* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177665796
  • Edition : 17
  • Publishing Year : MARCH 1997
  • Weight : 130.00 gms
  • Pages : 160
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A PERFECT GRAPH OF THE ADDITIONS AND SUBTRACTIONS OF THE YOUNG MINDS. YOUTH; THE PERIOD OF EXTREME EXUBERANCE. THE PERIOD TO LOVE, TO LOSE IN LOVE, TO DO ANYTHING IN LOVE. THE PERIOD TO ADMIT OUR SILLY MISTAKES, OUR FIASCO, TO WITNESS OTHER`S LOVE FROM A DISTANCE. BUT SOMETIMES, WE GET HURT AT THE CORE OF OUR HEART. THEN IT BECOMES DIFFICULT TO FORGET AND MORE DIFFICULT TO ACCEPT OUR FAULTS. SOMETIMES WE HAVE TO SHOW COURAGE AND FACE THE FACTS OF LIFE, THEN WE HIDE OUR EMBARRASSMENTS IN SOME SECRET CORNER OF LIFE AND START LEADING TO CREATE A PICTURE OF NORMAL LIFE BUT SOMETIMES WE JUST CANNOT COME OUT OF IT. SOME HAVE THE ABILITY TO CARRY ON AS IF NOTHING HAS HAPPENED, SOME GO ALONG WITH THE TIDE AND ACCEPT LIFE AS IT IS, MAKING IT MORE HAPPY FOR THEMSELVES AND EVERYBODY, BUT SOME FOLLOW THE WRONG PATHS TO GAIN HAPPINESS, DECEIVING THEMSELVES. THE STORIES HERE HAVE MANY SHADES OF LOVE. SOME HAVE VIGOR AND VITALITY, SOME ARE FULL OF PAIN AND AGONY; SOME ARE BASED ON FACTS AND SOME ON FAILURE; SOME RECOGNIZE THE NEED TO ADJUST AND COMPROMISE; SOME HAVE THE POTENTIALS OF TENDERNESS AND AFFECTION; SOME ARE HASTY, SOME ARE NASTY. THEY SOMETIMES WILL MAKE US SMILE, AND SOMETIMES WILL WET OUR EYES; SOMETIMES THEY WILL REVEAL ONLY THE TRUTH AND SOMETIMES THEY WILL PUT OUR MINDS IN CONFUSION.
‘हुंकार’ हा कथासंग्रह म्हणजे तारुण्यातील बेरीजवजाबाकीचा आलेखच! तारुण्य आयुष्यातील सळसळत्या उत्साहाचा काळ. प्रेम करण्याचा, प्रेमात हरवण्याचा, प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याचा. स्वत:ची झालेली फट्फजिती कबूल करण्याचा, दुसऱ्याची गंमत मजेत दुरून बघण्याचा, पण कधीकधी भलतीच ठेच लागते, अगदी जिव्हारी लागते. विसरू म्हणता विसरता येत नाही. नकळत झालेली चूक स्वीकारताही येत नाही. वास्तवाला सामोरे जायचे धैर्यही कधीकधी दाखवावे लागते. संसारात पडल्यावर दुखरा कोपरा मनात ठेवून काहीजण जगतात, काही त्यातून बाहेर येतच नाहीत. मागचे भोग विसरून वाटेला आलेला संसार टुकीने, नेटकेपणाने करणारे असतात. तर व्यवहारात भलत्याच काळ्या वाटेने जाऊन काहीजण फसवे सुख मिळवतात. प्रेमाच्या निरनिराळ्या छटा, त्यातील आततायीपणा, जोम, परिस्थितीमुळे असफल झालेल्या प्रेमातील वेदना, कारुण्य, संसारातले वास्तव, तडजोड, सच्चेपणा, मुलांबद्दलचा उमाळा, हळवेपणा या सा-या अवस्था वपुंनी या संग्रहातील वेगवेगळ्या कथांमधून चितारल्या आहेत. कधी विनोदाने मनाला खुदकन हसवणाया, कधी डोळ्यांच्या कडा ओल्या करणाया, तर कधी सरळ सत्याला भिडणाया अशा या कथा आहेत.

No Records Found
No Records Found
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
  • Rating StarParth Bhendekar

    हुंकार वपु ! मराठी वाचन संस्कृतीतील क्वचितच लोक असतील ज्यांना हे नाव माहित नाही. हुंकार हा कथासंग्रह मी वाचलेलं वपुचं तिसरं पुस्तक ! वपुंच्या व्यक्तीमत्तवाचे अनेक पैलु आपल्याला दिसतात एक उत्कृष्ट कथाकार , तत्तवज्ञ , विचारवंत हे त्यातलच काही. असो वपुंसारख्या सागराचं वर्णन मी काय करावं तर मी येतो मुद्द्यावर अर्थात हुंकारवर ! वपुंच्या कथा कधी वाचकाला हसवतात कधी रडवतात तर कधी वाचकांशी तासनतास नुसतं हितगुज करतात, बोलत राहतात. प्रत्येक कथा वाचल्यानंतर विचार केला नाही तर कथा समजणे आणि त्यातील संदेश घेणे थोडं अवघडच ! मी हुंकार हा कथासंग्रह चार दिवसापूर्वीच वाचून वेगळा केला. काय तो अनुभव ! एक वेगळचं जग वपुंच्या कथांमधून अनुभवायला मिळतं. 17 कथांचा हा संग्रह आपल्या प्रत्येक कथेत काहीतरी वेगळेपणा देऊन जातो. यातील पहिलीच कथा हुंकार. ही कथा म्हणजे पुढच्या मेजवानीचे ट्रेलर म्हणायला हरकत नाही. लग्नाआधीचं प्रेम आपल्याला परत भेटतं त्या प्रसंगाची ही गोष्ट. यातील एक वाक्य मला फार आवडतं "सुगंधात आणि स्वप्नात फार साम्य आहे दोघांचीही शेवटी राख होते " त्यानंतरची कथा "चक्रम" थोडी मजेशीर थोडी विचार करायला लावणारी ही कथा. हुंकारमध्ये फक्त वैचिरिक किंवा प्रासंगीक कथा आहेत असचं नाही बरं ! विचारांमार्फत विनोद पोहचवून आपल्याला हसवणं हेच वपुचं मोठं कौशल्य. संग्रहातील "मांजर" आणि "बुमरँग" या कथा वाचल्यावर याची अनुभुतीही आपल्याला येतेच. "शिकार" ही कथा प्रेमयुगल आपल्या लग्नासाठी काय काय शक्कल चढवतात ते दिसते आणि त्याचा जो मजेशीर शेवट होतो तो मात्र वाखाणण्याजोगा आहे. पण त्याच पुढील "पोरकी" ही कथा मात्र डोळ्यात पाणी आणते. मन अधिक संवेदनशील होतं आणि तो प्रसंग आपल्याच डोळ्यांसमोर उभा राहतो. तरुणांसाठी संपूर्ण कथासंग्रहच खूप मार्गदर्शक ठरतो पण यातील "सोनाराने कान टोचले दुसर्‍यांदा" आणि "निर्णय" या दोन्ही कथा आपल्या तरुण वयातील अनेक चूका आणि नैतिकता याबद्दल उपदेश करतात. "हाॅलिडे स्पेशल" ही कथा मला विशेष आवडते सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ही एक प्रेमकथा वाटते आणि शेवटी कथा अशी काही कलाटणी घेते की वाचक हसल्यावाचून राहात नाही. "कैफियत" आणि "रिकामी खुर्ची" या कथा मात्र आपल्याला फार विचार करायला लावतात. हे झालं कथांबद्दल माझं मत पण या कथांमधून घेण्यासारखं भरपूर आहे जे इथं सांगणं म्हणजे हुंकारचा एक वाचक कमी करण्यासारखं होईल. तेव्हा हुंकार तुम्हीही वाचा मला ज्या गोष्टी कळाल्या त्यापेक्षा काही वेगळ्या तुम्हाला कथा शकतात. त्या तुम्ही मला सांगा मला कळालेल्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. असचं पुढे जाऊन कारण आपल्याला ही वाचनसंस्कृती पुढे चालवायचीये !😊😊 ...Read more

  • Rating StarOnkar Ingawale

    सर्व कथा भावनिक प्रकारातील काही विनोदी ढंगाच्या. बऱ्याच कथा स्त्री पात्रावर बेतलेल्या.

  • Rating StarAALOCHANA - DEC, 1965

    श्री. काळे यांच्या या संग्रहातील कथांचे विषय बालबोध रीतीने सांगता येणार नाहीत. तसेच त्यांतील माणसे व प्रसंग यांना ‘लेबले’ ही लावता येणार नाहीत. म्हणूनच त्या खऱ्याखुऱ्या जिवंत आणि नवीन कथा आहेत. तसे पाहीले तर या कथांना आधारभूत असलेल्या वस्तुनिष्ठ जीवनर्शनात नवे किंवा अपूर्वाईचे काही नाही. त्या त्या जीवनाकडे पाहण्याचा लेखकाचा दृष्टिकोनही अ-पारंपारिक आहे असे नाही. पण प्रत्येक जीवनप्रसंग व त्यांत वावरणारी व्यक्ती यांचे जे जीवनास्पंदन काळ्यांनी शब्दांत पकडले आहे ते हुरहूर लावणारे व पीळदार आहे. ही हुरहूर व पीळ यांच्या प्रसंगचित्रणांतून नाजुक भावबंध प्रवाहीत झाले आहेत. या भावबंधात रूजू पण धारदार व्यक्तिदर्शन हे या कथांचे धन. यातल्या सर्वच कथा निर्दोष आहेत. असे नाही पण पण या कथांचे हे धन संगति-विरोधाचे धारदार दर्शन देऊन जाते. ...Read more

  • Rating StarDAINIK MARATHA 22-8-1965

    वाचकांना रिझवू शकणारा... वसंत पुरुषोत्तम काळे यांनी आजकाल अनेक प्रकारच्या अनेक कथा लिहील्या आहेत. विनोदी तशाच गंभीर. पोरकट तशाच प्रौढ. कधी वेगवान घटनांवर उभारलेल्या तर कधी शुद्ध व्यक्तिदर्शनात्मक. अनपेक्षित कलाटणी त्यांच्या कथेचे एकेकाळचे वैशिष्ट्य जही शिल्लक उरलेले दिसते. त्याउलट त्यांची कथा आज सहजपणे विकसित होत जाऊन ठरीव ठशाचे शेवट टाळतानाही आढळते. त्यांच्या कथेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तिच्यांतून सतत जाणवणारा माणसाला समजावून घेण्याचा आणि समजावून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न. ‘हुंकार’ ह्या त्यांच्या ताज्या कथासंग्रहांतल्या बहुतेक कथांतून लेखकाच्या मनांत वसत असलेल्या अपार सहानुभूतीच्या छडा गडदपणे पसरलेल्या आढळतात. मानवी व्यथेमुळे आणि अगतिकतेमुळे लेखकाचे काळीज पिळवटून गेल्याचे जाणवते. आणि दु:खामुळे वाटलेले दु:ख वाचकापर्यंत पोचवण्याची त्याची धडपडही जाणवते. हा दु:खाचा छोट नेहमीच आवगाने वाचकापर्यंत कोसळत येतोच असे नाही. तरीपण ‘स्वर’, कैफ’, ‘सत्कार’ किंवा ‘तो माझी वाट पाहत असेल’ ह्यासारख्या कथांतून वाचकाला व्यथित करून तोडण्याची ताकदही जाणवते. ‘हुंकार’ ह्या कथासग्रहांतल्या बहुतेक कथा वाङ्मयीन गुणांनी समृद्ध आहेत. कथेचा घाट, तिचे निवेदन, तिच्यातील व्यक्ती उभ्या करण्याचे कसब, घटना रंगवण्याची हातोटी इत्यादि बाबतीत लेखकाच्या लेखणीतला सफाईदारपणा आणि सरावाने सहज मिळत गेलेले तंत्रावरचे प्रभुत्व ह्यामुळे त्याच्या कथा नित्य वाचनीयच उतरतात. परंतु त्याहीपुढे जाऊन एखादी मोठी झेप लेखक घेऊ शकेल काय असा विचार केल्यास ‘स्वर’सारख्या एखाद्या विलक्षण हृदयस्पर्शी कथेतून दिलासाही मिळतो. ‘स्वर’ ही लेखकाची कथा खरोखरीच अविस्मरणीय आहे. जिला रूप नाही पण स्वर आहे अशा एका टेलिफोन ऑपरेटरचे व्यक्तिचित्र लेखकाने कमालीच्या कलात्मकतेने घडवले आहे. तिच्या कुरूपपणाबद्दल खोटे उमाळे कुठेच नाहीत. त्या व्यंगासकट तिने आपल्या आयुष्याचा हीशोब एका चमत्कारीक थंडपणे आखलेला असतो. जे प्रेम ती मिळवते ते कायम मिळत राहील अशी अपेक्षा तिला नसतेच. त्याचे स्पष्टrकरणही ती अत्यंत विचारीपणे आणि समतोलपणे करते. ‘‘माझ लग्न नक्की होणार आहे. प्रत्येक स्त्रीला-मग ती कशीही असली तरीही तिला पत्करणारा मिळतोच. पण माझ्यासारख्यांची लग्न होतात ती गरजेपोटी होतात. कुणाच्या तरी स्वप्नातली मूर्ती म्हणून नक्कीच माझा कुठं प्रवेश होणार नाही. कोणीतरी अडलेला पुरुष, एखादा बिजवर किंवा व्यंग असलेला, असा कोणीतरी गरजेपोटी मला पत्करणार. त्यात कसला कैफ? माझ्यासारखी मुलगी देखील त्याला वेडंपिसं करू शकत होती, त्यातच नाही का सगळं आलं?’ ह्या मुलीने जे मिळवले आणि ते गमावले त्याबद्दलचे दु:खही तिने विचारपूर्वक आतल्याआत दडपून टाकले. लेखकाने लिहीलेली ही कुरूप मुलीची गोष्ट त्याच्याजवळ असलेली व कल्पकतेनं वापरल्यास तीव्र परिणाम करू शकणारी मनोविश्लेषणाची शक्ती दर्शवते. कथा लिहीताना लेखकाने सांभाळलेला संयम, समतोलपणा व गहीवराचा अभाव वाखाणण्याजोगा आहे. इतरत्र आलेल्या काही व्यक्तीही अशाच काळजाचा ठाव घेऊन जातात. ‘तक्षक’ कथेतला अध:पाताचा प्रवर्तक कांता, ‘निरोप’ मधील पत्नीच्या व्यभिचाराने दु:खवल्यामुळे स्त्रियाकडे विकृतपणे पाहणारा गजा, ‘कैफ’ मधले भीषण धाडसांच्या कैफांत जगणारे विजूचे वडील, ‘पहीली खेप’मधले नाइलाजाने निर्दय बनलेले घाटे, ‘सत्कार’मधले कुणालाच नको असलेले पण पत्नीने सांभाळलेले केशवराव ह्या अशा अनेक व्यक्ती दैवाच्या अटळ प्रहाराखाली झोडपल्या गेल्या आहेत, आपल्या जीवनाची शोकांतिका टाळणे त्यांच्या हातात उरलेले नाही. ‘तो माझी वाट पाहत असेल’ ही लेखकाची एक वेगळ्याच तंत्राची कथा आहे. एखाद्या दडपणाखाली झपाटलेल्या मनोवृत्तींतून निर्माण झालेली. तिच्यात एक भेसूर अंधार आहे. आत्महत्या करावयास जाणाऱ्या माणसांकडे त्यांच्या वस्तु मागायला खाणारा ‘तो’ लोकविलक्षण खरा!’ ‘हुंकार’ ह्या कथेत एकांकिकेचे तंत्र चांगले वापरले आहे. प्रेमाची व्यथा हा तिचा विषय. तो लेखकाने उत्कटपणे, तन्मयतेने रंगवला आहे. ‘हुंकार’ ह्या कथासंग्रहांतल्या कथा विविध प्रकृतीच्या आहेत. त्यांच्यांत रुचिवैचित्र्य आहे. लेखकाच्या लेखनाचे रंग जमत आल्याची साक्ष आहे. कथा हेतूकडे आणि कथावस्तूकडे लेखकाच्या मनोवृत्तीचे झाडून अधिक केंद्रीकरण होत गेले- जे स्वर ह्या कथेत अचूक व अजोडपणे जमले आहेत तर लेखक मराठी कथेच्या क्षेत्रांत आपल्या वैशिष्ट्याचा ठसा निश्चितपणे ठेवू शकेल. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more