* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHEN RUCHIRA WAS PUBLISHED THERE WERE MANY WHO HAD SENT THEIR VIEWS ABOUT THIS BOOK; ONE OF THE BOOK HAD DESCRIBED KAMALABAI AS THE MOTHER INLAW WITH 1,25,000 DAUGTERSINLAW, THIS IS TRUE AS ALREADY SO MANY COPIES OF RUCHIRA HAVE BEEN SOLD. THROUGH THIS BOOK, SHE HAS TURNED THE NEWLY MARRIED GIRLS INTO EXPERT COOKS. THIS IS THE ONLY BOOK WHICH HAVE BEEN SOLD IN LAC. KAMLABAI WAS BORN AND BROUGHT UP IN VILLAGE KUNDAL IN DANDEKAR FAMILY. SHE STUDIED TILL 4TH STANDARD. SHE WAS MARRIED INTO OGALE FAMILY AT SANGLI. SHE STARTED TAKING LESSONS IN COOKERY UNDER THE ABLE GUIDANCE OF HER MOTHERIN LAW. SHE ALWAYS NURTURED THE ATTITUDE TO BE A PERFECTIONIST WHILE LEARNING A NEW DISH. SHE NEVER ALLOWED HER MORALE TO BE DOWN DURING THE PROCESS OF COOKING AND MASTERING A FOOD ITEM. SHE DID NOT JUST CONCENTRATE ON COOKING, SHE GAVE EQUAL IMPORTANCE TO PRESENTING THE ITEM WITH STYLE. HER HUSBAND`S JOB TOOK HER TO MUMBAI WHERE SHE SETTLED DOWN. MUMBAI GAVE A WIDE SCOPE TO HER COOKING SKILLS. SHE PARTICIPATED IN MANY COMPETITIONS AND WON MANY AWARDS FOR BEST DISHES AND BEST PRESENTATION. THIS GAVE HER A BOOST. SHE STARTED COOKERY CLASSES. SHE CONDUCTED CLASSES AT VARIOUS PLACES IN MAHARASTHRA. MANY LADIES WERE BENEFITTED BY HER CLASSES. SHE WAS A GUIDE AT THE S.N.D.T. UNIVERSITY IN MUMBAI. SHE CROSSED THE BOUNDARIES OF THIS NATION, SHE REACHED AUSTRALIA, THERE ALSO SHE CONDUCTED HER CLASSES. SHE WAS FELICITATED AT `ONE ARTIST: ONE EVENING` IN MUMBAI, ALONG WITH OTHER 100 UNIQUE PERSONALITIES. SHE HAS COME INTO DIRECT CONTACT THROUGH RADIO AND TELEVISION WITH MANY HOUSEWIVES. `RUCHIRA` HAS MADE HER FAMILIAR IN EVERY HOUSEHOLD. THE MARATHI PUSTAK PARISHAD HAS FELICITATED HER FOR THE TREMENDOUS SALE OF THIS BOOK. RUCHIRA IS THE HIGHEST PEAK OF HER EXPERIENCE, KNOWLEDGE AND STUDIES.
`रुचिरा` या पुस्तकावर प्रसिद्ध झालेल्या एका अभिप्रायामध्ये श्रीमती कमलाबाईंचे वर्णन ` सव्वा लाख सुनांची सासू` असे केलेले होते आणि ते सार्थही आहे. १,२५,००० पेक्षा अधिक प्रतींचा विक्रमी खप झालेल्या या एकमेव मराठी ग्रंथाच्या लेखिका यांनी खरोखरीच सव्वा लाख महिलांना सुगरण बनवलेले आहे, हे आता प्रकट सत्य आहे. कमलाबाईंचे बालपण दांडेकर घराण्यात कुंडलसारख्या खेडेगावात गेले. त्यांचे शिक्षण जेमतेम प्राथमिक इयत्ता चौथीपर्यंत झाले. विवाह होऊन त्या सांगलीच्या ओगले यांच्या घरात आल्या. आपल्या पाककलानिपुण सासूबाईकडून त्यांनी पाककलेचे धडे घेण्यास सुरुवात केली. नवनवीन पदार्थ शिकवावेत, एखादा पदार्थ बिघडला, मनाजोगता झाला नाही, तर खंत करत न बसता पुन्हापुन्हा तो अधिक चांगल्या रीतीने करून पाहावा, अशी वृत्ती कमलाबाईनी बाळगली पाककलेच्या आवडीबरोबरच त्यांना इतर कला अवगत होत्या. त्यामुळे चवदार पदार्थाना रंगतदार सजावटीची आणि कलात्मक मांडणीची जोड मिळाली.

No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #MARATHI RECIPE BOOK #KAMALABAIOGALE
Customer Reviews
  • Rating StarShweta Tadphale

    रुचिरा हे पाककला शास्त्राचे पुस्तक माहीत नाही असा कोणी महाराष्ट्रात तरी नसेल. स्वयंपाकाचे अगदी प्राथमिक धडे इथूनच सुरू करायचे.पहिला गुरु आई ,जिच्या हाताखाली वरकामे करून बघून आपण शिकतो.आणि नंतर साक्षात अन्नपूर्णा,कमलाबाई ओगले. प्रत्येक मराठी घरात रुचरा हे पुस्तक असते. मला आठवतंय मी वाचायला काहीच नाही म्हणून आईनी नवीनच आणलेलं हे पुस्तक टाईमपास जाणून वाचायला घेतले होते.सहज आणि सोपे पदार्थ, पारंपरिक पदार्थ अगदीच सध्या भाषेतही वरण भात ते केक पर्यंत,मस्त गाईड .सध्या घरातील वाटीचे आणि चमचा हे प्रमाण. ह्या पद्धतीने पदार्थ खूप परफेक्ट व्हायचा. मी तर लग्नात मुलींना हेच भेट द्यायचे . आज त्यांची आठवण येतेय कारण त्यांचे पुण्यस्मरण दिवस आज आहे.त्यावेळी असे धाडसी पुस्तक आणि त्याच्या अनेक वेळा झालेल्या आवृत्त्या हेच त्यांचे यश सांगतात. मी व माझ्यासारख्या अनेक जणींना सुगरण बनवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ...Read more

  • Rating StarRama Khatavkar

    या दोनही पुस्तकांचा परिचय द्यायची खरंतर काही गरजच नाहीये. छापिल स्वरुपात आहेत, म्हणून पुस्तकं म्हणायचं, नाही तर स्वयंपाकघरात प्रयोग करणार्या प्रत्येकाला आपली आई, आजी, किंवा जवळचं कुणीतरी आधाराचं असल्यासारखं वाटतं, ही पुस्तकं घरात असली की. २८ ्या वर आवृत्या निघाल्यात. कै. कमलाबाईंची प्रस्तावना पण खूप छान आहे. त्यांनी आपल्या सासूबाईंकडून हे सगळं शिकून घेतलं. प्रत्येक पदार्थ स्वतः बनवून, चविष्ट आणि आरोग्यपूर्ण होण्यासाठी त्यात बदल करून प्रमाणं ठरवून, मगच पुस्तकात समाविष्ट केला आहे. विशेषतः पहिला भाग जास्त उपयोगी वाटतो. रोजच्या वापरातले खास मराठी वळणाचे पदार्थ , यात साध्या भाताच्या प्रकारांपासून वरण, आमट्या, भाज्या, असं सगळं आहे. जसं सांगीतलंय, अगदी तसंच करत गेलं , तर हमखास यशाची खात्रीच. स्वयंपाकघरात वावरण्याची सवय नसलेल्या नवविवाहितांना याचा उपयोग होतोच, पण अनुभवी सुगरणींना देखील यात दरवेळी काहीतरी नवीन सापडतेच. अगदी स्वयंपाकघराची नव्याने ओळख झालेल्या पुरुषांनाही यांचा आधार वाटेल. साठवणीचे पदार्थ, मधल्या वेळचे पदार्थ, मुरांबे, लोणची, अन्य प्रादेशिक पदार्थ , पक्वान्ने, उपासाचे पदार्थ असे वेगवेगळे विभाग यात आहेत. भाषा साधी, सोपी, सहज कळेल अशी. मापासाठी वाटी आणि चमचा ही व्यावहारिक साधनेच आहेत. त्यामुळे दीड इंच आलं, किंवा इतके ग्रॕम रवा,असला काटेकोरपणा नाही. हे पुस्तक मी फाटेपर्यंत वापरलं, नंतर बाईंडिंग करुन वापरलं. माझ्या आईला पण यातले खूप संदर्भ उपयोगी पडले. आता माझ्या सुनांना पण कमलाबाईंचा आधार आहे. बाजारात पाककलेची असंख्य पुस्तके उपलब्ध आहेत, पण यासम हेच. ...Read more

  • Rating StarZee Marathi

    आणि काय हवं ... प्रिया बापट `रूचिरा` बघून पुरणपोळ्या करते ... २९/०४/२०२० 👇

  • Rating StarEKATA - APRIL 2019

    स्वयंपाक घरातील नंदादीप : रुचिरा... जातीच्या सुंदरींना काहीही शोभते. पण मूळच्या सौंदर्याबरोबरच चांगल्या वस्त्रप्रावरणांची आणि अलंकाराची जोड मिळाली तर सौंदर्यात अधिक भर पडते. हे जसं खरं आहे. त्याचप्रमाणे ‘स्वयंपाकघर’ महिलेचं हक्काचं स्थान तेही शास्त्शुद्ध असलं पाहिजे. ‘सगळ्या पदार्थांनी, सोयींनी युक्त असावं.’ ही वाक्य वाचताना मनाशी म्हटलं की देवघराप्रमाणेच स्वयंपाकघराचं स्थान आहे. ही वरील वाक्य ‘रुचिरा’च्या लेखिका कमलाताई ओगले यांच्या प्रस्तावनेतील आहेत. जीवनातील आवश्यक अशा घटकातील महत्त्व जाणून ‘रुचिरा’ हे पुस्तक कमलाताईंनी लिहिलं १९७० पासून २०१४ पर्यंत त्याच्या ४२ आवृत्त्या निघाल्या. लाखो प्रतींच्या खपानंतर आजही त्याला तेवढीच मागणी आहे. सतत प्रती संपतात आणि प्रकाशकांना फोन येतात. पाककला ही नवीन नाही पण वाचनाची आवड असणाऱ्यांना कोरंकरकरीत रुचिरा दिसल्यास पूर्ण वाचून बाजूला ठेवण्याव्यतिरिक्त गत्यंतर नाही. असे वाटते. नुकतेच खूप वर्षांनी हे पुस्तक ग्रंथच म्हणा हवंतर. माझ्या नजरेसमोर आला आणि पूर्ण फडशा पाडून बाजूला ठेवला. चिंतन करावे असाच विषय वाटला. तसं हे पुस्तक आणि कमलाताई ओगले कोणालाच नवीन नाहीत, पण ट्रंकेतील पैठणी किंवा लग्नातील शालू दिसला तर पटकन बाजूला ठेवला जात नाही. ४०-५० वर्षांपूर्वी नव्या सुनांना परदेशी जाणाऱ्या मुला-मुलींना हे पुस्तक म्हणजे वरदान होते. फोडणी कशी करावी? इथपासून मसाल्याची ओळख, भाज्या, कोशिंबिरी-चटण्या, वडे, फराळाचे पदार्थ वाटी चमच्याच्या अंदाजाने तसेच विविध मापाने कसे घ्यायचे हे विस्तारितपणे त्यात लिहिले आहे. सासूबाईंच्या शिकवणीमुळे मार्गदशनामुळे बाराव्या वर्षी लग्न करून आलेल्या कमलाताईंनी स्वयंपाकाच्या विषयात खूप प्रगती केली. हाताला चव असल्याने प्रत्येक पदार्थाची गोडी रुचकर असे. लाखो सुनांनी सासू म्हणून त्यांना गौरविले आहे. चौथी शिकलेल्या कुंडल (किर्लोस्करवाडी) येथून आलेल्या या महिलेने अतोनात प्रगती केली. नवीन सुनांना सुखी स्वयंपाकाचा कानमंत्र दिला आणि कुटुंब सुखी समाधानी झाले. आपले पाककलेतील ज्ञान पुस्तक रूपाने प्रसिद्ध केल्यास आपल्या अनुभवाची शिदोरी सर्वांनाच देता येईल हा विचार करून पुस्तकप्रपंच केला, असं त्यांनी लिहिलंय आणि त्यांच्या एवढ्या आवृत्त्या, लाखोंवर गेलेला खप हे काही त्यावेळी ध्यानी नव्हते. सांगली, बेळगांव, जळगांव, मुंबई, पुणे अशा विविध ठिकाणी पतीच्या बदलीमुळे राहावे लागले. त्यामुळे विविध ठिकाणी त्यांना प्रोत्साहन मिळत होते. मुंबईच्या वनिता समाजमध्ये दरवर्षी बक्षिसे मिळवत त्याच ठिकाणी कार्यकारिणीवर सुद्धा त्यांनी पद गाजविले. सासऱ्यांच्या आग्रहामुळं सांगलीच्या राणीबरोबर बॅडमिंटन ब्रिज खेळण्याची संधी मिळाली. धडाडीचा स्वभाव असल्यामुळे सतत काहीतरी नवीन करावे असा ध्यास होता. महिलांना स्वयंपाकाचे धडे देत क्लासेस घेणे, परदेशात क्लासेस घेणे, व्याख्याने देणे, असे करीत त्यातून मिळालेला पैसा स्वा. सावरकरांच्या निधीला त्या देत असत. टीव्हीवर पहिली मुलाखत देताना कुटुंबात सगळ्यांना वाटत होते त्या काय बोलतील? पहिलीच मुलाखत यशस्वी झाली. ऑस्ट्रेलियातील त्यांचे चिरंजीव श्री. अरुण ओगले व सून रोहिणी ओगले यांच्याकडून त्यांची बरीच माहिती मिळाली. सिडनी येथे त्यांनी महिलांना पाककलेबाबत खूप छान व्याख्यान दिले, की महिला आजही त्यांनी सांगितल्याप्रमाणे पदार्थ तयार करतात. आईच्या हाताला प्रचंड चव होती. त्यामुळे काही केले तरी आम्हा सगळ्यांना ते खूप आवडायचे असे श्री. ओगले सांगतात. पुस्तक प्रपंच करताना सामाजिक भानही त्यांना होते. विविध संस्थांना त्या मदत करीत होत्या. घरातून पती, थोरले चिरंजीव विश्वनाथ आणि दोन्ही सुना त्यांच्या सासूबाई या सगळ्यांचे माझ्या यशात खूप मोठे स्थान आहे. असंही कमलाताईंनी प्रस्तावनेत नमूद केलेले आहे. भाषेचं शुद्धीकरण त्याची व्यवस्था कुटुंबातील प्रत्येकाने केली आहे. हे त्या आग्रहपूर्वक सांगतात. किर्लोस्कर प्रकाशनातर्फे प्रथम बऱ्याच आवृत्त्या प्रकाशित झाल्यानंतर आता बरीच वर्षे पुण्यातील नामवंत अशा ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’कडे ही प्रकाशनाची धुरा आहे आणि आजही यशस्वीरीत्या त्याचे काम आनंदपूर्वक होत आहे. मसाले - फोडणीपासून विविध प्रकारच्या विविध पद्धतीने भाज्या, उसळी, कोशिंबिरी, पोळ्या, वड्या, लाडू यांची प्राथमिक तयारीपासून यात माहिती दिली आहे. महाराष्ट्रीय बंगाली, पंजाबी, कर्नाटकी, कोकणी या सर्व प्रांतांच्या पदार्थांची माहिती दिली आहे. पान वाढताना कसे वाढावे? पदार्थांचे सुशोभिकरण कसे करावे? विडा कसा बांधवा? किती प्रकारची पाने करता येतात. खमंग सुपारी-मसाला सुपारी-मुखशुद्धी ही साधी दिसणारी पण महत्त्वाची गोष्ट याबाबत खुलासेवार माहिती आहे. कृतीची माहिती खुलासेवर दिली आहे. संसार सुखी व्हावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. खवय्या असलेल्या नवऱ्याला, मुलांना चांगला स्वयंपाक करून सुखी करण्यासाठी ‘रुचिरा’ हे मार्गदर्शक आहे. ट्विटर, फेसबुक, व्हाट्सअप या सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाने लोकांना माहिती मिळते पण ज्ञानेश्वरी, श्यामची आई, गड आला पण सिंह गेला, या ग्रंथाच्या लाखो प्रतींच्या खपांप्रमाणेच हे ‘रुचिरा’ त्याच रांगेत असावे ही वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. – मनिषा लोणकर ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHASAMRAT RANKHAINDAL
MAHASAMRAT RANKHAINDAL by VISHWAS PATIL Rating Star
गंधार

नमस्ते सर, काल रात्री मी रणखैनदळ मध्ये आपण लिहलेला पावनखिंडीतील थरार वाचून काढला. कालची रात्र मी कधीच विसरणार नाही. जणू काही मीच महाराजांसोबत प्रवास करणारा एक मावळा आहे. महाराज थकल्यावर त्यांच्या तळपायांना राईचं तेल चोळून देतो आहे, त्यांच्यासह नाचणीच भाकर खातो आहे असं मला वाटतं होतं. सर, एखाद्या लहान मुलाला आकाशातल्या तारका दाखवाव्यात त्याचप्रमाणे आपण इतिहासाच्या नभांगणातील असंख्य तारकांचं दर्शन घडवून आणता आणि छत्रपती शिवराय हा अर्थातच ताऱ्यांमधील तारा असा ध्रुवतारा आहे ज्याचं अनोखं असं दर्शन महासम्राट मधून घडतंय. सर, माझी केवळ मागच्या जन्मीची पुण्याई म्हणून मी आपल्याला भेटू शकलो. ...Read more

FOUR SEASONS
FOUR SEASONS by SHARMILA PHADKE Rating Star
लोकसत्ता १०.९.२०२३ (लोकरंग) वंदना बोकील-कुलकर्णी

माणसांवाचून रिकामी गावं, रस्ते, घरं न पाहवणारी, अंजनमाळावरच्या नागदेवीच्या कातळावर रणरण उन्हात सर्वागाने उन्हं पिऊन घेणारी, आपली उन्हात तापून दग्ध तांबूस झालेली देहाकृती व्हिन्सेंटने (व्हान गॉग) पाहावी आत्ता या क्षणी आणि तिच्या मोहात पडून त्यानेती आपल्या कॅनव्हासवर रेखाटावी असं आसुसून वाटणारी एक अतिसंवेदनशील तरुणी कामायनी ही शर्मिला फडके यांच्या ‘फोर सीझन्स’ या कादंबरीची नायिका. या नायिकेची चार प्रदेशात, चार ऋतूंमध्ये, चार पुरुषांच्या सहवासात घडणारी कहाणी म्हणून तिचं शीर्षक ‘फोर सीझन्स’. ‘फोर सीझन्स’ ही खऱ्या अर्थाने आत्ताची कादंबरी आहे. कदाचित पहिली ब्लॉग कादंबरी. कारण लेखिकेने कादंबरीच्या नायिकेच्या नावाने ‘टय़ुलिप्स अॅण्ड ट्वायलाइट’ या ब्लॉगवर पोस्ट्स लिहिल्या. ‘कादंबरीने बऱ्यापैकी आकार घेतल्यावर, व्यक्तिरेखा सुस्पष्ट झाल्यावर’ मग हा ब्लॉग तिने बंद केला. ‘ब्लॉग अर्काइव्हमध्ये जमा झालेल्या शेकडो पोस्ट्सवरून मॅपिंग करत’ कादंबरीचा आत्ताचा आकार तिने सिद्ध केला. हिची निर्मितीप्रक्रिया आत्ताच्या तंत्रसाहाय्याने, समाजमाध्यमांचा शहाणा उपयोग करून घेऊन झाली आहे. या अर्थाने ही आत्ताची कादंबरी. अलीकडे म्हणजे साधारण गेल्या दहा वर्षांत नव्याने लिहू लागलेल्या लेखकांत हिरिरीने आपली भूमिकावाहक पात्रे निर्माण करण्याची जी वृत्ती दिसते तिच्यात न अडकता आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहत आणि तरी कथनात्म साहित्याच्या मागण्या नीट कळून घेत लेखन करणाऱ्यांमध्ये शर्मिला फडके ही लेखिका लक्ष वेधून घेते. मोजके लेखन आहे तिचे पण खरेच लक्षात राहणारे. गेल्या पाच-सहा वर्षांत विविध दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झालेल्या तिच्या कथा पाहिल्या तरी हे पटेल. ‘ये शहर बडा पुराना है’ ही कथा वाचकांना ताबडतोब आठवेल. याशिवाय विविध ठिकाणी कलाइतिहास, कलासमीक्षा, प्रवास याही विषयांवर तिचे लेखन सातत्याने चालू आहे. तिचे मूळ शिक्षण वनस्पतीशास्त्र या विषयातलं. नंतर पत्रकारिता आणि कलाइतिहास यांचेही पदव्युत्तर शिक्षण तिने घेतले. ही तिन्ही क्षेत्रं भटकंतीला पूरक. शर्मिला फडके यांना प्रवासाचीही आवड आहे. फॅशनेबल पर्यटन नव्हे, प्रवास. खरीखुरी हवा, माती, झाडंझुडं, पाणी, नद्या अंगावर घेत केलेला प्रवास. आणि हे करताना त्यांच्या संवेदना तल्लखपणे आजूबाजू टिपून घेत असतात. त्यामुळे त्यांच्या लेखनाचे विषय अनोखे आणि साहजिकपणे त्यांच्या अभ्यासविषयाशी आतून नातं सांगणारे असले तरी आजूबाजूला असलेलं वातावरण, सामाजिक-सांस्कृतिक घडामोडी यांचं भान असलेल्या एका डोळस कलाप्रेमी स्त्रीचं अनुभवविश्व त्यातून आकाराला येतं. ‘फोर सिझन्स’ ही त्यांची कादंबरी लेखक म्हणून त्यांचे जे वृत्तिविशेष आहेत त्यांचा प्रत्यय देणारी आहे. स्त्रियांनी लिहायचे ते खास त्यांच्याच रूढ अनुभवविश्वाविषयी असा जणू पायंडा पडलेला असताना ही लेखिका मात्र अशा विश्वाचा पसारा मांडते की जे खरंच अनवट आहे. या कथनाची नायिका कामायनी मुंबई, सुंदरबन, युरोप आणि माळरान अशा भूप्रदेशांमध्ये काही काळ वावरते. नुसती वावरत नाही तर जिवेभावे तिथे गुंतते. चार भूप्रदेश, तिथे भेटलेले चार पुरुष- तेही भिन्न विचारसरणीचे, प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे, त्यांच्या विचारांचा खोलवर परिणाम होऊन कच्च्या वयापासून वैचारिक, भावनिक आणि मानसिक गोंधळात वाढत गेलेली ही तीव्र बुद्धिमत्ता आणि कमालीची संवेदनशील असणारी मुलगी. मुंबईमध्ये वडिलांच्या वयाचा त्यांचा मित्र आणि तिला अगदी जन्मापासून ओळखणारा तिचा पालक म्हणावा असा जोसेफ, अनिर्बन बॅनर्जीच्या प्रभावाखाली सुंदरबनात दाखल, पण तिथे मनासारखे काहीच घडत नाही. उलट प्रेमात आणि कामात अपयश घेऊन पळून येणं. मग काही काळ पुन्हा मुंबई. मग जोसेफ तिला युरोपात पाठवतो. तिथे भेटतो इटालियन एरिक. तिथेही तेच घडते. विझून गेलेली, हरलेली आणि आत्मविश्वास गमावून बसलेली ती पुन्हा मुंबईत जोसेफच्या वळचणीला येते. तो तिला एक काम देऊन अंजनमाळ या माळरानावर पाठवतो. तिथे भेटतो विहान. माणूस आहे तिथे मतं आणि मतभेद आहेत, गुंतणं-गाठी बसणं आहे, संघर्ष तर आहेतच. पण या माळरानावर तेवढी ती तिची आहे. ती माळरानाच्याच प्रेमात पडते. कादंबरीत पात्रे म्हणाल तर कामायनीचे आईबाबा, त्यांच्याच बंगल्याच्या दुसऱ्या भागात राहणारे बानिदा, इरादी बॅनर्जी आणि त्यांचा मुलगा अनिर्बन, जोसेफ, एरिक, माळरानावर संशोधन करणारा विहान आणि त्याचे काका आस्ताद, रघु, मधोक हे मित्र आणि ती जिथे काम करते तिथले श्रीरंजन, निर्मल, नाडकर्णी वगैरे सहकारी. गेस्ट हाऊसची राखण करणारे राणू व लाखी आणि दहाबारा वर्षांची त्यांची मुलगी मणी. मरून गेलेली मार्गारेट फिलीप ग्रॅहम ही वनस्पतींची अभ्यासक, तिच्याशी एकनिष्ठ असलेला येशा हा तिचा मदतनीस पोरगा- ज्याची आता शंभरी उलटून गेली आहे. बस्स. माणसांचा आणि त्यांच्या नात्यांचा मोठा पसारा नाही मांडत लेखिका. या सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात जिवंत आहे तो निसर्ग. तोही तुमच्या आमच्या नेहमीच्या सवयीचा, चकचकीत, कॅमेरा किंवा तत्सदृश शब्दांतून दिसणारा, जणू काय आपलं मनोरंजन करण्याच्या डय़ुटीवर नेमलेला नव्हे. इथे त्याची जिवंत स्पंदनं आपल्याला जाणवतात. आपण उन्हात तापतो, आपल्याला उन्हाचा खरपूस वास येऊ लागतो. आपण सुंदरबनातल्या काळय़ा पाण्यात आणि दलदलीत पाय टाकायला कचरतो.. हा असा साक्षात अनुभव लेखिका तुम्हाला देते. अतिशय वैशिष्टय़पूर्ण रचना आहे या कादंबरीची. कधी प्रथमपुरुषी निवेदन, कधी तृतीयपुरुषी. कधी दैनंदिनीतल्या नोंदी. कधी नायिकेने स्वत:शीच केलेले विचार, कधी तिला पडणारी स्वप्नं तर कधी मार्गारेटच्या दैनंदिनीतल्या नोंदी. मुख्य प्रकरणं चार. ऋतू पहिला, ऋतू दुसरा.. अशा शीर्षकांची. त्यात उपशीर्षके असलेले लहान लहान परिच्छेद. कदाचित आधी ब्लॉग लिहून मग त्यातून कादंबरीचे कथानक रचल्यामुळे असेल, पण ही रचना एकाच वेळी अनेक पातळय़ांवर फिरते. त्यामुळे अनेक दिशीय, अनेक स्तरीय वास्तवाचा अनुभव वाचतावाचता येत राहतो. कादंबरीच्या आशयाशी इतकं थेट संलग्न असलेलं विविध पातळय़ांवर फिरणारं निवेदनतंत्र वाचकांच्या सवयीचे नाही. पण एकदा का तुम्ही या नायिकेबरोबर तिच्या पावलांनी चालू लागलात की.. आणि तसे चालताच तुम्ही.. की मात्र या निवेदनाची जादू आणि गंमत समजते. नायिकेची गोष्ट कधी ती सांगते तर कधी निवेदिका सांगते. निवेदनतंत्र इतक्या ताकदीने वापरणं आणि ते ‘वापरलं आहे’ याची जाणीव होऊ न देणं, यात या कादंबरीचं बरंच यश सामावलं आहे. उत्तम भाषाशैली आणि प्रतिमांचा फार नेमका वापर यांचाही त्यात वाटा आहेच. नायिका जशी जगते आहे, निसर्गाच्या चक्रातून स्वत:चे आयुष्य समजून घेते आहे तसं हे लेखन आहे. आखीव नाही, असं वाटणारं. तिची नजर जाते तो तो निसर्गाचा आविष्कार ती सांगते. नायिकेच्या रंग, गंध आणि स्पर्शाच्या संवेदना विशेष तल्लख आहेत. त्यामुळे तिच्या वर्णनांत चित्रकाराच्या पॅलेटवरचे रंग आणि त्यांच्या अगणित छटा येत-जात राहतात. व्हान गॉग, मोने वगैरे चित्रकारांच्या चित्रांचे संदर्भ येतात. सुंदरबन आणि युरोपातल्या आठवणी त्यात आपले धागे मिसळत राहतात. ती मनातले गोंधळ उघड करते. ते गोंधळ का निर्माण झाले, याचा वाचकांच्या साक्षीने शोध घेते. पहिल्याच मोठय़ा प्रकरणात आता लेखिका हे सारे कसे सोडवणार, म्हणून उत्सुकता आणि काळजीही वाटते कारण सरधोपट निवेदनाचा रस्ता तिने सोडून दिला आहे. या कादंबरीत आहे तसं रखरख माळरान कुणी कधी शब्दांतून क्वचितच मांडलं असेल. उन्हाच्या सुया डोळय़ांत घुसत असताना ही एका आंतरिक हट्टानं तिथे राहते. जगते. त्या उन्हात तिच्या आतले बर्फाचे गोठलेले प्रदेश वितळून वहाते होतात. तिची ती तिला सापडत जाते. ज्या प्रश्नांपासून ती पळत होती, त्या प्रश्नांना भिडण्याचे बळ ते ऊन तिला देते. अवघ्या तीस वर्षांच्या तिच्या आयुष्यात झालेले गुंते, गाठी हळूहळू सुटत जातात, सुरुवातीची ‘टय़ुलिपचे फूल वाटणारी ती अखेरीस एखादे रानफूल वाटू लागते.’ त्या प्रवासाची ही कहाणी आहे. या नायिकेला मिथक, लोककथा, झाडं-पानं-फुलं-पक्षी या सगळय़ांत रस आहे. नागदेवीच्या कातळाची कहाणी, आदिवासी तिथे करत असलेले विधी समजून घेण्याचा तिचा प्रयत्न आहे. राणू, त्याचा शंभरी पार केलेला वृद्ध बाप येशा, यांच्याशी संवाद साधण्याची, त्यांच्याकडून जुनी घटितं जाणून घेण्याची आणि ते ठिपके जोडत सलग चित्र पूर्ण करण्याची तिला निकड वाटते. मणी तर तिची छोटी मैत्रीण होऊन जाते. या कादंबरीच्या गाभ्याकडे अनेक वाटांनी जावं लागतं.. नायिकेच्या आई-वडिलांचं नातं विस्कटलेलं असणं, तिचं आईशिवाय मोठ होणं, वडिलांनी कामात बुडवून घेणं, अडनिडय़ा वयातल्या एकटेपणात बॅनर्जीकडे रमणं, त्यांच्या तरुण मुलाच्या प्रेमात पडणं. बाबांना दुखवायचं म्हणून वडीलधारेपण निभावणाऱ्या जोसेफकडे ओढा वाढणं, तरी त्याला जे नको वाटतं तेच तिनं निवडणं, अनिर्बनकडे जाणं. मग तिथून पळून युरोपात. तिथे एरिकच्या प्रेमात पडणं, करियरची वाट लागून, पूर्ण खचून मुंबई- पुन्हा जोसेफ आणि मग माळरान. हा सगळा प्रवास एका स्तरावर आहे. दुसऱ्या पातळीवर, माणसाचा जागतिक स्तरावरचा वावर, त्याला भेटणारी विविध देशीविदेशी माणसं, परदेशातील वास्तव्याची संधी, त्यामुळे होणारी भावनिक-शारीरिक जवळीक, त्यातून निर्माण होणाऱ्या वैयक्तिक जीवनातल्या समस्या आहेत. तिसऱ्या पातळीवर पर्यावरण आणि विकास यासंबंधीचे असंख्य स्थूल-सूक्ष्म धागे आहेत. नायिका जाहिरात क्षेत्रात करियर असणारी. ते क्षेत्र आणि पर्यावरण कायम विरोधी गटात. दोन्ही बाजू जनसामान्यांची करत असलेली अशुद्ध दिशाभूल, विस्थापितांचे पुनर्वसनाचे प्रश्न, ‘विस्थापितांचा प्रश्न केवळ जमिनी गमावण्याचा नसतो, तो मुळं उखडलं जाण्याचा असतो’, याविषयी असणारी कमालीची असंवेदनशीलता, प्रश्नांचा समग्र विचार न करता एकेका सुटय़ा घटकांचा विचार करून योजलेले तात्कालिक उपाय, हत्ती आणि सहा आंधळय़ांच्या प्राचीन गोष्टीतून आपण काहीच शिकलो नसल्याची चरचरीत जाणीव.. हे सगळं ही कादंबरी स्वत:त गुंफून घेते. म्हणजेच कालसमांतर आशय ती आपल्या पदरात घालते. नायिका ज्या जाहिरात क्षेत्रात काम करतेय तिथे येणारे कडवट अनुभव, स्वत:च केलेले सगळे नियम धाब्यावर बसवणाऱ्या सरकारी व्यवस्था, हिरव्या रंगाच्या ‘वॉश’खाली भयानक प्रदूषण करणाऱ्या उत्पादनांना मिळणाऱ्या परवानग्या आणि त्याविषयी उदासीन असणारी विविध पदांवरची माणसं. निकराने त्याला विरोध करणारे पर्यावरणस्नेही कार्यकर्ते आणि संस्था, याविषयी विचार करायला लावते ही कादंबरी. ही सगळी वीण गच्च विणली आहे. म्हणूनच ती वाचायला मजा येते. म्हणजे हिच्यात काही कमतरता वा त्रुटी नाहीत का? नाहीत कशा.. पण दुर्लक्ष कराव्यात अशा नक्कीच. उदा. जोसेफ, रघु, मधोक, आस्ताद, विहान यांच्या आयुष्यात कोणीच स्त्रिया कशा नाहीत? इतक्या जवळिकीच्या आणि प्रदीर्घ काळाच्या नात्यात कधीतरी त्या व नायिका आमनेसामने येऊ शकल्या असत्या. अशा तिढय़ांना सफाईने बगल दिली आहे. त्यामुळे समग्र चित्रात फटी राहिल्या आहेत. सहसा लेखिका ज्या तऱ्हेचं लेखन करत नाहीत तसं वाचायला मिळालं की सुखद वाटतं. स्त्री असण्याच्या परीघरेषा ओलांडून ही नायिका व्यक्ती म्हणून वेगळे आयुष्य जगते. सहजधर्मानं, अभिनिवेशानं नव्हे म्हणून आणखी बरं वाटतं. लेखिका, संपादक, संवादक, समीक्षक आणि कथा अभ्यासक अशा अनेक भूमिकांमध्ये सतत कार्यरत. ‘संवादसेतू’ या लक्षवेधी दिवाळी अंकाचे संपादन. कथक नृत्यांगना रोहिणी भाटे यांच्यावरील ‘रोहिणी निरंजनी’ हा गाजलेला ग्रंथ, ‘मंगला गोडबोले यांच्या निवडक कथां’ यासह अनेक पुस्तकांच्या संपादिका. ...Read more