काय पावलं उचलावीत, शरीर-मनाचं आरोग्य कसं ओळखावं, हे सुरुवातीलाच विशद केलं आहे. गर्भधारणेसाठी आपली पूर्वतयारी झाली आहे, हे पक्कं झाल्यानंतर जोडप्याला त्यानुसार नियोजन करता येईल. प्रत्यक्ष गर्भधारणेसाठी काय काळजी घ्यावी, इथपासून गर्भवती स्त्रीचा आहार-विहार, गर्भाच्या वाढीचे दर महिन्यांतील टप्पे आणि त्या टप्प्यांतील दुखणी, वैशिष्ट्ये, बारकावे इथपर्यंत वैद्यकीय अंगाने या पुस्तकात विस्तृत चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर संशोधित औषधे, आयुर्वेदोक्त औषधे, प्राणायाम, योगासने याबाबतही मार्गदर्शन केलेले आहे. गर्भवतीच आहार व आचरणातून पोटातल्या बाळावर एक प्रकारे संस्कार होतच असतात, त्याचबरोबर जाणीवपूर्वक संवाद साधून संस्कार कसे करता येतात, हेही यातून समजतं. प्रसतीपूर्व काळजी, सुलभ प्रसूती, प्रसूतीपश्चात घ्यावयाची काळजी याविषयीही वाचकांशी संवाद साधत लेखिकेने मार्गदर्शन केलं आहे. गर्भावरचे संस्कार या ठिकाणी पूर्ण होत नाहीत, तर अर्भकाच्या जन्मानंतरही त्याला दिसामाने वाढवताना पावलोपावली संस्कार आवश्यक असतात. शैशवाचा टप्पा पूर्ण होईपर्यंत त्याच्यावर संस्कार कसे करावेत, ते किती महत्त्वाचे आहेत, हे डॉ. बोरकर यांनी समजावलं आहे. ओघवती भाषा आणि सुटसुटीत प्रकरणे हे पुस्तकाचं वैशिष्ट्य. त्या-त्या प्रकरणातील महत्त्वाचा मजकूर प्रकरणाच्या शेवटी तक्त्याच्या रूपात देऊन तो ‘एका नजरेत’ समजावून घेण्याची सोय लेखिकेने केली आहे. त्यामुळे पुस्तकाची मांडणी साधी असली, तरी ते अत्यं उपयुक्त झाले आहे. संस्कृतप्रचुर शब्दांचा वापर टाळून (उदा. शीर्षके इ.) भाषेत आणखी सोपेपणा आणणे शक्य होते व त्यायोगे वाचकांच्या अधिक जवळ जाता आले असते. आज स्पर्धा हा परवलीचा शब्द झालेला असताना या धकाधकीच्या आयुष्यक्रमात थोडं थांबून आपल्याला काय हवं आहे, याचा मनाशी विचार करायला हे पुस्तक उद्युक्त करतं. एकाच अपत्यानंतर कुटुंबाचा आकार मर्यादित करण्याच्या आजच्या काळात त्या अपत्याकडून आई-वडिलांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. अपत्य सर्वगुणसंपन्न असावं आणि त्याचे सगळे गुण झळाळून समोर यावेत म्हणून त्यांचं आरोग्यही उत्तम असावं, असं पालकांना वाटतं. अशा परिस्थितीत आपलंही काही कर्तव्य आहे हे त्यांना जाणवलेलं नसतं. अशा पालकांना सावध करत हे पुस्तक सांगतं की, शाळेत जाणाऱ्या मुलांकडून स्पर्धेत टिकण्याची अपेक्षा करण्याअगोदर अनेक वर्षे आपण त्याकरता आवश्यक ती मशागत करायला हवी. अर्थात हे सारं आपल्या धर्मात, शास्त्रांत प्राचीन काळीच सांगून ठेवलेलं आहे. पुस्तकावर अभिप्राय देणाऱ्या डॉक्टरांनी- हे पुस्तक तरुणांनी लग्नापूर्वीच वाचावं, असं सुचविलं आहे. एकत्र कुटुंबपद्धती विरत चालल्यामुळे वडिलधाऱ्यांचे मार्गदर्शन अलभ्य होत असताना एका आश्वासक, अनुभवी स्नेह्याची भूमिकाही हे पुस्तक पार पाडतं. गैरसमज व अनाठायी गंड दूर करून ते गर्भवतीला धीर देतं, तसेच भावी पित्याला त्याच्या कर्तव्यांची जाणीव करून देतं. डॉ. बोरकर यांची अभ्यासू वृत्ती आणि समाजाला आपल्या परीने चांगलं देण्याची तळमळ पानोपानी जाणवत राहते. वाचकाच्या मनात आशादायक चित्र तयार करण्यात हे पुस्तक त्यामुळे यशस्वी होतं. -सुलेखा नलिनी नागेश ...Read more

  • Rating Stardr shalini kamble

    I read many books related to GARBHASANSKAR, but this book by Dr. Gauri Borkar is really authentic and scientific.

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more

RUCHIRA BHAG -2
RUCHIRA BHAG -2 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more