* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: VENDENTTA
  • Availability : Available
  • Translators : SURESH GUPTE
  • ISBN : 9789386888532
  • Edition : 2
  • Publishing Year : MARCH 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 216
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
FABIO AND NINA ARE WITH THEIR DAUGHTER WHEN FABIO DIES. OR DOES HE? AND IS NINA REALLY AS IN LOVE WITH HER HUSBAND OR IS SHE HAVING AN AFFAIR? ALL IS NOT WHAT IT AT FIRST SEEMS IN THIS NOVEL ABOUT LOVE AND BETRAYAL.
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात इटलीतील नेपल्स शहराच्या पार्श्वभूमीवर सदर कथा घडते. उच्च श्रीमंत कुळात जन्मलेल्या कौंट पॅÂबिओ रोमानी आपल्या ‘रोमानी व्हिला’त राहत होता. स्त्रियांविषयी विशेष आकर्षण नसलेल्या उच्च विचार बाळगणारा असा कौंट रोमानी होता. त्याचा एक गिडो केरारी नावाचा जिवलग मित्र होता. पेशाने चित्रकार पण रंगेल असणारा फेरारी कौंट रोमानीला नेहमीच त्याच्या सज्जन सभ्य स्वभावावरून चिडवत असे. अशा मनाने निर्मळ असणाऱ्या कौंट रोमानीला एक मुलगी आवडते आणि तो तिच्याशी विवाह करतो. लग्नाला साधारण तीन वर्षे होतात आणि कौंट रोमानी एका अत्यंत गोंडस कन्येचा पिता झालेला असतो. आपली पत्नी नीना व मुलीसह कौंट रोमानी आनंदात जीवन जगत असताना नेपल्स शहरात कॉलराची साथ सुरू होते. एके दिवशी एका रोग्याला मदत करत असताना उन्हाच्या तडाख्याने त्याला भोवळ येते. टेकडीवर असणाऱ्या ‘रोमानी व्हिला’पासून दूर असणाऱ्या कौंट रोमानीला एक धर्मगुरू पाहतो. कॉलराच्या रुग्णांना मदत करणाऱ्या धर्मगुरूला वाटते की, या साथीनेच कौंट रोमानी याचा मृत्यू झाला असावा. असा समज झाल्याने धर्मगुरू कौंट रोमानीला शवपेटीत ठेवून त्याच्या खानदानी शवागारात त्याच्यावर अंत्यसंस्कार करून त्याच्या बायकोला मृत्यूची वार्ता कळवतो. परंतु केवळ बेशुद्ध पडलेला रोमानी जागा होतो मोठ्या कष्टाने शवपेटीतून बाहेर पडतो. शवागारातून सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात एका खलाशी दरोडेखोराने त्याच्या शवागारात लपवलेला मोठा खजिना त्याला सापडतो. त्या खजिन्यातील सुंदर नेकलेस तो आपल्या प्रिय पत्नीला भेट देण्यासाठी घेतो दरोडेखोराने ज्या मार्गाने खजिना आत आणून लपवलेला असतो त्याच मार्गाने तो बाहेर पडून आपल्या घराकडे परततो. आपल्या मृत्यूने दु:खी झालेल्या आपल्या पत्नीला आपण स्वत: जाऊन आश्चर्यचकित करू असा विचार करत तो ‘रोमानी व्हिला’च्या बागेत येऊन पोहोचतो आणि त्याचवेळी आपल्या पत्नीला तो आपल्या जिवलग मित्राच्या गिडो फेरारीच्या बाहुपाशात बघतो. अतिशय दु:ख, तिरस्कार आणि सूडाच्या भावनेनं तो पेटून उठतो. संपत्तीच्या लालसेने वाहवत गेलेल्या व्यभिचारी पत्नीचे खरे रूप त्याला समजते आणि इथूनच सुरू होतो एका प्रामाणिक पतीचा सूडाचा प्रवास.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #VENDENTTA #VENDENTTA #व्हेण्डेट्टा #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SURESHGUPTE #MARIECORELLI "
Customer Reviews
  • Rating StarKIRAN BORKAR

    कॉलराच्या साथीत त्याचा मृत्यू झाला असे समजून जिवंत शवपेटीत टाकून त्याच्याच शाही शवागृहात टाकण्यात आले . शुद्धीवर येताच तो मोठ्या प्रयत्नाने तिथून बाहेर पडला .पण घरी येताच त्याला अजून एक धक्का बसला आणि तो सुडाने पेटून उठला .त्याने असे काय पाहिले...?? णि आपला सूड कसा पूर्ण केला...?? ते वाचायला हवेच .इटलीतील नेपल्स शहरात घडणारी ही रोमांचकारी सुडकथा ...Read more

  • Rating StarKiran Borkar‎

    कॉलराच्या साथीत त्याचा मृत्यू झाला असे समजून जिवंत शवपेटीत टाकून त्याच्याच शाही शवागृहात टाकण्यात आले . शुद्धीवर येताच तो मोठ्या प्रयत्नाने तिथून बाहेर पडला .पण घरी येताच त्याला अजून एक धक्का बसला आणि तो सुडाने पेटून उठला .त्याने असे काय पाहिले...?? णि आपला सूड कसा पूर्ण केला...?? ते वाचायला हवेच .इटलीतील नेपल्स शहरात घडणारी ही रोमांचकारी सुडकथा ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more