* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TATA – THE EVOLUTION OF A CORPORATE BRAND
  • Availability : Available
  • Translators : VIDULA TOKEKAR
  • ISBN : 9788184982992
  • Edition : 4
  • Publishing Year : FEBRUARY 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 232
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :JRD TATA BIRTHDAY COMBO OFFER
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A SERIES OF HIGH-PROFILE ACQUISITIONS, INCLUDING JAGUAR LAND ROVER AND CORUS STEEL, TOGETHER WITH THE LAUNCH OF THE NANO (THE WORLD S FIRST RS. 1 LAKH/ BELOW US$ 2500 CAR), IS SET TO CHANGE OUR PERCEPTION OF INDIA`: ON THE THRESHOLD OF BECOMING A TRULY GLOBAL BRAND.*S OLDEST AND MOST RESPECTED CORPORATE BRAND. WITH A MAJOR INTERNATIONAL PRESENCE, IN A VARIETY OF AREAS INCLUDING STEEL, TEA, CHEMICALS, COMMUNICATIONS AND SOFTWARE, TATA NOW STANDS 65TH IN THE WORLD BRAND VALUATION LEAGUE. BUT WHAT IS THE TATA BRAND ALL ABOUT? WHAT ARE ITS VALUES? HOW DO PEOPLE PERCEIVE IT, IN INDIA AND AROUND THE WORLD? IN THIS ABSORBING AND INFORMED BOOK MORGEN WITZEL DIGS INTO THE HEART OF THE TATA ENTERPRISE, DESCRIBES ITS ORIGINS, HOW TATA`S REPUTATION AND IMAGE EVOLVED, AND HOW THE GROUP HAS WORKED TO TRANSFORM THAT IMAGE INTO A POWERFUL AND VALUABLE BRAND. TATA: THE EVOLUTION OF A CORPORATE BRAND GOES TO THE CORE OF THE TATA ETHOS TO EXPLORE THE UNIQUE RELATIONSHIP BETWEEN THE TATA GROUP AND THE INDIAN PEOPLE, A RELATIONSHIP THAT GOES BEYOND THE ACHIEVEMENTS OF A SUCCESSFUL BUSINESS TO ITS SOCIAL CONTRIBUTIONS FOR ITS EMPLOYEES AND THE SOCIETY AT LARGE. FINALLY IT ASKS HOW THAT REPUTATION WILL BE PERCEIVED AND UNDERSTOOD AS TATA MOVES INTO GLOBAL MARKETS. WHETHER YOU RE AN ENTREPRENEUR, A MANAGER, A MARKETER, OR AN INTERESTED TATA LOYALIST THIS BOOK WILL HELP YOU UNDERSTAND THE DURABILITY OF THE BRAND AND INSPIRE YOU WITH THE VALUES IT HOLDS ONTO IN THE GLOBAL ECONOMY.
टाटा ब्रँड म्हणजे आहे तरी काय ? काय आहेत त्यांची मुल्ये ? जगातील आणि भारतातील लोकांना त्यातून काय समजते? या रंजक आणि माहितीपूर्ण पुस्तकात मोर्गेन विट्झेल टाटांच्या हृदयाचा ठाव घेतात,त्याचे मूळ समजावून सांगतात,टाटांच नाव आणि प्रतिमा कशी निर्माण होत गेली, आणि या प्रतिमेचं रुपांतर एका बलवान आणि मौल्यवान ब्रांड मध्ये करण्यासाठी या उद्योगसमूहाने काय केलं,याचं वर्णन करतात.

No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #MORGEN WITZEL #VIDULA TOKEKAR #टाटा-एका कॉर्पोरेट ब्रँडची उत्क्रांती #TATA – THE EVOLUTION OF A CORPORATE BRAND #BIOGRAPHY
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA 21-05-2017

    यशस्वी उद्योगाची यशोगाथा... जगातल्या बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये ‘टाटा’ ही विशेष आहे. केवळ आर्थिक नफा हे त्यांचे ध्येय नसून, ते सामाजिक आणि आर्थिक दोन्हीही आहे. ‘टाटा’ १४० वर्षांहून अधिक जुनी आहे. त्यांच्या २८ पब्लिक लिमिटेड कंपन्या आहेत. ऐंशीहून अधि देशांमध्ये त्यांचा कारभार आहे आणि पंचाऐंशीहून अधिक देशांमध्ये ते आपल्या वास्तू आणि सेवा निर्यात करतात. भारतात उद्योगाची छोटीशी सुरुवात केलेले ‘टाटा’, आता मोठ्या प्रमाणावर आंरराष्ट्रीय क्षेत्रात पोहोचले आहेत. समुहाच्या एकूण उत्पन्नापैकी ६५ टक्के उत्पन्नाचा भाग हा भारताबाहेरून येतो. सर्वांत अलीकडचा ताळेबंद ३१ मार्च २००९ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांत ७०.८ कोटी डॉलर्सचे उत्पन्न दाखवतो. तरीही ‘टाटा : एका कॉर्पोरेट ब्रँडची उत्क्रांती’ ही केवळ एका बलाढ्य आर्थिक संस्थेची यशोगाथा नाही. ही कहाणी आहे, टाटांच्या मूल्यांची : रोजच्या कामकाजाच्या मागे काय आहे; त्याचा डीएन आणि आपले सामाजिक ध्येय पूर्ण करताना ते आर्थिक कशाला दुय्यम प्राधान्य देतात’, त्याची. टाटा ब्रँडचे स्थान आणि त्याची मूल्य समजून घेताना चार महत्त्वाचे घटक लक्षात घ्यावे लागतील. एक म्हणजे, अगदी सुरुवातीपासून हे स्पष्ट होते की, टाटा समुहामध्ये काम करणाऱ्या विविध कंपन्यांचे ध्येय आणि काम हे सामाजिक असेल. मला माहीत असलेल्या जगातल्या सर्व कंपन्यांमध्ये ‘टाटा’ या बाबतीत एकमेव आहे. उद्योजकांनी स्थापन केलेल्या, मोठी आर्थिक संपत्ती मिळवलेल्या इतर मोठ्या कंपन्यांनी हे केले, पण त्यांनी आर्थिक संपत्ती निर्माण करण्यावर प्राधान्याने लक्ष केंद्रीत केले; समाजाला परतफेड करण्याचा निर्णय त्यानंतर आला. सहसा निवडलेले एकच सामाजिक कार्य करण्यासाठी या कंपन्यांच्या संस्थापकांनी सेवाभावी संस्था निर्माण केल्या. टाटांचे वेगळेपण यात आहे की, त्यांचे सामाजिक कार्य हे त्यांच्या एकूण ध्येयामध्ये एक कळीचा मुद्दा आहे. टाटांची कंपनी जिथे काम करते. त्या प्रदेशातल्या सामाजिक गरजा टाटा शोधून काढतात. प्रत्येक सुटी कंपनी ज्या समाजात काम करतो, तो समाज कशावर उभा आहे, ते शोधून काढतात आणि हेही शोधतात, की कशामुळे समाजात आशा आणि मूल्ये निर्माण होतील. तसेच भागधारक आणि कर्मचारी, भागीदार आणि नंतर सहयोगी घटकांसाठी आर्थिक मूल्यांची निर्मिती कशी होईल हेही बघितले जाते. इतर बहुतेक जागतिक कंपन्या ज्या मुद्द्यांवर जोखल्या जातात. त्या मुद्द्यांकडे लक्ष पुरवणे; हे या सुस्थापित, आंतरराष्ट्रीय संस्थेत सातत्याने चालू असते. आपण जेव्हा टाटांचे घोषवाक्य बघतो आणि प्रत्यक्ष कंपनीच्या अंतर्गत व्यवहाराकडे लक्षपूर्वक पाहतो. तेव्हा आपल्याला दिसते, की त्यांचा हेतू हा खरोखरच सामाजिक आहे. आणि संस्थेच्या आर्थिक पैलूंवर काम करतानासुद्धा हाच हेतू साहाय्यकारी ठरत आहे. त्यांचे वेगळेपण यातच आहे. बहुतेकशा पाश्चात्य देशांमध्ये संस्थेचा मोठा भाग हा आर्थिक प्रगती साध्य करण्यासाठी, ‘धंदा म्हणजे धंदा’ या तत्त्वावर काम करत असतो. हे फार संकुचित आहे. पाश्चात्य कंपन्यांनी आता हे समजून घेतले पाहिजे, की सामाजिक कार्य हे त्यांच्या एकूण ध्येयाचा एक भाग आहे. स्थानिक समाजातून स्थानिक बुद्धिमत्ता विकास पावते, हे पाश्चात्य जगाने समजून घेण्याची वेळ आली आहे. या कल्पनेशी टाटांनी स्वीकारलेली बांधिलकी दाखवणारे एक उदाहरण तामिळनाडूमधल्या दुर्गम भागातल्या होसूर गावी दिसून येते. १९८७ मध्ये टाटांनी स्थानिक सरकारबरोबर भागीदारीने व्यवसाय सुरू केला आणि टायटन घड्याळांचा पहिला कारखाना उभारला. कारखान्याठी लागणारे मनुष्यबळ कुठून आणायचे हा निर्णय ताबडतोब व्हायला हवा होता. बंगलोरहून व्यावसायिक अभियंते आणणे हा एक पर्याय होता. हे टाटांच्या बाण्याला अगदीच शोभण्याजोगे नव्हते. होसूरच्या आसपासचा प्रदेश अगदी गरीब! शेती हा जवळजवळ एकच उद्योग आणि स्थानिक पातळीवर कुशल कामगारांची अनुपलब्धता असली, तरीही कंपनीला हे पक्के ठाऊक होते, की हा प्रदेश आणि तिथली माणसे ही त्यांची जबाबदारी होती. गरिबी असली तरी प्राथमिक प्रदेश आणि तिथली माणसे ही त्यांची जबाबदारी होती. गरीबी असली तरी प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था चांगली होती आणि ती भरपूर सुशिक्षित मुले-मुली तयार करत होती. या नवीन भरतीतून जागतिक दर्जाचे घड्याळजी बनणार होते. चारशे तरुण लोकांना भरती करून होसूरमध्ये आणले गेले. टायटनने तात्काळ आवश्यक ती मदत दिली. कित्येकांनी यापूर्वी शहर कधी पाहिले नव्हते, की झोपडीशिवाय दुसरे घर पाहिले नव्हते. घरे बांधली गेली आणि ‘दत्तक पालक’ त्यांच्याबरोबर राहून शहरी वळणाचे, राहणीचे संस्कार त्यांच्यावर करू लागले. टायटनने क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम सुरू केले आणि कामानंतरच्या वेळात कामगारांना पदवीपर्यंतच नव्हे, तर पदव्युत्तर शिक्षणासाठीही मदत करायला सुरुवात केली. कारखान्यात प्रशिक्षक आणि अभियंते यांना अचूक यंत्र - प्रिसिजन मशिनरी - कशी वापरायची हे शिकवत होते. ‘टायटन’ हा आता एक अत्यंत यशस्वी उद्योग आहे आणि त्यात तामिळनाडूमधले हजारो लोक काम करतात. एकट्या होसूरमध्येच टायटनचे तीन कारखाने आहेत आणि तिथले बहुतांश कामगार आसपासच्या खेड्यांमधले आहेत. घड्याळाचे पट्टे आणि इतर आनुषंगिक गोष्टी बनवणाऱ्या उद्योगांमध्ये आणखी हजारोजणांना अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळाला आहे. २००१ मध्ये टायटनची ‘भारताचा सर्वांत प्रशंसनीय ब्रँड’ म्हणून निवड झाली आणि तिने आपले ‘सामाजिक संस्था’पण पुन्हा एकदा सिद्ध केले. शेवटी, टाटांनी हे एकदाच ठरवून टाकले आहे आणि ते त्यांच्या आर्थिक आणि बाजारातल्या कामागिरीवरून दिसून येते, की सामाजिक हेतू असल्यामुळे स्पर्धेची आणि जिंकण्याची तीव्रता जराही कमी होत नाही. खर तर, उलटेच घडते. उघडच आहे, की टाटा केवळ निवडलेल्या बाजारपेठेत सर्वोच्च स्थान मिळवतात आणि टिकवतात एवढेच नव्हे, तर भागधारकांसह सर्व घटकांसाठी दीर्घकालीन मूल्यनिर्मिती करण्यात अव्वल आहेत. त्याचवेळी ते सामाजिकदृष्ट्या जबाबदार, अतिशय गुणवान व्यवस्थापक आणि नेते घडवून भारतात आणि बाहेरच्या देशात निर्यातही करतात. या सगळ्या कल्पना ‘विश्वास’ या तीन अक्षरी शब्दांत सामावलेल्या आहेत. पुष्कळ कंपन्यांच्या उक्तीत तो असतो, पण कृतीत नसतो. टाटामध्ये काम करणाऱ्यांच्या रक्तातच तो आहे. ती एक वृत्ती आहे. वेगळेपण आहे. भविष्यात सर्व कंपन्यांसाठी ते एक मानक आहे, आणि ते ‘टाटा’ आहे. माझ्या व्यावसायिक कामानिमित्ताने मला युरोप आणि अमेरिकेत अशा सीईओची नावे विचारली जातात. ज्यांना युरोपियन आणि अमेरिकन संचालक मंडळावर घेता येईल. रतन टाटांचे नाव नेहमीच पहिले येते. नम्र, विनयी, विचारी, पाश्चात्य समाजासाठी दुर्मीळ अशा अनुभवाने समृद्ध असे त्यांचे वर्णन केले जाते. भविष्यात नेतृत्व करू शकतील अशांमध्ये हेच तर सारे अपेक्षित असते. मॉर्गन विट्झेल यांनी कष्टपूर्वक आणि सांगोपांग रीतीने हे संशोधन पूर्ण केले आहे. त्यांच्या निरीक्षणातून त्यांनी हे दाखवून दिले आहे, की टाटांचा सामाजिक हेतू हा टाटा ब्रँडमध्ये परावर्तित झाला आहे आणि हा एक ‘प्रसिद्धी’चा दिखावा नसून सत्य आहे. तो स्फूर्तिदायक आहे. तो प्रत्यक्ष आहे. मला वाटते ही कहाणी म्हणजे इतर संस्थांसाठी एक आव्हान आहे. या पुस्तकात ही सर्व कहाणी आहे. -राम चरण ...Read more

  • Rating StarDAINIK SAGAR 05-06-2016

    टाटा ब्रँड म्हणजे आहे तरी काय? काय आहेत त्याची मूल्यं? जगातील आणि भारतातील लोकांना त्यातून काय समजतं? या रंजक आणि माहितीपूर्ण पुस्तकात मॉर्गन विटझेल टाटांच्या हृदयाचा ठाव घेतात, त्याचे मूळ समजावून सांगतात. टाटांच नाव आणि प्रतिमा कशी निर्माण होत गेली णि या प्रतिमेचं रुपांतर एका बलवान आणि मौल्यवान ब्रँडमध्ये करण्यासाठी या उद्यांगसमूहाने काय केलं, याचं वर्णन करतात. ‘टाटा’ १४० वर्षाहून अधिक जूनी आहे. त्यांच्या २८ पब्लिक लिमिटेड कंपन्या आहेत. ऐंशीहून अधिक देशामध्ये त्यांचा बारभार आहे. आणि पंच्याऐंशीहून अधिक देशामध्ये ते आपल्या वस्तू आणि सेवा निर्यात करतात. टाटांचे वेगळेपण यात आहे की, त्यांचे सामाजिक कार्य हे त्यांच्या एकूण ध्येयामध्ये समाविष्ट आहे. कंपनीच्या स्थानिक परिस्थितीची गरज लक्षात घेऊन ते भागधारक, कर्मचारी, भागीदार यांच्यासाठी आर्थिक मूल्यांची निर्मिती करतात. मराठी अनुवाद विदुला टोकेकर यांनी केला असून प्रस्तावना राम चरण यांनी लिहिली आहे. एका आदर्श कंपनीचे अंतरंग वाचनीय असे आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more