* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: VENDETTA
  • Availability : Available
  • Translators : SURESH GUPTE
  • ISBN : 9789386888532
  • Edition : 2
  • Publishing Year : MARCH 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 216
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
FABIO AND NINA ARE WITH THEIR DAUGHTER WHEN FABIO DIES. OR DOES HE? AND IS NINA REALLY AS IN LOVE WITH HER HUSBAND OR IS SHE HAVING AN AFFAIR? ALL IS NOT WHAT IT AT FIRST SEEMS IN THIS NOVEL ABOUT LOVE AND BETRAYAL.
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात इटलीतील नेपल्स शहराच्या पार्श्वभूमीवर सदर कथा घडते. उच्च श्रीमंत कुळात जन्मलेल्या कौंट पॅÂबिओ रोमानी आपल्या ‘रोमानी व्हिला’त राहत होता. स्त्रियांविषयी विशेष आकर्षण नसलेल्या उच्च विचार बाळगणारा असा कौंट रोमानी होता. त्याचा एक गिडो केरारी नावाचा जिवलग मित्र होता. पेशाने चित्रकार पण रंगेल असणारा फेरारी कौंट रोमानीला नेहमीच त्याच्या सज्जन सभ्य स्वभावावरून चिडवत असे. अशा मनाने निर्मळ असणाऱ्या कौंट रोमानीला एक मुलगी आवडते आणि तो तिच्याशी विवाह करतो. लग्नाला साधारण तीन वर्षे होतात आणि कौंट रोमानी एका अत्यंत गोंडस कन्येचा पिता झालेला असतो. आपली पत्नी नीना व मुलीसह कौंट रोमानी आनंदात जीवन जगत असताना नेपल्स शहरात कॉलराची साथ सुरू होते. एके दिवशी एका रोग्याला मदत करत असताना उन्हाच्या तडाख्याने त्याला भोवळ येते. टेकडीवर असणाऱ्या ‘रोमानी व्हिला’पासून दूर असणाऱ्या कौंट रोमानीला एक धर्मगुरू पाहतो. कॉलराच्या रुग्णांना मदत करणाऱ्या धर्मगुरूला वाटते की, या साथीनेच कौंट रोमानी याचा मृत्यू झाला असावा. असा समज झाल्याने धर्मगुरू कौंट रोमानीला शवपेटीत ठेवून त्याच्या खानदानी शवागारात त्याच्यावर अंत्यसंस्कार करून त्याच्या बायकोला मृत्यूची वार्ता कळवतो. परंतु केवळ बेशुद्ध पडलेला रोमानी जागा होतो मोठ्या कष्टाने शवपेटीतून बाहेर पडतो. शवागारातून सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात एका खलाशी दरोडेखोराने त्याच्या शवागारात लपवलेला मोठा खजिना त्याला सापडतो. त्या खजिन्यातील सुंदर नेकलेस तो आपल्या प्रिय पत्नीला भेट देण्यासाठी घेतो दरोडेखोराने ज्या मार्गाने खजिना आत आणून लपवलेला असतो त्याच मार्गाने तो बाहेर पडून आपल्या घराकडे परततो. आपल्या मृत्यूने दु:खी झालेल्या आपल्या पत्नीला आपण स्वत: जाऊन आश्चर्यचकित करू असा विचार करत तो ‘रोमानी व्हिला’च्या बागेत येऊन पोहोचतो आणि त्याचवेळी आपल्या पत्नीला तो आपल्या जिवलग मित्राच्या गिडो फेरारीच्या बाहुपाशात बघतो. अतिशय दु:ख, तिरस्कार आणि सूडाच्या भावनेनं तो पेटून उठतो. संपत्तीच्या लालसेने वाहवत गेलेल्या व्यभिचारी पत्नीचे खरे रूप त्याला समजते आणि इथूनच सुरू होतो एका प्रामाणिक पतीचा सूडाचा प्रवास.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #VENDENTTA #VENDENTTA #व्हेण्डेट्टा #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SURESHGUPTE #MARIECORELLI "
Customer Reviews
  • Rating StarKIRAN BORKAR

    कॉलराच्या साथीत त्याचा मृत्यू झाला असे समजून जिवंत शवपेटीत टाकून त्याच्याच शाही शवागृहात टाकण्यात आले . शुद्धीवर येताच तो मोठ्या प्रयत्नाने तिथून बाहेर पडला .पण घरी येताच त्याला अजून एक धक्का बसला आणि तो सुडाने पेटून उठला .त्याने असे काय पाहिले...?? णि आपला सूड कसा पूर्ण केला...?? ते वाचायला हवेच .इटलीतील नेपल्स शहरात घडणारी ही रोमांचकारी सुडकथा ...Read more

  • Rating StarKiran Borkar‎

    कॉलराच्या साथीत त्याचा मृत्यू झाला असे समजून जिवंत शवपेटीत टाकून त्याच्याच शाही शवागृहात टाकण्यात आले . शुद्धीवर येताच तो मोठ्या प्रयत्नाने तिथून बाहेर पडला .पण घरी येताच त्याला अजून एक धक्का बसला आणि तो सुडाने पेटून उठला .त्याने असे काय पाहिले...?? णि आपला सूड कसा पूर्ण केला...?? ते वाचायला हवेच .इटलीतील नेपल्स शहरात घडणारी ही रोमांचकारी सुडकथा ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.