* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184988734
  • Edition : 2
  • Publishing Year : 1982
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 150
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
EACH ONE OF US IS A DROP OF DARKNESS. EACH DROP TREMBLES FOR A WHILE AS IT SHAPES THE DARKNESS WITHIN US. DURING THIS PROCESS OF GIVING MEANING IT SOMETIMES SLUMPS DOWN SOMEWHERE. NOT ALL OF US CAN UNDERSTAND THE DARKNESS IN A TRUE SENSE. THOSE FEW WHO ARE ABLE TO FEEL IT REALISE HELPLESSNESS AND INEXORABILITY OF THEIR VERY BEING. FOR THEM, THERE IS ONLY ONE WAY OUT OF THIS SITUATION. HOWEVER TEMPORARY IT SEEMS, THEY HAVE TO TRY TO REMAIN ON THE SURFACE IN AN ATTEMPT TO BE ALIVE WHILE FURTHER PUTTING THE EXPERIENCE INTO WORDS.
एक एक व्यक्ती म्हणजे काळोखाचा एक एक थेंब. आपल्यातल्या काळोखाला आकार देत, ‘अर्थ’ देत, प्रत्येक थेंब काही क्षण थरथरत राहातो आणि कधीतरी अचानकपणे ओघळून जातो. पण सगळ्यांनाच आपल्यातला अंधार आकळतो असं नाही. ज्यांना तो आकळतो त्यांना आपली असहायता उमगते, असहायतेतली अपरिहार्यता जाणवते. आपल्या असहायतेवर, तात्पुरती का होईना, मात करायचा एकच उपाय त्यांना दिसत असतो. धडपडत, हातपाय मारत, जगत राहणं आणि त्या जगण्याचा आविष्कार शब्दबद्ध करणं.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #KALOKHACHETHEMB #KALOKHACHETHEMB #काळोखाचेथेंब #SHORTSTORIES #MARATHI #PRABHAKARN.PARANJAPE "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK MAHARASHTRA TIMES 7-3-2016

    ‘रात्रीच्या काळोखात गाडलेल्या स्मृती एक एक करून जमा व्हायला लागतात. मनात एक वैराण वाळवंट हेलावू लागतं आणि सावलीप्रमाणे शरीरहीन असलेल्या त्या स्मृती मृगजळाप्रमाणे मला बोलावू लागतात,’ ‘उसळी मारून वर येतात अचानक डोह संपावा तशी झोप संपली,’ ‘ते सगळं अधांती हलतं, डुचमळतं वाटत होतं,’ ‘दृष्टीला गरगरवणारी रंगीबेरंगी वर्तुळे पापण्यांच्या फटकाऱ्याने उडवीत तो दरवाज्याकडे गेला,’ अशी प्रतिकात्मक आणि रुपकात्मक भाषा प्रभाकर नारायण परांजपे यांच्या या कथासंग्रहात अनुभवायला मिळते. वास्तवाला भिडणाऱ्या एकूण १६ कथांचा हा संग्रह. ‘टँहा’ ही वेगळ्या विषयावरील कथा, तर ‘मातीच्या मूर्ती’ या कथेतील धक्का तंत्राचा वापर परिणाम साधतो. संवादांपेक्षा वर्णनात्मकतेतून उलगडणाऱ्या या कथा कधी कधी गूढतेच्या वाटेनेही जातात. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 5-6-2016

    १९६७ ते १९७१ या काळात लिहिल्या गेलेल्या या कथा ‘सत्यकथा’, ‘अभिरुची’, ‘राजस’, ‘किर्लोस्कर’, ‘नवयुग’, ‘युगवाणी’, ‘मनोहर’ या त्या वेळच्या नव्या वाटेवरच्या साहित्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या नियतकालिकांत प्रसिद्धही झाल्या आहेत. विशेष हे मानायला हवे, की इतक्यावर्षांनंतरही त्या कालबाह्य वाटत नाहीत. आज भूतलावर सगळ्यात सामर्थ्यवान कोण असेल तर माणूस. त्याची विचार करण्याची, भावना व्यक्त करण्याची शक्ती, त्याची बुद्धी, नवनवीन शोधांची त्याची लालसा यामुळे त्याला हे सामर्थ्य प्राप्त झालंय असं म्हटलं जातं. बुद्धीच्या आणि इच्छाशक्तीच्या बळावर आपण काहीही करू शकतो असं माणसालाही वाटत असतं. पण प्रत्यक्षात हे खरं आहे का? निसर्गापुढे माणूस किती थिटा आहे हे तर आपण अनुभवतोच आहोत आणि तसंही या विश्वाच्या पसाऱ्यात एक व्यक्ती म्हणजे कुणीच नाही. जणू काळोखाचा थेंब. आपले अस्तित्व किती नगण्य आहे हे जेव्हा आणि ज्यांच्या लक्षात येते त्यांना जगण्यातला फोलपणा जाणवतो. पण आयुष्याची आसक्ती इतकी मोठी असते, की परिस्थितीवर मात करत जगायचा प्रयत्न प्रत्येक जणच करतो. काही त्यात यश मिळवतात. बाकीचे हातपाय मारत धडपड करत राहतात. या कथासंग्रहात अशाच व्यक्तीरेखा वाचकांना भेटत राहतात. ‘लाक्षागृहा’मधल्या शाळकरी सदूचे भावविश्व अशा घटनेने ढवळून निघते की ज्याचा त्याच्याशी प्रत्यक्षात काहीच संबंध नाही. पण तरीही काही नकोशा गोष्टींचा तो साक्षीदार होतो. ‘संध्याछाया’ ही अगदी परस्परविरोधी स्वभावाच्या दोन वृद्ध स्त्रियांची कथा सांगते. त्यातली एक परावलंबी आयुष्य पसंत करणारी, तर दुसरी हट्टाने स्वत:चे स्वातंत्र जपणारी. ‘काळोखाचे थेंब’ कथेची मांडणी वेगळीच आहे. नंदिनी आणि माधव यांचा एकमेकांचा अंदाज घेत बोलणे, प्रतिक्रीया देणे हे दुसऱ्यावर मात करण्यासाठी आहे. यातली तिसरी व्यक्तीरेखा अविनाश ही या दोघांच्या बोलण्यातून ‘दिसत’ राहते. या गोष्टीचा शेवट होतो तो नंदिनीसाठी जसा अकल्पित आहे तसा वाचकांसाठीही. ‘ट्याहा’ ही कथाही तिच्या वेगळेपणामुळे उठून दिसते. यातल्या काही कथा गूढ वळणावरच्याही आहेत. ‘अंधाराच्या अरण्यात’मधला विश्वनाथ, ‘मातीच्या मूर्ती’मधला ‘तो’, ‘निर्जन किनारी’मधली ‘ती’ कथा संपल्यावरही लक्षात राहतात. माणूस हे एक अजब रसायन आहे. त्याच्या व्यक्त अव्यक्त भावनांचा ठाव घ्यायचा प्रयत्न लेखकाने ‘भोवळ’, ‘महारोगी’, ‘मन माळरान’, ‘कॅसिनो’ या कथात केला आहे. उदाहरणार्थ, ‘मन माळरान’मधला लेखक लेखनाच्या अनुभूतीचा, जीवनाच्या अस्सलतेचा साक्षात्कार घडतानाचा अनुभव सांगताना म्हणतो, ‘निर्लेप, निर्विकार व्हायचं, मरायचं मनात, कुठल्या तरी क्षणी ते जमेल क्वचित. पण तो क्षणच असायचा अनंताचा कण, इंद्रिय संवेदनांच्या पलीकडील अवकाशाचं ओझरतं दर्शन. देठ तोडून ओंजळीत घेतलेल्या कमलाप्रमाणे दिसायचं विश्व आपल्याला सामावून घेऊनही आपल्यापासून तुटलेलं.’ पुस्तकातल्या दोन अनुवादित कथांचाही उल्लेख करायलाच हवा. यातली पहिली आहे ती जेम्स जोइसची ‘द डेड’. त्यात गूढ छटा आहे. दुसरी त्याहूनही महत्त्वाची आहे ती ‘त्रयस्थ’. आंद्रेई सिन्यावस्की यांच्या मूळ कथेवर आधारलेली. ही कथा म्हणजे राजकीय रूपक आहे. त्याचबरोबर कलावंताना वाटणरी परकेपणाची, त्रयस्थपणाची भावनाही यात खूप प्रभावी पद्धतीने मांडली गेली आहे. त्यामुळेच एका बाजूला शहारा उमटवत असतानाच बराच काळ ती मनात रेंगाळत राहते. लेखकाची भाषा रुपकात्मक आहे. ‘उसळी मारून वर येताना अचानक डोह संपावा तशी झोप संपली’ अशी वाक्ये ते सहजपणे लिहून जातात. या कथा वर्णनात्मक जास्त आहेत. गाव, रस्ते, समुद्र, व्यक्ती यांची बारकाईने, तपशिलात जाऊन केलेली वर्णने आहेत. त्यामुळे तो तपशील डोळ्यांसमोर उभा राहायला मदत होते. त्यांच्या व्यक्तिरेखाही मोजक्या शब्दांत ठसठशीतपणे उभ्या राहतात. उदाहरणार्थ, ‘द रनिंग म्यान’मधली अनघा किंवा ‘लाक्षागृह’मधला विठ्ठल. अगदी ‘मातीच्या मूर्ती’मधला ‘तो’ आणि ‘संध्याछाया’मधल्या काकूही. आजार, पैशाची वानवा, अशांत मन, एकटेपणा यापैकी एका किंवा अनेक गोष्टींचा सामना करणारी ही सगळी माणसे. पण मग तरीही आयुष्याला बांधून ठेवणारा कुठला धागा असतो जो यांना तगवून ठेवतो? या कथांतला माणूस धडपडत, ठेचकाळत, जखमी होत का होईना पण जगत राहतो. परिस्थितीवर मात करायचा प्रयत्न करत राहतो. त्याचे माणूसपण टिकवायचा प्रयत्न करत राहतो. अशा आपल्या आजूबाजूच्या, किंबहुना आपल्यातल्याच सामान्य माणसांच्या या कथा आहेत. वाचकाला अस्वस्थ करणे हा चांगल्या लेखनाचा निकष मानला जातो. हा कथासंग्रह त्यावर खरा उतरतो. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 7-2-2016

    एक एक व्यक्ती म्हणजे काळोखाचा एक एक थेंब. आपल्यातल्या काळोखाला आकार देत, ‘अर्थ’ देत; प्रत्येक थेंब काही क्षण थरथरत राहातो आणि कधीतरी अचानकपणे ओघळून जातो. पण सगळ्यांनाच आपल्यातला अंधार आकळतो असं नाही. ज्यांना तो आकळतो त्यांना आपली असहायता उमगते, असहायेतली अपरिहार्यता जाणवते. आपल्या असहाय्यतेवर तात्पुरती का होईना, मात करायचा एकच उपाय त्यांना दिसत असतो. धडपडत, हातपाय मारत, जगत राहणं आणि त्या जगण्याचा अविष्कार शब्दबद्ध करणं. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more