* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TATA – THE EVOLUTION OF A CORPORATE BRAND
  • Availability : Available
  • Translators : VIDULA TOKEKAR
  • ISBN : 9788184982992
  • Edition : 4
  • Publishing Year : FEBRUARY 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 232
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A SERIES OF HIGH-PROFILE ACQUISITIONS, INCLUDING JAGUAR LAND ROVER AND CORUS STEEL, TOGETHER WITH THE LAUNCH OF THE NANO (THE WORLD S FIRST RS. 1 LAKH/ BELOW US$ 2500 CAR), IS SET TO CHANGE OUR PERCEPTION OF INDIA`: ON THE THRESHOLD OF BECOMING A TRULY GLOBAL BRAND.*S OLDEST AND MOST RESPECTED CORPORATE BRAND. WITH A MAJOR INTERNATIONAL PRESENCE, IN A VARIETY OF AREAS INCLUDING STEEL, TEA, CHEMICALS, COMMUNICATIONS AND SOFTWARE, TATA NOW STANDS 65TH IN THE WORLD BRAND VALUATION LEAGUE. BUT WHAT IS THE TATA BRAND ALL ABOUT? WHAT ARE ITS VALUES? HOW DO PEOPLE PERCEIVE IT, IN INDIA AND AROUND THE WORLD? IN THIS ABSORBING AND INFORMED BOOK MORGEN WITZEL DIGS INTO THE HEART OF THE TATA ENTERPRISE, DESCRIBES ITS ORIGINS, HOW TATA`S REPUTATION AND IMAGE EVOLVED, AND HOW THE GROUP HAS WORKED TO TRANSFORM THAT IMAGE INTO A POWERFUL AND VALUABLE BRAND. TATA: THE EVOLUTION OF A CORPORATE BRAND GOES TO THE CORE OF THE TATA ETHOS TO EXPLORE THE UNIQUE RELATIONSHIP BETWEEN THE TATA GROUP AND THE INDIAN PEOPLE, A RELATIONSHIP THAT GOES BEYOND THE ACHIEVEMENTS OF A SUCCESSFUL BUSINESS TO ITS SOCIAL CONTRIBUTIONS FOR ITS EMPLOYEES AND THE SOCIETY AT LARGE. FINALLY IT ASKS HOW THAT REPUTATION WILL BE PERCEIVED AND UNDERSTOOD AS TATA MOVES INTO GLOBAL MARKETS. WHETHER YOU RE AN ENTREPRENEUR, A MANAGER, A MARKETER, OR AN INTERESTED TATA LOYALIST THIS BOOK WILL HELP YOU UNDERSTAND THE DURABILITY OF THE BRAND AND INSPIRE YOU WITH THE VALUES IT HOLDS ONTO IN THE GLOBAL ECONOMY.
टाटा ब्रांड म्हणजे आहे तरी काय ? काय आहेत त्यांची मुल्ये ? जगातील आणि भारतातील लोकांना त्यातून काय समजते? या रंजक आणि माहितीपूर्ण पुस्तकात मोर्गेन विट्झेल टाटांच्या हृदयाचा ठाव घेतात,त्याचे मूळ समजावून सांगतात,टाटांच नाव आणि प्रतिमा कशी निर्माण होत गेली, आणि या प्रतिमेचं रुपांतर एका बलवान आणि मौल्यवान ब्रांड मध्ये करण्यासाठी या उद्योगसमूहाने काय केलं,याचं वर्णन करतात.

No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #MORGEN WITZEL #VIDULA TOKEKAR #टाटा-एका कॉर्पोरेट ब्रँडची उत्क्रांती #TATA – THE EVOLUTION OF A CORPORATE BRAND #BIOGRAPHY
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA 21-05-2017

    यशस्वी उद्योगाची यशोगाथा... जगातल्या बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये ‘टाटा’ ही विशेष आहे. केवळ आर्थिक नफा हे त्यांचे ध्येय नसून, ते सामाजिक आणि आर्थिक दोन्हीही आहे. ‘टाटा’ १४० वर्षांहून अधिक जुनी आहे. त्यांच्या २८ पब्लिक लिमिटेड कंपन्या आहेत. ऐंशीहून अधि देशांमध्ये त्यांचा कारभार आहे आणि पंचाऐंशीहून अधिक देशांमध्ये ते आपल्या वास्तू आणि सेवा निर्यात करतात. भारतात उद्योगाची छोटीशी सुरुवात केलेले ‘टाटा’, आता मोठ्या प्रमाणावर आंरराष्ट्रीय क्षेत्रात पोहोचले आहेत. समुहाच्या एकूण उत्पन्नापैकी ६५ टक्के उत्पन्नाचा भाग हा भारताबाहेरून येतो. सर्वांत अलीकडचा ताळेबंद ३१ मार्च २००९ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांत ७०.८ कोटी डॉलर्सचे उत्पन्न दाखवतो. तरीही ‘टाटा : एका कॉर्पोरेट ब्रँडची उत्क्रांती’ ही केवळ एका बलाढ्य आर्थिक संस्थेची यशोगाथा नाही. ही कहाणी आहे, टाटांच्या मूल्यांची : रोजच्या कामकाजाच्या मागे काय आहे; त्याचा डीएन आणि आपले सामाजिक ध्येय पूर्ण करताना ते आर्थिक कशाला दुय्यम प्राधान्य देतात’, त्याची. टाटा ब्रँडचे स्थान आणि त्याची मूल्य समजून घेताना चार महत्त्वाचे घटक लक्षात घ्यावे लागतील. एक म्हणजे, अगदी सुरुवातीपासून हे स्पष्ट होते की, टाटा समुहामध्ये काम करणाऱ्या विविध कंपन्यांचे ध्येय आणि काम हे सामाजिक असेल. मला माहीत असलेल्या जगातल्या सर्व कंपन्यांमध्ये ‘टाटा’ या बाबतीत एकमेव आहे. उद्योजकांनी स्थापन केलेल्या, मोठी आर्थिक संपत्ती मिळवलेल्या इतर मोठ्या कंपन्यांनी हे केले, पण त्यांनी आर्थिक संपत्ती निर्माण करण्यावर प्राधान्याने लक्ष केंद्रीत केले; समाजाला परतफेड करण्याचा निर्णय त्यानंतर आला. सहसा निवडलेले एकच सामाजिक कार्य करण्यासाठी या कंपन्यांच्या संस्थापकांनी सेवाभावी संस्था निर्माण केल्या. टाटांचे वेगळेपण यात आहे की, त्यांचे सामाजिक कार्य हे त्यांच्या एकूण ध्येयामध्ये एक कळीचा मुद्दा आहे. टाटांची कंपनी जिथे काम करते. त्या प्रदेशातल्या सामाजिक गरजा टाटा शोधून काढतात. प्रत्येक सुटी कंपनी ज्या समाजात काम करतो, तो समाज कशावर उभा आहे, ते शोधून काढतात आणि हेही शोधतात, की कशामुळे समाजात आशा आणि मूल्ये निर्माण होतील. तसेच भागधारक आणि कर्मचारी, भागीदार आणि नंतर सहयोगी घटकांसाठी आर्थिक मूल्यांची निर्मिती कशी होईल हेही बघितले जाते. इतर बहुतेक जागतिक कंपन्या ज्या मुद्द्यांवर जोखल्या जातात. त्या मुद्द्यांकडे लक्ष पुरवणे; हे या सुस्थापित, आंतरराष्ट्रीय संस्थेत सातत्याने चालू असते. आपण जेव्हा टाटांचे घोषवाक्य बघतो आणि प्रत्यक्ष कंपनीच्या अंतर्गत व्यवहाराकडे लक्षपूर्वक पाहतो. तेव्हा आपल्याला दिसते, की त्यांचा हेतू हा खरोखरच सामाजिक आहे. आणि संस्थेच्या आर्थिक पैलूंवर काम करतानासुद्धा हाच हेतू साहाय्यकारी ठरत आहे. त्यांचे वेगळेपण यातच आहे. बहुतेकशा पाश्चात्य देशांमध्ये संस्थेचा मोठा भाग हा आर्थिक प्रगती साध्य करण्यासाठी, ‘धंदा म्हणजे धंदा’ या तत्त्वावर काम करत असतो. हे फार संकुचित आहे. पाश्चात्य कंपन्यांनी आता हे समजून घेतले पाहिजे, की सामाजिक कार्य हे त्यांच्या एकूण ध्येयाचा एक भाग आहे. स्थानिक समाजातून स्थानिक बुद्धिमत्ता विकास पावते, हे पाश्चात्य जगाने समजून घेण्याची वेळ आली आहे. या कल्पनेशी टाटांनी स्वीकारलेली बांधिलकी दाखवणारे एक उदाहरण तामिळनाडूमधल्या दुर्गम भागातल्या होसूर गावी दिसून येते. १९८७ मध्ये टाटांनी स्थानिक सरकारबरोबर भागीदारीने व्यवसाय सुरू केला आणि टायटन घड्याळांचा पहिला कारखाना उभारला. कारखान्याठी लागणारे मनुष्यबळ कुठून आणायचे हा निर्णय ताबडतोब व्हायला हवा होता. बंगलोरहून व्यावसायिक अभियंते आणणे हा एक पर्याय होता. हे टाटांच्या बाण्याला अगदीच शोभण्याजोगे नव्हते. होसूरच्या आसपासचा प्रदेश अगदी गरीब! शेती हा जवळजवळ एकच उद्योग आणि स्थानिक पातळीवर कुशल कामगारांची अनुपलब्धता असली, तरीही कंपनीला हे पक्के ठाऊक होते, की हा प्रदेश आणि तिथली माणसे ही त्यांची जबाबदारी होती. गरिबी असली तरी प्राथमिक प्रदेश आणि तिथली माणसे ही त्यांची जबाबदारी होती. गरीबी असली तरी प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था चांगली होती आणि ती भरपूर सुशिक्षित मुले-मुली तयार करत होती. या नवीन भरतीतून जागतिक दर्जाचे घड्याळजी बनणार होते. चारशे तरुण लोकांना भरती करून होसूरमध्ये आणले गेले. टायटनने तात्काळ आवश्यक ती मदत दिली. कित्येकांनी यापूर्वी शहर कधी पाहिले नव्हते, की झोपडीशिवाय दुसरे घर पाहिले नव्हते. घरे बांधली गेली आणि ‘दत्तक पालक’ त्यांच्याबरोबर राहून शहरी वळणाचे, राहणीचे संस्कार त्यांच्यावर करू लागले. टायटनने क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम सुरू केले आणि कामानंतरच्या वेळात कामगारांना पदवीपर्यंतच नव्हे, तर पदव्युत्तर शिक्षणासाठीही मदत करायला सुरुवात केली. कारखान्यात प्रशिक्षक आणि अभियंते यांना अचूक यंत्र - प्रिसिजन मशिनरी - कशी वापरायची हे शिकवत होते. ‘टायटन’ हा आता एक अत्यंत यशस्वी उद्योग आहे आणि त्यात तामिळनाडूमधले हजारो लोक काम करतात. एकट्या होसूरमध्येच टायटनचे तीन कारखाने आहेत आणि तिथले बहुतांश कामगार आसपासच्या खेड्यांमधले आहेत. घड्याळाचे पट्टे आणि इतर आनुषंगिक गोष्टी बनवणाऱ्या उद्योगांमध्ये आणखी हजारोजणांना अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळाला आहे. २००१ मध्ये टायटनची ‘भारताचा सर्वांत प्रशंसनीय ब्रँड’ म्हणून निवड झाली आणि तिने आपले ‘सामाजिक संस्था’पण पुन्हा एकदा सिद्ध केले. शेवटी, टाटांनी हे एकदाच ठरवून टाकले आहे आणि ते त्यांच्या आर्थिक आणि बाजारातल्या कामागिरीवरून दिसून येते, की सामाजिक हेतू असल्यामुळे स्पर्धेची आणि जिंकण्याची तीव्रता जराही कमी होत नाही. खर तर, उलटेच घडते. उघडच आहे, की टाटा केवळ निवडलेल्या बाजारपेठेत सर्वोच्च स्थान मिळवतात आणि टिकवतात एवढेच नव्हे, तर भागधारकांसह सर्व घटकांसाठी दीर्घकालीन मूल्यनिर्मिती करण्यात अव्वल आहेत. त्याचवेळी ते सामाजिकदृष्ट्या जबाबदार, अतिशय गुणवान व्यवस्थापक आणि नेते घडवून भारतात आणि बाहेरच्या देशात निर्यातही करतात. या सगळ्या कल्पना ‘विश्वास’ या तीन अक्षरी शब्दांत सामावलेल्या आहेत. पुष्कळ कंपन्यांच्या उक्तीत तो असतो, पण कृतीत नसतो. टाटामध्ये काम करणाऱ्यांच्या रक्तातच तो आहे. ती एक वृत्ती आहे. वेगळेपण आहे. भविष्यात सर्व कंपन्यांसाठी ते एक मानक आहे, आणि ते ‘टाटा’ आहे. माझ्या व्यावसायिक कामानिमित्ताने मला युरोप आणि अमेरिकेत अशा सीईओची नावे विचारली जातात. ज्यांना युरोपियन आणि अमेरिकन संचालक मंडळावर घेता येईल. रतन टाटांचे नाव नेहमीच पहिले येते. नम्र, विनयी, विचारी, पाश्चात्य समाजासाठी दुर्मीळ अशा अनुभवाने समृद्ध असे त्यांचे वर्णन केले जाते. भविष्यात नेतृत्व करू शकतील अशांमध्ये हेच तर सारे अपेक्षित असते. मॉर्गन विट्झेल यांनी कष्टपूर्वक आणि सांगोपांग रीतीने हे संशोधन पूर्ण केले आहे. त्यांच्या निरीक्षणातून त्यांनी हे दाखवून दिले आहे, की टाटांचा सामाजिक हेतू हा टाटा ब्रँडमध्ये परावर्तित झाला आहे आणि हा एक ‘प्रसिद्धी’चा दिखावा नसून सत्य आहे. तो स्फूर्तिदायक आहे. तो प्रत्यक्ष आहे. मला वाटते ही कहाणी म्हणजे इतर संस्थांसाठी एक आव्हान आहे. या पुस्तकात ही सर्व कहाणी आहे. -राम चरण ...Read more

  • Rating StarDAINIK SAGAR 05-06-2016

    टाटा ब्रँड म्हणजे आहे तरी काय? काय आहेत त्याची मूल्यं? जगातील आणि भारतातील लोकांना त्यातून काय समजतं? या रंजक आणि माहितीपूर्ण पुस्तकात मॉर्गन विटझेल टाटांच्या हृदयाचा ठाव घेतात, त्याचे मूळ समजावून सांगतात. टाटांच नाव आणि प्रतिमा कशी निर्माण होत गेली णि या प्रतिमेचं रुपांतर एका बलवान आणि मौल्यवान ब्रँडमध्ये करण्यासाठी या उद्यांगसमूहाने काय केलं, याचं वर्णन करतात. ‘टाटा’ १४० वर्षाहून अधिक जूनी आहे. त्यांच्या २८ पब्लिक लिमिटेड कंपन्या आहेत. ऐंशीहून अधिक देशामध्ये त्यांचा बारभार आहे. आणि पंच्याऐंशीहून अधिक देशामध्ये ते आपल्या वस्तू आणि सेवा निर्यात करतात. टाटांचे वेगळेपण यात आहे की, त्यांचे सामाजिक कार्य हे त्यांच्या एकूण ध्येयामध्ये समाविष्ट आहे. कंपनीच्या स्थानिक परिस्थितीची गरज लक्षात घेऊन ते भागधारक, कर्मचारी, भागीदार यांच्यासाठी आर्थिक मूल्यांची निर्मिती करतात. मराठी अनुवाद विदुला टोकेकर यांनी केला असून प्रस्तावना राम चरण यांनी लिहिली आहे. एका आदर्श कंपनीचे अंतरंग वाचनीय असे आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो