* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A PERFECT GRAPH OF THE ADDITIONS AND SUBTRACTIONS OF THE YOUNG MINDS. YOUTH; THE PERIOD OF EXTREME EXUBERANCE. THE PERIOD TO LOVE, TO LOSE IN LOVE, TO DO ANYTHING IN LOVE. THE PERIOD TO ADMIT OUR SILLY MISTAKES, OUR FIASCO, TO WITNESS OTHER`S LOVE FROM A DISTANCE. BUT SOMETIMES, WE GET HURT AT THE CORE OF OUR HEART. THEN IT BECOMES DIFFICULT TO FORGET AND MORE DIFFICULT TO ACCEPT OUR FAULTS. SOMETIMES WE HAVE TO SHOW COURAGE AND FACE THE FACTS OF LIFE, THEN WE HIDE OUR EMBARRASSMENTS IN SOME SECRET CORNER OF LIFE AND START LEADING TO CREATE A PICTURE OF NORMAL LIFE BUT SOMETIMES WE JUST CANNOT COME OUT OF IT. SOME HAVE THE ABILITY TO CARRY ON AS IF NOTHING HAS HAPPENED, SOME GO ALONG WITH THE TIDE AND ACCEPT LIFE AS IT IS, MAKING IT MORE HAPPY FOR THEMSELVES AND EVERYBODY, BUT SOME FOLLOW THE WRONG PATHS TO GAIN HAPPINESS, DECEIVING THEMSELVES. THE STORIES HERE HAVE MANY SHADES OF LOVE. SOME HAVE VIGOR AND VITALITY, SOME ARE FULL OF PAIN AND AGONY; SOME ARE BASED ON FACTS AND SOME ON FAILURE; SOME RECOGNIZE THE NEED TO ADJUST AND COMPROMISE; SOME HAVE THE POTENTIALS OF TENDERNESS AND AFFECTION; SOME ARE HASTY, SOME ARE NASTY. THEY SOMETIMES WILL MAKE US SMILE, AND SOMETIMES WILL WET OUR EYES; SOMETIMES THEY WILL REVEAL ONLY THE TRUTH AND SOMETIMES THEY WILL PUT OUR MINDS IN CONFUSION.
‘हुंकार’ हा कथासंग्रह म्हणजे तारुण्यातील बेरीजवजाबाकीचा आलेखच! तारुण्य आयुष्यातील सळसळत्या उत्साहाचा काळ. प्रेम करण्याचा, प्रेमात हरवण्याचा, प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याचा. स्वत:ची झालेली फट्फजिती कबूल करण्याचा, दुसयाची गंमत मजेत दुरून बघण्याचा, पण कधीकधी भलतीच ठेच लागते, अगदी जिव्हारी लागते. विसरू म्हणता विसरता येत नाही. नकळत झालेली चूक स्वीकारताही येत नाही. वास्तवाला सामोरे जायचे धैर्यही कधीकधी दाखवावे लागते. संसारात पडल्यावर दुखरा कोपरा मनात ठेवून काहीजण जगतात, काही त्यातून बाहेर येतच नाहीत. मागचे भोग विसरून वाटेला आलेला संसार टुकीने, नेटकेपणाने करणारे असतात. तर व्यवहारात भलत्याच काळ्या वाटेने जाऊन काहीजण फसवे सुख मिळवतात. प्रेमाच्या निरनिराळ्या छटा, त्यातील आततायीपणा, जोम, परिस्थितीमुळे असफल झालेल्या प्रेमातील वेदना, कारुण्य, संसारातले वास्तव, तडजोड, सच्चेपणा, मुलांबद्दलचा उमाळा, हळवेपणा या सा-या अवस्था वपुंनी या संग्रहातील वेगवेगळ्या कथांमधून चितारल्या आहेत. कधी विनोदाने मनाला खुदकन हसवणाया, कधी डोळ्यांच्या कडा ओल्या करणाया, तर कधी सरळ सत्याला भिडणाया अशा या कथा आहेत.

No Records Found
No Records Found
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
  • Rating StarParth Bhendekar

    हुंकार वपु ! मराठी वाचन संस्कृतीतील क्वचितच लोक असतील ज्यांना हे नाव माहित नाही. हुंकार हा कथासंग्रह मी वाचलेलं वपुचं तिसरं पुस्तक ! वपुंच्या व्यक्तीमत्तवाचे अनेक पैलु आपल्याला दिसतात एक उत्कृष्ट कथाकार , तत्तवज्ञ , विचारवंत हे त्यातलच काही. असो वपुंसारख्या सागराचं वर्णन मी काय करावं तर मी येतो मुद्द्यावर अर्थात हुंकारवर ! वपुंच्या कथा कधी वाचकाला हसवतात कधी रडवतात तर कधी वाचकांशी तासनतास नुसतं हितगुज करतात, बोलत राहतात. प्रत्येक कथा वाचल्यानंतर विचार केला नाही तर कथा समजणे आणि त्यातील संदेश घेणे थोडं अवघडच ! मी हुंकार हा कथासंग्रह चार दिवसापूर्वीच वाचून वेगळा केला. काय तो अनुभव ! एक वेगळचं जग वपुंच्या कथांमधून अनुभवायला मिळतं. 17 कथांचा हा संग्रह आपल्या प्रत्येक कथेत काहीतरी वेगळेपणा देऊन जातो. यातील पहिलीच कथा हुंकार. ही कथा म्हणजे पुढच्या मेजवानीचे ट्रेलर म्हणायला हरकत नाही. लग्नाआधीचं प्रेम आपल्याला परत भेटतं त्या प्रसंगाची ही गोष्ट. यातील एक वाक्य मला फार आवडतं "सुगंधात आणि स्वप्नात फार साम्य आहे दोघांचीही शेवटी राख होते " त्यानंतरची कथा "चक्रम" थोडी मजेशीर थोडी विचार करायला लावणारी ही कथा. हुंकारमध्ये फक्त वैचिरिक किंवा प्रासंगीक कथा आहेत असचं नाही बरं ! विचारांमार्फत विनोद पोहचवून आपल्याला हसवणं हेच वपुचं मोठं कौशल्य. संग्रहातील "मांजर" आणि "बुमरँग" या कथा वाचल्यावर याची अनुभुतीही आपल्याला येतेच. "शिकार" ही कथा प्रेमयुगल आपल्या लग्नासाठी काय काय शक्कल चढवतात ते दिसते आणि त्याचा जो मजेशीर शेवट होतो तो मात्र वाखाणण्याजोगा आहे. पण त्याच पुढील "पोरकी" ही कथा मात्र डोळ्यात पाणी आणते. मन अधिक संवेदनशील होतं आणि तो प्रसंग आपल्याच डोळ्यांसमोर उभा राहतो. तरुणांसाठी संपूर्ण कथासंग्रहच खूप मार्गदर्शक ठरतो पण यातील "सोनाराने कान टोचले दुसर्‍यांदा" आणि "निर्णय" या दोन्ही कथा आपल्या तरुण वयातील अनेक चूका आणि नैतिकता याबद्दल उपदेश करतात. "हाॅलिडे स्पेशल" ही कथा मला विशेष आवडते सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ही एक प्रेमकथा वाटते आणि शेवटी कथा अशी काही कलाटणी घेते की वाचक हसल्यावाचून राहात नाही. "कैफियत" आणि "रिकामी खुर्ची" या कथा मात्र आपल्याला फार विचार करायला लावतात. हे झालं कथांबद्दल माझं मत पण या कथांमधून घेण्यासारखं भरपूर आहे जे इथं सांगणं म्हणजे हुंकारचा एक वाचक कमी करण्यासारखं होईल. तेव्हा हुंकार तुम्हीही वाचा मला ज्या गोष्टी कळाल्या त्यापेक्षा काही वेगळ्या तुम्हाला कथा शकतात. त्या तुम्ही मला सांगा मला कळालेल्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. असचं पुढे जाऊन कारण आपल्याला ही वाचनसंस्कृती पुढे चालवायचीये !😊😊 ...Read more

  • Rating StarOnkar Ingawale

    सर्व कथा भावनिक प्रकारातील काही विनोदी ढंगाच्या. बऱ्याच कथा स्त्री पात्रावर बेतलेल्या.

  • Rating StarAALOCHANA - DEC, 1965

    श्री. काळे यांच्या या संग्रहातील कथांचे विषय बालबोध रीतीने सांगता येणार नाहीत. तसेच त्यांतील माणसे व प्रसंग यांना ‘लेबले’ ही लावता येणार नाहीत. म्हणूनच त्या खऱ्याखुऱ्या जिवंत आणि नवीन कथा आहेत. तसे पाहीले तर या कथांना आधारभूत असलेल्या वस्तुनिष्ठ जीवनर्शनात नवे किंवा अपूर्वाईचे काही नाही. त्या त्या जीवनाकडे पाहण्याचा लेखकाचा दृष्टिकोनही अ-पारंपारिक आहे असे नाही. पण प्रत्येक जीवनप्रसंग व त्यांत वावरणारी व्यक्ती यांचे जे जीवनास्पंदन काळ्यांनी शब्दांत पकडले आहे ते हुरहूर लावणारे व पीळदार आहे. ही हुरहूर व पीळ यांच्या प्रसंगचित्रणांतून नाजुक भावबंध प्रवाहीत झाले आहेत. या भावबंधात रूजू पण धारदार व्यक्तिदर्शन हे या कथांचे धन. यातल्या सर्वच कथा निर्दोष आहेत. असे नाही पण पण या कथांचे हे धन संगति-विरोधाचे धारदार दर्शन देऊन जाते. ...Read more

  • Rating StarDAINIK MARATHA 22-8-1965

    वाचकांना रिझवू शकणारा... वसंत पुरुषोत्तम काळे यांनी आजकाल अनेक प्रकारच्या अनेक कथा लिहील्या आहेत. विनोदी तशाच गंभीर. पोरकट तशाच प्रौढ. कधी वेगवान घटनांवर उभारलेल्या तर कधी शुद्ध व्यक्तिदर्शनात्मक. अनपेक्षित कलाटणी त्यांच्या कथेचे एकेकाळचे वैशिष्ट्य जही शिल्लक उरलेले दिसते. त्याउलट त्यांची कथा आज सहजपणे विकसित होत जाऊन ठरीव ठशाचे शेवट टाळतानाही आढळते. त्यांच्या कथेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तिच्यांतून सतत जाणवणारा माणसाला समजावून घेण्याचा आणि समजावून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न. ‘हुंकार’ ह्या त्यांच्या ताज्या कथासंग्रहांतल्या बहुतेक कथांतून लेखकाच्या मनांत वसत असलेल्या अपार सहानुभूतीच्या छडा गडदपणे पसरलेल्या आढळतात. मानवी व्यथेमुळे आणि अगतिकतेमुळे लेखकाचे काळीज पिळवटून गेल्याचे जाणवते. आणि दु:खामुळे वाटलेले दु:ख वाचकापर्यंत पोचवण्याची त्याची धडपडही जाणवते. हा दु:खाचा छोट नेहमीच आवगाने वाचकापर्यंत कोसळत येतोच असे नाही. तरीपण ‘स्वर’, कैफ’, ‘सत्कार’ किंवा ‘तो माझी वाट पाहत असेल’ ह्यासारख्या कथांतून वाचकाला व्यथित करून तोडण्याची ताकदही जाणवते. ‘हुंकार’ ह्या कथासग्रहांतल्या बहुतेक कथा वाङ्मयीन गुणांनी समृद्ध आहेत. कथेचा घाट, तिचे निवेदन, तिच्यातील व्यक्ती उभ्या करण्याचे कसब, घटना रंगवण्याची हातोटी इत्यादि बाबतीत लेखकाच्या लेखणीतला सफाईदारपणा आणि सरावाने सहज मिळत गेलेले तंत्रावरचे प्रभुत्व ह्यामुळे त्याच्या कथा नित्य वाचनीयच उतरतात. परंतु त्याहीपुढे जाऊन एखादी मोठी झेप लेखक घेऊ शकेल काय असा विचार केल्यास ‘स्वर’सारख्या एखाद्या विलक्षण हृदयस्पर्शी कथेतून दिलासाही मिळतो. ‘स्वर’ ही लेखकाची कथा खरोखरीच अविस्मरणीय आहे. जिला रूप नाही पण स्वर आहे अशा एका टेलिफोन ऑपरेटरचे व्यक्तिचित्र लेखकाने कमालीच्या कलात्मकतेने घडवले आहे. तिच्या कुरूपपणाबद्दल खोटे उमाळे कुठेच नाहीत. त्या व्यंगासकट तिने आपल्या आयुष्याचा हीशोब एका चमत्कारीक थंडपणे आखलेला असतो. जे प्रेम ती मिळवते ते कायम मिळत राहील अशी अपेक्षा तिला नसतेच. त्याचे स्पष्टrकरणही ती अत्यंत विचारीपणे आणि समतोलपणे करते. ‘‘माझ लग्न नक्की होणार आहे. प्रत्येक स्त्रीला-मग ती कशीही असली तरीही तिला पत्करणारा मिळतोच. पण माझ्यासारख्यांची लग्न होतात ती गरजेपोटी होतात. कुणाच्या तरी स्वप्नातली मूर्ती म्हणून नक्कीच माझा कुठं प्रवेश होणार नाही. कोणीतरी अडलेला पुरुष, एखादा बिजवर किंवा व्यंग असलेला, असा कोणीतरी गरजेपोटी मला पत्करणार. त्यात कसला कैफ? माझ्यासारखी मुलगी देखील त्याला वेडंपिसं करू शकत होती, त्यातच नाही का सगळं आलं?’ ह्या मुलीने जे मिळवले आणि ते गमावले त्याबद्दलचे दु:खही तिने विचारपूर्वक आतल्याआत दडपून टाकले. लेखकाने लिहीलेली ही कुरूप मुलीची गोष्ट त्याच्याजवळ असलेली व कल्पकतेनं वापरल्यास तीव्र परिणाम करू शकणारी मनोविश्लेषणाची शक्ती दर्शवते. कथा लिहीताना लेखकाने सांभाळलेला संयम, समतोलपणा व गहीवराचा अभाव वाखाणण्याजोगा आहे. इतरत्र आलेल्या काही व्यक्तीही अशाच काळजाचा ठाव घेऊन जातात. ‘तक्षक’ कथेतला अध:पाताचा प्रवर्तक कांता, ‘निरोप’ मधील पत्नीच्या व्यभिचाराने दु:खवल्यामुळे स्त्रियाकडे विकृतपणे पाहणारा गजा, ‘कैफ’ मधले भीषण धाडसांच्या कैफांत जगणारे विजूचे वडील, ‘पहीली खेप’मधले नाइलाजाने निर्दय बनलेले घाटे, ‘सत्कार’मधले कुणालाच नको असलेले पण पत्नीने सांभाळलेले केशवराव ह्या अशा अनेक व्यक्ती दैवाच्या अटळ प्रहाराखाली झोडपल्या गेल्या आहेत, आपल्या जीवनाची शोकांतिका टाळणे त्यांच्या हातात उरलेले नाही. ‘तो माझी वाट पाहत असेल’ ही लेखकाची एक वेगळ्याच तंत्राची कथा आहे. एखाद्या दडपणाखाली झपाटलेल्या मनोवृत्तींतून निर्माण झालेली. तिच्यात एक भेसूर अंधार आहे. आत्महत्या करावयास जाणाऱ्या माणसांकडे त्यांच्या वस्तु मागायला खाणारा ‘तो’ लोकविलक्षण खरा!’ ‘हुंकार’ ह्या कथेत एकांकिकेचे तंत्र चांगले वापरले आहे. प्रेमाची व्यथा हा तिचा विषय. तो लेखकाने उत्कटपणे, तन्मयतेने रंगवला आहे. ‘हुंकार’ ह्या कथासंग्रहांतल्या कथा विविध प्रकृतीच्या आहेत. त्यांच्यांत रुचिवैचित्र्य आहे. लेखकाच्या लेखनाचे रंग जमत आल्याची साक्ष आहे. कथा हेतूकडे आणि कथावस्तूकडे लेखकाच्या मनोवृत्तीचे झाडून अधिक केंद्रीकरण होत गेले- जे स्वर ह्या कथेत अचूक व अजोडपणे जमले आहेत तर लेखक मराठी कथेच्या क्षेत्रांत आपल्या वैशिष्ट्याचा ठसा निश्चितपणे ठेवू शकेल. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more