* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SUDHA MURTHY HAS WANDERED IN MANY REMOTE AND ECONOMICALLY BACKWARD PLACES IN INDIA. SHE HAS WALKED OVER TO DEPTHS AT THESE PLACES, SHE HAS TRAVELLED BY THE PUBLIC TRANSPORT. SHE HAS TRIED HER LEVEL BEST TO TAKE THE MEDICAL FACILITIES TO THE DOORSTEPS OF THESE NEGLECTED AND NEGLIGENT PEOPLE. HER WORK HAS GIVEN HER THE OPPORTUNITY TO MIX WITH MANY NOBLE PEOPLE FROM THE VARIOUS SECTORS OF SOCIETY. SHE HAS MET THE BEGGAR`S FAMILY FROM MUMBAI WHO WENT TO SETTLE DOWN IN GUJARAT WHERE THE EARTHQUAKE HAD LEFT EVERYONE IN CHAOS. SHE HAS MET THE MOTHER OF A GIRL WHO WAS KILLED FOR THE DOWRY. SHE HAS COME ACROSS THE UNKNOWN DONOR WHO HAS DONATED A HUGE AMOUNT BY CHEQUE. SUDHA MURTI`S LIFE IS MATURED TODAY WITH THE MEETINGS WITH SUCH VARIOUS PEOPLE WITH THEIR UNIQUE THOUGHTS, PHILOSOPHIES AND FEELINGS. SHE HAS PRESENTED HER EXPERIENCES AS A PROFESSOR AND AS A SOCIAL WORKER. THIS BOOK HAS A VERY SIMPLE AND HOMELY LANGUAGE THAT OF ANY COMMON PERSON, YET IT PRESENTS THE PERFECT PICTURE OF SUDHA MURTI`S WORK AND PHILOSOPHY IN DETAIL.
आपल्या व्यवसायात कार्यमग्न असतानाही सामाजिक भान ठेवून टिपलेल्या अनुभवांचे हे लेखन. भारताच्या आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागासभागांमध्ये सुधा मूर्ती यांनी भटकंती केली आहे. त्या पायी फिरल्या आहेत, त्यांनी बसनंही प्रवास केला आहे. या भागात अठराविश्वे दारिद्र्यात राहणाऱ्या माणसांच्या दारात आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या सुविधा नेऊन पोचवण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या कार्यामुळेच समाजाच्या विविध स्तरांतील असामान्य व्यक्तींच्या सहवासात त्या आल्या. मग ते मुंबईतून उठून जाऊन भूकंपग्रस्त गुजरातमध्ये स्थायिक होणारं भिकाऱ्यांचं कुटुंब असो, हुंड्यासाठी बळी गेलेल्या एका तरुणीची माता असो... नाही तर मोठ्या रकमेचा चेक देणगी म्हणून पाठवणारा अनामिक दाता असो... या सर्वांमुळे, त्यांच्या हृदयाला स्पर्श करून जाणाऱ्या कहाण्यांमुळे आणि त्यांच्या मुलखावेगळ्या जीवनविषयक तत्त्वज्ञानामुळे सुधा मूर्तींचं जीवन समृद्ध होऊन गेलं आहे.एक प्राध्यापिका आणि एक समाजसेविका या दोन्ही नात्यांनी त्यांना जे काही विलक्षण अनुभव आले ते त्यांनी आपल्यापुढे मांडले आहेत. विनोदाची झालर असलेल्या त्यांच्या घरगुती, मनमोकळ्या लेखनशैलीतून निर्माण झालेलं हे पुस्तक सुधा मूर्ती यांचं कार्य आणि त्यांचं जीवनविषयक तत्त्वज्ञान यांचं व्यापक दर्शन घडवणारं आहे.

No Records Found
No Records Found
Keywords
#SUDHA MURTY #N.R.NARAYANA MURTY #LEENA SOHONI #UMA KULKARNI #WISE & OTHERWISE #GOSHTI MANSANCHYA #PUNYABHUMI BHARAT #THAILIBHAR GOSHTI #SUKESHINI AANI ITAR KATHA #BAKULA #AYUSHYACHE DHADE GIRAVTANA #AAJICHYA POTADITALYA GOSHTI #MAHASHWETA #DOLLAR BAHU #SAMANYATALE ASAMANYA #PARIGH #PITRURHUN #ASTITVA #HARAVALELYA MANDIRACHE RAHASYA #TEEN HAJAR TAKE #SARPACHA SOOD #GARUDJANMACHI KATHA #TRISHANKU #A BETTER INDIA A BETTER WORLD #NARAYAN MURTY : MULYA JAPNARA EK ADWITIYA AAYUSHYA #सुधा मूर्ती #एन.आर.नारायण मूर्ती #लीना सोहोनी #उमा कुलकर्णी #वाइज अँड अदरवाइज #गोष्टी माणसांच्या #पुण्यभूमी भारत #थैलीभर गोष्टी #सुकेशिनी #बकुळा #आयुष्याचे धडे गिरवताना #आजीच्या पोतडीतल्या गोष्टी #महाश्वेता #डॉलर बहू सामान्यांतले असामान्य #परीघ पितृऋण #अस्तित्व #हरवलेल्या मंदिराचे रहस्य #तीन हजार टाके #सर्पाचा सूड #गरुडजन्माची कथा #त्रिशंकू #अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्ड : नारायण मूर्ती #नारायण मूर्ती : मूल्यं जपणारं एक अद्वितीय आयुष्य
Customer Reviews
  • Rating StarAnand Saraikar

    #वाइज #अँडअदरवाइज -------------------------------------------- काही व्यक्तींवर लक्ष्मीचा वरदहस्त असतो तर काही व्यक्तींवर सरस्वती ची कृपादृष्टी असते...परंतु जगात अशा मोजक्याच व्यक्ती असतात ज्यांच्या हातात लक्ष्मी आणि हृदयात सरस्वती निवास करत असे. भांडवलदार असूनही मनात जर समाजसेवेची आवड असेल तर कमावलेली पै नी पै ही धन्य होत असेल, कारण लक्ष्मीलाही ठाऊक असते की आपण सत्पात्री पडलो आहोत. सुधा मूर्ती या अशाच विदुषी. इन्फोसिस या बलाढ्य सॉफ्टवेअर कंपनीच्या त्या पतीसह भागीदार. त्या स्वतः M.Tech Computer science आहेत. त्याच बरोबर त्या प्राध्यापिका सुद्धा होत्या. प्राध्यापिका म्हणण्यापेक्षाही त्या कनवाळू,सह्रदय शिक्षिका ... वडील डॉक्टर असल्याने समाज सेवेचे बाळकडू लहानपणीच मिळालेले, समाजाकडून मिळालेले काही अंशी समाजाकडे गेले पाहिजे ही विचारसरणी मनात पक्की रुजलेली त्यामुळे इन्फोसिस फाऊंडेशन ही सामाजिक कार्य करणारी संस्था उभारली गेली नसती तर नवल वाटले असते. इन्फोसिस फाऊंडेशन ही विद्यार्थी, आदिवासी, आणि इतर गरजवंताना आर्थिक आणि वस्तु स्वरुपात मदत करणारी संस्था. अर्थात मदत देण्याचेही काही निकष असतात, आणि ज्यांनी ही संस्था उभी केली त्यांच्या सदसद्विवेक बुद्धिला जे पटेल त्यांना सुधाताई इमाने इतबारे मदत पोहोचवत असतातच....मुळात हे खरेखुरे अनुभव असल्याने समाजाचा खरा चेहरा आपल्या पुढे उघड करण्याचे काम त्या खुबीने करतात...आता विना रंगरंगोटी खरा चेहरा हा प्रत्येक वेळी विलोभनीय कसा असू शकेल...हे माहीत असूनही आपण कित्येक वेळा चकित होतो, हताश होतो आणि निराशही होतो.तुम्ही मला मदत करा नाहीतर मी आत्महत्या करीन अशी धमकी देणारा याचक(?), शेअर बाजारात पैसे बुडाले म्हणुन पाच कोटींची मदत मागणारी एक महाभाग स्त्री ... स्वतः च्या वडिलांना अनाथ म्हणून ऑफिस मधे आणून सोडणारा आणि त्यांच्या मृत्यूनंतर खरी ओळख सांगून बँक खात्यावर वारसा हक्क सांगणारा आधुनिक श्रावण... ज्या विद्यार्थ्यांला मदत केल्यामुळे शिक्षण पूर्ण करू शकलेला डॉक्टर जेव्हा त्यांच्याकडून फीसची मागणी करतो .. या आणि अशाच अनेक हृदयद्रावक हकिकती वाचताना एक प्रश्न वारंवार उपस्थित होतो माणुस असा का वागतो...?सामाजिक कार्य करत असताना आलेल्या अशाच कटू गोड अनुभवाचा मिश्किल आणि थेट हृदयाला भिडणाऱ्या शैलीत मांडलेला लेखाजोखा म्हणजेच #वाइजअँडअदरवाइज हे पुस्तक होय. #डॉ.#आनंद #सराईकर ...Read more

  • Rating StarRajesh Javir

    वाइज अँड अदरवाईज अतिशय छान पुस्तक. पुस्तक वाचल्यानंतर त्यांची विशाल महानता कळते. 204 पानाच्या या पुस्तकामध्ये सुमारे 51 कथा आहेत. आदरणीय सुधा मुर्ती यांच्या विशाल कार्याचा आढावा या पुस्तकामधुन होतो .प्रत्येक कथेमधुन सुधा मुर्ती यांच्या कार्याची णि त्यांच्या जीवनाविषयीच तत्वज्ञान या पुस्तकाच्या माध्यमातुन दिसुन येते.सुधा मूर्ती वाइज अँड अदरवाइज गोष्टी अनुभवाच्या त्यांनी त्यांच्या अनुभवातून त्याचबरोबर त्यांच्या मित्र मैत्रिणीच्या अनुभवातून ज्या काही गोष्टी सांगीतल्या आहे त्यातून बऱ्याच गोष्टी आपल्या मनाला स्पर्श करून जातात..! त्या चांगल्या वाईट अनुभवातुन ते काहींना काही शिकतमोठे झाले. ते म्हणतात ना अनुभव हा माणसाचा खरा गुरु असतो. तसेच या यशस्वी लोकांचा खरा गुरु हा त्यांना आलेला अनुभव असतो. यशस्वी व्यक्ती त्यांना आलेल्या अनुभवातुन ते शिकतात. वाइज अँड आदर वाईज एक प्रसिद्ध पुस्तक! भारताच्या अत्यंत मागास भागामध्ये त्या फिरल्या.रेल्वे, बस प्रसंगी पायी फिरून जाणून घेतले तेथील दारिद्र्य! आपल्या व्यवसायात कार्यमग्न असतानाही सामाजिक भान ठेवून टिपलेल्या अनुभवांचे हे लेखन. भारताच्या आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागासभागांमध्ये सुधा मूर्ती यांनी भटकंती केली आहे. त्या पायी फिरल्या आहेत, त्यांच्यासाठी मग आरोग्य,शिक्षण आणि स्वावलंबनासाठीची सुरू केल्या अनेक योजना! त्या साठी झगडल्या.अटोकाट प्रयत्न केले.अनेक प्रकारच्या लोकांचा संपर्क आणि संबंध आला.मन हेलावून टाकणारा एक एक प्रसंग जणू त्यांचा गुरूच! जसे आठरा विश्वं दारिद्र्याचे त्यांना स्वामी भेटले तसेच त्यांना भेटले करोडो रुपयांच्या रकमेचे चेक देणारे अनामिक दाते! "इन्फोसिस फाऊंडेशन" च्या माध्यमातून त्यांनी स्वतः अनेक कार्य चालवले आहेत.इतरांना ही मदत करतात. अश्या अनुभवातून निर्माण झाले एक तत्वज्ञान! त्याची मांडणी खूपच प्रेरक आसते! त्यांच्या या प्रवासामध्ये त्यांना कधी अत्यंत गरीब लोक भेटले तर कधी धूर्त राजकारणी यातुन आलेले अनुभव आणि त्यांना भेटलेली माणसे. यातुन समजलेला मनुष्यस्वभाव.वाईस अँड अदरवाइज या पुस्तकातुन त्यांनी मांडला आहे. सुधा मुर्ती यांनी परतफेडीची अपेक्षा न करता न ठेवता अनेकांना मदत केली. काहींनी त्या मदती बद्दल कृतज्ञता व्यक्त केली तर काहींनी मिळालेल्या मदतीचा उल्लेखही केला नाही. त्यांच्या या प्रवासामध्ये त्यांना खुप लहान-मोठी माणसे भेटली त्या प्रत्येकाकडुन बरंच काही त्यांना शिकायला मिळाले. हि अशी माणसं हीच माझी माणसं,तेच माझे नातेवाईक.मी त्यांच्यासाठी काम करते.मग त्यांची जात,उपजात,लिंग,भाषा किंवा राजकीय निष्ठा कोणतीही असो..! या पुस्तकातून बरंचस शिकायला मिळाले..! खरंच आपल्याला यशाच्या उंच शिखरावर पोहोचायचं असेल तर आपल्याला अनुभवातुन शिकलं पाहिजेल. हे पुस्तक वाचल्यावर समजत कि माणसाचा खरा गुरु हा त्याला आलेले अनुभव होय. जो अनुभवातुन शिकतो तो सदैव यशस्वी होत रहातो. ...Read more

  • Rating StarDARSHANA CHAPHEKAR

    इन्फोसिस फौंडेशनच्या अध्यक्षा, एक शिक्षिका आणि सुगृहिणी असलेल्या सुधा मूर्ती ह्यांच्या ह्या लेखनाला प्रस्तावना लिहितांना `द न्यू इंडियन एक्सप्रेस’चे संपादकीय सल्लागार टी. जे. एस. जॉर्ज ह्यांनी म्हंटले आहे, "कन्नड भाषेत श्रेष्ठ दर्जाचं लेखन सातत्यानं रत असणार्‍या या लेखिकेने `द न्यू संडे एक्सप्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्रातून प्रथमच स्तंभलेखन केलं. पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणार्‍या या मालिकेतून त्यांनी स्वत:चे वैयक्तिक अनुभव मांडले. आपण केलेल्या प्रवासाविषयी लिहिलं आणि त्यांना भेटलेल्या असामान्य मनाच्या सामान्य माणसांविषयी सांगितलं. त्यांच्या स्तंभलेखनामधील प्रांजळपणा आणि ताजेपणा लोकांना स्पर्शून गेला व त्याचं लेखन लोकप्रिय झालं’ - असे हे `तिकडच्या’ वाचकांना आवडलेले लेखन `इकडच्या’ वाचकांनाही आवडेल हे जाणून लीना सोहोनी ह्यांनी खुद्द लेखिकेनेही समरसून दाद द्यावी इतक्या समरसतेने मराठीत अनुवादित केले आहे. ...Read more

  • Rating StarLaxmikant Kulkarni

    थोडंसं जगणं समाजासाठी..! हे जरी खरे असले तरीपण "जगणंच फक्त समाजांसाठी" हे स्वतःच्या आचरणाने दाखवून देणाऱ्या अन असामान्य असूनही सामान्य राहणाऱ्या आणि असामान्य काम करणाऱ्या गोरगरीब,होतकरू आणि कित्येक निराधारासाठी आधारवड असणाऱ्या अम्मा म्हणजेच सुधा मूर्ी..! खरंच अशाच ठिकाणी "कर माझे जुळती " वाईज अँड अदरवाईज-सुधा मूर्ती इतक्या प्रचंड मोठ्या साम्राज्याची अनभिषीत एक कर्तृत्ववान महाराणी..! प्रचंड मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरांवर कुठलाही बडेजाव न करता समाजसुधारणेचा वसा घेतलेल्या सुधा मूर्तींच्या पुस्तकाविषयी थोडंसं..आणि त्याचं विचाराचं हे धन नक्कीच आपल्या पिढीला प्रेरणा देईल..! - विचाराचं संक्रमण योग्य तऱ्हेने करण्याची क्षमता ज्याची अधिक त्याच्या आयुष्यात गैरसमजांचे प्रसंग कमी प्रमाणांत घडतात. - मी फक्त अशाच माणसांना मदत करायचं ठरवलंय,ज्यांना कशाचाच,कुणाचाच आधार नाही.आपण जर त्यांना मदत केली नाही तर त्यांच्यावर अक्षरशः विनाश ओढावेल. हि अशी माणसं हीच माझी माणसं,तेच माझे नातेवाईक.मी त्यांच्यासाठी काम करते.मग त्यांची जात,उपजात,लिंग,भाषा किंवा राजकीय निष्ठा कोणतीही असो..! या पुस्तकातून बरंचस शिकायला मिळाले..! त्यांनी त्यांच्या अनुभवातून त्याचबरोबर त्यांच्या मित्र मैत्रिणीच्या अनुभवातून ज्या काही गोष्टी सांगीतल्या आहे त्यातून बऱ्याच गोष्टी आपल्या मनाला स्पर्श करून जातात..! त्यांची निरीक्षण करण्याची आणि वेगवेगळ्या नवीन व्यक्तींशी संवाद करण्याची हातोटी लाजवाब आहे..! आणि एवढं असतानाही त्यांना सत्कार,कुठला बडेजाव,किंवा कुणाची फुकटची अवास्तव स्तुती पण नकोय..! शेवटी तर त्यांनी स्पष्ट म्हटलंय कि "उगीचच्या उगीच एखाद्याचं अवास्तव,अतिरंजित कौतुक करणं म्हणजे एक प्रकारचा भ्रष्टाचारचं आहे..! :-खूप काही शिकण्यासारख्या..! सलाम सुधा मूर्ती यांना..! ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more