* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SUDHA MURTHY HAS WANDERED IN MANY REMOTE AND ECONOMICALLY BACKWARD PLACES IN INDIA. SHE HAS WALKED OVER TO DEPTHS AT THESE PLACES, SHE HAS TRAVELLED BY THE PUBLIC TRANSPORT. SHE HAS TRIED HER LEVEL BEST TO TAKE THE MEDICAL FACILITIES TO THE DOORSTEPS OF THESE NEGLECTED AND NEGLIGENT PEOPLE. HER WORK HAS GIVEN HER THE OPPORTUNITY TO MIX WITH MANY NOBLE PEOPLE FROM THE VARIOUS SECTORS OF SOCIETY. SHE HAS MET THE BEGGAR`S FAMILY FROM MUMBAI WHO WENT TO SETTLE DOWN IN GUJARAT WHERE THE EARTHQUAKE HAD LEFT EVERYONE IN CHAOS. SHE HAS MET THE MOTHER OF A GIRL WHO WAS KILLED FOR THE DOWRY. SHE HAS COME ACROSS THE UNKNOWN DONOR WHO HAS DONATED A HUGE AMOUNT BY CHEQUE. SUDHA MURTI`S LIFE IS MATURED TODAY WITH THE MEETINGS WITH SUCH VARIOUS PEOPLE WITH THEIR UNIQUE THOUGHTS, PHILOSOPHIES AND FEELINGS. SHE HAS PRESENTED HER EXPERIENCES AS A PROFESSOR AND AS A SOCIAL WORKER. THIS BOOK HAS A VERY SIMPLE AND HOMELY LANGUAGE THAT OF ANY COMMON PERSON, YET IT PRESENTS THE PERFECT PICTURE OF SUDHA MURTI`S WORK AND PHILOSOPHY IN DETAIL.
आपल्या व्यवसायात कार्यमग्न असतानाही सामाजिक भान ठेवून टिपलेल्या अनुभवांचे हे लेखन. भारताच्या आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागासभागांमध्ये सुधा मूर्ती यांनी भटकंती केली आहे. त्या पायी फिरल्या आहेत, त्यांनी बसनंही प्रवास केला आहे. या भागात अठराविश्वे दारिद्र्यात राहणाऱ्या माणसांच्या दारात आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या सुविधा नेऊन पोचवण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या कार्यामुळेच समाजाच्या विविध स्तरांतील असामान्य व्यक्तींच्या सहवासात त्या आल्या. मग ते मुंबईतून उठून जाऊन भूकंपग्रस्त गुजरातमध्ये स्थायिक होणारं भिकाऱ्यांचं कुटुंब असो, हुंड्यासाठी बळी गेलेल्या एका तरुणीची माता असो... नाही तर मोठ्या रकमेचा चेक देणगी म्हणून पाठवणारा अनामिक दाता असो... या सर्वांमुळे, त्यांच्या हृदयाला स्पर्श करून जाणाऱ्या कहाण्यांमुळे आणि त्यांच्या मुलखावेगळ्या जीवनविषयक तत्त्वज्ञानामुळे सुधा मूर्तींचं जीवन समृद्ध होऊन गेलं आहे.एक प्राध्यापिका आणि एक समाजसेविका या दोन्ही नात्यांनी त्यांना जे काही विलक्षण अनुभव आले ते त्यांनी आपल्यापुढे मांडले आहेत. विनोदाची झालर असलेल्या त्यांच्या घरगुती, मनमोकळ्या लेखनशैलीतून निर्माण झालेलं हे पुस्तक सुधा मूर्ती यांचं कार्य आणि त्यांचं जीवनविषयक तत्त्वज्ञान यांचं व्यापक दर्शन घडवणारं आहे.

No Records Found
No Records Found
Keywords
#SUDHA MURTY #N.R.NARAYANA MURTY #LEENA SOHONI #UMA KULKARNI #WISE & OTHERWISE #GOSHTI MANSANCHYA #PUNYABHUMI BHARAT #THAILIBHAR GOSHTI #SUKESHINI AANI ITAR KATHA #BAKULA #AYUSHYACHE DHADE GIRAVTANA #AAJICHYA POTADITALYA GOSHTI #MAHASHWETA #DOLLAR BAHU #SAMANYATALE ASAMANYA #PARIGH #PITRURHUN #ASTITVA #HARAVALELYA MANDIRACHE RAHASYA #TEEN HAJAR TAKE #SARPACHA SOOD #GARUDJANMACHI KATHA #TRISHANKU #A BETTER INDIA A BETTER WORLD #NARAYAN MURTY : MULYA JAPNARA EK ADWITIYA AAYUSHYA #सुधा मूर्ती #एन.आर.नारायण मूर्ती #लीना सोहोनी #उमा कुलकर्णी #वाइज अँड अदरवाइज #गोष्टी माणसांच्या #पुण्यभूमी भारत #थैलीभर गोष्टी #सुकेशिनी #बकुळा #आयुष्याचे धडे गिरवताना #आजीच्या पोतडीतल्या गोष्टी #महाश्वेता #डॉलर बहू सामान्यांतले असामान्य #परीघ पितृऋण #अस्तित्व #हरवलेल्या मंदिराचे रहस्य #तीन हजार टाके #सर्पाचा सूड #गरुडजन्माची कथा #त्रिशंकू #अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्ड : नारायण मूर्ती #नारायण मूर्ती : मूल्यं जपणारं एक अद्वितीय आयुष्य
Customer Reviews
  • Rating StarAnand Saraikar

    #वाइज #अँडअदरवाइज -------------------------------------------- काही व्यक्तींवर लक्ष्मीचा वरदहस्त असतो तर काही व्यक्तींवर सरस्वती ची कृपादृष्टी असते...परंतु जगात अशा मोजक्याच व्यक्ती असतात ज्यांच्या हातात लक्ष्मी आणि हृदयात सरस्वती निवास करत असे. भांडवलदार असूनही मनात जर समाजसेवेची आवड असेल तर कमावलेली पै नी पै ही धन्य होत असेल, कारण लक्ष्मीलाही ठाऊक असते की आपण सत्पात्री पडलो आहोत. सुधा मूर्ती या अशाच विदुषी. इन्फोसिस या बलाढ्य सॉफ्टवेअर कंपनीच्या त्या पतीसह भागीदार. त्या स्वतः M.Tech Computer science आहेत. त्याच बरोबर त्या प्राध्यापिका सुद्धा होत्या. प्राध्यापिका म्हणण्यापेक्षाही त्या कनवाळू,सह्रदय शिक्षिका ... वडील डॉक्टर असल्याने समाज सेवेचे बाळकडू लहानपणीच मिळालेले, समाजाकडून मिळालेले काही अंशी समाजाकडे गेले पाहिजे ही विचारसरणी मनात पक्की रुजलेली त्यामुळे इन्फोसिस फाऊंडेशन ही सामाजिक कार्य करणारी संस्था उभारली गेली नसती तर नवल वाटले असते. इन्फोसिस फाऊंडेशन ही विद्यार्थी, आदिवासी, आणि इतर गरजवंताना आर्थिक आणि वस्तु स्वरुपात मदत करणारी संस्था. अर्थात मदत देण्याचेही काही निकष असतात, आणि ज्यांनी ही संस्था उभी केली त्यांच्या सदसद्विवेक बुद्धिला जे पटेल त्यांना सुधाताई इमाने इतबारे मदत पोहोचवत असतातच....मुळात हे खरेखुरे अनुभव असल्याने समाजाचा खरा चेहरा आपल्या पुढे उघड करण्याचे काम त्या खुबीने करतात...आता विना रंगरंगोटी खरा चेहरा हा प्रत्येक वेळी विलोभनीय कसा असू शकेल...हे माहीत असूनही आपण कित्येक वेळा चकित होतो, हताश होतो आणि निराशही होतो.तुम्ही मला मदत करा नाहीतर मी आत्महत्या करीन अशी धमकी देणारा याचक(?), शेअर बाजारात पैसे बुडाले म्हणुन पाच कोटींची मदत मागणारी एक महाभाग स्त्री ... स्वतः च्या वडिलांना अनाथ म्हणून ऑफिस मधे आणून सोडणारा आणि त्यांच्या मृत्यूनंतर खरी ओळख सांगून बँक खात्यावर वारसा हक्क सांगणारा आधुनिक श्रावण... ज्या विद्यार्थ्यांला मदत केल्यामुळे शिक्षण पूर्ण करू शकलेला डॉक्टर जेव्हा त्यांच्याकडून फीसची मागणी करतो .. या आणि अशाच अनेक हृदयद्रावक हकिकती वाचताना एक प्रश्न वारंवार उपस्थित होतो माणुस असा का वागतो...?सामाजिक कार्य करत असताना आलेल्या अशाच कटू गोड अनुभवाचा मिश्किल आणि थेट हृदयाला भिडणाऱ्या शैलीत मांडलेला लेखाजोखा म्हणजेच #वाइजअँडअदरवाइज हे पुस्तक होय. #डॉ.#आनंद #सराईकर ...Read more

  • Rating StarRajesh Javir

    वाइज अँड अदरवाईज अतिशय छान पुस्तक. पुस्तक वाचल्यानंतर त्यांची विशाल महानता कळते. 204 पानाच्या या पुस्तकामध्ये सुमारे 51 कथा आहेत. आदरणीय सुधा मुर्ती यांच्या विशाल कार्याचा आढावा या पुस्तकामधुन होतो .प्रत्येक कथेमधुन सुधा मुर्ती यांच्या कार्याची णि त्यांच्या जीवनाविषयीच तत्वज्ञान या पुस्तकाच्या माध्यमातुन दिसुन येते.सुधा मूर्ती वाइज अँड अदरवाइज गोष्टी अनुभवाच्या त्यांनी त्यांच्या अनुभवातून त्याचबरोबर त्यांच्या मित्र मैत्रिणीच्या अनुभवातून ज्या काही गोष्टी सांगीतल्या आहे त्यातून बऱ्याच गोष्टी आपल्या मनाला स्पर्श करून जातात..! त्या चांगल्या वाईट अनुभवातुन ते काहींना काही शिकतमोठे झाले. ते म्हणतात ना अनुभव हा माणसाचा खरा गुरु असतो. तसेच या यशस्वी लोकांचा खरा गुरु हा त्यांना आलेला अनुभव असतो. यशस्वी व्यक्ती त्यांना आलेल्या अनुभवातुन ते शिकतात. वाइज अँड आदर वाईज एक प्रसिद्ध पुस्तक! भारताच्या अत्यंत मागास भागामध्ये त्या फिरल्या.रेल्वे, बस प्रसंगी पायी फिरून जाणून घेतले तेथील दारिद्र्य! आपल्या व्यवसायात कार्यमग्न असतानाही सामाजिक भान ठेवून टिपलेल्या अनुभवांचे हे लेखन. भारताच्या आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागासभागांमध्ये सुधा मूर्ती यांनी भटकंती केली आहे. त्या पायी फिरल्या आहेत, त्यांच्यासाठी मग आरोग्य,शिक्षण आणि स्वावलंबनासाठीची सुरू केल्या अनेक योजना! त्या साठी झगडल्या.अटोकाट प्रयत्न केले.अनेक प्रकारच्या लोकांचा संपर्क आणि संबंध आला.मन हेलावून टाकणारा एक एक प्रसंग जणू त्यांचा गुरूच! जसे आठरा विश्वं दारिद्र्याचे त्यांना स्वामी भेटले तसेच त्यांना भेटले करोडो रुपयांच्या रकमेचे चेक देणारे अनामिक दाते! "इन्फोसिस फाऊंडेशन" च्या माध्यमातून त्यांनी स्वतः अनेक कार्य चालवले आहेत.इतरांना ही मदत करतात. अश्या अनुभवातून निर्माण झाले एक तत्वज्ञान! त्याची मांडणी खूपच प्रेरक आसते! त्यांच्या या प्रवासामध्ये त्यांना कधी अत्यंत गरीब लोक भेटले तर कधी धूर्त राजकारणी यातुन आलेले अनुभव आणि त्यांना भेटलेली माणसे. यातुन समजलेला मनुष्यस्वभाव.वाईस अँड अदरवाइज या पुस्तकातुन त्यांनी मांडला आहे. सुधा मुर्ती यांनी परतफेडीची अपेक्षा न करता न ठेवता अनेकांना मदत केली. काहींनी त्या मदती बद्दल कृतज्ञता व्यक्त केली तर काहींनी मिळालेल्या मदतीचा उल्लेखही केला नाही. त्यांच्या या प्रवासामध्ये त्यांना खुप लहान-मोठी माणसे भेटली त्या प्रत्येकाकडुन बरंच काही त्यांना शिकायला मिळाले. हि अशी माणसं हीच माझी माणसं,तेच माझे नातेवाईक.मी त्यांच्यासाठी काम करते.मग त्यांची जात,उपजात,लिंग,भाषा किंवा राजकीय निष्ठा कोणतीही असो..! या पुस्तकातून बरंचस शिकायला मिळाले..! खरंच आपल्याला यशाच्या उंच शिखरावर पोहोचायचं असेल तर आपल्याला अनुभवातुन शिकलं पाहिजेल. हे पुस्तक वाचल्यावर समजत कि माणसाचा खरा गुरु हा त्याला आलेले अनुभव होय. जो अनुभवातुन शिकतो तो सदैव यशस्वी होत रहातो. ...Read more

  • Rating StarDARSHANA CHAPHEKAR

    इन्फोसिस फौंडेशनच्या अध्यक्षा, एक शिक्षिका आणि सुगृहिणी असलेल्या सुधा मूर्ती ह्यांच्या ह्या लेखनाला प्रस्तावना लिहितांना `द न्यू इंडियन एक्सप्रेस’चे संपादकीय सल्लागार टी. जे. एस. जॉर्ज ह्यांनी म्हंटले आहे, "कन्नड भाषेत श्रेष्ठ दर्जाचं लेखन सातत्यानं रत असणार्‍या या लेखिकेने `द न्यू संडे एक्सप्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्रातून प्रथमच स्तंभलेखन केलं. पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणार्‍या या मालिकेतून त्यांनी स्वत:चे वैयक्तिक अनुभव मांडले. आपण केलेल्या प्रवासाविषयी लिहिलं आणि त्यांना भेटलेल्या असामान्य मनाच्या सामान्य माणसांविषयी सांगितलं. त्यांच्या स्तंभलेखनामधील प्रांजळपणा आणि ताजेपणा लोकांना स्पर्शून गेला व त्याचं लेखन लोकप्रिय झालं’ - असे हे `तिकडच्या’ वाचकांना आवडलेले लेखन `इकडच्या’ वाचकांनाही आवडेल हे जाणून लीना सोहोनी ह्यांनी खुद्द लेखिकेनेही समरसून दाद द्यावी इतक्या समरसतेने मराठीत अनुवादित केले आहे. ...Read more

  • Rating StarLaxmikant Kulkarni

    थोडंसं जगणं समाजासाठी..! हे जरी खरे असले तरीपण "जगणंच फक्त समाजांसाठी" हे स्वतःच्या आचरणाने दाखवून देणाऱ्या अन असामान्य असूनही सामान्य राहणाऱ्या आणि असामान्य काम करणाऱ्या गोरगरीब,होतकरू आणि कित्येक निराधारासाठी आधारवड असणाऱ्या अम्मा म्हणजेच सुधा मूर्ी..! खरंच अशाच ठिकाणी "कर माझे जुळती " वाईज अँड अदरवाईज-सुधा मूर्ती इतक्या प्रचंड मोठ्या साम्राज्याची अनभिषीत एक कर्तृत्ववान महाराणी..! प्रचंड मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरांवर कुठलाही बडेजाव न करता समाजसुधारणेचा वसा घेतलेल्या सुधा मूर्तींच्या पुस्तकाविषयी थोडंसं..आणि त्याचं विचाराचं हे धन नक्कीच आपल्या पिढीला प्रेरणा देईल..! - विचाराचं संक्रमण योग्य तऱ्हेने करण्याची क्षमता ज्याची अधिक त्याच्या आयुष्यात गैरसमजांचे प्रसंग कमी प्रमाणांत घडतात. - मी फक्त अशाच माणसांना मदत करायचं ठरवलंय,ज्यांना कशाचाच,कुणाचाच आधार नाही.आपण जर त्यांना मदत केली नाही तर त्यांच्यावर अक्षरशः विनाश ओढावेल. हि अशी माणसं हीच माझी माणसं,तेच माझे नातेवाईक.मी त्यांच्यासाठी काम करते.मग त्यांची जात,उपजात,लिंग,भाषा किंवा राजकीय निष्ठा कोणतीही असो..! या पुस्तकातून बरंचस शिकायला मिळाले..! त्यांनी त्यांच्या अनुभवातून त्याचबरोबर त्यांच्या मित्र मैत्रिणीच्या अनुभवातून ज्या काही गोष्टी सांगीतल्या आहे त्यातून बऱ्याच गोष्टी आपल्या मनाला स्पर्श करून जातात..! त्यांची निरीक्षण करण्याची आणि वेगवेगळ्या नवीन व्यक्तींशी संवाद करण्याची हातोटी लाजवाब आहे..! आणि एवढं असतानाही त्यांना सत्कार,कुठला बडेजाव,किंवा कुणाची फुकटची अवास्तव स्तुती पण नकोय..! शेवटी तर त्यांनी स्पष्ट म्हटलंय कि "उगीचच्या उगीच एखाद्याचं अवास्तव,अतिरंजित कौतुक करणं म्हणजे एक प्रकारचा भ्रष्टाचारचं आहे..! :-खूप काही शिकण्यासारख्या..! सलाम सुधा मूर्ती यांना..! ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more